Showing posts with label animal. Show all posts
Showing posts with label animal. Show all posts

आपत्ती आणि मुकी जनावरे

 


आपत्ती आणि मुकी जनावरे

           अवेळी अवकाळी पाऊस. भुकंप. चक्रीवादळ. पूर. ढगफुटी. ज्वालामुखी. अतिवृष्टी. ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. अशा विविध माध्यमातून व बिकट परिस्थिती निर्माण होते त्याला आपत्ती असे म्हणले जाते. 

              बघता बघता उन्हाळा संपला आणि पावसाची चाहूल लागली. लोकांची लगबग सुरू झाली आपली घरे दुरुस्ती करण्यासाठी. हवामान अंदाजानुसार यंदा पाऊस जास्त आहे घरातील अन्न धान्य जनावरांसाठी चारा. जर पाऊस काळ जास्त झाला तर पाऊसाळयात आपणांस व आपल्या कुटुंबांचे जनावरांचे कोणत्याही परिस्थितीत हाल होऊ नये यासाठी आपण नियोजन लावतो. आणि एक वेळ मा जिल्हाधिकारी साहेब यांचा आपत्ती व्यवस्थापन २००५ व आपत्ती व्यवस्थापन कलम १५ नुसार सर्वांना कळविण्यात येते की पाणलोट क्षेत्रात पडत असणारा मुसळधार पाऊस यामुळे नदी काठी राहत असल्याले लोकांना स्थलांतरित होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. यांच्याकडून चेतावणी देण्यात येते. या निर्माण होणा-या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. आरोग्य विभाग. विद्युत पुरवठा. दुरध्वनी. सार्वजनिक बांधकाम विभाग. परिवहन महामंडळ. पाटबंधारे विभाग. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. पंचायत समिती. जिल्हा परिषद. व जिल्ह्यातील. मदतकार्य करणारे. संस्था. सेवाभावी संस्था. आर्थिक. सामाजिक. प्रशिक्षण. जनजागृती. यंत्रणा सराव. प्रतिस्पर्धी दल. यांना महापूराचया काळात मदतीसाठी तयार राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. व सर्वसामान्य जनतेला प्रशासनाला मदत करण्याचे आव्हान केले जाते 

            १९९०/१९९९ हा काळ नैसर्गिक आपत्तीवर आवर घालण्याचे दशक म्हणून ओळखले जाते आणि हवामान अंदाजानुसार पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढतो आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतो आपणांस बातमी. मोबाईल द्वारे. मॅसेज कळतो. पाणी ईथ आल तिथ आल. धरणातील विसर्ग सुरू केल्यामुळे गावात. कानाकोपऱ्यात तालुक्यातील काही ठिकाणी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाण्याचा फुगवटा वाढण्यास सुरुवात झाली. शासनाने वेळोवेळी लोकांना ताकीद देऊन सुध्दा लोकांना आपली जागा सोडून जाण्यास तयार नाहीत पाणी घरापर्यंत पोहचले बघता बघता पूरचे पाणी घरात घुसले पाणी घुसले मुळे लोकांची धास्ती वाढली. पाणी वाढतच होते. शासनाने आपणांस वचन दिले प्रमाणे सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी शासन व अधिकार व कर्मचारी सेवाभावी संस्था सामाजिक संघटना आपली जात धर्म सोडून महापूरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले. पण आपली लोक आडगी आहेत पाणी तोंडात जाण्याच्या स्तराला आल्यावर पाळायला चालू करतात यांत्रिक बोटी. व हेलिकॉप्टर दल व अन्य मार्गाने मदत कार्य सुरू केले जाते आणि लोकांना सुखरूप ठिकाणी पोहचवल जात माणस पूरातून वाचविण्यासाठी शासन बरेच प्रयत्न करते. 

