ईद चे औचित्य साधून मुस्लिम समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर साठी रोख रकमेची मदत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांच्याकडे केली सुपूर्त. Eid e Milad

ईद निमित्त मुस्लीम समाजाने केली ग्रामीण रुग्णालयाला मदत

ईद चे औचित्य साधून मुस्लिम समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर साठी रोख रकमेची मदत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांच्याकडे केली सुपूर्त.



श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) इस्लाम धर्माचे संस्थापक , प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती श्रीगोंद्यात ही आपापल्या घरी साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुलूस , शोभायात्रा न काढता अत्यंत साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. मात्र सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक बांधिलकी समजून तालुक्यातील मुस्लिम बांधव व सहयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. ६५ जणांनी आपले रक्त दान केले. अहमदनगर येथील अर्पण रक्तपेढीने हे रक्त संकलन केले.
पैगंबर जयंती च्या पवित्र व आनंदाच्या दिवशी हे शिबिर घेण्यात आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व मजहर सय्यद यांनी देखील रक्तदान करून पुण्य पदरात पाडून घेतले व आपला रक्तदानाचा हक्क बजावला.


अजिम जकाते , निसार हकीम , अस्लम शेख , लियाकत तांबोळी , देशमुख , मोहन भिंताडे , इरफान पिरजादे , शकुर शेख , इरफान काझी , अल्ताफ शेख , खालील पठाण , सद्दाम जकाते , मुजफ्फर कुरेशी , इरफान कुरेशी , अयाज कुरेशी , अर्शद शेख , सतीश सूद्रिक , प्रविण शेलार , मुजाहिद शेख , रियाज तांबोळी , जैद आतार , अब्दुल रहीम जकाते , जावेद शेख , आदींसह ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ५ युवकांनी प्लाझा डोनेट करण्याची तयारी दर्शविल्याने रक्तपेढीने त्यांची तपासणी केली आहे.


डॉ. अरुण रोडे यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन या चांगल्या उपक्रमाचे कौतुक करत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांनी ईद - ए - मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी देऊ केलेल्या मदतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. वसीम जमादार यांच्यासह सहयोग फाऊंडेशन चे सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

वाचा -



मखदुम,मुस्कान व रहमत सुलतान तर्फे बहादुरशाह जफर यांना अभिवादन

बहादूरशाह जफर यांच्या विचारांनी भारतीय राष्ट्रवादाला बळ मिळते- आबीद खान 

अहमदनगर- ब्रिटीश राजवट उलथून भारतीयांचे राज्य आणू पाहणारे एक अग्रगण्य सेनानी म्हणून आपण स्वातंत्र्य सेनानी बहादूर शाह जफर यांचा अभिमानाने उल्लेख करु शकतो.आजच्या व्यामिप्र आणि गुंतागुंतीच्या कालखंडात बहुसंख्येच्या जमातवाढाला राष्ट्रवादाचे स्थान प्राप्त होत असतांना खराखुर्‍या एकात्म भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक असणार्‍या बहादूरशाह जफर यांची आठवण करणे आणि त्यांच्या विचारांचा प्रकाशात आधुनिक भारतीय राष्ट्रवादाला बळ देणे यासाठीच त्यांची जयंती साजरी व्हावी. असे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले. 

मखदूम सोसायटी, रहेमत सुलतान फौंडेशन, मुस्कान असोसिएशन च्यावतीने स्वातंत्र्य सेनानी बहादूर शाह जफर यांची जयंती रहेमत सुलतान सभागृह येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून युनूसभाई तांबटकर, आर्कि.फिरोज शेख,आरिफ सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्ती गीत अबरार शेख यांनी सादर केले. तर नादीर खान यांनी बहादूर शाह जफर यांची

 ‘ना किसी की आँखका नूर हूं... ना किसी के दिल का करार हूं... जो किसी के काम न आ सके... मै वो एक मुश्के गुबार हूं...’ ही कविता सादर केली. 

 पुढे बोलतांना आबीद खान म्हणाले बहादूर शाह जफर केवळ अखेरचे मुघल सम्राट नव्हे तर 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचा महानायक होते. म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांना रंगून येथे कैदेत ठेवले. जोपर्यंत ते जिवंत होते. तोपर्यंत ब्रिटीशांना सतत उठावाची भीती वाटत होती. परिणामी मृत्यूनंतरही त्यांचे पार्थिव भारतात आणले नाही. त्यांचा तिथेच दफन विधी करण्यात आला.

 मुघलाबद्दल द्वेष बाळगणार्‍यांना उद्देशून ख्यातनाम कवी शंकरराव दिघे 

‘या शतकाचा सातबारा होईल कोरा’ या कविता संग्रहात लिहितात - 

‘हिंदूस्तां की सरजमीं पें मचलने वाले मुगलों ने... कभी सपने में भी म्यानमार नही देखा था।

और जफर को भी दिल्ली से ज्यादा रंगून पसंद नही था !

