राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA


महाराष्ट्र- मुंबई


सध्या महाराष्ट्रात कोविड च्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, संभाव्य वाढणा-या रुग्णांचे हित लक्षात घेऊन ऑक्सिजन, रेम्डेसिवीर इंजेक्शनची व रक्ताची पुरेशी उपलब्धता व्हावी याकरीता अन्न व औषध प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.  औषध नियंत्रण,भारत सरकार यांनी सदर औषधाच्या उत्पादन व विक्री/वितरणासाठी मे.सिप्ला लि., मे. हेटेरो हेल्थकेअर व मे. मायलॅान लि.,  मे. झायडस कॅडिला, मे. डाँ. रेडिज,  मे. ज्यूबीलंट लाईफ सायंसेस व मे. सन फार्मा. या औषध उत्पादकांना उत्पादन व विक्री/वितरणासाठी अनुमती दिलेली असून, सध्या एकूण 7 औषधी उत्पादकांचा Remidesivir Injection चा साठा गंभीर रूग्णांकरीता उपलब्ध आहे. सदरच्या औषधांचे विक्री वितरण हे त्यांच्या भिवंडी, नागपूर व पूणे इत्यादी डेपोमधून संपूर्ण राज्यात शासकिय /निमशासकिय रूग्णालये , संस्था व वितरकांना पुरवठा होत आहे.

सदर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची परिस्थिती पाहता डॉ. राजेंद्र शिंगणे , माननीय मंत्री महोदय,अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, श्री. सौरभ विजय, माननीय सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व श्री. अभिमन्यू काळे, माननीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांनी दिनांक ०४.०४.२०२१ रोजी रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादकांचे व मेडिकल ऑक्सिजन उत्पादक यांचे प्रतिनीधी व प्रशासनाचे अधिकारी यांचे सोबत तातडीची बैठक घेतली व महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त इंजेक्शनचा  पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.  तसेच त्यानुसार सर्व उत्पादकांनी प्राधान्याने  महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे 5000०  ते ६०००० इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात Remdesivir Injection चा फारसा तुटवडा नाही.

          शासनाने दिनांक 30/03/2021 च्या आदेशान्वये राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठयापैकी 80 टक्के साठा हा वैदयकिय वापरासाठी राखीव ठेवला आहे.

        महाराष्ट्र  राज्यातील दररोजचे ऑक्सीजनचे उत्पादन 1250 मेट्रीक टन इतके असून त्यापैकी 700 टन साठा वैदयकिय कारणासाठी वापरला जात आहे.

       ऑक्सीजनची सर्वत्र योग्य व जलद वाहतूक केली जावी म्हणून आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी दिनांक 03.04.2021 च्या आदेशान्वये राज्यातील 06 महत्वाच्या उत्पादकांचे 80 टक्के टँकर्स मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत.

          

          भविष्यात ऑक्सीजनची अधिकची गरज भासल्यास त्या दृष्टीने शासनाने गुजरात व छत्तीसगड मधून ऑक्सीजन आणण्यास सुरुवात केली आहे.

         तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठया संख्येने नाहीत अशा राज्यामधुन देखील ऑक्सिजन प्राप्त करुन घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरु आहे. त्यामुळे मेडीकल ऑक्सीजनची रुग्णासाठी करण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होवू नये या बाबीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अदयापपावेतो  अशी कोणतीही घटना तथा तक्रार अन्न व औषध प्रशासनास  प्राप्त झालेली नाही.

सदर औषधाचा कोवीड रूग्णांसाठी वापर करण्याबाबत जेव्हापासून अनुमती देण्यात आलेली आहे तेव्हापासून सदर औषधाच्या विक्री,वितरण व साठा यावर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण ठेवत आहे. Remdesivir Injection हे औषध तसेच आणीबाणीच्या प्रसंगी गरजू रूग्णास औषध सहज उपलब्ध्‍ व्हावे व सदर औषधाचा काळा बाजार होवू नये याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना काटेकोरपणे पाळत ठेवण्याबाबतच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर औषधाच्या किंमत आकरणीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. 

तसेच सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत झपाटयाने होत असलेली वाढ विचारात घेवून रेम्डेसीवीर इंजेक्शनचा वापर यथोचीत व योग्यरित्या करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे सर्व रुग्णालयांना करण्यात येत आहे. 

 Medical Oxygen व Remdesivir Injection यांच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठयाबाबत माहिती प्रत्येक जिल्हात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच त्यांच्या उत्पादकांना देखिल महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त साठयाचा पुरवठा करण्याबाबत सुचित करण्यात आलेले  आहे. सध्या महाराष्ट्रात Medical Oxygen, Remdesivir Injection औषधाचा पुरेसा साठा उपलबध होत असून तुटवडा होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

तरी Medical Oxygen व Remdesivir Injection कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत त्यांना औषध मिळून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. असे निर्देश मा.मंत्री अन्‍न व औषध प्रशासन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. 

मुंबई व राज्यतील इतर रक्तपेढयांकडे किती रक्त व त्याचे घटक उपलब्ध आहेत व ते किती कालावधीसाठी पुरेसे आहेत याबाबत अधिकाऱ्यांकडून मा’ मंत्री महोदया यांनी  आढावा घेतला असता दिनांक 03.04.2021 रोजी मुंबईतील रक्तपेढ्याकडे एकूण 3181 युनिट रक्त व रक्त घटक असल्याचे आढळून आले आहे’ तसेच राज्यात एकूण 29928 युनिट रक्त व घटक उपलब्ध असल्याचे दिसुन आले. सदर साठा अंदाजे 5 ते7 दिवसासाठी पुरेसा असुन पुढील कालावधीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा येवू नये यासाठी सर्व रक्त पेढयांनी लहान मोठे रक्तदान शिबीरे  कोव्हीड 19 च्या संदर्भात घ्यावयाची दक्षता पाळून आयोजित करावे असे आवाहन मा. मंत्री महोदय यांनी केले. अधिकाऱ्यांनी या संदर्भात सजग राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावी असेही निर्देश मा. मंत्री महोदय यांनी यावेळी दिले.

वाचा

तेढ अनुदान आणि विना अनुदानाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांचा- Granted and Non Granted Secondary school's...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2..

कलाकार...

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2

व्याख्या व संकल्पना



(१) समुचित शासन (२)!सक्षम अधिकारी (३) सार्वजनिक प्राधिकारी (४) माहिती (५) अभिलेख (६) विहित (७) त्रयस्थ पक्ष (८) सहाय्यक जनमाहिती अधिकारी (९) जन माहिती अधिकारी (१०) प्रथम अपिलीय अधिकारी (११) केंद्रीय माहिती अधिकारी (१२) राज्य माहिती आयोग

         (१) समुचित शासन केंद्र सरकार किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासन यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या.  घटित करण्यात आलेल्या.  त्यांच्याकडे मालकी असलेल्या.   त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीदवारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणाच्या बाबतीत.  केंद्र सरकार असा आहेे

>

        राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या. घटित करण्यात आलेल्या त्यांच्याकडे मालकी असलेल्या त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीदवारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणाच्या बाबतीत राज्य शासन असा आहे

              समुचित शासनाची जबाबदारी

 * कलम (१२)! प्रमाणे केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे

* कलम (१५) प्रमाणे. राज्य माहिती आयोग स्थापन करणे

* कलम (२६) समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे

" प्रशिक्षण. शिक्षण.  प्रचार. प्रसार.  

" दुर्बल घटकातील व्यक्तींच्या जागृकतेसाठी उपक्रम 

" मार्गदर्शन करणे

" सार्वजनिक प्राधिकरणाना मार्गदर्शन करणे

* कलम (२७) नियम करणे

* कलम ४(४) प्रसार प्रसिध्दी माध्यमांच्या खरचाएवढी किंवा मुद्रणालय खर्चा एवढी किंमत

* कलम ६ चया पोट कलम (१) अन्वये देय असलेली फि 

* कलम ७ ची पोटकलमे (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि 

* कलम १३(६)  अन्वये वेतन भत्ते आणि

* कलम १६(६) माहिती आयोग वेतन सेवाशर्ती

* कलम १९(१०) दुसर्या अपिलाबाबत नियम.  मार्गदर्शक सूचना.  आदेश देणे.  विहित करणे.   आवश्यक असेल अशी बाब 

* कलम २९ नियम सभागृहा पुढे ठेवणें

" सक्षम अधिकारी " 

* लोकसभा.  / राज्यसभा. / विधानसभा. अध्यक्ष

* राज्यसभा / विधानसभा   सभापती

* सर्वोच्च न्यायालय.  भारताचे मुख्यमंत्री. न्यायमूर्ती

* उच्च न्यायालय   उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

* सविधानाप्रमाणे. किंवा संविधानाअनवये 

* स्थापन / घटित. करण्यात आलेले प्राधिकरण.   राष्ट्रपती

* संविधान अनूछेद २३९ अन्वये नियुक्त. करण्यात आलेला. 

