चलो अहमदनगर चलो अहमदनगर चलो अहमदनगर
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने हाथरस मधील अमानुष घटनेत बळी गेलेल्या मनिषा वाल्मिकी हिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजातल्या हजारों मुलींच्या रक्षणासाठी, तसेच मुस्लिम समाज व इतर अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचार व माॅब लिंचिग थांबविण्यासाठी तथा आपल्या देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२० जन आक्रोश मोर्चाकाढण्यात येणार असुन या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेने आव्हान केले आहे.
लोकशाही व संविधान बचाव अभियान, JUSTICE FOR MANISHA चे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर ३१ राज्यात, ५५० जिल्ह्यात चार टप्प्यांतील श्रृंखलाबद्ध आंदोलनांतर्गत आहे.
आंदोलन दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इंपिरियल चौक अहमदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर अशी माहिती जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) राजेंद्र करंदीकर यांनी केले आहे.
निकलो बाहर मकानों से !
जंग लढो हैवानों से !!
हर जोर-जुल्म की टक्कर में
संघर्ष हमारा नारा हैं!
No comments:
Post a Comment