Showing posts with label आजार. Show all posts
Showing posts with label आजार. Show all posts

पाचही बोट तुपात

 

पाचही बोट तुपात

       .     सर्वांना आरोग्य सेवा हे ध्येय सध्या सर्व स्तरांवर गाठण्याचा प्रयत्न शासन करत आहे मात्र त्या दिशेने कोणतीही सापेक्ष वाटचाल होताना आज दिसतं नाही त्याला सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील खाजगीकरण मग ते विमा कंपन्या खाजगी दवाखाने यांना समान कमिशन बेसवर दिल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय योजना राबविण्याचा अधिकार यामुळे आज वैद्यकीय सेवा अडचणीत अणि सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला न परवडणारा झाला आहे  2018 चया बजेट प्रमाणे जाहीर करण्यात आलेली भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजे नफेखोर विमा कंपन्या यांचें उकळ पांढरे करणारी सरकारी पैशांचा अकार्यक्षम वापर करणारी धुळफेक योजना आहे. सरकारी दवाखाने यांची क्षमता वाढविण्यासाठी सरकार प्राधान्याने पैसा वापरत नाही त्याऐवजी उच्च तंत्रज्ञान असणार्या खाजगी दवाखान्यातूकडून काही ठराविक सेवा या योजने अंतर्गत सरकार विकत घेऊन त्या गोरगरीब जनतेला विकत घेऊन त्या गोरगरीब जनतेला उपलब्ध करून देत आहे अशा धोरणामुळे सरकारी सेवा. दवाखाने सुधारण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा उरत नाही. त्यामुळे सरकारी केंद्रातील मिळणारी सेवा दिवसेंदिवस आटत आणि अपुरी पडत चालली आहे त्यामुळे गोरगरीब जनता सर्वसामान्य माणस खाजगी दवाखान्याकडे वळली आहेत 

           भारतीयांना गरजेप्रमाणे दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा पुरविणे ही व्यवस्था उभी करणे शक्य आहे हे निरनिराळ्या तज्ञांनी ठोसपणे मांडले आहे त्यानुसार येत्या दहा वर्षांत हे ध्येय गाठण्यासाठी कालबद्ध धोरण आखणे गरजेचे आहे आणि ते अमलात आणण्यासाठी (१) आरोग्यावर येणार्या खर्चात १००/टक्के वाढ करा (२) सरकारी आरोग्य सेवेत आमुलाग्र सुधारणा आणि अभूतपूर्व वाढ करणे गरजेचे आहे (३) खाजगी सेवेचे नियमन प्रामाणिकपणे करुन प्रामाणिक सेवेसाठी प्रामाणिक दर या तत्वावर सरकारी खाजगी सेवा गरजेप्रमाणे विकत घेऊन मोफत देण्याचे धोरण घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण. औषधं उत्पादन. वैद्यकीय तपासणी यातील नफखोरी बंद करायची आज नितांत गरज आहे

