आगडोंब Ahmed Munde

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

आगडोंब



           आज सर्वत्र एकच आग लागली आहे ती म्हणजे आरोग्य. विज्ञान व तंत्रज्ञान.  दलित आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती.  शेतमजूर. शेती व ग्रामीण विकास. लघुउद्योग.  पाणीपुरवठा. व पाणी वाटप. गृहनिर्माण संस्था. महिला मुक्ती चळवळ.  व्यसनमुक्ती.  कायदा आणि न्याय.  बालकल्याण. अनाथ आणि अपंग पुनर्वसन.  धरणग्रस्त व इतर विस्थापितांचे पुनर्वसन. साक्षरता प्रसार. बांधल मजूराचे पुनर्वसन. ‌ लोककला. अंधश्रद्धा निर्मूलन.  राजकीय. धार्मिक. सांस्कृतिक.  प्रादेशिक.शोषन बालक.  जातीयवाद. विषमतावादी. दारिद्रय.  गरिबी.  जाती पाती. पैसा अडका. नाती गोती. अन्न वस्त्र निवारा.  डिझेल पेट्रोल. गॅस. राॅकेल. दळणवळण.  कुटुंब. बेरोजगारी.  शिक्षण. मनोविनोदनाची साधने. ‌आंदोलन चळवळी. राजकीय संघटना व पक्ष.  संपर्क माध्यमे.  सुरक्षा दले.  नेतृत्व धारणा. धर्म निरपेक्ष.  स्वातंत्र्य करार.  लोकशाही गणराज्य.  आर्थिक.  नागरी हक्क व संरक्षण.  चलेजाव चळवळ. वंगभंग चळवळ.  जालियनवाला बाग हत्याकांड. संप. उपोषण. रस्ता रोको.   

             वरील सर्व मुद्दे आपणास उपयुक्त ठरतं आहेत पण आज या सर्व मुद्द्यांना वेगळेच वळण लागले जाते आहे आपल्याकडे साथी रोग पहिलें होणेच पण आत्ता नवल झाले आहे एक विषाणू येतो आणि पूर्ण पणे मानवाला आपल्या विळख्यात घेते जगण्यासाठी कमवणारा व्यक्ति जीवाच्या आकांताने घरात बसतो काय नेमका प्रकार आहे कोणाला माहिती

         आज  शिक्षण पूर्ण करून हजारों नाही लाखों मुलं बेकार आहेत. भरती नाही रांत्र दिवस व्यायाम करुन शरिर कमविण्यासाठी पहाटेपासून प्रयत्न करणारि मुल रोज आपणं बघतो त्यात अॅकडमी वर्गाच्या नावाखाली लूटणारे वेगळेच आहेत शासनाने आपणावर मोठा उपकार केला भरती साठी वयोमर्यादा वाढवली पण त्या वयापर्यंत. भरतीची वाट बघायची का मुलांचे लग्न करायचे मोठें कोडे पालकांसमोर आहे वय वाढले की कोण लग्नासाठी मुलगी देत नाही मग काय करायचे

              आरोग्य सर्वात मोठा प्रश्न आहे मेडिकल. दवाखाने. डॉ. कडून होणारी लूट आपण बघतो मजल्यावर मजले बांधले या डॉ लोकांनी त्याला काही दरपत्रक नाही कोण औषधांचे किती पैसे घेतो याला नियम नाही परवा औषधांच्या किमती वाढल्या जीवनावश्यक आहे घेणें गरजेचेच आहे 

      अन्न धान्य रेशन कार्ड संबंधित म्हणाला तर मोठा घोटाळा परवा अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू केली त्यात दोन चाकी गाडी. एक लाखापेक्षा उत्पन्न जास्त नको. शासकीय सेवेत नाही पाहिजे. आज दोन चाकी चार चाकी गाडी प्रत्येकाच्या दारात उभी आहे ती सुद्धा आपल्या शासन व्यवस्थेमुळे कारणं सुलभ हप्ते भरा डाॅउनपेमेंट थोड भरा आणि गाडी घेऊन जा आत्ता मला नाही वाटत की कोणीही रेशनकार्ड साठी पात्र ठरेल म्हणून 

         पेट्रोल व डिझेल गॅस सिलिंडर यांचा दर सुध्दा विचार करायला लावणारा आहे कोणीही यावर आवाज उठवत नाही कारणं सर्वजण एकाच नावत आहेत कोणी कोणाच्या नावला होल पाडायचे चाललंय गाडी जीवनशयक झाली कितीही महागाई झाले तरी पेट्रोल डिझेल लोक घेतात हे यांच्या ध्यानात आल आहे त्यामुळे वरिल तीन पेट्रोल डिझेल गॅस यांचें दर रोज वाढणार आपल्यालाच काहितरी केलं पाहिजे पण काय करणार 



              अन्न धान्य कडधान्ये डाळी तेल भाजीपाला फळे अशा जीवनावश्यक वस्तूंची साठवण करून ग्राहकांना लूटणारे व्यापारी पिकविणारे जेवढ मिळवत नाहीत त्यांच्या डबल व्यापारी मिळवितात याला आपली व्यवस्था कारणीभूत आहे 

      बंद आंदोलन मोर्चा उपोषण करणारे आपल्यावर अन्याय झाला म्हणून शासनाला जाब विचारण्यासाठी उन वारा पाऊस यांचा विचार न करता झगडत असतात पण त्याकडे कोणी लक्ष सुध्दा देत नाही त्यांना पळवून घालविण्यासाठी विविध हातखंडे वापरले जातात मग आपल्याला न्याय मागणे सुध्दा अपराध आहे

          असे विविध प्रश्न आहेत की त्यांचा मोठा आगडोंब उसळला आहे पण बोलावं तरी चोरी नाही बोलावं तर मरण सर्वसामान्य माणसाला जगण अवघड झाले आहे ज्यांना हा मॅसेज कळला त्यांनी हा विविध समस्यांचा आगडोंब उसळला आहे त्यात आपणासच पाणी ओतावे लागणार आहे नाही तर पुन्हा चलेजाव चळवळ उभी करावी लागेल नाहीतर जालियनवाला बाग हत्याकांड आठवा वेळ यायला लागली आहे वाटचाल हुकूमशाही कडे चालली आहे




       वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

कोणत्याही समाजातील दानशूर व्यक्ती कोण असतील तर त्यांनी संपर्क साधावा  समाजांचे आपण देणं लागतो. या तत्वावर काही नियोजन संदर्भात चर्चा करणे आहे. नावासाठी नाही फक्त समाजासाठी.

वाचा -

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD

गुलाम. मजूर. कामगार

लोकशाही आणि घराणेशाही

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

गुलाम. मजूर. कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

गुलाम. मजूर. कामगार



                 शब्द एक सारखे असले तरी यांचा अर्थ भयानक व अंगावर काटा आणणारा आहे याचे वर्गीकरण आर्थिक परिस्थिती नुसार श्रीमंत. गरिब. असे ढोबळ वर्गीकरण तर आहेच परंतु त्यातही वयसायपरतवे. शेतकरी. शेतमजूर कुशल. अकुशल कामगार अशी वर्गवारी देखील आहे. शहरी व ग्रामीण. सुशिक्षित. अशिक्षित. असा भेद देखील अनेक वेळा महत्वाचा असतो महिला पुरुष उच्च कनिष्ठ दर्जा देण्याची वृत्ती आपल्या विचारात खोलवर धृढ झालेली आहे यांच्या जोडीला प्रादेशिक. अहंकार आणि राजकीय मतभेद आहेतच थोडक्यात म्हणजे सामाजिक. आर्थिक. सांस्कृतिक. व राजकीय. अंगानी आपण व आपला समाज विभागलेला आहे या विभागलेल्या सर्व गटाचे सर्व व्यक्तिचे रास्त न्याय. आणि लोकशाही हितसंबंध. जपत जपत अंतिम आपल्याला स्वातंत्र्य. समता. बंधुता. व सामाजिक न्याय. यावर आधारलेला एकात्मिक राजकीय समाज निर्माण करावयाचा आहे वरिल प्रकारचया सर्व मतभेदाचा विचार न करता आपण सर्वांनी समाजांचे पाईक म्हणून माणसाला. माणूस म्हणून कसे जगता व जगविता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे

                 गुलाम हा शब्द आपण स्वातंत्र्य मिळायच्या आधी मोगल गुलामगिरीत होतो. २५० वर्ष. आणि नंतर ब्रिटिश कालखंडात १५० वर्षे. भोगली आहेतः माणसाला गुलाम म्हणून वागविले जाण्याचा प्रसंग देखील आपल्याला थक्क करून सोडणारा आहे जनावरांचा बाजार भरावा तसा त्यावेळी मजूर विक्री साठी बाजार भरत असत माणसाची बोली लावली जात असे तब्येत चांगली असणारे गुलाम शेतात काम करण्यासाठी घरात घरकाम करण्यासाठी. जनावरें गुरे चारणे. तेलाचे घाणे ओढणे बैलाप्रमाणे काम शेणघाण काढणे संडास साफ करणे. करण्यासाठी असे गुलाम विकत घेतले जात होते अनेक अशी कामे होती की आपण त्याचा विचार सुध्दा करू शकत नाही हि वेळ आपल्यावर आली ती आपल्या फुटिरतेचया भावनेमुळे आपणच या सर्वाला जबाबदार आहोत बराच काळ लोटला आणि बर्याच परीश्रमा आपल्या देशहिताचा विचार करणार्या लोकांच्या. तन मन धन याचाच नाही तर आपल्या संसाराची होळी केली आणि एकवेळ आपण स्वातंत्र्य दिनाच्या नावाने मोकळा श्वास घेतला तोपर्यंत गुलामगिरीत असणारे लोक त्यांना गुलामगिरीतून मुक्ति मिळाली

            गुलाम या नावाला नवीन कापड बदलाव तसं मजूर हे नवीन नाव मिळाले त्यावेळी बांधकाम क्षेत्र आत्ता एवढे व्यापक नव्हतं लोक ज्यांच्याकडे शेती जादा आहे गावात जो इतरांपेक्षा मोठा आहे त्यांच्यात सर्व कुटुंब आपली व आपल्या कुटुंबाची दोन वेळचे जेवण कसंबसं मिळावं म्हणून काम करण्यास जात होते खेडेगावात लोकसंख्या वाढत निघाली काम करणारे जास्त झाले काम कमी पडायला सुरुवात झाली स्वातंत्र्य मिळाले आणि काही वर्षांत ग्रामपंचायत राजची स्थापना झाली मग सरपंच उपसरपंच सदस्य टीम तयार झाली शासनाने लोकांची परस्थिती बिकट आहे हे ध्यानात घेवून महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना. ग्रामीण भागातील लोकांना संजीवनी म्हणून चालू करून दिली यात कोंबडी पालन शेळी मेंढी पालन. रोपवाटीका. जनावरांचे गोठे बांधकाम. गोबरगॅस बांधणे. अशी विविध कामे लोकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम करत होते रोजगार हमी योजना धर्तीवर जाॅब कार्ड. चालू करण्यात आले १५ दिवसांच्या वर रोजगार उपलब्ध नसेल तर रोजगार भत्ता म्हणून मजूरांना पगार देणे बंधनकारक करण्यात आले काळ बदलत गेला आणि शिक्षण व्यवस्था थोड्याफार प्रमाणात सुरू झाली होती शिकलेली लोक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यास समर्थ नव्हते ग्रामपंचायत राज स्थापन झाले होते सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी यांनी हि बाब शासनाच्या लक्षात आणून दिली आणि गावागावात मजूर सहकारी सोसायट्या या नावाने मजूरांना हक्काचे काम मिळणारे व्यासपीठ तयार झाले मजूर सोसायट्यांचे माध्यमातून अल्प भूधारक. मिळेल ते काम करणारे कामगार यांना शासन विना अनामत रक्कम भरता गटर समाजमंदिर पाण्याची टाकी रस्ते विकास महामंडळ कामे देणे बंधनकारक आहे पण झाले उलटेच मजूर सोसायट्या मध्ये नावासाठी फक्त मजूर हे नावच राहिले आणि नेते व त्यांचे बगलबच्चे यांनीच या सोसायटीत नावे मोठी मोठी टेंडर घेण्यास सुरुवात केली मजूर नावालाच उरला आज बघा सोसायटी मजूरांचया नावांवर पण एकही मजूर त्यात सभासद नाही दिनदयाळ मागासवर्गीय. या नावाने चालू असणार्या विविध संस्था यात खरोखर एकही वरिल प्रमाणे कोणी नाही याला कारणीभूत आहे ती आपली प्रशासन व्यवस्था हे सर्व वेगळंच होण्यास सुरुवात झाली मग मजूर नाव जरा व किळसवाणे वाटायला लागलं आणि मग एक वेगळ अस नाव आलं ते म्हणजे सुशिक्षित कामगार असं



                बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आणि शासनाला मदत करील असा बांधकाम व्यावसायाने भरारी घेतली लोकांच्या हाताला भरपूर काम उपलब्ध झाले यामुळे गौण खनिज उत्खनन यात सुध्दा मोठी उलथापालथ झाली नद्या डोंगर यावर भस्मासूर राक्षसा प्रमाणे मोठ्या मोठ्या मशिनरी बसल्या डोंगर सपाट झाले नद्यांमधील वाळू उपसत उपसत माती सुध्दा यांनी उपसली विट भट्टी नदी कडची माती काढून नदी गावा पर्यंत आली आणि दरवर्षी महापूर नुकसान होण्यास सुरुवात झाली याला आपण जबाबदार आहोत

          कामगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन एप्रिल. १९२१ मध्ये मुंबईत पहिलें कामगार कार्यालय स्थापन झाले त्याची व्याप्ती पाच विभागांत करण्यात आली यावर अधिकार व कामगार कायदे कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांना आपले हक्क समजण्यासाठी ८/३/२००० रोजी नागरि सनद तयार करण्यात आली त्यानुसार समान वेतन किमान वेतन सुरक्षा कायदा विमा संरक्षण अशा २७ कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या त्यासाठी १८/६०/ वयोगटातील व्यक्तींना अंशदान रक्कम भरून नोंदणी साठी हक्क देणेत आला कामगार संख्या वाढली आणि बांधकाम विभागासी कोणताही संबंध नसलेले लोक बांधकाम कामगार संघटना नावांची दुकाने निर्माण झाली कामगार नोंदणी नावाखाली कामगार लूट सुरू झाली सायकली वर असणारे कामगार संघटना स्थापन करून अगदी थोड्या दिवसात लाखोंचे मालक झाले याला कामगार नोंदणी आॅफिस मधील अधिकार व कर्मचारी हे सुद्धा या कामगार हितचिंतक लोकांना सामिल आहेत कामगारांना विविध योजना मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक आर्थिक लूट चालूच आहे 

             याचाच अर्थ असा होतो की गुलाम या शब्दाचा अजून कामगारावरील शाप गेला नाही पोटासाठी राबणारा गुलामच होता आणि अजून आहे गरिब. गरजू. व्यसनी. अडाणी. आहे म्हणून सर्वांनी याला लूटायचा घाट घातला आहे का कामगारातला खासदार आमदार ग्रामपंचायत सदस्य या कोणत्याही शासकीय क्षेत्रात कामगार नाही कारण आम्हाला चालत नाही कामगार जन्माला आला कामगार म्हणून मरायचे ते निसहाय म्हणून 




       समाजसेवा व बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ....

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ..

