Showing posts with label WORKER. Show all posts
Showing posts with label WORKER. Show all posts

कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा.


कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा. 
अबब एवढ कामगार आलें कुठुन ? 

      असंघटित बांधकाम कामगार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार व महिला व मुल यांचेसाठी विविध कल्याणकारी १९ योजना राबविण्यात येतात त्यासाठी बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर दाखला देणे अनिवार्य आहे. कामगार व अधिकारी समोरा समोर अशी नोंदणी पध्दती असताना शासनाकडून बोगस कामगार नोंदणी बंद व्हावी यासाठी आॅनलाइन पध्दतीने बांधकाम कामगार नोंदणी केली जात आहे. त्यात सुध्दा कामगार कल्याण मंडळांची अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी पडत आहे त्यामुळे खराखुरा कामगार नोंदणी प्रक्रिया पासून वंचित राहत आहे. आत्ता विचार करण्याची गरज आहे की रोजच्या रोज हजारो बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने होत आहे. मग एवढे बांधकाम कामगार एका जिल्ह्यात आहेत का ? एवढी बांधकाम साईट चालू आहे का ? महिला बांधकाम कामगार कामावर दिसत नाही मग परवाचे (.२०२० ) २८३०० सुरक्षा संच पुरुष कामगारापेक्षा महिलांना जास्त वाटप झाले ते कसे ? मग त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती ? त्या बांधकाम कामगार नोंदणीसाठी बांधकाम कामगार प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर आहेत त्यांच्या कामावर ऐवढे कामगार आहेत का ? प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर यांना बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारा दाखला ९० दिवस काम केल्याचे देणे अनिवार्य आहे त्या इंजिनिअर यांना कामगार पगार पत्रक जोडणे अनिवार्य करा ? पगार पत्रक नसेल तर इंजिनिअर यांनी शपथ पत्र देणे बंधनकारक करा ? इंजिनिअर कामगारांचा पगार चेक वर देत असेल तर बॅंक तपशील नोंदणी दाखला देताना देणे अनिवार्य करा ? वरील सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे असा आदेश जारी करण्यात यावा यामुळे बोगस कामगार नोंदणी होणार नाही. कारणं खरोखरच कामगार असेल त्यालाच इंजिनिअर दाखला देणारं. बोगसगिरी होणे याला कारणीभूत आहे तो म्हणजे इंजिनिअर 

              २०११ या सांगली जिल्हा कामगार सर्वे नुसार. सांगली जिल्ह्यात. ३३.२/ टक्के कामगारांची नोद आहे. म्हणजे त्या जिल्ह्यात. शासकीय. राजकीय. विविध आस्थापनात काम करणारे अधिकारी व कर्मचारी. कोण आहे कां नाही ? दुकानदार रेशन दुकानदार. व अन्य विविध स्तरांतील लोक काही आहेत का नाही ? अंतिम २०११ सर्वे नुसार महाराष्ट्रात ४४.८/ टक्के असंघटित कामगार आकडेवारी आहे 

          २०१७ चे शासन निर्णयानुसार. व आम्ही केलेल्या कामगार सर्वे नुसार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्या सर्वे नुसार. ४ लाख २९ हजार १५५ एवढे बांधकाम कामगार आहेत असं मंडळाकडून सांगितले आहे. आणि बांधकाम कामगार यांना विविध १९ योजनांसाठी. १२७.७१.८०.१२५ एवढी लाभार्थी कामगारांना आर्थिक लाभ देण्यात आला होता. म्हणजे आत्ता जिल्ह्याची लोकसंख्या किती आणि बांधकाम कामगार किती याच गणित करा आणि उत्तर शोधा वेड लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यातील बांधकाम कामगार नसताना सुद्धा मंडळाकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी आलेला आर्थिक व वस्तू स्वरूपातील मदत बोगस कामगार नोंदणी करून लुठली याला कारणीभूत आहे तो म्हणजे इंजिनिअर कारणं बांधकाम कामगार आहे हे कुणी सिध्द केल. वरील सर्व विभागवार राज्यातील बांधकाम कामगार नोंदणी. जर ५.७५६२८ असा प्रसारीत करण्यात आला आहे. मग आत्ता आपल्या जिल्ह्यात किती बांधकाम कामगार असतील. २०१६/२०१७ पर्यंत. पुणे विभागात २३९३८ आणि २०११/पासून २०१७ पर्यंत १ लाख ७५ हजार ३२० एवढी बांधकाम कामगार नोंदणी दर्शवली आहे. म्हणजे सगळ कामगारच आहेत का ? आपल्या जिल्ह्यात. एवढ कामगार आल कुठून ? मुंबई उपनगर कामगार संख्या. ९५.८/टक्के