         याप्रसंगी युनूसभाई तांबटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे महानायक बहादूरशाह जफर ब्रिटीश साम्राज्यशाही विरोधी सशस्त्र संघर्षाचे अग्रगण्य सेनानी महामानवाला आज अभिवादन करण्यात आले. हे महापुषरु भारताच्या गंगा जमनी किंवा एकात्मता विचार प्रवाहाचे प्रतिनिधी आहेत.

        प्रास्तविकात मुस्कान असोसिएशन चे अध्यक्ष शफकत सय्यद यांनी सांगितले की, आपण आज स्वत:चे वाढदिवस थाटबाटात साजरे करत असतो, पण ज्यांच्यामुळे आज आपण देशात स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात फार उदासिनता जाणवते. हे समाजाचे दुर्भाग्य आहे, असे नमुद केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्कि.फिरोज शेख यांनी केले. आभार आरिफ सय्यद, यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी , रेहान शेख,आरिफ सय्यद,नादिर खान,तारीक शेख व संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 

वाचा -

बहादूरशाह जफर यांच्या विचारांनी भारतीय राष्ट्रवादाला बळ मिळते- आबीद खान...

सर सय्यद अहमदखान यांनी शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड दिली - युनुसभाई तांबटकर....


अल-करम सोसायटीच्या शिबीरात 170 रुग्णांची मोफत तपासणी - HEALTH CHECKUP CAMP

तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करुन घेणे आवश्यक - डॉ.जहिर मुजावर

 फोटो - पैगंबर जयंतीनिमित्त रामचंद्र खुंट येथील अल-करम हॉस्पिटल मॅटरनिटी अ‍ॅण्ड नर्सिंग होम येथे मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हाफिज अबुल कासिम, तौफिक तांबोळी, शेर अली शेख, एजाज तांबोळी, डॉ.जहिर मुजावर, डॉ.नाजिया मुजावर आदि.



अहमदनगर - आज कोरोनामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे, त्यामुळे छोट-छोट्या आजारावरही घरगुती उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे आजाराचे योग्य प्रकारे निदान न झाल्यास आजार बळावतो. लॉकडाऊनच्या काळात व्हॉटस्अपवर अनेक आजारावरील उपचारांबाबत माहिती येत, परंतु ते उपचार सर्वांनाच लागू होतील, असे नाही. यासाठी नागरिकांनी आजारांबाबत जागरुक राहून तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन उपचार घेणे आवश्यक आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना मोफत तपासणी व उपचार अल-करम सोशल सोसायटीच्यावतीने उपलब्ध करुन दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अशा शिबीराचा गरजूंना नक्कीच फायदा होतो, यासाठी अशा शिबीराचे नियमित आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. जहिर मुजावर यांनी केले. 

 अल-करम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने पैगंबर जयंतीनिमित्त रामचंद्र खुंट येथील अल-करम हॉस्पिटल मॅटरनिटी अ‍ॅण्ड नर्सिंग होम येथे मोफत सर्वरोग निदान, उपचार, रक्तगट तपासणी, शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन 22 नं.मस्ज़िदचे पेशइमाम हाफिज अबुल कासिम यांच्या हस्ते झाला. यावेळी तौफिक तांबोळी, शेर अली शेख, एजाज तांबोळी आदि उपस्थित होते.

 या शिबीरामध्ये डॉ.जहिर मुजावर, डॉ.नाजिया मुजावर यांनी 170 रुग्णांची तपासणी करुन उपचार केले. लॅब टेक्निशियन राहिल शेख, सैफ शेख, अमिन शेख यांनी सहकार्य केले. 

वाचा -

ईद निमित्त मुस्लीम समाजाने केली ग्रामीण रुग्णालयाला मदत



खासदार इम्तियाज जलील कोचाधामन विधानसभा क्षेत्रमे - AIMIM BIHAR ELECTION

कोचाधामन विधानसभा क्षेत्रमे पहुचे खासदार इम्तियाज जलील 


बिहार विधानसभा चुनाव के चलते औरंगाबाद के खासदार तथा एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील कोचाधामान विधानसभा क्षेत्र पहुचे. जनता का एम आय एम प्रती चाहत बात रही ही की बिहार की जनता तिसरा विकल्प को ज्यादा से ज्यादा पसंदी दे रही है. महीला हो या पुरुष सभी असद ओवासी की पार्टी ए आय एम आय एम से जुड रहे है. एम आय एम प्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसी ने अपने अभी दिग्गज नेता प्रचार मी उतारे है.  


एमआईएम प्रत्याशी अल्हाज इज़हार असफी साहब के प्रचार के लीए कॉर्नर सभा मे जनतासे मुखातीब हुए खासदार इम्तियाज जलील साहब.   



खासगीकरण का? COMPANY PRIVATIZATION

खासगीकरण का? 



