एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री


अहमदनगर - 


पुर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वच पक्षांनी आपले उमिदवार रिंगणात उतरवले होते. काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप बरोबर प्रदेशातील अनेक राजकीय पक्षांनी उमेदवार दिले होते. एम आय एम ने महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकित ही एन्ट्री केली. एम आय एम पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून. अहमदनगर जिल्ह्याची कमान डॉ परवेज अशरफी यांच्या हातात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम ने आपले ६ उमेदवार दिले होते त्यापैकी ४ उमेदवारांनी विजय नोंदविला आहे. शेवगाव व श्रीरामपूर तालुक्यात एम आय एम ने आपले उमेदवार उतरविले होते. शेवगाव तालुक्यात ५ तर श्रीरामपूर तालुक्यात १ उमेदवार देऊन एम आय एम आपली सुरुवात केली होती. त्या पैकी ३ शेवगाव मधून तर १ श्रीरामपुर तालुक्यातून निवडून आल्याने एम आय एम ने अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री केली असल्याचे दिसते. निवडून आलेल्या उमेदवारांना एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अभिनंदन केले व शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख आणि श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख यांचा ही अभिनंदन केले. 

ज्या प्रकारे पूर्ण देशात एम आय एम ला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच प्रकारे ग्राम पंचायत निवडणूक पहाता एम आय एम आता गावा गावात पोहोचत असल्याचे दिसते.

निवडून आल्या नंतर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी साहेब यांना देताच सर्वांनी एम आय एम अहमदनगर टीमचा अभिनंदन केले.

येणाऱ्या काळात एम आय एम अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या नगर परिषद, नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकी कडे आपला लक्ष केंद्रित करणार असल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी एका पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




वाचा -

ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project...

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे...

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे

 असुन फायदा नसून खोळांबा 

अल्पसंख्याक योजना व शिष्यवृत्ती



            (१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे

सदर अर्ज आॅनलाइन पध्दतीने करणे आवश्यक आहे

(२) पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

सदर योजना अल्पसंख्याक मंत्रालय व भारत सरकार यांचेकडून राबविली जाते उच्च तंत्रज्ञान तंत्रशिक्षण विभागातर्फे. उच्च संचणालय पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते ११वी १२वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजना पात्र ठरविण्यासाठी वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेलें असावेत

(३) मेरीट कम मिन्स् शिष्यवृत्ती

     सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत असून राज्यांमध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण तांत्रिक शिक्षण व व्यवसाय शिक्षण या विभागात शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २-५० लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत

(४) व्यावसायिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना

        उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीच्या नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील गुणवत्ताधारक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उच्च व्यावसायिक व १२वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचया कुटुंबाची मिळणार या वार्षिक उत्पन्न मर्यादा २-५० लाखावरुन ६ लाख करण्यात आली आहे

(५) मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान. गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. व उर्दू. या विषयांचे शिक्षण देणे तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इयत्ता ९वी १०वी ११वी व १२ वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे

(६) अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान

      धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये औधोगिक प्रशिक्षण संस्था व दिवयांग (अपंग ) शाळांमध्ये पायाभूत सुविधा सोयी पुरविण्यासाठी अनुदान योजना

(७) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह (केंद्र व राज्य )

    विद्यार्थिनींसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य) अल्पसंख्याक समाजातील मुलीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मा न्या सचचर समितीने केलेल्या शिफारशीनुसार अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरू करणे हि शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे बांधण्यात येत आहे

(८) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना

(९) मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

कर्ज मर्यादा. २-५० लाखांपर्यंत

      व्याजदर फक्त ३/टक्के

       १००/टक्के कर्ज

परतफेड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्ष शैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात याची सविस्तर माहिती मंडळ कार्यालयात मिळेल कर्ज मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे

(१०) राजीव गांधी शिक्षण कर्ज योजना

कर्ज मर्यादा. दोन लाख पन्नास हजार 

  व्याजदर फक्त ३/टक्के

१००/टक्के कर्ज

परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५. वर्षे 

        पात्रता

अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा मुस्लिम. शिख. पारशी. बुध्दीषट व जैन. समाजाचा 

             समावेश

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा 

वयोमर्यादा १ते ३२ वर्ष

कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शहरी भागात. रुपये. १/०३/०००पेक्षा कमी ग्रामीण भागात ८१००० पेक्षा कमी

       राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज

अल्पसंख्याक असल्याचा पुरावा

आधार कार्ड /इलेक्शन कार्ड/ बॅंक पासबुक झेरॉक्स /पॅन कार्ड /यापैकी एक

अर्जदार व जामिनदार आधार कार्ड/इलेक्शन कार्ड /पारपतरक /बॅंक पासबुक /वाहन लायसन्स /पॅन कार्ड /पैकी एक

उत्पन्न प्रमाणपत्र

कुटुंब नावे तहसिलदार/तलाठी /यांचा उत्पन्न दाखला /शासकीय/खाजगी /क्षेत्रतातील कर्मचारी असल्यास फाॅरम १६

(११) मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना

राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता ८वी९वी१०वी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील मुला मुली साठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुधारित स्वरुपात राबविण्याबाबत 

   आज अलिकडे अल्पसंख्याक कार्यशाळा. अल्पसंख्याक मेळावे. अल्पसंख्याक हक्क व अधिकार. नियोजन. जिल्ह्यात अल्पसंख्याक अध्यक्ष आपल्या वाहनांना आपल्या अध्यक्ष पदाच्या मोठ्या मोठ्या पाट्या लावून फिरतात एक वेळ अशी आली कि अल्पसंख्याक दिन आॅनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला प्रत्त्येक जण आपापल्या राजकीय वर्तुळात या अल्पसंख्याक समाजातील लोकांचा कसा वापर करता येईल याकडे जादा लक्ष आहे

