Showing posts with label sarkar. Show all posts
Showing posts with label sarkar. Show all posts

सत्तेपुढे शहाणपण नाही

 


सत्तेपुढे शहाणपण नाही 

       ‌‌. साम दाम दंड भेद हे समिकरण आपणांस माहीत आहे पण हे ज्यांच्याकडे असतें ते सत्तेत असायला हवे. जिथे पैसा आहे तिथे बुध्दी नाही. जिथे बुध्दी आहे तिथे पैसा नाही. जिथे पैसा आणि सत्ता आहे तिथ जनसमुदाय असतोच. एकीकडे समाजप्रबोधन ऐकणारे बोलाविले तरी येथ नाहीत. सागराला पाण्याची गरज नाही. गर्भश्रीमंत लोकांना पैशांची गरज नाही. तरी सुध्दा निसर्गनियम आहे जिथे आहे तिथेच जात कारणं त्याला आहे सत्ता. निसर्गनियम आहे डबरा असेल तिथेच पाणी साठते म्हणजे सत्ता माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाईल सांगता येत नाही मोकळे भुखंड. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव. मोठ मोठे कारखाने. मोठे मोठ्या पतसंस्था बॅंका. हे सर्व सत्ता असणार्या लोकांचेच आहे. गोरगरीब जातो तो फक्त कर्ज काढायला आणि व्याजात मरायला कारणं सत्ताधारी लोकांचे म्हणने असते सर्वसामान्य गोरगरीब हे किड असतात मतदान आल की हजार पाचशे मटन दारु दिली की आपण पाच वर्षांत काही विकास काम जरी नाही केल तरि आपण निवडून येणार म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब यांना मुर्ख समजल जात आणि हे कश्यामुळे फक्त आणि फक्त सत्तेमुळे 

   . आपल्या गावातील शहरातील राजकारणाची थोडी जास्त माहिती आपल्याला कळते. पण देशाच्या राजकारणाविषयी वर्तमानपत्र. नभोवाणी. दुरदरशन यांच्यामुळे वाढिव माहिती आपणास मिळते. बहुतेक वेळा अगदी जुजबी वरवरची माहिती असते. आणी तेवढ्या माहितीवर आपण खुश असतो. राजकारणाची वैशिष्ट्य. व्यक्तिमत्व. लकबी. समाजातील पत. लोकांच्या शी व्यवहार. थोडेफार व्यक्तिगत जीवन असे या वरवरचे माहीतीचे स्वरुप असते. राजकाराणातून घेण्यात येणारे निर्णय. त्यात गुंतलेले आर्थिक प्रश्न. भ्रष्टाचार. दहशतवाद. अडकलेले शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी. यांची सहसा आपणांस माहीती व जाणिव नसते. राजकीय पक्षाचे पुढारी आमदार खासदार मंत्री नेते पक्षाची निशानी याचा एक गठ्ठा मतदानासाठी चिन्हांचा होणारा वापर यांची माहिती असली तरी पक्षाचे कार्यक्रम धोरणे या गोष्टी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला माणसाला कंटाळवाण्या वाटतात म्हणजेच राजकारण व नेते याबद्दलची माहिती बहुतेक वेळा ढोबळ स्वरूपाची असते आपण या माहीतीकडे कसे अणि काय विचार करून पाहतो ? एक तर राजकारणी प्रक्रियेत निर्णय कसे घेतले जातात. त्या निर्णयाचा तपशील अहवाल यामध्ये आपणांस रस नसतो. थोडा चौकसपणा म्हणून आणि गंमत म्हणून आपण पुढारी यांच्यातील भांडणे. एकामेकावर भ्रष्टाचार आरोप. विविध घोटाळे. जातीयवाद. विकासाचा अभाव. यापुढे जाता जाता ढोबळ माहीतीच्या आधारे राजकारण. राजकीय पक्ष नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते ठरत जातात सोप्या माहितीवरून आपण राजकारण्यांची सोपी उत्तरे मनाशी तयार करतो. याच मुख्य परिणामी म्हणजे आपल्या दृष्टीने राजकारण हे मुख्यतः व्यक्तिकेंद्रित असते मग राजकारण्यांचे स्पष्टिकरण देताना आपण सहज बोलून जातो. अमुक भागाचा विकास अमुक नेत्यांमुळे झाला. या नेत्यांच्या आडमुठ्या पणामुळे हा पक्ष फुटला. अमुक नेत्यांमुळे सत्ता गेली. म्हणजे राजकारण हा आपल्या आयुष्याशी निगडीत व संलग्न असा एक गंभीर घटक आहे असे न मानता बहुतेक तो शिळोप्याच्या. गप्पांचा विषय. हास्यविनोद. यांचाच विषय माणून आपणच आपली फसवणूक करत असतो. म्हणूनच आपण आपले मित्र घरातली लोक यांच्याशी राजकारणाबद्दल फारशा पोटतिडकीने बोलत नाही पण पाहुणे. अपरिचारक यांच्याशी बोलताना राजकारणाबद्दल टिप्पणी करुन जातो. राजकारणाविषयी बोलायचे म्हणजे अफवा. भानगडी. आरोप. याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात 