      भारतीय संविधानच्या आर्टिकल २१,३७,३८,३९ आणी ३०० मुळे केंद्र सरकारला खासगीकरण करणे शक्य नाही व खासगीकरण वर कोणताही कायदा बनवू शकत नाही. सरकार जर संविधानाचा उलंघन करत खासगीकरण साठी मनाप्रमाणे कायदा बनवते तर सरकार न्यायालयात टिकू शकत नाही. फक्त न्यायालयात योग्य न्याय झाले तर संविधानाचा उलंघन देशद्रोह चा अपराध मानला जाईल आणि यासाठी आजीवन कारावास ची शिक्षा आहे यामुळे सरकार भंग होण्याची शक्यता आहे. 
आज चांगली शिक्षा प्राप्त केलेले नागरिकांचे मुलेही खासगीकरण मुळे भांडवलदार कडे ५-७ हजार ची नोकरी करत आहे. संविधान सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती की देशात प्रायव्हेट सेक्टर तयार केले पाहिजे की पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी सेक्टर. सभेत पूर्ण चर्चा होऊन नंतर संविधान निर्मात्याने हा निर्णय घेतला की देशात विषमता आहे आणि विषमतला दूर करण्यासाठी पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी सेक्टर तयार केले जाईल. 
        संविधान निर्मात्यांची सहमतीने झाली की आर्टिकल ३७, ३८, ३९ मद्येपण सरकारी सेक्टरला प्रोत्साहन देणे आणि अश्या कोणत्याही प्रकारची निती बनवू नाहीत ज्यामुळे खासगीकरणाला  प्रोत्साहन किंवा फायदा मिळेल. संविधानात अशी व्यवस्था करण्यात आली आहे की सरकार असा कोणतीच निती बनवणार नाही ज्यामुळे देशातील अधिक संपत्ती काही मोजक्या भांडवलदारांच्या हाती जमा होईल. 
        या नंतर संविधान चे ४२वे संशोधन आले ज्याला माननीय सर्वूच्च न्यायालयात आव्हान करण्यात आले याला गोरखनाथ कसे च्या नावाने ओळखले जाते यात भी न्यायालयाने हेच सांगितले आहे की देशातील विषमता दूर करण्यासाठी खासगीकरण ऐवजी सरकारी सेक्टरला प्रावधान देण्यात यावे. एवढेच नाही तर इंदिरा सहानी च्या निर्णयाने माननीय सर्वोच्च न्यायाल ने संविधानाचे या आर्टिकल ला जनहित साठी व्यापक मानत संविधानात या  आर्टिकल मुळे केंद्र सरकार कोणताही असा कायदा बनवण्यास असमर्थ आहे हे देशात १३५ करोड जनतेच्या विरोधात असेल आणि मोजक्या भांडवलदारला याचा फायदा होईल. संविधानात खासगीकरणाला नाकारले आहे. परंतु सरकारी सेक्टरला खासगी हातात विकत आहे आआणी  या परिस्थितीत भारताचे खासगी कारखाने विदेशी कंपनी खरिदी करू शकती यामुळे देश गुलाम होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. आर्टिकल ३०० चा भी उलंघन होत आहे आणि विश्व बॅंक चा अनेक अहवालात स्पष्ट झाले आहे की खासगीकरण मुळे देशात विषमता जास्त पसरेल. खासगी वव्यापार मध्ये नागरिकांना पूर्ण वेतन मिळणार नाही आणी कार्माचारीन कडून  जास्त वेळ काम करून घेतले जाईल आणी पेंशन आणी आरोग्य सारखे मूलभूत सेवा पासुन कर्मचाऱ्यांना वंचीत ठेवले जाईल. 
हेच सरकारी सेक्टर मध्ये पेंशन , भविष्य निधी, व आरोग्य सुविधा आणी विमा सारख्या अनेक सुविधा मिळतील.
त्याच बरोबर काम करण्याचे तास ठरवलेले आहे. 


        खासगी शेत्रात कोणत्याही प्रकारची गारंटीगरांठी नाही. कर्मचर्यांना भांडवलदाराची चाकरी करावी लागते या उलट संविधानाने बेगारी प्रतेला प्रतिबंध घातले आहे. खासगीकरणामुळे बेगारी प्रथा परत लागू होण्याची शक्यता आहे जे सन १९४७ च्या पहिले होती. तेव्हा संविधानाची कमतरता होती. त्यावेळी सरकारी शेत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आले. आणी आज देशात सर्व काही असतांना सरकारी सेक्टारला कौडीच्या भावात विकुन भांडवलदाराच्या हाती देण्यात येत आहे जे संविधानाच्या विरुद्ध आहे उलंघन होत आहे. सामान्य जनतेच्या जीवनाबरोबर खेळले जात आहे.