    पालघर ठाणे. ८०.१/टक्के

     पुणे ६५.३/ टक्के

     अलिबाग रायगड. ५९.८/ टक्के

     सातारा. ३१.९/टक्के

      रत्नागिरी. ३४.६/ टक्के

       सिंधुदुर्ग ३७.७/टक्के

      कोल्हापूर. ४२.१/ टक्के

       सोलापूर. ३३.३/टक्के

        उस्मानाबाद. २०.३/ टक्के

 ‌‌. लातूर. २६.८/ टक्के

          नांदेड. २५.७/ टक्के

          परभणी. २३.९/ टक्के

          जालना. २०.९/टक्के

         औरंगाबाद. ३७.८/टक्के

         नाशिक. ३६.५/ टक्के

         धुळे. २६.४/ टक्के

         नंदुरबार. १६.१/ टक्के

         जळगाव. २७.०/ टक्के

        बुलढाणा. १७.८/ टक्के

        वाशीम १५.२/ टक्के

        हिंगोली. १६.३/ टक्के

        अकोला. ३१.३/ टक्के

        अमरावती. २८.२/ टक्के

       यवतमाळ. १९.५/ टक्के

        वर्धा. २९.५/ टक्के

         चंद्रपूर. ३२.३/टक्के

          नागपूर ६३.५/ टक्के

           गडचिरोली १७.१/ टक्के

           गोंदिया. २४.८/ टक्के

           भंडारा. २४.३/ टक्के

          सांगली ३३.३/ टक्के

            हि २०११ ची कामगार संख्या महिला व पुरुष यांची आहे आज हीच बांधकाम कामगार नोंदणी पाचपटीत वाढली आहे. त्याला कोण जबाबदार आहे. आजच आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या काढा आणि कामगार नोंदणी काढा म्हणजे तुम्हाला फरक कळेल 

     २०१६ मध्ये. मुंबई कोकण विभाग. पुणे. नाशिक. नागपूर. औरंगाबाद. या विभागातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई २०१६ पर्यंत एकूण नोदीत आस्थापना. ७५३० आहेत मग प्रत्येक जिल्ह्यात विविध कामगार नोंदणी असथापना कोणत्या बेसवर. बांधकाम कामगार नोंदणी करतात हे सर्व जण सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून सर्व आपली कामे करतात का ? 

                      आज बांधकाम कामगार नोंदणी होताना. परराज्यातून कामासाठी येणारे. युपी बिहार राजस्थान आणि विविध परराज्यातून येणार्या बांधकाम कामगारांची कागदपत्रे अपुरी असल्याने नोद होत नाही आपल्यातील कामगार महिला काही प्रमाणात कामांवर जातात मग एवढे बांधकाम कामगार आले कोठुन. म्हणजे. नोंदणी साठी लागणारे दाखले देणारे. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे बोगस कामगार नोंदणी होत आहे हे खरे 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बांधकाम कामगार आणि दारू?

 


बांधकाम कामगार आणि दारू

           दारू सोडा आरोग्याशी नात जोडा. निरोगी रहा विविध विनाशकारी रोगांपासून वाचा. जस आपण आज वागता तसेच उद्या आपली मुल वागणार म्हणजे बा दारुडा पोरग दारूड. अस नको. आजच विचार बदला. कारण दारू विक्री व्यवसाय करणारा कधीच दारू पित नाही म्हणून तो मालक आहे आणि आपण गुलाम झालो आहे

         बांधकाम कामगार म्हणलं की व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित मिळेल ते काम करणारा मिळेल ती मजूरि घेणारा ठेकेदार इंजिनिअर यांचा अन्याय सहन करणारा. गरिबी मुळे शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा. तो व्यक्ती म्हणजे बांधकाम कामगार होय. 