          मध्यमवर्गीय लोकांचा राजकारणाविषयी दृष्टीकोन निर्थक तेची. आणि तुचछतेची एक झालर असते. आपण काहीही म्हटले तरी राजकीय पुढारी त्यांना हवे तसे तेच करणारं अशी हताश भावना त्यात असते. शिवाय पुढारी काहीही म्हणले. कोणतेही कायदे केले. कोणतेही कायदे मोडले. तरी व्हायचे तेच होणार. भ्रष्टाचार वाढणारं. महागाई वाढणार. बेरोजगारी वाढणार. गुंडगिरी. अवैध धंदे. शैक्षणिक बाजार. वैद्यकीय बाजार. दबाव वाढणार. मनमानी कारभार वाढणार. जातीयवाद म्हणजे राजकारणामुळे समाज अर्थव्यवस्था यांच्या वर विशेष म्हणजे राजकारणी लोकांवर कोणताही परिणाम होत नाही म्हणजे राजकारण ही निरथक गोष्ट आहे अशी वृत्ती बर्याच लोकांमध्ये असतें त्यांच्या जोडीला राजकीय घडामोडी आणि पुढारी यांच्या विषयी तुचछतेची भावना असते. पुढारी झालेले सर्व गुंडगिरी क्षेत्रातून असलेले. अडाणी अशिक्षित असतात. फक्त पैसा माणूस बळ यांना आपल्या वर राज्य करण्याचे लाईन्स देतो. कारणं काही न करता पैसा आणि सत्ता मिळिणयाचेसाधन म्हणजे राजकारण होय असं मत मध्यमवर्गीय लोक यांचा आवडता सिध्दांत असतो. अधिकारापेक्षा कमी अकलन शक्ति असलेला पुढारी ही प्रतिमा शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या मनात पक्की घर करून बसली आहे. पण लोकांच्या कलाने. मताने चालणारं राजकारण हेच अनेक पुढारी आमदार खासदार मंत्री यांना कमी प्रतीचे वाटतें. सामान्य माणसाला गोरगरीब जनतेला काही कळत नसताना त्याने निवडलेल्या प्रतिनिधी कारभार पाहत असल्याचे अनेकांच्या दृष्टीने राजकारणात गुणवत्ता. विश्वास हरता. राहत नाही. म्हणजेच केवळ पुढारयाचया विषयी तुचछतेची भावना नसते सामान्य माणसाच्या मतांवर चालणार्या लोकशाही राजकारणाविषयी अढी असतें. # लोकशाहीत डोकयाला महत्व नसते #. किंवा. # लोकशाहीत फक्त डोकी मोजली जातात # या प्रकारची टिका त्यातूनच येते. त्या तुलनेने अर्धशिक्षित. अशिक्षित. अशा लोकांमध्ये राजकारणाबद्दल अविश्वास असला तरी निर्थक तेची भावना कमी असते. त्यांना राजकारण शासन व्यवस्था याविषयी कुतुहल अधिक असते. आपल्या राजकीय प्रक्रियेशी स्वताला जोडून घेण्याचा प्रयत्न करतात. राजकारणाच्या वास्तव हिशेबी स्वरूपामुळे ते संपूर्ण प्रकियेला तुच्छ लेखत नाहीत. मात्र राजकारणाबद्दल त्यांची माहिती ही कमी प्रमाणात असते. त्यामुळे राजकारणाविषयी आपल्या मनात आत्मविश्वास कमी असतो आणि ते बरोबर ही आहे. 

      आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय जमाती दुर्गम प्रदेशातील रहिवासी इत्यादी त्यांच्या राजकारणाशी काही संबंध येतच नाही. आणि आला तर त्यातून कटू अनुभवच त्यांच्या वाट्याला येतो. त्यामुळे त्यांना राजकारणाविषयी माहिती अगदी पुसट असते. त्यामुळे सहसा हे गट राजकारणात मिसळलेले आपणास पहावयास मिळत नसतील. त्यामुळे असे गट आपल्या आपल्या वस्तीच्या कोंदणात राहतात देशांचे राजकारण वैगरे गोष्टी त्यांच्या दृष्टीने परकयाच आहेत. पण आत्ता हे गट राजकारणात हळूहळू ओढले जात आहेत. शासन यंत्रणेकडून येणारी बंधने दडपण आधुनिक संस्कृतीचा होत जाणारा परिचय यातून अनेक आदिवासी. जमातींनी. आपले पारंपरिक अस्तित्व गमाविल्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळे राजकारण म्हणजे परकयाची भयकारी दडपण वाटणे शक्य आहे. राजकारणाविषयी आत्मीयता न वापरण्याचे कारणं निव्वळ त्यांचे अज्ञान नसते. त्यांच्या दृष्टीने राजकारण म्हणजे बाहेरच्या त्यांच्याच हितासाठी चाललेला खटाटोप असतो. सरकार. पोलिस. अधिकारी व कर्मचारी. हा त्यांच्या राजकीय अनुभव त्यामुळे राजकारणाविषयी त्यांची दृष्टी भीतीयुक्त दुरावयाची असतें आज चालू असलेलें गलिच्छ राजकारण हे अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व जमाती इतर मागासवर्गीय जमाती यांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून चालू आहे निवडणूक आरक्षण. नोकरी आरक्षण. शिक्षण आरक्षण. शिष्यवृत्ती आरक्षण. मुस्लिम आरक्षण. मराठा आरक्षण. अशा विविध मुद्यांवर अवलंबून आहे. ज्या दिवशी जात वर्गवारी संपेल त्या दिवशी आपल्या देशातील राजकारण गजकर्ण संपेल हे खरे आहे कारणं मत मिळविण्यासाठी जाती जातीत भांडणे जातीयवाद संपेल त्यामुळे त्यावेळी नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याकडे मुद्दाच राहणार नाही. म्हणूनच आज सर्व विकास मंडळे यामधील जात वर्गवारी नष्ट करा. नोकरी शिक्षण. विविध विकासाच्या योजना यामध्ये जात आणूच नका आणि मग राजकारण खेळा त्यावेळी तुमचा पैसा माणूस बळ फसवी आश्वासने काहीच उपयोगाची राहणार नाहीत