          अल्पसंख्याक समाजा बद्दल जर कोणाला कळवाळा असेल तर त्यांनी एकाच काम करा ते म्हणजे अल्पसंख्याक असल्याचा पुरावा देणे हि अट रद्द करा जुना समाज अडाणी होता कागदाची किंमत त्यांना त्यावेळी कळली नाही त्यामुळे ६० वर्षाचा पुरावा मिळणे शक्यच नाही 

          अल्पसंख्याक योजनेअंतर्गत शिक्षणासाठी कर्ज योजना आहे पण त्या योजनेचा कर्ज पुरवठा मंडळाने करणे गरजेचे आहे कारण मंडळाने जर कर्ज प्रकरणे मंजूर केली तरि बॅंका हि प्रकरणे निकाली काढत नाही त्यात विनाकारण अटि घालून कर्ज प्रकरणे बाद केले जाते नाहि तर मग बॅंक मॅनेजर यांना टक्केवारी दिली तरच कर्ज प्रकरणाला मंजुरी मिळते किती वाईट आहे बघ

               वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा

     संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अन्न धान्य सुरक्षा रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण जर एखाद्या शासकीय आॅफिस मध्ये माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्या संदर्भात असणारि माहिती हि त्या कार्यालयाच्या लेटर हेड वर देणे बंधनकारक आहे अशी माहिती मिळत नसेल तर कार्यालय दिरंगाई वरिष्ठांकडे तक्रार दाखल करा


वाचा - 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प ....

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....


ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

रस्त्यावरच दिवस-रात्र काढणा-या २४ ‌वर्षीय बेघर, 

निराधार तरुणीला मानवसेवा प्रकल्पाचा आधार.



जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात एक २४ ‌वर्षाची तरुणी रस्त्यावर दिवस-रात्र फिरत होती. मानसिक भान नसल्यामुळे सर्व नाती विस्कटली, आयुष्याची पुर्ण लक्तरी उडाली. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पाटील यांनी समाजसेवी संस्थांचे मार्गदर्शक मा. प्रा. श्री अविनाश मुंडके सर यांना कळविले. मुंडके सर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या तरुणीबाबत माहिती दिली. एक एअर होस्टेज मानसिक ताण-तणावातून सर्व काही हरपून वेदनांच ओझं घेवून आयुष्य जगत होती. रस्त्यावर दिवस-रात्र काढणा-या या निराधार मनोरुग्ण तरुणीला दिलीप गुंजाळ यांनी दि. १३/०१/२०२१ रोजी संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेत मायेचा आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. सध्या मानवसेवा प्रकल्पात ४० बेघर, निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधु उपचार घेत असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक राहुल साबळे यांनी दिली. या बेघर तरुणीला दाखल करुन घेणेसाठी आणि उपचार देखभालीसाठी संस्थेचे स्वयंसेविका अनिता मदणे, कोमल कांबळे, समुपदेशक सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, सिराज शेख, स्वप्नील मधे, नितीन बर्डे, अजय दळवी, कृष्णा बर्डे, प्रसाद माळी, अशोक मदणे हे पुढाकार घेत आहेत.

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३ / ९११२०४९१९१ / ९११२०५९१९१





वाचा - 

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय AIMIM-SP..

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune....

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...


अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय AIMIM-SP

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय



लखनऊ: बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलंय. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "कुणी काहीही म्हणो, आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे घाबरले आहेत. त्यांना वाटणारी भिती हाच आमचा विजय आहे." आजमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातोय. या ठिकाणाहून समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव लोकसभेवर निवडून गेले होते. आजमगडमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असून या ठिकाणच्या मुस्लिम मतांच्या दिशेवरुनच पूर्व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांची दिशा ठरते असं म्हटलं जातं.

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय

बिहार निवडणुकीनंतर एआयएमआयएम,असदुद्दीन ओवैसी यांनी आपला मोर्चा आता उत्तर प्रदेशकडे वळवला असून ते राज्यातील महत्वाच्या मुस्लिम नेत्यांच्या भेटी घेत आहेत. समाजवादी पक्षाने  त्यांच्यावर भाजपची 'बी टीम' म्हणत टीका केलीय.

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय


लखनऊ: बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलंय. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "कुणी काहीही म्हणो, आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे घाबरले आहेत. त्यांना वाटणारी भिती हाच आमचा विजय आहे." आजमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातोय. या ठिकाणाहून समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव लोकसभेवर निवडून गेले होते. आजमगडमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असून या ठिकाणच्या मुस्लिम मतांच्या दिशेवरुनच पूर्व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांची दिशा ठरते असं म्हटलं जातं.

असदुद्दीन ओवैसी हे केवळ आठच तास या भागाच्या दौऱ्यावर होते. पण त्यांच्या या दौऱ्याने उत्तर प्रदेशचे राजकारण तापलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेता या भागातल्या मुस्लिम मतांवर औवेसींची नजर आहे. या ठिकाणी औवेसींनी कोणतेही भाषण दिलं नाही पण त्यांना जो राजकीय संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिल्याचं सांगण्यात येतंय.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. एकूण 403 सदस्यांची संख्या असणाऱ्या विधानसभेत भाजपचे बहूमत आहे. योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व हे आक्रमक हिंदुत्ववादी स्वरुपाचे आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रृवीकरण करण्यावर औवेसी यांचा भर असल्याचं सांगण्यात येतंय.

पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या ही 20 ते 40 टक्के इतकी आहे. आतापर्यंत ही मते समाजवादी पक्षाच्या पारड्यात पडायची. आता या मतांवर असदुद्दीन ओवैसी यांची नजर आहे. त्यामुळे या परिसरावर औवेसी यांनी लक्ष केंद्रीत केल्याचं सांगण्यात येतंय.

बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातही ओवैसी यांनी लहान पक्षांचा गट बनवला असून त्याचे नाव आहे संकल्प मोर्चा. यात ओम प्रकाश राजभर, बाबू सिंह कुशवाह आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर या नेत्यांचा समावेश आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 100 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरतात. समाजवादी, बसप आणि कॉंग्रेसला आतापर्यंत मिळत असलेली ही मते आता एमआयएमच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर नेहमीप्रमाणे भाजपची 'बी टीम' म्हणून टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवैसीनी सांगितलं की टीका करणाऱ्यांना वाटत असलेली भिती हाच आमचा विजय आहे.




वाचा -



संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=6635653436316363626562383530633364663062303766333435393362306332

 



    संविधान व लोकशाही विरोधी तसेच जात पंचायत अनकूल कोणताही निर्णय सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी दिला आहे. 

     नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात ते बोलत होते. 

       मुसलमान जमात राजुरी, ता. जुन्नर ही वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक संस्था आहे. नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीत सदर धार्मिक संस्थेने कोणतेही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे संस्थेच्या अध्यक्षाचे नावे उमेदवारी अर्ज मागवून घेऊन, उमेदवार निवड समिती स्थापण करुन सदर उमेदवार निवड समितीस ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडण्याचे व नाकारण्याचे अधिकार दिले. व सदर उमेदवार निवड समितीच्या निर्णया विरूद्ध जाणाऱ्या उमेदवारास जमाती मार्फत कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. 

        सदर संस्था वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक संस्था असून संबंधित कृत्य पूर्णपणे असंविधानिक, बेकायदेशीर, भारतीय संविधानाला व लोकशाहीला आव्हान देणारे असून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जातपंचायती नुसार धमकी देणारे आहे. सदर कृत्य हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन असून लोकशाही प्रक्रियेला कमजोर करणारे आहे. अशी माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली. 

        सदर प्रकरणाचा सहानुभूतिपूर्वक व गांभीर्याने विचार करून योग्य चौकशी होऊन संबंधित व्यक्तिंविरोधात मानवाधिकारांचे हनन केल्या प्रकरणी,संविधानास आव्हान देऊन राष्ट्रद्रोह केल्या प्रकरणी व जातपंचायत अंतर्गत धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी शासनाकडे केली आहे.




वाचा -

नवी मुंबई विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे नाव देण्यात यावे - हाजी शाहनवाज खान AIMIM 

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 

देश -

एम आय एम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उद्देशून ट्विट केले आहे की आपण नागरिकांना चुकीची माहिती देऊ नका. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर वरून पोस्ट केले आहे की पुणे शहरातील एम आय एम पक्षाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आहे. या पोस्ट बरोबर एक फोटो द्या काही लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दाखवले आहे. या पोस्ट वरुन एम आय एम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर वर उत्तर देत लिहिले की श्री अजित पवार साहेब आपण नागरिकांना चुकीची माहिती देऊ नका ज्या व्यक्ती आपण उल्लेख करत आहे त्या व्यक्तीला एमआयएम पक्षाने चार वर्षापूर्वीच पक्षातून बाहेर काढले आहे आणि अशाच लोकांना तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वीकारले जात आहे. ज्या व्यक्तीचा उल्लेख या पोस्टमध्ये एम आय एम नेते म्हणून केला जात आहे तो व्यक्ती एकेकाळी एम आय एम पुणे शहर अध्यक्ष या पदावर होता. परंतु मागील पुणे महानगरपालिका निवडणुकी नंतर संबंधित व्यक्तीला पदमुक्त करून पक्षातून काढण्यात आले होते. संबंधित व्यक्ती त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदावर कार्यरत होता व काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सध्या कोणत्याही पक्षासोबत जवळीक नव्हती. त्या व्यक्तीला एमआय एम पुणे शहर नेते उद्देशन असे दाखवायचे प्रयत्न होत आहे की एम आय एम चे नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहे.

सध्या एम आय एम पक्ष हैदराबाद नंतर महाराष्ट्र आणि बिहार मध्ये आपले यश संपादन केले आहे. भविष्यात राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशामध्ये आपलं पक्ष मजबूत करण्याची तयारी करत आहे. यानुषंगाने बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वारंवार दौरे करत आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांना महाराष्ट्र सोबत गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम प्रत्येक राज्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रत्येक निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. एम आय एम पक्षामुळे भाजपला फायदा होत असल्याचे आरोप नेहमी होत असले तरी सामान्य जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हे स्वतःला सेक्युलर म्हणणारे पक्षांची डोकेदुखी बनली आहे. 



वाचा - 






डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 डॉ बाबासाहेब आंबेडकर : जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्वाचा चे काही आठवणी 



१४ एप्रिल १८९१ : सुभेदार रामजी व श्रीमती भिमाबाई आंबेडकर या मातापित्यांचे चौदावे अपत्य. ( जन्मस्थळ : महू इंदोर जवळ मध्य प्रदेश) 

१८९६ : माता भिमाबाई यांचा मृत्यू.

नोव्हेंबर १९०० : गवर्नमेंट व्हर्णा क्युलर (मराठी) शाळा सातारा मध्ये प्रवेश.

एप्रिल १९०६ : श्री भिकू वालंगकरांची कन्या रमाबाई बरोबर विवाह.

जानेवारी १९०८ : मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

डिसेंबर १९१२ :  यशवंतराव या पुत्राचा जन्म.

जानेवारी १९१३ : बी. ए उत्तीर्ण ( पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन)

फेब्रुवारी १९१३ : वडील सुभेदार रामजी यांचा मृत्यू.

जुलै १९१३ : बडोद्याचे सयाजीराव महाराज यांची शिष्यवृत्ती प्राप्त, न्यूयॉर्क विश्वविद्यालय कोलंबिया येथे राज्यशास्त्र (विभागात) उच्चशिक्षणासाठी प्रवेश. 

