Showing posts with label food. Show all posts
Showing posts with label food. Show all posts

रेशन गोदाम आणि माहिती अधिकार

 

रेशन गोदाम आणि माहिती अधिकार

          आपल्या भारताने हरित क्रांती योजना आणली आणि आधुनिक शेती औजारे आधुनिक खते बी बियाणे पाण्याचा योग्य वापर यामुळे आपल्या भारतात असणारी अन्न धान्य यांचा तुडवडा भरून निघाला सर्वत्र अन्न धान्य मुबलक प्रमाणात होण्यास सुरुवात झाली त्यामुळे आपणांस दुष्काळ. ओला कोरडा. रोगराई. टोळधाड अशा विविध संकटावेळी परदेशातून अन्न धान्य आयात करावे लागत होते. आज आपल्यातच मुबलक अन्न धान्य पिकत असल्यामुळे आपणांस व आपल्यातील गोरगरीब जनतेला मुबलक अन्न उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. आणि हे अन्न धान्य निवडक आणि स्वच्छ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली त्यातसुद्धा आज बोगस कारभार जोरात चालू आहे प्रत्येक तालुक्यात विविध रेशनकार्ड धारकांना जसे अंत्योदय. बी पी एल. केशरी शिधापत्रिका. अशा लोकांना वेळेनुसार अन्न धान्य वितरण केले जाते. आणि हे शासनाकडून येणारे अन्न धान्य संरक्षण. साठवण. वितरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शासकीय गोदाम उभारले जाते. त्यासाठी गोदाम निरिक्षक नेमला जातो. हमाल नेमले जातात. रेशन दुकानदार यांना दुकानात अन्न धान्य पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाते पण हा ठेका पुरवठा विभाग अधिकारी यांच्या बगलबच्चे यांना दिले जाते. 2017 पासून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानुसार वर्षातून दोन वेळा गोदाम तपासणी पडताळणी तहसिलदार यांनी नेमलेल्या समिती द्वारे करणे आवश्यक आहे. त्यातच कोणत्याही समाजसेवक व संस्था यांना शासकीय गोदाम तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार नाही कारणं आम्ही बोगस अधिकारी यांना रस्त्यावर आणू ही भिती तालुका पुरवठा अधिकारी. जिल्हा पुरवठा अधिकारी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री. यांच्या मनात असणार म्हणून आम्हाला शासकीय गोदाम तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार दिला नाही 

            माहिती अधिकार कायद्यानुसार सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणार्या कामकाजाची माहिती तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपल्याला आपल्या लोकशाही राज्याने दिला आहे पण आज लोकशाहीचा खून झाला आहे मग न्याय कोणाकडे मागायचा ? आपल्या तालुक्यात असणारे शासकीय गोदाम याची माहीती आपल्या माहीतीच्या अधिकारांचा वापर करून आजच मिळवा आणि या चोरांचा बोगस कारभार रस्तावर आणा. 

* शासकीय गोदाम निरिक्षक यांचें नाव पत्ता मोबाईल नंबर सह कधीपासून कार्यरत आहेत

* तपासणी झाली असेल तर तपासणी अधिकारी यांचें नाव हुधदा. पत्ता मोबाईल नंबर सह कधीपासून कार्यरत आहेत

* मागील गोदाम तपासणी पडताळणी कधी झाली होती कोणता अधिकारी होता त्याचा हुदधा काय नाव मोबाईल नंबर सह

* शासकीय गोदाम इमारत बांधकाम दिनांक. इमारीतीची सध्या स्थिती

* शासकीय गोदाम भोवती असारी जागा स्वच्छ व मोकळी आहे काय

* शासकीय गोदाम मध्ये विज कनेक्शन आहे का त्यांचे लाईट बिल कोण अदा करते

* शासकीय गोदाम मध्ये अधिकारी व कर्मचारी यांची हमाल व वाहतूक व्यवस्था सांगणारा बोर्ड फलक उपलब्ध आहे का

* शासकीय गोदाम मध्ये धान्य थपपीची रचना नियम कशाप्रकारे आहे

* शासकीय गोदाम मध्ये धान्यावर व इतर किटक रोखणेसाठी फवारणी यंत्र उपलब्ध आहे का असेलतर कोणते