              आपणं २०२० कोरोना काळ सर्वांनी अनुभवला आहे. त्यावेळी आपण सर्वांनी डॉ यांनी व मेडिकल यांनी कोरोना ग्रस्त असो वा अन्य आजाराने म्हणजे. बी पी.  शुगर. सर्दी पडस. मलेरिया काविळ हिवताप डेंग्यू हाडांचे आजार पोटाचे विकार.  अशा विविध आजाराने ग्रस्त असणारे लोक यांना डॉ लोकांनी कोणतीही तपासणी केली नाही मग आजार विकार न तपासणी करता औषधे पेशंटचया अंगावर टाकणे तोंडाला मास्क असेल तरच दवाखान्यात उपचार. सॅनिटायझर. हॅणगोलज असल्यास उपचार नाहीतर दवाखान्यात प्रवेश सुध्दा दिला नाही. काही वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा  असे मानणारे यांनी चक्क दवाखानयाला कुलप घातली आणि तुमच्या जीवाशी खेळ केला. बी पी   शुगर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना रोज घेण्यासाठी औषध सुध्दा मिळाले नाही.  किडणी प्रामबलम असणारे पेशंट यांना डायलसीस करावे लागते कोरोना काळात दवाखान्यात बेड फुल्ल झाले त्यामुळे अशा रोग्यांना अक्षरशः आपला जीव गमवावा लागला. कोण जबाबदार. करोना काळात येणारा खर्च गोरगरीब जनतेला परवडणारा नाही त्यामुळे शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना कोरोना काळात  दिड लाखांपर्यंत उपचार करण्यासाठी मोफत केली आणि गजब प्रकार उघडकीस आला जशी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यात हजारो कोरोना बाधित रुग्ण सापडायला सुरुवात झाली. दवाखान्यात बेड शिल्लक नाही. आॅकिसजन कमतरता. डॉ नर्स यांची कमतरता. अशा विविध प्रश्नांनी डोक वर काढलं. कोरोना बाधित रुग्ण मरण्याची संख्या डबल होण्यास सुरुवात झाली मयताना जाळण्यासाठी स्मशानभूमी मध्ये जागा कमी पडायला लागली.  अर्धवट जळलेली प्रेताचे लचके कुत्री तोडायला लागली. लोकांच्या मनात आपण मरणार आपण आता जगत नाही अशा विविध विचाराने घर केलं. यावेळी डॉ लोकांनी योजनेचे दिड लाख सोडून दोन अडीच लाख कोरोना पेशंटचे दवाखान्याचे बिल केल औषधे कोरोना काळात वापरले जाणारे औषधांचे कीट आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार त्याची किंमत ७५० रूपये होती पण घाबरलेल्या जनतेला तेच कोरोना काळात विलगिकरण अथवा उपचारा दरम्यान वापरलेल्या औषधांची किंमत ७५०० रूपये लावण्यात आली होती. पेशंट ला लागणारी औषधे डॉक्टरांच्या मेडीकल मध्येचं घेण बंधनकारक करण्यात आले होते. कोणतीही डॉ जेनरिक औषध लिहून देत नव्हता जेनरिक औषध आणण्यासाठी सांगतं नव्हते म्हणजे औषध कंपन्या यांचें कमिशन वेगळ मेडिकल वाले यांचें कमिशन वेगळ अशी लुट करण्यात आली. कोरोना पेशंट जवळ कोण नाही काय उपचार केल माहीत नाही  पेशंटला कोणत औषधं दिल माहिती नाही. पेशंट जीवंत आहे का मयताचे बील चालू आहे माहीत नाही. मनमानी कारभार पडद्याच्या मागे चालू होता आपल्या जिल्ह्यात जे कोणतेही दवाखाने धर्मादाय अंतर्गत उपचार करतात ते सोडून ठराविक नामांकित व्यक्ती यांचेच दवाखाने कोविड सेंटर म्हणून निवडले गेले मग काय सरकार यांच शासकीय प्रशासन यांच मग दवाखान्याचे बील यांचेच 

            हिंदी मध्ये एक म्हण आहे. # आम के आम गुठलियोंके दाम # ही म्हण येथे डॉ यांच्याबाबतीत खरी झालेली आपणांस दिसते कारण पेशंट जीवंत आहे तोपर्यंत औषधांचा आणि त्यांचे काॅट भाडे. योजनेचे पैसे आणि कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तिला दवाखान्या पासून स्मशानभूमी पर्यंत आणण्यासाठी   एक किलोमीटर अंतराचे भाडे  ३००० कोरोना काळात मयत झालेला व्यक्तिला लपेटून पीपी किट यामध्ये घालण्यासाठी २८०० रूपये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व सेवा देणारी सर्व शिषटम डॉ यांचीच होती म्हणजे चारी बाजूंनी जनतेला सरकारला लुटणारे सर्वात मोठें परके चोर नव्हते तर आपल्यातीलच होतें 

          कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला गोरगरीब माणसाला मदत करणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना अखेर शासनाने बंद केली आणि आपले मुख्यमंत्री यांनी दवाखाने यांच्या मनमानी कारभाराला चाफ बसावा म्हणून दवाखान्याच्या उपचार पद्धती नुसार उपचार दर निश्चित केले आणि मग काय अचानकपणे मोठा बदल झाला तो म्हणजे जागोजागी हजारो पटींनी सापडणारे कोरोना पेशंट अचानक कमी झाले कधी कोराना काळात कायम फुल्ल असणारे दवाखाने मोकळे पडले स्मशानभूमी मोकळी झाली. अॅमबुलनस धक्क्याला लागल्या. प्रेत जाळणारी यांचं काम आणि ठेका गेला आणि मग आमच्या ध्यानात आले काय आहे गौडबंगाल म्हणजे जो पर्यंत योजना होती जोपर्यंत मनमानी बील आकारता येत होते तोपर्यंत डॉ व इतर मेडिकल वाले व यांच्यावर अवलंबून असणारे सर्व लोक यांची पाची बोटं तुपात होती आत्ता पेशंट गेल कुठ 