                  आपल्या राजकारणाविषयी दृष्टीकोन अशा विविध छटा असल्या तरी एकंदर आपली राजकारणाविषयाची भावना. संशय. दुरावा. अविश्वास. यांनी युकत असते. राजकारण हा समाज व्यवस्थेचा एक भाग आहे असं आपल्या मनावर बिंबवले आहे त्यापासून आपला कांहीच फायदा होत नाही. त्यात काही गैर नाही अस कोणी माणत नाही. आपला मित्र लपवाछपवी करतोय असा आपणास संशय आला तरी आपण सहज बोलतो काय र राजकारण करताय का. ? ‌. कचेरीत कोणी काही काम करायला लागला की काय र पुढारी झालाय कां ? एकादा गोड बोलायला लागला की आपण म्हणतो यंदा काय निवडणूकीला उमेदवार होण्याचा विचार आहे का ? हे आपल्या राजकीय संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्ये मानायला काहीच हरकत नाही त्यामुळे राजकारण अस्वच्छ व्यवहार. कुटील खेळ. अस मानल तर वावगे ठरणार नाही राजकारणात सभ्य माणसांचे काही काम नसतं जणू काही राजकारणी लोकांची एक वेगळी जमातच आहे. राजकारण करणे म्हणजे कारस्थाने. लटपटी करणे. सवताचे महत्व वाढविणे. भ्रष्टाचार करणे. विविध घोटाळे करणे अमाप बेनामी संपत्ती मालमत्ता हेच राजकारणाचे एकमेव उद्दिष्ट आहे. राजकारण हा समाजविषयक निर्णय घेण्याचा मार्ग आहे. सार्वजनिक धोरणाविषयी सहमती निर्णय घेण्याचे ते एक सा़धन आहे यांवर आपलाच नव्हे तर कोणाचाच विश्वास बसत नाही 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अधिकार वीज ग्राहकांचे - ELECTRIC SUPPLY

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 अधिकार वीज ग्राहकांचे



(१) भरमसाठ बिल (२) पळणारे मिटर (३) लाईट तोडण्याची धमकी. (४) रिडींग न घेता बिल. (५) आपले अधिकार आणि हक्क 

             कोरोना काळात सर्व जनता टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली होती हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही उपासमारीची वेळ आली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी कोणतेही मिटर रिडींग घेतलें नाही कारण कोरोना प्रसार यामुळे डिसेंबर संपेपर्यंत कोणतेही विज रिडींग घेण्यात आले नाही सर्व पक्ष सामाजिक संघटना नेते. विविध तत्वज्ञानी यांनी जनतेला वेगळच स्वप्न दाखविले आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला लाईट बील भराव लागणार नाही म्हणून बंद आंदोलन मोर्चा निवेदन जागोजागी चर्चा सुरू केल्या पण खरे सांगितले नाही हे सर्व करण्यापेक्षा लाईट बील आणि सर्वसामान्य जनता यांचे हक्क आणि अधिकार समजावून सांगायची गरज होती आपल लाईट बील एका महिना थांबले तर विज कंपनीचा कर्मचारी येतो आणि लाईट तोडतो पण अशा काही कंपन्या आहेत असे काही कारखाने आहेत एम आय डी सी मध्ये छोटे मोठे उद्योग यांच विज बिल हजारात नव्हे तर लाखांत बाकी आहे त्यांच्यासाठी विज तोडण्याचा कायदा आहे का नाही विचार करण्याची गरज आहे

         (१) ग्राहकाने अर्ज केल्यापासून ७ दिवसांच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसांच्या आत विद्युत वितरण कंपनी ग्राहकांच्या जागेचे निरिक्षण करणे बंधनकारक आहे तसेच विज जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ वया दिवसांपर्यंत तर ग्रामीण भागात २० वया दिवसांपर्यंत कळविला पाहिजे