वाचा - 

प्रेषित पैगंबर मोहम्मद (स.) सर्वांसाठी - Eid E Milad

 प्रेषित पैगंबर मोहम्मद (स.) सर्वांसाठी:

पैगंबर जयंती निमित्त पुस्तकाचे प्रदर्शन



*प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रदर्शन धरती चौक अहमदनगर येथे घेण्यात आले याप्रसंगी मोठा प्रतिसाद मिळाले,*

*प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांनी संपूर्ण मानव जातीसाठी जी शिकवण दिली आणि संपूर्ण मानव जातीला अंधारातून उजेडाकडे आणले ते केवळ मुसलमानांचे नसून ते समस्त विश्वाला प्रदान करण्यात आलेले साक्षात करुणा सागर आहेत त्यांचा संदेश सर्वान पर्यंत पोहोचावे हेच उद्देश या पुस्तक प्रदर्शन मागे होता,*

*याप्रसंगी अनेक पुस्तके आलेले मान्यवराना भेटही देण्यात आली अहमदनगरचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुस्तक प्रदर्शनास शुभेच्छा दिले व आयोजकांचे अभिनंदन केले.*

*मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजीत वाघ सर यांनीही भेट दिली व आजच्या काळात या पुस्तकांची फार गरज आहे असे यावेळी उद्देशून सांगितले,*



* यावेळी मार्किट समितिचे सेक्रेटरी केंडके दादा, सामाजिक कार्यकर्ता सलीमभाई जरीवाला, परेश लोखंडे, उमेश भागानगरे महाराज, मुफ़्ती अल्ताफ अहमदनगरी, डॉ. परवेज़ अशरफी, आसिफ दुलेखान,  आर्क. फ़िरोज़ शेख, अरबाज़ शेख, सद्दाम कुरेशी तसेच परिसरातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्यानी उपस्तित होते.*

या पुस्तक प्रदर्शनाच्या यशस्वी साठी  फिरोज शेख, अलतमश जरीवाला, अयूब खान, मकबूल सर, यूनुस शेख व आदिनी परिश्रम घेतले.

वाचा -

महानतम हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांचे आदर्श जीवन......

मानवसेवा प्रकल्पाने दाखवली‘माणुसकी -

मानवसेवा प्रकल्पाने दाखवली‘माणुसकी’!

निराधार मानसिक विकलांग तरुणाला आधार




सुपा ता. पारनेर येथे एका निराधार मनोविकलांग तरुणामुळे भीतीचे वातावरण तयार झाले होते. केस वाढलेले, दाढी-आंघोळीचा पत्ता नाही, अवतार मळकटलेला! रस्त्यावर ही कड ते ती कड  फिरून जेवण अन्नपाणी मागणे त्यामुळे महिलांमध्ये अतिशय भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही महिलांनी सुपा पोलीस स्टेशनला कळवले. सुपा पोलीस स्टेशनचे मा. श्री संदिप चौधरी साहेब यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या‘मानवसेवा’प्रकल्पाला माहिती दिली, आणि या तरुणाला दाखल करुन घेण्याबाबत विनंती केली. या निराधार मानसिक विकलांग तरुणाच्या डोळ्यातून रक्त वाहत होते, संपुर्ण शरीर मळकटले होते. अतिशय अस्वस्थ झालेल्या या तरुणाला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ व संस्थेच्या स्वयंसेवकांनी दि. २९/१०/२०२० रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेतले. जेवण देवून, दाढी, आंघोळ-स्वच्छ-कपडे इतकंच नाही तर त्याला मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले. या तरुणावर उपचार करुन, कुटुंब शोधून पुनर्वसनही करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी म्हटले.‘जे का रंजले गांजले, त्‍यासि म्‍हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचिं जाणावा’या उक्‍तीचा तंतोतंत प्रत्‍यय श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, प्रसाद माळी, राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अशोक मदणे, अनिता मदणे यांनी दाखवून दिला.

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या माता-भगिनीं व बंधूंचे हक्काचे घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३


https://janmatanchaprahar.blogspot.com/2020/10/eid-mubarak.html

https://janmatanchaprahar.blogspot.com/2020/10/manavseva.html

महानतम हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांचे आदर्श जीवन- Eid Mubarak




महानतम हजरत
 मुहम्मद (स.) पैगंबरांचे आदर्श जीवन १२ रबिऊल अव्वलचा पवित्र दिवस. या रबिऊल अव्वलच्या महिन्यात १२ तारखेला महानतम अंतिम पैगंबर रहमतुलील आलमिन हजरत मुहम्मद (स.) हे अखिल मानवजातीसाठी दया व क्रुपा बनून अवतरले. ईद - ए - मिलाद या पवित्र दिवशी मुसलमान समुदायाचे लोक अंतिम पैगंबर स. ची सुआठवण उजळवित असतात. या अतिपवित्र दिवशी पैगंबर (स.) च्या सेवेत सर्वजण रममाण होतात. त्यांच्या प्रेमाने प्रत्येक मुसलमानाचे हदय ओतप्रोत भरलेले आहे. या सर्व गोष्टी आपल्या ठिकाणी आदरास पात्र व कदर करण्यासारख्या आहेत. पैगंबर (स.) यांची सुआठवण उजळवित असताना सर्वसाधारणपणे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते ते त्यांनी सांगितलेल्या शांती, सद्भाव, बंधुत्व, समानता व दुष्ट रुढीविरुध्द लढण्याच्या आदर्शाकडे! 