      ‌.    यासाठी शासनाने हे अवलंबण्याची गरज आहे त्याशिवाय डॉ मनमानी कारभार बंद होणार नाही आणि मजल्यावर मजले कोट्यावधी रुपयांची बेनामी मालमत्ता गोळा होणार नाही यासाठी (१) महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेवेच्या हक्काचा कायदा करावा (२) सरकारी आरोग्य खर्चात हनुमान उडी घेण्याची गरज आहे (३) विविध उपाययोजना करून आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे आहे (४) सरकारी केंद्रासाठी औषध खरेदी व वितरण प्रणाली अमलात आणणे आवश्यक आहे (५) आरोग्य मनुष्यबळ धोरण म्हणजे कंत्राटीकरण बंद करणे आवश्यक आहे (६) बिगर आॅलोपथिक उपचार पद्धती मधील दुजा भाव देणे बंद करा (७) महाराष्ट्रात धर्मादाय रूग्णालयात गरिब व कमकुवत थरातील रुग्णांसाठी २०/ टक्के खाटा राखीव ठेवण्याचे बंधन ठेवा (८) महिला आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या (९) सरकारी आरोग्य यंत्रणा आर्थिक दृष्ट्या बळकट करण्याची गरज आहे (१०) आरोग्य योजना कारभार भ्रष्टाचार मुक्त होणे गरजेचे आहे (११) राज्य जन आरोग्य परिषद व जन संपर्क. आरोग्य समिती नेमणे आवश्यक आहे (१२) राज्य आणि जिल्हा स्तरावर आरोग्य सभा असणे गरजेचे आहे (१३) राज्य जन आरोग्य परिषदेमध्ये समाजसेवक स्वयंसेवी संस्था आरोग्य क्षेत्रातील तज्ञ असतील हे पाहणे महत्त्वाचे आहे 

        निसर्ग सुध्दा डॉ लोकांच्या बाजूने आहे कारणं वेळोवेळी वातावरणांत होणारा बदल. अवेळी पाऊस अवेळी कडाक्याची थंडी अवेळी पडणारे आग ओकणारे ऊन यामुळे माणसाचे शरीर साथ देत नाही लोक मोठ्या प्रमाणात विविध शारीरिक आजाराने ग्रस्त आहेत त्यांना दवाखान्यात जाण्या खेरिज पर्याय उरला नाही आज आपल्या गावात तालुका जिल्हा शहर यामध्ये दवाखान्या पुढे आजारी लोकांची रांग लागली आहे मनमानी फि मनमानी औषध दर मग काय लुटच लुटच चालू आहे कोण चाफ लावणार आहे का ? प्रश्न मोठा आहे. त्यातच तरूण पिढी बेरोजगारी शासकीय भरती नाही हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आणि त्यातच निसर्गाचा विविध रोगांच्या माध्यमांमधून घाला यामुळे पूर्णपणे मानसिक विकलांग झाले आहेत शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर येणारी पिढी मतिमंद आणि गुलामच तयार होणार आहे त्याची सुरुवात झाली आहे ती म्हणजे आॅनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विचार करा आत्ता नाही तर कधीच नाही 

  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मनाचा रोग मनाचा रोग

 

मनाचा रोग मनाचा रोग 

                      लहानपणापासून आपल्या कळत नकळत आपण राजकीय अनुभवांना सामोरे जावे लागते कधी एकट्याने तर कधी गटाच्या समूहाच्या स्वरुपात. या अनुभवातून आपल्या देशातील राजकीय व्यवहार कसा चालतो. याबद्दल आपली काही मते बनवतात. राजकारण हा एक सामूहिक व्यवहार आहे हे आपल्या मनावर ठसते. थोडक्यात राजकीय सामाजिकीकरण यामुळे नागरिक बनतो म्हणजे आपल्या राजकीय समाजांचे एक घटक बनतो. नागरिक म्हणून आपल्या अधिकारांची आणि जबाबदारी यांची आपल्याला जाण येते 

