Showing posts with label labour. Show all posts
Showing posts with label labour. Show all posts

बांधकाम कामगार आणि दारू?

 


बांधकाम कामगार आणि दारू

           दारू सोडा आरोग्याशी नात जोडा. निरोगी रहा विविध विनाशकारी रोगांपासून वाचा. जस आपण आज वागता तसेच उद्या आपली मुल वागणार म्हणजे बा दारुडा पोरग दारूड. अस नको. आजच विचार बदला. कारण दारू विक्री व्यवसाय करणारा कधीच दारू पित नाही म्हणून तो मालक आहे आणि आपण गुलाम झालो आहे

         बांधकाम कामगार म्हणलं की व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित मिळेल ते काम करणारा मिळेल ती मजूरि घेणारा ठेकेदार इंजिनिअर यांचा अन्याय सहन करणारा. गरिबी मुळे शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा. तो व्यक्ती म्हणजे बांधकाम कामगार होय. 

    बांधकाम कामगार.क्षेत्रात आज आपल्या लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक याच व्यवसायावर आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतात. म्हणजे. सरकारला सर्वात मोठा आर्थिक टॅक्स हा बांधकाम क्षेत्रातून ज्याला बांधकाम कामगार व्हायचे आहे त्यासाठी कोणतीही परिक्षा नाही. कोणतेही अनुभव सर्टिफिकेट लागतं नाही शिक्षणाची अट नाही त्यामुळे ६५ टक्के लोक या बांधकाम क्षेत्राकडे वळतात. ग्रामीण भागातून येणारा लोकांचा लोंढा हा शहरांत बांधकाम कामगार म्हणूनच काम करतात. त्यामुळे वाढणारी गुंडगिरी बेकायदा अवैध व्यवसाय. व्यसनी. अशा विविध कारणानें ही जनता ग्रासली आहे 

                दारु हा शब्द मधीरा. सुरा. सोमरस अशी मनमोहक नाव असणारा एक शब्द आहे. जुन्या काळात काळया कुजलेल्या गुळापासून. नवसागर. युरिया. भाबळीची साल. असे एक मिश्रण तयार केले जाते ते ठराविक दिवसासाठी कुजणयासाठी सोडले जाते त्यात साप उंदीर घुशी पाली. असे एक नाही अनेक प्राणी पाडतात आणि मरतात आणि अशा मिश्रणापासून मानवी आरोग्यास हानिकारक असणारी दारु तयार केली जाते. आणि लोक बांधकाम कामगार दिवसभर उन्हात राबून चार पैसे गाठीला बांधायचे सोडून त्याच पैशांत दारु सारखं विष विकत घेतात किती वाईट आहे बघा. बांधकाम कामगार दारुच्या अधिन झाले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारूच्या नशेत असणारे बांधकाम कामगार मी बघितले आहेत. यात बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इंजिनिअर. यांना कामगारांची गरज असेल तर सकाळी त्याला दारू पिण्यासाठी पैसे देऊन नंतरचं कामांवर न्यावे लागते. बांधकाम कामगार यांचे असे मत आहे की दिवसभर कामांचा कंटाळा घालविण्यासाठी आम्ही दारू पितो. काहीजण म्हणतात आम्हाला लय टेन्शन आहे म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण मुल ऐकत नाहीत म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण कर्जबाजारी पणामुळे दारू पितात. काहीजण बायकोच्या त्रासामुळे किंवा बेजबाबदार वागण्यामुळे दारू पितात. तर काहीजणांन खास चैनी करायची म्हणून पीतात. अशी एक नाही अनेक कारणे लोक सांगतात पण हा सर्व खेळ आहे ते आपल्या मित्रांची कुटुंबाची. फसवणूक करत नाहीत तर ते सवताची फसवणूक करत असतात. 