                बोलणारयाचया. "एरंडया विकतात आणि न बोलणारा उपाशी मरतो " आशी आपल्या मराठी भाषेत म्हनं आहे. महापूर किंवा कोणतीही आपत्ती मग ती मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक असो. यात जीव जातो तो म्हणजे मुक्या जनावरांचा. आपण २००५ विसरलो नाही. २०१४ विसरलो नाही २०१९ तर आपण अजिबात विसरणार नाही कारणं महाप्रलय काय असतो ते आपण पाहिले आहे. भारतात दरवर्षी ५०/टक्के. भागात भुकंप. आणि ३०/टक्के भागात दुष्काळ पूर येतो. महापूर सारख्या संकटात प्रत्त्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी पळतो आणि निवारयाला जातो. आणि ज्यांना काही बोलता येत नाही. अशी खुंठयाला डांबून घातलेली जनावरें. सोडून नेण्याचं राहून राहून जाते. काहीजण राहण्यास गावांत असतांत आणि वस्ती रानात असते आणि रात्रीच्या वेळी पूराचे पाणी गोठ्यात घुसल्यावर. काय परस्थिती असेल विचार करण्याच्या पलिकडे आहे बांधल्यामुळे कुठ जाता सुध्दा येत नाही ती जनावरें टाचा खुडून मरताना त्यांचा जीव जाताना काय हाल होत असेल देव कोणालाही असे मरण देऊ नये. या मुक्या जनावरांत मांजर. कुत्री. गाय म्हैस वासरे. शेळ्या मेंढ्या लहान मोठी जनावरे. याची खरोखरच बिकट परिस्थिती होते. २०१९ मध्ये आलेला महापूर आपण बघितला आहे त्यात. मोठ्या प्रमाणात जनावरं मृत्यू मुखी पडली. रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे फुगून पडली होती. प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याचे पडलें होते. त्यामुळे या मेलेल्या जनावराकडे कोणाचेही लक्ष्य नव्हतं. त्यांची दुर्गंधी सुटल्यावर शासनाने पुढाकार घेऊन त्या मृत्यू जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावली. 

          आपत्ती ग्रस्त लोकांसाठी जागोजागी जेवण राहण्याची सोय अडकलेल्या लोकांना भोजन पॅकेट पोहोचविले जाते. दवाखाना. तपासणी औषध त्यांची आपले सगेसोयरे करणारं नाहीत एवढी सेवा या आपत्ती ग्रस्त लोकांची उठाठेव केली जाते. शासनाने. या सर्व लोकांच्या पेक्षा आपत्ती काळात सर्वात अगोदर जनावर पूरातून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांना चांगली जागा. स्वच्छ पाणी. चारा. आजारी जनावरांसाठी दवाखाना. जे काय करता येतील तेवढ्या सेवा सुविधा जनावरांसाठी करणे गरजेचे आहे. ज्या जनावरांनी लोकांच्या पडत्या काळात आपल्या दुधातून आर्थिक गरज भागविली. त्यांना त्यांची किंमत आहे का नाही माहित नाही. बॅंक. सोसायटीच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांत परिषद योजनेतून घेतलेली जनावरें. त्यातील एखादे जनावरा मृत्यू मुखी पडलें तर बसलं की घर त्या गरिबांचे. शासनाने जनावरांना सुध्दा आपत्ती काळात नुकसान भरपाई साठी पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे मनुष्य मृत्यूमुखी पडले तर शासन पाच लाख मदत जाहीर करते. 

          पूरकाळात. भूखसंकलन. सर्वांनी माणसांपेक्षा जनावरांना भरभरून मदत करा. 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गिधाडे

 


         आपण आपल्या गावात प्राचिन काळापासून हे नाव ऐकत आलो आहे  मृत्यू झालेले जीव सुध्दा ही जात सोडत नाही एक म्हनं आहे की जनावरं किंवा कोणताही प्राणी मृत्यू झाला तर या गिधाडांना स्वप्न पडते आणि यांचें थवे चया थवे येथे उतरतात आणि मृत्यू झालेल्या प्राण्यांचा फडशा पाडतात तो असा की त्या जनावरांची फक्त हांडे दिसतात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पुरेपूर एखाद्याला संपविण्याचा जणू विडा उचलला आहे