(२) विधुत जोडणी अर्ज व योग्य ते नियमानुसार शुल्क भरल्यानंतर ग्राहकाला कमाल १ महिन्यांच्या आत विज सुरु करून देणे हि जबाबदारी विधुत वितरण कंपनीला बंधनकारक आहे

(३) विधुत वितरण कंपनीकडून प्रत्त्येक दोन महिन्याला एकदा तरी विधुत मिटरची तपासणी नोंद घेतली गेली पाहिजे कृषी मिटर साठी तीन महिन्यांतून एकदा

(४) घरगुती व शेतकरी ग्राहकांना बील सोपविलयाची तारीख व दंडाशिवाय बील भरण्याची तारीख यामध्ये किमान २१ दिवसांचा अवकाश असला पाहिजे इतर ग्राहकांना हा अवकाश १५ दिवसांचा कालावधी असला पाहिजे

(५) विधुत मिटर जर वेगाने फिरत असेलतर किंवा त्यात काही बिघाड आल्यास सदर मिटर विधुत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरुन तपासून घेणें ग्राहाकाचा अधिकार आहे जर मिटर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे हि विधुत वितरण कंपनीची जबाबदारी आहे ग्राहकांच्या मागणीनुसार विधुत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ञ यंत्रणांकडून हि करता येईल याची माहिती विधुत कंपनीकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे हा ग्राहकांचा हक्क आहे

(६) विधुत मिटर जळालयाची तक्रार ग्राहकाने विधुत वितरण कंपनीला केल्यानंतर शहरी भागात २४ तासांच्या आत व ग्रामीण भागात ४८ तासांच्या आत नवीन मिटर बसवून विधुत पुरवठा पूर्ववत करणे कंपनीची जबाबदारी आहे

(७) नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकाला एखाद्या महिन्यात अचानक मोठ्या रकमेचे बील येते ग्राहक विज वितरण कंपनीकडे तक्रार करायला गेल्यास अगोदर बील भरा नंतर तक्रार करा अन्यथा विज पुरवठा खंडित केला जाईल असे सांगितले जाते विधुत कंपनीकडून असा दिलेला सल्ला दिशाभूल करणारा असतो



(८) नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास जर अचानक मोठे व वाढीव बील आल्यास असे वाढीव व मोठे बील भरण्याची सक्ती करता येते नाही अशा परिस्थितीत विधुत अधिनियम. ( २००३ चया कलम ५६ उपकलम. १ नुसार ग्राहकाला परिस्थितीनुसार निषेध नोंदवून बील भरण्याची तरतूद आहे. )

(९) अचानक आलेले वाढीव व मोठें विज बील भरणयापेक्षा मागील सहा महिन्यांतील बीलाची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते याला निषेध बील किंवा पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात असे बील भरुन घेतल्यानंतर विधुत वितरण कंपनीस विज पुरवठा खंडित करता येत नाही

(१०) समजा उचीत मुदतीत ग्राहकानी बील भरले नसेल तरी अचानक विधुत पुरवठा खंडित करणे हि कंपनीची हूकूमशाही कृती ठरते बील न भरल्यास ग्राहकाचा विधुत पुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकाला १५ दिवस अगोदर लेखी नोटीस बजावण्यात आली पाहिजे बील भरले नाही म्हणून किंवा ग्राहक थकबाकीदार झाला म्हणून अचानक नोटीस न देता विधुत पुरवठा खंडित करता येणार नाही

(१२) विधुत कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरी भागात ४ तासांपेक्षा अधिक काळ व ग्रामीण भागात २४! तासांपेक्षा अधिक काळ विधुत पुरवठा खंडित ठेवला तर पिडीत ग्राहक विधुत कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो

(१३)!विधुत ग्राहकाचे ग्राराहाणे व तक्रार निवारण मंच कायद्यातील तरतुदी प्रमाणे प्रत्त्येक मंडल क्षेत्रात स्थापना केलेली असते स्थानिक पातळीवर समाधान न झाल्यास विधुत ग्राहक तक्रार निवारण मंचा मध्ये तक्रार दाखल करू शकतात प्रत्त्येक विधुत बीलावर तक्रार निवारण मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक दिलेलाच असतो




वीज चोरीची प्रकरणे सदर ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर चालविता येणार नाहीत

(१४) मंचाचे कार्य अर्धनयायीक पध्दतीने चालते या मंचासमोर विधुत कंपनी व ग्राहक या दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या जातात तक्रार निवारण मंचा मध्ये कोणतीही फी लागतं नाही ग्राहक सवताकडून तक्रार चालवू शकतो वकीलाची गरज नाही तक्रारीचा निकाल दोन महिन्यांत देणे हे तक्रार निवारण मंचावर बंधनकारक आहे 

(१५) ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून न्याय मिळाल्याने समाधान झाले नसेल तर ग्राहक किंवा ग्राहक प्रतिनिधी विधुत लोकपाल यांचेकडे विनाशुल्क तक्रार करू शकतात

