बहादूरशाह जफर यांच्या विचारांनी भारतीय राष्ट्रवादाला बळ मिळते- आबीद खान
अहमदनगर- ब्रिटीश राजवट उलथून भारतीयांचे राज्य आणू पाहणारे एक अग्रगण्य सेनानी म्हणून आपण स्वातंत्र्य सेनानी बहादूर शाह जफर यांचा अभिमानाने उल्लेख करु शकतो.आजच्या व्यामिप्र आणि गुंतागुंतीच्या कालखंडात बहुसंख्येच्या जमातवाढाला राष्ट्रवादाचे स्थान प्राप्त होत असतांना खराखुर्या एकात्म भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक असणार्या बहादूरशाह जफर यांची आठवण करणे आणि त्यांच्या विचारांचा प्रकाशात आधुनिक भारतीय राष्ट्रवादाला बळ देणे यासाठीच त्यांची जयंती साजरी व्हावी. असे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
मखदूम सोसायटी, रहेमत सुलतान फौंडेशन, मुस्कान असोसिएशन च्यावतीने स्वातंत्र्य सेनानी बहादूर शाह जफर यांची जयंती रहेमत सुलतान सभागृह येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून युनूसभाई तांबटकर, आर्कि.फिरोज शेख,आरिफ सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्ती गीत अबरार शेख यांनी सादर केले. तर नादीर खान यांनी बहादूर शाह जफर यांची
‘ना किसी की आँखका नूर हूं... ना किसी के दिल का करार हूं... जो किसी के काम न आ सके... मै वो एक मुश्के गुबार हूं...’ ही कविता सादर केली.
पुढे बोलतांना आबीद खान म्हणाले बहादूर शाह जफर केवळ अखेरचे मुघल सम्राट नव्हे तर 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचा महानायक होते. म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांना रंगून येथे कैदेत ठेवले. जोपर्यंत ते जिवंत होते. तोपर्यंत ब्रिटीशांना सतत उठावाची भीती वाटत होती. परिणामी मृत्यूनंतरही त्यांचे पार्थिव भारतात आणले नाही. त्यांचा तिथेच दफन विधी करण्यात आला.
मुघलाबद्दल द्वेष बाळगणार्यांना उद्देशून ख्यातनाम कवी शंकरराव दिघे
‘या शतकाचा सातबारा होईल कोरा’ या कविता संग्रहात लिहितात -
‘हिंदूस्तां की सरजमीं पें मचलने वाले मुगलों ने... कभी सपने में भी म्यानमार नही देखा था।
और जफर को भी दिल्ली से ज्यादा रंगून पसंद नही था !
याप्रसंगी युनूसभाई तांबटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे महानायक बहादूरशाह जफर ब्रिटीश साम्राज्यशाही विरोधी सशस्त्र संघर्षाचे अग्रगण्य सेनानी महामानवाला आज अभिवादन करण्यात आले. हे महापुषरु भारताच्या गंगा जमनी किंवा एकात्मता विचार प्रवाहाचे प्रतिनिधी आहेत.
प्रास्तविकात मुस्कान असोसिएशन चे अध्यक्ष शफकत सय्यद यांनी सांगितले की, आपण आज स्वत:चे वाढदिवस थाटबाटात साजरे करत असतो, पण ज्यांच्यामुळे आज आपण देशात स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात फार उदासिनता जाणवते. हे समाजाचे दुर्भाग्य आहे, असे नमुद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्कि.फिरोज शेख यांनी केले. आभार आरिफ सय्यद, यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी , रेहान शेख,आरिफ सय्यद,नादिर खान,तारीक शेख व संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
वाचा -
बहादूरशाह जफर यांच्या विचारांनी भारतीय राष्ट्रवादाला बळ मिळते- आबीद खान...
सर सय्यद अहमदखान यांनी शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड दिली - युनुसभाई तांबटकर....
No comments:
Post a Comment