आपल्या कडे भरपूर प्रमाणात वने व जंगले होती सर्वत्र झाडें झुडपे विविध पशू पक्षी जलचर प्राणी. सरपटणारे प्राणी असे विविध जीव आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत होती सर्वांना खाण्यास अन्न पिण्यासाठी पाणी. राहण्यासाठी आपल्यापरीने घरटी गुहा पाण्याचे जलस्त्रोत होते मोठें प्राणी लहान लहान प्राण्यांना खात होते पण कधीही कोणत्याही प्राण्यांच्या संख्येत घट किंवा वाढ होत नव्हती सर्व निसर्ग नियमानुसार व्यवस्थित चालू होते जर आपण विचार केला तर वने व जंगले. उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील निमसदाहरित अरण्ये / उप उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील आद्र व पानझडी / उष्ण कटिबंधातील मान्सून अरण्ये / उष्ण कटिबंधातील रूक्ष पानझडी अरण्ये / उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये / राखीव वने / संरक्षित वने / अवरगीकृत वने / अति घनदाट खाणज वने / मध्यम दाट खाजण वने / खुली खाजण वने / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / पेंच राष्ट्रीय उद्यान / गुगामाळ राष्ट्रीय उद्यान / नवेगाव राष्ट्रीय उद्यान / बोरिवली राष्ट्रीय उद्यान / चांदोली अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान /संजय गांधी राष्ट्रीय उद्यान / इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान / राधानगरी अभयारण्य / अशी विविध वने जंगले वन्यजीव संरक्षण करण्यासाठी काही नैसर्गिक होती तर काही आपण वन्यजीव संरक्षण करण्यासाठी तयार केली होती त्यात औषधी वनस्पती व वाघ / सिंह / बिबट्या / चिता / हत्ती / कोल्हे / लांडगे / तरस / भेकर / सांबर / काळवीट / रानमांजर / साळींदर / रानमुंगस / अस्वल /रानडुक्कर / पटटेवाले वाघ /सायाळी /रानगवा / ससे /खोकड / नीलगाय / चिंकारा / वानर /उदमांजर / गवा / पिसारा / हरीण / नाग /धामण / फुरसे / मन्यार / अजगर /सरडा / गांडूळ /हरणटोळ / विरुळा / घोरपड / सापसुरळया / रानपाली / वृक्षसरप / पारवे / बुलबुल /सुतार /हसरा /गरूड / ससाणे /कोकीळ /घुबड / घारि / गिधाडे / पोपट /शिंपी / चंडोल / खंड्या / माळढोक / मोर / करकोचा / पानकावळा / बदक / बगळा / मधमाशी / किटक / टोळ / फुलपाखरे / भुंगे / किडे / मुंग्या /व अन्य औषधी व जनावरांच्या चराईसाठी चारा उपयोग वृक्ष झाडं झुडपे वरिल प्रमाणे सर्व जीव आपला जीवन प्रवास सुखात चालला होता एकामेकावर अवलंबून असणारे प्राणी पशू पक्षी एकामेकाना खातात पण संख्या समान राहते मग वाघ. सिंह. चित्ता. बिबटे. असे हिंस्त्र प्राण्यांना कोणताही प्राणी खात नाही मग यांची संख्या झपाट्याने वाढायला हवी होती पण आज हे सर्व प्राणी बचाव अशी मोहीम राबवावी लागते विचार करा यांची संख्या कशामुळे कमी झाली विचार करण्याची गरज आहेे >
लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि लोकांना राहणे व वाढती लोकसंख्या यांना रोजगार सुख सोयी देण्यासाठी व लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडायला लागली लोक हळूहळू गावाच्या बाहेर आले पण वाढता लोकांचा स्वार्थ आणि जमीनीवरील अधिकार करण्याची वृत्ती गावापासून थोड दूर घेवून गेली आणि एकवेळ माणूस जंगलात गेला हा वन्यजीवांचा असरा असणारा त्याचे घर असणारे लाखो प्राणी पशू पक्षी किटक यांच्या वास्तव्यावर त्याची नजर गेली आणि थोडी थोडी करत जंगले तोडायला सुरुवात झाली रस्त्याच्या नावांवर / बांध / बंधारे / कालवे / एम आय डी सी उधोग व्यवसाय / मोठी मोठी सिमेंट जंगले टोलेजंग इमारती / कारखाने व अन्य उधोगाना बाॅयलर साठी लागणारे जळाऊ लाकूड / घरबांधणी साठी लाकूड / काही समज गैरसमज यासाठी निरापराध प्राणी पशू पक्षी यांची कत्तल / अशा विविध आपल्या स्वार्थापोटी माणसाने जंगल तोड करण्यास सुरुवात केली बघता बघता जंगलांची क्षेत्रे कमी झाली आणि औधोगीकरण झाले पण आपली संस्कृती दर्शविणारे प्राणी पशू पक्षी यांचा निवारा आसरा नष्ट झाला आणि त्यांच्या जमाती नष्ट होण्यास सुरुवात झाली आज काही प्राणी पशू पक्षी आपणं पुस्तकातच वाचतो आणि आपल्या मुलांना गोष्टी सांगण्याची वेळ आली याला अमुक म्हणतात त्याला तमुक म्हणतात किती वाईट आहे डोंगरे शासनाने विविध योजना सांगून हजारो हेक्टर जमीन ढापली आहे त्यात विविध झाडांची लागवड केली ती माणसाला कोणत्याही उपयोगाची नाही ती कशी त्याची माहिती पुढे देणार आहे