    बांधकाम कामगार.क्षेत्रात आज आपल्या लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक याच व्यवसायावर आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतात. म्हणजे. सरकारला सर्वात मोठा आर्थिक टॅक्स हा बांधकाम क्षेत्रातून ज्याला बांधकाम कामगार व्हायचे आहे त्यासाठी कोणतीही परिक्षा नाही. कोणतेही अनुभव सर्टिफिकेट लागतं नाही शिक्षणाची अट नाही त्यामुळे ६५ टक्के लोक या बांधकाम क्षेत्राकडे वळतात. ग्रामीण भागातून येणारा लोकांचा लोंढा हा शहरांत बांधकाम कामगार म्हणूनच काम करतात. त्यामुळे वाढणारी गुंडगिरी बेकायदा अवैध व्यवसाय. व्यसनी. अशा विविध कारणानें ही जनता ग्रासली आहे 

                दारु हा शब्द मधीरा. सुरा. सोमरस अशी मनमोहक नाव असणारा एक शब्द आहे. जुन्या काळात काळया कुजलेल्या गुळापासून. नवसागर. युरिया. भाबळीची साल. असे एक मिश्रण तयार केले जाते ते ठराविक दिवसासाठी कुजणयासाठी सोडले जाते त्यात साप उंदीर घुशी पाली. असे एक नाही अनेक प्राणी पाडतात आणि मरतात आणि अशा मिश्रणापासून मानवी आरोग्यास हानिकारक असणारी दारु तयार केली जाते. आणि लोक बांधकाम कामगार दिवसभर उन्हात राबून चार पैसे गाठीला बांधायचे सोडून त्याच पैशांत दारु सारखं विष विकत घेतात किती वाईट आहे बघा. बांधकाम कामगार दारुच्या अधिन झाले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारूच्या नशेत असणारे बांधकाम कामगार मी बघितले आहेत. यात बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इंजिनिअर. यांना कामगारांची गरज असेल तर सकाळी त्याला दारू पिण्यासाठी पैसे देऊन नंतरचं कामांवर न्यावे लागते. बांधकाम कामगार यांचे असे मत आहे की दिवसभर कामांचा कंटाळा घालविण्यासाठी आम्ही दारू पितो. काहीजण म्हणतात आम्हाला लय टेन्शन आहे म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण मुल ऐकत नाहीत म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण कर्जबाजारी पणामुळे दारू पितात. काहीजण बायकोच्या त्रासामुळे किंवा बेजबाबदार वागण्यामुळे दारू पितात. तर काहीजणांन खास चैनी करायची म्हणून पीतात. अशी एक नाही अनेक कारणे लोक सांगतात पण हा सर्व खेळ आहे ते आपल्या मित्रांची कुटुंबाची. फसवणूक करत नाहीत तर ते सवताची फसवणूक करत असतात. 

              काॅंकरेट.गॅंग म्हणजे येथे एक ठेकेदार असतो. रोज सकाळी दारूच्या अड्ड्यावर असणारे बांधकाम कामगार गोळा करून त्यांना दारू पाजून कामांवर नेतात आणि काम झाल्यावर ठरविल्याप्रमाणे पगार न देता घालविले जाते. या अशा कामांवर जाणारे बांधकाम कामगार यांची नोंदणी पोलिस स्टेशनला करणे आवश्यक आहे पण कोणीही करत नाही. त्यांचा इनसुरनस करणे गरजेचे आहे पण कोणीही करत नाही. याचयामगचे कारणं सांगितलें जाते ते म्हणजे हे कामगार परगावचे आहेत आमच्याकडे काय कायम आहेत का ? मग यांच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. असे मत या ठेकेदार लोकांचे असते. यामध्ये अंगावर पैसे देण्याचे नविन खुळ आल आहे कारणं या कामगारांना दारूचं व्यसन आणि दुसरें कोणतेही काम येत नाही मग एखाद्या ठेकेदार यांचेकडून अंगावर पैसे घ्यायचे. मग काय या कामगारांचा दारुचा खर्च आणि पगार कमी यामुळे या बांधकाम कामगार याचे अंगावर असणारे पैसे कसे फिटणार मग त्या कामगारांचे मरेपर्यंत हेच काम करायचे. पैशासाठी कामगारांना माराहाण. बांधून मारणे. शिविगाळ. रात्री अपरात्री घराकडे जाणे. दम देणें जीवे मारण्याची धमकी. पोलिस स्टेशनला गेला तर जीवे मारण्याची धमकी. . त्यांच्या बायकांवर वाईट नजर तुझ्या नवरयाने अंगावर पैसे घेतले आहेत ते तुला फेडावे लागतिल नाहितर या महिलांच्या कडे शरिरसुखाची मागणी करणारे नराधम याच धंद्यात आहेत. कामगाराच दारूडा नाही हे ठेकेदार सुध्दा दारु पितात पण ते बार मध्ये. महागडी दारु पितात यासाठी येणारा पैसा हा बांधकाम कामगार यांच्या घामातून येतो.कामावर काम चालू असताना काही अपघात झाल्यास.दुखापत झाल्यास त्यासाठी येणारा औषधांचा खर्च व जोपर्यंत तो बांधकाम कामगार काम करू शकत नाही तोपर्यंत त्याचा पगार. ज्या ठेकेदार कंत्राटदार यांनी कामाला घेऊन जाणारया वर आहे. पण आज कोणीही बांधकाराला ओळख सुद्धा देत नाही आजचं निर्णय करा आणि ज्यांच्याकडे कामाला जाताय तेथे असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ पोलिस स्टेशनला तक्रार करा. फक्त दारू पिऊ नका क्रांकरेट कामांवर जाणारे बांधकाम कामगार हे काम करत असताना बरेच कामगाराचा कामांवर मृत्यू झाला आहे अशी बरिच प्रकारणे आहेत. पण आजपर्यंत या बांधकाम कामगार यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार केली नाही का ? मला कळत नाही. बांधकाम कामगार यांच्या नशिबाला हे सर्व येते ते म्हणजे फक्त आणि फक्त दारूमुळे