"सक्षम अधिकारी जबाबदारी

* सार्वजनिक.  प्राधिकरणाना. मार्गदर्शक करणे

     कलम. २८ नियम करणे.  कलम. ४(४) अन्वये प्रसार प्रचार. प्रसिध्दी. माध्यमांचा खर्च. किंवा मुद्रणांक खर्चा एवढी रक्कम

*. अधिकारी. कर्मचारी. प्रशिक्षण

कलम. ६ ची पोट कलम (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि

* मार्गदर्शिका तयार करणे 

कलम ७चे पोट कलमे (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि विहित करणे आवश्यक असेल अशी बाब मार्गदर्शक सूचना आदेश देणे


"सार्वजनिक प्राधिकरण " 

* सविधाना प्रमाणे किंवा तदनवये 

* संसदेने तयार केलेल्या कायद्यानुसार

* राज्य विधान मंडळाने तयार केलेल्या कायद्यानुसार

    स्थापन घटित करण्यात आले आहे

शासनाची मालकी असलेला. तयाचे नियंत्रण असलेला किंवा त्यांच्याकडून निधी नुसार प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो अशी अशासकीय संघटना

" सार्वजनिक प्राधिकरण जबाबदारी " 

* प्रशिक्षण व निधी उपलब्ध

* जन माहिती अधिकारी / अपिलीय अधिकारी

* माहिती अधिकाराचा कायदा व सामाजिक लेखा परिक्षण

* संघटनात्मक वर्तन रिती व आंतरवैयकतिक. संबंध प्रशिक्षण

* जनसंपर्क व प्रतिसादाच्या. प्रशासन कौशल्य प्रशिक्षण

* माहिती पुरविण्यासाठी पुरेसा निधी जन माहिती अधिकाराला उपलब्ध करून देणे

* स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटन करणे व अद्यावत ठेवणें

* आवश्यक फलक लावणे

* आवश्यक सुविधा पुरविणे

* माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रत

* माहितीचा अधिकार नियमांची प्रत

* शासन निर्णय.  शासन आदेश. परिपत्रक प्रती

*. बॅनर्स. पोस्टर.  माहिती पत्रके

* सी डी. / फिल्म/ रजिस्ट्रर. / कोरया. अर्जाचे नमुने

* अहवाल पाठविण्याचे विविध नमुने

* मार्गदर्शक पुस्तिका. कार्यान्वित. स्थायी आदेश ई 

" कलम. २/४/५/ते ११/२५/" 

* सार्वजनिक प्राधिकरण यांची कार्ये

* कलम. ४ अंमलबजावणी

* अभिलेख व्यवस्थापन

* जनमाहिती अधिकारी

* सहाय्यक जन माहिती अधिकारी

* प्रथम अपिलीय अधिकारी

* पदनिरदेशन

* अर्ज असेल त्याप्रमाणे माहिती प्रकट करणे

* फलक लावणे

* व्यवस्था करणे

* प्रशिक्षण

*अहवाल पाठविणे

"माहिती"

कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य

अभिलेख.   दस्त ऐवज.  ज्ञापने.  ई-मेल.  अभिप्राय.  सुचना.  प्रसिध्दी पत्रके.   परिपत्रके.   आदेश.   रोजवहया.  संविदा.  अहवाल.   कागदपत्रे.   नमुने.   व प्रतिमाने.   ( माॅडेल ) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात.    आधारसामग्री.   अभिलेख.  दस्त ऐवज हस्तलिखित.  व फाईल ई. 

बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

"माहिती अधिकार कलम ३ "

     माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोग याचा अर्थ कलम १२/ पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला केंद्रीय माहिती आयोग असा आहे

राज्य माहिती आयोग. याचा अर्थ कलम १५/ पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला राज्य माहिती आयोग असा आहे

  " माहिती अधिकार कलम. ३

*माहिती अधिकार कोणासाठी ? 

या अधिनियम तरतुदी अधिन राहून सर्व नागरिकांना माहिती घेणेचा अधिकार असेल 

" माहिती अधिकार भाग. _२ 

*स्वयम् प्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती ( १ ते १७ बाबी ) कलम (४) 

* स्वयम् प्रेरणेने प्रकटन नमुने ( स्वस्त धान्य दुकान ) 

* महाराष्ट्र अभिलेख व्यवस्थापन अधिनियम. २००५ महत्वाची तरतूद

" माहिती अधिकार कलम. (४) 

स्वयम् प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सार्वजनिक प्राधिकरणावरील आ बंदने 

* (क ) सार्वजनिक प्राधिकरण त्याच्याजवळ असलेली सर्व माहिती

* योग्य रितीने सूचिबध करिल

* त्याची निर्देश सूची. तयार करील आणि ज्यांचे संगणकीकरण करणे योग्य आहे अशा सर्व अभिलेखाची माहिती

* संगणकीकरण करून विविध प्रणालीचा  वापर करून. नेटवर्क मार्फत ते जात आहेत

" (ख " प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरण अधिनियम अधिनियमित झाल्यापासून  १२० दिवसांच्या आत ( १७ प्रकारची ) माहिती प्रसिद्ध करील आणि दरवर्षी ती प्रकाशने अद्यावत करील

* प्राधिकरणाची. रचना.  कार्य.  आणि कर्तव्य.  यांचा तपशील 

* प्राधिकरणातील. अधिकारी.  कर्मचारी.  यांचे अधिकार. आणि कर्तव्य. 

* प्राधिकरणामधये. निर्णय घेण्याची. कार्यपद्धती.  पर्यवेक्षण उत्तरदायित्व प्रणाली

* प्राधिकरणाची. कार्य पार पाडण्याची " मानके "

" (१) (ख ) माहिती अधिकार

" कार्य पार पाडण्यासाठी नियम.  विनिमय सुचना

* प्राधिकरणातील. दस्त ऐवजाचे विविध प्ररवगातील विवरण 

* धोरण तयार करण्याची व्यवस्था  / तपशील

* प्राधिकरणातील बैठकाचे कार्य वृत / बैठका लोकांसाठी

* प्राधिकरणातील अधिकारी / कर्मचा-यांची निर्देशिका 

* अधिकारी / कर्मचारी यांची मासिक वेतन. / नुकसान भरपाई देण्याची पद्धती

(१) (ख ) 

* सर्व योजनांचा तपशील.  अर्थ संकल्प.  संवितरीत केलेल्या रककमाचा तपशील

* अर्थ सहाय्य.  कार्यक्रमाची अंमलबजावणी.  रीत.  वाटप.  केलेल्या रक्कमा लाभार्थी तपशील

* सवलती. परवाने.  प्राधिकारपत्रे.  दिलेल्या व्यक्तिचा तपशील

* इलेक्ट्रॉनिक माहिती चा तपशील

* नागरिकांना उपलब्ध सुविधा ( वाचनालय इ ) चा तपशील

* पी. आय. ओ.  नावे. पदनाम. व इतर तपशील

* विहित करण्यात येईल अशी माहिती

" (१) (ग ) "

ज्यामुळे लोकांना बाधा पोहचते अशी महत्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करताना संबंधित सर्व वस्तू स्थिती प्रसिद्ध करील

" (१)  (घ ) माहिती अधिकार

आपल्या प्रशासन किंवा नयायिकतव निर्णयाबाबत कारणे बाधित व्यक्तिंना कळविणे 

(२) प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरण नियमित कालांतराने संपर्काच्या विविध साधनांद्वारे. स्वताहून माहिती पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहील

(३) प्रत्त्येक माहिती विस्तृत प्रमाणात आणि लोकांना सहजपणे उपलब्ध होईल अशा स्वरूपात आणि अशा रितीने प्रसारीत करण्यात येईल

(४) हि सर्व माहिती जन माहिती अधिकारी यांचेकडे इलेक्ट्रॉनिक किमतीला उपलब्ध असावी

" आपण आपल्या ग्रामपंचायत विभागात चालणार्या कामांची माहिती अशी आणि कोणत्या विभागांची माहिती मागू शकतो त्यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ आपलीं ढाल आहे

आपला अधिकार आहे

सार्वजनिक प्राधिकरण ग्रामपंचायत कार्यालय करिता माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख ) ( १ ते १७ ) अंतर्गत करावयाच्या स्वयम् प्रकटनाचा नमुना प्रतिवर्षी अद्यावत करणे अनिवार्य आहे

(१) सर्वसाधारण माहिती

* पदनाम

* सरपंच. * तंटामुक्ती समिती अध्यक्ष *ग्रामसेवक ( ग्रामपंचायत सचिव ) * तलाठी * कोतवाल. * ग्रामपंचायत शिपाई. *पाणी पुरवठा कर्मचारी *कृषी सहायक *व इतर

(२) जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ग्रामपंचायत भिंती वर लावणे बंधनकारक आहे

* जन माहिती अधिकारी

*प्रथम अपिलीय अधिकारी

*द्वितीय अपिलीय अधिकारी

(३) ग्रामपंचायत गावातील लोकसंख्या तपशील

*प्रकार

* एकूण लोकसंख्येच्या

*अनुसूचित जाती

*अनुसूचित जमाती

* मतदार

* कुटुंबाचा प्रकार 

* एकूण कुटुंब

*. दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका

* अंत्योदय शिधापत्रिका धारक

" संचिकेत ठेवावयाची माहिती "

प्रकार ग्रामपंचायत लोकसंख्या तपशील

* गावांची एकूण लोकसंख्या

* अनुसूचित जाती

*अनुसूचित जमाती

*इतर मागासवर्गीय

* अल्पसंख्याक

         इतर

*एकूण मतदार

*अनुसूचित जाती

*अनुसूचित जमाती

* इतर मागासवर्गीय

*अल्पसंख्याक

          इतर

*विशेष क्षमता असलेली व्यक्ती

* शेतकरी जमीनधारक

* अनुसूचित जाती ( जमीन धारक )

*अनुसूचित इ ( जमीन धारक )

*इतर मागासवर्गीय ( जमीन धारक ) 

* अल्पसंख्याक ( जमीन धारक )

           कुटुंब प्रकार

* दारिद्रय रेषेखालील कुटुंब

* दारिद्रय रेषेवरील कुटुंब

* अंत्योदय कुटुंब

* अन्न पूर्णा कुटुंब

* घरात शौचालय सुविधा असलेली कुटुंबे

* घरात शौचालय नसलेली कुटुंब

* विद्युत जोडणी असलेली कुटुंबे

* विद्युत जोडणी नसलेली कुटुंब

* शेतजमीन असलेली कुटुंबे

* भूमिहीन कुटुंब

* अल्पभूधारक कुटुंब

* घरात नळ जोडणी असणारे कुटुंब

* घरात नळ जोडणी नसणारे कुटुंब

* कच्च्या घरात राहणारे कुटुंब

* पक्क्या घरात राहणारे कुटुंब

* गायरान जमीन

*लागवडीसाठी योग्य नसणारी जमीन

* पडिक जमीन

* गावांची महसुली जमीन

            इतर

ग्रामपंचायत भागात पशूधन माहिती पशूधन प्रकार

*गाय. *बैल.  *म्हैस. *शेळी.  *मेंढी.  *उंट. *कोंबडी. 