           आपण पहिल्यामाणे आपल्या देशात विविध घटकामारफत आपण राजकारणाला सामोरे जातो. निवडणूका. चळवळी. शिक्षण. आणि संपर्क माध्यमे या सरवामारफत आपल्या राजकीय कृतीला चालना मिळते. एक खाजगी व्यक्ती म्हणून असलेलें आपले अस्तित्व थोड्याफार प्रमाणात बदलून एक कार्यकर्ता. एक प्रेशक आणि मुख्य म्हणजे एक मतदार म्हणूनच राजकीय सामाजिक अस्तित्व तयार होते. आपल्या सर्व राजकीय अनुभवामधून आपली मतदानाची कृती घडते. आपल्या देशातील राजकारणाच्या संदर्भात तिला सर्वाधिक महत्व असते. एकीकडे राजकीय कृतीच्या विविध शक्यता आपल्याला जाणवत असतांनाच राज्य संस्थेच्या ताकदिचे स्वरुपही आपल्याला उलगडत जाते. सुरक्षा दले. पोलिस. शासकीय निमशासकीय कार्यालये. अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे केवढे प्रचंड सामर्थ्य शासनाला प्राप्त होते. हे आपण दुरूनच पाहून किंवा अनुभवाने शिकतो. शासनाच्या अनुभव सन्मान आणि गौरवाच्या रुपाने आपण घेतो. एक व्यक्तिमत्त्व म्हणून राजकीय कृती करण्याच्या आपल्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती होणे आणि त्या कृतीं करण्यामधील अडचणी आणि जोखिम यांचें भान होणे असे आपल्या राजकीय सामाजिकीकरणाचे स्वरूप असते या सामाजिकीकरणा मधून आपण नागरिक बनतो याचा अर्थ आपल्या राज्य व्यवस्थेतेचया चौकटीत आपण आपले नागरिकत्व अडकवून घेतो. जसजसा आपणं पौढ वयांत राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो तसतसा आपल्या नागरिकत्वाचा अर्थ आपल्याला अजून कळला नाही

              निवडणूका वयाची अट १८ वर्ष निवडणूकीत वापरली जाणारी तत्वे म्हणजे. पैशाचा वापर. जेवन दारू. गुंडगिरी. बोगस मतदान. उमेदवारांना उचलून नेणे डांबून ठेवणे. मारामाऱ्या. खून. संघटना सहभाग. उपोषण आंदोलने. सभा मेळावे. शिक्षण. प्रसार माध्यमे. जातीयवाद. कुटील खेळ. मला सत्ता मिळावी म्हणून पडेल ते करणारे. केंदिकरण. स्वायत्तता. जमातवाद आणि राष्ट्रीय ऐक्य. लोकप्रतिनिधी विरोधी सरकारी नोकर. अधिकारशाही. प्रदेशवाद. अशी विविध माध्यमे वापरून जनतेला मूर्ख बनवून आपला सत्तेचा हेतू साध्य केला जातो

             सत्ता पैसा मनुष्य बळ हे गोळा झाल्यावर जागोजागी साखर कारखाने. एम आय डी सी. शिक्षण संस्था. बॅंक पतसंस्था सोसायट्या. पतपेढी. अशा विविध संस्था चालू करून गावातील जास्त मतदान असणारे घर. गावांत पत वजन असणारे व्यक्ती. यांना हाताला धरून मुलांना विविध ठिकाणी काम दिले जाते ते तुमच्यावर दया आली म्हणून नव्हे तर फक्त मतदानासाठी. कारणं ज्या ज्या वेळी मतदान लागेल त्यावेळी अशा विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव आणला जातो आमचा उमेदवार तुमच्या गावात निवडून आला पाहिजे मग तो दगड असला तरी नाहीतर नोकरी वरून काढण्यात येईल मग काय एका नोकरदार व्यक्तिच्या मागें कमीतकमी पाच ते सहा मतदान असत हातात असणार्या नोकरिची काळ्जी असते त्यामुळे मनांत नसताना सुद्धा केवळ राजकीय दबापोटी यांची गुलामी करावी लागते. रात्री अपरात्री घराकडे येवून दम देणे. घराची जप्ती काढण्याची धमकी. आरक्षणात जागा घर घालविणयाची धमकी. दारात रस्ता गटर करणारं नाही. घरफाळा पाणीपट्टी डबल आकारली जाईल. आणि सर्वात वाईट दिवस कोणाचे असतील तर. महिला अध्यक्ष. विद्यार्थी संघटना अधक्ष. रिक्षा माल वाहतूक चालक मालक संघटना अध्यक्ष. विविध गणेशोत्सव मंडळ. नवरात्र उत्सव मंडळ विविध युवाशक्ती प्रतिष्ठान. अशा ठिकाणी नेमले जाणारे आणि पदाच्या हव्यासापोटी राजकीय लोकांच्या ताटा खालचे मांजर होणारे यांच्यावर ईकडचा नाही आणि तिकडचा नाही पक्षाचा अध्यक्ष असल्याने कोठेही काम होत नाही कारणं आडवा येतो तो म्हणजे पक्ष बाजूला जाता येईना विरोध करता येत नाही विरोधात बोलता येत नाही असे वाईट दिवस कार्यकर्त्यांवर येणार हे शंभर टक्के