१९१५ : अर्थशास्त्र हा मुख्य विषय व समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्य नीतिशास्त्र हे दुय्यम विषय घेऊन उत्तीर्ण.

मे १९१६ : "भारतातील जाती" या विषयावर प्रा. गोल्डनविजर यांचे समोर प्रबंध वाचन. हासले पुढे प्रकाशित झाला. हे  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले पुस्तक.

१९१६ : नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया या शीर्षकाखाली पीएच. डी.

जून १९१६ : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विख्यात संस्थेत ( इंग्लंडमध्ये) पुन्हा विशेष अभ्यासासाठी प्रवेश.

जून १९१७ : कोलंबिया विद्यापीठाची पी एच डी प्राप्त तेव्हापासून डॉक्टर ही पदवी बाबासाहेबांना प्राप्त झाली आहे. 

जून १९१७ : एम एस सी अर्थशास्त्र ही लंडनची पदवी मिळवून भारतात.

१९१७ : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती. बाबासाहेबांची संस्थानात भावी काळात अर्थमंत्री पदावर नेमणूक महाराजांना करावयाची होती. परंतु बाबासाहेब अस्पृश्य समाजातील असल्याने कार्य व्यवहारातील इतर लोकांनी बाबासाहेबांशी गैरवर्तन केल्यामुळे स्वाभिमानी बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

१९१७ : "भारतातील अत्यल्प शेती धोरण व त्यावर उपाय" या विषयावर पुस्तक प्रकाशित केले.

१९१८ : साऊथबरो कमिशन हे सार्वत्रिक मताधिकार याबाबत भारतात आले असता त्यापुढे मत अधिकाराबद्दल साक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करावयास पाहिजे होते. कमिशने त्यांचे म्हणणे स्वीकारले आहे.

१९१८ नोवेंबर : मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती.

जानेवारी १९२० : "मूकनायक" हे दलितांचे पहिले साप्ताहिक मराठीमधून प्रकाशित.

सप्टेंबर १९२० : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पुढच्या अभ्यासासाठी व बॅरिस्टर च्या अभ्यासा साठी लंडनला (इंग्लंडला) दाखल.

जून १९२१ : "प्रोविन्शियल डिसेंट्रलाइजेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या विषयावर प्रबंध सादर हो तो स्वीकारला गेला. एम एस सी अर्थशास्त्र लंडन ही पदवी प्राप्त.

१९२२ - २३ : बॉन विद्यापीठ जर्मनी येथे अर्थशास्त्र शिक्षणासाठी काही महिने व्यतीत केले.

मार्च १९२३ : "प्रॉब्लेम ऑफ डी रुपी" या विषयावरील प्रबंध यामुळे डी.एस.सी. बॉन विद्यापीठाची पदवी प्राप्त.

१९२३ : बॅरिस्टर ग्रेज इन पदवीप्राप्त.

एप्रिल १९२३ : भारतात आगमन अजून पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली प्रारंभ. तेथेसुद्धा जातीयतेचा कडवट अनुभव.




जुलै १९२४ : दलित वर्गाच्या व्यापक हितासाठी "बहिष्कृत हितकारणी सभा" या संस्थेची मुंबईत स्थापना.

१९२५ : "ब्रिटीशकालीन भारतात प्रांतीय अर्थव्यवस्थेचा विकास" या विषयावरील महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित.

१९२६ : भारतीय मुद्रा (रुपिया) या विषयावर रॉयल कमिशन ( हिल्टन यंग) पुढे साक्ष.

१९२६ : मुंबई प्रांतातील प्रांतिक मंडळाचे सभासद म्हणून सरकारने नेमणूक केली.

मार्च १९२७ : चवदार तळ्याचा महाड प्रसिद्ध संग्राम अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी पहिला सत्याग्रह. दलित चळवळीतील आंदोलनाचे हे पहिले पाहूल.

एप्रिल १९२७ : "बहिष्कृत भारत" पाक्षिकाचे प्रथम प्रकाशन "समाज समता संघाची" स्थापना.

मे १९२८ : सायमन कमिशन समोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ कशासाठी पाहिजे त्यावर आग्रही प्रतिपादन.

जून १९२८ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध काय ते विषयाचे प्राध्यापक.

मार्च १९३० : "जनता" साप्ताहिक सुरु.

सप्टेंबर १९३२ : ब्रिटन पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी "कम्युनल अवॉर्ड" जाहीर करून विभक्त मतदारसंघांची मागणी अशांत पूर्ण केली होती. यावर निषेध म्हणून गांधींचे प्रांतिक उपोषण. गांधींचे प्राण वाचून अस्पृश्य वरील भावी संकट टाळावे या हेतूने डॉ बाबासाहेबांनी "पुणे करारावर" स्वाक्षरी केली व संयुक्त मतदारसंघात मान्यता दिली.

१९३२ - ३४ : संविधान सुधारणा संबंधी संसदेच्या संयुक्त समितीचे सभासद.

मे १९३५ : रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू.

जून १९३५ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती.

डिसेंबर १९३५ : "जात पात" तोडक मंडळ लाहोरच्या परिषदेला अध्यक्ष म्हणून आमंत्रण.

१९३६ : "जाती पद्धतीचे उच्चाटन" यावर गाजलेले अध्यक्ष भाषण त्यांना सादर करण्यास "जात पात तोळख मंडळ" या संयोजक संस्थेने परवानगी दिली नाही. त्यावर गांधींनी हरिजन साप्ताहिक प्रचंड टीका केली. त्यावर डॉक्टरांनी सडेतोड उत्तर दिले.

ऑगस्ट १९३६ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.

जानेवारी १९३७ : मुंबई प्रांतिक सभेत सभासद म्हणून निवड निवडून आलेत.