              काॅंकरेट.गॅंग म्हणजे येथे एक ठेकेदार असतो. रोज सकाळी दारूच्या अड्ड्यावर असणारे बांधकाम कामगार गोळा करून त्यांना दारू पाजून कामांवर नेतात आणि काम झाल्यावर ठरविल्याप्रमाणे पगार न देता घालविले जाते. या अशा कामांवर जाणारे बांधकाम कामगार यांची नोंदणी पोलिस स्टेशनला करणे आवश्यक आहे पण कोणीही करत नाही. त्यांचा इनसुरनस करणे गरजेचे आहे पण कोणीही करत नाही. याचयामगचे कारणं सांगितलें जाते ते म्हणजे हे कामगार परगावचे आहेत आमच्याकडे काय कायम आहेत का ? मग यांच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. असे मत या ठेकेदार लोकांचे असते. यामध्ये अंगावर पैसे देण्याचे नविन खुळ आल आहे कारणं या कामगारांना दारूचं व्यसन आणि दुसरें कोणतेही काम येत नाही मग एखाद्या ठेकेदार यांचेकडून अंगावर पैसे घ्यायचे. मग काय या कामगारांचा दारुचा खर्च आणि पगार कमी यामुळे या बांधकाम कामगार याचे अंगावर असणारे पैसे कसे फिटणार मग त्या कामगारांचे मरेपर्यंत हेच काम करायचे. पैशासाठी कामगारांना माराहाण. बांधून मारणे. शिविगाळ. रात्री अपरात्री घराकडे जाणे. दम देणें जीवे मारण्याची धमकी. पोलिस स्टेशनला गेला तर जीवे मारण्याची धमकी. . त्यांच्या बायकांवर वाईट नजर तुझ्या नवरयाने अंगावर पैसे घेतले आहेत ते तुला फेडावे लागतिल नाहितर या महिलांच्या कडे शरिरसुखाची मागणी करणारे नराधम याच धंद्यात आहेत. कामगाराच दारूडा नाही हे ठेकेदार सुध्दा दारु पितात पण ते बार मध्ये. महागडी दारु पितात यासाठी येणारा पैसा हा बांधकाम कामगार यांच्या घामातून येतो.कामावर काम चालू असताना काही अपघात झाल्यास.दुखापत झाल्यास त्यासाठी येणारा औषधांचा खर्च व जोपर्यंत तो बांधकाम कामगार काम करू शकत नाही तोपर्यंत त्याचा पगार. ज्या ठेकेदार कंत्राटदार यांनी कामाला घेऊन जाणारया वर आहे. पण आज कोणीही बांधकाराला ओळख सुद्धा देत नाही आजचं निर्णय करा आणि ज्यांच्याकडे कामाला जाताय तेथे असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ पोलिस स्टेशनला तक्रार करा. फक्त दारू पिऊ नका क्रांकरेट कामांवर जाणारे बांधकाम कामगार हे काम करत असताना बरेच कामगाराचा कामांवर मृत्यू झाला आहे अशी बरिच प्रकारणे आहेत. पण आजपर्यंत या बांधकाम कामगार यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार केली नाही का ? मला कळत नाही. बांधकाम कामगार यांच्या नशिबाला हे सर्व येते ते म्हणजे फक्त आणि फक्त दारूमुळे

                दारूचे व्यसन असणा-या व्यक्तीला समाजात किंमत नाही मुलबाळ पत्नी सगेसोयरे यांच्यात किंमत नाही. कारणं रोज संध्याकाळी घराकडे दारू पिऊन येणारे रस्त्याला पडत पडतं येताना आपण बघतो. आणि म्हणतो आज काय पगार झालाय वाटत ? आज काय बाजार आहे वाटतं ? मग त्या घरातील महिलांना व मुलांना एकादा माणूस सांगतं येतो की तुमचा माणूस अमुक ठिकाणी दारू पिऊन पडला आहे काय वाटतं असलं त्या जीवाला. उसने पैसे घेऊन. कर्ज काढून. घरातील भांडी कुंडी विकून. चोरी करून संडास धुवून. कष्टाची कामे करून. साफसफाई करून. वेळ पडल्यास घरातील बायको मुलं कामाला ठेवून स्वता. दारु पिणारे. असं एक नाही अनेक प्रकारची कामे करून दारू पिणारे मी बघितले आहेत. आणि याचं प्रमाण जास्त आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांत वाईट आहे 