आज ईद - ए - मिलादुन्नवी या अत्यंत पवित्र दिवसालाही आम्ही एक परंपरागत प्रदर्शनीय उत्सवाचे स्वरुप देऊन टाकले आहे. याच्या वास्तविक व खऱ्या उद्दिष्टांना पूर्णपणे विसरुन गेलो आहोत.
 'खुदाने उस कौम की हालत आज तक नही बदली.' "न हो खयाल उसे खुद आप अपनी हालत बदलनेका

आता जेव्हा पैगंबर (स.) चे शुभ स्मरण होत आहे व प्रत्येक मुसलमानाचे लक्ष त्याकडेच आहे. आम्हाला हिच सुसंधी आहे त्यांचे आदर्श आपल्या जीवनात उतरविण्याची. पैगंबर (स.) यांच्या जीवनाचा अभ्यास करताना आपणास असे आढळून येईल की हे एक मानवता, प्रेम व विश्वव्यापक द्रुष्टीकोन ठेवणाऱ्या महानतम व्यक्तीचे जीवन आहे. त्यांच्या नजरेत सर्व समान होते. कोणत्याही एका विशिष्ट गटात अथवा घराण्यात, राष्ट्रात, वंशात अगर एखाद्या विशिष्ट देशाच्या हितात त्यांना स्वारस्य नव्हते. म्हणूनच त्यांना 'सरवरे कायनात' म्हणजेच 'जगाचे सरदार', 'जगाचे नेते' म्हणून संबोधले जाते. पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांचे कार्य कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी किंवा राष्ट्रासाठी नव्हते. अखिल मानवजातीसाठी त्यांनी कार्य केले. सर्वश्रेष्ठ अल्लाहाचे त्यांनी कार्य केले. सर्वश्रेष्ठ अल्लाहाने त्यांना 'रहमतुलील आलमीन' बनवून जगाच्या उध्दारासाठी निर्माण केले होते. पैगंबर (स.) यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेची सर्वात मोठी समस्या सोडविण्यातच खर्च केले. त्यांनी केवळ एक काल्पनिक रुपरेषा सादर केली नाही तर उलट त्यांनी या रुपरेषेवर एक जिवंत समाज निर्माण करुन दाखविला. अनेक रानटी व अमानवीय प्रथा अहंकारांनी व शत्रुत्वाने भरलेली मने, पिढ्यानपिढ्या कट्टर दुष्मनी, विखुरलेल्या अवस्थेत असणारे लोक, नैतिकतेचा झालेला अध:पात या सर्व गोष्टींना मूठमाती देऊन मागासलेल्या अरबांना ईश्वराच्या राज्यासमोर आज्ञापूर्वक नतमस्तक होण्यास भाग पाडले. विखुरलेल्या अवस्थेतून त्यांना एकत्र करुन ईश्वर भक्तीच्या आधारावर नैतिकतेची एक नवीन सामाजिक व्यवस्था,नवीन आर्थिक व्यवस्था आणि नवीन राजकीय व्यवस्था त्यांच्या अंध:कारमय जीवनात निर्माण केली. आज आमच्यापैकी एकापेक्षा एक वरचढ होऊन जगासमोर महानतम अंतिम पैगंबर (स.) यांनी दाखविलेल्या कल्याणकारी व एकमेव अशा साध्या, सोप्या व सरळ मार्गाविषयी बोलत असतात व हाच एकमेव कल्याणकारी मार्ग असल्याची घोषणा करीत असतात. मग तेच जग आम्हाला त्या सरळ व कल्याणकारी मार्गाच्या विरुध्द जात असल्याचे पाहात असते. पैगंबर (स.) यांची पध्दत सत्याधिष्ठीत आहे. त्यांचे जीवन आदर्श जीवन आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आहे. असे असताना आमची वागणूक यांच्याविरुद्ध असते. आमच्या अशा वागण्यास एक मुस्लीमतर हास्यास्पद ठरवित असेल तर दोष कुणाचा ? आम्ही कोणत्या उत्तराने त्याला संतुष्ट करु शकतो बरे ? आज या अंशात अशा वातावरणात खरी आवश्यकता आहे ती या गोष्टीची की या दिवशी पैगंबर (स.) यांच्या शिकवणी व त्यांच्या जीवनआदर्शानुसार चालण्याचा द्रुढ निश्चय करुन त्या कल्याणकारी सरळ व सोप्या मार्गावर इतरांनाही चालण्यास प्रेरित करु तेव्हाच आम्ही ईद - ए - मिलादुन्नबीच्या खऱ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू व हाच या पवित्र दिनाचा संदेश आहे.