(७) ग्रामपंचायत कर्मचारी. कर्तव्य.  जबाबदारी.  व अधिकार तलाठी.  ग्रामसेवक. इत्यादी यांची माहिती संचिकेत ठेवणे

*तलाठी. /पटवारी *ग्रामसेवक / ग्रामपंचायत ग्रामपंचायत सचिव*पाणीपुरवठा विभाग *

            इतर उपरोक्त नमूद कर्मचारी.  गावात मुक्कामी असणे बंधनकारक आहे

(८) ग्रामसभा बैठका प्रकारhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

* वाॅरड सभा.   *ग्रामसभा *ग्रामपंचायत सभा *ग्रामसचिवालय. 

(९) ग्रांमपचायत स्तरावरील योजना

         समितीचे नाव

*सामाजिक न्याय समिती

*ग्राम दक्षता समिती म न रे गा

*ग्राम आरोग्य समिती

*ग्राम दक्षता समिती ( सार्वजनिक विवरण )

*शाळा व्यवस्थापन समिती

"  (९) ‌ग्रामपंचायत करासंबधीचा माहिती"

         कराचा प्रकार

*घरपट्टी. *पानपट्टी. *स्वच्छता कर. *विद्युत कर. *व्यवसाय कर *जमीन महसूल * सांडपाणी व्यवस्थापन * दिवाबत्ती कर * बाजार कर. * इतर कारणाकरिता

* विहीरीतील पाण्याच्या वापरासाठी कर *नाले सफाई. * चौकी फि. *कोंडवाडा *

(१०) ग्रामपंचायत गाव विकास अंदाज पत्र

*२००८ उत्पन्न २००९ खर्च

* २००९ उत्पन्न २०१० खर्च

*२०११ उत्पन्न २०१२ खर्च

*२०१२ उत्पन्न २०१३ खर्च

(११) ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे स्त्रोत

*नदि / धरण *तलाव *हातपंप *खाजगी विहिरी *सार्वजनिक विहिरी

(१२) ग्रामपंचायत केंद्र शासन साहायित चालवल्या जाणाऱ्या योजना

*इंदिरा आवास योजना

*मंजूर किती. बाध किती कारण काय ? 

(१३) ग्रामपंचायत विकास कामांचा तपशील अंदाजे रक्कम खर्च *रस्ते *विहीर पुनर्भरण *चेक डॅमस *नाले गटर. *सांडपाणी व्यवस्थापन *अंगणवाडी. *शाळा.  सामाजिक बांधिल *पाणी पुरवठा (१४) ग्रामपंचायती मार्फत करण्यात येणारी खालील कामांचा तपशीील >

*जन्म मृत्यू नोंदणी *घर दुकान मुल्यांकन *जमीन मालकि व महसूल

सरकारी दुध संस्था /सहकारी बँक /पोस्ट कार्यालय /अग्नी शमन दल /पशूवैधकीय दवाखाना /खते / बियाणे / वितरण केंद्र /महिला मंडळ /युवक मंडळ /आपत्ती व्यवस्थापन /पोलिस चौकी पत्ता /पोलिस निरिक्षक / उपनिरीक्षक /पोलिस मित्र / सामाजिक सुरक्षा /अधिकारे व पत्ते

वरील प्रमाणे सर्व माहिती आपणास घेण्याचा अधिकार आहे आपला अधिकार आजच वापरा  काही मदत पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा

९८९०८२५८५९

वाचा -

कुळकायदा कुळकायदा - Land...

तेढ अनुदान आणि विना अनुदानाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांचा- Granted and Non Granted Secondary school's...

वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण...

कुटुंब आणि महिला...

तेढ अनुदान आणि विना अनुदानाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांचा- Granted and Non Granted Secondary school's

 


          आपल्या राज्यघटनेनुसार सर्वांना परस्थिती न बघता समान व निरपेक्ष मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध शैक्षणिक संकुल उभारत आहे त्यामध्ये कायम अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कोणत्या शिक्षण संस्थेने किती शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क मुलांना कोणत्या सेवा शैक्षणिक सुविधा द्यायचे आहेत हे निश्चित केले आहे महाराष्ट्र शासन शालेय व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र सं २००९/(१०८/०९)माशि मंत्रालय दि २१/२०१० रोजी शासन निर्णय जारी करण्यात आले पण आज कोठेही शासन निर्णयानुसार काम होताना दिसत नाही याला आपण कारणीभूत आहोत शालेय शिक्षण नावाखाली वार्षिक बेमाफी फि पालकांकडून वसूली केली जाते आपणास माहीत नसल्यामुळे आपले पैसे वाया जात आहेत शासन सर्वांचे नियम ठरवून देत आहे पण त्याची अंमलबजावणी न करता शिक्षण हा पैसे मिळवण्याचे सर्वात मोठे माध्यम आज झाले आहे



शासन निर्णय क्र सं २००९/(१०८/०९) ३/दि ८ मे २००९

शासन निर्णय क्र सं २००९(१०८/०९)माशि २३ फेब्रुवारी २०१०

शासन निर्णय क्र सं २००९/(१०८/०९) माशि ३ दि ४ मार्च २०१० राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क निश्चित करण्याबाबत त्यावेळी श्रीमंती कुमुद बन्सल सेवानिवृत्त प्रधान सचिव ( भा प्र से ) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशी नुसार मा उच्च न्यायालयात मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचीका क्र १४४५/२००९ व त्यास संलग्न असलेल्या याचिकेबाबत मा उच्च न्यायालयाने दि १०/ डिसेंबर २००९ रोजी वेळापत्रक ठरवून दिले आहे आणि सदर वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी आदेश देण्यात आले आहेत

              बन्सल समितीच्या अहवालातील शिफारशी शिक्षण संचालक ( माध्य व उच्च माध्य ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना एकूण ८७ शिक्षण विषयक संघटना / शिक्षण संस्था /पालक शिक्षक संघ यांचेसह एकूण ३२८१९ जनतेच्या स्वाक्षरी सह निवेदन प्राप्त झाली आहेत सदर निवेदनाच्या अनुषंगाने जानेवारी २०१० रोजी शिक्षण संघटना. / शिक्षण संस्था / पालक शिक्षक संघ व इतर यांच्या प्रतिनिधींची सुनावणी घेण्यात आली बन्सल समितीच्या शिफारशी आणि शिक्षण संचालक यांचे अभिप्राय यांचें साकल्याने विचार करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतले आहेत मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सदर शासन निर्णयांची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी त्यावर जनमत अजमावून घेण्याची प्रतिनिधीक स्वरूपात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला

(१) विना अनुदानित व कायम अनुदानित तत्वावरील शाळांनी शैक्षणिक शुल्क आकारताना वस्तुनिष्ठ मानकाचया आधारें व पारदर्शकतेने शुल्क वाढीचे निर्णय घ्यावेत

(२) शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी कडून कॅपिटेशन फी आकारण्यास किंवा नफेखोरी करण्यास परवानगी असणार नाही तथापि शैक्षणिक संस्थांना वाजवी शिल्लक ठेवता येईल दरवर्षी संस्थेची वाजवी शिल्लक ही कोणत्याही परिस्थितीत ६/ टक्के पेक्षा जास्त असणार नाही

(३) शैक्षणिक संस्थांना वाजवी प्रमाणात अधिक उत्पन्न उभे करताना कोणत्याही अनिर्बंध मार्गाचा अवलंब करता येणार नाही तसेच संस्थेस अन्य मार्गाने मिळणार या उत्पन्नाचा समावेश ( उदा. शाळेतील हाॅल व मैदान भाड्याने दिल्याने मिळणारे उत्पन्न बॅंकेतील ठेवींवर मिळवणारे व्याज व इतर ) एकूण रक्कमेत दर्शवने बंधनकारक असेल

(४) शैक्षणिक शुल्क निश्चित करण्याच्या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता संबंधित संस्था राखेल. संस्था शाळेचा जमा खर्च वार्षिक लेखासह पालक/ शिक्षक संघासमोर ठेवील संस्था शाळेचे शुल्क खालील प्रमाणे आकारणे व निर्धारित करणे आवश्यक आहे

(अ ) प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रती विद्यार्थी शैक्षणिक शुल्क निर्धारित करताना मान्य खर्चाच्या बाबी वरील खर्च विचारात घेण्यात येईल मान्य खर्चाची ( वेतन व वेतनेतर ) यादी परिशिष्ट "अ "ब" मध्ये नोंदविली आहे

(ब ) मान्य खर्चाच्या बाबींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या खर्चाची विभागणी प्राथमिक व उच्च माध्यमिक अशी करून त्या त्या प्रकारतील विद्यार्थी संखेने भागून प्रती विद्यार्थी शैक्षणिक शुल्क निर्धारित करण्यात येईल

(क ) वार्षिक खर्चाची विभागणी १२ महिन्यात करून मासिक शुल्क निश्चित करण्यात येईल त्यानुसार मासिकं / त्रेमासिक / सहामाही / वार्षिक शुल्क भरण्याची अनुमती पालकांना देण्यात येईल

(५) शैक्षणिक शुल्क निश्चितीवर ज्याचा प्रतक्ष परिणाम होणार आहे अशा भविष्य कालीन योजनेचे नियोजन जास्ती जास्त पाच वर्षांसाठी मर्यादित असते

(६) भविष्य कालीन योजना विद्यार्थी यांच्या हितासाठी शिक्षणाचा दर्जा वाढविणारया आणि सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळणार या असतील याच बाबींवर वाजवी शिल्लक खर्च केली जाईल यांची काळजी संस्था घेईल आणि त्याची माहिती पालक व अन्य संबंधित घटकांना करून देणे बंधनकारक आहे

(७) पाच वर्षांचे नियोजन करताना त्याचे वरषनिहाय भाग पाडण्यात येतील जेणेकरून खर्चाची विभागणी वर्ष निहाय होईल व खर्चाचा तेवढाच भाग त्या वर्षीच्या शुल्क निर्धारणासाठी (८ )अशा प्रकारचे नियोजन करीत असताना शैक्षणिक शुल्क खेरीज अन्य व सत्रोतातून किती पैशांची व्यवस्था करता येईल हेही संस्था पाहिल शैक्षणिक शुल्क उत्पन्न यातून हाती घ्यावयाच्या योजना आणि अन्य उत्पन्न यातून हाती घ्यावयाच्या योजना अशी विभागणी करणे गरजेचे आहे