            आज शासनाकडून देशी विदेशी दारूला लाईसनस देवून विक्री करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे शासन सुध्दा पूर्ण दारूबंदी कायदा अंमलात आणत नाही. काही ठिकाणी उलटी बाटली अशी महिला आंदोलन झाली पण त्याला सुद्धा जोर लागला नाही. त्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात राजकारण आल आणि अशी आंदोलने करणार्या महिला राजकारणात गेल्या आणि आंदोलन मोर्चा हे सर्व शांत झालयं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी १९ कामगार महिलांना मुलांना जशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मंडळाकडून व्यसनमुक्ती उपचारासाठी योजना आहे पण आज कोणताही बांधकाम कामगार या योजनेकडे वळत नाही आणि वळलेला नाही. म्हणजे मंडळांचा बांधकाम कामगार यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी असणा-या प्रयत्न फोल ठरला आहे. मंडळाने सर्वांचे चेक अप करण्याची गरज आहे किंवा मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा दाखला अनिवार्य करण्यात यावा कारणं आत्ता अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत बांधकाम कामगार यांच्या विविध टेस्ट करण्याच्या मागच कारणं आहे ते म्हणजे बांधकाम कामगार दारू पितो का? जर एखाद्या कामांवर बांधकाम कामगार याचा काही अपघात झाला तर अभियान मध्ये करण्यात आलेल्या विविध टेस्ट मध्ये अल्कोहोल चे सुध्दा टेस्ट होते त्यामुळे मंडळाकडून बांधकाम कामगार कामावर असताना अपघातात मृत्यू झाल्यास असणारा पाच लाख रुपये इतकी शासनाची त्यांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम मिळणारं नाही म्हणजे दारू किती वाईट आहे बघा ? महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र ही योजना शासनाने अंमलात आणली होती पण त्याचा सुध्दा काही उपयोग झाला नाही. 

            आजचं दारू सोडा आरोग्याशी नातं जोडा. निरोगी रहा कारणं दारु म्हणजे गुलामगिरी. 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कामगार ठेकेदार इंजिनिअर आणि योजना

 



कामगार ठेकेदार इंजिनिअर आणि योजना

         ‌ कामगार हे बहुतांशी अशिक्षित अडाणी गरजू असल्याने तसेच ते असंघटित असल्याने त्यांची मालक ठेकेदार इंजिनिअर वर्गाकडून सतत पिळवणूक होण्याची शक्यता असते. त्या करीता त्यांना त्यांच्या रोजगार सेवाशर्ती प्राप्त व्हाव्यात व त्यांना सामाजिक. शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक सुरक्षा प्रधान करण्याच्या उद्देशाने विविध कामगार कायद्यामध्ये कामगारांचे हक्क निर्माण करून त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे या कामगार कायद्यांची प्रभावी पणे व यशस्वी अंमलबजावणी मालक ठेकेदार इंजिनिअर यांचेकडून केली जात आहे ती कशी हे पाहण्यासाठी व खात्री करून घेण्यासाठी असे कामगार ज्या ठिकाणी काम करतात कामांवर जातात अश्या कार्यस्थळाचे निरिक्षण करण्याकरिता आयुक्तालय कामगार आयुकतापासून तर निम्मं स्तरावरील सहकारी कामगार अधिकारी तसेच किमान वेतन निरिक्षक ( शेती व दुकाने निरिक्षक यांची विविध अधिनियमाच्या अंतर्गत #निरिक्षक # म्हणून नियुक्ती करण्यात येते व आलेली आहे अश्या प्रकारे ज्या अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती अधिनियमाच्या अंतर्गत # निरिक्षक # म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे असे अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून देण्यात भौगोलिक कार्यक्षेत्रातील विविध असथापनेतील/ उधोगांना निरिक्षक भेटी देऊन या या भेटी वेळी प्रत्यक्ष कामगारांच्या सेवाशर्ती बाबत त्यांना विविध अधिनियमाच्या अंतर्गत लाभ सुविधा सोयी सुविधा नियोक्तयाडून. दिल्या जातात किंवा नाही याची तपासणी करून खात्री करून घेतात व कामगारांना अधिनियमानुसार मिळणारे. १९ कल्याणकारी योजना सापेक्ष पणे मिळवण्यासाठी किंवा त्या मिळत नसतील तर त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करतात किंबहुना ते मिळवून देण्याकरिता त्यांना केंद्रीय कायदे १९ व राज्य शासनाचे ६ कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार आवश्यकती कारवाई ते करतात यात नियोकतयाकडून विविध न्यायालयात अभियोग दाखल करून किंवा कामगार न्यायालय मध्ये वसुली दावे दाखल करणे यांचा समावेश होतो

      कामगार आयुक्तांकडून खालील महत्वाची कार्य केली जातात

विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून अधिनीयमाचे फायदे कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. कामगार व मालक मध्ये कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण होऊ पाहणा-या किंवा निर्माण झालेल्या औधोगिक विवादात वेळीच मध्यस्थी करून कामगार व मालक यांच्यात समेट घडवून आणणे. व औधोगिक क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था कायम राखणे/औधोगिक सौदाहपूरण व शांततेने राखणे. 