(१६) विधुत कंपनीची प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी किंवा जोडणीचया ठिकाणी मिटर रिडींग किंवा इतर कामांसाठी आला असल्यास त्यास सदर प्रतिनिधींच्या गणवेशावर नाव व पद असलेली पट्टी तसेच ओळखपत्र असलेच पाहिजे ग्राहकानी मागणी करूनही सदर प्रतिनिधी नाम पट्टी किंवा ओळखपत्र दाखविण्यास असमर्थ ठरल्यास ग्राहक अशा प्रत्त्येक कसूर झाल्याच्या वेळी ग्राहक विधुत कंपनीकडे तक्रार करू शकतात

जर आमच्यासी केला नाद तर लोकपालाकडे मागू दाद

तक्रार पध्दत

ग्राहकाने पहिली तक्रार स्थानिक व जिल्हा स्तरावर विधुत कार्यालयाकडे करावी १०/१५ दिवसात तक्रार निवारण वा समाधान नाही झाल्यास सदर तक्रार ग्राहक मंचाकडे करावी जर दोन महिन्यांत योग्य तो न्यायनिवाडा करणे बंधनकारक आहे जर सदर तक्रार मंचाने ग्राहकास न्याय दिला नाही तर लोकपालाकडे सदर तक्रार करून न्यायाची मागणी करू शकतो

    विधुत अधिनियम २००३ कलम ४२ (६) द्वारे आणि माविनिआ ( ग्राहक निवारण मंच आणि विधुत लोकपाल ) विनिमय २००६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विधुत लोकपाल यांचे कार्यालय मुंबई व नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास बाधित ग्राहक लोकपाल यांचेकडे न्याय निवेदन करू शकतात

पत्ता विधुत लोकपाल महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग केशव बिल्डिंग ब्रांदरा कुर्ला काॅमपलेकस बांद्रा पूर्व ४०००५५ महावितरण/ टाटा / रिलायन्स / बेस्ट विज पुरवठा विद्युत नियामक आयोगाच्या मानकांप्रमाणे महावितरण वा अन्य विज पुरवठा कंपनीने ग्राहकांना योग्य त्या मानकांप्रमाणे सेवा न पुरविलयास ग्राहकांना द्यावयाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद विज कायदा २००३ मध्ये आहे त्याप्रमाणे ग्राहकांनी नुकसान भरपाई मागावी

     सेवेचा प्रकार / पुरवठ्याची कार्यवाही मानक / ठरविलेला नियम देय नुकसान भरपाई

  (१) विद्युत जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून जागा तपासणी कालावधी ७ दिवस शहरे १० दिवस ( ग्रामीण क्षेत्र ) १०० रुपये विलंबाचा प्रति आठवडा किंवा त्यांच्या भागास

(२) विज जोडणी अर्ज प्राप्त झालेपासून ग्राहकांचे करावयाच्या खर्चा बद्दल कळविणयाचा कालावधी असलेल्या विजेच्या जाळ्यातून जोडणी देण्यास १५ दिवस नगरे / शहरे २० दिवस ग्रामीण क्षेत्र १०० रुपये विलंबाचया प्रति आठवडा किंवा त्यांच्या भागास

(३) विद्युत पुरवठा शुल्क भरल्यानंतर व पूर्ण भरलेला अर्ज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून विज पुरवठा सुरू करण्याचा कालावधी १ महिना १०० रुपये विलंबाचया प्रति आठवडा किंवा त्यांच्या भागास

(४) फयुज गेल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकास विज न मिळाल्यास ४ तास नगरे / शहर. ग्रामीण भागात. ५० रुपये विलंबाचया प्रति तासाला किंवा त्यांच्या भागास

(५) ओव्हरहेड तारात बिघाड झाल्यास सहा तास नगरे शहर ग्रामीण भागात विज पुरवठा खंडित झाल्यास प्रत्त्येक तासाला ५० रूपये विलंब चार्ज

(६) वितरण रोहित्रात बिघाड. प्रत्त्येक तासाला शहर. नगर. ग्रामीण. ५० रूपये विलंब चार्ज

(७) मिटर जळणे विद्युत पुरवठा सुरळीत करणे ग्रामीण. शहर. नगर. ४८ तासांच्या वर तासाला १०० रूपये विलंब चार्ज

(८) विज कनेक्शन तोडले व पुन्हा जोडणीसाठी थकीत बील भरल्या पासून किंवा विज कायदा ५६ उपकलम (१)! चया परंतु कालानुसार निषेध नोंदवून सरासरी मासिकं रक्कम भरल्यानंतर २४ तास ( नगर / शहर ४८ तास ) ( ग्रामीण भागात १०० रुपये विलंबाचया प्रति आठवडा किंवा त्यांच्या भागास

(९) मिटर धारक नावात बदल वर्गवारी बदल करार मागणीत मंजूर भारात बदल अर्ज केल्यापासून दुसरे बील येईपर्यंत १०९ रूपये विलंबाचया प्रति आठवडा किंवा त्यांच्या भागास

        आपणास हे सर्व माहिती असल्यास आपणांस कोणत्याही नेत्याची कुणाच्या उपकराची आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन याची गरज नाही कारणं कायदा सर्वांसाठी एकसमान आहे 

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९


वाचा -

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

सुरूंग सुरूंग सुरूंग सुरूंग Ahmed Munde...