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

AMAZING MOBILES SHOP NOW

लोकशाही आणि घराणेशाही

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 लोकशाही आणि घराणेशाही



                 भारतीय लोकशाही व्यवस्थेला पंचेचाळीस वर्षांचा इतिहास आहे एका प्रदीर्घ लढयातून आपले आपले लोकशाही समाजवादी गणराज्य आकाराला आला आहे प्राचीन भारतात लोकशाहीचा व्यापक प्रयोग नव्हता एतधेशीय सत्तेची राजवट असताना नव्या विचारांचा उदय झालेला नव्हता स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ह्या खंडप्राय देशात सहासे पेक्षा जास्त संस्थाने होती त्यापेक्षा अधिक होती त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र व्यवस्था होती राज्य करण्याची पध्दती आणि त्यामधील व्यवहार भिन्न होता हया ऐयधेशीय सत्ता मध्ये एक समान धागा होता तो म्हणजे ग्राम राज्य. होय ग्राम राज्यांनी प्राचीन हिंदू धर्मातील जातीव्यवस्था टिकवून ठेवली होती एतधेशीय राजा किंवा सत्ताधीश व ग्राम राज्ये ह्यांच्या संबंध हा केवळ सारा व महसुली उतपादनापुरता मर्यादित होता

               ग्राम राज्य प्रमुख हा पाटिल किंवा देशमुख असे तो आपल्या राज्याला म्हणजे राजाला गावचा महसुली वाटा देत असे ह्या महसुली उत्पन्न बदल्यात राजाने लोकांचे परकिय आक्रमणापासून संरक्षण करावे ही अपेक्षा असे म्हणजे सुव्यवस्था आणि रक्षणासाठी. पोलिस राज्य. हेच प्राचीन एतधेशीय सत्ताच मुख्य उद्दिष्ट होते सत्ता कोणाची आहे यात ग्रामसभेला रस नव्हता आपल्या शेती उत्पन्नाचा विशिष्ट वाटा गावच्या पाटलाकडे किंवा वतनदार देशमुख यांचेकडे देणे एवढंच त्यांना माहीत होते प्रत्यक्षात महसुली वसुलीचे काम गावातील कुलकर्णी करत असत ह्या काळातही अमलखालील प्रजेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही राज्यकर्ते यांचेवर असलीतरी ते हि जबाबदारी चोखपणे बजावतीलच असे मात्र नाही उलट हे सर्वजण मिळून आपल्याच रयतेची लूटमार करण्यात ऐयधेशीय सत्याचा पुढाकार होता सारा वसुली वेळेत झाला नाही तर राजांचे सैनिक गावातील मालमत्ता महिलांना त्रास. आणि गावाच्या गावे लूटत असतं शिवाय पाटील वतनदार देशमुख कुलकर्णी ह्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे जनतेला कोणी वालीच उरला नाही हि परस्थिती सर्वसाधारण



              इ स १८१८ पर्यंत अशीच राहिली इ स १८१८ मध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले त्यांनी मराठ्यांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात इंग्रज सत्तेचा अमंल सुरू झाला हि एक नवीन राजवट होती नवी राजवट ह्या अर्थाने की ह्या सत्तेने नव्या प्रथा व पध्दती सुरु केल्या उदाहरण. सारावसुलीचया पारंपारिक पद्धतीत रयत धान्याच्या स्वरुपात राजाला सारा देत असे ब्रिटिशांनी हि पध्दत बदलून रोख पैसा ह्या स्वरुपात सारावसुलीची पध्दती सुरु केली त्यांनी जनतेला लूटणारया ठग. पेंढारी. ह्याच्या पूर्ण बीमोड करून शांतता व सुव्यवस्था व कायद्याचे राज्य प्रस्थापित केले आणि महसूल व राज्य व्यवस्थेत अनेक कायदे करून हळूहळू नवी चौकट उभी केली नव्या राजयवयवसथेसाठी प्रशासन वर्ग स्थापन केला व न्याय दानासाठी न्यायालये सुरू केली ह्यामुळे आपल्याला नव्या राज्य व्यवस्थेचा परिचय झाला 

            ब्रिटिशांनी जी पद्धती राबवली किंवा राबवण्याचा प्रयत्न केला त्यामागे ब्रिटिश संसदीय पद्धतीचा मोठा प्रभाव होता हया नव्या बदलातून लोकशाहीचे नवे विचार भारत वाशीयाना कळले आणि घराणेशाहीचा समूळ नायनाट झाला इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीला हे नवे विचार लोकशाही संकल्पना समजून घेण्याची संधी मिळाली

              स न १८५७ मध्ये काही भारतीय सेनानी सैनिक समाजसेवक. क्रांतिकारी यांनी ऐयधेशीय सत्तांनी विचारानी बंड करून आव्हान दिले ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न केला परंतु हा प्रयतणाला अपयश आले भारतीय असंतोष कमी करण्यासाठी १८५८ मध्ये राणीचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहिरनामा मध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आणि १८५८ मध्ये ब्रिटिश संसदेने कायदा करुन ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आणली




          इंग्रज गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्यातली घराणेशाही अजून जशी होती तशीच राहिली एका ठिकाणी एकाच घरातील घराण्यातील व्यक्ति अजून आपल्यावर राजे गेले राजपाठ गेले पण सर्वसामान्य जनतेवर राज्य करणारे तेच आहेत लोकशाही माध्यमातून आपणास विविध अधिकार दिले आहेत पण अजून यांचा वापर आपणास कळालेला नाही अमुक स्वातंत्र्य तमुक स्वातंत्र्य पण ते कागदावरच. विविध कर्ज योजना पण अट जातींचा दाखला कि जे सर्वसामान्य पूर्ण करु शकत नाहीत आत्ता जागायची गरज आहे

      समाजसेवा. बंद आंदोलन. मोर्चे. निवेदन. मागणी अर्ज. तक्रार अर्ज. वाचन. लेखन. संबोधन. प्रचार. प्रसार प्रसिध्दी. आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९ 

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून मुस्लिम समाजातील मुलांना शिक्षणासाठी. ५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे संबंधित जिल्ह्याचे ठिकाणी असणारे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ या आॅफिसला आजच्या आज भेट द्या काही अडचण आल्यास फोन करून संपर्क साधा 

माहिती अधिकार

१४ वया वित्त आयोगानुसार आपल्या ग्रामपंचायतीला पंचायत विकासासाठी आलेल्या विकास निधी मधून दिवयांग. ( अपंग ) व्यक्तिंना ५ टक्के रक्कम वाटण्यात आली आहे का माहिती मागा


वाचा -

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

सफाई कामगार सफाई कामगार...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते..

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ...

सफाई कामगार सफाई कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 सफाई कामगार सफाई कामगार



          आपल्याकडे लहान लहान वाडया वस्त्या होत्या लोक विभागून राहतं होते त्यावेळी स्वच्छता आणि टापटीप आरोग्य याचा फारसा विचार केला जात नव्हता आणि त्याची तेवढी गरज नव्हती कारण प्रदुषण कमी स्वच्छ आणि मोकळी हवा केमिकल रहित अन्न धान्य दुध ताजा भाजीपाला आणि फळे यामुळे लोक अंगापिंडाने गच्च असायची कोणतेही व्यसन नाही एकत्र कुटुंब पद्धती काळ बदलत गेला आणि 

          गावांचे रूपांतर शहरात झाले विविध खेड्यातून नोकरी व कामधंदा यांच्या शोधात लोकांचा लोंढा शहराकडे वाढला लोकसंख्या वाढली सुखसोयी यात वाढ झाली लोकसंख्या वाढल्यामुळे विविध रस्त्यांवर चालणारे लहान लहान व्यवसाय वाढले खाणपानाचया वस्तू मध्ये वाढ झाली जागोजागी संडास मुतारी लेडिज जेंटस. यांची निर्मिती झाली बाजार एस टी स्टँड लोकाचा वावर जास्त आसलेमुळे वापर जास्त होऊ लागला बाजार. बस स्टेशन. रेल्वे स्टेशन. चौक. पानपट्टी विक्री. सार्वजनिक बागा. पर्यटन स्थळे. रस्ते गटर. सार्वजनिक समाजमंदिर. सार्वजनिक पाण्याच्या टाक्या. लोकसंख्या वाढल्यामुळे रोज वापराच्या वस्तू त्याचा कचरा. जसे दुध पिशवी. वृतमान पेपर. भाजीपाला. डॉ व मेडिकल मध्ये निघणारा घातक कचरा. लोखंडी जाळी गंजलेल्या वस्तू. आशा एक नाही अनेक ठिकाणचा निर्माण होणारा कचरा