(९) शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी करण्यात येणारा खर्च हा शाळेची गरज शाळेत असणार्या सेवा सुविधा शाळेत नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सेवा सुविधा या सर्व बाबींवर विचार करून पालक / शिक्षक. संघाच्या वतीने सहमतीने करण्यात येईल

(१०) कोणतीही विश्रवसत संस्था ही लोकसेवारथ असल्याने शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी. विश्र्व सतचा कोणताही खर्च विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कातून करता येणार नाही

(११) एखाद्या विद्यार्थ्याने शाळा सुरू होताना किंवा शैक्षणिक सत्र चालू असताना मध्येच आपले नाव काढून घेतले तर त्याबाबतीत व्यवस्थापनाने आकारलेले शैक्षणिक शुल्क परत करण्याबाबतचे धोरण शाळा / संस्था शैक्षणिक शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अगाऊ निश्चित करेल त्याबाबतची माहिती प्रवेशावेळी विद्यार्थी/ पालक यांना देण्यात येईल

(१२) विना अनुदानित व कायम अनुदानित शाळांनाही शासन आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे अर्थात महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी ( सेवाशर्ती ‌) विनिमय अधिनियम १९७७ नियमावली १९८१ माध्यमिक शाळा संहिता व निर्गमित आणि निर्गमित होणारे शासन निर्णय / परिपत्रके / आदेश / निर्देश यांचें पालन करणे शाळांनाही बंधनकारक राहील

(१३) शुल्क निश्चित करण्याच्या प्रक्रियेत पालक शिक्षक संघाचा सहभाग राहिल प्रत्त्येक शाळेत पालक शिक्षक संघ स्थापन करण्यात येईल पालक शिक्षक संघांचे कार्य व कार्यपद्धती पुढील प्रमाणे

(१) राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित विनाअनुदानित व कायम अनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झालेपासून ३० दिवसांच्या आत पालक शिक्षक संघांची स्थापना करण्यात यावी

(२) शाळेतील प्रत्त्येक विद्यार्थ्यांचे पालक हे पालक शिक्षक संघाचे सभासद असतील

(३) शहरी भागात रुपये ५/ व ग्रामीण भागात १/ या दराने पालक शिक्षक संघाच्या प्रत्त्येक सभासदांकडून दरवर्षी सभासद शुल्क आकारण्यात येईल

(४) पालक शिक्षक संघांची स्थापना झाल्यानंतर पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पद्धतीने दोन आठवड्यात करण्यात यावी त्यासाठी घ्यावयाच्या बैठकीची सूचना सर्व संबंधितांना मुख्याध्यापकांकडून पत्राने एक आठवडा अगोदर देण्यात यावी

(५) शिक्षण अधिकारी /शिक्षण निरीक्षक हे प्रत्त्येक पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पद्धतीने होईल यांची खात्री करतील

अध्यक्ष. प्राचार्य / मुख्याध्यापक

उप अधक्ष. पालकामधून एक

सचिव. शिक्षकामधून एक

सहसचिव. पालक / विद्यार्थी मधून एक

सदस्य. प्रत्त्येक तुकडी साठी एक शिक्षक

प्रत्त्येक तुकडी साठी एक पालक

जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य

(७) पालक सदस्यांमध्ये मागासवर्गीय. ५०/टक्के महिला

(८) पालक शिक्षक / कार्यकारी समितीच्या नावांची यादी सूचना फलक लावणे

(९) सर्व प्राथमिक / माध्यमिक शाळांकडून पालक शिक्षक स्थापनेनंतर १५ दिवसांच्या आत सभासदांच्या नावांची यादी व कार्यकारी समिती सदस्य यादी संबंधित शिक्षण अधिकारी / शिक्षण निरीक्षक यांचेकडे सादर करावी

(१०) पालक शिक्षक संघ मुदत १ वर्ष कार्यकारी सदस्य पदाधिकारी कार्यकारी समितीची पाच वर्ष

(११) कार्यकारी समितीची बैठक महिन्यातून एकदा

(१२) सर्व बैठकची सूचना विषय सूची पत्राने कळविणे

(१३) बैठकीचे स्वाक्षरी इतिवृत्त नोंदवहीत ठेवून ती नोंदवही जतन करून ठेवण्यात यावी

(१४) शाळेकडून विद्यार्थी व पालक शिक्षक यांचेसाठी दर्शनी भागात सूचना पेटी उपलब्ध असावी

(१५) पालक शिक्षक संघाबाबतची सर्व शासन परिपत्रक शासन निर्णय उच्च न्यायालयात निर्णय सूचना इत्यादी सर्व कागदपत्रे फलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे

(१६) कार्यकारी समिती शिक्षण शुल्क. सत्र शुल्क. व सह शालेय उपक्रमासाठी आकारण्यास येणारे शुल्क इत्यादी संबधी माहितीची नोंद वही व शुल्क मान्यतेसाठी पालक शिक्षक संघाच्या बैठकीत सादर करणे

(१४) पालक शिक्षक संघाच्या नियमितपणे किमान दोन बैठका घेण्यात येतील प्रत्त्येक बैठकीत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये सदर बैठकीची कारयसूची पालक शिक्षक संघाच्या सदस्यांना किमान १५ दिवस अगोदर हसतदेय स्वरुपात वितरित करण्यात येईल पालक शिक्षक संघापुढे शैक्षणिक शुल्क निश्चितीचा शुल्क विषय प्रथम चर्चेसाठी ठेवून त्यामध्ये प्राप्त होणा-या सूचनांच्या अनुषंगाने कार्यकारी समितीची समंती आवश्यक आहे

(१५) व्यवस्थापनाने निश्चित केलेले शुल्क निर्धारण / वाढीचे प्रस्ताव पालक शिक्षक संघासमोर ठेवण्यात येतील त्यांस पालक शिक्षक संघाच्या मान्यतेसह किंवा लेखी आक्षेपासह संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी / शिक्षण निरीक्षक यांचे मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविणे व्यवस्थापनावर बंधनकारक राहील 

(१६) प्राप्त प्रस्ताव शिक्षण निरीक्षक /शिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्याच्या लेखा परिक्षा कडून दिवसांत तपासून घ्यावा व आपल्या अभिप्रायासह शिक्षण उपसंचालकांचया अध्यक्षतेखाली समितीने या प्रस्तावाची पडताळणी करून त्यावर अंतिम निर्णय एका महिन्यात घेऊन संबंधित संस्थेला कळविणे समितीने मान्यता दिलेल्या ज्या संस्था बाबत पालक शिक्षक संघाच्या शैक्षणिक शुल्क वाढीबाबत तक्रारी प्राप्त होतील त्यांची प्रकरणे प्राथमयाने निकाली काढावीत 

     सदर विभागीय समितीची रचना खालील प्रमाणे राहील

(१) विभागीय शिक्षण उपसंचालक. पदसिध्द अधिकारी

(२) मान्यताप्राप्त/ नोंदणीकृत चार्टर्ड अकौंटट सदस्य

(३) संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी / शिक्षण निरीक्षक

(४) पालक प्रतिनिधी. सदस्य

(५) संस्था प्रतिनिधी. सदस्य

(६) शिक्षण खात्याशी निगडित संस्था प्रतिनिधी (१) सदस्य

(७) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखा अधिकारी. सदस्य 

                समितीवर अशासकीय सदस्यांची निवड शिक्षण उपसंचालक करतील व त्यांच्या कार्यकाळा एक वर्षाचा राहील तसेच अशासकीय सदस्यांना दैनिक भत्ता व प्रवास भत्ता शासकीय दराप्रमाणे अनुज्ञेय राहील 

(१७) विभागीय शिक्षण उपसंचालक अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपिल करावयाचे झाल्यास संबंधित संस्थेस असे अपिल राज्यस्तरीय समितीपुढे ३९ दिवसांच्या आत सादर करता येईल राज्यस्तरीय समितीने असे अपिल प्राप्त झाल्यानंतर ४५/ दिवसांच्या आत निर्णय देणे आवश्यक राहील 

  राज्य समितीची खालीलप्रमाणे राहील

(१)! शिक्षण/ संचालक. पदसिध्द अधिकारी

(२) संबंधित विभागांचे विभागीय शिक्षण उपसंचालक. सदस्य

(३) शिक्षण संचालनालयातील सहायक संचालक लेखा. सदस्य

(४) मान्यताप्राप्त / नोंदणीकृत सनदी लेखापाल सदस्य

(५) संस्था संचालक संघटना प्रतिनिधी. सदस्य 

(६) पालक संघटना. प्रतिनिधी (१) सदस्य 

(७) शिक्षण खात्याशी निगडित स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी (१) सदस्य

(८) शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक सदस्य सचिव 

        समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती शिक्षण संचालक करतील व त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील तसेच अशासकीय सदस्यांना दैनिक भत्ता. शासकीय दराप्रमाणे अनुज्ञेय राहील

(१८) प्राथमिक शाळाबाबतीत राज्यस्तरावरील समिती शिक्षण ( प्राथमिक ) व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाबाबतीत राज्यस्तरावरील समिती शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात येईल

(१९) शाळेतील शुल्क निर्धारण प्रकिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच ज्या शैक्षणिक वर्षापासून शुल्क आकारावयाचे आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या किमान सहा महिने अगोदर संबंधित संस्थांनी पुर्ण करुन परिपूर्ण प्रस्ताव शिक्षण निरीक्षक / शिक्षण अधिकारी यांचेमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे सादर करणे बंधनकारक आहे

(२०) शुल्क निर्धारण प्रस्तावाची पडताळणी करताना त्यामध्ये कोणतीही अवास्तव बाब आढळल्यास विहित पद्धतीने शुल्क निर्धारण केले आहे की नाही यांची खातरजमा करून घेण्याचे अधिकार विभागीय स्तरावरील समितीला राहतील दरम्यान काळात कोणत्याही संस्थेला अंतरिम फि वाढ करता येणार नाही

(२१) अशा आदेशानुसार असेही सूचित करण्यात येते की जनतेला या निर्णयाच्या अनुषंगाने काही म्हणने शासनाकडे मांडावयाचे असल्यास आदेश निर्गमित झालेपासून दिनांकापासून. २१ दिवसांच्या आत शिक्षण संचालक क्ष( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे ई मेल पत्त्यावर सादर करता येईल जनमत प्राप्त झाल्यानंतर शुल्क निर्धारणा संबंधित असलेल्यांना प्रतिनिधीक स्वरूपात सुनावणीसाठी बोलावण्यात येईल शुल्क निर्धारण विषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल त्यात या विषयाची अंमलबजावणी तारिख सूचित करण्यात येईल 

   महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल आदेश अ मा भटटलवार. यानी जनहितासाठी प्रकाशित केला आहे

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

कलाकार..

वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण...

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen

कुळकायदा कुळकायदा - Land..


वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण




              आपल्या कडे भरपूर प्रमाणात वने व जंगले होती सर्वत्र झाडें झुडपे विविध पशू पक्षी जलचर प्राणी. सरपटणारे प्राणी असे विविध जीव आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत होती सर्वांना खाण्यास अन्न पिण्यासाठी पाणी. राहण्यासाठी आपल्यापरीने घरटी गुहा पाण्याचे जलस्त्रोत होते मोठें प्राणी लहान लहान प्राण्यांना खात होते पण कधीही कोणत्याही प्राण्यांच्या संख्येत घट किंवा वाढ होत नव्हती सर्व निसर्ग नियमानुसार व्यवस्थित चालू होते जर आपण विचार केला तर वने व जंगले. उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील निमसदाहरित अरण्ये / उप उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील आद्र व पानझडी / उष्ण कटिबंधातील मान्सून अरण्ये / उष्ण कटिबंधातील रूक्ष पानझडी अरण्ये / उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये / राखीव वने / संरक्षित वने / अवरगीकृत वने / अति घनदाट खाणज वने / मध्यम दाट खाजण वने / खुली खाजण वने / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / पेंच राष्ट्रीय उद्यान / गुगामाळ राष्ट्रीय उद्यान / नवेगाव राष्ट्रीय उद्यान / बोरिवली राष्ट्रीय उद्यान / चांदोली अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान /संजय गांधी राष्ट्रीय उद्यान / इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान / राधानगरी अभयारण्य / अशी विविध वने जंगले वन्यजीव संरक्षण करण्यासाठी काही नैसर्गिक होती तर काही आपण वन्यजीव संरक्षण करण्यासाठी तयार केली होती त्यात औषधी वनस्पती व वाघ / सिंह / बिबट्या / चिता / हत्ती / कोल्हे / लांडगे / तरस / भेकर / सांबर / काळवीट / रानमांजर / साळींदर / रानमुंगस / अस्वल /रानडुक्कर / पटटेवाले वाघ /सायाळी /रानगवा / ससे /खोकड / नीलगाय / चिंकारा / वानर /उदमांजर / गवा / पिसारा / हरीण / नाग /धामण / फुरसे / मन्यार / अजगर /सरडा / गांडूळ /हरणटोळ / विरुळा / घोरपड / सापसुरळया / रानपाली / वृक्षसरप / पारवे / बुलबुल /सुतार /हसरा /गरूड / ससाणे /कोकीळ /घुबड / घारि / गिधाडे / पोपट /शिंपी / चंडोल / खंड्या / माळढोक / मोर / करकोचा / पानकावळा / बदक / बगळा / मधमाशी / किटक / टोळ / फुलपाखरे / भुंगे / किडे / मुंग्या /व अन्य औषधी व जनावरांच्या चराईसाठी चारा उपयोग वृक्ष झाडं झुडपे वरिल प्रमाणे सर्व जीव आपला जीवन प्रवास सुखात चालला होता एकामेकावर अवलंबून असणारे प्राणी पशू पक्षी एकामेकाना खातात पण संख्या समान राहते मग वाघ. सिंह. चित्ता. बिबटे. असे हिंस्त्र प्राण्यांना कोणताही प्राणी खात नाही मग यांची संख्या झपाट्याने वाढायला हवी होती पण आज हे सर्व प्राणी बचाव अशी मोहीम राबवावी लागते विचार करा यांची संख्या कशामुळे कमी झाली विचार करण्याची गरज आहेे >

            लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि लोकांना राहणे व वाढती लोकसंख्या यांना रोजगार सुख सोयी देण्यासाठी व लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडायला लागली लोक हळूहळू गावाच्या बाहेर आले पण वाढता लोकांचा स्वार्थ आणि जमीनीवरील अधिकार करण्याची वृत्ती गावापासून थोड दूर घेवून गेली आणि एकवेळ माणूस जंगलात गेला हा वन्यजीवांचा असरा असणारा त्याचे घर असणारे लाखो प्राणी पशू पक्षी किटक यांच्या वास्तव्यावर त्याची नजर गेली आणि थोडी थोडी करत जंगले तोडायला सुरुवात झाली रस्त्याच्या नावांवर / बांध / बंधारे / कालवे / एम आय डी सी उधोग व्यवसाय / मोठी मोठी सिमेंट जंगले टोलेजंग इमारती / कारखाने व अन्य उधोगाना बाॅयलर साठी लागणारे जळाऊ लाकूड / घरबांधणी साठी लाकूड / काही समज गैरसमज यासाठी निरापराध प्राणी पशू पक्षी यांची कत्तल / अशा विविध आपल्या स्वार्थापोटी माणसाने जंगल तोड करण्यास सुरुवात केली बघता बघता जंगलांची क्षेत्रे कमी झाली आणि औधोगीकरण झाले पण आपली संस्कृती दर्शविणारे प्राणी पशू पक्षी यांचा निवारा आसरा नष्ट झाला आणि त्यांच्या जमाती नष्ट होण्यास सुरुवात झाली आज काही प्राणी पशू पक्षी आपणं पुस्तकातच वाचतो आणि आपल्या मुलांना गोष्टी सांगण्याची वेळ आली याला अमुक म्हणतात त्याला तमुक म्हणतात किती वाईट आहे डोंगरे शासनाने विविध योजना सांगून हजारो हेक्टर जमीन ढापली आहे त्यात विविध झाडांची लागवड केली ती माणसाला कोणत्याही उपयोगाची नाही ती कशी त्याची माहिती पुढे देणार आहे 

               आपण केलेल्या विघातक कामाची पोचपावती आपणास मिळायला सुरुवात झाली प्राण्यांना. राहण्यासाठी व जगण्यासाठी अन्न. पिण्यासाठी पाणी. वेळोवेळी लागणारे जंगलातील वनवे आपण वानरे माकड बघितली आहेत पूर्वी काळात रानात. रताळे. बटाटे. मका. भुईमुग शेंगा. केळी. अशी शेती केली जात होती त्यावेळी जनावराला अन्न मुबलक मिळत होते आज सर्वत्र ऊस व अन्य पिकांची शेती केली जाते याप्रमाणे जनावराला अन्न मिळते बंद झाले त्यामुळे वानर / माकडे रानगवे. / निलगाय. अशा जनावरांनी गावाचा मानवी वस्तीचा रस्ता धरला. याला कारणीभूत आपणच आहोत तसेच. वाघ सिंह चित्ते बिबट्या यांनासुद्धा जंगलांची तोड झाल्यामुळे राहणे खाणे मिळणं बंद झाले आणि त्यांनी गावाकडे मानव वस्तीकडे रस्ता वळविला शेळ्या मेंढ्या कोंबड्या कुत्री माणस लहान मुले यांचेवर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यांना गावाकडे येण्यास भाग पाडणारे व बाहेरचे कोणी नाहीत आपणच आहोत आणि आपण आत्ता एखादे जनावरं शहरात गावात दाखल झाले की त्याला अमानुषपणे पकडतो काही वेळा पकडताना काही वन्यजीवांचा मृत्यू सुध्दा होतों म्हणजे त्यांच्यावर आपण याचे अगोदर केलेला अन्याय कमी होता म्हणून आज सुध्दा या मुक्या निरापराध प्राणी पशू पक्षी यांना यांचा वंश संपत आला तरी अजून किती दिवस अन्याय सहन करावा लागणार काय आपलं वाईट केलं आहे या जनावरांनी मी म्हणतो ते आपणास देत असणारी सजा दंड आपण केलेल्या कामाच्या किंमतीत कमी आहे आणि आपण ताठ मानेने वन्यजीव संरक्षण दिन साजरा करतो आपल्याला कस काहीच वाटतं नाही जरा तरी वाटायला हवं 

              वरील प्रमाणे सर्व प्रकार प्राणी पशू पक्षी यांचेवर होणारा अन्याय / शिकार / वन्यजीवांची अवैध शिकार. / वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार / वन्यजीव संवर्धन / वन्यजीव संरक्षण / राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण / जलचर प्राणी / सरपटणारे प्राणी / वन्यप्राण्यांना विष प्रयोग करणे /पारध करणे /जाळ्यात पकडने /सापळ्यात अडकवणे /छळ करणे /शरिराचा कोणताही भाग जखमी करणे /जायबंदी करणे /स्वताच्या इच्छेनुसार तोडणे. उपटू वा गोळा करणे /जिवंत अथवा मृत विक्री /आग लावणे /विस्फोटक वापरणे / राष्ट्रीय उद्यान मध्ये खाजगी जनावरें चरण्यासाठी बंदी /पर्यटनावर बंदी /वरिल प्रमाणे तरतूद करण्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा. "१९७२" आणि "२००३" व त्यात प्रामुख्याने महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी "२००६" हा सुधारित कायदा तयार केला यात जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतातील वन्यजीवांचा समावेश करण्यात आला "वन्यजीव " याचा अर्थ प्राणी. जलचर. तसेच भू वनस्पती. जे कोणत्याही अधिवासाचा हिस्सा आहेत

