अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar

 

 


अहमदनगर -

काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील परिस्तीत चिंताजनक होत चालली आहे. महाराष्ट्र राज्यात करोना विषाणू ने थैमान घातला आहे. अहमदनगर जिल्हातही रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण संख्या जास्त आणि सुविधा कमी जाणवत आहे. मागील १५ ते २० दिवसापासून इंजेक्शन रेम्दिसेवीर व ऑक्सिजन चा तुटवडा जास्त जाणवत आहे. सामान्य जनतेत अशी अस्था तयार झाली आहे की जर हा इंजेक्शन दिला तर आमचा रुग्ण बरे होणार. त्यामुळे नातेवाईक पाहिजेल तितके पैसे इनजेक्शन साठी मोजण्यात तयार होत आहे. त्याच बरोबर अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला ऑक्सिजन तयार करणारे लिक्वीड मिळत नसल्याने प्लांट ऑक्सिजन तयार करणे शक्य नाही. लिक्वीड आणि इंजेक्शन हे अन्न व औषध प्रशासन यांच्या इखत्यारीत असल्याने अशी बातमी येत आहे की अन्न व औषध प्रशासनाने लिक्वीड पुरवणारी कंपनीला अहमदनगर येते लिक्वीड न देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ती कंपनी अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांट ला लिक्वीड देत नाही.त्याच अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांनी इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा स्वतःच्या हातात घेतले असून सर्व रुग्णालयाला ८०% खाट कोविडसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे. मागील ६ दिवसापासून जील्हा अधिकारी कार्यालयातून सर्व रुग्णालयांना संपर्क करून त्यांची ऑक्सिजन आणि इंजेक्शन ची रोजची किती मागणी आहे याची माहिती घेतली जात असून काही रुग्णालयांना आलेल्या ऑक्सिजन पैकी जास्त ऑक्सिजन देण्यात येत आहे तर काहींना काहीच दिले जात नाही. सध्या इंजेक्शन व ऑक्सिजनचा इतका तुटवडा असून अहमदनगर येथील प्लांट ला लिक्वीड पुरवठा न करण्याचे अन्न व औषध प्रशासन आदेश मंजे अधिकरिंच्या राजकारण मुळे सामण्या जनतेच्या जीवाशी खेळणे. सध्या जबाबदार कोणाला धरण्या पेक्षा पुरवठा सुरळीत कसे होईल या साठी काम करणे गरजेचे आहे.असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी तर्फे मुख्य मंत्री साहेबांना देण्यात आले आहे.  


पत्रात पुढे लिहिले आहे की अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी संपर्क शेत्राच्या बाहेर आहे. मुंबई अन्न व औषध प्रशासन कडून एका व्यक्तीचा नंबर घेतले असता त्यांनी फोन ही घेतला नाही आणि मेसेज ला प्रतिसादही दिले नाही. अहमदनगर जिल्हा अधिकारी व निवासी जिल्हा अधिकारी यांना देखील प्लांट बंद असल्याचे माहीत आहे. परंतु कोणीही त्यावर लक्ष केंद्रित करण्यास तयार नाही. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील मृत्यूचा प्रमाण ऑक्सिजन बेड न मिळाल्याने वाडले असावे असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्य मंत्री साहेबांना सदर प्रकरणात योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर अहमदनगर येथील प्लांट सुरू करण्याचे व संबंधित प्लांट ला ऑक्सिजन लिक्वीड पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख,मुफ्ती अल्ताफ साहेब, नगर सेवक असिफ सुलतान,ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख, एम आय एम शहर युवा अध्यक्ष अमीर खान, सलमान खान, समीर बेग,आरिफ सय्यद,आदींचे सह्या आहेत.


डाँ.परवेज अशरफी 

9890006580

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug...

ग्रामपंचायतीत १५% निधी आणि मागासवर्गीय उन्नती -Grampanchayat Maharashtra....

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश...

वारस नोंद चा कायदा - ....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या