              आपल्या सर्वांना आजच एक महत्वाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे आपण आपल्या समाजातून जमातीमधून आपला घरचा उमेदवार उभा करणे गरजेचे आहे म्हणजे उमेदवार आपला मतदार आपला आणि आपली व्यथा प्रश्न मांडण्यासाठी हक्काचा माणूस मिळेल पण आपण जात जातींची दुश्मन असा प्रकार करतोच परकयाला उचलू लागतो आणि आपल्याला खाली आणतो 

         मुस्लिम समाजाला हक्काचा असा कोणताच पक्ष नाही मुस्लिम मतदान एक गठ्ठा आहे त्यासाठी सुरवातीला काॅग्रेस सरकारने मुस्लिमांची फसवणूक केली ती म्हणजे मुस्लिम मतदान मिळविण्यासाठी हातांचा पंजा हे पक्षाचे चिन्ह ठेवले कारणं मुस्लिम समाजात हातांचा पंजा पुज्य मानला जातो. यातील राहिलेली कसर मुस्लिम मुल्ला मौलवी यांनी धर्माचा प्रसार करतांना ठराविक पक्षाचा प्रचार आपल्या कामातूनच केला आणि समाजात फूट पाडली मुस्लिम जात एकच पण त्यात सुध्दा सिया आणि सुन्नी अशा जमाती तयार केल्या आणि समाजातील एकीला सुरुंग लावला. तो आजपर्यंत सावरला नाही. आजसुद्धा एखाद्या मुस्लिम बांधवांना म्हणलं की आपल्या मुस्लिम समाजांचे हक्क अधिकार सर्व स्वातंत्र्य शैक्षणिक. आरक्षण वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक असे विविध आपले हक्क व अधिकार आपणांस मिळवून देण्यासाठी आपला हक्काचा मुस्लिम पक्ष पाहिजे आणि आहे जर एखाद्या मुस्लिम बांधवांना आपण म्हणलं अशा पक्षाचे ध्येय धोरणे उद्दिष्ट यांचा प्रसार करण्यासाठी पदाधिकारी होणार कां ? तर उत्तर येते की मी अमुक पक्षाचा पदाधिकारी आहे ते काय म्हणतील गावात मुस्लिम संख्या घर कमी आहेत. आमच्या गावात तालुका मध्ये राजकीय वर्चस्व असणारा नेता आमहाला कोठेतरी अडकवील. आम्ही विरोध करू शकत नाही. शेवटी आम्हास हेच मदत करतील. अशी न पटणारी फसवी उत्तरे दिली जातात. की त्या उत्तरांचा कोणताही अर्थ नाही म्हणजे आपल्याला गुलामी करण्याची सवय रक्तातच आहे का ? आपले वर्चस्व आपण प्रस्थापित करण्याची धमक नाही. 

            आजचं माझं मत अस आहे आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील सर्व अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांनी आप आपल्या जातीतील उमेदवार उभा करा आणि निवडून आणा मग बघा सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती. जिल्हा परिषद. व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये. सर्व नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या ठिकाणी आपला माणूस घालवा आणि देशाच्या सर्व सुत्रांच्या चाव्या हातात घ्या. आणि मग सर्व व्यवस्था तुमच्या हातात घ्या त्याशिवाय बदल होणार नाही आणि यामुळे होणारा बदल इतिहास घडवेल कारणं आपल तेवढ मतदान आहे की आपणं सरकार स्थापन करु शकतो 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा.

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा. 

                    गाव छोटी छोटी होती अशा आकांक्षा कमी होत्या कोणीही आजच्यासारखे रोजच बाहेरचं रस्त्यावर गाडीवर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यास जात नव्हते कारण तेवढे आपले चोचले नव्हते आज सर्वत्र गावात तालुका जिल्हा राज्य सर्वच ठिकाणी चौका चौकात वडापाव. चायनीज भेळ. दाबेली. बिर्याणी पाणीपूरी मटन चिकन दुकान. तेल व किराणा विक्री करणारे दुकानें. फिरून खाद्यपदार्थ विक्री करणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. अशी एक नाही अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणारे आज जागोजागी ठाण मांडून बसले आहेत त्यातच यांचेकडून ग्राहकाला मिळणारी वागणूक. मिळणारी स्वच्छता. तशा प्रकारची आहे. 