    या कायद्यात केंद्र आणि राज्य यांची अधिकार मंडळे

केंद्र शासन 

(१) वन्यजीव संगोपन अधिकार कलम. (३) 

(२) राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ज्यामध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतील त्यांची व मंडळांची कामे खालील प्रमाणे

(१) वन्यजीव संवर्धन कार्यात सुधारणा

(२) राज्यशासनाला वन्यजीव संवर्धन चालना देण्यासाठी मदत

(३) वन्यजीव अवैध शिकार वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी सल्ला व धोरण तयार करणे

(३) वन्यजीव संवर्धन सुधारणेतील उपाययोजना

(४) वन्यजीव भाष्य करणारा अहवाल किमान दोन वर्षांतून एकदा तयार करणे व जनहितासाठी प्रकाशित करणे

वाघ बचाव संरक्षण व संवर्धन

राष्ट्रीय वाघ सरक्षण व संवर्धन अधिकार मंडळ ( एन टि सी ए ) ची स्थापना वन्यजीव कायद्यात २००६ चया सुधारणेनंतर झाली पर्यावरण व वन्य मंत्री अधक्ष असणारे अधिकार मंडळ स्थापन करण्यात आले

( कलम "८"प्रमाणे

(१) वाघ सरक्षित क्षेत्रात जैवसृषटी मारक पध्दतीने होणारा जमीन वापर

(२) मानव व वनयप्राणी संघर्ष थांबविण्यासाठी उपाययोजना करणे वाघांना हाणी न पोहचता सहवावर भर देणे

            अजून वेळ गेलेली नाही आपणांस आत्ता वन्यजीवांना संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे कायद्याची पूर्ण माहिती उद्या मॅसेज मध्ये देणार आहे 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

कलाकार....

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen...

पळवाट पळवाट...

कलाकार -

 कलाकार कलाकार



             नावात मोठे रहस्य दडलेले आहे. मातीला आकार देणारा कुंभार. शिल्पाला आकार देणारा शिल्पकार. लोहाला आकार देणारा लोहार. शैक्षणिक प्रसार करणारे शिक्षण महर्षी. समाजात संबोधन प्रबोधन प्रचार आणि प्रसार करणारे समाजसेवक. असे विविध विभागात काम करणारे कार्यकर्ते लोक आपण बघतो. काही ध्यानात राहतात काही विसरून जातात. कारणं आपल्याला चांगले पचत नाही रूचत नाही मग विचार खुडणयाचे काम आपणच करतो कारण समोर असणारा आपल्या ध्यानात राहतो पण पडद्याच्या मागे असणारे काळाच्या ओघात गायब होतात कारणं त्यांचे कार्य चांगले असते आज पुरस्कार प्रमाणपत्र याचे वाटप त्यांचे कार्य न बघता तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे प्रामुख्याने बघितले जाते किती वाईट आहे बघा ? 

                  आपल्या पूर्वीच्या काळात कलाकार हे फक्त पोट भरण्यासाठी व समाजांत प्रबोधन समाजहिताची आपली जबाबदारी आहे अशी भावना मनात घेवून कार्य करत होते गोपाळ गोलहा. / दांगट / नंदिबैलवाले. / मदारी / सापगारूडी / वासुदेव. / भविष्य कथन करणारे / मनकवडी. / कुडमुडे जोशी. / डमरूवाले / भिक्षेकरी / सोंग घेवून मनोरंजन करणारे / औषध उपचार करणारे / तमाशा / लोकनाट्य. /गोंधळी/बहुरुपी/ जागरण/ पोपटवाले / डोंबारी /पांगूळ/ डवरी / असवलाचा खेळ करणारे / भजन कीर्तन /लग्नात नाचणारे / वरातीपुढे बत्ती डोक्यावर घेऊन / भारुडे. / अशा अनेक जातींचे जमाती मनोरंजन व कला यामाध्यमातून जनजागृती करत होते हे सर्व लोक मागास प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती याची परस्थिती बेताची असायची गरिबी नशीबाला पुजलेली. पोट भरल तरी बस असा विचार करणारी महाराष्ट्र मध्ये भटक्या विमुक्त जाती २८ भटक्या तर १४ विमुक्त जाती नोंद आढळते भारतात ११ कोटी पेक्षा जास्त भटक्या जमाती आहेत काही कागदावर आल्या काहींची नोंद झाली नाही महाराष्ट्रात भटक्या विमुकताची लोकसंख्या ७३ लाखांच्या आसपास जाते अशा भटक्या विमुक्त जमातींचे स्वरुप प्रस्थापित समाजापेक्षा फार वेगळे आहे भटकंती हेच त्यांचे जीवन आहे अर्थार्जनासाठी नव्हे तर पोट भरण्यासाठी त्यांना हे गाव ते गाव मनोरंजन कला सादर करत फिरावे लागते देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी पारंपारिक जातपंचायतीला त्यांना सामोरे जावे लागते रुढी प्रथा पारंपारिक व्यवसाय यातच अडकलेले आहे पूर्वग्रह काम मिळत नाही. भीक कोण देत नाही. शेती नाही. गाव नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण अभाव. समाजव्यवस्थेत हे घटक उदरनिर्वाह साठी भटकू लागले या भटकणारया घटकांचे किंवा समूहाचे गटांचे अध्यात्मिक भटके मनोरंजन करणारे भटके आणि जनावरांच्या पालनपोषणासाठी भटकणारे भटके असं वर्गीकरण झाले स्थिर समाजाची अध्यात्मिक गरज भागविण्यासाठी काही समूह गट भटकंती करत होते अध्यात्मिक गरज भागवून पसा कुडचा धान्यावर आपला उदरनिर्वाह करणारे कलाकार 

            गेल्या काळात गावात जत्रा यात्रा असायच्या. भाकरी घाला तमाशा करणारे कलाकार आपण बघितले आहेत त्यांचा उद्देश फक्त पोट भरण्यासाठी नव्हता तर समाजाला अनमोल संदेश येणार्या काळातील धोके यापासून सावध करणे हा होता. पहाटे पहाटे दाण पावलं दाण पावलं असा संदेश देणारे वासुदेव पिंगळे. हे कलाकार यांचा यामागचा उद्देश होता की पहाटे लवकर उठा निरोगी स्वच्छ हवा घ्या आणि आरोग्य सुदृढ ठेवा हे होते कलाकार. शिवाजी महाराज काळात गोंधळी ही एक कलाकार जमात होती त्यांची कला सादर करण्यामागे वेळोवेळी होणारे हल्ले कोणाकडून केव्हा हल्ला होणार हे गोंधळ सादर करणारे हाडांचे कलाकार आम्ही पाहिले आहेत. पाऊसाचे भविष्य सांगणारे नंदिबैलवाले. येणारा पाऊस केव्हा पडेल आपण विश्वास किती ठेवायचा हे आपण ठरवू सापांचे खेळ करून आपल्याला सापाबधदल समज गैरसमज सांगणारे सापांना मारू नका सांगणारे सापगारुडी हे होय. पोपटवाले. याया भविष्य सांगतो हे सांगणारे भविष्य वाले तर कोणी प्राण्यांपासून भविष्य कथन करणारे. दुरवर उभे राहून एकाच्या बोटांच्या हालचाली वर शब्द ओळखणे याला मनकवडी असे संबोधले जाते. वाचतो गा डोंबारी असे म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी तलवारबाजी असे मैदानी खेळ करणारे कलाकार हे आपल्यातच होते. माकड उड्या या माध्यमातून लहान मुले यांचें व मोठया माणसांचे मनोरंजन करणारे कलाकार. अस्वलाच्या खेळ करणारे कलाकार. 



              आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि मग आपल्यात व आपल्या समाजव्यवस्थेत क्रांतीकारक बदल झाले शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कक्षा नववीन शोध लावले गेले जसे. टेलिफोन / टेलिव्हिजन. / मोबाईल. /सिनेमा थिएटर /बॅन्ड/ डाॅलबि / झांज पथक / लग्नात विधुत रोशनाई / लॅपटॉप / नाटक थिएटर / चित्रपट / असे अनेक कृत्रिम मनोरंजन करणारी सेवा अंमलात आली त्याचवेळी या पोटासाठी जनहितासाठी जनप्रबोधन करणार्या भटक्या विमुक्त जातीचा पारंपरिक व्यवसाय मारला गेला विज्ञान क्रांतिमुळे नशिबाचा किंवा भाग्याचा संबंध नाहिसा झाला ती कल्पना भ्रामक आहे भटक्या जमातीनी मात्र आपला पारंपरिक मनोरंजन व्यवसाय घालवावा स्थिर समाजाची गरज भागविणारे कलाकार उघड्यावर पडले समाजाच्या दया बुध्दी वर भीक मागून जुनी कापडे गोळा करणे मोलमजुरी कष्टाची कामे शोधने. असे व्यवसाय कलाकारांना निकृष्ट जीवन जगण्याची वेळ आली जनावरांच्या चराईसाठी भटकणाऱ्या जमातींची अवस्था याहिपेक्षा दयनीय झाली जनावरें चरण्यासाठी कुरणे बाकिच नाहीत जागोजागी सिमेंट जंगले तयार झाली त्यामुळे जनावरांचे खेळ करून आपला उदरनिर्वाह करणारे यांना जगणे कठीण झाले त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी खडी फोडणे. रस्ते तयार करणे. अशी अंगमेहनतीची कामे शोधायलाच सुरूवात केली रोजगार कमतरता यामुळे ग्रामीण भागात राहणे अवघड झाले मग यांनी शहराकडे स्थलांतर करायला सुरुवात केली शहरात राहण्याचा मोठा प्रश्न मग झोपडी बांधून राहण्यास सुरुवात केली त्यातूनच शहरात झोपडपट्टी वास्तव्य. काळाबाजार. दारु. गुंडगिरी. तयार झालीं आठराविशव दारिद्र्य शिक्षण लाचार. भिकार यांचे. जीवन जगणे त्यामुळे या कलाकार व त्यांची मुल गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली आणि एक गुन्हेगार विश्व तयार झाले याला आपण कारणीभूत आहोत आज जुने पारंपारिक मनोरंजन बघायला मिळत नाही ही वास्तविकता अगदी वाईट आहे



