उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य
भारत संस्कृती प्रिय देश आहे विविध सणवार लग्नकार्य कार्य विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात आपण आपला जुना खेडेगावातील बाजार पाहिला असेल लहान गाव बोटांवर मोजता येतील इतकेच भाजीपाला व अन्य पदार्थ तयार व विक्री करणारे लोक हळूहळू लोकसंख्या वाढत गेली गावांचे रुपांतर शहरात झाले लोकांचे रहाणीमान व जीवनशैली बदलत गेली आणि त्याबरोबर खाण पाण यामध्ये बदल झाला
आज घरात रोज खाऊन कंटाळा आला असे म्हणणारे शहरातील विविध म्हणजे वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस वेगवेगळे ज्युस मिठाई पदार्थ. बेकरी पदार्थ. मासे. मटण. धाब्यावरचे जेवन. दारावर विकायला येणारे पदार्थ. भाजीपाला. असे अनेक विक्री करणारे आपणास चौका चौकात आपले गाडी लावून विक्री करताना आपणास दिसतात
अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडून निर्मिती व वाटपासाठी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती परंतु अन्न व उत्पादन मात्र कमी होते अशा परिस्थितीमध्ये अन्न भेसळ मोठ्याप्रमाणात वाढली यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने भेसळ प्रतिबंधक कायदा अंमलात आणला सन १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून नवीन तरतुदी करून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली या कायद्यानुसार भेसळयुक्त अन्न साठवनीची जागा विक्री करण्यासाठी वापरात येणारी स्वच्छ जागा सुरक्षा मालाचा दर्जा. निर्मिती कालावधी. अन्न तयार करताना विकताना स्वच्छ पाणी. झुरळ माश्या किटक. प्रतिबंधक उपाय केला आहे का मांस व मासे चिकन कापण्यासाठी वापरली जाणारी जागा. स्वच्छ आहे का. ? वेटर किंवा कामगार डोक्याला टोपी. कॅप हंडगलोज. मास्क. केस नखे. कापली आहेत कां ? वेटर कामगार रोजच्या रोज आंघोळ टुथ ब्रश व स्वच्छ राहतो का ? मांस मासे चिकन हे कापीव मालाचा दर्जा. ?
वरील प्रमाणे सर्व असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात येते आज कोठेही यातील कोणतीही गोष्ट पहावयास मिळत नाही. मासे विक्री करणारे रस्त्यावर बसून विक्री केली जाते मटन मार्केट असते पण त्याला जो माल विक्रीसाठी कापला जातो तेथे. स्वच्छता नाही. कामाला असणारा कामगार दाढी वाढलेली मळकट कपडे नखे वाढलेली. पाणी स्वच्छ नाही. एवढेच नाही जी बकरी कापली जातात त्यांचा दर्जा सुध्दा सुनिश्चित नसतो तरी कोणतीही कारवाई केली जात नाही
आत्ता वडापाव पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस ज्युस. चायनीज फूड आईस्क्रीम केक आंबोली उत्तापा असे विविध रोजच्या आहारात समावेश होणारे पदार्थ गाड्यांवर उघड्यावर मिळतात त्यात वापरण्यात येणारी साधनसामग्री. मसाले कोणत्या दर्जाचे आहेत माहिती नाही ? तेल विविध केमिकल वापर होताना दिसतो तेल आठ आठ दिवस बदलले जात नाही हे असे सर्वत्र राजरोसपणे सुरू आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सर्वे करणे गरजेचे आहे केंव्हा झाला होता कोणाला माहित ?