                आज आपणं वडापाव बद्दल बोलू आपल्या आसपासच काय पण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आज हातावरचे पोट असणारे. दिवसभर काम करणारे राहण्याचा ठिकाणा नाही. असे व दिवसभर वेड्यासारखे फिरणारे. भिक मागणारे. अशी बरीच जनता आणि यांचं एकमेव बजेट मधील खाण आहे ते म्हणजे वडापाव. स्वस्त परवडणारा असा एकच पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रच केंद्र माणल जाणारी मुंबई येथे प्रथम खाद्यपदार्थ म्हणून वडापाव याचा सहभाग असतो

              वडापाव आणि स्वच्छता आणि वडापाव मध्ये वापरला जाणारा कच्चा माल त्याचा दर्जा. काम करणारे कामगार यांचे आरोग्य. याचा आपण कधीच विचार केला नाही आज मी तुम्हाला एका वडापाव गाडीवर घेऊन जातो. चौकाच्या एका कोपरयात गटारवर फरशी टाकून त्यावर गाडी उभी केलेली. सकाळी सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे चालू होतात. पिण्यासाठी बोअरचे पिण्यास अयोग्य असे पाणी. बाजारात कमी दरातील मिरची. सडलेली कोंथिबीर. सर्वात खराब झालेला काळ पडलेला बटाटा. कमीत कमी आठ दिवस न बदलेले खाद्यतेल. अस सर्व असत कामांवर असतो तो बालकामगार. त्याच्या अंगावर फाटलेली कपडे. वाढलेली केस नखे अशी सर्वच खाद्यपदार्थ विक्री करणार्या गाड्यांची परस्थिती आहे. असे सर्व लहान उद्योग सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अशा खाद्यपदार्थ विक्री करणार्या लोकांना नियम अटी घालून परवाने देतात पण सत्यता कोणताही नियम पाळला जात नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणारे मोकाट झाले आहेत. हेच उधोग नाही तर. बार. हाॅटेल. धाबे. घरगुती खाणावळ. यांच्याबद्दल सुध्दा अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना नियम अटी सारख्याच आहेत. पण सत्यता पालन होत नाही मटन चिकन विक्री करणारे दुकानें यांवर स्वच्छता नाही. कामांवर असणारा कामगार त्याचे आरोग्य. स्वच्छता अभाव. कापण्यात येणारे कोंबडी बकरी त्याचा दर्जा. काय. काही दुकानांवर निकृष्ट दर्जाचे मांस विकले जाते. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो अन्न व औषध प्रशासन विभाग यांची मटन मार्केट मधील दुकानांवर छापा टाकला आणि अमुक अमुक किलो निकृष्ट दर्जाचे मांस जप्त केले जप्त केलेले मांस व अन्य पदार्थ कुठे गेले अधिकारी व कर्मचारी यांच्या पोटात. बघा छापा कश्यासाठी टाकला. तुमचे आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी नाही 

          चायनीज एक मोठ खुळ आपल्या डोक्यात आहे घरातील सर्वजण एकत्र बसून चायनीज खातात पण ते कधी शिजवल जात. तेल कोणत आहे. चिकन कसल आहे. चायनीजला कलर लाल आला म्हणजे कोणत केमिकल त्यात वापरल आहे. ते आपल्या शरिरावर काय विपरीत परिणाम करिल याचा आपण कधी विचार करत नाही मग याचा विचार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी तरी केला आहे का ? 

 फळें विक्री करणारे नासकी कुजकी फळे विकली जातात. फळे पिकविण्यासाठी विविध औषध केमिकल वापरले जाते त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे 

         गुटखा. खैनी सिगारेट विडी तंबाखू. अफू चरस गांजा नशेची औषधे. गोळया. पाऊडर. अशी विविध व्यसनाची सवय आपणास आपल्या चौकात चौकात आपल्या घराजवळच्या पानटपरी पासून लागते. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यांच्या जवळ नशेचा कोणताही पदार्थ विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे पण आज सर्वत्र सर्रास नशेच्या पदार्थांची विक्री केली जात आहे कोणताही रोख ठोक नाही यामुळे आपली तरुण पिढी धोक्यात आहे आतातरी अन्न व औषध प्रशासन विभाग कुठे आहे 

              दारूबंदी साठी शासन नुसता आदेश काढते पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आज काही गावांत शाळेच्या भिंतीला लागून आज दारू दुकान आहे ज्या महिलांनी उलटी बाटली आंदोलन केली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणी लोकांनी आंदोलन खुडून काढली. कोणीही काहीही बोलत नाही कारणं ही दुकाने सत्ताधारी यांच्या बगलबच्चे यांचीच आहे याला कोण लगाम घालेल काय माहित नाही 

अन्न आणि औषधे यांचे

 प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले. अन्नभेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-१९५४’, अंमलात आणला. इ.स. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे अन्नात व पेयात भेसळ करण्यास मनाई करण्यात आली. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी; त्यावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे; त्यावर निर्मितीची तारीख, कालावधी व साठविण्यासंबंधीच्या सूचना इ. सर्व बाबी स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