                दारूचे व्यसन असणा-या व्यक्तीला समाजात किंमत नाही मुलबाळ पत्नी सगेसोयरे यांच्यात किंमत नाही. कारणं रोज संध्याकाळी घराकडे दारू पिऊन येणारे रस्त्याला पडत पडतं येताना आपण बघतो. आणि म्हणतो आज काय पगार झालाय वाटत ? आज काय बाजार आहे वाटतं ? मग त्या घरातील महिलांना व मुलांना एकादा माणूस सांगतं येतो की तुमचा माणूस अमुक ठिकाणी दारू पिऊन पडला आहे काय वाटतं असलं त्या जीवाला. उसने पैसे घेऊन. कर्ज काढून. घरातील भांडी कुंडी विकून. चोरी करून संडास धुवून. कष्टाची कामे करून. साफसफाई करून. वेळ पडल्यास घरातील बायको मुलं कामाला ठेवून स्वता. दारु पिणारे. असं एक नाही अनेक प्रकारची कामे करून दारू पिणारे मी बघितले आहेत. आणि याचं प्रमाण जास्त आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांत वाईट आहे 

            आज शासनाकडून देशी विदेशी दारूला लाईसनस देवून विक्री करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे शासन सुध्दा पूर्ण दारूबंदी कायदा अंमलात आणत नाही. काही ठिकाणी उलटी बाटली अशी महिला आंदोलन झाली पण त्याला सुद्धा जोर लागला नाही. त्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात राजकारण आल आणि अशी आंदोलने करणार्या महिला राजकारणात गेल्या आणि आंदोलन मोर्चा हे सर्व शांत झालयं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी १९ कामगार महिलांना मुलांना जशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मंडळाकडून व्यसनमुक्ती उपचारासाठी योजना आहे पण आज कोणताही बांधकाम कामगार या योजनेकडे वळत नाही आणि वळलेला नाही. म्हणजे मंडळांचा बांधकाम कामगार यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी असणा-या प्रयत्न फोल ठरला आहे. मंडळाने सर्वांचे चेक अप करण्याची गरज आहे किंवा मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा दाखला अनिवार्य करण्यात यावा कारणं आत्ता अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत बांधकाम कामगार यांच्या विविध टेस्ट करण्याच्या मागच कारणं आहे ते म्हणजे बांधकाम कामगार दारू पितो का? जर एखाद्या कामांवर बांधकाम कामगार याचा काही अपघात झाला तर अभियान मध्ये करण्यात आलेल्या विविध टेस्ट मध्ये अल्कोहोल चे सुध्दा टेस्ट होते त्यामुळे मंडळाकडून बांधकाम कामगार कामावर असताना अपघातात मृत्यू झाल्यास असणारा पाच लाख रुपये इतकी शासनाची त्यांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम मिळणारं नाही म्हणजे दारू किती वाईट आहे बघा ? महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र ही योजना शासनाने अंमलात आणली होती पण त्याचा सुध्दा काही उपयोग झाला नाही. 