          कचरा कोठून तयार होतो कसा व कोणत्या ठिकाणाहून किती कचरा तयार होतो हे आपण आत्ता बघितले पण हा कचरा गोळा कसा होतो कोण कचरा गोळा करत त्या कचरयाची विलवेहाट कोण आणि कशी लावली जाते हे आपण कधी विचार सुध्दा करत नाही आपणास विचार करण्याची गरज आहे

       आज शहराची वाढ महानगरात झाली आहे आसमानाला विचार करायला लावणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जागोजागी केर कचऱ्याचे डोंगराएवढे ढिग त्यातून होणारे प्रदुषण वाढता मोकाट कुत्री यांचा वावर आणि संकटात सापडलेले मानवी जीवन हा कचरा गोळा करण्यासाठी व आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून राबणारे सफाई कामगार हे सुद्धा आपल्यासारखेच लोक आहेत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे मोठ्या प्रमाणावर हे कामगार आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अशी गलिच्छ वस्ती राहून गलिच्छ काम करत असतात 



          पावसाळा सुरू झाला आणि मग काय ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याणे तुंबलेल्या गटारी तुंबलेल्या व घाणीचे भरलेल्या मुतारी व सार्वजनिक संडास यातून येणारि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर येणारी घाण जागोजागी साचलेले डबके  यातून आपणास चालन सुध्दा होत नाही आपण आपल्या नाकाला रुमाल बांधून फीरतो मग त्यात काम करणार्या सफाई कामगारांनचा आपण व आपल्या नगरात नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कधीही विचार केला नाही सफाई कामगार नसेल तर शहराची कचराकुंडी होण्यास वेळ लागणार नाह

      शासनाने अशा सफाई कामगार लोकांच्या साठी १२/८/१९७५ पासून शासन प्रयत्नशील आहे  त्यानंतर लाड समितीचे नावाने २१ मार्च २०१६  यात कायमस्वरूपी सफाई कामगारांना घरकुल योजना. महागाई भत्ता. निर्वाह निधी. सफाई कामगार पुनर्वसन. वारस हक्काने नोकरी कायदा. सफाई कामगार. विमा संरक्षण. कामगारांना कामावर असताना विविध सुखसोयी उपलब्ध करून देणे. अशी सफाई कामगार यांना विविध योजना विविध शासन निर्णयानुसार देणेत आल्या आहेत 

         आज सर्वत्र खाजगीकरण चालू झाले आहे यातच विविध ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. स्थानिक स्वराज्य संस्था. यांनी कामगारांचा कोणताही लोड आपल्यावर येऊ नये यासाठी ठेकेदारि पध्दतीने सफाई कामगार घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कामगारांना कोणताही लाभ देणे आवश्यक नाही त्यांना मिळणारा भत्ता नियमानुसार ७० रूपये वरून ४०० रुपये करण्यात आला आहे पण आज ठेकेदार २२० रुपये असे नाममात्र पगार पोटी शुल्क देऊन आठ आठ तास काम करुन घेत आहेत त्यात महिला सफाई कामगारांना मिळणारी वागणूक ही तर वाईट आहे त्यांच्याकडे मुकादम लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन कायम वेगळाच असतो 

            आपल्या हक्क व अधिकार यासाठी सफाई कामगार आंदोलन उपोषण करण्यास बसले असता नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका यांचे सी ओ हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नाही असा पवित्रा घेऊन प्रकरण टाळले जाते आणि तुमचा ठेकेदार आणि तुम्ही बघून घ्या असे सांगितले जाते विविध सफाई कामगार संघटना नावाखाली तयार झालेली दुकानदारी मोडून काढणे गरजेचे आहे अधिकारी आणि कर्मचारी व ठेकेदार यांचे बरोबर सगणमत करून पैसा मिळवणारे समाजकंटक यांना सफाई कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याची गरज नाही  




             खरोखरच सफाई कामगारांना सेवा सुविधा हॅणडगलोज. बुट. सुरक्षा जॅकेट. टोपी. विमा संरक्षण. व अन्य सुरक्षा पूरविणयाची सर्व जबाबदारी हि ठेकेदारावर आहे आणि सर्वात मोठी जबाबदारी ही अधिकारी व कर्मचारी यांचेवर आहे जिथे जिथे सफाई कर्मचारी आपल्या हक्क व अधिकार यासाठी उपोषण व आंदोलन करित असतील त्यांनी आपली मागणी मान्य होई पर्यंत जागा सोडू नका कारणं आपण झाडू खाली ठेवला तर बघू हे ठेकेदार व अधिकार कर्मचारी झाडू घेतात का बघू 

      वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण एखाद्या विभाग शासकीय आॅफिस ग्रामपंचायत. नगरपरिषद महानगरपालिका येथील कोणतीही माहिती मागितली असेल तर त्यांनी देणे बंधनकारक आहे

माहिती अधिकार दाखल केल्यानंतर कोणी आपणास दमदाटी. जीवे मारण्याची धमकी देत असेल तर पोलिस स्टेशनला तक्रार द्या कारण माहित अधिकार दाखल करणार्या व्यक्तिला शासन निर्णयानुसार पोलिस संरक्षण देण्यात आले आहे

वाचा - 

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे . 

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य



             भारत संस्कृती प्रिय देश आहे विविध सणवार लग्नकार्य कार्य विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात आपण आपला जुना खेडेगावातील बाजार पाहिला असेल लहान गाव बोटांवर मोजता येतील इतकेच भाजीपाला व अन्य पदार्थ तयार व विक्री करणारे लोक हळूहळू लोकसंख्या वाढत गेली गावांचे रुपांतर शहरात झाले लोकांचे रहाणीमान व जीवनशैली बदलत गेली आणि त्याबरोबर खाण पाण यामध्ये बदल झाल

            आज घरात रोज खाऊन कंटाळा आला असे म्हणणारे शहरातील विविध म्हणजे वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस वेगवेगळे ज्युस मिठाई पदार्थ. बेकरी पदार्थ. मासे. मटण. धाब्यावरचे जेवन. दारावर विकायला येणारे पदार्थ. भाजीपाला. असे अनेक विक्री करणारे आपणास चौका चौकात आपले गाडी लावून विक्री करताना आपणास दिसतात

           अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडून निर्मिती व वाटपासाठी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती परंतु अन्न व उत्पादन मात्र कमी होते अशा परिस्थितीमध्ये अन्न भेसळ मोठ्याप्रमाणात वाढली यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने भेसळ प्रतिबंधक कायदा अंमलात आणला सन १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून नवीन तरतुदी करून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली या कायद्यानुसार भेसळयुक्त अन्न साठवनीची जागा विक्री करण्यासाठी वापरात येणारी स्वच्छ जागा सुरक्षा मालाचा दर्जा. निर्मिती कालावधी. अन्न तयार करताना विकताना स्वच्छ पाणी. झुरळ माश्या किटक. प्रतिबंधक उपाय केला आहे का मांस व मासे चिकन कापण्यासाठी वापरली जाणारी जागा. स्वच्छ आहे का. ? वेटर किंवा कामगार डोक्याला टोपी. कॅप हंडगलोज. मास्क. केस नखे. कापली आहेत कां ? वेटर कामगार रोजच्या रोज आंघोळ टुथ ब्रश व स्वच्छ राहतो का ? मांस मासे चिकन हे कापीव मालाचा दर्जा. ? 