      आज मानवरुपी गिधाड आपणास सर्वत्र पाहायला मिळतात ती म्हणजे आर्थिक लुबाडणूक.  सामाजिक दबाव. महिला अत्याचार.  कामगार लुबाडणूक. सर्वसामान्य माणसाला शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मिळणारी वागणूक.   वैद्यकीय सेवा. मेडिकल व्यवसाय.   किराणा दुकान. फळे भाजीपाला. महागाई.  अशी विविध प्रकारची गिधाडे आपणास दिसतात 

            रेशन विभाग ( पुरवठा विभाग ) यातून आपणास काय वागणूक मिळते आपणास माहीत आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात सदन असणारे ज्यांना गरज नाही असे लोक असतात. त्यांना रेशन मधून मिळवणारे अन्न धान्य खाण्यास योग्य वाटत नाही ते जादा दराने विक्री करतात त्याचा उपयोग गरजवंताला होईल पण तशी तरतूद केली जात नाही रेशन दुकानदार महिन्याला जेवढे रेशनकार्ड धारकांना अन्न धान्य मिळणार या लाभातून   तुमचे नाव दिसत नाही.  थम उठत नाही. आधार कार्ड लिंक नाही. वरून येत नाही. अशी एक नाही अनेक कारणे दाखवून आपला हक्क मारला जातो.  नविन रेशनकार्ड काढणे.  नाव कमी करणे. नाव वाढविणे. अन्न सुरक्षा योजनेत समावेश करणे.  अशी अनेक प्रकरणे महिने न महिने धुळखात पडलीं आहेत याचा अर्थ काय 

         सामाजिक दबाव आपण समाजप्रिय लोक आहोत  समाजात म्हणजे  एक कुटुंब असल्यासारखे आपण राहतो समाजातील चालीरीती सणवार. मृत्यू दहन दफन शिक्षण.  लग्न संभारभ. याचा आपणास अभिमान असतो आज समाजाच्या नावांवर आज सर्वत्र प्रत्त्येक जण आपापल्या परीने सत्ता आपला दबदबा निर्माण करण्याकडे कल आहे  समाजातील लोकांना वाळीत टाकण्याची भीती घालून पैसा उकळणे. जात पंचायतीच्या नावाखाली जातक अटि घालणे तुम्ही पंचांच्या निर्णयानुसार वागले पाहिजे असे निर्बंध घालणे अशी विविध प्रकारची बंधने घातली जातात याला काय म्हणायचे

           जननी जन्म जन्मभूमी जय. एक महिला आई बहीण वयीनी. आजी. या सर्व नात्याची आठवण आपणास महिला दिनाच्या. दिवशी आपणास आठवतात. पण खरोखर पाहिले तर  आज महिला आपल्या घरातच सुरक्षित नाही. बाहेर आपण पाहतो शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षीत नाहीत. अॅसिड हल्ले. बलात्कार. अपहरण. छेडछाड. लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करणे. अशा विविध समस्यांना महिलांना मुलींना रोज सामना करावा लागतो 

                शाळेत जाणारी मुलगी. बाजारात बाजार आणण्यास गेलेली मुलगी परत घरात येई पर्यंत तीची आई वडील घराच्या दरवाज्याकडे डोळे लावून बसतात कारणं बाहेर भली मोठी गिधाड फिरत असतात आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारी महिला आज सुरक्षित नाही  महिलांना. वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणारे आपणातीलच आहेत . त्यांच्या वरिल. अन्याय दूर करण्यासाठी महिला कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे बलात्कार करणार्या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात न देता जनतेच्या ताब्यात द्या. महिला वावर जास्त असणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत 