भाजीपाला फळे विक्री करणारे व उत्पादन करणारे शेतात खतांच्या नावाखाली विविध केमिकल यांचा वापर होताना दिसतो त्यामुळे या भाजीपाला व फळे यातील नैसर्गिक तत्व निघून जाते काही ठिकाणी मी पाहिले आहे की विविध रंगांची फळें आज बाजारात दिसत आहेत पिवळे कलिंगड. काळया रंगाची केळी. लाल कोबी. लवकरात लवकर विकायला यावी यासाठी फळांना इंजेक्शन दिले जाते त्यामुळे आठ दिवसांत विकायला येणारी फळे दोन दिवसांत विकण्यासाठी तयार होतात यामुळे हा भाजीपाला पिके फळे जीवनावश्यक वस्तू असलेमुळे हे आहारात समावेश झाल्याने लोकांना कॅन्सर. ह्रदय विकार. साखर. असे विविध आजार होताना आपणं पाहतो
वरील प्रमाणे सर्व व्यवसाय उघड्यावर चालतात त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याचा धोकाही संभवतो धूळ. डास विविध ठिकाणी मैला व विविध घाणीवर बसलेल्या माश्या. व अन्य जीवन घातक रोग प्रसार करणारे किटाणू. यामुळे मलेरिया हिवताप डेंग्यू. कावीळ विषबाधा. संडास उलटी. असे विविध जीव घेणे आजार होण्याचा धोकाही संभवतो
अन्न व औषध प्रशासन विभागाने या सर्व ठिकाणचा सर्वे करून वेळोवेळी तपासणी केली पाहिजे अस्वच्छता किंवा ग्राहक आरोग्यासाठी अपायकारक कोणतीही घटना वस्तू आढळल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपण ऐकतो आज अमुक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला आणि भेसळ युक्त लाखोंचा माल जप्त केला पण प्रश्न पडतो हा माल गेला कुठे ? एका बाजूने जप्त केला आणि दुसरया बाजूने विक्री करण्यासाठी त्याच दुकानात आला काय चाललंय तुमच्या आमच्या जीवाचा खेळ मांडला आहे. जिल्ह्यात एकच अन्न व औषध प्रशासन विभागांचे आॅफिस आहे मग ११ तालुक्यात हे फिरणार कधी आणि रेड करून कारवाई करणार कधी ? यावेळी प्रत्त्येक तालुक्याच्या ठिकाणी एक अन्न व औषध प्रशासन विभागाचे ऑफिस असायलाच हवे नसेल तर एखाद्या सेवाभावी संस्था युनियन यांना रितसर अधिकार व नियम व अटी या तत्वावर नेमण्यात यावे
आपण काय करायले पाहिजे आपण शक्यतो बाजारात उघड्यावर मिळणारे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. कोणताही खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडी हाॅटेल किंवा कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता किंवा बाल कामगार दिसल्यास ताबडतोब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवा कोणतीही खाद्य वस्तू खरेदी करताना निर्मिती व एकसप्रायरी डेट बघा नसेल तर वस्तू खरेदी करू नका
रेशन मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे माती खडे किड काटके पिट झालेले धान्य. असे निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य रेशन मधून सुध्दा वितरण केले जाते सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार नाही वरन येतंय आम्ही काय घरांत तयार केलयकाय अशी उद्धट उत्तरे दुकानदारांकडून मिळतात
https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d वरील सर्व भेसळयुक्त निकृष्ट. दर्जा. ओला व वाळका. रोज उपयोगात येणारा अन्न धान्य यावर शासन कारवाई करिल तेंव्हा करील आपण सतर्क होऊन आपले जीवन आपणच वाचवू शकतो
वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
कामगार नोंदणी संदर्भात
ऑनलाईन नोंदणी करताना वेबसाईट वर प्राबलेम येतं आहे त्यामुळे कामगार नोंदणी करताना कामगारांना नोंदणी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
आमचे नवीन नेमणूक झालेले विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी जिल्हा ठिकाणी असणारे सहायक कामगार आयुक्त भवन येथे निवेदन दाखल करा व ऑनलाईन नोंदणी संदर्भात अडचण मंडळाच्या निदर्शनास आणून द्या
वाचा -
तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...
आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...