* शासकीय गोदाम मध्ये उंदीर घुशी यांचा सुळसुळाट आहे का 

* शासकीय गोदाम मध्ये मोकळी धान्य बारदान वर्गवारी बांधून ठेवली आहे का 

* शासकीय गोदाम मध्ये धान्य वजन करण्यासाठी वापरली जाणारी वजन मापे प्रमाणीत केली आहेत का आणि कोणी आणि कोणाकडे

* साठा सटाॅक थप्पी रजिस्टर आहे का दैनंदिन लिहिलं जाते का

* वाहतूक पास नोंदवही

* बिन कार्ड रजिस्टर

* गोदाम अन्न धान्य तुट रजिस्टर

* अन्न धान्य सफाई तुट रजिस्टर

* परमिट रजिस्टर

* जिल्ह्यां अंतर्गत वाहतूक व बाहेरून आवक रजिस्टर

* जड संग्रह रजिस्टर

* हमाली रजिस्टर

* बिल रजिस्टर

* वाहतूक खर्च पास रजिस्टर

* रिक्त बारदान. सुतळी रजिस्टर

* अखाद्य धान्य साठा रजिस्टर

* अन्न धान्य लावताना प्रत्येक धान्य प्रकारासाठी स्वतंत्र भाग केलें आहेत का

* थपपया चढत्या क्रमाने लावल्या आहेत का

* थप्पी रजिस्टर मधील प्रतवारी बाबतचा रकाना क्रमांकाने २२ दर १५ दिवसांनी लिहून त्याचा अहवाल पाठवला आहे का कोणी आणि कोणाकडे

* धान्यातील किटकांच्या प्रमाणानुसार. अ ब क ड प्रतवारी केली आहे का

* गोदाम तुट किंवा स्वच्छता तुट यांची नोंद वहीत घेतली आहे का

* धान्याची सर्व आवक e .1‌ वाहतूक पास रजिस्टर नोंदवही मध्ये वाहतूक पास वरून केली आहे का

* वाहतूक पास रजिस्टर नोंदवही मध्ये तुटीची नोद केली आहे का

* वाहतूक पास रजिस्टर नोंदवही मध्ये थप्पी रजिस्टरला आवक धरली आहे का

* वाहतूक पास रजिस्टर नोंदवही मध्ये थप्पी क्रमांक नोंदविला आहे का

* बिन कार्ड रजिस्टर ठेवलें आहे का

* सर्व धान्य थप्पी मध्ये बिन कार्ड लावलें आहे का

* बिन कार्ड वर आवक व वितरण नोंद घेण्यात आली आहे का

*सर्व बिन कार्ड लेखा परिक्षण होईपर्यंत जतन करून ठेवले आहेत का

* गोदामांची तुटीची नोद गोदाम तुट रजिस्टर मध्ये घेतली आहे का

* गोदामातील तुटीचा अहवाल दर आठवड्याला सादर केला आहे काय

* गोदामातील तुटीची नोंद थप्पी रजिस्टर मध्ये घेतली आहे काय

* धान्य स्वच्छ केल्यानंतर आलेली तुट ( स्वच्छता तुट) रजिस्टर मध्ये नमूद केली आहे काय

* धान्य स्वच्छ केल्यानंतर आलेल्या तुटीची नोद थप्पी रजिस्टर मध्ये केली आहे का

* गोदामपाल धान्याचा आठवडा गोषवारा (आवक जावक तपशील आठवडा गोषवारा) मध्ये दर आठवड्याला तहसील कार्यालयास सादर करतात काय

*गोदामातील प्रत्येक साहित्याची नोंद ( जड संग्रह) रजिस्टर मध्ये केली आहे काय

* रजिस्टर मधील सर्व साहित्य के रजिस्टर मधील अनुक्रमाची नोद आॅईलपेंटने केली आहे का