लोकशाही आणि घराणेशाही...

लोकशाही आणि घराणेशाही...

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य



             भारत संस्कृती प्रिय देश आहे विविध सणवार लग्नकार्य कार्य विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात आपण आपला जुना खेडेगावातील बाजार पाहिला असेल लहान गाव बोटांवर मोजता येतील इतकेच भाजीपाला व अन्य पदार्थ तयार व विक्री करणारे लोक हळूहळू लोकसंख्या वाढत गेली गावांचे रुपांतर शहरात झाले लोकांचे रहाणीमान व जीवनशैली बदलत गेली आणि त्याबरोबर खाण पाण यामध्ये बदल झाल

            आज घरात रोज खाऊन कंटाळा आला असे म्हणणारे शहरातील विविध म्हणजे वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस वेगवेगळे ज्युस मिठाई पदार्थ. बेकरी पदार्थ. मासे. मटण. धाब्यावरचे जेवन. दारावर विकायला येणारे पदार्थ. भाजीपाला. असे अनेक विक्री करणारे आपणास चौका चौकात आपले गाडी लावून विक्री करताना आपणास दिसतात

           अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडून निर्मिती व वाटपासाठी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती परंतु अन्न व उत्पादन मात्र कमी होते अशा परिस्थितीमध्ये अन्न भेसळ मोठ्याप्रमाणात वाढली यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने भेसळ प्रतिबंधक कायदा अंमलात आणला सन १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून नवीन तरतुदी करून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली या कायद्यानुसार भेसळयुक्त अन्न साठवनीची जागा विक्री करण्यासाठी वापरात येणारी स्वच्छ जागा सुरक्षा मालाचा दर्जा. निर्मिती कालावधी. अन्न तयार करताना विकताना स्वच्छ पाणी. झुरळ माश्या किटक. प्रतिबंधक उपाय केला आहे का मांस व मासे चिकन कापण्यासाठी वापरली जाणारी जागा. स्वच्छ आहे का. ? वेटर किंवा कामगार डोक्याला टोपी. कॅप हंडगलोज. मास्क. केस नखे. कापली आहेत कां ? वेटर कामगार रोजच्या रोज आंघोळ टुथ ब्रश व स्वच्छ राहतो का ? मांस मासे चिकन हे कापीव मालाचा दर्जा. ? 



             वरील प्रमाणे सर्व असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात येते आज कोठेही यातील कोणतीही गोष्ट पहावयास मिळत नाही. मासे विक्री करणारे रस्त्यावर बसून विक्री केली जाते मटन मार्केट असते पण त्याला जो माल विक्रीसाठी कापला जातो तेथे. स्वच्छता नाही. कामाला असणारा कामगार दाढी वाढलेली मळकट कपडे नखे वाढलेली. पाणी स्वच्छ नाही. एवढेच नाही जी बकरी कापली जातात त्यांचा दर्जा सुध्दा सुनिश्चित नसतो तरी कोणतीही कारवाई केली जात नाही

           आत्ता वडापाव पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस ज्युस. चायनीज फूड आईस्क्रीम केक आंबोली उत्तापा असे विविध रोजच्या आहारात समावेश होणारे पदार्थ गाड्यांवर उघड्यावर मिळतात त्यात वापरण्यात येणारी साधनसामग्री. मसाले कोणत्या दर्जाचे आहेत माहिती नाही ? तेल विविध केमिकल वापर होताना दिसतो तेल आठ आठ दिवस बदलले जात नाही हे असे सर्वत्र राजरोसपणे सुरू आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सर्वे करणे गरजेचे आहे केंव्हा झाला होता कोणाला माहित ? 

          भाजीपाला फळे विक्री करणारे व उत्पादन करणारे शेतात खतांच्या नावाखाली विविध केमिकल यांचा वापर होताना दिसतो त्यामुळे या भाजीपाला व फळे यातील नैसर्गिक तत्व निघून जाते काही ठिकाणी मी पाहिले आहे की विविध रंगांची फळें आज बाजारात दिसत आहेत पिवळे कलिंगड. काळया रंगाची केळी. लाल कोबी. लवकरात लवकर विकायला यावी यासाठी फळांना इंजेक्शन दिले जाते त्यामुळे आठ दिवसांत विकायला येणारी फळे दोन दिवसांत विकण्यासाठी तयार होतात यामुळे हा भाजीपाला पिके फळे जीवनावश्यक वस्तू असलेमुळे हे आहारात समावेश झाल्याने लोकांना कॅन्सर. ह्रदय विकार. साखर. असे विविध आजार होताना आपणं पाहतो 

             वरील प्रमाणे सर्व व्यवसाय उघड्यावर चालतात त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याचा धोकाही संभवतो धूळ. डास विविध ठिकाणी मैला व विविध घाणीवर बसलेल्या माश्या. व अन्य जीवन घातक रोग प्रसार करणारे किटाणू. यामुळे मलेरिया हिवताप डेंग्यू. कावीळ विषबाधा. संडास उलटी. असे विविध जीव घेणे आजार होण्याचा धोकाही संभवतो

