Showing posts with label women. Show all posts
Showing posts with label women. Show all posts

कन्या कन्या - महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती

 


कन्या कन्या. 

              महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती # मुलगी जन्माला आली लक्ष्मी आली # असं म्हणणारे आपण जेव्हा आपणं आपल्या शेजारी सगेसोयरे आपल्या घरांत मुलगी जन्माला येणे. म्हणजे भाग्याचे माणल जात माझी छकुली माझी लेक भाग्याची अशी आपली मनधारणा असतें मुलीच्या जन्माचे स्वागत करा असा शासन सल्ला देत आहे. त्यासाठी माझी मुलगी भाग्याची. व मुलींच्या जन्मावर एक विशिष्ट रक्कम मुदत ठेव ठेवली जाते. एक वेळ मुलींचा जन्मदर जास्त होता पण काळ बदलला आणि लिंग चाचणी सारखी सोय आली आणि लिंग चाचणी करून मुलीचा गर्भातच घात केला जाऊ लागला. वंशाचा दिवा फक्त मुलगा असतो या समजूतीने आपल्या मनात घर केले होते. त्यांची पोचपावती म्हणून एक वेळ अशी आली की आज मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. आपण विसरलो की. छत्रपती शिवाजी महाराज. शाहू महाराज. ज्योतीबा फुले. बाबासाहेब आंबेडकर. महाराणा प्रताप. समाजसेवक. क्रांतिकारी अशी विविध विभूती माणसाला जगण्याचा. राहण्याचा आपल्या जन्माचा अर्थ सांगणारे. लोकांच्या हितात आपले हित बघणारे. आपल्याला मिळाले म्हणजे त्यांना जन्माला घालणारी एक स्त्री होती हे आपण विसरतो. राजमाता जिजाऊ. झाशीची राणी लक्ष्मीबाई. फातिमा शेख सावित्रीबाई फुले. मदर तेरेसा. अशा विविध महिलांनी नावलौकिक मिळविला आहे. या सुध्दा भारतीय नारी आहेत. जर मुलगी जन्माला आली नसती तर अशा पावन विभूतीना आपण मुकलो असतो 