                  कामगार आज मोठ्या अडचणीत सापडला आहे कारणं शासकीय कल्याणकारी योजना मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्त्येक जिल्ह्यात जागोजागी तयार झालेल्या कामगार संघटना. एजंट दलाल यांचा सुळसुळाट यामुळे कामगारांची आर्थिक व मानसिक लुट चालू आहे. ह्या सर्व व प्रकाराला संघटना एजंट दलाल जेवढे जबाबदार आहेत तेवढेच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी सुध्दा जबाबदार आहेत. कारणं कामगार आज वैयक्तिक पातळीवर एकादा नोंदणी अर्ज किंवा लाभाचा अर्ज देण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये गेला तर अधिकारी व कर्मचारी त्याला विचारतात की तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे असं विचारण्याचा अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना नाही. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल नंबर फलकावर का लावले जात नाहीत ? संघटना व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचें मोबाईल नंबर अधिकारी व कर्मचारी यांचेकडे कशासाठी पाहीजेत ? संघटना व एजंट यांचें सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये ठिय्या मारणे कोणत्या नियमांत आहे ? म्हणूनच म्हणतो की या सर्व बोगस कामगार नोंदणी यासाठी संघटना एजंट दलाल किंवा अन्य कोणीही जबाबदार नाही कारणं हे सर्व परिस्थितीचें बळी आहेत पण यांना आश्रय देणारे अधिकारी व कर्मचारी हे खरे गुन्हेगार आहेत. एक चौकशी झालीच पाहिजे

