Showing posts with label Family. Show all posts
Showing posts with label Family. Show all posts

वडिलोपार्जित

 

#* वडिलोपार्जित #*

               माणूस समाजप्रिय प्राणी आहे एकत्र कुटुंब पद्धती एकत्र समाज पध्दती ही आपली वैशिष्ट्य आहे. सण सुध. मंगलकार्य. दुःखाचे प्रसंग. लग्न विधी व इतर सर्व होणारें विधी समाजाच्या धर्माच्या नियमानुसार करणे हे आपले कर्तव्य माणतो. आपल्याला आपल्या वडिलांकडून घर जमीन. नोकरी स्थावर मालमत्ता. व अन्य आर्थिक मालमत्ता मिळते त्या संपत्तीला वडिलोपार्जित संपत्ती म्हणलं जातं 

                    कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून आपले वडिल सर्व पालनपोषणाची जबाबदारी पार पाडत असतात. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आपल्या आशा आकांक्षा यांचा आपल्या दैनंदिन गरजा. आपले राहणीमान यांचा गळाघोटावा लागतो आणि आपल्या मुलांना चांगलें जीवन मिळावं यासाठी आपले वडील कायम प्रयत्नशील असतात समजा आपले वडील कोणतेही सार्थ अवैध काम करत असतील तर आपल्या मुलांनी तेच काम करावे असे कोणालाही वाटत नाही 

            गतकाळात आपल्या पालकांची परस्थिती बिकट होती. समाजात विविध व्यवसाय बलुतेदार पध्दतीने केले जात होते. म्हणजे गावातील लोहार. सुतार. मोची. कुंभार. मुस्लिम अशा विविध अल्पसंख्याक जातींना आपले वडिलोपार्जित व्यवसाय करावे लागत होते. आज आपल्या देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात शिक्षणाचा प्रसार झाला आजची पिढी शिक्षण घेवून साक्षर झाली आणि आपले वडिलोपार्जित व्यवसाय करण्याची त्यांना खंत वाटू लागली. आणि वडिलोपार्जित व्यवसाय लुप्त झाले.  

        आपल्या भारतात पहिल्यांदाच राजकारण ग्रामपंचायत माध्यमातून अंमलात आले आणि आपल्या संविधानाने मतदानाचा अधिकार प्रदान केला त्यानुसार आपला व आपले हित जपणारा आपला हक्काचा माणूस निवडण्याचा अधिकार देण्यात आला आणि त्यातूनच आपल्यात इंग्रज काळातील पाटील कुलकर्णी यांना इंग्रजांनी शेतसारा व विविध कर वसूल करण्यासाठी नेमले होते म्हणजे पाटील हे नाव नसुन ती एक पदवी होती हे आपल्या ध्यानात आले. आणि एकवेळ आपल्या क्रांतिकारक. स्वातंत्र्य सैनिक. आंदोलन. मोर्चे. उठाव चळवळ या माध्यमातून बरेच संघर्ष केला आणि एक वेळ इंग्रज आपला देश सोडून गेले. पण त्यांनी दिलेल्या पदवयाचे भांडवल करून पाटील. कुलकर्णी. यांनी आपला पवित्रा सोडला नाही. आणि आपल्या देशात गावात तालुका जिल्हा यामध्ये होणारी निवडणूक यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. कारणं यांना जनतेवर राज्य करणे. जनतेला भुरळ पाडणे. बोलण्याचे कौशल्य. पैसा. माणूस बळ. जमिनींचे हस्तांतरण. अशा माध्यमातून राज्य करण्याचा धागा सापडला होता. आणि मग