                २२/२३ /२०२० रोजी आपल्याकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देशात यात प्रवेश केला आणि चालू गाडीला घुणा लागावं तसं धावपळ करणारी जगण्यासाठी मिळविणारी सर्वसामान्य जनता टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यात लग्न जावळ मुंजी. व अन्य सण संभारभ यांचेवर अवलंबून असणारे कलाकार मांडववाले. भांडी वाले. लग्न कार्यालय. लग्नात विधुत रोशनाई करणारे व अन्य या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार मालक त्यांचेवर व त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती कलाकार कामगार मालक हे अक्षरशः रस्त्यावर आले होते आपली व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले 

                 शासनाने सर्व क्षेत्रातील लोकांसाठी विविध मंडळे स्थापन केली आहेत पण आपल्या तरुणाईच्या काळात सर्वांचे मनोरंजन करणारे कलाकार ज्यावेळी वयोवृद्ध होतात त्यावेळी त्यांचेवर येणारी वेळ अतिशय वाईट आहे एक वेळ पट्टीचा कलाकार रस्त्यावर भीक मागताना चहा द्या तंबाखूला दोन रुपये द्या. घरच्यांची मदत नाही घराची मुल जबाबदारी घेण्यास तयार नाहीत शासनाच्या नियमानुसार ६०/ वर्षात एकदा अधिकारी व कर्मचारी निवृत्त होतो त्याला पुढचे आयुष्य जगता यावे यासाठी शासन थोडीकाहोईना पेन्शन देते तसी तरतूद कलाकारांच्या बाबतीत करता येणार नाही का ? ६० वर्षाचा व्यक्ति सर्व शासकीय योजनेतून बाद होत असेल तर त्याला मतदानाचा अधिकार कशासाठी त्यांचे मतदार यादीतून नाव वगळून टाका. कलाकार जगला पाहिजे नाहीतर कला व कलाकार गोष्टींच्या रूपाने सांगावें लागतील. 

          आत्ता जादा लिहित नाही लिहताना कोणाच्या आत्मसन्मानाला काही अगाध झाला असेल तर माफी असावी

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा 

आपण जाब विचारु शकतो का ?...

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती...

कुळकायदा कुळकायदा - Land...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

कुटुंब आणि महिला

कुटुंब आणि महिला



               कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो

याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात



            आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते

याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही



            महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात

           पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो

      महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो 

          महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन. 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....

कुळकायदा कुळकायदा - Land....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती....

आपण जाब विचारु शकतो का ?....

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen




       एक आक्टेबर हा जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो भारतात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७५/ टक्के म्हणजेच ज्येष्ठांची संख्या अंदाजे (९) कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात (२००१ मधील आकडेवारी नुसार ) ८४.५ लाख जेष्ठा पैकी ३९/ लाख (४६.५/टक्के ) पुरूष व ४५ लाख (५३.५/टक्के ) स्त्रिया आहेत साधारणपणे जेष्ठ स्त्रियांमध्ये विधवांचे प्रमाण ५०/टक्के व विदुरांचे प्रमाण २५/ टक्के आहे ग्रामीण भागात ६०/ वर्ष वयानंतर काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ३७/टक्के एवढे आहे 

              सेवानिवृत्ती नंतर. सामाजिक. /कौटुंबिक / स्नेहबंध माणसिक स्वास्थ्य. / शारीरिक आरोग्य / समृद्ध ठेवण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी काही माहिती व टिप्स पाठवत

(१) निवृत्ती म्हणजे नोकरी /व्यवसायातून निवृत्ती जीवनातून नव्हे जे आवडते ते नोकरी व व्यवसाय काळात करता आले नाही ते करण्याची संधी म्हणजे निवृत्ती हा पूर्ण विराम नसून एक स्वल्प विराम आहे आयुर्मान वाढल्याने अजून बरेच आयुष्य बाकी आहे

(२) वार्धक्यातही. 'अजून यौवनात मी ' या सकारात्मक जगण्याचा दृढ निश्चय करा नियती आणि निश्चिचय याची सांगड घातल्याशिवाय निर्मिती होत नाही

(३) स्वताच्या आत्मसन्मान. / अस्तित्व. / आणि स्वताचे सुख. / स्वताचे आरोग्य / हे सर्व अबाधित ठेवण्यासाठी स्वताला. सक्षम ठेवावे. विशिष्ट जेष्ठ नागरिक संघटना संस्था स्थापन कराव्यात. समवयस्क लोकांनी एकत्र यावे सृजनशील कार्य करावे आणि आपली जीवनसंधया आनंदी करावी

(४) निवृत्ती नंतरचा विचार निवृत्ती पूर्वी करणे आवश्यक आहे

(५) सेवानिवृत्ती लाभाची योग्य आपल्यासाठी गुंतवणूक करा उतारतया वयात. आजार / पर्यटन / धार्मिक कार्य / इ साठी कामी येणेसाठी त्याचे नियोजन करा 

(६) निवृत्ती पूर्वीच्या नोकरीमध्ये आलेला अनुभव त्या क्षेत्रातील ज्ञान याचा फायदा करून घेवून निवृत्ती नंतर अर्धवेळ काम करा छोटासा गृह उद्योग काढू शकता

(७) नवीन गोष्टी शिकण्याची / करून बघण्याची आवड ठेवा / एकादी कला. / वैयक्तिक कौशल्य. याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या तुम्हाला आवडेल तो छंद जोपासा. 

(८) कुटुंबात वावरताना स्वस्त भावात आवश्यक असा बदल करणे गरजेचे आहे हे सत्य मनी जाणून घ्या सल्ला देणे / मुला/ सुनांचया निर्यात विनाकारण मध्यस्थी करणे / हेकेखोर पणे वागणे / एकटे पुटपुटने / जोरात बोलणे / कुटुंबातील लोकांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे इ गोष्टी बदलाव्या लागतात दुसर्याच्या स्वभाव बदलाणयापेक्षा सर्वांमध्ये बदल करा 

(९) आपल्या तनमनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी सर्वांची आदर्श कशी दिनचर्या / फिरणे / प्राणायाम / व्यायाम / खेळ / उत्तम आचार विचार / चांगल्या गुणी व आदर्श मित्रांचा सहवास / यशस्वी लोकांचा सहवास / संगीत करमणूक /नवनवीन शिकण्याची आवड / इ गोष्टी स्वताच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व फुलविणयासाठी संधीचा फायदा करून घ्यावा

(१०) स्वताची मिळकतीची कुवतीनुसार कौटुंबिक जबाबदारी घ्यावी

(११) मोठेपणाने व सामंजस्याने वागून आपल्या वागण्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी सर्वांशी प्रेमाने वागा. आपल्या वागण्याचा. बोलण्याचा. वावरण्याचा त्रास कोणालाही होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी

(१२) कुटुंबातील इतरांना आपलीं भीती न वाटता आदर व प्रेम वाटेल असे वागा. तसेच भविष्याकडे वेगाने निघालेल्या या पुढील पिढीला संस्काराचे ब्रेक आणि प्रेरणेचे इंधन दिले पाहिजे

(१३) मनात घालमेल न ठेवता स्पष्ट बोला रोजचा आपल्यामुळे कलह. भांडण होत असेल तर मुला " सुनापासून चार घर दुरच रहा

(१४) एकटेपणा जाणवत असेल तर समवयस्क / समछंदिषट. ग्रुप करावेत अशा मनाला आनंद देणारया ग्रुप मध्ये सहभागी व्हावे

(१५) निवृत्ती नंतर आलेला पैसा व भावी खर्च याचा ताळमेळ आखावा वार्धक्यात आजार शस्त्रक्रियेकरिता अचानक उद्भवणाऱे खर्च मुला मुलींचे विवाह या महत्वाच्या बाबींसाठी लागणारी आर्थिक तरतूद लक्ष्यात घेऊन तो पैसा बाजूला काढावा भावनेच्या भरात. व अंध प्रेमापोटी "पुढयातले ताट आणि बसायचे ताट " मुलांना व कोणत्याही नातेवाईक यांना देवू नका कारण "ठणठणगोपाळ " असेलतर कोणी विचारत नाही

(१६) निवृत्ती नंतर घरात अधिक लक्ष देवू नये आवश्यकतेनुसार देणे लाभदायक ठरते अन्यथा ते इतरांना खुपते 

(१७) निवृत्ती नंतर उतारतया वयात करावी लागणारी कामे समजून घेवून आनंदाने ती केल्यास दोन गोष्टी साध्य होतात तुमचे व तुमच्या मुले सुना यांच्यामधील संबंध दृढ होतात कुटुंबाची प्रगती निश्चित होते परंतु काही कामे आपणास नकोशी वाटत असतील तर त्याबद्दल स्पष्ट बोलून नकार द्यावा

(१८) सुनेचा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस. काही विशेष प्रसंग इ लक्षात ठेवून तिला आवडत्या वस्तू. भेटवस्तू द्यावी तू आमची मुलगीच आहेस. असे बोला

(१९) नातवंडे हा आजी आजोबा यांचा विरंगुळा असतो जीव की प्राण असतो त्यांच्यावर जिवापाड प्रेम करा आपल बालपण नातवंडांच्या समवेत संगतीत परत अनुभवा

(२०) घरात लहान मूल असताना मुलांचे आई-वडील मुलांच्या प्रगतीसाठी ज्या दिशेने प्रयत्न करतात त्याच दिशेने आजी आजोबा यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत आजी आजोबा नातवंडांचे लाड मुलांच्या आई बाबांच्या शिस्तीच्या आड येता कामा नये

(२१) आत्ता काय वार्धक्य आले सारे संपले आजार होणारच राहिले तेवढे दिवस जसे असेल तसे काढायचे ही नकारात्मक आधी बंद करा आपल्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आठवा तुम्ही दोघेच होता तेव्हा. आजही तुझी दोघेच आहात सारे नकारात्मक विचार सोडून नव्याने एकामेकाचा सविकार करा आता थोड मोल्ड व्हा एकामेकाना पुरक व्हा आहार. / आरोग्य / औषध उपचार / पर्यटन / गप्पा / वाचन / याद्वारे एकामेकाची काळजी घेवून आनंदी रहा 