            आजचं दारू सोडा आरोग्याशी नातं जोडा. निरोगी रहा कारणं दारु म्हणजे गुलामगिरी. 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गुलाम. मजूर. कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

गुलाम. मजूर. कामगार



                 शब्द एक सारखे असले तरी यांचा अर्थ भयानक व अंगावर काटा आणणारा आहे याचे वर्गीकरण आर्थिक परिस्थिती नुसार श्रीमंत. गरिब. असे ढोबळ वर्गीकरण तर आहेच परंतु त्यातही वयसायपरतवे. शेतकरी. शेतमजूर कुशल. अकुशल कामगार अशी वर्गवारी देखील आहे. शहरी व ग्रामीण. सुशिक्षित. अशिक्षित. असा भेद देखील अनेक वेळा महत्वाचा असतो महिला पुरुष उच्च कनिष्ठ दर्जा देण्याची वृत्ती आपल्या विचारात खोलवर धृढ झालेली आहे यांच्या जोडीला प्रादेशिक. अहंकार आणि राजकीय मतभेद आहेतच थोडक्यात म्हणजे सामाजिक. आर्थिक. सांस्कृतिक. व राजकीय. अंगानी आपण व आपला समाज विभागलेला आहे या विभागलेल्या सर्व गटाचे सर्व व्यक्तिचे रास्त न्याय. आणि लोकशाही हितसंबंध. जपत जपत अंतिम आपल्याला स्वातंत्र्य. समता. बंधुता. व सामाजिक न्याय. यावर आधारलेला एकात्मिक राजकीय समाज निर्माण करावयाचा आहे वरिल प्रकारचया सर्व मतभेदाचा विचार न करता आपण सर्वांनी समाजांचे पाईक म्हणून माणसाला. माणूस म्हणून कसे जगता व जगविता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे

                 गुलाम हा शब्द आपण स्वातंत्र्य मिळायच्या आधी मोगल गुलामगिरीत होतो. २५० वर्ष. आणि नंतर ब्रिटिश कालखंडात १५० वर्षे. भोगली आहेतः माणसाला गुलाम म्हणून वागविले जाण्याचा प्रसंग देखील आपल्याला थक्क करून सोडणारा आहे जनावरांचा बाजार भरावा तसा त्यावेळी मजूर विक्री साठी बाजार भरत असत माणसाची बोली लावली जात असे तब्येत चांगली असणारे गुलाम शेतात काम करण्यासाठी घरात घरकाम करण्यासाठी. जनावरें गुरे चारणे. तेलाचे घाणे ओढणे बैलाप्रमाणे काम शेणघाण काढणे संडास साफ करणे. करण्यासाठी असे गुलाम विकत घेतले जात होते अनेक अशी कामे होती की आपण त्याचा विचार सुध्दा करू शकत नाही हि वेळ आपल्यावर आली ती आपल्या फुटिरतेचया भावनेमुळे आपणच या सर्वाला जबाबदार आहोत बराच काळ लोटला आणि बर्याच परीश्रमा आपल्या देशहिताचा विचार करणार्या लोकांच्या. तन मन धन याचाच नाही तर आपल्या संसाराची होळी केली आणि एकवेळ आपण स्वातंत्र्य दिनाच्या नावाने मोकळा श्वास घेतला तोपर्यंत गुलामगिरीत असणारे लोक त्यांना गुलामगिरीतून मुक्ति मिळाली