आपण केलेल्या विघातक कामाची पोचपावती आपणास मिळायला सुरुवात झाली प्राण्यांना. राहण्यासाठी व जगण्यासाठी अन्न. पिण्यासाठी पाणी. वेळोवेळी लागणारे जंगलातील वनवे आपण वानरे माकड बघितली आहेत पूर्वी काळात रानात. रताळे. बटाटे. मका. भुईमुग शेंगा. केळी. अशी शेती केली जात होती त्यावेळी जनावराला अन्न मुबलक मिळत होते आज सर्वत्र ऊस व अन्य पिकांची शेती केली जाते याप्रमाणे जनावराला अन्न मिळते बंद झाले त्यामुळे वानर / माकडे रानगवे. / निलगाय. अशा जनावरांनी गावाचा मानवी वस्तीचा रस्ता धरला. याला कारणीभूत आपणच आहोत तसेच. वाघ सिंह चित्ते बिबट्या यांनासुद्धा जंगलांची तोड झाल्यामुळे राहणे खाणे मिळणं बंद झाले आणि त्यांनी गावाकडे मानव वस्तीकडे रस्ता वळविला शेळ्या मेंढ्या कोंबड्या कुत्री माणस लहान मुले यांचेवर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यांना गावाकडे येण्यास भाग पाडणारे व बाहेरचे कोणी नाहीत आपणच आहोत आणि आपण आत्ता एखादे जनावरं शहरात गावात दाखल झाले की त्याला अमानुषपणे पकडतो काही वेळा पकडताना काही वन्यजीवांचा मृत्यू सुध्दा होतों म्हणजे त्यांच्यावर आपण याचे अगोदर केलेला अन्याय कमी होता म्हणून आज सुध्दा या मुक्या निरापराध प्राणी पशू पक्षी यांना यांचा वंश संपत आला तरी अजून किती दिवस अन्याय सहन करावा लागणार काय आपलं वाईट केलं आहे या जनावरांनी मी म्हणतो ते आपणास देत असणारी सजा दंड आपण केलेल्या कामाच्या किंमतीत कमी आहे आणि आपण ताठ मानेने वन्यजीव संरक्षण दिन साजरा करतो आपल्याला कस काहीच वाटतं नाही जरा तरी वाटायला हवं
वरील प्रमाणे सर्व प्रकार प्राणी पशू पक्षी यांचेवर होणारा अन्याय / शिकार / वन्यजीवांची अवैध शिकार. / वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार / वन्यजीव संवर्धन / वन्यजीव संरक्षण / राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण / जलचर प्राणी / सरपटणारे प्राणी / वन्यप्राण्यांना विष प्रयोग करणे /पारध करणे /जाळ्यात पकडने /सापळ्यात अडकवणे /छळ करणे /शरिराचा कोणताही भाग जखमी करणे /जायबंदी करणे /स्वताच्या इच्छेनुसार तोडणे. उपटू वा गोळा करणे /जिवंत अथवा मृत विक्री /आग लावणे /विस्फोटक वापरणे / राष्ट्रीय उद्यान मध्ये खाजगी जनावरें चरण्यासाठी बंदी /पर्यटनावर बंदी /वरिल प्रमाणे तरतूद करण्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा. "१९७२" आणि "२००३" व त्यात प्रामुख्याने महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी "२००६" हा सुधारित कायदा तयार केला यात जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतातील वन्यजीवांचा समावेश करण्यात आला "वन्यजीव " याचा अर्थ प्राणी. जलचर. तसेच भू वनस्पती. जे कोणत्याही अधिवासाचा हिस्सा आहेत
या कायद्यात केंद्र आणि राज्य यांची अधिकार मंडळे
केंद्र शासन
(१) वन्यजीव संगोपन अधिकार कलम. (३)
(२) राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ज्यामध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतील त्यांची व मंडळांची कामे खालील प्रमाणे
(१) वन्यजीव संवर्धन कार्यात सुधारणा
(२) राज्यशासनाला वन्यजीव संवर्धन चालना देण्यासाठी मदत
(३) वन्यजीव अवैध शिकार वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी सल्ला व धोरण तयार करणे
(३) वन्यजीव संवर्धन सुधारणेतील उपाययोजना
(४) वन्यजीव भाष्य करणारा अहवाल किमान दोन वर्षांतून एकदा तयार करणे व जनहितासाठी प्रकाशित करणे
वाघ बचाव संरक्षण व संवर्धन
राष्ट्रीय वाघ सरक्षण व संवर्धन अधिकार मंडळ ( एन टि सी ए ) ची स्थापना वन्यजीव कायद्यात २००६ चया सुधारणेनंतर झाली पर्यावरण व वन्य मंत्री अधक्ष असणारे अधिकार मंडळ स्थापन करण्यात आले
( कलम "८"प्रमाणे
(१) वाघ सरक्षित क्षेत्रात जैवसृषटी मारक पध्दतीने होणारा जमीन वापर
(२) मानव व वनयप्राणी संघर्ष थांबविण्यासाठी उपाययोजना करणे वाघांना हाणी न पोहचता सहवावर भर देणे
अजून वेळ गेलेली नाही आपणांस आत्ता वन्यजीवांना संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे कायद्याची पूर्ण माहिती उद्या मॅसेज मध्ये देणार आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
वाचा
बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...
No comments:
Post a Comment