             वरील प्रमाणे सर्व असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात येते आज कोठेही यातील कोणतीही गोष्ट पहावयास मिळत नाही. मासे विक्री करणारे रस्त्यावर बसून विक्री केली जाते मटन मार्केट असते पण त्याला जो माल विक्रीसाठी कापला जातो तेथे. स्वच्छता नाही. कामाला असणारा कामगार दाढी वाढलेली मळकट कपडे नखे वाढलेली. पाणी स्वच्छ नाही. एवढेच नाही जी बकरी कापली जातात त्यांचा दर्जा सुध्दा सुनिश्चित नसतो तरी कोणतीही कारवाई केली जात नाही

           आत्ता वडापाव पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस ज्युस. चायनीज फूड आईस्क्रीम केक आंबोली उत्तापा असे विविध रोजच्या आहारात समावेश होणारे पदार्थ गाड्यांवर उघड्यावर मिळतात त्यात वापरण्यात येणारी साधनसामग्री. मसाले कोणत्या दर्जाचे आहेत माहिती नाही ? तेल विविध केमिकल वापर होताना दिसतो तेल आठ आठ दिवस बदलले जात नाही हे असे सर्वत्र राजरोसपणे सुरू आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सर्वे करणे गरजेचे आहे केंव्हा झाला होता कोणाला माहित ? 

          भाजीपाला फळे विक्री करणारे व उत्पादन करणारे शेतात खतांच्या नावाखाली विविध केमिकल यांचा वापर होताना दिसतो त्यामुळे या भाजीपाला व फळे यातील नैसर्गिक तत्व निघून जाते काही ठिकाणी मी पाहिले आहे की विविध रंगांची फळें आज बाजारात दिसत आहेत पिवळे कलिंगड. काळया रंगाची केळी. लाल कोबी. लवकरात लवकर विकायला यावी यासाठी फळांना इंजेक्शन दिले जाते त्यामुळे आठ दिवसांत विकायला येणारी फळे दोन दिवसांत विकण्यासाठी तयार होतात यामुळे हा भाजीपाला पिके फळे जीवनावश्यक वस्तू असलेमुळे हे आहारात समावेश झाल्याने लोकांना कॅन्सर. ह्रदय विकार. साखर. असे विविध आजार होताना आपणं पाहतो 

             वरील प्रमाणे सर्व व्यवसाय उघड्यावर चालतात त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याचा धोकाही संभवतो धूळ. डास विविध ठिकाणी मैला व विविध घाणीवर बसलेल्या माश्या. व अन्य जीवन घातक रोग प्रसार करणारे किटाणू. यामुळे मलेरिया हिवताप डेंग्यू. कावीळ विषबाधा. संडास उलटी. असे विविध जीव घेणे आजार होण्याचा धोकाही संभवतो

          अन्न व औषध प्रशासन विभागाने या सर्व ठिकाणचा सर्वे करून वेळोवेळी तपासणी केली पाहिजे अस्वच्छता किंवा ग्राहक आरोग्यासाठी अपायकारक कोणतीही घटना वस्तू आढळल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपण ऐकतो आज अमुक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला आणि भेसळ युक्त लाखोंचा माल जप्त केला पण प्रश्न पडतो हा माल गेला कुठे ? एका बाजूने जप्त केला आणि दुसरया बाजूने विक्री करण्यासाठी त्याच दुकानात आला काय चाललंय तुमच्या आमच्या जीवाचा खेळ मांडला आहे. जिल्ह्यात एकच अन्न व औषध प्रशासन विभागांचे आॅफिस आहे मग ११ तालुक्यात हे फिरणार कधी आणि रेड करून कारवाई करणार कधी ? यावेळी प्रत्त्येक तालुक्याच्या ठिकाणी एक अन्न व औषध प्रशासन विभागाचे ऑफिस असायलाच हवे नसेल तर एखाद्या सेवाभावी संस्था युनियन यांना रितसर अधिकार व नियम व अटी या तत्वावर नेमण्यात यावे 

               आपण काय करायले पाहिजे आपण शक्यतो बाजारात उघड्यावर मिळणारे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. कोणताही खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडी हाॅटेल किंवा कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता किंवा बाल कामगार दिसल्यास ताबडतोब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवा कोणतीही खाद्य वस्तू खरेदी करताना निर्मिती व एकसप्रायरी डेट बघा नसेल तर वस्तू खरेदी करू नका 

         रेशन मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे माती खडे किड काटके पिट झालेले धान्य. असे निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य रेशन मधून सुध्दा वितरण केले जाते सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार नाही वरन येतंय आम्ही काय घरांत तयार केलयकाय अशी उद्धट उत्तरे दुकानदारांकडून मिळतात 

         https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d वरील सर्व भेसळयुक्त निकृष्ट. दर्जा. ओला व वाळका. रोज उपयोगात येणारा अन्न धान्य यावर शासन कारवाई करिल तेंव्हा करील आपण सतर्क होऊन आपले जीवन आपणच वाचवू शकतो 

    वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९ 

कामगार नोंदणी संदर्भात

ऑनलाईन नोंदणी करताना वेबसाईट वर प्राबलेम येतं आहे त्यामुळे कामगार नोंदणी करताना कामगारांना नोंदणी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

आमचे नवीन नेमणूक झालेले विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी जिल्हा ठिकाणी असणारे सहायक कामगार आयुक्त भवन येथे निवेदन दाखल करा व ऑनलाईन नोंदणी संदर्भात अडचण मंडळाच्या निदर्शनास आणून द्या




वाचा - 

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

      महत्वाचे कामकाज



(१) अधिनसत कर्मचारी वर्ग मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल इ कामकाज नियंत्रण व पर्यवेक्षण

(२) ग्रामीण महसुली विभागांचे पर्यवेक्षक

(३)! महसूल अधिकारी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कर्तव्य आणि कार्य पार पाडणे

(४)! पैसा कागदपत्रे वगैरे बाबतीची मागणी संबंधित इसमाला कळविणे म ज म अ कलम १७

(५) शासकीय पैसा वसुली मागणी प्रमाणे वसुली करणे ( म ज म अ कलम १८)

(६)!शेतीचे प्रयोजनासाठी शासकीय जमीनीबाबत प्रस्ताव करणे ( म ज म अ कलम २०/३१ ) 

(७) शासकीय जमीनीवरिल झाडे आणि इतर नैसर्गिक उत्पन्न बाबत कार्यवाही ( म ज म अ कलम २३/२४/२५)

(८) सोडून दिलेल्या किंवा जप्त केलेल्या पोटविभागाची विल्हेवाट ( म ज म अ कलम ३५)

(९) जमीनीचा उपयोग एका प्रयोजनातून दुसर्या प्रयोजनात रुपांतर करणे ( म ज म अ कलम ४४)

(१०) अवैध गौण खनिज उत्खनन कारवाई करणे ( म ज म अ कलम ४८) 

(११) शासकीय भूखंडावरील अतिक्रमण पाडणयाबाबची कार्यवाही (म ज म अ कलम ५०/५१ )

(१२) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असलेल्या इसमास काढून टाकणे ( म ज म अ कलम ५९)

(१३) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असणारा काढून सदर मिळकत सरकार जमा करणे ( म ज म अ कलम ५४)

(१४) हस्तांतरित अयोग्य वहिवाट प्रमाणपत्राची कारवाई करणे (म ज म अ कलम ६१) 

(१५) जप्त केलेलीं जमीन ताब्यात घेणे त्यांचा विनियोग करणे ( म ज म अ कलम ७३) 

(१६) धारण जमिनीतीचे विभाजन करणे ( म ज म अ कलम ८५) 

(१७) भुमापन क्रमांकाच्या किंवा पोटविभागाचया हद्द आखणी करणे (म ज म अ कलम १३६)

(१८) भुमापन क्रमांकाच्या आणि गावाच्या हद्दीत निशाण्या लावणे व दुरुस्त करणे ( म ज म अ कलम १३९/१४१)

(१९) दंडणीय कारवाई करणे (म ज म म अ कलम १५२) 

(२०) हस्तलिखित प्रमादाची दुरुस्ती करणे ( म ज म अ कलम १५५) 

(२१) जमीन महसूल थकबाकी करणार्या विरोधात कारवाई करणे ( म ज म अ कलम १७४ )

(२२) शेतसारा रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसुल करणे ( म ज म अ कलम १७६)