              राजकारण सुरू झाले. यामध्ये अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांना कधीच संधी मिळाली नाही आणि यांनी मिळून दिली नाही कारणं जनता फक्त मतदानाची बॅंक म्हणून यांनी वापर केला. समाजात फूट पाडणे. जातीयवाद घडविणे. गरिब असेलतर आणखी गरिब कसा होईल तिकडे प्रामुख्याने लक्ष दिले. आणि अशा विविध माध्यमातून यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि तेथूनच वडिलोपार्जित या विषयाला सुरुवात झाली. वडील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सदस्य नेता पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्यातलेच होण्यास सुरुवात झाली. आणि यांचा जयजयकार करणारे. प्रचार करणारे कार्यक्रमात खुर्च्या उचलणारे. पोस्टर डिजिटल लावण्यास आपली मुल. कारणं काय मटन आणि दारु यांमुळेच आपणं कधी पुढ गेलो नाही. आणि आज जो सुरवातीला राजकारण मध्ये गेला त्यांनंतर त्याचा मुलगा. मुलगी सून. सासू. पावणे. यांनाच निवडणूक लढण्याची संधी दिली जाते म्हणजे फक्त नाव बदलला आणि राजकारणी तोच आहे. जनतेला त्रास तोच. जनतेची लूट तीच. दहशतवाद. गुंडगिरी. अपहरण खुन. बलात्कार यांचे वाढते प्रमाण याचे कारण आहे ते म्हणजे वडिलोपार्जित पध्दतीने आलेली राजकारणातील चोर

              शुध्द बीजा पोटी फळें रसाळ गोमटी. अशी आपल्या मराठी भाषेत म्हनं आहे. पण राजकारणात असणारे सर्वजण काही चोर नसतात त्यातील काहीजण समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे काही भारतीय नागरिक आहेत त्यांनी समाजाचे भल करण्यासाठी आपले पूर्ण जीवनाची होळी केली आहे. पण राजकारणात फक्त पैसा सत्ता संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने येणारे. यांना जनता मेली काय आणि जगली काय काहीच फरक पडत नाही. हजारों एककर जमीन. जागोजागी साखर कारखाने. बॅंक पतसंस्था. पेट्रोल पंप. शैक्षणिक संस्था अशा नोटा छापण्याचे उधोग निर्माण केले जातात मग काय त्यांची मुल याच पाऊलावर चालतात कारणं हे सर्व वडिलोपार्जित त्यांना मिळालेल असतं. 

   ‌. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग यातील कोणी राजकारणात दिसतं नाही आणि आलातर त्याला आपणं आपला संबंधित आहे म्हणून निवडून देत नाही. कारणं राजकारणी लोकांना या खालच्या जातीतील कोणी राजकारणात चालत नाही. आणि आपणांस पाटील कुलकर्णी यांच्या शिवाय आपल चालण नाही मला कळत नाही कशासाठी पाटील कुलकर्णी पाहिजे काय तुमच्या उरावर नाचायला पाहिजे. आजच निर्णय करा आपल्या समाजांचा प्रतिनिधी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद नेता पुढारी आमदार खासदार मंत्री का नको ? म्हणजे ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे त्याचीच मुल पुन्हा राजकारणात येणार आणि तुमच्यावर राज्य करतात. हे सर्व होत आपल्या मनांत आपण निवडून दिलेल्या लोकांबद्दल आदर नसून भीती असते. बोलण्याचे. विचारण्याचे धाडस नाही. आपल कोणतंही काम होत नाही त्याचा पाठपुरावा होतं नाही. आपल काम एकच आहे ते म्हणजे सर्व गप्प गुमान सहन करणे हेच आपले काम आहे

      आज वडिलोपार्जित चालत आलेले राजकारण संपविणे गरजेचे आहे. सर्व गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक सर्व जाती जमाती यांनी आज सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये राजकारण प्रशासन शासन यांच्या कीललया आपल्या हातात घ्या जस मतदान करताय तस मत मांडायला शिका. आपल्या हक्क व अधिकार यासाठी मैदानात येवून भांडायला शिका. 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कुटुंब आणि महिला

कुटुंब आणि महिला



               कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो

याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात



            आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते

याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही



            महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात

           पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो

      महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो 

          महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन. 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....

कुळकायदा कुळकायदा - Land....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती....

आपण जाब विचारु शकतो का ?....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या