    त्यामुळे उनाड फिरणारा या गिधाडांना चाफ बसेल 

            कामगार संघटीत आणि असंघटित कामगार असे दोन प्रकार असतात त्यात मोलमजुरी करणारे. बिगारी काम करणारे. बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना  वेतन जेमतेम असते. त्यातूनच अडाणी गरजू व्यसनी गरिब अशी छाप यांच्यावर पडलेली असते    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून अशा बांधकाम व्यावसायिक कामगार यांच्यासाठी १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने कुटुंबातील. मुलं. वैयक्तिक कामगार. यांना भविष्य निर्वाह करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजना मिळविण्यासाठी कोणतेही एजंट दलाल यांची गरज भासत नाही. पण कामगार हितचिंतक आहे असा आव आणून आज जागोजागी विविध कामगार संघटना सेवाभावी संस्था युनियन व इतर माध्यमातून बेमाफी फि घेवून कामगार नोंदणी केली जाते   लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांकडून मंडळातून मिळणाऱ्या लाभातून मोठा वाटा काढून घेतला जातो  बोगस कामगार नोंदणी केली जाते बांधकामासी कोणताही संबंध नसणारे लोक आज मंडळांचा लाभ संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्त मधील अधिकार व कर्मचारी यांच्या तुम्ही खा आम्ही खातो असा फंडा वापरला जातो  अशी बरीच प्रकरणे आहेत लिहायला वेळ कमी पडेल मग मला सांगा यांना काय म्हणता येईल मृत्यू झालेल्यांना खाणारे बरे ही तर जीवंत माणसांना या मार्गाने खात आहेत

        आत्ता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्यावर अन्याय झाला आहे त्याचा न्याय मिळावा जाब विचारता यावा यासाठी. शासकीय आॅफिस.  ग्रामपंचायत. पंचायत समिती.  जिल्हा परिषद. तहसिलदार कार्यालय अंतर्गत येणारे सर्व विभाग. जिल्हा अधिकारी. अशे सर्व शासकीय क्षेत्रातील आॅफिस मध्ये निवेदन.  तक्रार अर्ज. मागणी अर्ज. स्मरणपत्र. बंद. आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन. अशा विविध विषयांवर वेळोवेळी अर्ज करत असतात पण आजपर्यंत माझ्या पाहण्यात नाही की कोणत्याही शासकीय आॅफिसने कोणत्याही पत्र व्यवहाराचे लेखी उत्तर दिले नाही  असे का ? आपण लोकशाही राज्यात आहोत. लोकांनी लोकांच्या साठी तयार केलेले राज्य आहे पण सर्वसामान्य जनतेला काहीच किंमत नाही. एकाधा व्यक्ति उपोषणाला बसतो पण कोणीही त्या उपोषण स्थळी जाऊन भेट देत नाही याउलट एखाद्या नामांकित व्यक्तिच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित असते हे काय आहे  शासनाने गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे पण खरोखर एक विचार येतो शासकीय अधिकारी नावालाच आहेत यांच्या किल्ल्या राजकारणी लोकांच्या हातात आहेत 

        यांना काय म्हणता येईल मृत्यू झालेल्यांना खाणारे बरे पण जीवंत लोकांना खाणारे कोण ?

        आपणं डॉ यांना देव मानतो आज आपणं बघतो की वैद्यकीय सेवेचा व्यवसाय सुरू केला आहे  दवाखान्यात दाखल झाल्यापासून फी आकारण्यास सुरवात होतें ती अमुक आजारासाठी अमुक अशी नाही तोंडाला येईल ती फी. दवाखान्यात मेडिकल त्याच डॉ लोकाच मग त्याच्या उपचार घेताय म्हणून त्यांचे औषध त्यांच्याच मेडिकल मध्ये मिळणार दुसरीकडे मिळणार नाही. औषधांची किमंत किती आहे हे विचारायचे नाही. पेशंट बरा होऊ अथवा नाही यांचे बिल माफात झाले की सांगितले जाते तुमचा पेशंट दुसरीकडे हालवा. ?  पेशंट मयत झाल्यास पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जात नाही. आपण भावनिक असतो आपला व्यक्ती मयत असतो आपण ईकड १०/२० टक्के नी पैसे काढतो आणि यांच्या मढयावर घालतो  मेडिकल हा एक पैसा मिळवण्याचा मार्ग आहे  दहा गोळ्यांचे पाॅकीट. ५० रुपये म्हणजे पाच रुपयांला एक गोळी त्याची विक्री दहा रुपये प्रमाणे केली जाते. सलाईन बाॅटल. ४० रु मेडिकल वाले विकणार १०० रु डॉ तीच सलाईन बाॅटल अडमिट असणार्या पेशंटला  लावली की त्याची किंमत खाट भाडे. आय सी यु चार्ज वेगळा. जनरल चार्ज वेगळा. म्हणजे सर्व मिळून दिवसांचे.  कमीत कमी १०/००० हजार बिल होत असावे. म्हणजे आय सी यु मध्ये पेशंटला कोणती वैद्यकीय सेवा दिली जाते हे नातेवाईक यांना सुध्दा माहिती नसते. आणि आपण विचारत नाही. मी पाहिले आहे. एका तासांपूर्वी व्यवस्थित बोलत असणारा पेशंट नाहिसा होतो. मयत असणार्या पेशंटला सुध्दा आॅकसिजन वर ठेवून काही डॉ पैसे उकळतात. दवाखान्यात कोठेही  रुग्ण हक्क सनद लावली जात नाही. वैद्यकीय सेवेप्रमाणे रुग्णांचे बिल आकारण्यात यावे  आपण विचारत नाही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे वर्षाला एक मजला डॉ वाढवत आहेत जागोजागी मोठ्याप्रमणात माया गोळा केली आहे. महिला बाबतीत  बाळंतपण काळात. नैसर्गिक रीत्या जरी बाळंतपण होत असेल तरी सुद्धा सिझर करण्याचा सल्ला दिला जातो 