जानेवारी १९३९ : काळे स्मृती व्याख्यानमाला पुण्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेमार्फत केली जात होती. तेथे भाषणात १९३५  च्या स्वातंत्र्याच्या सरकारी योजनेवर टीकेची झोड.

एप्रिल १९४२ : गव्हर्नर च्या दिल्ली कार्यकारणी परिषदेचे मजूर सदस्य म्हणून नेमणूक.

डिसेंबर १९४२ : कॅनडामध्ये पॅसिफीक रिलेशन्स परिषदेत "गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति" या विषयावर एक निबंध सादर केला. जो १९४३ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाला.

जानेवारी १९४३ : 'गांधीजी व रानडे' या विषयावर न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ या जन्मदिनी दिनाच्या निमित्ताने झालेल्या समारंभात भाषण दिले. पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध 'शॉर्ट ऑन पाकिस्तान' या पुस्तकाचे प्रकाशन.

जून १९४५ : गांधी व काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले? या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध.

एप्रिल १९४५ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

एप्रिल १९४६ : सिद्धार्थ कॉलेज मुंबई उद्घाटन.

जुलै १९४६ : व्हॉईसरॉय कौन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा (बाबासाहेब बंगाल कॉन्स्टिट्यूशन सदस्य म्हणून निवडून गेले होते. परंतु भारत पाकिस्तान विभाजन निश्चित झाल्यावर सर्व सभासदांनी राजीनामा दिला, त्यात डॉ बाबासाहेबांनी सुद्धा राजीनामा दिला.) त्यानंतर मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाने विधिमंडळात डॉ. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली जागा डॉ बाबासाहेबांना दिली डॉ बाबासाहेब विधिमंडळाचे सभासद झाले. 

सप्टेंबर १९४६ : अस्पृश्यांच्या हीत संबंधाचे स्वतंत्र भारतात रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर इंग्लंडच्या कॅबिनेट मिशन ने चुका केल्या होत्या. आपले याबाबतचे मत सांगण्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लंडनला शिष्टमंडळ रवाना.

ऑक्टोबर १९४६ : अस्पृश्य पूर्वी कोण होते ? हे पुस्तक प्रसिद्ध केले.

मार्च १९४७ : शासन आणि अल्पसंख्यांक या विषयावर अल्पसंख्यांकाचे मूलभूत अधिकार संरक्षण याबाबत एक टिपणी सादर.

ऑगस्ट १९४७ : पंडित नेहरू च्या अंतरिम सरकार मध्ये कायदा मंत्री म्हणून सामील, घटना समितीच्या ग्राफ्टिंग समितीचे सदस्य.

एप्रिल १९४८ : कृष्णराव बी. कबीर यांच्या मुलीबरोबर शारदा कबीर यांच्याशी विवाह.

ऑक्टोबर १९४८ : भाषा व प्रांतिक रचना कमिशन पुढे (धर कमिशन) डॉ बाबासाहेबांनी महाराष्ट्र भाषावर प्रांत रचनेत त्यांचे स्वरूप यावर निवेदन दिले.

नोव्हेंबर १९४८ : 'मसुदा समितीचे अध्यक्ष' या नात्याने घटनेच्या मसुदा अंतरिम लोकसभेचे पुढे सादर केला.

जून १९५० : मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद स्थापना.

डिसेंबर १९५० : जागतिक बौद्ध परिषद, कोलंबो प्रतिनिधी.

फेब्रुवारी १९५१ : हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.

९ मे १९५१ : जनतेच्या  प्रतिनिधित्वाचे बिल (निवडणुकीचा कायदा)

जुलै १९५१ : "भारतीय बौद्ध जनसंघ" ची स्थापना.

https://www.amazon.in/gp/product/B08G896B5S/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=jpnews786-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B08G896B5S&linkId=2fb3ed0d185aea3df8fe7d30e11507f8सप्टेंबर १९५१ : 'बुद्ध उपासना पाठ' या पुस्तकांचे संकलन केले.

डिसेंबर १९५१ : हिंदू कोड बिलाला काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला होता पण सनातन्यांच्या विरोधामुळे काँग्रेसला माघार घ्यावी लागली. या कारणाने तसेच इतर मतभेदांमुळे डॉ आंबेडकरनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

मे १९५२ : राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती, त्याआधी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ शकले नाही.

मे १९५२ : कोलंबिया विद्यापीठाच्या (अमेरिका) द्वी शताब्दी समारंभानिमित्त एल. एल. डी सन्मानाने दिली.

मे १९५३ : सिद्धार्थ कॉलेज - मुंबई कॉमर्स अर्थशास्त्र विभागाचे उद्घाटन लोकसभेच्या पोटनवडणुकीसाठी अर्ज भरला.

डिसेंबर १९५४ : जागतिक बौद्ध परिषद (रंगून) येथे प्रतिनिधी.

मे १९५५ : भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.

डिसेंबर १९५५ : भाषावर प्रांतरचना संबंधी संयुक्त महाराष्ट्र बाबत ठाम मत मांडले.

जून १९५६ : सिद्धार्थ लॉ कॉलेज चे उद्घाटन.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

१५ ऑक्टोबर १९५६ : नागपूर दीक्षा भूमीवर भाषण देले.

१५ नोव्हेंबर १९५६ : काठमांडू नेपाळ येथील चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत भाषण.

६ डिसेंबर १९५६ : महापरिनिर्वाण

१४ एप्रिल १९९० : मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान.

ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी लिखित संविधानाचे अंतरंग या पुस्तकातून.


वाचा - 

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court...