(२३) स्थावर मालमत्ता विक्री संबंधित उद्घोषणा व लेखी नोटीस काढणे ( म ज म अ कलम १९७)

(२४) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम मालमत्ता अटकाव व विक्री करणे ( म ज म अ कलम १८०)

(२५) कसूर करणाऱ्या व्यक्तिची मालमत्ता विक्री करणे ( म ज म अ कलम १८१) 

(२६) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या आणि ती वयवसथेखाली घेणे ( म ज म अ कलम १८२) 

(२७) स्थावर व जंगम मालमत्ता विक्री विषयी उद्घोषणा करणे (म ज म अ कलम १९२/१९३) 

(२८) जप्त केलेल्या मालमत्तेविषयी दावे निकालात काढणे ( म ज म अ कलम २१८)

 अन्न व नागरी पुरवठा कामकाज बाबतीत तहसिलदार

(१) तालुका स्तरावरील नियंत्रण

(२) अन्न धान्य साठवण व वितरण

(३) रास्त भाव दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू विषयक कामकाज

(४) उपकोषागार अधिनियम नुसार दरमहा मुद्रांक व अन्य किंमती कागदपत्रे याबाबतीत कोषागार कार्यालयांची तपासणी करणे

(५) सब जेल मनयुअल नुसार सब जेल अधिक्षक म्हणून कामकाज पाहणे 

   अर्ध न्यायिक कामकाज तहसिलदार

(१) कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे अन्वये कामकाज

(२) मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ अन्वये कामकाज

(३) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये चौकशी कामकाज

  * कार्यकारी दंडाधिकारी नात्याचे तहसिलदार *

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ६ मध्ये फौजदारी न्यायालयाचे जे वर्ग नमूद केलेलें आहेत त्यात ( कार्यकारी दंडाधिकारी ) यांच्या न्यायालयाचा समावेश होतों या अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांचें न्यायालय हे फौजदारी न्यायालय आहे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या स्थानिक अधिकारितेत अपराध येत असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४४ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांना अशा अपराध करणार्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत खालील विविध कायद्यानुसार तहसिलदार यांना अर्ध न्यायिक कामकाज पार पाडावे लागते

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०७ते ११०/१३३/१४४/१७४/ चया तरतुदी अन्वये कामकाज

(२) उच्च न्यायालय क्रिमिनल मॅन्युअल अन्वये प्रतिज्ञा पत्र मृत्यूपूर्वी जबानी घेणे मृत्यू कारणांचा पंचनामा करणे ओळख परेड घेणे इत्यादी

(३) कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे

(४) असामाजिक तत्वावर लक्ष वेधून त्यांच्या हालचाली विषयीं माहिती मिळविणे

(५) शांतता समितीच्या बैठका घेणे व विविध सण उत्सव प्रसंगी कायदा व सुव्यवस्था हाताळणे

   इतर कामकाज

(१) तालुका स्तरावर राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम आयोजित तहसिलदार समन्वय व अंमलबजावणी अधिकारी असल्यामुळे त्यांना खालील कर्तव्य पार पाडावी लागतात

(१) ग्रामीण रोजगार हमी योजना

(२) विविध शासकीय विभाग समन्वय व शासकीय योजना अंमलबजावणी करणे आढावा घेणे

(३) जनगणना. कृषी गणना. पशु गणना. रोगराई निवारण कामांचे नियोजन

(४) लोकसभा. विधानसभा. विधानपरिषद. जिल्हा परिषद. पंचायत समिती. नगरपरिषद. ग्रामपंचायत. विरनीषट सहकारी संस्था निवडणुकां पोट निवडणूक विषयी कामकाज

(५) तालुका स्तरावर विविध समित्या अध्यक्ष सचिव सदस्य म्हणून कामकाज पाहणे

(६) कारयशेत्रात अतिमहत्वाच्या व्यक्तिच्या व्यक्ति यांचें दौरे दरम्यान राजशिष्टाचार विषयी कामकाज पाहणे

 *तहसिलदार यांचे अधिनसथ खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी वृंद असून त्यांचे मार्फत खालील प्रमाणे कर्तव्य / कामकाज पार पाडले जाते

 (१) नायब तहसिलदार

 (२) अव्वल कारकून

 (३) मंडळ अधिकारी

 (४) तलाठी

 (५) शिपाई

  (६) कोतवाल

आपणास माहीत असणे गरजेचे आहे कि आपल्या तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात वरिल प्रमाणे कामकाज चालते

        वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८८०८२५८५९





वाचा -

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education..

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ...

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 आजची शिक्षणपद्धती आणि आपण



       संस्कार करणे. नागरिक घडविणे आचार विचार. राहणीमान. उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज असते त्यामुळे शिक्षणातून आपल्यावर राजकीय सामाजिक आर्थिक संस्कार केले जातात आज्ञापालन आणि शिस्तप्रिय यांचें महत्व आपल्या मनावर बिंबवले जाते अधिकार असणार याचा आदर करायला आपण शाळेत शिकतो चांगला नागरिक म्हणून आपली कर्तृत्व कोणते असतात तेही आपणास शाळेत शिकवले जाते.  

            भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हि प्रार्थना आपण शाळेत पाट केली असेल एक भारतीय नागरिक म्हणून असणारि कर्तृत्व या प्रतिज्ञेत स्पष्ट केली आहेत आपला देश त्याचा इतिहास याची माहिती देऊन देशाभिमान निर्माण करण्यात शिक्षणाचा मोठा वाटा असतो शाळेतल्या क्रमिक पुस्तकांमधून काय शिकवले जावे कोणते विचार मांडले जावेत यावर सरकार शासन नियंत्रण ठेवते आपल्या देशाच्या गरजा लक्षात घेऊन मुलांची जडणघडण व्हावी म्हणून सरकार शासन प्रयत्नशील राहते त्यामुळे तुम्ही कोणत्याही शाळेत गेला आणि जात असलातरी एकाच प्रकारची पुस्तके तुम्हाला आभयासावी लागतात पण प्रत्त्येक शाळेचे वातावरण वेगळे असते क्रमिक पुस्तके तीच असली तरी शिक्षकांकडून होणारे संस्कार वेगळेच असतात

             शाळेतून वाचण्याच्या. खेळाच्या स्पर्धा संधी मिळण्याचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे पुस्तके आणि अभ्यासक्रम एकाच प्रकारचे असले तरी काही शाळेतून मुलांना अधिक प्रमाणात संधी मिळते पुढाकार घेण्यास वाव मिळतो तर काही शाळांत औपचारिक शिक्षण तेवढे मिळते पण इतर संधी कमी प्रमाणात मिळते तेव्हा तुम्ही कोणत्या शाळेत शिकता कोणत्या माध्यमातून शिकता यावरही तुमच्यावर होणारे संस्कार अवलंबून असतात

             एकिकडे सर्वांसाठी एकाच प्रकारच्या शाळा ( सार्वजनिक शाळा‌ ) असाव्यात अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे उततमात उत्तम अशा शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड चालते लहान गावात राहणारे पालक आपल्या मुलांना शहरातील शाळेत पाठविण्याचा पर्यंत करतात

              आज शिक्षणाचा बाजार झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकून वकिल डॉ वैधानिक न्यायाधीश पोलिस. वैमानिक. असे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मंत्री नेते यांनी सुध्दा शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच घेतलें होतें आपले विचार बदलले आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पध्दतीबधदल आपले विचार बदलले आपली मुले महागातलया महाग डोनेशन असणार्या फक्त नाव मोठें असणार्या शाळेत पाठवायला सुरुवात झाली गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर बांधकाम कामगार यांच्या मुलांना बाहेरील शाळेचा खर्च झेपणारा नव्हता त्यामुळे त्यांची मुले जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेण्यासाठी झगडत आहेत तोपर्यंत शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळेत २०/पेक्षा कमी पट असणार्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आत्ता या आर्थिक दुर्बल मुलांचे काय