*( हमाली) रजिस्टर मध्ये हमाली कामाची नोंद आहे काय

*रजिस्टर मधील नोंदवही वर ठेकेदार याची स्वाक्षरी आहे काय

* रिक्त झालेल्या बारदानाची वापरलेल्या सुतळीची नोंद रिक्त बारदान/ सुतळी रजिस्टरला आहे काय

* रजिस्टर नोंद थप्पी रजिस्टरचया रकाना क्रमांक १७ ला घेतलाय आहेत का

* अखाद्य धान्य साठा) रजिस्टर मध्ये खाण्यास पात्र नसलेल्या धान्य साठ्याची नोंद घेतली आहे काय

* चाचणी नोंदवही मध्ये गोदामात येणार्या धान्याची वजन घेतलीं आहेत का

*आवक धान्यात तूट आढळली असल्यास चाचणी मध्ये तशी नोंद करून ठेकेदार/ प्रतिनिधी स्वाक्षरी घेतली आहे काय

* एका योजनेतील धान्य दुसर्या योजनेसाठी वापरण्यात आले आहे का

* अपवादात्मक परिस्थितीत उपरोक्त नुसार धान्य वापरले असल्यास त्यासाठी मा जिल्हाधिकारी यांची मान्यता घेतलीं आहे काय

* जिल्हाधिकारी यांचेकडील मान्यता क्रमांक नमूद करावा

* उपरोक्त नुसार धान्य वापरले असल्यास ते १५/२० दिवसांत मूळ योजनेत पूर्ववत केले आहे का

            आजचं आपल्या तालुक्यातील पुरवठा विभागाला माहिती अधिकार दाखल करून वरिल प्रमाणे माहिती मागा. आपणांस पुरवठा करण्यात येणारे रेशन अन्न धान्य निवडक स्वच्छ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आहे आज आपणांस किडके कूजके अखाद्य. भुंगे मुंग्या वास येणारे अन्न धान्य रेशन दुकानातून वितरण केले जाते. आणि चांगलें अन्न धान्य जात कुठ वाहतूक करणारी वाहने रेशन अन्न धान्य घेऊन कुठे जातात. रेशन अन्न धान्य आपल्या तालुक्याला महिन्याला येत किती ? रेशन दुकानदार पोतयाने धान्य विकतात ते कुठुन येत ? त्यांना गोदाम मधून जास्त धान्य वितरण केल जात कां वाहतूक करणारे हमाल यांचें संगनमताने हा गोरख धंदा चालतो.  

               समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३



        या अधिनियमाच्या अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी व मुख्य जबाबदाऱ्या

             आज रेशन हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जागोजागी दोन नंबर ने सापडणारा रेशन चा तांदूळ टनामधये सापडत आहे हा सापडणारा गोरगरीब जनतेचा तांदूळ गोडाऊन मधून बाहेर येताना त्या त्या विभागातील अधिकारी यांच्या निगराणीत व सहि शिवाय बाहेर आला कसा आणि मार्केट व साॅमिल मध्ये लाखों रुपये किंमतीचा तांदूळ सापडतो याला जबाबदार कोण

             शासनाने विविध विभागांतील अधिकारी व आयुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी. अन्न धान्य वितरण अधिकारी. उप नियंत्रक शिधावाटप. तहसिलदार. यांना खालील प्रमाणे जबाबदारी दिली आहे

(१) विभागीय आयुक्त

  प्रमुख जबाबदारी

विभागातील सर्व जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चया अंमलबजावणी संनियंत्रण करणे त्यांच्या मासिक बैठकीत या योजनेचा आढावा घेणे

(२) जिल्हा अधिकारी

नियंत्रण शिधावाटप मुंबई

प्रमुख जबाबदारी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची प्रभावीपणे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सदर योजनेच्या सुरवातीच्या काळात प्रत्त्येक आठवड्यात बैठका घेवून आढावा घेणे आणि अंमलबजावणी उणिवा निराकारण करणे

(३) जिल्हा पुरवठा अधिकारी

अन्न धान्य वितरण अधिकारी

उप नियंत्रक अधिकारी

प्रमुख जबाबदारी

जिल्हा अधिकारी/नियंत्रक शिधावाटप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चया अंमलबजावणी कारवाई करणे