(२२) आत्ता तर मी फक्त माझ्यासाठी जगणार अशा ताजा आनंदी हिरव्यागार मनाने प्रत्त्येक क्षण जगा

(२३) संगीताची जादू अनोखी आहे रोज भजन कीर्तन करा भावगीते/ श्लोक / स्त्रोत / फिल्मी संगीत /जुनी गाणी / स्वास्थ संगीत / पक्षांचे आवाज / समुद्राची साज / यांचे कॅसेट ऐका 

(२४) रुग्ण सेवा / गोरगरीबांची सेवा / गरजूंना मदत / अशी समाजकार्य करा रक्ताची व रक्ताच्या पलीकडची नाती जपा आणि आपले वार्धक्य आनंदी करा जात / धर्म / लिंग / वय / यांच्या बंधनापेक्षा ही रक्ताच्या नात्यापलीकडची नाती वार्धक्यात तुम्हाला सुखद क्षण देऊ शकतील जगण्याला व आनंदाची झालर येईल

(२५) कठोर बोलण्यापेक्षा अबोल रहा छोटी ठीणगी स्फोट घडवून आणते विचारपूर्वक बोला विचारपूर्वक वागा

(२६) घरात पती/ पत्नी / मुल /सुना / सासू सासरे/ कोणाचीही एकाधी गोष्ट पटत नसेल तर त्याबद्दल स्पष्ट बोला जे बोलताय ते सामंजस्य ठेवून बोला तरच तुमच्या बोलण्याचा योग परिणाम होईल अन्यथा वाद वाढेल कमीत कमी अपेक्षा ठेवणे व जास्ती जास्त सामंजस्य ठेवणें गरजेचे आहे

(२७) रागांचा पारा अचानक वाढला तर उच्चरक्तदाब / ह्रदयविकाराचा. असा त्रास होतो रक्तदाब अचानक वाढला असता मेंदूत रक्तस्त्राव होतो हार्ट अॅटेक येवू शकतो

(२८) चंद्र प्रकाश हवा असेलतर सुर्याने मावळायला हवे

(२९) उतारते वय एक नियम कटाक्षाने पाळा कुठेही गेला तरी आरोग्य विषय काढून समुदखी शोधायचा नाही मुला/ सुनाना थोडस खटकल तरी स्वताचे दुःख खरवडून काढायचे नाही

(३०) अध्यात्मात मानसिक आरोग्य चांगले राहते धार्मिक /! वाचन /चित्रपट /सीडी / यांच्या द्वारे आवडत्या भगव़ताला आवळून भकतिसार आंनंद घ्यावा क्षमा / शांती / बंधुत्व /सत्व /जेथे आहे तेथे परमेश्वर आहे

(३१) वार्धक्यात एखाद्या व्यक्तिला मनमोकळे करायला कोण नसल्यास ती व्यक्ती टिव्ही समोर रमते 

(३२) आपल्याला काही महत्व नाही आपल्या विरोधात काही कारस्थान शिजतंय असा नकारात्मक विचार आल्यास घरातल्या इतरा सोबत वारंवार खटके उडतात

(३३) आपण परगावी जात असल्यास इतरांसोबत त्याबाबत चर्चा करू नका

(३४) विश्वास पात्र नोकरच असावेत. नोकरासमोर पैसा दाग दागिने. महत्वाची कागदपत्रे हताळणी करू नये

(३५) दारावरची बेल वाजलयास घाईने दरवाजा उघडू नये खात्री करा कोण आहे 

(३६) तुमच्या मुलांचा मुलींचा अपघात झाला आहे असे कोणी म्हटले तर त्यांच्या सोबत जाऊ नका

(३७) दारावर दागिणे पाॅलिश करून देणारे ठग लोक तुम्हाला लूटू शकतात कशा लोकांना दारात सुध्दा उभे करू नका. अंधश्रद्धेचा / बुवाबाजी / यांच्या नादी लागू नका

(३८) रस्त्यावरून जाणाऱ्या वृध्द स्त्रियांना खोटे नाटे सांगून लूटणारे लोक आहेत अशा वयवृध स्त्रियांनी दाग दागिने घालू नये चुकीचे फोन / अनोळखी व्यक्ती वारंवार घराजवळ फिरणे. / दारावरची बेल सतत वाजणे /याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित पोलिस स्टेशनला संपर्क साधा

(३९) चांगले शेजारी असतील तर वेळ पडल्यास त्यांची मदत घ्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाणे / फोनवर बोलणे /वैयक्तिक माहिती देणे इस्टेटसंदरभात माहिती देणे टाळा

(४०) प्रवासात अनोळखी व्यक्तीशी बोलू नये 

(४१) शारीरिक आरोग्याला काही तक्रारी असतील तर गांभिर्याने डॉ पत्ता. फोन नंबर. डॉ नाव. हे आपल्या जवळील डायरी मध्ये लिहून ठेवा

(४२) स्वताला स्वता जपा शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करावा वेळ पडल्यास औषध उपचार करावा

(४३) हल्ली अनोळखी व्यक्ती यांच्या पेक्षा नातेवाईक व आपली मुले यांचे पासून सुध्दा धोका खाऊ शकतात

(४४) हताश होऊन आत्महत्या विचार करु नका 

(४५) अन्न/ वस्त्र / निवारा / आरोग्याची काळजी / मुलभूत गरजा भागविण्यासाठी. आई वडील जेष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याणार्थ अधिनियम. "२००७"‌ व महाराष्ट्र आई वडील चरितार्थ आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणार्थ नियम "२०१०" मधील नियम "१४" नुसार १०००० प्रतिमहा निर्वाह भत्ता मिळू शकतो नियम. "२०" अन्वये जिल्हा पोलिस अधीक्षक हे जेष्ठ नागरिकांच्या जीवीताचे व मालमत्ता रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करतील असे कायद्याचे संरक्षण जेष्ठ नागरिकांना आहे

(४६) गरजेचे ठरल्यास आनंदाने वृद्धाश्रम सविकारणे पर्याय उपयुक्त ठरतो छळापेक्षा ते परवडले

(४७) आपले वार्धक्य. / आपल्या गरजा / आपले आजार / आणि आपले उर्वरित आयुष्य याचा विचार करून सर्व प्रापटी / पैसा / मुलांच्या हातात देऊ नका कागदपत्रे न वाचता सह्या करु नका

(४८) आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीची विल्हेवाट कशी व्हावी याचे ईच्छा पत्र तयार करा

(४९) वार्धक्यात आर्थिक स्वावलंबन घालवू नका. आजपर्यंतच्या तुमच्या कमाईवर तुमचा अधिकार आहे

(५०) प्रदेशात स्थायी झालेल्या मुलांकडे राहण्यास जाण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घ्या

(५१) जीवनात कळत नकळत आपणाकडून काही व्यक्ती दुखावल्या असू शकतात त्यांच्याशी अबोला असेल तर स्वताहून बोला दुस-याला मानसन्मान द्या. त्यामुळे तो वाढण्याची शक्यता जास्त असते

(५२) फिट राहण्यासाठी रोज सकाळी व्यायाम करा. / ध्यानधारणा / ओंकार जप / रिलॅकसेशन रोज रहा / सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरा / बागेत जा /  

(५३) वाढत्या वयात हलका सकस आहार घ्यावा / आहाराचे प्रमाण समान ठेवा / मद्यपान / तंबाखू / सिगारेट / व्यसन सोडा 

(५४) झोपण्यापूर्वी. आवडते वाचणं / भक्तिगीते / संगीत / गाणी / यांचा आस्वाद घ्या

(५५) आवश्यक तेवढी विश्रांती घ्या / झोप घ्या / जागरण करु नका 

(५६) प्रकृतिसाठी डॉ यांचेकडे गेल्यावर कुठल्या औषधाने / आहाराने / अॅलरजी रिअकसन आली / तर उपचार घेण्याअगोदर डॉ यांना सांगा

(५७) औषधाचा ढोस / औषधवेळ / मनाप्रमाणे बदल करू नका औषधे रोजची म्हणून अंधारात घेवू नका 

(५८) औषधे मुलांच्या पासून लांब ठेवा

(५९) हसणे. खळखळून हा आरोग्य राखण्याचा खरा मंत्र आहे म्हणून खळखळून हसा 

(६०) वार्धक्यात. / मधुमेह / उच्चरक्तदाब / ह्रदयविकाराचा झटका / पक्षाघात / संधीवात / मोतीबिंदू / वृद्धत्व / कंपवात / कर्णबधिरता / किडणी स्टोन / मुतखडा / बद्धकोष्ठता / विसावभोळेपणा / शस्त्रक्रिया / अतिसार / इ आजार उद्भवतात त्यामुळे डॉ सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेवू नका 

         आपण बघतो ज्या लोकांनी आपल्या आयुष्यातील ३५/४० वर्षे एखाद्या आॅफिस मध्ये घालवली आपल्या पेक्षा मोठ्या साहेबांची चाकरी केल्यासारखी कामे केली आणि एक वेळ ६० वर्षांनी निवृत्ती झाली शासनाने ठरवून दिलेला निवृत्ती वेतन योजनेतून आलेला आपणच आपल्या साठी ठेवलेला थोडाफार पैसा येथून पुढचे आयुष्य जगण्यास मिळाला काहीना मिळाला काहीजण वाट बघत आहेत 

      आपल्याला ज्या आई वडील यांनी जन्म दिला आपणास मोठें केले जेव्हा त्यांचे हातपाय थकले त्यावेळी आपण त्यांना पहिल्यासारखी किंमत देतो का ? नाही आपण आपणास आपले म्हातारे आई वडील सांभाळायचे जड होतात आणि आपण त्यांना वृधश्रमाचा रस्ता दाखवतो आपणास लाज नाही वाटत ? 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...

कुळकायदा कुळकायदा - Land

पळवाट पळवाट...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या