अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र हा सध्या कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील भयंकर परिस्थितितुन जात असून अश्या परिस्थितीतून जात आहे व अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाच्या उद्रेक पायला मिळत आहे या परिस्थिति मध्ये मुस्लिम समाजाचा पवित्र रमज़ान महीना संपन्न होत असून शेवट चे 4 दिवस उरले आहे येत्या 14 तारखेला रमज़ान ईद व अक्षयतृतीया ह्या सणा निम्मित प्रशासनाच्या नियमाचे पालन करीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 12 चालु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजीम राजे समवेत राजु जहागिरदार, राजेंद्र गायकवाड, मुन्ना भाई, जहीर सय्यद, मोहम्मद हुसैन, शफी खान, तौसिफ शेख आदि उपस्थित होते रमज़ान ईदला शीरखुर्मा साठी लागणाऱ्या किराना सामान व अन्य वस्तु साठी प्रशासनाने काही प्रमाणात अत्यावश्यक दुकानाना सूट द्यावी जेणे करुण नागरिकांना ईद व अक्षय तृतीया साठी लागणाऱ्या किराना खरेदी करता येईल व उत्साह ने रमज़ान ईद व अक्षयतृतीया दोन्ही सण घरच्या घरी साजरी करता येईल
मागच्या वर्षी कोरोनाच्या महामारीत मुस्लिम बांधवानी साध्या पद्धतीने घरी ईद साजरी केली होती तसेच यावर्षीही घरी ईद साजरी करण्यात येत असून परंतु ईद साठी लागणाऱ्या डायफ्रूट व किराना सामानसाठी अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 12 चालू ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching....
सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई...
No comments:
Post a Comment