                मुलगी जन्माला आली सोबत लक्ष्मी घेऊन आली. म्हणायला बर वाटत पण खरोखरच असं होत का नाही. लक्ष्मी वाढलेली आपणांस खपते पण मुलगी वाढल तसं आपल दडपण वाढतं मग ती शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये. बाजार. प्रवास. सार्वजनिक विविध ठिकाणी. आज आपली कन्या कन्या अडचणीत आहे. कारणं आज आपण बाल लैंगिक शोषणाच्या घटना वेळोवेळी वृतमापत्रात. दूरचित्रवाणी. यांवर बघतो वाचतो आणि आरे आरे वाईट झाल एवढंच म्हणतो आणि विसरुन जातो. पण आज बाल लैंगिक शोषण करणारे हे विसरतात की त्यांना जन्माला घालणारी एक स्त्रिच आहे # पर स्त्री मातेसमान # हे सत्य आहे का ? सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि याच जास्त प्रमाण आहे ते म्हणजे. पुणा मुंबई या भागात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे एखाद्या ठिकाणी बलात्कार घडलाच तर ती घटना दूरध्वनी दूरदर्शन यांवर ब्रेकिंग न्यूज म्हणून. पाठोपाठ दाखवून आपल्या न्युज लाइव्ह याचा टिआरपी वाढविणे एवढाच उद्देश असतो आणि बलात्कार करणार्या व्यक्तिला सारखें जनतेपुढे दाखविले जाते म्हणजे पिढता पेक्षा व्यक्तिची जाहीरात केली जाते. महाराष्ट्राला हलवून टाकणारे या घटना. काही दिवसांपूर्वी पुण्यात १३ वर्षाच्या एका चिमुकल्या मुलींवर बलात्काराची घटना घडली. ही बातमी ताजी असताना रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपलेल्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्यांवर बलात्कार झाल्याचे समोर आले. खेड तालुक्यातील एका १२ वर्षाच्या मुलींवर पाच नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केलयाची फक्त नोद आहे. वसयीत १६ वर्षाच्या मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. पिपंरी येथे एका नराधमाने मी निवृत्त पोलिस असल्याचे सांगून एका महिला शिक्षेकेवर बलात्कार केला. अमरावती १७ वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला. मुंबई साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाला आणि उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला कोपरडी बलात्कार प्रकरण. ही घटना भयानक असतो आपणास त्यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि पिडीतांना न्याय मिळवून देणयाची गरज आहे त्यानुसार आपल्या संविधानाने आणि कायद्याने घटनात्मक संस्था. व्यवस्था यांच्या भूमिका स्पष्टपणे आपणास आखून दिलेल्या आहेत त्यानुसार पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखणे आणि बलात्कार सारख्या प्रकरणांचा तपास. फिर्याद नोंदविणे. आरोपींना गुन्हेगारांना पकडणे. इथवरच मर्यादित आहे. गुन्हा घडला आहे किंवा नाही त्यातील आरोपींना कोणती शिक्षा झाली पाहिजे आदी गोष्टी ठरविण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे बहुतेक अशा प्रकरणांमध्ये खरया गुन्हेगारांना पकडले आहे याची खात्री नसते. बरेचदा खरेखुरे आरोपी मोकाट फिरतात म्हणजे चुकीच्या लोकांना शिक्षा देऊन बलात्कार घटना थांबणार नाहीत आणि बलात्कार सारख्या घटना थांबणार नाहीत आरोपींना पकडून तुरुंगात डांबून ठेवणे त्यानंतर त्यांना जामिनावर मुक्तता करणे पैसा वशिलेबाजी. धमकी. दम. अशा माध्यमांचा वापर करणारे आरोपी यांना पोलिसांनी पकडून जनतेच्या ताब्यात द्या. म्हणजे. वाईट नजरेने बघितले तर डोळे काढा. बलात्कार असेल तर हात तोडा नाहीतर चौकात यांना फाशीची शिक्षा द्या. नाहीतर मरेपर्यंत चप्पल बूट सॅंडल यांने मारण्यात यावे यासाठी अशा आरोपींना जनतेच्या ताब्यात द्या जनता यांना शिक्षा देईल त्याशिवाय आरोपीच्या मनांत दहशत बसणार नाही कशासाठी यांना पकडायचे आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये पोसायचे. 

                  १९६० मध्ये गुन्हेगारी कायदा यासंबंधीची सविस्तर माहिती आपणांस देतो विविध फौजदारी कायदे काही उप कलमे लावली आहेत त्यानुसार शारीरिक मानसिक छळ इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध. ३५४ अ महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडणे. या कृतयासाठी ३५४ ब लैंगिक समाधान मिळविण्याच्या विकृती ३५४ क आणि महिलेचा पाठलाग करणे आॅनलाइन छळ ३५४ ड अशा विविध महिलांसाठी संरक्षक कलमांचा समावेश करण्यात आला आहे राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी जनसामान्यांच्या मनात आली होती त्यानुसार काही महिला संघटना व महिलानी मागणी केली होती त्यानुसार#दिशा # कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शक्ति कायदा आणणारं आहे बलात्काराच्या अनेक खटल्यांमध्ये पिडिताचे शोषण होते आणि गुनहेगार मोकाट सुटतात त्यामुळे केवळ कायदाच नव्हे तर समाजाने सुध्दा आपली जबाबदारी म्हणून जिथे जिथे महिलेवर अत्याचाराची प्रकरणे घटना घडत असतील तर अशा पिडित महिलांना कायदेशीर संरक्षण द्या. बलात्कार घटना नंतर व्यक्त होणारा राग हा योग्य असला व्यक्ति त्यामुळे भावनिक होऊन किंवा केवळ दिखावा म्हणून किंवा विरोधकांकडून मागणी होतंय म्हणून निर्णय घेणे उचित ठरणार नाही. तसेच गुन्हे घडल्यानंतर प्रक्रियेविषयीचा विचार करत असताना ते घडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडे लक्ष दिले पाहिजे बलात्काराच्या दृष्टीने याचा विचारांत सेफ्टी संकल्पना अंमलबजावणी गरजेची आहे