 ● मी अखिल मानव जातीसाठी दया व क्रुपा बनून अवतरलो आहे. 
● आपल्या मुलास चांगले शिक्षण देण्यापेक्षा दुसरी कोणतीही मोलाची देणगी पिता देऊ शकत नाही. 
● जो कुणी परधर्मियांचा छळ करतो तो मलाच छळतो.
 ● ज्ञान संपादन करा. ज्ञानी माणसास सत्य किंवा असत्य किंवा न्याय व अन्यायामधील फरक कळतो. 
● आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. 
● सबंध रात्रभर प्रार्थना करण्यापेक्षा रात्रीचा एक तास दुसऱ्यांना ज्ञान देण्यात खर्च करणे अधिक चांगले. (महानतम अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (स.) 
 मुजफ्फर भाई सय्यद
कार्याध्यक्ष
अ. भा. साहित्य कलामंच
९९६०३२५०५७

वाचा-

एम आय एम - बिहार विधानसभा चुनाव मे धुम BIHAR ELECTION

बिहार चुनाव - एम आय एम पार्टी के सर्वोसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी के आदेश पर एम आय एम महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी और प्रदेश महासचिव फिरोज लाला बिहार की जनता से मुलाकात के लिए अमुर विधानसभा क्षेत्र में पहुंचे.
बिहार चुनाव मे एम आय एम पार्टी और गटबंदन ने बिहार चूनाव मे एक नया विकल्प जनता को देणे की कोशिश की है. जनता का रुजान एम आय एम की तरफ देखते हुए ऐसा लगता है के बिहार विधानसभा चूनाव देश की राजनितीमे एक नया बदलाव की शुरवात हो सक्ती है.



 #AIMIM
 #MissionFatehBihar 
#MissionFatehBihar


मानवसेवा निराधार माता - भगिनी व बंधूना मदत - MANAVSEVA

मानवसेवा प्रकल्पातील निराधार माता-भगिनीं व बंधूना एक हात मदतीचा



अहमदनगर - एक हात मदतीचा या संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत दस-याच्या शुभमुहर्तावर दि. २५/१०/२०२० रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील बेघर निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंसाठी जीवनावश्यक वस्तु व भांडी (कप्याची ताट ४०, ग्लास ४०, चमचे ४०, मग २, भातवाढी ४, पळी ४ पाण्याचे पिंप २) स्वरूपात मदत दिली. 

एक हात मदतीचा
देईल कुणा जीवदान !
पुण्यकर्म करून बघा
लाभे तुम्हाही समाधान... 



    या उक्तीप्रमाणे एक हात मदतीचा या संघटनेचे मा. ओंकार कोकाटे, मा. निलेशजी रासकर, मा. महेशजी जोशी, मागितेश्वर दळवी, स्वप्निल गायकवाड यांनी मानवसेवेतून खरी ईश्वराची सेवा आहे आणि आपली मदत ही कोणाला तरी जीवनदान देत असते असा संदेश या मदत भावनेतून दिला. एक हात मदतीचा या संघटनेने सामाजिक भावनेतून केलेल्या या मदतीबद्दल श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी कृतज्ञ व्यक्त केले. 

"मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!"
मानवसेवा प्रकल्प
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)
द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

डॉ गफ्फार कादरी बिहार मे - AIMIM BIHAR ELECTION

एम आय एम महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी बिहार मे  



बिहार मे सभी पार्टी अपनी पुरी ताकत के साथ बिहार विधान सभा चुनाव मे उतरी है. इस मे हैदराबाद स्तीत एम आय एम पार्ट्य भी पीछे नाही है. खासदार असदुद्दिन ओवेसी और खासदार इम्तियाज जलील के साथ अब एम आय एम महाराष्ट्र के कार्याध्यक्ष जनाब डॉ गफ्फार कादरी साहबभी बिहार चुनावी मैदान मे उतार चुके है. एम आय एम और दिगर पार्टी   का गटबंदन एक तिसरा परियाय बनकर बिहार कि जनताने स्वीकार किया ही. बिहार चुनाव के नातीजोपर पुये देश की नजरे टिकी है. अगर जनता तिसरा विकल्प को पसंदी देती है तो आणे वाले दिनोमे पुरे देश  इस तरह का प्रयोग किया जा सकता है. 

खासदार इम्तियाज जलील बिहार निवडणूक प्रचाराला - AIMIM BIHAR ELECTION

औरंगाबादचे खासदार बिहारच्या निवडणुक प्रचाराला, पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी..