      .  मग यांना काय म्हणता येईल आपण विचार करा. सजग नागरिक व्हा प्रश्न विचारा नाहितर ही अशी अनेक ठपून बसली आहेत कवा पड पडत्या आणि मी खातोय 

       समजा काही कारणांमुळे एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश बंद  किंवा लाॅकडाऊन करण्यात आला की मग किराणा दुकानदाराचे सोनं होतंय कारण. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत ही दुकाने जसे. किराणा. दुध. भाजीपाला फळे. यांना सुट देण्यात येते. पण वेळेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या वेळेचा फक्त फायदाच करुन घेण्यासाठी. मालाचा दर डबल केला जातो. मग. तेल. शेंगदाणे. गुळ. ज्वारी. गहू बाजरी. मका. व अन्य किराणा माल. अगोदर सटाॅक केला जातो आणि मग आम्हाला माल मिळत नाही असे कारणं दाखवून जनतेला लुटले जाते  नासका कुजक्या. भाज्या फळं विकली जातात. अशा जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री करणारे दुकानदार त्यांचेवर कोणाचा अंकुश आहे का ? यांना काय म्हणता येईल

         विविध उत्पादनांची आज आपणं मार्केटला.  निर्मिती होताना बघतो. तयांची मोठ्याप्रमाणात टेलिव्हिजन वृतमानपत्र. व विविध माध्यमातून आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात एका वर एक मोफत पाकिटावर किंमत जास्त आत माल कमी. तेल किलोचा भाव वेगळा लिटरचा वेगळा  आज आॅनलाइन शापिंग च याड प्रत्येकाला लागलंय किंमत अगोदर भरुन घेतलीं जाते अन्यथा पॅकिंग फोडण्याच्या आधी आत काय आहे कसे आहे ते आपल नशीब. अशी एक नाही अनेक गिधाड आपल्या भोवती फिरत आहेत कवा कोण सापडतो त्या टार्गेट मध्ये. हा सर्वात मोठा प्रश्न आहे 

        यांना काय म्हणता येईल तुमच्याकडे उत्तर आहे का ? 