              ठेकेदार भोळ्याभाबड्या गरिब व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित कामगारांवर मनमानी पद्धतीने आपला सर्वस्वी हकक सांगणारा व्यक्ती म्हणजे ठेकेदार होय. जो आपल्या मनाला येईल तेवढा पगार. आपल्या मतानुसार कामांची वेळ. ठरवणारा. आणि कामगार यांच्या जीवांवर. कमी वेळात जास्त आर्थिक माया गोळा करणारा. काही ठिकाणी कामगाराबरोबर त्याची बायको मुलं आपल राज्य सोडून पर राज्यात कामासाठी येतात त्यांचे अनुभव आपल्याला हालवून टाकणारे आहेत. ठेकेदार यांची महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक अपमानास्पद असते त्याचा बघण्याचा दृष्टीकोन वाईट असतो पण हे कामगार व त्यांची पत्नी याचा विरोध न करतां सर्व काही सहन करत असतात. काहीवेळा कामगारांना बांधून माराहान करणे. युपी बिहार राजस्थान मधून आलेले कामगार यांना माराहान करून काम करून घेवून न पैसे देता घालवणे. हे आपण बघतो असे कामगार कोणाकडे जाणारं परकी लोक परक राज्य यांतच कामगार अडकून जातो. एकादा कामगार कामावरून पडून मरण पावलयास. त्याला कोणताही सुरक्षा संबंधित ठेकेदार गांभीर्य घेत नाही मयत कामगारांना कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. आज आपल्या जवळ बेळगाव कर्नाटक युपी बिहार राजस्थान येथून कामगार कामासाठी येतात रस्त्याचे काम करणारे. सफाई कामगार. यांना सुध्दा ठेकेदार कंत्राट बेसवर कामांवर ठेवले जाते. पण या सर्व कामगारांचा वापर फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी केला जातो यांतच कामगार सुरक्षा धोक्यात आली आहे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या कल्याणकारी योजना मिळाव्या यासाठी कोणतीही ठेकेदार मदत करत नाही. आत्ता सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे कामाच्या दरांचा आजपर्यंत ठेकेदार यांच कधीही युनियन झाल नाही दर निश्चित करण्याबाबत. त्याला कारणं आहे की यांच्यात एकी नाही. यांना एकत्र येण्यासाठी सर्वात मोठा अडसर आहे तो म्हणजे यांना काम देणारया लोकांचा. अनेकवेळा यांचं युनियन दर निश्चित करण्यासाठी युनियन झाले मिटींग झाली जेवण झाली पण ही युनियनने. जास्त काळ टिकली नाहीत आणि येथून पुढे होणारं नाही आणि टिकणार नाही. दर ठरतो सर्व ठेकेदार लोकांचा एक नेता तयार होतो. पण कोणच युनियनचे ठरविल्या प्रमाणे दर घेऊन काम करत नाही कारणं रोज तयार होणारें ठेकेदार आज गल्ली बोळात काही अनुभव नाही चार फळ्या बांबू घेऊन रोज एक कंत्राटदार ठेकेदार तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरोखरच प्रामाणिक काम करणारे कामांचा पूर्ण अनुभव असणारे. कामांचा दर्जा उत्कृष्ट असणारे. असे सेंट्रिंगवाले आज दराच्या कचाट्यात सापडले आहेत. मोठे ठेकेदार कंत्राटदार. हेच मनमानी दराने काम घेतात. आणि हेच कमी दारात काम घेतात आणि सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करतात. कारणं सांगितलें जाते की आपसी संबंध होते. पाहुणे आहेत. त्या इंजिनिअरचे कायम काम आहे. मग दरासाठी एकी होणारच नाही ? १९८९ साली. काॅलम बीम. छपपरी. फाॅंडेशन. यांच दर. अॅटम बेसवर होते. त्यावेळी कामगार पगार. १८ ते चांगला मिस्त्री असेलतर त्याला ३५ रूपये पगार होता. म्हणजे. त्यावेळी कामगार पगार आणि दर यांचा विचार केला तर. आज. २०२१ रोजी. सेंट्रिंग कामांचे दर. ९०/१००/१२०/ असं आहेत कामगार पगार आज ३५०/५००/ असा झाला आहे म्हणजे १९८९ सालीच्या अंदाजानुसार आज सेंट्रिंग कामांचे दर १७०/ रू स्वेटर फूट असायला हवे होतें. याला कारणीभूत आहेत ते म्हणजे सर्व फुटार सेंट्रिंग ठेकेदार कंत्राटदार. युपी बिहार राजस्थान वाले कामगार म्हणून आले आणि स्वता ठेकेदार कंत्राटदार झाले. यांच काय केल आपण ? यांना आश्रय दिला तो म्हणजे इंजिनिअर लोकांनी 

          इंजिनिअर. ठेकेदार यांची पुढची पायरी म्हणजे इंजिनिअर. घर. बंगला. हाॅटेल. लाॅज. मंगल कार्यालय. कंपन्या. एम आय डी बांधकामे. रस्ते. पुल. बंधारे. विविध शासकीय इमारती. या सर्व कामांसाठी सर्वगुणसंपन्न आणि आज सर्वात मोठे खुळ असणारे वास्तुशास्त्र माहीत असणारा. सरळ. सुटसुटीत. मनमोहन बांधकामे करण्यासाठी जीवनातील घर आपल्या स्वप्नातील घर कसं असावं. यासाठी आपण इंजिनिअर निवडतो. जरा माग जाऊन विचार केला तर घराची व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बांधकाम व विविध बांधकामे करण्यासाठी स्थानिक मिस्त्री यांची निवड केली जात होती. पण आज उलट झाल. एकही कंत्राटदार ठेकेदार असा आहे कां त्याला मालकाकडून काम आलंय. नाही कारणं इंजिनिअर लोकानी बांधकाम क्षेत्रात एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांची एकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मिटींगा महिन्याला होतात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामुळे समाजांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. पण कामगार ठेकेदार कंत्राटदार यांची छाप व्यसनी. आठवड्याला इंजिनिअर यांच्या आॅफिस पुढे उभे राहणारे. कामांचा अनुभव शुन्य.असणारे. अशी छाप पाडली आहे त्यामुळे यांच्या हातात कोणीही मालक आपले घरांचे काम देत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की इंजिनिअर लोक सेंट्रिंग ठेकेदार कंत्राटदार यांना कधीच एकत्र येवू देणारं नाहीत. कारणं मालक इंजिनिअर यांना मागिल त्या दराने काम देतात जेवढे पैसे इंजिनिअर हातात. मोठ मोठी अपार्टमेंट. मोक्याच्या जागा. लाखांच्या घरात गाड्या. कुठून आलं हातुडा. थाफी बंळबा. न घेता मिळवतात तेवढे पैसे कामगार काम करून सुध्दा मिळवत नाही त्याला एकवेळ गाडीत तेल टाकायला सुध्दा पैसे नाहीत असं का? आपणं कधी विचार केला नाही ? आणि आत्ता दरासाठी मिटींगा घेवून काय उपयोग ? वेळ गेली. ? आत्ता गप्प बसा आणि आप आपसात भांडणे करत माझ काम तु घेतल तुझ काम मी घेतल काय उजेड पाडला घेतल ते सुद्धा कमी दरात आगोदर आपलं मिटवा आणि नंतर दरासाठी उठाव करा 

