आयुष्याची नवी वाट...
हरवलेल्या ज्योतीची 'मानवसेवा' मुळे घडली कुटुंबाची भेट
हिंगोली येथील ३० वर्षीय 'ज्योती' मानसिक संतुलन बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावली होती. मानसिक आजारामुळे समाजात तिच्याविषयी एक भीती निर्माण झाल्याची बातमी होती, काही लोकांनी तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवले. बंद खोलीच्या खिडकीतून तिला जेवण पाणी देत होते.
सदर महिलेची माहिती अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाला मिळाली. संस्थेचे कार्यकर्ते सुशांत गायकवाड, अविनाश पिंपळे, पुजा मुठे, सुरेखा केदार, सरीता गोडे यांनी या महिलेची बंद खोलीतून सुटका करीत संस्थेच्या *'मानवसेवा प्रकल्पात'* दि.२३/१०/२०२१ रोजी दाखल केले. ज्योती हिच्यावर मानसोपचार तज्ञ डॉ अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिची मानवसेवा प्रकल्पात काळजी घेवून संरक्षण दिले. संस्थेच्या समुपदेशक पुजा मुठे यांनी ज्योतीचे उपचार पूर्ण करुन समुपदेशनात माहिती घेऊन कुटुंब शोधले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पाने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन दि.१२/०१/२०२२ रोजी ज्योतीला सन्मानाने कुटुंबाच्या ताब्यात देवून पुनर्वसन केले. ज्योतीला तिचे मुले आणि कुटुंब मिळताच अश्रू अनावर झाले.
*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*
*मानवसेवा प्रकल्प*
(मन आणि घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)
द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*
☎️ (०२४१) २४२९९४२
📱९०११७७२२३३
No comments:
Post a Comment