        बॅंक. पतसंस्था. विविध सोसायट्या. पतपेढी. फायनान्स कंपन्या. खाजगी सावकार.  सरकारमान्य सावकार. भिशी मंडळे. अशा विविध आर्थिक उलाढाल करणारी माध्यमे आपण बघतो  त्यात एक म्हनं आहे. * ऊस मुळासकट खाल्ला. * याचा अर्थ असा होतो की  एखाद्याने एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले तर त्यावर व्याज किती आकारण्यात आले आहे त्या कर्जाला मुदत किती आहे. जामीन कोण आहेत याचा पाठपुरावा आपणच करायचा असतो. मी पाहिले आहे की अशी कर्जे काढणारे एक तर फास लावून घेतात अन्यथा आपले गाव सोडून जातात आपलीं सर्व संपत्ती विकून सुध्दा अशी कर्ज भागत नाहीत ती म्हणजे आपल्या गलथानपणामुळे. आज खाजगी सावकारकी बर्याच प्रमाणात वर डोकं काढत आहे. व्याजाला व्याज. घरदार शेतीवाडी लिहून घेतलीं जाते वेळ पडल्यास घरातल्या महिलांना सुध्दा वेठीस सरकारी लाईसनस देण्याची तरतूदही आहे त्यामुळे त्याला सरकारमान्य सावकारी म्हणले तर वावगे ठरणार नाही  धरले जाते अशी बरीच गिधाड आपणास आपल्या भोवती दिसतात त्यावर शासन अंकुश नाही 

      यांना पाठबळ कोण देत विचार करा उत्तर सापडेल 

       अशी बरीच मोठी गिधाड आपणास खाण्यास तयार आहेत  त्यातच सत्तेची लालसा असणारे आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जातील आजची तरुण पिढी यांना बळी पडत आहे सवलत. शोषण. यातला फरक समजून घ्या 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

 संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

घृणा...

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE ...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण




              आपल्या कडे भरपूर प्रमाणात वने व जंगले होती सर्वत्र झाडें झुडपे विविध पशू पक्षी जलचर प्राणी. सरपटणारे प्राणी असे विविध जीव आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत होती सर्वांना खाण्यास अन्न पिण्यासाठी पाणी. राहण्यासाठी आपल्यापरीने घरटी गुहा पाण्याचे जलस्त्रोत होते मोठें प्राणी लहान लहान प्राण्यांना खात होते पण कधीही कोणत्याही प्राण्यांच्या संख्येत घट किंवा वाढ होत नव्हती सर्व निसर्ग नियमानुसार व्यवस्थित चालू होते जर आपण विचार केला तर वने व जंगले. उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील निमसदाहरित अरण्ये / उप उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील आद्र व पानझडी / उष्ण कटिबंधातील मान्सून अरण्ये / उष्ण कटिबंधातील रूक्ष पानझडी अरण्ये / उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये / राखीव वने / संरक्षित वने / अवरगीकृत वने / अति घनदाट खाणज वने / मध्यम दाट खाजण वने / खुली खाजण वने / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / पेंच राष्ट्रीय उद्यान / गुगामाळ राष्ट्रीय उद्यान / नवेगाव राष्ट्रीय उद्यान / बोरिवली राष्ट्रीय उद्यान / चांदोली अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान /संजय गांधी राष्ट्रीय उद्यान / इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान / राधानगरी अभयारण्य / अशी विविध वने जंगले वन्यजीव संरक्षण करण्यासाठी काही नैसर्गिक होती तर काही आपण वन्यजीव संरक्षण करण्यासाठी तयार केली होती त्यात औषधी वनस्पती व वाघ / सिंह / बिबट्या / चिता / हत्ती / कोल्हे / लांडगे / तरस / भेकर / सांबर / काळवीट / रानमांजर / साळींदर / रानमुंगस / अस्वल /रानडुक्कर / पटटेवाले वाघ /सायाळी /रानगवा / ससे /खोकड / नीलगाय / चिंकारा / वानर /उदमांजर / गवा / पिसारा / हरीण / नाग /धामण / फुरसे / मन्यार / अजगर /सरडा / गांडूळ /हरणटोळ / विरुळा / घोरपड / सापसुरळया / रानपाली / वृक्षसरप / पारवे / बुलबुल /सुतार /हसरा /गरूड / ससाणे /कोकीळ /घुबड / घारि / गिधाडे / पोपट /शिंपी / चंडोल / खंड्या / माळढोक / मोर / करकोचा / पानकावळा / बदक / बगळा / मधमाशी / किटक / टोळ / फुलपाखरे / भुंगे / किडे / मुंग्या /व अन्य औषधी व जनावरांच्या चराईसाठी चारा उपयोग वृक्ष झाडं झुडपे वरिल प्रमाणे सर्व जीव आपला जीवन प्रवास सुखात चालला होता एकामेकावर अवलंबून असणारे प्राणी पशू पक्षी एकामेकाना खातात पण संख्या समान राहते मग वाघ. सिंह. चित्ता. बिबटे. असे हिंस्त्र प्राण्यांना कोणताही प्राणी खात नाही मग यांची संख्या झपाट्याने वाढायला हवी होती पण आज हे सर्व प्राणी बचाव अशी मोहीम राबवावी लागते विचार करा यांची संख्या कशामुळे कमी झाली विचार करण्याची गरज आहेे >

            लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि लोकांना राहणे व वाढती लोकसंख्या यांना रोजगार सुख सोयी देण्यासाठी व लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडायला लागली लोक हळूहळू गावाच्या बाहेर आले पण वाढता लोकांचा स्वार्थ आणि जमीनीवरील अधिकार करण्याची वृत्ती गावापासून थोड दूर घेवून गेली आणि एकवेळ माणूस जंगलात गेला हा वन्यजीवांचा असरा असणारा त्याचे घर असणारे लाखो प्राणी पशू पक्षी किटक यांच्या वास्तव्यावर त्याची नजर गेली आणि थोडी थोडी करत जंगले तोडायला सुरुवात झाली रस्त्याच्या नावांवर / बांध / बंधारे / कालवे / एम आय डी सी उधोग व्यवसाय / मोठी मोठी सिमेंट जंगले टोलेजंग इमारती / कारखाने व अन्य उधोगाना बाॅयलर साठी लागणारे जळाऊ लाकूड / घरबांधणी साठी लाकूड / काही समज गैरसमज यासाठी निरापराध प्राणी पशू पक्षी यांची कत्तल / अशा विविध आपल्या स्वार्थापोटी माणसाने जंगल तोड करण्यास सुरुवात केली बघता बघता जंगलांची क्षेत्रे कमी झाली आणि औधोगीकरण झाले पण आपली संस्कृती दर्शविणारे प्राणी पशू पक्षी यांचा निवारा आसरा नष्ट झाला आणि त्यांच्या जमाती नष्ट होण्यास सुरुवात झाली आज काही प्राणी पशू पक्षी आपणं पुस्तकातच वाचतो आणि आपल्या मुलांना गोष्टी सांगण्याची वेळ आली याला अमुक म्हणतात त्याला तमुक म्हणतात किती वाईट आहे डोंगरे शासनाने विविध योजना सांगून हजारो हेक्टर जमीन ढापली आहे त्यात विविध झाडांची लागवड केली ती माणसाला कोणत्याही उपयोगाची नाही ती कशी त्याची माहिती पुढे देणार आहे 

               आपण केलेल्या विघातक कामाची पोचपावती आपणास मिळायला सुरुवात झाली प्राण्यांना. राहण्यासाठी व जगण्यासाठी अन्न. पिण्यासाठी पाणी. वेळोवेळी लागणारे जंगलातील वनवे आपण वानरे माकड बघितली आहेत पूर्वी काळात रानात. रताळे. बटाटे. मका. भुईमुग शेंगा. केळी. अशी शेती केली जात होती त्यावेळी जनावराला अन्न मुबलक मिळत होते आज सर्वत्र ऊस व अन्य पिकांची शेती केली जाते याप्रमाणे जनावराला अन्न मिळते बंद झाले त्यामुळे वानर / माकडे रानगवे. / निलगाय. अशा जनावरांनी गावाचा मानवी वस्तीचा रस्ता धरला. याला कारणीभूत आपणच आहोत तसेच. वाघ सिंह चित्ते बिबट्या यांनासुद्धा जंगलांची तोड झाल्यामुळे राहणे खाणे मिळणं बंद झाले आणि त्यांनी गावाकडे मानव वस्तीकडे रस्ता वळविला शेळ्या मेंढ्या कोंबड्या कुत्री माणस लहान मुले यांचेवर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यांना गावाकडे येण्यास भाग पाडणारे व बाहेरचे कोणी नाहीत आपणच आहोत आणि आपण आत्ता एखादे जनावरं शहरात गावात दाखल झाले की त्याला अमानुषपणे पकडतो काही वेळा पकडताना काही वन्यजीवांचा मृत्यू सुध्दा होतों म्हणजे त्यांच्यावर आपण याचे अगोदर केलेला अन्याय कमी होता म्हणून आज सुध्दा या मुक्या निरापराध प्राणी पशू पक्षी यांना यांचा वंश संपत आला तरी अजून किती दिवस अन्याय सहन करावा लागणार काय आपलं वाईट केलं आहे या जनावरांनी मी म्हणतो ते आपणास देत असणारी सजा दंड आपण केलेल्या कामाच्या किंमतीत कमी आहे आणि आपण ताठ मानेने वन्यजीव संरक्षण दिन साजरा करतो आपल्याला कस काहीच वाटतं नाही जरा तरी वाटायला हवं 