             सर्वात मोठा घोटाळा आज कोणता असेल तर शिक्षण व्यवस्था मोठं मोठी शाळा कॉलेज चालू करायची आणि अनुदानाची रक्कम लूटायची अनुदानित शाळांना मुलांच्या साठी राहणे कपडे जेवन इमारत खर्च असे विविध सवलतीसाठी अनुदान देण्यात येते पण मुलं शाळेत प्रवेश घेताना मोठि रक्कम डोनेशन म्हणून भरून घेतलीं जाते त्यावर शासनाचा अंकुश नाही शाळेतील फि संदर्भात एक निर्णय शासनाने घेतला पाहिजे आणि सर्व शाळेत एकच फी घेणे बंधनकारक करण्यात आले पाहिजे त्यातच बांधकाम कामगार यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे साठी तरतूद करण्यात यावी 



        आज शिक्षणाची अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

    वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन मोर्चा निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

महत्वाचा विषय

तुमच्याजवळ अनुभव समाजसेवा करण्याची इच्छा सर्वसामान्य जनता यांच्या वेगवेगळ्या शासकीय कामासाठी भटकंती करणे हे सर्व तुमचे काम कामाला व तुम्हाला पुरेसे नाही कारण तुम्ही कोणत्या पक्षाचे काम करता हे महत्वाचे आहे




वाचा-



आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=3839313865336562633164386238313236316165366464653036363733353764

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा



          संगणकीकृत सातबारा आणि फेरफार उतारा दुरुस्ती साठी आदेश राज्यातील १००) टक्के अधिकार अभिलेखाचे झाले असून या संगणकीकृत गाव न न ७/१२ चे आधारे दस्त नोंदणी केली जाते यामध्ये तलाठी यांचा मनमानी कारभार यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो यामध्ये अचूकता येण्याची गरज आहे तथापि अजून देखील संगणकीकृत ७/१२ मध्ये चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदन तक्रार अर्ज शासनाकडे जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय प्राप्त होत आहेत तसेच अनेक खातेदार ई मेल द्वारे किंवा दुरध्वनी मधून अडचणी मांडतात काही खातेदार ई हक्क प्रणाली द्वारे ७/१२ मधील दुरुस्ती ऑनलाईन अर्ज दाखल करतात तरिही त्यात तलाठी यांच्या मनमानी कारभार मुळे दुरुस्ती होत नाही अशा असंख्य तक्रारी इकडे कार्यालयात प्राप्त होत आहेत आत्ता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना १००/टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे

             संगणकीकृत ७/१२ मधील अचूकता साध्य करण्यासाठी आपण चावडी वाचन एडीट रि एडीटसह कलम १५५ चया आदेशानुसार दुरूस्ती सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांच्या वापर करून ७/१२ चे उद्दिष्ट आपण ९८/टक्के सध्या केले आहे तरीही ही अचूकता १००/टक्के साध्य करण्यासाठी तसेच ई फेरफार प्रणालीत निदर्शनास न येणार्या काही त्रुटी /चूका खातेदार निदर्शनास आणून देतील त्या चूक दुरुस्ती अर्ज स्वीकारणे आणि त्या प्रमाणे तहसिलदार यांचे कलम १५५ खालील आदेश काढून ७/१२ दुरूस्ती करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्तरावर कॅम्प घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे

    संगणकीकृत ७/१२ मधील चूका दुरुस्ती साठी प्रत्त्येक तालुक्यातील तालुका स्तरावर किंवा मंडळ स्तरावर आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजनासाठी निश्चित करण्यात येणार आहे व त्याची व्यापक प्रचार प्रसार प्रसिध्दी देण्यात यावी

      (१) हा कॅम्प चया ठिकाणी ७/१२ दुरुस्ती साठी लागणारे नवीन अर्ज स्विकारण्याची सोय जुन्या हस्तलिखित अभिलेखावरुन खात्री करणे तलाठी कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे तहसिलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावाना खात्री करून मान्यता देणे परिशिष्ट क मधील आदेश तहसिलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांचे स्वाक्षरी पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे इत्यादी कामे करण्यात येतील

     (२) संगणकीकृत ७/१२ मधील एकही चूक दुरुस्ती आत्ता तहसिलदार आदेशाशिवाय होऊ शकत नसल्याने कॅम्प साठी तहसिलदार व नायब तहसिलदार ( ई. फेरफार ) यांची उपस्थिती बंधनकारक राहील

      (३) ई हक्क प्रणालीतून आलेले सर्व ऑनलाईन अर्ज या कॅम्प मध्ये निकाली काढण्यात येतील

        (४) सदरचे सर्व कॅम्प उप विभागीय अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली पार पडतील

        (५) या कॅम्प मध्ये ओ डी सी अहवालातील विसंगती ७/१२ ची दुरुस्ती देखील करण्यात येईल तसेच शासनाच्या दिनांक ११/१/२०२१ चया निर्देशानुसार प्रमाणे गाव नमुना न ( क) मधील नोंद देखील अद्यावत करणेत येईल

     (६) हे कॅम्प दर आठवड्यात एका ठराविक दिवशी २०/ जानेवारी २०१२ ते २० मार्च २०२१ या काळात प्रत्त्येक तालुक्यात आयोजित करण्यात येतील आणि या कॅम्प चया पर्यवेक्षकासाठी जिल्हा स्तरावरून व विभागीय स्तरावरून वरिष्ठ महसूल अधिकारी यांचीही नियुक्ती करावी 

       (७) या कॅम्प फलनिष्पत्ती खालील संगणकीकृत ७/१२ मधील चूका दुरुस्ती साठी आयोजित कॅम्प अहवाल जिल्हा स्तरावर कळविणे बंधनकारक आहे

    आपण पाहतो जागेचा वाद पिढ्यान् चालत असतो घरच्या घरे बरबाद होतात काही जण जागेसाठी खून पूर्ववैमनस्यातून मारामाऱ्या असे प्रकार घडतात यातच प्रामुख्याने वेळ आणि पैसा वाया जातो हे सर्व थांबवण्यासाठी तालुका स्तरावर तहसिलदार यांना सह हिससेदार संमतीने वाटणीपत्र करण्याचा अधिकार दिला आहे आपण आपली समस्या लेखी स्वरूपात तहसिलदार कार्यालय येथे दाखल करा आणि पाठपुरावा करा

          आत्ता ७/१२ व फेरफार उतारा यात काही तलाठी व समाजातील काही लोक यांना हाताशी धरून बोगस नोंद घालणे मयताचे नावे दस्त करतात असे प्रकार घडतात ईसलापूर मधील उदाहरण म्हणजे. अशोक शिवलिंग देशमाने वय ५६ हे अशाच प्रकाराला कंटाळून व सलग दोन वर्षे तलाठी कार्यालय मध्ये हेलपाटे मारावे लागले अखेर शेवटी त्यांनी इस्लामपूर तहसिलदार कार्यालय समोर अमरण उपोषण सुरू केले सलग सात दिवस उपोषण चालले सर्व परिवार असल्या कडाक्याच्या थंडीत उपोषण करत होता परगावचे असल्यामुळे जेवन खाण्याचे सुध्दा मोठी अडचणीला सामोरे जावे लागले तरि सुध्दा वाईट वाटले की कोणताही शासनाचा अधिकारी इ कर्मचारी यांच्या भेटिला आला नाही वाईट वाटत की अधिकारी एकदा मोठा नेत्यांने नुस्ता फोन केला असतां तरी उपोषण ठिकाणी भेट दिली असती पण सर्वसामान्य व्यक्ती उपोषणाला बसला आहे काय त्याला किंमत नाही कोणीही भेटायला नाही सलग सात दिवस उपोषण करणारा व्यक्ति स्वता उठून तहसिलदार कार्यालय मध्ये साहेबाला भेटायला जातो या सारखें वाईट नाही 

         शासनाकडे माझे हात जोडून विनंती करतो की बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन हे होण्याआधी रोखा आंदोलनकर्ते यांचा मुद्दा कसा आहे समाजीक वैद्यकीय वैयक्तिक हक्कासाठी असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा ज्या विभागामुळे हि परस्थिती निर्माण झाली आहे त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उपोषण व अन्य आंदोलन वेळी होणारा जीव व वित्त हाणीचा खर्च आकारण्यात यावा असा कायदा तयार झाला पाहिजे

            वरील प्रमाणे समाजसेवा उठाव आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी समाजसेवा वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा तालुका

९८९०८२५८५९



वाचा -




शासनाचा सर्वात मोठा निर्णय

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 शासनाचा सर्वात मोठा निर्णय



       दिव्याग व्यक्ति यांना मिळाला न्याय प्रत्त्येक दिव्याग व्यक्तीला मिळणार शिधापत्रिका .