अन्न आणि औषधे यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक विभागात सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा शासनाकडून उभारल्या जातात. त्या ठिकाणी योग्य शिक्षण असलेले प्रशासक व तपासणी अधिकारी नेमले जातात. तपासणी अधिकारी अन्न वा औषधे खरेदी करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. उत्पादनात भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्तीवर किंवा उद्योगावर खटला भरण्याचा अधिकार त्यांना असतो. एखादा ग्राहकदेखील अन्नाची व औषधाची खरेदी करून परीक्षणासाठी ते प्रयोगशाळेत पाठवू शकतो. मात्र ग्राहकाने त्याचा हा उद्देश विक्रेत्याला अगोदर सांगावा लागतो. महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी संस्थाही त्यांचे अधिकारी नेमू शकतात.


केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रशासनाचे नियंत्रण केले जाते. आरोग्य सेवेचे महासंचालक हे प्रशासन विभागाचे अध्यक्ष असतात. इतरही सदस्य या समितीवर असतात. अन्न व औषध परीक्षण यांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयीचा कायदा १९४० मध्ये अंमलात आणला गेला. १९६२ मध्ये सर्व प्रकारची प्रसाधने या कायद्याखाली आली. अशा कायद्यामुळे संपूर्ण भारतात औषधे व प्रसाधने यांची निर्मिती, साठवण, वाटप व विक्री यांवर नियंत्रण आले. ग्राहकांना प्रमाणित औषधांचा पुरवठा योग्य तर्‍हेने व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश असतो. इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ हार्मोनायझेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविते.

      ‌. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने विविध विभाग नेमले आहेत त्यात प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभाग. अन्न सुरक्षा अधिनियम. असे विविध विभाग आपल्यासाठी आहेत यामध्ये आपणांस काही चुकीचे आपल्या आरोग्यास हानिकारक अपायकारक असे वाटत असेल तर आजच आवाज उठवा आणि त्याची तक्रार संबंधित ठिकाणी करा आरोग्य वाचवा शासनाला जागवा. 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचेकडून शिराळा तालुक्यातील सार्थ निवड कामांची आवड सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे धडाडीचे नेतृत्व. श्रीमती सौ अनिता विजय धस यांची युनियनच्या. शिराळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE

 रोग मोठा का ? माणूस



           मानव आहे म्हणजे तो आजारी पडणार. पूर्वीच्या काळात आत्ता पेक्षा भयानक आजार साथी होत्या  मोठें मोठें रुग्णालय दवाखाने रक्त लघवी तपासणी केंद्र नव्हती. एक्सरे सारखी सुविधा उपलब्ध नव्हती  काही अपघात झाल्यास फॅकचर प्लास्टर. सारखी सुविधा उपलब्ध नव्हती  बीपी. साखर. मधूमेह. कॅन्सर. असे महाभयंकर महामारी सारखें आजार नव्हते. कारणं असतील तर त्यावेळी त्यांची नावे सुध्दा वेगळी असतील. काही काही आजार त्यावेळी हकीम. वैध. जंगलातून विविध जडीबुटी आणून त्यापासून विविध आणि प्रभावी औषध तयार केले जात होते माणसांची नाडी बघून आजार सांगणारे  गावठी डॉ होते जनसेवा म्हणून उपचार करण्याची वृत्ती होती. 

              आपण एकूण आहे प्लेग पटकी सारखी महामारी आपल्या पूर्वजांवर आली होती त्यात  हा आजार उंदीर या प्राण्यांच्या अंगावर असणारी पिसू चावली की माणसाला. ताप येवून दोन ते तीन दिवसांत माणूस मरत असे. त्यावेळी उंदर सुध्दा जास्त असायची कारण घर मातीची. धान्य मुबलक साठवण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही धान्य असल्यामुळे उंदरांची संख्या जास्त घरांवर पाला पाचोळा असे छप्पर असायचे. प्लेग पटकी सारखी साथ आली की गावच्या गावं मृत्युमुखी पडायचे एकाला दहन केले की दुसरा मृतदेह तयार असायचा. असे एक नाही अनेक दिवस चालायचे. त्यावेळी.अलगीकरण  लाॅकडाऊन सारखी फसवी व्यवस्था होती का ? त्यावेळी लोक आपल्या इच्छेनुसार अलगीकरण करत होते ते म्हणजे गाव सोडणे गावाशी कोणताही संबंध नाही पाहिजे तेवढं अन्न धान्य जनावरे घेवून डोंगरात वास्तव्य करत होते  त्यामुळे गावातील उंदरांची संख्या कमी होण्यास सुरुवात होत होती  त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगलीच मदत होत होती लोकांच्या मनात बदल झाला रोग सुध्दा बदलले सुख सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने विविध गंभीर आजार निर्माण झाले त्यात