              आज बांधकाम कामगार कल्याणकारी योजना मिळविण्यासाठी व बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर यांच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. पण आज असा प्रकार उघडकीस आला आहे की काही संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचेकडे ठराविक रक्कम घेऊन काही इंजिनिअर लोक प्रमाणपत्र देत आहेत म्हणजे खराखुरा कामगार माग आणि बोगस कामगार पुढे यासाठी सुध्दा इंजिनिअर लोक जबाबदार आहेत कां ? यांचा सर्वे झाला काय ? इंजिनिअर यांना किती दाखले देणे असा कोणता निर्णय आहे का? 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सफाई कामगार सफाई कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 सफाई कामगार सफाई कामगार



          आपल्याकडे लहान लहान वाडया वस्त्या होत्या लोक विभागून राहतं होते त्यावेळी स्वच्छता आणि टापटीप आरोग्य याचा फारसा विचार केला जात नव्हता आणि त्याची तेवढी गरज नव्हती कारण प्रदुषण कमी स्वच्छ आणि मोकळी हवा केमिकल रहित अन्न धान्य दुध ताजा भाजीपाला आणि फळे यामुळे लोक अंगापिंडाने गच्च असायची कोणतेही व्यसन नाही एकत्र कुटुंब पद्धती काळ बदलत गेला आणि 

          गावांचे रूपांतर शहरात झाले विविध खेड्यातून नोकरी व कामधंदा यांच्या शोधात लोकांचा लोंढा शहराकडे वाढला लोकसंख्या वाढली सुखसोयी यात वाढ झाली लोकसंख्या वाढल्यामुळे विविध रस्त्यांवर चालणारे लहान लहान व्यवसाय वाढले खाणपानाचया वस्तू मध्ये वाढ झाली जागोजागी संडास मुतारी लेडिज जेंटस. यांची निर्मिती झाली बाजार एस टी स्टँड लोकाचा वावर जास्त आसलेमुळे वापर जास्त होऊ लागला बाजार. बस स्टेशन. रेल्वे स्टेशन. चौक. पानपट्टी विक्री. सार्वजनिक बागा. पर्यटन स्थळे. रस्ते गटर. सार्वजनिक समाजमंदिर. सार्वजनिक पाण्याच्या टाक्या. लोकसंख्या वाढल्यामुळे रोज वापराच्या वस्तू त्याचा कचरा. जसे दुध पिशवी. वृतमान पेपर. भाजीपाला. डॉ व मेडिकल मध्ये निघणारा घातक कचरा. लोखंडी जाळी गंजलेल्या वस्तू. आशा एक नाही अनेक ठिकाणचा निर्माण होणारा कचरा

          कचरा कोठून तयार होतो कसा व कोणत्या ठिकाणाहून किती कचरा तयार होतो हे आपण आत्ता बघितले पण हा कचरा गोळा कसा होतो कोण कचरा गोळा करत त्या कचरयाची विलवेहाट कोण आणि कशी लावली जाते हे आपण कधी विचार सुध्दा करत नाही आपणास विचार करण्याची गरज आहे

       आज शहराची वाढ महानगरात झाली आहे आसमानाला विचार करायला लावणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जागोजागी केर कचऱ्याचे डोंगराएवढे ढिग त्यातून होणारे प्रदुषण वाढता मोकाट कुत्री यांचा वावर आणि संकटात सापडलेले मानवी जीवन हा कचरा गोळा करण्यासाठी व आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून राबणारे सफाई कामगार हे सुद्धा आपल्यासारखेच लोक आहेत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे मोठ्या प्रमाणावर हे कामगार आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अशी गलिच्छ वस्ती राहून गलिच्छ काम करत असतात 