            गुलाम या नावाला नवीन कापड बदलाव तसं मजूर हे नवीन नाव मिळाले त्यावेळी बांधकाम क्षेत्र आत्ता एवढे व्यापक नव्हतं लोक ज्यांच्याकडे शेती जादा आहे गावात जो इतरांपेक्षा मोठा आहे त्यांच्यात सर्व कुटुंब आपली व आपल्या कुटुंबाची दोन वेळचे जेवण कसंबसं मिळावं म्हणून काम करण्यास जात होते खेडेगावात लोकसंख्या वाढत निघाली काम करणारे जास्त झाले काम कमी पडायला सुरुवात झाली स्वातंत्र्य मिळाले आणि काही वर्षांत ग्रामपंचायत राजची स्थापना झाली मग सरपंच उपसरपंच सदस्य टीम तयार झाली शासनाने लोकांची परस्थिती बिकट आहे हे ध्यानात घेवून महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना. ग्रामीण भागातील लोकांना संजीवनी म्हणून चालू करून दिली यात कोंबडी पालन शेळी मेंढी पालन. रोपवाटीका. जनावरांचे गोठे बांधकाम. गोबरगॅस बांधणे. अशी विविध कामे लोकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम करत होते रोजगार हमी योजना धर्तीवर जाॅब कार्ड. चालू करण्यात आले १५ दिवसांच्या वर रोजगार उपलब्ध नसेल तर रोजगार भत्ता म्हणून मजूरांना पगार देणे बंधनकारक करण्यात आले काळ बदलत गेला आणि शिक्षण व्यवस्था थोड्याफार प्रमाणात सुरू झाली होती शिकलेली लोक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यास समर्थ नव्हते ग्रामपंचायत राज स्थापन झाले होते सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी यांनी हि बाब शासनाच्या लक्षात आणून दिली आणि गावागावात मजूर सहकारी सोसायट्या या नावाने मजूरांना हक्काचे काम मिळणारे व्यासपीठ तयार झाले मजूर सोसायट्यांचे माध्यमातून अल्प भूधारक. मिळेल ते काम करणारे कामगार यांना शासन विना अनामत रक्कम भरता गटर समाजमंदिर पाण्याची टाकी रस्ते विकास महामंडळ कामे देणे बंधनकारक आहे पण झाले उलटेच मजूर सोसायट्या मध्ये नावासाठी फक्त मजूर हे नावच राहिले आणि नेते व त्यांचे बगलबच्चे यांनीच या सोसायटीत नावे मोठी मोठी टेंडर घेण्यास सुरुवात केली मजूर नावालाच उरला आज बघा सोसायटी मजूरांचया नावांवर पण एकही मजूर त्यात सभासद नाही दिनदयाळ मागासवर्गीय. या नावाने चालू असणार्या विविध संस्था यात खरोखर एकही वरिल प्रमाणे कोणी नाही याला कारणीभूत आहे ती आपली प्रशासन व्यवस्था हे सर्व वेगळंच होण्यास सुरुवात झाली मग मजूर नाव जरा व किळसवाणे वाटायला लागलं आणि मग एक वेगळ अस नाव आलं ते म्हणजे सुशिक्षित कामगार असं



                बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आणि शासनाला मदत करील असा बांधकाम व्यावसायाने भरारी घेतली लोकांच्या हाताला भरपूर काम उपलब्ध झाले यामुळे गौण खनिज उत्खनन यात सुध्दा मोठी उलथापालथ झाली नद्या डोंगर यावर भस्मासूर राक्षसा प्रमाणे मोठ्या मोठ्या मशिनरी बसल्या डोंगर सपाट झाले नद्यांमधील वाळू उपसत उपसत माती सुध्दा यांनी उपसली विट भट्टी नदी कडची माती काढून नदी गावा पर्यंत आली आणि दरवर्षी महापूर नुकसान होण्यास सुरुवात झाली याला आपण जबाबदार आहोत

          कामगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन एप्रिल. १९२१ मध्ये मुंबईत पहिलें कामगार कार्यालय स्थापन झाले त्याची व्याप्ती पाच विभागांत करण्यात आली यावर अधिकार व कामगार कायदे कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांना आपले हक्क समजण्यासाठी ८/३/२००० रोजी नागरि सनद तयार करण्यात आली त्यानुसार समान वेतन किमान वेतन सुरक्षा कायदा विमा संरक्षण अशा २७ कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या त्यासाठी १८/६०/ वयोगटातील व्यक्तींना अंशदान रक्कम भरून नोंदणी साठी हक्क देणेत आला कामगार संख्या वाढली आणि बांधकाम विभागासी कोणताही संबंध नसलेले लोक बांधकाम कामगार संघटना नावांची दुकाने निर्माण झाली कामगार नोंदणी नावाखाली कामगार लूट सुरू झाली सायकली वर असणारे कामगार संघटना स्थापन करून अगदी थोड्या दिवसात लाखोंचे मालक झाले याला कामगार नोंदणी आॅफिस मधील अधिकार व कर्मचारी हे सुद्धा या कामगार हितचिंतक लोकांना सामिल आहेत कामगारांना विविध योजना मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक आर्थिक लूट चालूच आहे 

             याचाच अर्थ असा होतो की गुलाम या शब्दाचा अजून कामगारावरील शाप गेला नाही पोटासाठी राबणारा गुलामच होता आणि अजून आहे गरिब. गरजू. व्यसनी. अडाणी. आहे म्हणून सर्वांनी याला लूटायचा घाट घातला आहे का कामगारातला खासदार आमदार ग्रामपंचायत सदस्य या कोणत्याही शासकीय क्षेत्रात कामगार नाही कारण आम्हाला चालत नाही कामगार जन्माला आला कामगार म्हणून मरायचे ते निसहाय म्हणून 




       समाजसेवा व बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ....

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ..

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

AMAZING MOBILES SHOP NOW

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या