    बिहार विधानसभा निवडणुकीत  एमआयएम ने जनतेला तिसरा पर्याय दिले आहे. एम आय एम  वीस विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. सुरूवातीला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा, दौऱ्यांना स्थानिक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे एमआयएमने इथे पुर्ण क्षमतेने लढण्यासाठी देशातील दिग्गज एम आय एम नेते बिहार मध्ये प्रचारासाठी उतरवले आहे.. चार टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराची संपुर्ण धुराही खासदार ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावर असणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष देखील या निवडणुकीत उतरले परंतु त्यांचा  एकही नेता अजून बिहारमध्ये प्रचाराला पोहोचले नाहीत. याउलट एमआयएमने मात्र गेल्या महिनाभरापासून बिहार राज्यामध्ये आपले नेते प्रचाराला उतरून धमाल करत आहे. पहिल्या टप्यात पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, आता मतदानाची तारीख जवळ येत असतांना त्यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील प्रचारासाठी बिहारमध्ये बोलावून घेतले आहे. कोचाधामन येथील पक्षाच्या उमेदवारासाठी इम्तियाज जलील यांनी एम आय एम ला मत देण्याचेचे विनंती केली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारक विजय मिळवत राज्यातील सर्वाधिक धक्कादायक निकालीची नोंद करण्यात एमआयएमला यश आले होते. अचानक मिळालेल्या या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील यांनी गेल्या वर्षभरात केल्याचे दिसून आले. असदुद्दीन ओवेसी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुद्देसूद मांडणी, आक्रमक शैली आणि नागरी प्रश्नांना प्राधान्य देत इम्तियाज जलील यांनी आपली चांगली प्रतिमा मतदारसंघात निर्माण केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्याला हादरा दिल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षची  जबाबदारी दिली. केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे असो, की मग संसदेत त्यावर भाष्य असो, यातून इम्तियाज जलील यांनी आपली छाप पाडली. केवळ राजकीय मुद्देच नाही, तर मतदारसंघातील विकास कामांच्या मुद्यावर देखील इम्तियाज जलील संसदेत अनेकवेळा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ओवेसीने  बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एमआयएमनेे स्थानिक पक्षांशी युती करून या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. एकटी एमआयएम वीस विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. 


        बिहारची जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने एमआयएमने इथे पुर्ण क्षमतेने लढण्यासाठी कंबर कसली आहे. चार टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराची संपुर्ण धुराही ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर असणार आहे. ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांना बिहारमध्ये बोलावून घेत त्यांच्यावर प्रचाराची मोठी जबाबदारी सोपवली आहे. कोचाधामन विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारासाठी काॅर्नर बैठक घेतल्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी सभा घेत तडाखेबंद भाषण केले. पुढील काही दिवस इम्तियाज जलील हे बिहारच्या निवडणुकीत आपल्या पक्षासाठी ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून मत मागतांना दिसणार आहेत.

आरक्षणा बाबत सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा - MUSLIM RESERVATION

आरक्षणा बाबत सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा- हाजी इर्शादभाई



        "महाराष्ट्र सरकारने मुस्लिम  आरक्षणासंदर्भात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्वरित आरक्षणाचा अध्यादेश काढावा " असे आवाहन महाराष्ट्र स्टेट मायनाॅरीटीज फेडरेशनचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी केले आहे. 
         पुणे येथे आयोजित समविचारी संघटनांच्या प्रतिनिधी बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. 
           " मुस्लिम आरक्षण हा अल्पसंख्यक समुदाय म्हणून मुस्लिम समाजाचा तो संविधानिक अधिकार आहे. मुस्लिम समाज आर्थिक- सामजिक- शैक्षणिक दृष्टया अतिशय मागासलेला असून आरक्षणामुळे तो राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊन उन्नती कडे मार्गस्थ होईल. सरकारने वेळकाढूपणा न करता त्वरित अध्यादेश काढून समाजाला न्याय दयावा. समाजातील लोकप्रतिनिधी व विविध पक्षातील नेत्यांनी समाजाची बांधीलकी व आपल्या कर्तव्याची जाण ठेवून सरकारला आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यास भाग पाडावे" असे प्रतिपादन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे. 
          यावेळी प्रसिध्द कायदेतज्ञ अॅड. समीर शेख,महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी , मदर टेरेसा फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुफीयान शेख, संविधान साक्षरता अभियानचे प्रमुख अलीम वजीर पटेल, फैयाज सय्यद, शाहनवाज पानसरे, अकीलभाई आतार, सरवर पठान, एजाज सय्यद, वसीम खान आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

एमआयएमचे बिहार निवडणुकीत औरंगाबादचे नेते प्रचारात - AIMIM BIHAR ELECTION

 

बिहार निवडणुकीत औरंगाबाद एमआयएमचे  नेते प्रचारात



बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने 20 उमेदवार मैदानात उतरवले आहे. पक्षाचे सुप्रीमो खा.असदोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार सभेला तेथे प्रचंड प्रतिसाद मिळत असुन जनतेला एम आय एमने गटबंदन आणी जनतेला दिलेला परीयाय जनता स्वीकारत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील एम आय एम नेते बिहार प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले आहे त्यात औरंगाबादेतील नेत्यांवर मोती जबाबदारी देण्यात आली आहे.  एम आय एमच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एम आय एम ने जनतेला एक मोटा पर्याय दिला असुन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशी खात्री व्यक्त केली जात आहे. खासगी भेटी साठी जास्तीत जास्त भर दिलेजात आहे. यावेळी औरंगाबाद येथील हाजी इसाक खान, आरेफ हुसैनी, वसीम अहेमद, निसार कादरी उमेदवारांना विजयी करण्सायासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

ओवेसींच्या प्रचाराला प्रचंड गर्दी जमत आहे त्याच बरोबर महाराष्ट्राचे एम आय एम खासदार इम्तियाज जलील  बिहारला तळ ठोकून बसले आहेत.
एमआयएमच्या उमेदवारांची यादी….
पहीला चरण- विधानसभा मतदारसंघ- शेरघाटी, उमेदवार मसरुर खान, 

दूसरे चरण -साहेबपूर कमाल येथून गोरेलाल यादव, साहेबगंज, मोहंमद मुकीम, फुलवारी शरीफ येथून कुमारी प्रतिभा. 