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

वक्फ बोर्डाचे सिईओला मुदतवाढ देण्यास विरोध - MAHARASHTRA BOARD

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 फाईल चोरीच्या आरोपावर दिले स्पष्टीकरण, वक्फ बोर्डाच्या बैठकीत 45 प्रस्तावावर चर्चा



औरंगाबाद, 8 जानेवारी

वक्फ बोर्डाचे सिईओ हे ३० जानेवारीला सेवानिवृत्त होत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे तरी त्यांना मुदतवाढ देण्यास माझा विरोध आहे. पूर्णवेळ सिईओची शासनाने नियुक्ती करावी यासाठी पाच अधिका-यांच्या नावाची शिफारस केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत वक्फ बोर्डाचे सदस्य अँड खालेद बाबू कुरेशी यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले वक्फ मंत्र्यांनी फाईल चोरल्याचा खोटा आरोप लावला होता त्याबद्दल त्यांनी आज स्पष्टीकरण दिले. या कारणांमुळे सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्याला न्यायालयात आवाहन दिले होते. ज्या फाईल माझ्याकडे होत्या मी सदस्य असल्याने लॉकडाऊनच्या काळात कामकाज बंद असल्याने अभ्यासासाठी नेले होते. त्याची परवानगी वक्फ बोर्डाकडून घेण्यात आली होती असे ते म्हणाले. आजच्या बैठकीत ४५ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डात कामाचे नियोजन नाही. एनओसी, नवीन नोंदणीसाठी संबंधितांना चकरा माराव्या लागतात. सक्षम अधिकारी, कर्मचा-यांची कमतरता आहे. पूर्णवेळ सिईओ नसल्याने निर्णय लांबणीवर पडतात. शासनाकडून वक्फ बोर्ड कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी लावला. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे दिवसभर बैठक सुरु होती. बैठकीला अशासकीय सदस्य अँड खालेद बाबू कुरेशी, शासकीय सदस्य इम्तियाज काजी, सिईओ अनिस शेख यांची उपस्थिती होती.

वाचा - 



नवी मुंबई विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे नाव देण्यात यावे - हाजी शाहनवाज खान AIMIM

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 



मुंबई - महाराष्ट्र 

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी झाला तर मृत्यू २ डिसेंबर २०१४ साली झाला. हे भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री झाले होते. रायगड जिल्ह्याच्या आंबेत गावामध्ये जन्मलेल्या अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठ व लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८० मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९ व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले. अंतुले यांनी रायगड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. सन २००४ साली ते पुन्हा १४ व्या लोकसभेवर निवडून आले. देशभरातील राजकारणात, समाजकारणात अखंडपणे अविरत असणारे अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नव्याने होणाऱ्या नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले साहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी एम आय एम विद्यार्थी प्रदेश महासचिव हाजी शहनवाज यांनी प्रधान मंत्री, महाराष्ट्राचे मुख्य मंत्री, नगर विकास मंत्री यांना केली आहे.





मुंबई - महाराष्ट्र 

बैरिस्टर अब्दुल रहमान अंतुले का जन्म ९ फरवरी, १९२९ को हुआ था और २ दिसंबर २०१४ को उनका निधन हो गया था। वह भारत में एक राजनेता, केंद्रीय अल्पसंख्यक मामलों के मंत्री और महाराष्ट्र के आठवें मुख्यमंत्री थे। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के एक सदस्य, अंतुले मनमोहन सिंह २००६ से २००९ तक केंद्र सरकार में अल्पसंख्यक मामलों के पहले केंद्रीय मंत्री बने। रायगढ़ जिले के अंबेट गाँव में जन्मे अंतुले ने मुंबई और लंदन विश्वविद्यालय में अध्ययन किया और बैरिस्टर की डिग्री प्राप्त की। अंतुले, जो १९६२ से महाराष्ट्र की राजनीति में सक्रिय हैं, १९६२ से १९७६ तक विधान सभा के सदस्य रहे। १९७६ से १९८० तक राज्यसभा सदस्य रहने के बाद, अंतुले साहब १९८० में फिर से विधान सभा के लिए चुने गए और जून १९८० से जनवरी १९८२ तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में कार्य किया। १९८९ तक एक विधायक रहने के बाद, अंतुले ९ वीं लोकसभा के लिए चुने गए और १९९८ तक सांसद बने रहे। अंतुले ने अपना पूरा जीवन रायगढ़ जिले के लोगों की सेवा में बिताया है। २००४ में, वह १४ वीं लोकसभा के लिए फिर से चुने गए। अंतुले महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री थे। इसलिए, नए नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का नाम बैरिस्टर अब्दुल रहमान अंतुले के नाम पर रखा जाना चाहिए, जिसमें प्रधानमंत्री, महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शहरी विकास मंत्री, एमआईएम छात्र क्षेत्र के महासचिव हाजी शाहनवाज की मांग की गई है।


वाचा -

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प ....

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ....

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned....

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प

 कशी नशिबाने थट्टा मांडली




"त्या" अर्धनग्न मातेला मानवसेवेच्या मायेने झाकले

अहमदनगर :- १० जानेवारी २०२१

चिखलाने माखलेले केस, मानसिक भान हरवून नुसती बडबड, अंगावर फाटके कपडे, संपुर्ण शरीराची किळसवाणी अवस्थेतील एक निराधार महिला बुरुडगाव रोड, साळुंके मळा परीसरात फिरत होती. या महिलेची अवस्था पाहून श्री स्वप्नील कुलकर्णी सर आणि श्री समीर बोरा सर यांनी निराधार मानसिक विकलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना whatsapp द्वारे माहिती दिली. आज रविवार दि. १०/०१/२०२१ रोजी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अनिता मदणे, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, स्वप्नील मधे, चंदा मावशी हे प्रत्यक्ष बुरुडगाव रोडवर जावून या निराधार मानसिक विकलांग महिलेची सुशृषा करुन उपचार व पुनर्वसनाकरीता श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या“मानवसेवा”प्रकल्पात दाखल करुन आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर हे या महिलेवर उपचार करीत आहेत. 

