सफाई कामगार सफाई कामगार
आपल्याकडे लहान लहान वाडया वस्त्या होत्या लोक विभागून राहतं होते त्यावेळी स्वच्छता आणि टापटीप आरोग्य याचा फारसा विचार केला जात नव्हता आणि त्याची तेवढी गरज नव्हती कारण प्रदुषण कमी स्वच्छ आणि मोकळी हवा केमिकल रहित अन्न धान्य दुध ताजा भाजीपाला आणि फळे यामुळे लोक अंगापिंडाने गच्च असायची कोणतेही व्यसन नाही एकत्र कुटुंब पद्धती काळ बदलत गेला आणि
गावांचे रूपांतर शहरात झाले विविध खेड्यातून नोकरी व कामधंदा यांच्या शोधात लोकांचा लोंढा शहराकडे वाढला लोकसंख्या वाढली सुखसोयी यात वाढ झाली लोकसंख्या वाढल्यामुळे विविध रस्त्यांवर चालणारे लहान लहान व्यवसाय वाढले खाणपानाचया वस्तू मध्ये वाढ झाली जागोजागी संडास मुतारी लेडिज जेंटस. यांची निर्मिती झाली बाजार एस टी स्टँड लोकाचा वावर जास्त आसलेमुळे वापर जास्त होऊ लागला बाजार. बस स्टेशन. रेल्वे स्टेशन. चौक. पानपट्टी विक्री. सार्वजनिक बागा. पर्यटन स्थळे. रस्ते गटर. सार्वजनिक समाजमंदिर. सार्वजनिक पाण्याच्या टाक्या. लोकसंख्या वाढल्यामुळे रोज वापराच्या वस्तू त्याचा कचरा. जसे दुध पिशवी. वृतमान पेपर. भाजीपाला. डॉ व मेडिकल मध्ये निघणारा घातक कचरा. लोखंडी जाळी गंजलेल्या वस्तू. आशा एक नाही अनेक ठिकाणचा निर्माण होणारा कचरा
कचरा कोठून तयार होतो कसा व कोणत्या ठिकाणाहून किती कचरा तयार होतो हे आपण आत्ता बघितले पण हा कचरा गोळा कसा होतो कोण कचरा गोळा करत त्या कचरयाची विलवेहाट कोण आणि कशी लावली जाते हे आपण कधी विचार सुध्दा करत नाही आपणास विचार करण्याची गरज आहे
आज शहराची वाढ महानगरात झाली आहे आसमानाला विचार करायला लावणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जागोजागी केर कचऱ्याचे डोंगराएवढे ढिग त्यातून होणारे प्रदुषण वाढता मोकाट कुत्री यांचा वावर आणि संकटात सापडलेले मानवी जीवन हा कचरा गोळा करण्यासाठी व आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून राबणारे सफाई कामगार हे सुद्धा आपल्यासारखेच लोक आहेत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे मोठ्या प्रमाणावर हे कामगार आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अशी गलिच्छ वस्ती राहून गलिच्छ काम करत असतात
पावसाळा सुरू झाला आणि मग काय ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याणे तुंबलेल्या गटारी तुंबलेल्या व घाणीचे भरलेल्या मुतारी व सार्वजनिक संडास यातून येणारि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर येणारी घाण जागोजागी साचलेले डबके यातून आपणास चालन सुध्दा होत नाही आपण आपल्या नाकाला रुमाल बांधून फीरतो मग त्यात काम करणार्या सफाई कामगारांनचा आपण व आपल्या नगरात नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कधीही विचार केला नाही सफाई कामगार नसेल तर शहराची कचराकुंडी होण्यास वेळ लागणार नाही
शासनाने अशा सफाई कामगार लोकांच्या साठी १२/८/१९७५ पासून शासन प्रयत्नशील आहे त्यानंतर लाड समितीचे नावाने २१ मार्च २०१६ यात कायमस्वरूपी सफाई कामगारांना घरकुल योजना. महागाई भत्ता. निर्वाह निधी. सफाई कामगार पुनर्वसन. वारस हक्काने नोकरी कायदा. सफाई कामगार. विमा संरक्षण. कामगारांना कामावर असताना विविध सुखसोयी उपलब्ध करून देणे. अशी सफाई कामगार यांना विविध योजना विविध शासन निर्णयानुसार देणेत आल्या आहेत
आज सर्वत्र खाजगीकरण चालू झाले आहे यातच विविध ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. स्थानिक स्वराज्य संस्था. यांनी कामगारांचा कोणताही लोड आपल्यावर येऊ नये यासाठी ठेकेदारि पध्दतीने सफाई कामगार घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कामगारांना कोणताही लाभ देणे आवश्यक नाही त्यांना मिळणारा भत्ता नियमानुसार ७० रूपये वरून ४०० रुपये करण्यात आला आहे पण आज ठेकेदार २२० रुपये असे नाममात्र पगार पोटी शुल्क देऊन आठ आठ तास काम करुन घेत आहेत त्यात महिला सफाई कामगारांना मिळणारी वागणूक ही तर वाईट आहे त्यांच्याकडे मुकादम लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन कायम वेगळाच असतो
आपल्या हक्क व अधिकार यासाठी सफाई कामगार आंदोलन उपोषण करण्यास बसले असता नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका यांचे सी ओ हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नाही असा पवित्रा घेऊन प्रकरण टाळले जाते आणि तुमचा ठेकेदार आणि तुम्ही बघून घ्या असे सांगितले जाते विविध सफाई कामगार संघटना नावाखाली तयार झालेली दुकानदारी मोडून काढणे गरजेचे आहे अधिकारी आणि कर्मचारी व ठेकेदार यांचे बरोबर सगणमत करून पैसा मिळवणारे समाजकंटक यांना सफाई कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याची गरज नाही
खरोखरच सफाई कामगारांना सेवा सुविधा हॅणडगलोज. बुट. सुरक्षा जॅकेट. टोपी. विमा संरक्षण. व अन्य सुरक्षा पूरविणयाची सर्व जबाबदारी हि ठेकेदारावर आहे आणि सर्वात मोठी जबाबदारी ही अधिकारी व कर्मचारी यांचेवर आहे जिथे जिथे सफाई कर्मचारी आपल्या हक्क व अधिकार यासाठी उपोषण व आंदोलन करित असतील त्यांनी आपली मागणी मान्य होई पर्यंत जागा सोडू नका कारणं आपण झाडू खाली ठेवला तर बघू हे ठेकेदार व अधिकार कर्मचारी झाडू घेतात का बघू
वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
माहिती अधिकार
आपण एखाद्या विभाग शासकीय आॅफिस ग्रामपंचायत. नगरपरिषद महानगरपालिका येथील कोणतीही माहिती मागितली असेल तर त्यांनी देणे बंधनकारक आहे
माहिती अधिकार दाखल केल्यानंतर कोणी आपणास दमदाटी. जीवे मारण्याची धमकी देत असेल तर पोलिस स्टेशनला तक्रार द्या कारण माहित अधिकार दाखल करणार्या व्यक्तिला शासन निर्णयानुसार पोलिस संरक्षण देण्यात आले आहे
वाचा -
लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे .
उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ...
No comments:
Post a Comment