Showing posts with label Islam. Show all posts
Showing posts with label Islam. Show all posts

इस्लामची सामाजिक राजनैतिक चर्चा.

 



मदिनेत आगमन (१६ सप्टेंबर ६२२)


पैगंबर साहेब मदिनेत दाखल झाले तेव्हा तेथे एक प्रकारची सामाजिक आणि राजनैतिक चर्चा सुरू झाली मदिने चे आर्थिक नेतृत्व ज्यू लोकांच्या हातात होते तेथील दोन कबिले ' औस ' व ' खजरिज ' यांच्यामध्ये वर्षानुवर्षे टोळीयुद्ध चालायचे तसेच दांभिकांचा सरदार अब्दुल्ला बिन उबै बिन सलूल मदिने चा बादशा बनण्याचे स्वप्न पाहत होता अशावेळी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांच्या मदिनेत आगमन तेथील सामाजिक आणि राजनेतिक वातावरणात खूप बदल घडून आणणारे होते मदिने तील जनतेची विचारसरणी एकदम बदलली आणि अनेक शिष्टमंडळे पैगंबर साहेबांना येऊन भेटू लागली.

त्यांना प्रेषित साहेबांचा एकच प्रश्न होता आणि त्यांचे एकच उत्तर होते आम्हास मदिनेत शांतता हवी आहे पैगंबर साहेबांनी त्यांना सुचविले की तमाम कबिले यांच्या सरदारांना एकत्रित करा आपापसात सल्लामसलत करून समस्येचे निराकरण केले जाईल मदिने तील सर्व धर्मीय लोकांचे धर्मगुरु आणि कबीर यांचे सरदार 'सखीफा बनू सअदा' येथे एकत्रित आले त्या लोकांमध्ये ज्यू, ख्रिस्ती मूर्तिपूजक, निर्वासित, नास्तिक, मदिने तील अन्सार मक्के तील मुहाजिर तसेच इब्राहिम व सुद्धा उपस्थित होते तेथे प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते प्रत्येक व्यक्ती प्रकटपणे बोलली पैगंबर साहेब म्हणाले एका व्यक्तीने बोलावे आणि ते एकाने लिहून काढावे लोक स्वयंस्फूर्तपणे म्हणाले येथे आपल्यापेक्षा बेहतर व श्रेष्ठ कोणीच नाही आपण म्हना आणि आम्ही त्याला अक्षरबद्ध करीत आहोत हेच लिखाण नंतरच्या इतिहासात जगातले सर्वप्रथम लिखित संविधान म्हणून ओळखले गेले.