अहमदनगर - मैला बालों वाली एक बेघर महिला, होश खो बैठी, फटे कपड़े, बदहवास बदन बड़ागांव रोड के सालुंके माला इलाके में घूम रही था। इस महिला की स्थिति को देखकर, श्री स्वप्निल कुलकर्णी सर और श्री समीर बोरा सर ने श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडल के संस्थापक दिलीप गुंजल को सूचित किया, जो व्हाट्सएप के माध्यम से मानसिक रूप से विकलांगों के पुनर्वास के लिए काम कर रहे हैं। आज रविवार है। 10/01/2021 को, संगठन के स्वयंसेवकों राहुल सेबल, सुशांत गायकवाड़, अनीता मदने, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दलवी, स्वप्निल माधे, चंदा मावे ने सीधे बुरडगाँव रोड पर जाकर इस बेसहारा मानसिक रूप से विकलांग महिला की देखभाल की। "मानव सेवा" परियोजना में दाखिल करके समर्थित। मनोचिकित्सक डॉ अनय क्षीरसागर इस महिला का इलाज कर रहे हैं।

मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!

•••••••••••••••••••••••••

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३, ९११२०४९१९१, ९११२०५९१९१




वाचा - 

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ....

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे - डॉ.रेश्मा चेडे...

गुजरात राज्यातील हरवलेल्या वृद्ध महिलेला मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले कुटुंब - manavseva project ....


अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT

 #_I_love_Ahmednagar





          अहमदनगर के पास भिंगार नदी पर स्थित एक किला है। यह अहमदनगर सल्तनत का मुख्यालय था। 1803 में, इसे दूसरे एंग्लो-मराठा युद्ध के दौरान अंग्रेजों द्वारा लिया गया था। इसे ब्रिटिश राज के दौरान जेल के रूप में इस्तेमाल किया गया था। वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।


प्रमुख विशेषताएं

1803 में अहमदनगर किला दिखने में गोल था, जिसमें चौबीस गढ़, एक बड़ा गेट, और तीन छोटे सैली पोर्ट थे। यह एक हिमनद था, कोई ढंका हुआ रास्ता नहीं; एक खाई, दोनों तरफ पत्थर के साथ, लगभग 18 फीट (5.5 मीटर) चौड़ी, 9 फीट (2.7 मीटर) पानी के साथ चारों ओर, जो केवल स्कार्प के शीर्ष के 6 या 7 फीट (2.1 मीटर) तक पहुंच गया था; चारों ओर लंबे नरकट उग आए। बरम केवल एक गज चौड़ा था। प्राचीर काले हेवन पत्थर का था; चूनम में ईंट का पैरापेट, और दोनों एक साथ ग्लेशिस की शिखा से दिखाई देते थे जो कि एक क्षेत्र-अधिकारी के तम्बू के ध्रुव के समान ऊंचा होता था। गढ़ सभी लगभग 1 ⁄2 फीट ऊंचे थे; वे गोल थे। उनमें से एक ने आठ बंदूकों को बारबेट पर रखा, जो पूर्व की ओर इशारा करते थे; बाकी सभी में जिंगी था, [वर्तनी की जांच करें] प्रत्येक में चार। 1803 में प्रत्येक गढ़ में दो बंदूकें दिखाई दीं, और कहा गया कि किले में 200 घुड़सवार तैयार किए जाएंगे।

किले के पश्चिम में एक गनशॉट अहमदनगर का पेटा था। किले के मुख्य द्वार ने पेटा का सामना किया, और पुरुषों के लिए एक छोटे से अर्धवृत्त और कई छोटे टावरों के साथ एक छोटे से अर्ध-वृत्ताकार कार्य द्वारा बचाव किया गया था। खाई के ऊपर एक लकड़ी का पुल था, जिसे युद्ध के समय में निकाला जा सकता था, लेकिन यह एक ड्रॉब्रिज नहीं था। यह बताया गया था कि पुल के रूप में एक लोहे का गर्त, उस पर या उसके समर्थकों पर रखा जा सकता है, और लकड़ी का कोयला या अन्य कंबस्टिबल्स के साथ भरा जा सकता है, जिसे दुश्मन के संपर्क में आने के रूप में प्रज्वलित किया जा सकता है।

एक छोटी नदी उत्तर की ओर से आई थी, जो कि पेटा के पश्चिम की ओर गोल थी, और किले के दक्षिण की ओर चली गई। किले के बीच में उत्तर की ओर से एक नाला भी गुजरता है, जो भिंगार नामक एक शहर और पूर्व की ओर बंदूक की नोक पर आता है और नदी में समा जाता है। एक संभावित रक्षात्मक कमजोरी, भिंगार के करीब और पूर्व में एक छोटी पहाड़ी या बढ़ती जमीन थी, जहाँ से घेराबंदी की गई तोपों से गोली मारकर किले तक पहुँचा जा सकता था।

पहाड़ियों से दो नल या ढंके हुए एक्वाडक्ट्स उत्तर की ओर एक मील या उससे अधिक की दूरी से गुजरे और पेटा और कस्बे की आपूर्ति करते थे, और फिर किले में, खाई के नीचे या उसके नीचे तक चले जाते थे, जिसमें अपशिष्ट गिर जाता था।

सैली बंदरगाहों से खाई के पार कोई मार्ग नहीं था, और खाई के ऊपर एक्वाडक्ट्स का कोई हिस्सा दिखाई नहीं दिया। ऊपर उल्लिखित नाले में खड़ी बैंक थीं और किले के 60 गज के भीतर से गुजरती थीं; भिंगार से जलमार्ग इसके नीचे से गुजरा। नाले पर कोई पुल या एक प्रमुख क्रॉसिंग पॉइंट भी नहीं था और इसलिए किले और भिंगार शहर के बीच कोई स्पष्ट रूप से परिभाषित मार्ग नहीं था।