              महिलांचे लैंगिक शोषण बलात्कार आणि हत्या अशा गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली आहे प्रश्न पडतो की अशा घटना का घडतात? एक समाज म्हणून आणि यंत्रणा म्हणून आपल्या देशाला या आघाडीवर सातत्याने अपयश का येते आहे ? महिला आणि पुरुष समान नाहीत आणि त्यामुळेच पुरुषांप्रमाणे महिला सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. मनाप्रमाणे कपडे धारण करू नये. हसू नये. सजनेसवरणे. लैंगिक शोषण आणि बलात्कार हे एक आजारांचे लक्षण आहे असा आजार जडलेल्या व्यक्ति पुरुषांपेक्षा महिलेला कमी लेखतात. फक्त आणि फक्त भोग वस्तू म्हणून त्यांची गणना करण्यात येते हे वास्तव्य समजून घेतलं पाहिजे स्त्री भ्रूणहत्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमागे हीच मानसिकता असते जे लोक पितृसत्ताक मानसिक मध्ये लहानाचे मोठे होतात आणि शिक्षणाच्या अधिक संधी प्राप्त करून घेतात ते सामान्यतः असे मानतात की आपण महिलेपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि त्यामुळेच आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्याचा हक्क आहे महाराष्ट्र मध्ये गेल्या ४ ते ५ हजार महिला बलात्कार घटना घडल्या आहेत तर ७/८ हजार बालकांवर अत्याचार झालेले आहेत आणि आजही होत आहेत यापुढे होणारच कारण आपली शासन व्यवस्था आणि आपली मानसिकता याला कारणीभूत आहे सार्वजनिक ठिकाणी जाणारया महिलांवर. ४००/५००/हून अधिक महिलांवर अॅसिड हल्ले झाले ग्रामीण व शहरी भागातील पुणे मुंबई उपनगर यामध्ये एक हजाराहून अधिक महिला या अत्याचाराला बळी पडल्या आहेत महिलांवर बलात्कार आणि बालकांवर लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ले आणि अन्य घरेलु अत्याचार घटना झाल्या अशा पिडीत महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी शासनाने # मनोधैर्य # योजना २०१३ मध्ये सुरू झाली आणि २०१८ पर्यंत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण कडे पुनर्वसनासाची जबाबदारी देण्यात आली 

              निरक्षरता. अठरा विश्व दारिद्र्य. गरिबी. बेरोजगारी. अश अनेक समस्या आज वेश्याव्यवसाय यासाठी महिलांना प्रवृत्त केले जाते आणि असे भयानक समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत इथली समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तितकेच मोठे परिश्रम घ्यावे लागतात. दुर्दैवाने चित्रपट किंवा अलीकडच्या माहिती तंत्रज्ञान समाजप्रवृती सदृढ करण्यापेक्षा त्यातल्या विकृतींनादेखील संरक्षण दिलयाचेच एकंदरीत दिसून येते. 

               नोव्हेंबर १९५३ मध्ये कांग्रेस पक्षाने आपली महिला आघाडी स्थापन केली त्यापूर्वीच १९३४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समांतर अशा राषटसेविका समितीची स्थापना श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांनी केली होती. पूर्वीच्या जनसंघाला व आत्ताच्या भारतीय जनता पक्षाला या समितीमधून स्त्री कार्यकर्त्या मिळतातं. १९५५ मध्ये राष्ट्रीय सेवा दल व प्रजासमाजवादी पक्ष यांना जवळ असलेल्या समाजवादी विचारांच्या महिलांनी समाजवादी महिला सभेची स्थापना केली या सभेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रापुरते आहे ही महिल सभा आंतरराष्ट्रीय लोकशाही समाजवादी सभेशी संलग्न आहे

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कुटुंब आणि महिला

कुटुंब आणि महिला



               कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो

याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात



            आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते

याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही



            महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात

           पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो

      महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो 

          महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन. 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....

कुळकायदा कुळकायदा - Land....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती....

आपण जाब विचारु शकतो का ?....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या