(४) तहसिलदार/साहयक

अन्न धान्य वितरण अधिकारी

शिधावाटप अधिकारी

प्रमुख जबाबदारी

सदर अधिकारी त्यांच्या पुरवठा विषयक नियमित जबाबदार्या व्यतिरिक्त अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी पुढील जबाबदारी पार पाडतील

(१) पात्र लाभार्थी यादी अंतिम करणे

(२) याद्या प्रसिद्ध करणे

(३) लाभार्थी निवडीबाबत व अन्य अपेक्षांचे निराकरण करणे

(४) रास्त भाव दुकानात विहित कालावधीत धान्य उपलब्ध असेल व अनुज्ञेयप्रमाणे लाभार्थ्यास सर्वसाधारण दर्जाचे (f a q ) धान्य वितरित करणे

(५) भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त झालेलेfaq दर्जाचे अन्न धान्य अंतिमतः लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने रास्त भाव दुकानदारांची मार्गदर्शन पर कार्यशाळा वेळोवेळी घेणे

       आप आपल्या गावात रेशन दुकानदार अन्न धान्य कमी देणे नाव दिसत नाही. थम उठत नाही कारण बारा तास मोलमजुरी करणारे लोक यांच्या हाताला गठ्ठे पडतात त्यामुळे त्यांचा थम उठत नाही तर अशा लोकांना आधार कार्ड ग्राह्य धरुन रेशन अन्न धान्य मिळाले पाहिजे 

        अन्न धान्य वितरणाचा निकष

(१) भूमिहीन मजूर. असंघटित क्षेत्रातील कामगार. बांधकाम मजूर. ऊस तोडणी कामगार. वीटभट्टी कामगार. कोळसा कामगार. हंगामी स्थलांतर करणारे कामगार. 

(२) कातकरी. माडिया. गोंड. आणि कोलमसारखया अतिमागास जमातीचे कुटुंब

(३) अल्प भूधारक. आणि लहान शेतकरी 

(४) ज्या कुटुंबात एक एकर पेक्षा कमी जमीन आहे आणि ज्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे

(५) ज्या कुटुंबात कुटुंब प्रमुखाला गंभीर आजार झालेला आहे

(६) ज्या विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन झालेले नाही

(७) फुटपाथवर. दलदलीच्या जमीनीवर राहणारे बेघर लोक

(८) निराधार महिला. वेश्याव्यवसाय करणा-या महिला. कुटुंब प्रमुख महिला असलेली कुटुंबे. 

(९) तृतीयपंथींची निवड सुध्दा केली आहे

(१०) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब 

वरील प्रमाणे सर्वजण लाभार्थी म्हणून घोषित केले आहे

दिवयांग (अपंग) यांना शासन निर्णयानुसार लवकरात लवकर रेशनकार्ड देणे बंधनकारक आहे आणि ते सुद्धा प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेनुसार देणे बंधनकारक आहे

            वरील प्रमाणे उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण निवेदन मागणी अर्ज. प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अन्न धान्य कृती समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

आज हा संदेश वाचणार या सर्वांनी आप आपल्या जिल्ह्यात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आॅफिस असेलतर त्या आॅफिस ची आजची परिस्थिती काय आहे मंडळ चालू आहे बंद आहे याचा रिपोर्ट मला पाठवा 

       बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ज्या कामगारांनी केली असेल तर सहाय्य कामगार आयुक्त आॅफिस कडून आपणास मॅसेज आला असेल की आपला नोंदणी अर्ज खालील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे तर काळजी करू नका आपण तिथे कामगार नोंदणी केली आहे तेथें जाऊन आपला नोंदणी अर्ज नेटवर ओपन करून रद्द नोंदणी अर्जाची कारणे बघू शकता.

वाचा-

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen...

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA...

कलाकार...


खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा - FDA MUMBAI

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा



मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १५.३.२०२१ रोजी सह आयुक्त (दक्षता) श्री. समाधान पवार यांनी त्यांच्या पथकासह ओमकार ट्रेडिंग कंपनी व मे. शिवय ट्रेडिंग कंपनी, सातिवली, वसई (पु) या दोन खाद्यतेल रिपॅकींग करणाऱ्या आस्थापानंवर छापा टाकला . सदर ठिकाणी खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच खाद्यतेलाच्या रिपॅकींगसाठी जुन्या टीनचा पुनर्वापर होत असल्याचे दिसून आले. खाद्यतेलाच्या काही पाउचमध्ये पाकिटावर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे खाद्यतेल भरले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. सदर दोन्ही आस्थापनांमधून सुमारे ३२,५०,५६८/- रुपये किंमतीचा विविध खाद्यतेलांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या खाद्यतेलांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई घेण्यात येईल. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री ना. राजेंद्र येड्रावकर व मा. आयुक्त श्री. अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त (दक्षता) श्री. समाधान पवार यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. एम.आर.घोसलवाड , श्री. एम.आर.महांगडे, श्री. नि.सो.विशे, श्री. डी.एस.महाले , श्री.वाय.एच. ढाणे, श्री. डी.एस.साळुंखे, , श्री. पी.पी.सूर्यवंशी , श्री. बी.एन.चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अन्न पदार्थ वा औषधे यांच्या गैरप्रकाराबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास ती टोल फ्री क्र.१८००२२२३६५ वर अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त (दक्षता) श्री. समाधान पवार यांनी जनतेला केले आहे.  



वाचा -

रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या किमती नियंत्रित करण्यासाठी हालचाली - FDA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या किमती नियंत्रित करून १५०० पर्यंत कमी करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या हालचाली 

महाराष्ट्र 

राज्यात Covid-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोंबर, २०२० ते जानेवारी २०२१ या काळात रुग्णसंख्या बरीच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी , २०२१ च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे १०,००० नवीन रुग्ण वाढत आहेत. आजरोजी राज्यात ९८८५९ सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात Covid-19 या साथरोगाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारत येत नाही. 

Covid-19 आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी, २०२१ अखेर पर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले त्याचबरोबर रेम्डेसिवीर इंजेक्शन ची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले. फेब्रुवारी, २०२१ पासुन रुग्णालये व रुगणालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली परंतु छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता त्यांचेवर छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले.https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

याबाबत डॉ. राजेंद्रजी शिंगणे, मा.मंत्री, अन्न व औषध प्रशासन व श्री. सौरभ विजय, मा. सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी या प्रकरणी कार्यवाही घेण्याच्या दिलेल्या सुचने नुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुगणालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १३०० रुपयांनी म्हणजे सरासरी १०४०/- रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले. तथापि याबबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर १० ते ३० % अधिक रक्कम आकारून छापील किमतीपेक्षा कमी किमतीत रुग्णास उपलब्ध करीत असल्याचे परंतु बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे. 

त्यामुळे याबाबत मा. आयुक्त , अन्न व औषध प्रशासन , म. राज्य यांनी दाखल घेवून सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन ची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्याशात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरवात केली. यासंदर्भात सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांची दि. ६/३/२०२१ व दि. ९/३/२०२१ रोजी श्री. अभिमन्यू काळे, मा. आयुक्त , अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्यात व तसेच रुग्णालयाची देखील दि. ८/३/२०२१ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील रुग्णांना छापील किंमत आकारीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा प्रशासनाने शासनास सविस्तर अहवाल सादर केला असून शासनाने रुग्णालयांना सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त ३०% जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे.

तसेच याबाबत आज रोजी अन्न व औषध प्रशासनाने रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या सर्व उत्पादकांना सदर औषधाच्या किंमती त्यांच्या विक्री किंमतीच्या जास्तीत जास्त ३० % जास्त आकारून MRP निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिलेले असून लवकरच रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

तसेच रेम्डेसिवीर इंजेक्शन या औषधाची घाऊक व किरकोळ विक्री किमतीतील तफावत बघता व्यापक जनहिताच्या दृष्टीने केंद्र शासनाने औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 अंतर्गत अधिकाराचा वापर करून रेम्डेसिवीर इंजेक्शन १०० mg ची अधिकतम किरकोळ विक्री किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण, , नवी दिल्ली यांना सादर केला आहे. 