               दिव्याग व्यक्ति समाजात एक सहानुभूतीने विचार करण्याचा वर्ग आहे . तीन चाकी सायकल , पाटावरून , कुबड्या , घेऊन चालणारे . काठीच्या आधाराने , कृत्रिम अवयव , वापरुन आपली कामे करणारे . मदतीसाठी दुसर्याची वाट केवीलवाने चेहरे करून बघताना आपणास दिसतात . आधार कार्ड नोंदणी , सर्कल चौकशी , तहसिलदार कार्यालयात पेन्शन , योजना , यासाठी आॅफिस मध्ये चौकशी करणेसाठी जाता येत नाही .

                बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने वेळोवेळी निवेदने व संदेश पाठवून दिव्याग व्यक्तिच्या अडचणी मांडल्या आहेत . पण कोणत्याही कार्यालयाने याचा विचार केला नाही . त्यांना अधिकारी व कर्मचारी यांना भेटण्यास जाता येत नाही . तर प्रत्त्येक दिव्याग कल्याणकारी आॅफिस मध्ये , दिव्याग सहाय्यता करणेसाठी एक एक कर्मचारी नेमण्यात यावेत .

             शासनाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून व सर्वे करून दिव्याग लोकांना काही काम धंदा करता येत नाही . म्हणून त्यांचा अन्न , धान्य याचा प्रश्न सुटावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडून वेळोवेळी म्हणजे .

         दि. ५-११-१९९९

         दि. ८-८-२००१

        दि . २५-५-२००५

        दि . २९ जून २०१३

        दि. १७ डिसेंबर २०१३

        दि .२१ डिसेंबर २०२०


          अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ नुसार ग्रामीण भागात (४ लाख ६ हजार ९७१ ) शहरातील लोकांच्या साठी (२ लाख ३०हजार ४५ ) अशी एकूण (७ लाख १६ ) लाभार्थी संख्या निश्चित केली आहे . अंत्योदय योजना, बीपीएल , सर्व दिव्याग व्यक्तिचा समावेश करणेसाठी १ फेब्रुवारी २०१४ नुसार सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत .

             अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार अन्न धान्य याचा लाभ मिळवण्यासाठी ज्या दिव्याग व्यक्तिंना रेशनकार्ड हवे आहे . अशा सर्व दिव्याग बांधवांनी संबंधित कार्यालयात नवीन रेशनकार्ड मिळणे साठी अर्ज करावा .दिव्याग व्यक्ति कडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे पात्र दिव्याग व्यक्तिंना नवीन शिधापत्रिका वितरण करण्यात यावे , व त्यांच्या समावेश प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेत त्वरित करण्यात यावा अशी तरतूद शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे .

             तरी सर्व दिव्याग बांधवांनी आपल्या जवळच्या तहसिलदार कार्यालय येथील पुरवठा विभागासी आजच संपर्क साधावा . काही अडचण आल्यास खालील नंबरवर फोन करा .


    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ,

  संस्थापक अध्यक्ष :- अहमद नबीलाल मुंडे .



    रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा.

    रेशन कृती समिती सांगली जिल्हा

    मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा .

    माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा.

९८९०८२५८५९


प्रचार व प्रसार समाजसेवा जनप्रबोधन ,वाचन ,लेखन संबोधन, प्रबोधन, आणि नेतृत्व करणेसाठी आपल्या गावात तालुका , जिल्हा , राज्य , येथून पदाधिकारी नेमणे आहे .

   तरी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड झेरॉक्स , एक फोटो व कागदपत्रांच्या माहीती व आमचें कामा संदर्भात माहिती घेणे साठी वरिल फोन नंबर वर फोन करून संपर्क साधावा .





वाचा -

कायदा माझ्या भारतीय घटनेचा -

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI...

नवनाथ खेडकर यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर....!

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 नवनाथ खेडकर यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर....!

 



शेवगाव प्रतिनिधी 

अक्षय केदार


शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील रहिवासी असलेले तसेच डोंगराळ पट्यात राहून देखील सर्व सामान्यांची जाण ठेवणारे गोर गरीब जनतेच्या सुखदु:खात नेहमी सहभागी होऊन सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणारे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ खेडकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच जय भगवान युवा प्रतिष्ठाण दैत्यनांदूर यांचे तर्फे देण्यात येणारा समाज रत्न पुरस्कार नवनाथ खेडकर यांना जाहीर करण्यात आला असून सदर पुरकाराचे वितरण दि. १५ फेब्रुवारी रोजी दैत्यनांदूर येथील भाऊ बाबा मंदिरासमोर होणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी ह.भ.प. रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी तसेच शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत डेरे, एसपी ऑफिस मधील संजूबाबा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी नवनाथ खेडकर यांना प्रतिष्ठान च्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे वरील मान्यवरांच्या शुभहस्ते नवनाथ खेडकर यांना हा हा पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे. खेडकर यांचे गेल्या तीन-चार वर्षापासून चालू असलेल्या सामाजिक कार्याची दखल दैत्य नांदूर येथील जय भगवान युवा प्रतिष्ठान घेतली असून जय भगवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ दहिफळे यांनी नुकतीच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध संस्था तसेच मित्रमंडळी व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

वाचा-

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI


अनाथाचा नाथ अजिनाथ -Shevgaon

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

  



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार


पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर हे गाव या गावामध्ये अजिनाथ दहिफळे नावाचा तरुण गेली पाच वर्षांपासून आपल्या गावातील  समाज्याची जान आसनार्या थोर व्यक्तिच्या मदतीने पाथर्डी शेवगाव तालुक्यातील अनाथ  व निराधार मुलांना शिक्षणासाठी अधार देत आहे...त्यांना दत्तक घेत आहे...

आत्तापर्यंत जवळपास पाथर्डी शेवगाव तालुक्यातील तीस मुलांना त्याने प्राथमिक शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे...व कित्येक निराधार मुलांना शालेय साहित्याची मदत करुन त्यांना शिक्षणासाठी अधार दिला आहे..

खरच त्यांचे कार्य  कौतुकास्पद आहे ..काल आव्हाने येथील दोन अनाथ निराधार मुलांना  त्यांनी पुर्ण शालेय साहित्य भेट दिले तीन वर्षांपासून ते या अनाथ व निराधार मुलांना न विसरता शालेय साहित्य आणुन देतात खरच त्यांचे कार्य कौतुकास्पद आसल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गरड सर बोलताना म्हणाले..

फक्त अनाथ निराधार मुलांना शिक्षणासाठी मदतच नाही तर  आपल्या गावातील होतकरू व हुशार पन्नास हुन अधिक मुलांचे गेली चार वर्षापासून रोज आपली सर्व कामे सोडुन चार-पाच तास मोफत क्लास घेत आहेत...गावातील आठ दहा लहान मुले तर अक्षरशा रात्री झोपण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरी असतात. नक्कीच गावातील मुलांना आधिकारी बनविण्याचे स्वप्न त्यानी मनाशी ठरविले आहे..हे कार्य करण्यासाठी वेळोवेळी गावातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळते म्हणूनच हे कार्य मला शक्य आहे ते म्हणाले.व लवकरच आपन आपल्या गावामधे अनाथ व निराधार मुलांसाठी अनाथालयाची सुरवात करनार आहोत आसे ते म्हणाले..

  कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या