       एड्स. काविळ डेंग्यू. मलेरिया हिवताप. घटसर्प क्षय धनुर्वात असे एक नाही अनेक रोग व्हायरस निर्माण झाले लोकांचे खाणपान बदलले. राहणसाण बदलले विविध व्यसने  तंबाखू गुटखा खैणी पान मसाला शासनाने बंधनं घालून सुध्दा कोठे जागा मिळेल तिथे थुंकणे या थुंकी वर बसणारया विविध माशा डास रोग पसरविण्याचे एक मोठे माध्यम आहे आपले रस्त्यावरचे उघडे खाद्यपदार्थ खाणे यामुळे सुध्दा विविध आजार आपणास होतात 

        आज एक नवीन व्हायरसने जवळपास दिड वर्ष महामारी सारखें थैमान घातले आहे  श्वासोच्छ्वास घेणे. संपर्क.  गर्दित जाणे.  मांस मासे अंडी यामुळे याचा प्रसार होतों असे सांगितले जाते या व्हायरस रोगाने एखादा व्हायरस रोगाने बाधित झाल्यास. त्याला. अलगीकरण करणे. त्याचा इतरांशी संपर्क टाळणे. सॅनिटाईजर. मास्क व्हायरस रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी औषध उपचार असे विविध उपाययोजना करण्यात येतात त्यातून हा  व्यक्ती मृत झाल्यास त्याला स्पर्श करायचा नाही. त्याची अंत्यविधी सुध्दा करण्यास आपणास परवानगी नाही. दवाखान्या पासून स्मशानात स्मशानभूमीत. मृतदेहाची विटंबना झालेली आपण बघितली आहे. काही काही मृतदेह कुत्र्यानी लचके तोडले. काय माणसांचे जीवन आहे हे आपल्या ध्यानात आले नेऊन दहन करेपर्यंत फक्त होणारे बील भरण्याचा आपणास अधिकार आहे 

                  आपल्या रक्तातील व्यक्ती. आपले मित्र. सगेसोयरे. यांना आपणं असा व्हायरस रोग येण्याअगोदर दवाखान्यात बघायला जात होतो  त्याची विचारपूस करत होतो. त्याला मदत करत होतो  एखादा मृत्युमुखी पडल्यास त्याचे सर्व अंत्यविधी कार्यक्रम समाज रितीरिवाज प्रमाणे करत होतो 

           आज काळ वेळ बदलली आणि आपले महणनारे. आज आपल्यापासून लांब होत आहेत व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तिकडे कायतरी भयानक आजार झाला आहे अशी मानसिकता तयार करून समाज पाहत असतो कायम जवळ असणारे आज कोण जवळ येत नाही बोलत नाही अशी वागणूक बाहेरचे देण्यातच पण मी पाहिले आहे की व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याची घराची लोक सुध्दा वाईट आणि एक वेगळ्या प्रकारे बघत असतात की त्या रोगी माणसाला रोगापेक्षा या वागणूकी मुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि मनोधैर्य खचते आणि आजारापेक्षा  या वागणूकीने आणि रोगाच्या दहशती मुळे मरताना आपण पाहिले आहे. रोगांचे भांडवल झाले जागोजागी रुग्णालये तयार झाले 

      मानवता हाच खरा धर्म आहे रोग आत्ता आला आहे माणूस अगोदर आहे म्हणून मानव धर्म श्रेष्ठ करा रोगी लोकांना हीण वागणूक देऊ नका त्यांना धीर द्या कारणं कोणी कोणाचें दुःख वाटून घेत नाही सुख वाटून घेऊ शकते. रोगी लोका बरोबर सकारात्मक विचारात बोला. त्यांना त्या आजाराबरोबर लढण्याची प्रेरणा द्या मदत करा कारणं माणसांपेक्षा रोग मोठा नाही आपणांस माणूस हवा आहेे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबासाठी एप्रिल ते मे दोन महिन्यांचे. गहूं आणि तांदूळ मोफत वाटण्याचा शासनाचा निर्णय

माहिती अधिकार आत्ता माहिती अधिकार दाखल केल्यानंतर ३० दिवस वाट पाहण्याची गरज नाही कारण माहित अधिकार कायदा २००५ नुसार शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार १० दिवसांत संबंधित माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे

भूक भूक भूक -Humger Hunger..

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

"

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या