वाचा -

सामान्य जनतेचा थोडातरी आर्थिक विचार करा - डॉ परवेज अशरफी AIMIM...

महिला आर्थिक विकास - A. MUNDE ...

मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई -FDA...

Covid-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे अन्न व औषध प्रशासने घेतला हा निर्णय - FDA ...

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य



             भारत संस्कृती प्रिय देश आहे विविध सणवार लग्नकार्य कार्य विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात आपण आपला जुना खेडेगावातील बाजार पाहिला असेल लहान गाव बोटांवर मोजता येतील इतकेच भाजीपाला व अन्य पदार्थ तयार व विक्री करणारे लोक हळूहळू लोकसंख्या वाढत गेली गावांचे रुपांतर शहरात झाले लोकांचे रहाणीमान व जीवनशैली बदलत गेली आणि त्याबरोबर खाण पाण यामध्ये बदल झाल

            आज घरात रोज खाऊन कंटाळा आला असे म्हणणारे शहरातील विविध म्हणजे वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस वेगवेगळे ज्युस मिठाई पदार्थ. बेकरी पदार्थ. मासे. मटण. धाब्यावरचे जेवन. दारावर विकायला येणारे पदार्थ. भाजीपाला. असे अनेक विक्री करणारे आपणास चौका चौकात आपले गाडी लावून विक्री करताना आपणास दिसतात

           अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडून निर्मिती व वाटपासाठी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती परंतु अन्न व उत्पादन मात्र कमी होते अशा परिस्थितीमध्ये अन्न भेसळ मोठ्याप्रमाणात वाढली यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने भेसळ प्रतिबंधक कायदा अंमलात आणला सन १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून नवीन तरतुदी करून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली या कायद्यानुसार भेसळयुक्त अन्न साठवनीची जागा विक्री करण्यासाठी वापरात येणारी स्वच्छ जागा सुरक्षा मालाचा दर्जा. निर्मिती कालावधी. अन्न तयार करताना विकताना स्वच्छ पाणी. झुरळ माश्या किटक. प्रतिबंधक उपाय केला आहे का मांस व मासे चिकन कापण्यासाठी वापरली जाणारी जागा. स्वच्छ आहे का. ? वेटर किंवा कामगार डोक्याला टोपी. कॅप हंडगलोज. मास्क. केस नखे. कापली आहेत कां ? वेटर कामगार रोजच्या रोज आंघोळ टुथ ब्रश व स्वच्छ राहतो का ? मांस मासे चिकन हे कापीव मालाचा दर्जा. ? 



             वरील प्रमाणे सर्व असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात येते आज कोठेही यातील कोणतीही गोष्ट पहावयास मिळत नाही. मासे विक्री करणारे रस्त्यावर बसून विक्री केली जाते मटन मार्केट असते पण त्याला जो माल विक्रीसाठी कापला जातो तेथे. स्वच्छता नाही. कामाला असणारा कामगार दाढी वाढलेली मळकट कपडे नखे वाढलेली. पाणी स्वच्छ नाही. एवढेच नाही जी बकरी कापली जातात त्यांचा दर्जा सुध्दा सुनिश्चित नसतो तरी कोणतीही कारवाई केली जात नाही

           आत्ता वडापाव पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस ज्युस. चायनीज फूड आईस्क्रीम केक आंबोली उत्तापा असे विविध रोजच्या आहारात समावेश होणारे पदार्थ गाड्यांवर उघड्यावर मिळतात त्यात वापरण्यात येणारी साधनसामग्री. मसाले कोणत्या दर्जाचे आहेत माहिती नाही ? तेल विविध केमिकल वापर होताना दिसतो तेल आठ आठ दिवस बदलले जात नाही हे असे सर्वत्र राजरोसपणे सुरू आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सर्वे करणे गरजेचे आहे केंव्हा झाला होता कोणाला माहित ? 