          अन्न व औषध प्रशासन विभागाने या सर्व ठिकाणचा सर्वे करून वेळोवेळी तपासणी केली पाहिजे अस्वच्छता किंवा ग्राहक आरोग्यासाठी अपायकारक कोणतीही घटना वस्तू आढळल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपण ऐकतो आज अमुक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला आणि भेसळ युक्त लाखोंचा माल जप्त केला पण प्रश्न पडतो हा माल गेला कुठे ? एका बाजूने जप्त केला आणि दुसरया बाजूने विक्री करण्यासाठी त्याच दुकानात आला काय चाललंय तुमच्या आमच्या जीवाचा खेळ मांडला आहे. जिल्ह्यात एकच अन्न व औषध प्रशासन विभागांचे आॅफिस आहे मग ११ तालुक्यात हे फिरणार कधी आणि रेड करून कारवाई करणार कधी ? यावेळी प्रत्त्येक तालुक्याच्या ठिकाणी एक अन्न व औषध प्रशासन विभागाचे ऑफिस असायलाच हवे नसेल तर एखाद्या सेवाभावी संस्था युनियन यांना रितसर अधिकार व नियम व अटी या तत्वावर नेमण्यात यावे 

               आपण काय करायले पाहिजे आपण शक्यतो बाजारात उघड्यावर मिळणारे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. कोणताही खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडी हाॅटेल किंवा कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता किंवा बाल कामगार दिसल्यास ताबडतोब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवा कोणतीही खाद्य वस्तू खरेदी करताना निर्मिती व एकसप्रायरी डेट बघा नसेल तर वस्तू खरेदी करू नका 

         रेशन मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे माती खडे किड काटके पिट झालेले धान्य. असे निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य रेशन मधून सुध्दा वितरण केले जाते सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार नाही वरन येतंय आम्ही काय घरांत तयार केलयकाय अशी उद्धट उत्तरे दुकानदारांकडून मिळतात 

         https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d वरील सर्व भेसळयुक्त निकृष्ट. दर्जा. ओला व वाळका. रोज उपयोगात येणारा अन्न धान्य यावर शासन कारवाई करिल तेंव्हा करील आपण सतर्क होऊन आपले जीवन आपणच वाचवू शकतो 

    वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९ 

कामगार नोंदणी संदर्भात

ऑनलाईन नोंदणी करताना वेबसाईट वर प्राबलेम येतं आहे त्यामुळे कामगार नोंदणी करताना कामगारांना नोंदणी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

आमचे नवीन नेमणूक झालेले विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी जिल्हा ठिकाणी असणारे सहायक कामगार आयुक्त भवन येथे निवेदन दाखल करा व ऑनलाईन नोंदणी संदर्भात अडचण मंडळाच्या निदर्शनास आणून द्या




वाचा - 

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

      महत्वाचे कामकाज



(१) अधिनसत कर्मचारी वर्ग मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल इ कामकाज नियंत्रण व पर्यवेक्षण

(२) ग्रामीण महसुली विभागांचे पर्यवेक्षक

(३)! महसूल अधिकारी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कर्तव्य आणि कार्य पार पाडणे

(४)! पैसा कागदपत्रे वगैरे बाबतीची मागणी संबंधित इसमाला कळविणे म ज म अ कलम १७

(५) शासकीय पैसा वसुली मागणी प्रमाणे वसुली करणे ( म ज म अ कलम १८)

(६)!शेतीचे प्रयोजनासाठी शासकीय जमीनीबाबत प्रस्ताव करणे ( म ज म अ कलम २०/३१ ) 

(७) शासकीय जमीनीवरिल झाडे आणि इतर नैसर्गिक उत्पन्न बाबत कार्यवाही ( म ज म अ कलम २३/२४/२५)

(८) सोडून दिलेल्या किंवा जप्त केलेल्या पोटविभागाची विल्हेवाट ( म ज म अ कलम ३५)

(९) जमीनीचा उपयोग एका प्रयोजनातून दुसर्या प्रयोजनात रुपांतर करणे ( म ज म अ कलम ४४)

(१०) अवैध गौण खनिज उत्खनन कारवाई करणे ( म ज म अ कलम ४८) 

(११) शासकीय भूखंडावरील अतिक्रमण पाडणयाबाबची कार्यवाही (म ज म अ कलम ५०/५१ )

(१२) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असलेल्या इसमास काढून टाकणे ( म ज म अ कलम ५९)

(१३) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असणारा काढून सदर मिळकत सरकार जमा करणे ( म ज म अ कलम ५४)

(१४) हस्तांतरित अयोग्य वहिवाट प्रमाणपत्राची कारवाई करणे (म ज म अ कलम ६१) 

(१५) जप्त केलेलीं जमीन ताब्यात घेणे त्यांचा विनियोग करणे ( म ज म अ कलम ७३) 

(१६) धारण जमिनीतीचे विभाजन करणे ( म ज म अ कलम ८५) 

(१७) भुमापन क्रमांकाच्या किंवा पोटविभागाचया हद्द आखणी करणे (म ज म अ कलम १३६)