  इस्लामी इतिहासात या सनद ( charter) ची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे ज्याला 'मिसाके मदिना' मदिने चा करार म्हणून संबोधिले जाते. विविध पश्चिमात्य विद्वानांनी आणि इतिहासकारांनी या चे मनःपूर्वक कौतुक केले आहेत. काही विद्वानांनी याला जगातील पहिली मानवाधिकार सनद म्हणून संबोधिले आहे, जी मागील शतकात राष्ट्रकुल (Common wealth) आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा *(UNO)* जाहीरनामा तयार होण्यास आधारभूत ठरले प्रसिद्ध इंग्रजी इतिहासकार सर विलियम या करा नाम्याचे अनुवाद करताना लिहित आहेत की हे सनद मोहम्मद (स)च्या वतीने मुसलमानांच्या दरम्यान म्हणजे कुरेश आणि मदिना (यसरिब) चे मुसलमान आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या दरम्यान ज्याचा संबंध कोणतेही जमातीशी असो जो कोणी आमच्याबरोबर एकनिष्ठ आणि हे सर्व मिळून उर्वरित (जगाच्या) तुलनेत एक राष्ट्रकुल आहेत मुसलमानां करिता युद्ध आणि युद्ध बंदीच्या काळात काही विशेष अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत.त्यांच्यापैकी कोणालाही या गोष्टीची परवानगी नसेल की ते या करारात सामील असलेल्या इतर धर्मीय अनुयायांच्या शत्रू बरोबर युद्ध अथवा तह करू शकतील जे ज्यू आमच्या राष्ट्रकुल सोबत निगडित आहे ते सर्व शारीरिक अथवा मानसिक मानहानी पासून सुरक्षित राहतील. त्यांना स्वतः आमच्या लोकांसारखे अधिकार प्राप्त असतील आणि त्यांना सर्व प्रकरणात बरोबरीचा दर्जा प्राप्त असेल ते सर्व यहुदी जे मदिनेत राहतात मुस्लिमांन सोबत संयुक्त राष्ट्रकुल स्थापनेत सहभागी होतील आणि ते सर्व आपापल्या धार्मिक विधींची तशाच प्रकारे उपासना करतील ज्याप्रकारे मुस्लिम करतात ज्यू सोबत ज्या कबिल्यांचा करार झाला असेल त्यांना सुद्धा संरक्षण आणि स्वातंत्र्य प्राप्त असेल. जे कोणी राज्यात बंडखोरी करील किंवा राष्ट्र कुलातील राज्याविरुद् शत्रुत्व द्रोह पसरविण्याचा प्रयत्न करेल मग तो अगदी प्रेषित पुत्र असला तरी संयुक्त राष्ट्र कुलातील सर्व नागरिक त्याच्याविरुद्ध एक होतील. ही सनद लागू होणाऱ्यांसाठी मदीना हे एक पवित्र हिंसा मुक्त (हरम: आश्रयस्थान) आहे की या राष्ट्रकुलआ मध्ये एखादा वाद किंवा मतभेद निर्माण झाला असेल तर तो निर्णयासाठी अल्लाहकडे अल्लाह च्या प्रेषितकडे सोपविला जाईल."(The religion of Islam : by A.Galwash p. p. 50)


मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?

लेखक : अनिस चिस्ती

पोस्ट : फिरोज शेख (अहमदनगर)

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching


 


कॉम्रेड एम.एन रॉय यांनी आपल्या Historical Role of lslam( इस्लामचे ऐतिहासिक योगदान )या ग्रंथाच्या माध्यमातून द्वंद्वात्मक भौतिकवादी दृष्टिकोनातून इस्लामच्या राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारे विवेचन केले आहे. इस्लाम हे धर्म वेड्या व हिंसक लोकांची एक चळवळ होती व यातून त्यांना यश मिळाले असे भाष्य केले जाते व इस्लाम हा तलवारीच्या जोरावर लादला गेला आहे. असे विचार रूढ़ झाले आहेत. या मतांचे व या लबाडीचे खंडन करून इस्लामच्या वाढीसाठी कोणते घटक करणींभुत होते याची मीमांसा केली आहे. रॉय मते इस्लाम वाढी साठी समतावादी प्रेरणा कारणीभुत आहे ज्यामुळे इस्लाम जगभर पसरला आहे. 

 रॉय यांचे मूळ ग्रंथ इंग्रजीत आहेत व आपल्याकडे हे वाचले जात नाही. अलीकडे प्राध्यापक सुभाष भिंगे यांनी याचे अनुवाद केले व आज हे वाचकांना उपलब्ध आहे. रॉय हे कम्युनिस्ट व भिंगे हे ख्यातनाम लेखक यांनी हे ग्रंथ संपादित केला आहे यावरून विषयाचे गांभीर्य लक्षात येईल.रॉय यांनी हा ग्रंथ 1936 मध्ये तुरुंगात असताना लिहिला आहे मार्क्सवादी व्यक्तीने इस्लामवर लिहिणे हे अनेकांना नवल वाटेल परंतु तत्कालीन खोट्या समजुतींचा पर्दाफाश करण्यासाठी हे लिखाण लिहिणे भाग होते.

आजही इस्लाम बाबत इतर धर्मीयात गैरसमजुती आहेत ते या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच कमी होतील.

 त्याचा उद्देश इस्लामचे गोडवे गाणे नव्हे भारतीय मार्क्सवादाचे जनक असणारे एम एन रॉय यांना कोणत्या धर्माचे गुणगान करण्याची आवश्यकता नव्हती परंतु वास्तव व सत्य मांडने हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले व या ग्रंथाचे लेखन केले.

 

इस्लामच्या वाढीसाठी कारणीभूत इस्लामच्या वाढीच्या कारणांची चर्चा करताना ते म्हणतात की " इतरांना सामावून घेण्याची, वृत्ती विश्वव्यापक प्रेरणा, लोकशाही प्रणाली आणि इस्लामचा एकेश्वरवाद हे विचार अरबांच्या भौगोलिक परिस्थिती ने दिलेली देणगी आहे."(७५)

इस्लामच्या अनुयायांनी विजयानंतर रक्तपात व इतर धर्मियांचे धार्मिक अधिकार हिरावून घेतले व त्यांना धर्म स्वीकारला किंवा मृत्यु असे दोनच पर्याय ठेवून क्रुरतचे दर्शन दिले असे जे बोलले जाते व आजही समाजात हे विचार रुजले आहे व हे विचार खूप द्वेषाशाचे रूप धारण करते. परंतु वास्तविक असे नाही इस्लामच्या उदयाचा काळ आम्ही लक्षात घेतला असता तो काळ प्राचीन काळाचा शेवटचा भाग होतात लढाया होणे साहजिक आहे परंतु कशासाठी? व का? झाली यावर हे लक्ष देणे भाग असते.

 विजया नंतर पराभुतांना,शरणागतांना तुम्ही कोणती वागणूक देता यावरून शिकवणीचे सार लक्षात येते

 "जेरूसलम ने शरणागती पत्करल्यानंतर उमर खलिफाने पराभूत नगरवासयांची मालमत्ता पूर्ववत त्यांच्या ताब्यात दिली. त्यांना त्यांच्या उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य दिले"(८३)

 या उलट ख्रिश्चनांनी ताबा मिळवला त्यात त्यांनी कत्तल केली आहे

गिबन या जगप्रसिद्ध इतिहासकारांनी असे म्हणटले नाहीतर पुराव्यानिशी सिद्ध केले आहे की हजरत मोहम्मद पैगंबर(स) यांनी ख्रिश्चनांना व्यक्तिगत संरक्षण पुरवले होते. त्यांच्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीचे संरक्षण केले त्यांना आपापल्या धर्मानुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.पैगंबरांचे आचरण व त्यांची शिकवण ही सबंध मानवजातीसाठी उपयुक्त होती व आहे तरी आज काल काही द्वेषपूर्ण आक्षेप घेऊन चरित्र मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या प्रवृत्तिच्या लोकांना आपल्या लिखाणातून रॉय चांगलीच चपराक दिली आहे.


मी प्रेषितांना सर्वप्रथम सुधारक म्हणून पाहतो सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून पाहता अशी कोणतीच कुप्रथा नाही ज्याचा विरोध केला नाही. विरोध दर्शवला नाही तर त्या प्रथेचे उच्चाटन केले. या यासंबंधी एक लेख वेगळा लिहावे लागेल. इस्लाम मध्ये केवळ धार्मिक शिकवणी नाहीं फक्त धार्मिक गोष्टींना महत्त्व दिले नसून इहलोकी व पारलौकिक जीवन यांचा अभ्यास करण्याचीही मुभा दिली आहे. आम्हाला इस्लाम मध्ये खगोलशास्त्रज्ञ व यावर चिंतन करणारेही निर्माण झाले याचा विसर आम्हाला पडू नये. आम्हा केवळ पारलौकिक स्वर्ग-नर्क धर्मग्रंथ याचाच अभ्यास करावा असे सांगत नाही. इस्लामी इहलौकीक व पारलौकिक या दोन्ही पातळीवर मानवी जीवनाची वाटचाल व्हावी असे सांगतो.इस्लामिक परंपरेत विद्वानांना व त्यांच्या विद्वत्तेला तोटा नाही. परंतु या प्रेरणा घेतल्या जात नाही आज धर्म व विज्ञान यापासून व्यक्ती दुरावला आहे. एकतर खुप अभिमान किंवा न्युंनगड आहे. 


 या जगात कुठेही जाऊन अभ्यास करावा या बुद्धीच्या व तर्काच्या आधारे निसर्गातील नवनवीन गोष्टींचा अभ्यास करावा. एकंदरीत तर्क,चिकित्सा या आधारे मानवी जीवन सफल बनवावे. प्रेषित सर्व प्रथम येथे शिक्षण घेण्यासाठी पुढे या म्हणतात. प्रेषितांनी सर्व प्रथम शिक्षणाचा संदेश दिला.

 "ग्रीकांच्या वैभवसंपन्न ज्ञानाचा वारसा अरबांनी चालवला आहे . "वैज्ञानिक संशोधनाचा पितामह रॉजर बेकन हा अरबांचा शिष्य होता, होमबॉल्ट मते अरब हेच भौतिकशास्त्राचे खरेखुरे संस्थापक होत."(११०)

इस्लामी परंपरेत तत्त्वज्ञानाची एक दीर्घ परंपरा होती. अलकाजी,अलहसन,अवेसीना,अलफराबी, अबुबकर,अलगजाली असे शेकडो नावे सांगता येतील हे तत्त्ववेते बुद्धीप्रमाण्यावादी होते त्यांनी इस्लामी परंपरेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. इस्लामिक परंपरेत ज्ञानाच्या सर्व कक्षा खुल्या होत्या. विद्वानांना महत्त्व प्राप्त होते विद्वानांचे ही धर्म कधी विचारले जात नसेत. "मायदेशातून पलायन करून आश्रयासाठी भटकणाऱ्या     

परकीय ग्रीक विद्वानां बगदादच्या खलिफाने स्वीकार केले. त्यांच्या अश्रद्ध ज्ञानाने आणि प्रतिभेने खलिफा इतका प्रभावित झाला होता.की त्याने ना कुरान पर्याय ठेवला ना तलवारीचा. त्यांने केवळ संरक्षण नाही तर विद्वत्तेची कदर केली त्याशिवाय अनेक विद्वानांचे तत्वज्ञान अरबी भाषेत भाषांतरीत केले. बहुतांश विद्वान नास्तिक होते तरीपण त्यांनी आपला धर्म लादला नाही."( ११२)

"आधुनिक युरोपने अरबांकडून वैद्यक शास्त्र व गणिताचे ज्ञान तर घेतले सोबत निसर्गाचे ज्ञान नियम उलगडून दाखवणारे व मनुष्याची दृष्टी विशाल बनवणारे खगोलशास्त्राचे ज्ञान ही उत्साहाने निर्माण केले होते"(११९)


  गणितीय सिद्धांतांना जे मोल प्राप्त झाले त्याचे स्त्रोत अरबस्तान होते परंतु अरबांनी स्वतः होऊन त्याचे श्रेय विनम्रतापूर्वक ग्रीक तत्त्ववेताना दिले. इस्लामी परंपरेचे इतिहासात एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले काळाच्या ओघात मुस्लिम समाजला याचा विसर पडला आहे।


---संदर्भ _इस्लामचे ऐतिहासिक योगदान

लेखक:कॉम्रेड एम.एन रॉय 

अनुवाद:प्रा.सुभाष भिंगे

    

प्रेषितांची शिकवण यावर उद्या एक दिर्घ लेख किंवा दोन लेख पोस्ट करेन आपल्या काहि सुचना असल्या कमेंट करा किंवा खालील नंबर वर फोन करा. नक्कीच विचार करेन.


©समाज साथी

Najir Shaikh         

Nanded

9561991736

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

गिधाडे...

भूक भूक भूक -Humger Hunger...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh

मुस्लिमांची कट्टरता -  मुजाहीद शेख 




अत्यंत विचारपूर्वक आणि धुर्तपणे मुस्लिमांशी कट्टर हा शब्द जोडण्यात आला आहे, परिणामतः या देशात कट्टर म्हणताच केवळ मुस्लिमांची प्रतिमा उभी राहते. 