तिसरे चरण- कोचाधामन येथून इजहार असफी, बहादुरगंज अन्जार नईमी, किशनगंज, कमरुल हौदा, बायसी रुकुनोद्दीन अहमद, अमौर, अख्तरुल इमान, नरपतगंज, हदीस साहाब, कस्बा, डॉ. शाबाज, परानपूर, खाजा हसन महमूदी, जोकीहाट, मो.शाहनवाज आलम, बरारी राकेश यादव, मनिहारी, गौरेती मुर्मू सहादूर, अररिया मो.रशीद अलवर, सिकता रिजवानुल्लाह शेर शाहयादी, ठाकूरगंज हाफीज महबूब आलम, रानीगंज रोशनी देवी, छातापूर येथून आलम हे उमेदवार निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत तिसरा परियाय या गटबंधांच्या माद्यमातून उभा राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

वाचा -

अल करम तर्फे सर्वरोग निदान शिबीर - HEALTH CHECKUP CAMP

 अल करम तर्फे पैगंबर जयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर


अहमदनगर- पैगंबर जयंती निमित्त अल करम सोशल अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे अल करम मॅटर्निटी हॉस्पिटल इंगळे मेडिकल च्या जवळ रामचंद्र खुंट अहमदनगर येथे सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. ज्यामध्ये रुग्णांची तपासणी, रक्तगट तपासणी, शुगर तसेच प्रसूतीसाठी शिबिरात नोंदणी केल्यास सवलतीत डिलेवरी केली जाईल.

 तरी या संधीचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 0241-2423333 व 90 28 40 43 96 या नंबर वर संपर्क करावा.







स्टमिना मल्टीस्पोर्टस अकॅडमी क्रीडा स्पर्धेचे निकाल जाहीर

 स्टमिना मल्टीस्पोर्टस अकॅडमी क्रीडा स्पर्धेचे निकाल जाहीर 


नुकत्याच  क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ मुकुंदनगर येथे पार पडले. स्टमिना मल्टीस्पोर्टस अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्रीडाप्रकार घेण्यात आले. यात १०० मी. धावणे, स्याकरसे, लाठी स्पर्धा, पूषअप स्पर्धा, सीटअप्स ,अशे अनेक मैदानी स्पर्धा घेण्यात आले. स्पर्धेत विजयी खेळाळूची नावे खालील प्रमाणे

१)शेख अब्दुल समीर,        २) शेख राजिन वसीम,     
३) शेख अली,                    ४) शेख इब्राहीम,             
५) शेख उम्मेकुलसुम,        ) सय्यद सबिया, 
७) शेख झारा,                     ८) शेख सफुरा,                
९)  सय्यद नुरफातेमा.
क्रीडा मार्गदर्शक व संचालक वसीम शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीप्ती पोलीस अधीक्षक दिघे साहेब, माजी नगरसेवक नसीम शेख, पत्रकार वहाब सय्यद, अॅड जहागीरदार ,बहार मॅडम आदी. उपस्तीत होते.          



लोकशाही व संविधान बचाव अभियान - बहुजन क्रांती मोर्चा


चलो अहमदनगर     चलो अहमदनगर     चलो अहमदनगर    


बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने हाथरस मधील अमानुष घटनेत बळी गेलेल्या मनिषा वाल्मिकी हिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजातल्या हजारों मुलींच्या रक्षणासाठी, तसेच मुस्लिम समाज व इतर अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचार व माॅब लिंचिग थांबविण्यासाठी तथा आपल्या देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी शनिवार दि. ३१ ऑक्टोबर  २०२० जन आक्रोश मोर्चाकाढण्यात येणार असुन  या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेने आव्हान केले आहे.  
लोकशाही व संविधान बचाव अभियान,  JUSTICE FOR MANISHA  चे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर ३१ राज्यात, ५५० जिल्ह्यात चार टप्प्यांतील श्रृंखलाबद्ध आंदोलनांतर्गत आहे.
आंदोलन  दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी  दुपारी १२  वाजता  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इंपिरियल चौक अहमदनगर  ते जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर अशी माहिती जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) राजेंद्र करंदीकर यांनी केले आहे.

निकलो बाहर मकानों से !
                   जंग लढो हैवानों से !!

हर जोर-जुल्म की टक्कर में
                 संघर्ष हमारा नारा हैं!

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या