(१८) भुमापन क्रमांकाच्या आणि गावाच्या हद्दीत निशाण्या लावणे व दुरुस्त करणे ( म ज म अ कलम १३९/१४१)

(१९) दंडणीय कारवाई करणे (म ज म म अ कलम १५२) 

(२०) हस्तलिखित प्रमादाची दुरुस्ती करणे ( म ज म अ कलम १५५) 

(२१) जमीन महसूल थकबाकी करणार्या विरोधात कारवाई करणे ( म ज म अ कलम १७४ )

(२२) शेतसारा रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसुल करणे ( म ज म अ कलम १७६)

(२३) स्थावर मालमत्ता विक्री संबंधित उद्घोषणा व लेखी नोटीस काढणे ( म ज म अ कलम १९७)

(२४) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम मालमत्ता अटकाव व विक्री करणे ( म ज म अ कलम १८०)

(२५) कसूर करणाऱ्या व्यक्तिची मालमत्ता विक्री करणे ( म ज म अ कलम १८१) 

(२६) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या आणि ती वयवसथेखाली घेणे ( म ज म अ कलम १८२) 

(२७) स्थावर व जंगम मालमत्ता विक्री विषयी उद्घोषणा करणे (म ज म अ कलम १९२/१९३) 

(२८) जप्त केलेल्या मालमत्तेविषयी दावे निकालात काढणे ( म ज म अ कलम २१८)

 अन्न व नागरी पुरवठा कामकाज बाबतीत तहसिलदार

(१) तालुका स्तरावरील नियंत्रण

(२) अन्न धान्य साठवण व वितरण

(३) रास्त भाव दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू विषयक कामकाज

(४) उपकोषागार अधिनियम नुसार दरमहा मुद्रांक व अन्य किंमती कागदपत्रे याबाबतीत कोषागार कार्यालयांची तपासणी करणे

(५) सब जेल मनयुअल नुसार सब जेल अधिक्षक म्हणून कामकाज पाहणे 

   अर्ध न्यायिक कामकाज तहसिलदार

(१) कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे अन्वये कामकाज

(२) मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ अन्वये कामकाज

(३) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये चौकशी कामकाज

  * कार्यकारी दंडाधिकारी नात्याचे तहसिलदार *

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ६ मध्ये फौजदारी न्यायालयाचे जे वर्ग नमूद केलेलें आहेत त्यात ( कार्यकारी दंडाधिकारी ) यांच्या न्यायालयाचा समावेश होतों या अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांचें न्यायालय हे फौजदारी न्यायालय आहे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या स्थानिक अधिकारितेत अपराध येत असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४४ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांना अशा अपराध करणार्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत खालील विविध कायद्यानुसार तहसिलदार यांना अर्ध न्यायिक कामकाज पार पाडावे लागते

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०७ते ११०/१३३/१४४/१७४/ चया तरतुदी अन्वये कामकाज

(२) उच्च न्यायालय क्रिमिनल मॅन्युअल अन्वये प्रतिज्ञा पत्र मृत्यूपूर्वी जबानी घेणे मृत्यू कारणांचा पंचनामा करणे ओळख परेड घेणे इत्यादी

(३) कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे

(४) असामाजिक तत्वावर लक्ष वेधून त्यांच्या हालचाली विषयीं माहिती मिळविणे

(५) शांतता समितीच्या बैठका घेणे व विविध सण उत्सव प्रसंगी कायदा व सुव्यवस्था हाताळणे

   इतर कामकाज

(१) तालुका स्तरावर राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम आयोजित तहसिलदार समन्वय व अंमलबजावणी अधिकारी असल्यामुळे त्यांना खालील कर्तव्य पार पाडावी लागतात

(१) ग्रामीण रोजगार हमी योजना

(२) विविध शासकीय विभाग समन्वय व शासकीय योजना अंमलबजावणी करणे आढावा घेणे

(३) जनगणना. कृषी गणना. पशु गणना. रोगराई निवारण कामांचे नियोजन

(४) लोकसभा. विधानसभा. विधानपरिषद. जिल्हा परिषद. पंचायत समिती. नगरपरिषद. ग्रामपंचायत. विरनीषट सहकारी संस्था निवडणुकां पोट निवडणूक विषयी कामकाज

(५) तालुका स्तरावर विविध समित्या अध्यक्ष सचिव सदस्य म्हणून कामकाज पाहणे

(६) कारयशेत्रात अतिमहत्वाच्या व्यक्तिच्या व्यक्ति यांचें दौरे दरम्यान राजशिष्टाचार विषयी कामकाज पाहणे

 *तहसिलदार यांचे अधिनसथ खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी वृंद असून त्यांचे मार्फत खालील प्रमाणे कर्तव्य / कामकाज पार पाडले जाते

 (१) नायब तहसिलदार

 (२) अव्वल कारकून

 (३) मंडळ अधिकारी

 (४) तलाठी

 (५) शिपाई

  (६) कोतवाल

आपणास माहीत असणे गरजेचे आहे कि आपल्या तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात वरिल प्रमाणे कामकाज चालते

        वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८८०८२५८५९





वाचा -

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education..

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ...

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या