          पावसाळा सुरू झाला आणि मग काय ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याणे तुंबलेल्या गटारी तुंबलेल्या व घाणीचे भरलेल्या मुतारी व सार्वजनिक संडास यातून येणारि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर येणारी घाण जागोजागी साचलेले डबके  यातून आपणास चालन सुध्दा होत नाही आपण आपल्या नाकाला रुमाल बांधून फीरतो मग त्यात काम करणार्या सफाई कामगारांनचा आपण व आपल्या नगरात नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कधीही विचार केला नाही सफाई कामगार नसेल तर शहराची कचराकुंडी होण्यास वेळ लागणार नाह

      शासनाने अशा सफाई कामगार लोकांच्या साठी १२/८/१९७५ पासून शासन प्रयत्नशील आहे  त्यानंतर लाड समितीचे नावाने २१ मार्च २०१६  यात कायमस्वरूपी सफाई कामगारांना घरकुल योजना. महागाई भत्ता. निर्वाह निधी. सफाई कामगार पुनर्वसन. वारस हक्काने नोकरी कायदा. सफाई कामगार. विमा संरक्षण. कामगारांना कामावर असताना विविध सुखसोयी उपलब्ध करून देणे. अशी सफाई कामगार यांना विविध योजना विविध शासन निर्णयानुसार देणेत आल्या आहेत 

         आज सर्वत्र खाजगीकरण चालू झाले आहे यातच विविध ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. स्थानिक स्वराज्य संस्था. यांनी कामगारांचा कोणताही लोड आपल्यावर येऊ नये यासाठी ठेकेदारि पध्दतीने सफाई कामगार घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कामगारांना कोणताही लाभ देणे आवश्यक नाही त्यांना मिळणारा भत्ता नियमानुसार ७० रूपये वरून ४०० रुपये करण्यात आला आहे पण आज ठेकेदार २२० रुपये असे नाममात्र पगार पोटी शुल्क देऊन आठ आठ तास काम करुन घेत आहेत त्यात महिला सफाई कामगारांना मिळणारी वागणूक ही तर वाईट आहे त्यांच्याकडे मुकादम लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन कायम वेगळाच असतो 

            आपल्या हक्क व अधिकार यासाठी सफाई कामगार आंदोलन उपोषण करण्यास बसले असता नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका यांचे सी ओ हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नाही असा पवित्रा घेऊन प्रकरण टाळले जाते आणि तुमचा ठेकेदार आणि तुम्ही बघून घ्या असे सांगितले जाते विविध सफाई कामगार संघटना नावाखाली तयार झालेली दुकानदारी मोडून काढणे गरजेचे आहे अधिकारी आणि कर्मचारी व ठेकेदार यांचे बरोबर सगणमत करून पैसा मिळवणारे समाजकंटक यांना सफाई कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याची गरज नाही  




             खरोखरच सफाई कामगारांना सेवा सुविधा हॅणडगलोज. बुट. सुरक्षा जॅकेट. टोपी. विमा संरक्षण. व अन्य सुरक्षा पूरविणयाची सर्व जबाबदारी हि ठेकेदारावर आहे आणि सर्वात मोठी जबाबदारी ही अधिकारी व कर्मचारी यांचेवर आहे जिथे जिथे सफाई कर्मचारी आपल्या हक्क व अधिकार यासाठी उपोषण व आंदोलन करित असतील त्यांनी आपली मागणी मान्य होई पर्यंत जागा सोडू नका कारणं आपण झाडू खाली ठेवला तर बघू हे ठेकेदार व अधिकार कर्मचारी झाडू घेतात का बघू 

      वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण एखाद्या विभाग शासकीय आॅफिस ग्रामपंचायत. नगरपरिषद महानगरपालिका येथील कोणतीही माहिती मागितली असेल तर त्यांनी देणे बंधनकारक आहे

माहिती अधिकार दाखल केल्यानंतर कोणी आपणास दमदाटी. जीवे मारण्याची धमकी देत असेल तर पोलिस स्टेशनला तक्रार द्या कारण माहित अधिकार दाखल करणार्या व्यक्तिला शासन निर्णयानुसार पोलिस संरक्षण देण्यात आले आहे

वाचा - 

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे . 

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या