पेटा और किले के आसपास कई छोटे पैगोडा और मस्जिद थे, लेकिन उन कस्बों की तुलना में किले और भिंगार के बीच या किले के पास बिल्कुल भी नहीं था।

इतिहास

िले का निर्माण मलिक अहमद निज़ाम शाह प्रथम (जिनके नाम पर अहमदनगर शहर के नाम पर किया गया था) ने 1427 में किया था। [उद्धरण वांछित] वह निज़ाम शाही वंश का पहला सुल्तान था और उसने पड़ोसी से आक्रमणकारियों के खिलाफ शहर की रक्षा के लिए किला बनवाया था। इदर [प्रशस्ति पत्र की जरूरत] शुरू में यह मिट्टी से बना था, लेकिन प्रमुख किलेबंदी 1559 में हुसैन निजाम शाह के तहत शुरू हुई। चार साल लग गए और आखिरकार 1562 में समाप्त हो गया। [उद्धरण वांछित] 1596 में, चांद बीबी रानी ने मुगल आक्रमण को सफलतापूर्वक विफल कर दिया, लेकिन जब अकबर ने 1600 में फिर से हमला किया तो किला मुगलों के पास चला गया।

औरंगजेब की मृत्यु 20 फरवरी 1707 को 88 वर्ष की आयु में अहमदनगर किले में हुई थी। औरंगजेब की मृत्यु के बाद, यह किला 1724 में निज़ामों को, 1759 में मराठों को और बाद में 1790 में सिंधियाओं को दे दिया गया। मराठा साम्राज्य में अस्थिरता की अवधि के बाद माधवराव द्वितीय की मृत्यु, दौलत सिंधिया का किला और उसके आसपास का क्षेत्र उसके पास था। 1797 में, उन्होंने नाना फडणवीस को पेशवा राजनयिक को अहमदनगर किले में कैद कर दिया।

1803 में द्वितीय आंग्ल-मराठा युद्ध के दौरान, आर्थर वेलेस्ली ने मराठा सेनाओं को हराया और ईस्ट इंडिया कंपनी किले के कब्जे में आ गई।




आधुनिक युग

किले को अहमदनगुर किले के रूप में जाना जाता था और ब्रिटिश राज द्वारा एक जेल के रूप में इस्तेमाल किया गया था और यहीं से जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आज़ाद, सरदार पटेल और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नौ अन्य सदस्यों को छोड़ दिया गया था जब वे भारत छोड़ दिए गए थे। भारत का संकल्प। [४] [५] जवाहरलाल नेहरू ने अपनी लोकप्रिय पुस्तक-डिस्कवरी ऑफ इंडिया- लिखी थी, जबकि उन्हें अहमदनगर किले में कैद किया गया था। [२] [५] [६] उसी समय के दौरान, कांग्रेस नेता, मौलाना अबुल कलाम आज़ाद ने भी अपने प्रशंसित "ग़ुबार-ए-ख़ातिर" (Sallies of Mind) (उर्दू: اربار طاطر) को संकलित किया, जिसे उर्दू साहित्य में "उपनिवेशवादी निबंध" का सबसे अच्छा उदाहरण माना जाता है। ।

वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)


वाचा -

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned

"मा. मंत्रीमहोदय डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नामुळे मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद. यांच्या आदेशाला मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली कडून स्थगिती मिळविण्यात अन्न व औषध प्रशासनाला  यश"




महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटका, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे.  सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या सेवन करण्यामुळे मुखाचा कर्करोग तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात हे  वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्या अनुषंगाने विविध संशोधन झालेले असून, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपर मध्ये यांचा विस्तृत प्रमाणावर उल्लेख केलेला आहे.  या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य मध्ये गुटका, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम 188 व 328 यांचा समावेश होऊन आरोपीविरुद्ध संबंधित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येत होती. तथापि सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध लावण्यात येणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 च्या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली होत्या. त्यांचा एकत्रित निकाल मार्च 2016 मध्ये घोषित झाला. मा. उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी ह्याच फक्त उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वर लागू होतात असा निष्कर्ष दिला.

सदर निकालाच्या विरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र अभिमत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी बरोबर भारतीय दंड संहितेच्या तरतुदी लागू होतात असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने देऊन, सदर सर्व तेरा याचिका  रिमांड बॅक करण्यात आल्या व त्याची  पुन्हा सुनावणी होऊन  मा. उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद  यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी निकाल घोषित केला की, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 188 लागू होते त्यामुळे प्रशासन चिंतेत होते.तथापि मा. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरुद्ध माननीय मंत्रिमहोदय डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकार तर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व त्यासोबत कलम 328 हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहे असे मा. सर्वोच्च न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्रीयुत चिटणीस ,पाटील यांच्या मार्फत स्वतंत्र अभिमत याचिका नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केल्या, त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दिनांक 7 जानेवारी 2021रोजी स्थगिती दिलेली आहे.

सदरील  कार्यवाही  मा. मंत्री   डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब तसेच अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त श्री अभिमन्यू काळेसर तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री सौरभ विजय त्याचबरोबर विधी व न्याय खात्याचे प्रधान सचिव,विधी व न्याय खात्याचे औरंगाबादचे उपसचिव श्री चव्हाण, सहसचिव श्री कदम ,सरकारी अभियोक्ता श्रीयुत यावलकर (खंडपीठ, औरंगाबाद) सहआयुक्त आढाव, यांचे मार्गदर्शनाखाली सह आयुक्त औरंगाबाद विभाग श्री वंजारी , सहाय्यक आयुक्त नांदेड बोराळकर, अन्न सुरक्षा अधिकारी औरंगाबाद श्री फरीद सिद्दिकी यांनी पूर्ण केली.





वाचा -

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान - KADAR KHAN ....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत....



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या