Articles on Various issues related to common man. जनमतांचा प्रहार जनवार्ता न्युज राष्ट्रीय,सामाजिक,राजकीय,आरोग्य,भारताचा इतीहास,देश आणी विदेशातील घडामोडी जनते समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
नगरसेवक झोपले आयुक्तचा दालनात- Ahmednagar Corporation
मुकुंदनगर मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी
आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन
समस्या न सुटल्यास बजेटच्या सभेमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा.
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर प्रभाग 3 मधील पिण्याच्या पाणीचा प्रश्न गंभीर बनला असून, या भागात नागरिकांना दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत आहे. पाणी प्रश्नासह घनकचरा, ड्रेनेजलाईन, बंद पथदिवे व रस्त्यांच्या प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती सदर प्रश्न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे आज झोपा काढा आंदोलन करण्यात आले.
मुकुंदनगर प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असून, याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार असून, सदर परिसर मुस्लिम बहुल भाग असल्याने या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या भागातील प्रामुख्याने नशेमन कॉलनी, इशरद पार्क, छोटी मरियम मस्जिद, जीशान कॉलनी, एन.एम. गार्डन परिसर, सी.आय.व्ही. सोसायटी, नम्रता कॉलनी, सहारा सिटी, मेहराज मस्जिद परिसर, दर्गा दायरा, शहाशरीफ पार्क, संजोगनगर, दगडी चाल, अमर कॉम्प्लेक्स, अमन कॉलनी, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, हुसेनी कॉलनी, सहाजी पार्क, बिहारी चाल, कौसर बाग, दरबार कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, अलमास पार्क, बजाज कॉलनी, इक्रा स्कूल परिसर व बरेच ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामध्ये फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली आहे. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देण्यात यावे. पाण्याची टाकी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करण्यात यावे व प्रभागांमधील वॉल मॅनचा वेळ वाया जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, या भागात 35 ते 40 हजार लोकसंख्या राहत आहे. त्याप्रमाणे येथे कर्मचारींचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने प्रभाग पुर्णपणे स्वच्छ होत नाही. या समस्यांचा कायमस्वरूपी निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडू कामगारांची संख्या वाढवण्यात यावी, कामगारांना छोटे कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात यावे, घंटागाडीची संख्या वाढवण्यात यावी. या भागांमध्ये ड्रेनेजलाईन तुंबून रस्त्यावरुन घाण पाणी वाहत असल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली आहे. ड्रेनेजचे पाईप खचले असून ते दुरुस्त करून नवीन लाईन टाकण्यात यावी. प्रभागात काही ठिकाणी पथदिवे नसून व काही ठिकाणी बंद पडले आहे. परिणामी अंधारामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, अनेकवेळा अपघातही होत आहे. तरी बंद पथदिवे दुरुस्त करावे. शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून, ती त्वरीत कार्यान्वीत करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे मुकुंद नगर मधील नागरी समस्या न सुटल्यास बजेट ची सर्वसाधारण ची सभा होणार आहे त्यामध्ये नगरसेवक आसिफ सुलतान यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
वाचा -
मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई -FDA...
वासिम रिझवी विरोधात कोपरगावात एम आय एम तर्फे निवेदन - AIMIM ...
खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा - FDA MUMBAI...
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
-
कलम १६ कलम २१ काय आहे? माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद...
-
उज्ज्वला योजना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या भागातील महिलांचे जीवन सुधारावे यासाठी शासनाने महिलांचा. धूर. आरोग्य ...
-
खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील...