Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

सत्तेपुढे शहाणपण नाही

 


सत्तेपुढे शहाणपण नाही 

       ‌‌. साम दाम दंड भेद हे समिकरण आपणांस माहीत आहे पण हे ज्यांच्याकडे असतें ते सत्तेत असायला हवे. जिथे पैसा आहे तिथे बुध्दी नाही. जिथे बुध्दी आहे तिथे पैसा नाही. जिथे पैसा आणि सत्ता आहे तिथ जनसमुदाय असतोच. एकीकडे समाजप्रबोधन ऐकणारे बोलाविले तरी येथ नाहीत. सागराला पाण्याची गरज नाही. गर्भश्रीमंत लोकांना पैशांची गरज नाही. तरी सुध्दा निसर्गनियम आहे जिथे आहे तिथेच जात कारणं त्याला आहे सत्ता. निसर्गनियम आहे डबरा असेल तिथेच पाणी साठते म्हणजे सत्ता माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाईल सांगता येत नाही मोकळे भुखंड. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव. मोठ मोठे कारखाने. मोठे मोठ्या पतसंस्था बॅंका. हे सर्व सत्ता असणार्या लोकांचेच आहे. गोरगरीब जातो तो फक्त कर्ज काढायला आणि व्याजात मरायला कारणं सत्ताधारी लोकांचे म्हणने असते सर्वसामान्य गोरगरीब हे किड असतात मतदान आल की हजार पाचशे मटन दारु दिली की आपण पाच वर्षांत काही विकास काम जरी नाही केल तरि आपण निवडून येणार म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब यांना मुर्ख समजल जात आणि हे कश्यामुळे फक्त आणि फक्त सत्तेमुळे 

   . आपल्या गावातील शहरातील राजकारणाची थोडी जास्त माहिती आपल्याला कळते. पण देशाच्या राजकारणाविषयी वर्तमानपत्र. नभोवाणी. दुरदरशन यांच्यामुळे वाढिव माहिती आपणास मिळते. बहुतेक वेळा अगदी जुजबी वरवरची माहिती असते. आणी तेवढ्या माहितीवर आपण खुश असतो. राजकारणाची वैशिष्ट्य. व्यक्तिमत्व. लकबी. समाजातील पत. लोकांच्या शी व्यवहार. थोडेफार व्यक्तिगत जीवन असे या वरवरचे माहीतीचे स्वरुप असते. राजकाराणातून घेण्यात येणारे निर्णय. त्यात गुंतलेले आर्थिक प्रश्न. भ्रष्टाचार. दहशतवाद. अडकलेले शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी. यांची सहसा आपणांस माहीती व जाणिव नसते. राजकीय पक्षाचे पुढारी आमदार खासदार मंत्री नेते पक्षाची निशानी याचा एक गठ्ठा मतदानासाठी चिन्हांचा होणारा वापर यांची माहिती असली तरी पक्षाचे कार्यक्रम धोरणे या गोष्टी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला माणसाला कंटाळवाण्या वाटतात म्हणजेच राजकारण व नेते याबद्दलची माहिती बहुतेक वेळा ढोबळ स्वरूपाची असते आपण या माहीतीकडे कसे अणि काय विचार करून पाहतो ? एक तर राजकारणी प्रक्रियेत निर्णय कसे घेतले जातात. त्या निर्णयाचा तपशील अहवाल यामध्ये आपणांस रस नसतो. थोडा चौकसपणा म्हणून आणि गंमत म्हणून आपण पुढारी यांच्यातील भांडणे. एकामेकावर भ्रष्टाचार आरोप. विविध घोटाळे. जातीयवाद. विकासाचा अभाव. यापुढे जाता जाता ढोबळ माहीतीच्या आधारे राजकारण. राजकीय पक्ष नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते ठरत जातात सोप्या माहितीवरून आपण राजकारण्यांची सोपी उत्तरे मनाशी तयार करतो. याच मुख्य परिणामी म्हणजे आपल्या दृष्टीने राजकारण हे मुख्यतः व्यक्तिकेंद्रित असते मग राजकारण्यांचे स्पष्टिकरण देताना आपण सहज बोलून जातो. अमुक भागाचा विकास अमुक नेत्यांमुळे झाला. या नेत्यांच्या आडमुठ्या पणामुळे हा पक्ष फुटला. अमुक नेत्यांमुळे सत्ता गेली. म्हणजे राजकारण हा आपल्या आयुष्याशी निगडीत व संलग्न असा एक गंभीर घटक आहे असे न मानता बहुतेक तो शिळोप्याच्या. गप्पांचा विषय. हास्यविनोद. यांचाच विषय माणून आपणच आपली फसवणूक करत असतो. म्हणूनच आपण आपले मित्र घरातली लोक यांच्याशी राजकारणाबद्दल फारशा पोटतिडकीने बोलत नाही पण पाहुणे. अपरिचारक यांच्याशी बोलताना राजकारणाबद्दल टिप्पणी करुन जातो. राजकारणाविषयी बोलायचे म्हणजे अफवा. भानगडी. आरोप. याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात 

          मध्यमवर्गीय लोकांचा राजकारणाविषयी दृष्टीकोन निर्थक तेची. आणि तुचछतेची एक झालर असते. आपण काहीही म्हटले तरी राजकीय पुढारी त्यांना हवे तसे तेच करणारं अशी हताश भावना त्यात असते. शिवाय पुढारी काहीही म्हणले. कोणतेही कायदे केले. कोणतेही कायदे मोडले. तरी व्हायचे तेच होणार. भ्रष्टाचार वाढणारं. महागाई वाढणार. बेरोजगारी वाढणार. गुंडगिरी. अवैध धंदे. शैक्षणिक बाजार. वैद्यकीय बाजार. दबाव वाढणार. मनमानी कारभार वाढणार. जातीयवाद म्हणजे राजकारणामुळे समाज अर्थव्यवस्था यांच्या वर विशेष म्हणजे राजकारणी लोकांवर कोणताही परिणाम होत नाही म्हणजे राजकारण ही निरथक गोष्ट आहे अशी वृत्ती बर्याच लोकांमध्ये असतें त्यांच्या जोडीला राजकीय घडामोडी आणि पुढारी यांच्या विषयी तुचछतेची भावना असते. पुढारी झालेले सर्व गुंडगिरी क्षेत्रातून असलेले. अडाणी अशिक्षित असतात. फक्त पैसा माणूस बळ यांना आपल्या वर राज्य करण्याचे लाईन्स देतो. कारणं काही न करता पैसा आणि सत्ता मिळिणयाचेसाधन म्हणजे राजकारण होय असं मत मध्यमवर्गीय लोक यांचा आवडता सिध्दांत असतो. अधिकारापेक्षा कमी अकलन शक्ति असलेला पुढारी ही प्रतिमा शहरी व ग्रामीण भागातील लोकांच्या मनात पक्की घर करून बसली आहे. पण लोकांच्या कलाने. मताने चालणारं राजकारण हेच अनेक पुढारी आमदार खासदार मंत्री यांना कमी प्रतीचे वाटतें. सामान्य माणसाला गोरगरीब जनतेला काही कळत नसताना त्याने निवडलेल्या प्रतिनिधी कारभार पाहत असल्याचे अनेकांच्या दृष्टीने राजकारणात गुणवत्ता. विश्वास हरता. राहत नाही. म्हणजेच केवळ पुढारयाचया विषयी तुचछतेची भावना नसते सामान्य माणसाच्या मतांवर चालणार्या लोकशाही राजकारणाविषयी अढी असतें. # लोकशाहीत डोकयाला महत्व नसते #. किंवा. # लोकशाहीत फक्त डोकी मोजली जातात # या प्रकारची टिका त्यातूनच येते. त्या तुलनेने अर्धशिक्षित. अशिक्षित. अशा लोकांमध्ये राजकारणाबद्दल अविश्वास असला तरी निर्थक तेची भावना कमी असते. त्यांना राजकारण शासन व्यवस्था याविषयी कुतुहल अधिक असते. आपल्या राजकीय प्रक्रियेशी स्वताला जोडून घेण्याचा प्रयत्न करतात. राजकारणाच्या वास्तव हिशेबी स्वरूपामुळे ते संपूर्ण प्रकियेला तुच्छ लेखत नाहीत. मात्र राजकारणाबद्दल त्यांची माहिती ही कमी प्रमाणात असते. त्यामुळे राजकारणाविषयी आपल्या मनात आत्मविश्वास कमी असतो आणि ते बरोबर ही आहे. 

      आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय जमाती दुर्गम प्रदेशातील रहिवासी इत्यादी त्यांच्या राजकारणाशी काही संबंध येतच नाही. आणि आला तर त्यातून कटू अनुभवच त्यांच्या वाट्याला येतो. त्यामुळे त्यांना राजकारणाविषयी माहिती अगदी पुसट असते. त्यामुळे सहसा हे गट राजकारणात मिसळलेले आपणास पहावयास मिळत नसतील. त्यामुळे असे गट आपल्या आपल्या वस्तीच्या कोंदणात राहतात देशांचे राजकारण वैगरे गोष्टी त्यांच्या दृष्टीने परकयाच आहेत. पण आत्ता हे गट राजकारणात हळूहळू ओढले जात आहेत. शासन यंत्रणेकडून येणारी बंधने दडपण आधुनिक संस्कृतीचा होत जाणारा परिचय यातून अनेक आदिवासी. जमातींनी. आपले पारंपरिक अस्तित्व गमाविल्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळे राजकारण म्हणजे परकयाची भयकारी दडपण वाटणे शक्य आहे. राजकारणाविषयी आत्मीयता न वापरण्याचे कारणं निव्वळ त्यांचे अज्ञान नसते. त्यांच्या दृष्टीने राजकारण म्हणजे बाहेरच्या त्यांच्याच हितासाठी चाललेला खटाटोप असतो. सरकार. पोलिस. अधिकारी व कर्मचारी. हा त्यांच्या राजकीय अनुभव त्यामुळे राजकारणाविषयी त्यांची दृष्टी भीतीयुक्त दुरावयाची असतें आज चालू असलेलें गलिच्छ राजकारण हे अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व जमाती इतर मागासवर्गीय जमाती यांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून चालू आहे निवडणूक आरक्षण. नोकरी आरक्षण. शिक्षण आरक्षण. शिष्यवृत्ती आरक्षण. मुस्लिम आरक्षण. मराठा आरक्षण. अशा विविध मुद्यांवर अवलंबून आहे. ज्या दिवशी जात वर्गवारी संपेल त्या दिवशी आपल्या देशातील राजकारण गजकर्ण संपेल हे खरे आहे कारणं मत मिळविण्यासाठी जाती जातीत भांडणे जातीयवाद संपेल त्यामुळे त्यावेळी नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याकडे मुद्दाच राहणार नाही. म्हणूनच आज सर्व विकास मंडळे यामधील जात वर्गवारी नष्ट करा. नोकरी शिक्षण. विविध विकासाच्या योजना यामध्ये जात आणूच नका आणि मग राजकारण खेळा त्यावेळी तुमचा पैसा माणूस बळ फसवी आश्वासने काहीच उपयोगाची राहणार नाहीत

                  आपल्या राजकारणाविषयी दृष्टीकोन अशा विविध छटा असल्या तरी एकंदर आपली राजकारणाविषयाची भावना. संशय. दुरावा. अविश्वास. यांनी युकत असते. राजकारण हा समाज व्यवस्थेचा एक भाग आहे असं आपल्या मनावर बिंबवले आहे त्यापासून आपला कांहीच फायदा होत नाही. त्यात काही गैर नाही अस कोणी माणत नाही. आपला मित्र लपवाछपवी करतोय असा आपणास संशय आला तरी आपण सहज बोलतो काय र राजकारण करताय का. ? ‌. कचेरीत कोणी काही काम करायला लागला की काय र पुढारी झालाय कां ? एकादा गोड बोलायला लागला की आपण म्हणतो यंदा काय निवडणूकीला उमेदवार होण्याचा विचार आहे का ? हे आपल्या राजकीय संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्ये मानायला काहीच हरकत नाही त्यामुळे राजकारण अस्वच्छ व्यवहार. कुटील खेळ. अस मानल तर वावगे ठरणार नाही राजकारणात सभ्य माणसांचे काही काम नसतं जणू काही राजकारणी लोकांची एक वेगळी जमातच आहे. राजकारण करणे म्हणजे कारस्थाने. लटपटी करणे. सवताचे महत्व वाढविणे. भ्रष्टाचार करणे. विविध घोटाळे करणे अमाप बेनामी संपत्ती मालमत्ता हेच राजकारणाचे एकमेव उद्दिष्ट आहे. राजकारण हा समाजविषयक निर्णय घेण्याचा मार्ग आहे. सार्वजनिक धोरणाविषयी सहमती निर्णय घेण्याचे ते एक सा़धन आहे यांवर आपलाच नव्हे तर कोणाचाच विश्वास बसत नाही 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बुद्धिचा व्यापार

 


बुध्दिचा व्यापार. 

               आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये. बुद्धिवादी लोक आपणांस पाहावयास मिळतात. काही जण वैधानिक.  तंत्रज्ञान.  शैक्षणिक.  सामाजिक.  आर्थिक तज्ञ.  वैचारिक मंथन.   लोकशाही अभ्यासक.  कायदे पंडित.  मानस उपचार तज्ञ.   मानोस उपचार तज्ञ.खेळाडू.     असे विविध क्षेत्रात अभ्यासक लोक आपल्या  देशांची शान वाढवितात.  पण आज उलट झाल आहे. आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील. उच्च शिक्षण घेऊन. बाहेर पडणारे बुद्धिजीवी वर्ग. आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास. राज्य देश यांची. चारि बाजूने उन्नती विकास करण्यासाठी आपली बुध्दी वापरत नाहीत.  आपल्याला उच्च आर्थिक किंमतीवर आपले व आपल्या देशांचे नाव उच्च स्तरावर जाईल यासाठी. आपली बुध्दी चिकाटी आपल्यातच वापरली पाहिजे. या विचारांकडे पाट फिरविली आहे आणि कोण आपल्या बुध्दिचे उच्च दाम लाविल तिकडेच असे. बुद्धिवंत जातात आणि आपले गाव तालुका जिल्हा राज्य देश यांचे आपण नागरिक आहोत. देशासाठी काहीतरी करणे. आपलं परम कर्तव्य आहे हे आपण विसरतो आणि. फक्त दे पैशासाठी आपली बुध्दी विकतात. मग यांना भारतीय नागरिक म्हणायचे का ? विचार करा. आपल्या देशात सर्व वस्तू तयार करणार्या कंपन्या आहेत.  तशी आर्थिक स्थिती आपल्या देशाची आहे आपणच आपल्या बुध्दीचा वापर करून. आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केल पाहिजे 

              बुध्दिवंताचे स्थलांतर ही एक भयानक आणि जटिल समस्या आहे. यामुळे बुद्धिवंताचे आगमन निर्गम यामुळे देशात जिल्ह्यात तालुक्यात गावात चांगलें वाईट परिणाम होतात. स्थलांतर करणारे तरुण व बुद्धिवंत भरणा आज जास्त आहे.   

* बुद्धिवहन. निर्गमन क्षेत्रात बुधदिवंताचे स्थलांतर मुळे जी उणीव निर्माण होते ती आपणास सर्वांना विचार करायला लावते. यालाच बुद्धिवहन असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही

* बुध्दी अतिरिक्ता. देशातील लोकसंख्येत आवश्यकते पेक्षा जास्त तंत्रज्ञान व उच्च विद्या विभूषित. लोक असतांत व स्थानिक अर्थ व्यवस्थेतही बुद्धिवान लोकसंख्या केव्हाही उपलब्ध होते त्या स्थितीला बुध्दी अतिरकता. अस म्हणता येईल जपान संयुक्त संस्थाने. जर्मनी या देशांत बुध्दी अतिरिकता मोठ्या प्रमाणात आहे

* बुध्दी आदान प्रदान दोन राष्ट्रांत बुद्धिवान लोकांची स्थलांतर प्रक्रिये द्वारे आदला बदल होत असल्यास त्याला बुध्दी आदान प्रदान असं म्हणता येईल. यामुळे राष्ट्राचा आर्थिक.  सामाजिक. सांस्कृतिक व शैक्षणिक. विकासाला चालना मिळते या प्रक्रियेत सहभागी झालेल्या देशांना पारसपारिक. प्रबोधनचा व वैधानिक संक्रमणाचा लाभ मिळतो 

* बुध्दी निर्यात.  व्यवसायिक दृष्टीकोन एका देशातील बुद्धिवान लोकांना दुसर्या लोकांना देशात नियमित पाठविलें जाते. कुशल श्रमिक किंवा तंत्रज्ञान. नियमित आर्थिक करारावर पुरवठा करणे म्हणजे बुध्दी निर्यात होय. अविकासित. व काही प्रमाणात विकसनशील राष्ट्रे अशी बुध्दी निर्यात करून परकिय चलन मिळते. 

         बुधदिवंता चे स्थलांतराचे भिषण परिणाम होतात. बुधदिवंताचे स्थलांतर निर्गमन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतात गरिब व विकसनशील अविकासित देशांना मोठा फटका बसलेला आपणांस दिसतो.  गरिब व अविकासित देश उच्च शिक्षणावर मोठा खर्च करावा लागतो.  तंत्रज्ञान. शास्त्रज्ञ.  अभियंते. वैद्यकीय व्यवसायिक यांच्या शिक्षणावर देशांची गरज म्हणून मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परंतु पदवी मिळालेनंतर हे तंत्रज्ञ व इतर उच्चविद्याविभूषित लोक मोठ्या पगाराच्या व चांगल्या सेवा सुविधांच्या अभिलाषेने श्रीमंत विकसित देशाकडे धाव घेतात आणि आपला देश विसरून जातात  व्यक्तिगत पातळीवर त्यांचा निर्णय योग्यही आहे परंतु  ज्या समाजाने/ शासनाने त्यांच्या शिक्षणावर प्रचंड पैसा खर्च केलेला असतो तो सर्व पाण्यात जातो आणि पदरि पडती ती निराशा. समाजाची शासनाची. बुध्दीवंत यांचेकडून राष्ट्राची उन्नती सेवा घडावी ही अपेक्षा असते परंतु कित्येक तंत्रज्ञ व बुद्धिवंत स्वताच्या स्वार्थापोटी विकसित देशांत आपली बुध्दी विकतात आणि मोठा आर्थिक लाभ मिळतात.  भारता सारख्या विकसनशील देशातून विकसित देशाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. या स्थलांतरामुळे जी बुध्दिची उणीव निर्माण होते तिला बुध्दी वहन असं म्हणलं जातं. बुध्दी वहना मुळे. विकसनशील व अविकासित देशांचा आर्थिक विकासाचा वेग मंदावतो.  

आगमन क्षेत्रातील परिणाम. श्रीमंत विकसित देशात तरुण प्रतिभा संपन्न लोकांची भर पडते. आगमन क्षेत्राला या बुद्धिवंताचा चांगलाच लाभ होतो. इंग्लंड व अमेरिका. वैद्यकीय क्षेत्रात भारतीय वैद्यकीय व्यावसायिकांचा भरणा जास्त असतो. विकसित देशांना तंत्रज्ञ बुद्धिवंत सहज उपलब्ध झाल्याने त्यांची आर्थिक विकास ची. गती अधिक वेगवान जगात बुद्धिवहन समस्या आपल्याला दुसर्या महायुध्दाच्या वेळी प्रकर्षाने जाणवू लागली आहे 

* स्थलांतराचे परिणाम.  स्थलांतराचे परिणाम निर्गमन क्षेत्रात तसेच आगमन क्षेत्रातही दिसून येतात स्थलांतरामुळे स्थलांतरित व्यक्ती नवीन पर्यावरणात व संस्कृतीत वावरते यातूनच पुढे सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन सांस्कृतिक विकास होतो.  निर्गमन क्षेत्रापेक्षा आगमन क्षेत्रात अधिक चांगलें परिणाम दिसून येतात कारण आगमन क्षेत्रात कार्यक्षम व बुद्धिवंत लोकांची भर पडते.   बुध्दीवंत स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रातील तसेच निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येच्या. आकारावर रचनेवर परिणाम होतो.  लोकसंख्या व प्रदेशातील साधनसंपत्ती पुनसथानांकन.  किंवा संतुलन होण्यास मदत होते.  स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येत घटते तर. आगमन क्षेत्रातील लोकसंख्या वाढते.  लोकसंख्येच्या आकारावर म्हणजे एकूण लोकसंख्या व तिची घनता. तिची वाढ बदलते. तसेच जनन. मृतयुता. वयोरचना.  लिंगरचना. व साक्षरता. यात संख्यात्मक बदल होताना आपणास दिसतात.  निर्गमन क्षेत्रात बालके.  महिला. व वृद्धांचे प्रमाण वाढते.  निर्गमन क्षेत्रात बुध्दी वहन.  समस्या निर्माण होते. याउलट आगमन क्षेत्रात बुद्धिवंताची व कार्यक्षम लोकसंख्येची भर पडते.  आर्थिक विकासाला. आगमन क्षेत्रातील लोकसंख्या पोषक असते. 

* आर्थिक परिणाम. आगमन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्यास त्या प्रदेशातील मानव साधनसंपत्ती गुणोत्तर बदलते साधनसंपत्ती यावरील ताण वाढतो.  आर्थिक विकास व नियोजन यांवर वाईट घातक परिणाम होतो.  मुळातच नयुन लोकसंख्या असलेल्या प्रदेशात स्थलांतर घडून आल्यास ते आर्थिक विकासाला पोषक ठरते साधनसंपत्ती विकास होतो.  मात्र अनियोजित व अनिर्बंध स्थलांतर घडून आल्यास प्राथमिक गरजांची पूर्तता नीट होत नाही. नागरि जीवनाच्या अनेक समस्या उद्भवतात.  आगमन क्षेत्रात लोकसंख्या वाढल्याने नियोजनाचा आराखडा बदलावा लागतो.  आरोग्य.  शिक्षण.  पाणी.  वीज.  वाहतूक.  व संदेशवहन. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा.  याचा नियोजन आराखडा व उचित अवलंब झाला नाही तर विशेषत नागरि केंद्रात सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्न घातक होतो.  शहरांची निकोप वाढ होत नाही. गलिच्छ वस्त्या.  प्रदुषण. सार्वजनिक आरोग्य. यांसारखे ज्वलंत प्रश्न निर्माण होतात.  निर्गमन क्षेत्रात कार्यक्षम लोकसंख्या घटते.  परावलंबीतांचे प्रमाण वाढते.  आर्थिक उत्पन्न घटते.  

* सामाजिक परिणाम. स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील सामाजिक भिननतेवर परिणाम होतो.  जाती रचना. समाजपधदती.  विवाहप्रणाली. शिक्षण. चालीरीती या सामाजिक अंगामध्ये विविधता निर्माण होतो. सामाजिक व्हायला वेळ लागतो.  आगमन क्षेत्रात अल्पसंख्यांकांचे प्रमाण वाढून प्रसंगी सामाजिक ताणतणाव निर्माण होतात.  सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.  आगमन क्षेत्रात काही अनुकूल बदलही दिसून येतो.  आगमन क्षेत्रात आचार विचार. आदान प्रदान होते.  नवीन जीवनपद्धती संस्कृती निर्माण होते.  स्थलांतरित लोक नवीन पर्यावरणाशी व संस्कृतीशी मिळते जुळते घेतात तशी त्यांना सवय लागते.  ते अधिक सहनशीलता बनतात.  आगमन क्षेत्रात बुद्धवंताची भर पडल्याने त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळतो. आर्थिक विकास होतो. आंतरजातीय विवाह.  विचारमंथन.  समायोजन. उच्च शिक्षण.  यामुळे समाजाला बुद्धिवंत लोकांचा फायदा होतो.    निर्गमन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढल्याने त्या परिस्थितीत जन्य.  आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनू लागतात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने त्या स्वावलंबी होऊ लागतात.  व्यवसायात संस्था पतसंस्था. पतपेढी.  संघटना.  विक्री संस्था.  लघु उद्योग.   शिक्षण यामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.  मात्र निर्गमन क्षेत्रातील साधनसंपत्ती पुरेपूर विकास होत नाही.  

      अंतर्गत स्थलांतरामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते.  विभिन्न चालिरिती. रुढी परंपरा.  नीतिमूल्ये.  धार्मिक विचार प्रणाली.  सण.  उत्सव.  यांची पारंपारिक ओळख संस्कृती संवर्धन यास वाव मिळतो.   काही वेळेस संस्कृती नीट न झाल्याने अल्पसंख्याक. बहुसंख्यांक. गटबाजी.  भाषावाद.  प्रांतवाद. जातीय संवर्धन.  जातीय संप्रदाय.  निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते.  सांस्कृतिक अवमूल्यन वाढू लागते ज्ञ भारतात व जगातील काही राष्ट्रात. अंतर्गत स्थलांतरामुळे. जातीयवाद. भाषावाद. प्रांतवाद. सांस्कृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

                 समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जातीच भांडवल

 

जातीच भांडवल 


आज सर्वत्र जातीचे राजकारण भांडवल केल जात कोणतीही योजना. विकास योजना आर्थिक विकास महामंडळ यांची कर्ज योजना. विविध संस्था. सेवाभावी संस्था. शासकीय निमशासकीय कार्यालये. विविध सोसायट्या. सुतगिरणी. विविध शालेय शिक्षण. नोकरी आरक्षण. व विविध ठिकाणी असणारी आरक्षणे. यासाठी एकच जाचक अट घातली जाते ती म्हणजे जात प्रमाणपत्र. आणि १९६७ चा जातीचा पुरावा आणि तो आपण दाखल करू शकत नाही कारणं त्यावेळी आमचे पूर्वज पोटासाठी हे गाव ते गाव फिरत होते तेव्हा त्यांना कोणताही स्थानिक निवारा नाही. कोणताही स्थानिक व कायमस्वरूपी व्यवसाय नाही मग जगायचं साधन नाही त्यांना जातीचा पुरावा कसला असतो. आपल्या पुढच्या पिढीला त्याची अडचण येणार आहे. कागद कशाला म्हणतात. हे ज्यांना माहीत नव्हते त्यांचेकडे जातीचा दाखला जातीचा पुरावा असेल का? मजूर सोसायट्या फक्त नावालाच आहेत त्यात एकही मजूर सभासद नाही मग अनुसूचित जाती जमाती सुतगिरणी.  अल्पसंख्याक विकास महामंडळ. दिनदयाळ सूतगिरणी. ही नाव जातीच्या नावाखाली  भांडवल करून चोरांनी. लाखो नाही करोडो रुपयांची टेंडर घेवून आपले खिसे भरले म्हणून म्हणतो ज्या दिवशी जात संपेल त्या दिवशी राजकारण संपेल कारण यांच्याकडे तुमच्या आमच्यात भांडण लावून राजकारण करणे बंद होईल 
              भारतीय घटनेच्या कलम ३४१ अन्वये राष्ट्रपती आदेशानुसार भारतीय समाजातील काही जातीय गटांना. अनुसूचित जाती जमाती असे घोषित केले आहे. सन १९५० मध्ये अमलात आलेल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने अनुसूचित जाती या शब्दप्रयोगाचा स्वीकार केला. सर्वसाधारणपणे मागासवर्गीय सामाजिक गट सूचित करण्याच्या हेतूने. # अनुसूचित जाती # हा शब्द प्रयोग केलेला आपणास आढळतो भारतीय राज्यघटनेने कलम ३६६ अन्वये अनुसूचित जातीची व्याख्या केली आहे भारतीय घटने पुरता विचार करावयाचा झाल्यास घटनेच्या कलम ३४१ अनुसार ज्या जनजाती अथवा जाती यांचें भाग अथवा त्यातील गट यांचा अनुसूचित जाती म्हणून उल्लेख केला असेल त्या सामाजिक गटांना. अनुसूचित जाती. असं माणले गेले आहे # अनुसूचित जाती # भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४१ (१) अनुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना अनुसूचित जमाती असं संबोधलं गेलं आहे यात एकाकी डोंगरांवर व जंगलात राहणारे व ज्यांना आधुनिक संस्कृती व जीवनाचा परिचय होए शकला नाही अशांचा समावेश होतो. अशा लोकांना # गिरीजन # किंवा आदिवासी असं म्हणलं जातं आहे यांचें मागासलेला पणा हे मुख्यतः आर्थिक व सांस्कृतिक आहे. इतर सर्व भारतीया पेक्षा शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला समाज म्हणजे अनुसूचित जाती जमाती होय. महाराष्ट्र डोंगराळ प्रदेशात घनदाट अरण्यात आदिवासी लोकांचे वास्तव्य आढळते ते बर्याच भागात विखुरलेले आहेत राज्यात आदिवासी लोकांचे वास्तव्य प्रामुख्याने सह्याद्री पर्वत. सातपुडा पर्वतरांगा. व गोंडवन विभागात ( विदर्भ मराठवाडा )येथे या जमातींचे वास्तव आढळते आदिवासी लोकांचे वर्गीकरण सर्वांनी आपल्या आपल्या स्वार्थापोटी केले आहे यात अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती. असं वर्गीकरण आपणांस पाहावयास मिळते
        अनुसूचित जाती # महाराष्ट्र शासनाने वर्गीकृत जातींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुसूचित जातींमध्ये. महार.  मांतग.  चर्मकार.  यांची लोकसंख्या जास्त आहे. याचप्रमाणे होलिया.  लोहार.  ढोर.  खाटीक. मेडगी.  मेहतर.  डोंब.  बेरड.  शेणवी.  इत्यादी जातीच्या लोकाचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र अनुसूचित जातींमध्ये नवबौद्ध यांचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे सन १९९१ चया जनगणने नुसार अनुसूचित जाती लोकसंख्या अंदाजे ८७.५८.००० एवढी सांगण्यात आली आहे. त्यांचे त्यावेळी असणारे प्रमाण लोकसंख्येच्या केवळ ११/ टक्के आहे. अनुसूचित जाती मध्ये त्यावेळी असणारे साक्षरता प्रमाण ६५/ टक्के आहे.  १९८२ साली अनुसूचित जातीची लोकसंख्या. ४४.८०.००० होती. त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ७-१ / टक्के होते.  २००१ सालीच्या जनगणने नुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या ९८.८२ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या ५०.६३ लाख एवढी नोदवली गेली आहे. व महिलांची लोकसंख्या ४८.१९/ लाख.  आहे. ग्रामीण भागात अनुसूचित जातीचे प्रमाण  ६१.७/ लाख लोक ग्रामीण भागात राहतात. राज्यात अनुसूचित जातीचे प्रमाण १०.२/ टक्के एवढेच अंदाजे देण्यात आले आहे अनुसूचित जाती  अगेर. अनमुक. आरेमाला.  आरवा माला.  बहना बहाना. बाकड बंट. बलाही. बलाई. बसोरा. बुरुड. बांसोर. बासोडी. बेडाजंगम. बुडगाजंगम. बेरड. भांबी. भांभी. असादरू. चामडिया. चमार. चमारी. चांभार. चमगार. हरळयया. हराळी. खालपा. माचीगर. मोचीगार. मादर. मादिक. मोची. तेलगू. मोची. कोमटी. राणीगार. रोहीदास. नोना. रामनामी. रोहित. समगार. सतनामी. सूर्यवंशी. सूरजवंशी. भंगी. मेहतर. ओलगाणा. सखी. मलकाना.  हलाल खोर.  लालवेगी. वाल्मिकी. कोरार.  झाडमलली.  बिंदला. बयागार. चलवादी. चेननदासर.  होलया. दसारी. डककल. डोलकलवार. चढोर. कककयया. दासर. कंकयया. डोहोर. डोम. डुमार. येललमवार. गंडा. गंडी. गरोड. गारो. घासी. घासीया.  हललीर. हलसार. हसलार. हुलसवार. लोहार. वलहार. होलय.  होलेर.  होलय. होलया. होलिया. कैकाडी. अकोला अमरावती भंडारी बुलढाणा नागपूर वर्धा व यवतमाळ जिल्हे आणि राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्ह्यात 
खंगार. कनेरा. मिरधा. खाटिक. चिकवा. चिकवी. कोलपूल. वंडलु. कोरी. लिंगडेर.  मादगी. मादिगा.  महार.  मेहरा. तराळ. घेमू मेगू. माहयावंशी.  धेड. वणकर. मारू. वणकर.  माला. माला दासारी.  माला हनाई.  मालाजंगम.  माला मस्ती.  माला साले. नेटकानी. माला संन्याशी. मांत. मातंग. मिनिमदिग.  दखनी.  मांग. म्हशी. मदारी. गारुडी. राधेमांग. मांग गारोडी.  मांग गारूडी.  मनने मस्ती. मेघवाल. मेधवार. मिठा अयलवार. मुक्री. नाडियाहादी. पासी. सांसी. शेणवा. चेणवा. सेडमा. रावत. सिंधोललू. चिंदोललू. तिरगार. तिरबंदा. तुरी. महाराष्ट्रात अनुसूचित जाती संख्या एकूण ५९ जातीचा समावेश करण्यात आला आहे
#* अनुसूचित जमाती #*
महाराष्ट्रात अनुसूचित जमाती सुमारे ४७ आहेत. यांचे वास्तव्य प्रामुख्याने डोंगराळ भागात व अरण्यात आहे. यांचे वास्तव्य सह्याद्री पर्वतमय प्रदेश.  सातपुडा पर्वतमय प्रदेश.  गोंडवन प्रदेश ( विदर्भ मराठवाडा) त्यामध्ये प्रामुख्याने # सह्याद्री पर्वतमय प्रदेश महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा प्रदेश व्यापलेला आहे. कोकणातील ठाणे   रायगड. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील. नाशिक. अहमदनगर. पुणे. जिल्ह्यात मुख्यत्वे. पश्चिम भागात अनुसूचित जमाती राहताना आपणांस दिसतात. सह्याद्री पर्वतमय प्रदेशात महादेव कोळी. वारली. पारधी. ठाकर. मल्हार. कोळी. भिल्ल. काथोळी.  कातकरी. इत्यादी जमाती आढळतात 
        आदिवासी जमाती  महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेत  ठाणे रायगड. तसेच नाशिक अहमदनगर व पुणे. जिल्ह्याचा पश्चिम भाग. सातपुडा पर्वतरांगेत नंदुरबार धुळे जळगाव अमरावती तसेच अकोला व बुलढाणा जिल्हा. विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर. व गडचिरोली तर मराठवाडा नांदेड व परभणी हिंगोली जिल्ह्यांत अनुसूचित जमाती राहतात विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा धानोरा इटापलली. अहेरी. सिरोचा नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी. अककलकुवा. नवापूर. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा ठाणें जिल्ह्यातील तळासरी डहाणू. मोखाडे व जव्हार तालुके. नाशिक जिल्ह्यातील सुरगणा व कळवण. तालुक्यात अनुसूचित जमातीचे वास्तव आहे # अनुसूचित जमाती # लोकसंख्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या १९८१ साली सुमारे ५८ लाख होती तर १९९१ साली ती ७३ लाखांपर्यंत वाढली महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीची टक्केवारी ९.३ आशी दर्शवली आहे अनुसूचित जमाती मध्ये सन १९९१ ची जनगणने नुसार साक्षरतेचे प्रमाण सुमारे ३७/ टक्के आहे. यामध्ये पुरुषाचे प्रमाण ४९/ टक्के तर महिलांचे प्रमाण फक्त २४ टक्के दाखवण्यात आले आहे सन २००२ ची जनगणने नुसार महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८५.७७ लाख आहे त्यात. पुरुषांची संख्या ४३.६८ लाख एवढी आहे. महिलांची लोकसंख्या ४२.४९ लाख एवढी आहे. राज्यात अनुसूचित जमाती ८.५ टक्के आहेत. ग्रामीण भागात अनुसूचित जमाती ८७.३ टक्के लोकांचे वास्तव्य आहे.   सन १९९१ ची जनगणने नुसार महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या सुमारे २० लाख आहे 
        महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या अनुसूचित जातीच्या सर्वे नुसार अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या ९८.८१.६५६ असून तिची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी १०.२० अशी दर्शविण्यात आली आहे  त्यानुसार पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे  ७.६२ लाख ( टक्केवारी ७.७१/टक्के ) 
नागपूर ६.९६ लाख
सोलापूर ५.७८ लाख
नांदेड ४.९८ लाख
अहमदनगर ४.८५ लाख
असे जिल्ह्याचे प्रथम क्रमांक येतात  महाराष्ट्रात वरील पाच जिल्ह्यांची मिळून अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी ३०.५ अशी आहे 
रत्नागिरी २४.५१५ लाख
सिंधुदुर्ग ३८.५३६ लाख
नंदुरबार ४१.४१२ लाख
रायगड ५३.६६७लाख 
हिंगोली १.०७.६९७ लाख 
कोल्हापूर ४.५० लाख
अमरावती ४.४७ लाख
नाशिक ४.२७ लाख
लातूर ४.०४ लाख
मुंबई उपनगर ४.०२ लाख
औरंगाबाद ३.७६ लाख
ठाणे ३.४० लाख
सांगली ३.१३ लाख
चंद्रपूर २.९७ लाख
भंडारा २.०२ लाख
जळगाव २.८७ लाख
बीड २.८१ लाख 
यवतमाळ २.५३ लाख
सातारा व उस्मानाबाद  २.४६ लाख
बुलढाणा २.४२ लाख
वरील सर्व अनुसूचित जाती जमाती ची जिल्हावार लोकसंख्या आहे 
अनुसूचित जमाती महाराष्ट्रातील
महादेव कोळी.  वारली. पारधी. गोंड. कोकण. ठाकर. मल्हार कोळी. भिल्ल काथोडी. गोमित. ढाणका. माडिया. गोंड. कोया. हळबा. गोंड. ही सर्व यादी अनुसूचित जमाती यांची आहे 
             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

तफावत - सत्तेसाठी काहीपण

 

तफावत - सत्तेसाठी काहीपण

           आपल्या देशात सामाजिक व आर्थिक क्रांती घडून येण्यासाठी एकाबाजूला राज्याचे व्यक्ती स्वातंत्र्य जाचक निर्बंध कमी झाले पाहिजेत स्वताच्या विकास घडवून आणण्याची आपणाला मोकळीक पाहिजे हे जसे मूलभूत हक्काच्या प्रकरणावरुन आपणास दिसते आणि आपण आज ते अनुभवत आहे. कारण आज कोणाचाही कसलाही विकास नाही. कसलेही लोककल्याण नाही. 

            विसाव्या शतकात लोककलयाणाची वाढती जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे हा विचार पुढे आला. आपल्या प्राचीन परंपरेतही राज्याची ही क्रियाशील भूमिका मांडलेली आहे आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्वांचा विचार हा या दोन्ही गोष्टी सुसंगत असाच आहे. परंतु हे निर्देश पूर्णतः सरकारने पाळले नाही तर याविरुद्ध आपणास न्यायालयात दाद मागता येत नाही. किंवा या तत्वांशी विसंगत असलेले कायदे अवैधही ठरत नाहीत. ही तत्वे अमलात आणण्यासाठी सरकारने कायदे करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय ही तत्वे अमलात येऊ शकत नाहीत. आपल्या विकासाच्या मार्गात सरकारने अडथळे निर्माण करू नये. हे आपल्या मूलभूत हक्कांचे सूत्र आहे. असा विकास घडून येण्यासाठी आवश्यक संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी हा विचार मार्गदर्शक ततवामागे आहे. संविधान मुद्दा घालण्यात आला आहे तो आमच्या मते लोकशाही कशी असावी याचा निर्देश आहे. आम्हाला निव्वळ प्रोढ मतदान देऊनच फक्त राजकीय लोकशाही साधायची नाही कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असो त्याला भारताची एकंदर रचना कशी असावी याचे मार्गदर्शन या भागातून मिळेल. आर्थिक लोकशाहीसाठी काहीजण वयकतिविकास हा पाया मानतात तर काहींच्या आणि आपल्या मते समाजवादी साम्यवादी व्यवस्था हाच तिचा निकष असतो या विचारप्रणाली कोणत्याही मतांचा राजकीय पक्षाला आपल्याला तत्वानुसार भारताची रचना करण्यास वाव मिळावा अशा लवचिक पध्दतीने निदेशक देण्यात आले आहेत 

          ‌ समाजात काही लोक अतिश्रीमंत व बाकिचे अति दारिद्र्य काहींच्या हाती उत्पादनाची साधने. शेती. उधोग खनिज संपत्ती. भांडवल. व बाकीचे फक्त श्रमशक्तीचे धनी अशी तफावत निर्माण झाली आहे त्यातून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होणे. अपरिहार्य असते अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी समाजव्यवस्था राज्याने निर्माण करणे गरजेचे आहे. संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही असे धोरण तयार करण्याची गरज आहे. समाजात साधनसंपत्ती वाटप जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने व्हावे. उपजीविकेचे साधन मिळविण्याचा समान अधिकार महिला व पुरुष यांना समानच आहे. व्यक्ति व व्यक्ती समूहातील विषमता. जातीयवाद. किमान पातळीवर असावा किंवा अजिबात नसावा. उद्योग व्यवस्थापन यात कामगारांचा सहभाग असावा. जसे मजूर सोसायट्या. दिनदयाळ सूतगिरणी. अनुसूचित जमाती जमाती सूतगिरणी. मागासवर्गीय सूतगिरणी. पण यात कोणताही वंचित घटक नावाप्रमाणे बघायला सुध्दा मिळत नाही घटनेच्या कलम ३८/३९/ मध्ये राज्याला दिले आहेत या नुसार सामाजिक व आर्थिक न्याय साधला जाईल हे अपेक्षित आहे 

                आदर्श भारत कसा असावा ? भारतात सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी मोठी मोठी आंदोलने मोर्चे निदर्शने उपोषण चळवळी झाल्या परकियांना पळवून लावण्यासाठी आपल्या घरदार मुल बाळ पत्नी याची राखरांगोळी करणार्या क्रांतिकारक समाजसेवक यांना जन्माला घालणारी आपली भारत भुमी. आज महिला सुरक्षित नाही. कामगार यांना समान किमान वेतन कायद्यानुसार वेतन नाही. भ्रष्टाचार. बेरोजगारी. खेड्यातून शहराकडे रोजगाराच्या शोधात येणारे लोंढे कमी करण्यासाठी खेडी सबल झाली पाहिजेत. अपंग. निराधार विधवा वयोवृद्ध समाजातील वंचित घटक यांना राज्याचे साह्य मिळाले पाहिजे. मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. सर्वांना समान नागरी कायदा असावा. सर्व मजूरांना निर्वाह भत्ता बोनस पेन्शन वेळेवरच मिळावी. शासकीय योजना त्यामध्ये पशुसंवर्धन कुक्कुटपालन शास्त्रीय पध्दतीने होईल व पशुधन वाचविण्यासाठी जनावरांची कत्तल बंद करावी. पर्यावरण व वनसंपत्ती संरक्षण करणे. अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार बंद करावा लागेल. रेशन घोटाळा थांबवा गरजूंना अन्न धान्य द्या. रेशन दुकानदार यांची दादागिरी थांबवा. महसूल घोठाळा. आर्थिक लुट बंद करा. व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणे काळाची गरज. जनगणना काळाची गरज आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे काळाची गरज आहे. महिलांना संरक्षण. तरूणांना रोजगार. शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आमली पदार्थ व मद्यपान बंदी करणे गरजेचे आहे. दुर्बलतेवर जनतेचे. विशेषत अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जमाती भटक्या विमुक्त जाती यांना संरक्षण आरक्षण देऊन जमातींचे शोषण करण्यावर बंदी करणे गरजेचे आहे. वयकतिसमूह दर्जा. सुविधा व संधी याबाबतीत विषमता त्यांनी टाळावी. घटनासमिती नागरिकांचे अधिकार हे केवळ हे केवळ नकारात्मक राज्यावरील बंधने राहू नयेत ते सकारात्मक विकासाची संधी प्राप्त करून देणारे असे असावेत असा एक विचार प्रवाह होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर. के टी शहा. अल्लादि कृषणसवामी अय्यर व बेनेगल नरसिंगराव. हे विचारांचे पुरस्कारते होते. कन्हैयालाल मुनशी. डॉ बाबासाहेब आंबेडकर व शहा यांसारख्या तर हे अधिकार मार्गदर्शक सरकारवर व न्यायालय वर बजावणी योग्य असावेत असे वाटत होते. परंतु राजयाजवळ साधनसंपत्ती कमतरता व घटना समितीतील जुन्या सदस्यांचा आभाव यामुळे तफावत व तडजोड म्हणून या अधिकारांचा समावेश मार्गदर्शक करण्यात आला. ही तत्वे केवळ शुभेच्छा असाच घ्यायचा काय ? ती पाळण्याचे सर्वांवर बंधन सरकारवर किती आहे याचा प्रश्न आपणांस आज निर्माण झाला आहे

      तत्वे अमलात आणण्यासाठी न्यायालये सरकारला आदेश देऊ शकत नसली तरी ती सरकारवर बंधनकारक आहेत आणि सार्वजनिक नीतीमततेचे रक्षण कायद्यापेक्षा जागृत लोकमतच चांगल्याप्रकारे करु शकते तेव्हा सरकार या तत्वांना बांधील कसे राहील याची काळजी समाजसेवक. वृत्तपत्र हितसंबंधी गट विचारवंत पक्षसंघटना यांनी जनमत तयार करण्याची गरज आहे ज्याप्रमाणे संघटना समर्थ व सुसंघटित असतील त्यांच्यातील मार्गदर्शक तत्वे सहमती असेल तेवढी ही तत्वे अमलात येण्याची शाश्वती अधिक राहील हे उघड आहे या संघटनाना निर्वेध पणे काम करू देण्याची हमी मूलभूत हक्काच्या प्रकरणातून त्या दृष्टीने मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे एकमेकांस पूरक असतील तर तफावत निर्माण होणार नाही भारत हा लोकशाही राज व्यवस्था असलेला देश आहे नियमित कालमर्यादेनंतर होणा-या निवडणुका हे लोकशाहीचे लक्षण सत्तारुढ पक्षाला अशा निवडणुकांच्या वेळी जनतेला सामोरे जावे लागते आपल्याला कारभाराचा जाब द्यावा लागतो. तेव्हा मार्गदर्शक ततवापासून ढळणारया पक्षाच्या विरोधी मतदान करून त्याचा पराभव करून जनता त्याला धडा शिकवू शकते. या बाबतीत विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असू शकते असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा विरोधी मतदानाची भीती ही मार्गदर्शक ततवामागची मोठी दंड शक्ति आहे दोन निवडणुकी दरम्यान काळात सुध्दा सरकारला मार्गदर्शक तत्वात बांधील ठेवता येते त्यासाठी सातत्याने जनमताचा रेठा एकी असावी लागते. चळवळी मोर्चे सत्याग्रह बंद घेराव बहिष्कार इत्यादी मार्गाचा अवलंब करावा लागतो 

    ‌‌. समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी व जनजागृती जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

इस्लामची सामाजिक राजनैतिक चर्चा.

 



मदिनेत आगमन (१६ सप्टेंबर ६२२)


पैगंबर साहेब मदिनेत दाखल झाले तेव्हा तेथे एक प्रकारची सामाजिक आणि राजनैतिक चर्चा सुरू झाली मदिने चे आर्थिक नेतृत्व ज्यू लोकांच्या हातात होते तेथील दोन कबिले ' औस ' व ' खजरिज ' यांच्यामध्ये वर्षानुवर्षे टोळीयुद्ध चालायचे तसेच दांभिकांचा सरदार अब्दुल्ला बिन उबै बिन सलूल मदिने चा बादशा बनण्याचे स्वप्न पाहत होता अशावेळी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांच्या मदिनेत आगमन तेथील सामाजिक आणि राजनेतिक वातावरणात खूप बदल घडून आणणारे होते मदिने तील जनतेची विचारसरणी एकदम बदलली आणि अनेक शिष्टमंडळे पैगंबर साहेबांना येऊन भेटू लागली.

त्यांना प्रेषित साहेबांचा एकच प्रश्न होता आणि त्यांचे एकच उत्तर होते आम्हास मदिनेत शांतता हवी आहे पैगंबर साहेबांनी त्यांना सुचविले की तमाम कबिले यांच्या सरदारांना एकत्रित करा आपापसात सल्लामसलत करून समस्येचे निराकरण केले जाईल मदिने तील सर्व धर्मीय लोकांचे धर्मगुरु आणि कबीर यांचे सरदार 'सखीफा बनू सअदा' येथे एकत्रित आले त्या लोकांमध्ये ज्यू, ख्रिस्ती मूर्तिपूजक, निर्वासित, नास्तिक, मदिने तील अन्सार मक्के तील मुहाजिर तसेच इब्राहिम व सुद्धा उपस्थित होते तेथे प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते प्रत्येक व्यक्ती प्रकटपणे बोलली पैगंबर साहेब म्हणाले एका व्यक्तीने बोलावे आणि ते एकाने लिहून काढावे लोक स्वयंस्फूर्तपणे म्हणाले येथे आपल्यापेक्षा बेहतर व श्रेष्ठ कोणीच नाही आपण म्हना आणि आम्ही त्याला अक्षरबद्ध करीत आहोत हेच लिखाण नंतरच्या इतिहासात जगातले सर्वप्रथम लिखित संविधान म्हणून ओळखले गेले.

  इस्लामी इतिहासात या सनद ( charter) ची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे ज्याला 'मिसाके मदिना' मदिने चा करार म्हणून संबोधिले जाते. विविध पश्चिमात्य विद्वानांनी आणि इतिहासकारांनी या चे मनःपूर्वक कौतुक केले आहेत. काही विद्वानांनी याला जगातील पहिली मानवाधिकार सनद म्हणून संबोधिले आहे, जी मागील शतकात राष्ट्रकुल (Common wealth) आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा *(UNO)* जाहीरनामा तयार होण्यास आधारभूत ठरले प्रसिद्ध इंग्रजी इतिहासकार सर विलियम या करा नाम्याचे अनुवाद करताना लिहित आहेत की हे सनद मोहम्मद (स)च्या वतीने मुसलमानांच्या दरम्यान म्हणजे कुरेश आणि मदिना (यसरिब) चे मुसलमान आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या दरम्यान ज्याचा संबंध कोणतेही जमातीशी असो जो कोणी आमच्याबरोबर एकनिष्ठ आणि हे सर्व मिळून उर्वरित (जगाच्या) तुलनेत एक राष्ट्रकुल आहेत मुसलमानां करिता युद्ध आणि युद्ध बंदीच्या काळात काही विशेष अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत.त्यांच्यापैकी कोणालाही या गोष्टीची परवानगी नसेल की ते या करारात सामील असलेल्या इतर धर्मीय अनुयायांच्या शत्रू बरोबर युद्ध अथवा तह करू शकतील जे ज्यू आमच्या राष्ट्रकुल सोबत निगडित आहे ते सर्व शारीरिक अथवा मानसिक मानहानी पासून सुरक्षित राहतील. त्यांना स्वतः आमच्या लोकांसारखे अधिकार प्राप्त असतील आणि त्यांना सर्व प्रकरणात बरोबरीचा दर्जा प्राप्त असेल ते सर्व यहुदी जे मदिनेत राहतात मुस्लिमांन सोबत संयुक्त राष्ट्रकुल स्थापनेत सहभागी होतील आणि ते सर्व आपापल्या धार्मिक विधींची तशाच प्रकारे उपासना करतील ज्याप्रकारे मुस्लिम करतात ज्यू सोबत ज्या कबिल्यांचा करार झाला असेल त्यांना सुद्धा संरक्षण आणि स्वातंत्र्य प्राप्त असेल. जे कोणी राज्यात बंडखोरी करील किंवा राष्ट्र कुलातील राज्याविरुद् शत्रुत्व द्रोह पसरविण्याचा प्रयत्न करेल मग तो अगदी प्रेषित पुत्र असला तरी संयुक्त राष्ट्र कुलातील सर्व नागरिक त्याच्याविरुद्ध एक होतील. ही सनद लागू होणाऱ्यांसाठी मदीना हे एक पवित्र हिंसा मुक्त (हरम: आश्रयस्थान) आहे की या राष्ट्रकुलआ मध्ये एखादा वाद किंवा मतभेद निर्माण झाला असेल तर तो निर्णयासाठी अल्लाहकडे अल्लाह च्या प्रेषितकडे सोपविला जाईल."(The religion of Islam : by A.Galwash p. p. 50)


मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?

लेखक : अनिस चिस्ती

पोस्ट : फिरोज शेख (अहमदनगर)

चांगल रुचत नाही चांगल पचत नाही

 


                    आपल्या देशांचे राजकारण. समाजकारण. अर्थकारण. प्रशासकीय विभाग. शैक्षणिक विभाग. विविध कल्याणकारी योजना. विविध सामाजिक संघटना. सामाजिक हिताची कार्यालये. अशी विविध माध्यमातून आपला व आपल्या समाजांचा गोरगरीब जनतेचा. सर्वसामान्य माणसाचा. आपल्या सामाजिक व्यवहारांचा एक भाग असतो. समाजाची वैशिष्ट्य आकांक्षा यांचें प्रतिबिंब राजकारणात. सामाजात प्रशासनावर पडते. तसेच यामध्ये होणार या विविध निर्णयामुळे सामाजिक व्यवहारांवर परिणाम झालेला आपण पाहतो. अशा पध्दतीने सामाजिक व्यवहार आणि राजकारण प्रशासन हे सर्व एकामेकाशी संलग्न असतात. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. विविध भाषेप्रमाणे आपल्याला आपले गाव तालुका जिल्हा राज्य देश याचा अभिमान असतो. त्या त्या प्रदेशांचा निसर्ग तेथील संस्कृती. प्रादेशिक इतिहास. साहित्य कला. त्या त्या विभागात असलेली शासन व्यवस्था याचा सुध्दा आपणास अभिमान असतो. विविध जाती जमाती विविध भाषा वेशभूषा राहणीमान चालीरीती सणवार मंगल कार्य दहन दफन विधी. त्या भागातील प्रशासकीय कार्यालये न्याय व्यवस्था याचा आपणावर चांगलाच प्रभाव असतो. 

              आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सर्वसामान्य माणसाला शासनाकडून मिळणाऱ्या राबविण्यात येणारया विविध कल्याणकारी आर्थिक सामाजिक शैक्षणिक महसुली अशा विविध योजना राबविल्या जातात त्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाकडून एक अधिकारी व कर्मचारी शासनाकडून निवडले जातात त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद. शहरी भागासाठी नगरपरिषद विभाग. महानगरपालिका. तहसिलदार. प्रांताधिकारी. नायब तहसिलदार. ग्रामसेवक. तलाठी. मंडलधिकारी. आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या अंतरंग. समाजकल्याण. महिला व बाल कल्याण विभाग. अपंग कल्याण विभाग. कामगार आयुक्त भवन. विविध योजनांसाठी आर्थिक पूरवठा करणारे विभाग. आरोग्य विभाग. शिक्षण विभाग. पाणीपुरवठा. विविध कर वसुली. नागरिकांना मिळणार या सुख सुविधा. गटर रस्ते. सफाई कामगार. गावातील सांडपाणी व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापन. असे एक नाही अनेक विभाग सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांच्यासाठी शासन नियोजन करत असतें. त्यासाठी सक्षम अधिकारी व कर्मचारी कार्यकारी अधिकारी. संचालक समिती. नियोजन समिती. यातून अधिकारी नेमले जातात. 

          वरील सर्व विभाग आणि यांच्याशी आपला संबंध संपर्क रोजचाच आहे. आपणाला आपल्या मागणी तक्रारी दाखल करण्यासाठी आपणांस वरिल विभागासी आपला दैनंदिन संबंध येतोच पण आज वरिल सर्व योजना राबविण्यासाठी किंवा अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी सक्षम असतात त्यांना मदत आपणच नागरिक म्हणून करणे आवश्यक आहे. 

            आपणांस चांगले जेवण जास्त पचत नाही. आणि आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले तर ते आपणांस रुचत नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही कारण. एखाद्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात ग्रामपंचायत किंवा नगरपालिका पोलिस स्टेशनला पंचायत समिती. येथे एखादा प्रामाणिकपणे नोकरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी आला की समाजातील काही लोक त्या अधिकारी व कर्मचारी यांचा आदर सत्कार करतात. की आत्ता आमच्या गावाला शहराला तालुक्याला जिल्ह्याला नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकारी अधिकारी व कर्मचारी मिळाला असे सर्वसामान्य जनतेला वाटते पण असेच मत त्याच गावातील शहरातील तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य. नगरसेवक. व राजकीय क्षेत्रात असणार्या लोकांना त्याचा अडसर वाटायला सुरुवात होते कारणं त्यामुळे अशा लोकांचे बोगस उधोग. गुन्हेगारी दहशतवाद. भ्रष्टाचार सामाजिक भुरटे चोरटे. सक्तीने वर्गणी गोळा करणे. खंडणी गोळा करणे. दमदाटी. छेडछाड. जीवन. नोकरी. व्यापार. आर्थिक राजनैतिक यावर अंकुश अडसर ठरणारे अधिकारी व कर्मचारी अशा राजकीय सामाजिक क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणार्या लोकांना चालत नाहीत. 

            कर्तव्य दक्ष अधिकारी व कर्मचारी यांना जीवे मारण्याची धमकी देणे. त्यांना आपला हेतू साधून घेण्यासाठी आर्थिक अमिष दाखवणे. यातून सुध्दा जर अधिकारी व कर्मचारी ऐकत नसेल तर त्याच्या अंगावर जाणे शिवीगाळ करणे किंवा शेवटी त्याला त्याला आपला राजकीय सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या कचाट्यात अडकिवणे. आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आपत्ती काळ. रोगाचा प्रादुर्भाव. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन यावेळी राजकीय व सामाजिक संघटना यांच्याआगोदर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी उन वारा पाऊस थंडी यांची काळजी न करता आपल्या सेवेसाठी सर्वात अगोदर घटनास्थळी धाव घेणारे हेच अधिकारी व कर्मचारी आहेत पण आपले दुर्दैव आहे की असे अधिकारी व कर्मचारी जास्त काळ शहरात गावात तालुका जिल्हा राज्य यामध्ये जास्त काळ नोकरी करताना दिसत नाहीत कारणं आपणांस चांगले पचत नाही चांगले रुचत नाही 

            आपल्या गावांचा शहरांचा तालुक्याचा जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी हेच अधिकारी व कर्मचारी उपयोगी पडतात त्यामुळे असे कोणतेही अधिकारी व कर्मचारी आपल्या मनाने बदली करून घेत नाहीत तर ते राजकीय व इतर दबावापोटी आपली बदली करून घेतात असे कोठेही अधिकारी व कर्मचारी करत असतील तर सर्वसामान्य जनतेने अशा कर्तव्य दक्ष अधिकारी याची बदली रद्द होण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे 

                अधिकारी व कर्मचारी हे नाममात्र आहे काय असे वाटत कारणं निर्णय कोण घेतय आणि फक्त मंजुरी आदेश वर सही करण्याचा अधिकार आहे पण त्या निर्णयाबद्दल बोलण्याचा अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना नाही. संघटित गुन्हेगारी असुरक्षितता. महिला अत्याचार. यासारख्या समस्यांमुळे सामाजिक सुरक्षा. प्रश्न महत्वाची बनत आहे. त्याशिवाय आंदोलने. दंगेधोपे. यामुळे सार्वजनिक शांतता आज धोक्यात आली आहे. यावर नियंत्रण आणणारे अधिकारी व कर्मचारी आपणांस पचत व रुचत नाहीत. कोरोना काळात सफाई व वैद्यकीय सेवा देणारे अशा वर्कर. डॉ. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा नाहक त्रास देण्यात आला होता 

           भारतीय जनतेला काही महत्वाचे अधिकार देण्यासाठी व त्यासाठी वचनबद्ध राहण्यासाठी हे संविधान समंत केले आहे संविधानाने सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. निर्माण केले आहे. समाजवाद धर्मनिरपेक्षता व लोकशाही ही या सार्वभौम गणराजयाची मूलभूत तत्वे आहेत. सर्व नागरिकांना सामाजिक. आर्थिक. व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व उपासना यांचें स्वातंत्र्य व दर्जाची आणि संधी समानता निश्चित प्राप्त करून दिली आहे. पण आम्हाला चांगले रुचत नाही आणि पचत नाही

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

पाऊस काळात पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे कारणं पाण्यापासून बरेच आजार होण्याची शक्यता असते. स्वच्छता पाळा रोगराई टाळा. आपले घर आपला परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या परिसरात कीटक नाशक औषधे फवारणी करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचेकडे पत्र व्यवहार करा

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या