          भाजीपाला फळे विक्री करणारे व उत्पादन करणारे शेतात खतांच्या नावाखाली विविध केमिकल यांचा वापर होताना दिसतो त्यामुळे या भाजीपाला व फळे यातील नैसर्गिक तत्व निघून जाते काही ठिकाणी मी पाहिले आहे की विविध रंगांची फळें आज बाजारात दिसत आहेत पिवळे कलिंगड. काळया रंगाची केळी. लाल कोबी. लवकरात लवकर विकायला यावी यासाठी फळांना इंजेक्शन दिले जाते त्यामुळे आठ दिवसांत विकायला येणारी फळे दोन दिवसांत विकण्यासाठी तयार होतात यामुळे हा भाजीपाला पिके फळे जीवनावश्यक वस्तू असलेमुळे हे आहारात समावेश झाल्याने लोकांना कॅन्सर. ह्रदय विकार. साखर. असे विविध आजार होताना आपणं पाहतो 

             वरील प्रमाणे सर्व व्यवसाय उघड्यावर चालतात त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याचा धोकाही संभवतो धूळ. डास विविध ठिकाणी मैला व विविध घाणीवर बसलेल्या माश्या. व अन्य जीवन घातक रोग प्रसार करणारे किटाणू. यामुळे मलेरिया हिवताप डेंग्यू. कावीळ विषबाधा. संडास उलटी. असे विविध जीव घेणे आजार होण्याचा धोकाही संभवतो

          अन्न व औषध प्रशासन विभागाने या सर्व ठिकाणचा सर्वे करून वेळोवेळी तपासणी केली पाहिजे अस्वच्छता किंवा ग्राहक आरोग्यासाठी अपायकारक कोणतीही घटना वस्तू आढळल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपण ऐकतो आज अमुक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला आणि भेसळ युक्त लाखोंचा माल जप्त केला पण प्रश्न पडतो हा माल गेला कुठे ? एका बाजूने जप्त केला आणि दुसरया बाजूने विक्री करण्यासाठी त्याच दुकानात आला काय चाललंय तुमच्या आमच्या जीवाचा खेळ मांडला आहे. जिल्ह्यात एकच अन्न व औषध प्रशासन विभागांचे आॅफिस आहे मग ११ तालुक्यात हे फिरणार कधी आणि रेड करून कारवाई करणार कधी ? यावेळी प्रत्त्येक तालुक्याच्या ठिकाणी एक अन्न व औषध प्रशासन विभागाचे ऑफिस असायलाच हवे नसेल तर एखाद्या सेवाभावी संस्था युनियन यांना रितसर अधिकार व नियम व अटी या तत्वावर नेमण्यात यावे 

               आपण काय करायले पाहिजे आपण शक्यतो बाजारात उघड्यावर मिळणारे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. कोणताही खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडी हाॅटेल किंवा कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता किंवा बाल कामगार दिसल्यास ताबडतोब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवा कोणतीही खाद्य वस्तू खरेदी करताना निर्मिती व एकसप्रायरी डेट बघा नसेल तर वस्तू खरेदी करू नका 

         रेशन मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे माती खडे किड काटके पिट झालेले धान्य. असे निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य रेशन मधून सुध्दा वितरण केले जाते सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार नाही वरन येतंय आम्ही काय घरांत तयार केलयकाय अशी उद्धट उत्तरे दुकानदारांकडून मिळतात 

         https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d वरील सर्व भेसळयुक्त निकृष्ट. दर्जा. ओला व वाळका. रोज उपयोगात येणारा अन्न धान्य यावर शासन कारवाई करिल तेंव्हा करील आपण सतर्क होऊन आपले जीवन आपणच वाचवू शकतो 

    वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९ 

कामगार नोंदणी संदर्भात

ऑनलाईन नोंदणी करताना वेबसाईट वर प्राबलेम येतं आहे त्यामुळे कामगार नोंदणी करताना कामगारांना नोंदणी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

आमचे नवीन नेमणूक झालेले विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी जिल्हा ठिकाणी असणारे सहायक कामगार आयुक्त भवन येथे निवेदन दाखल करा व ऑनलाईन नोंदणी संदर्भात अडचण मंडळाच्या निदर्शनास आणून द्या




वाचा - 

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या