या देशात विविध समाजातील, जाती धर्मातील लोक दाढी राखतात, विशेषतः शीख धर्मातील; तसेच अनेक मराठा बांधव शिवप्रेमापोटी दाढी राखतात; परंतु मुस्लिमांनी दाढी राखणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्माचे लोक डोके झाकतात, विशेषतः शीख लोक धार्मिक परंपरा म्हणून पगडी घालतात; परंतु मुस्लिमांचे टोपी घालणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्मातील लोकांचे विविध पेहराव आहेत आणि त्यांना तसे पेहराव करण्याचे स्वातंत्र्यही आहे. उदा. उदा. दक्षिणेकडचे अनेक लोक अगदी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले तरीही लुंगीच घालतात. काही धर्म विशेषशी संबंधित असणारे लोक निर्वस्त्र राहण्यास प्राधान्य देतात. त्यांचे विधिमंडळात व्याख्यानही आयोजित केले जाते. मात्र मुस्लिमांचा पोशाख म्हणजे कट्टरता.

या देशात ख्रिस्ती नन सर्वांग झाकणारा पोशाख परिधान करतात. चित्रपट, मालिका आणि धारावाहिकांमधून त्यांना अत्यंत पवित्र, सोज्वळ म्हणून सादर केले जाते. मात्र मुस्लिम स्त्रियांचा बुरखा म्हणजे कट्टरता.

या देशात सर्व जातीधर्माचे आपापले धार्मिक स्थळ आणि ज्ञान केंद्रे आहेत. सर्व जातीधर्मातील लोक आपापल्या धार्मिक स्थळांना आणि ज्ञान केंद्रांना भेटी देतात. मात्र मुस्लिमांचे धार्मिक स्थळ मस्जिद आणि ज्ञान केंद्र मदरसा म्हणजे कट्टरता.

Family Health Survey च्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 75 टक्केपेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत. विशेषतः भारतातील क्षत्रिय आणि शूद्र वर्ग पूर्णतः मांसाहारी आहेत. लपून छापून मांसाहार करणारे वैश्य आणि ब्राह्मणही काही कमी नाहीत. तरीही केवळ मुस्लिमांचा मांसाहार म्हणजे कट्टरता.

या देशात प्रत्येक जातीधर्माची अभिवादानाची आपली एक पद्धत आहे. ते सर्व एकमेकांना त्यांच्या परंपरेनुसार अभिवादन करतात. परंतु मुस्लिमांनी अन्य मुस्लिमांना 'सलाम अलैकुम' म्हणणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध समूहांच्या विविध मातृभाषा आहेत. त्या भाषांना जपण्याचे त्यांना स्वातंत्र्यही आहे. तसेच त्या भाषांचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याचा संवैधानिक हक्कही आहे. मात्र मुस्लिमांनी उर्दू भाषेबद्दल प्रेम दाखवणे म्हणजे कट्टरता.

मुळात 'कट्टर'तेचे लेबल लावून मुस्लिमांची अभिव्यक्ती दाबण्यात आली आहे. मुस्लिमांच्या मुस्लिम म्हणून व्यक्त होण्याला अत्यंत धुर्तपणे कट्टरता ठरविण्यात आले आहे. मुस्लिमांचे मुस्लिमत्व जपणेच कट्टरता ठरविण्यात आले आहे. असे करून अत्यंत धुर्तपणे मुस्लिमांची अभिव्यक्ती मुस्लिमांकडून काढून इतरांच्या हाती देण्यात आली आहे. आता ते सांगतील तीच मुस्लिमांसाठी पूर्वदिशा असेल. त्यांच्या विचारांशी मुद्देसूद मतभेद करून त्यांचे खंडन करणारा कोणी मुस्लिम उभा राहत असेल तर म्हणे कट्टरता. का? कारण मुस्लिम आपली अभिव्यक्ती त्यांच्याकडून परत घेऊ पाहतोय.

मुजाहीद शेख 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=201589934750595&id=100046987687696

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER .....

इतिहास किती विक्रुत कराल ?...


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या