              वरील प्रमाणे सर्व प्रकार प्राणी पशू पक्षी यांचेवर होणारा अन्याय / शिकार / वन्यजीवांची अवैध शिकार. / वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार / वन्यजीव संवर्धन / वन्यजीव संरक्षण / राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण / जलचर प्राणी / सरपटणारे प्राणी / वन्यप्राण्यांना विष प्रयोग करणे /पारध करणे /जाळ्यात पकडने /सापळ्यात अडकवणे /छळ करणे /शरिराचा कोणताही भाग जखमी करणे /जायबंदी करणे /स्वताच्या इच्छेनुसार तोडणे. उपटू वा गोळा करणे /जिवंत अथवा मृत विक्री /आग लावणे /विस्फोटक वापरणे / राष्ट्रीय उद्यान मध्ये खाजगी जनावरें चरण्यासाठी बंदी /पर्यटनावर बंदी /वरिल प्रमाणे तरतूद करण्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा. "१९७२" आणि "२००३" व त्यात प्रामुख्याने महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी "२००६" हा सुधारित कायदा तयार केला यात जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतातील वन्यजीवांचा समावेश करण्यात आला "वन्यजीव " याचा अर्थ प्राणी. जलचर. तसेच भू वनस्पती. जे कोणत्याही अधिवासाचा हिस्सा आहेत

    या कायद्यात केंद्र आणि राज्य यांची अधिकार मंडळे

केंद्र शासन 

(१) वन्यजीव संगोपन अधिकार कलम. (३) 

(२) राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ज्यामध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतील त्यांची व मंडळांची कामे खालील प्रमाणे

(१) वन्यजीव संवर्धन कार्यात सुधारणा

(२) राज्यशासनाला वन्यजीव संवर्धन चालना देण्यासाठी मदत

(३) वन्यजीव अवैध शिकार वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी सल्ला व धोरण तयार करणे

(३) वन्यजीव संवर्धन सुधारणेतील उपाययोजना

(४) वन्यजीव भाष्य करणारा अहवाल किमान दोन वर्षांतून एकदा तयार करणे व जनहितासाठी प्रकाशित करणे

वाघ बचाव संरक्षण व संवर्धन

राष्ट्रीय वाघ सरक्षण व संवर्धन अधिकार मंडळ ( एन टि सी ए ) ची स्थापना वन्यजीव कायद्यात २००६ चया सुधारणेनंतर झाली पर्यावरण व वन्य मंत्री अधक्ष असणारे अधिकार मंडळ स्थापन करण्यात आले

( कलम "८"प्रमाणे

(१) वाघ सरक्षित क्षेत्रात जैवसृषटी मारक पध्दतीने होणारा जमीन वापर

(२) मानव व वनयप्राणी संघर्ष थांबविण्यासाठी उपाययोजना करणे वाघांना हाणी न पोहचता सहवावर भर देणे

            अजून वेळ गेलेली नाही आपणांस आत्ता वन्यजीवांना संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे कायद्याची पूर्ण माहिती उद्या मॅसेज मध्ये देणार आहे 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

कलाकार....

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen...

पळवाट पळवाट...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या