गिधाडे

 


         आपण आपल्या गावात प्राचिन काळापासून हे नाव ऐकत आलो आहे  मृत्यू झालेले जीव सुध्दा ही जात सोडत नाही एक म्हनं आहे की जनावरं किंवा कोणताही प्राणी मृत्यू झाला तर या गिधाडांना स्वप्न पडते आणि यांचें थवे चया थवे येथे उतरतात आणि मृत्यू झालेल्या प्राण्यांचा फडशा पाडतात तो असा की त्या जनावरांची फक्त हांडे दिसतात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पुरेपूर एखाद्याला संपविण्याचा जणू विडा उचलला आहे

      आज मानवरुपी गिधाड आपणास सर्वत्र पाहायला मिळतात ती म्हणजे आर्थिक लुबाडणूक.  सामाजिक दबाव. महिला अत्याचार.  कामगार लुबाडणूक. सर्वसामान्य माणसाला शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मिळणारी वागणूक.   वैद्यकीय सेवा. मेडिकल व्यवसाय.   किराणा दुकान. फळे भाजीपाला. महागाई.  अशी विविध प्रकारची गिधाडे आपणास दिसतात 

            रेशन विभाग ( पुरवठा विभाग ) यातून आपणास काय वागणूक मिळते आपणास माहीत आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात सदन असणारे ज्यांना गरज नाही असे लोक असतात. त्यांना रेशन मधून मिळवणारे अन्न धान्य खाण्यास योग्य वाटत नाही ते जादा दराने विक्री करतात त्याचा उपयोग गरजवंताला होईल पण तशी तरतूद केली जात नाही रेशन दुकानदार महिन्याला जेवढे रेशनकार्ड धारकांना अन्न धान्य मिळणार या लाभातून   तुमचे नाव दिसत नाही.  थम उठत नाही. आधार कार्ड लिंक नाही. वरून येत नाही. अशी एक नाही अनेक कारणे दाखवून आपला हक्क मारला जातो.  नविन रेशनकार्ड काढणे.  नाव कमी करणे. नाव वाढविणे. अन्न सुरक्षा योजनेत समावेश करणे.  अशी अनेक प्रकरणे महिने न महिने धुळखात पडलीं आहेत याचा अर्थ काय 

         सामाजिक दबाव आपण समाजप्रिय लोक आहोत  समाजात म्हणजे  एक कुटुंब असल्यासारखे आपण राहतो समाजातील चालीरीती सणवार. मृत्यू दहन दफन शिक्षण.  लग्न संभारभ. याचा आपणास अभिमान असतो आज समाजाच्या नावांवर आज सर्वत्र प्रत्त्येक जण आपापल्या परीने सत्ता आपला दबदबा निर्माण करण्याकडे कल आहे  समाजातील लोकांना वाळीत टाकण्याची भीती घालून पैसा उकळणे. जात पंचायतीच्या नावाखाली जातक अटि घालणे तुम्ही पंचांच्या निर्णयानुसार वागले पाहिजे असे निर्बंध घालणे अशी विविध प्रकारची बंधने घातली जातात याला काय म्हणायचे

           जननी जन्म जन्मभूमी जय. एक महिला आई बहीण वयीनी. आजी. या सर्व नात्याची आठवण आपणास महिला दिनाच्या. दिवशी आपणास आठवतात. पण खरोखर पाहिले तर  आज महिला आपल्या घरातच सुरक्षित नाही. बाहेर आपण पाहतो शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षीत नाहीत. अॅसिड हल्ले. बलात्कार. अपहरण. छेडछाड. लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करणे. अशा विविध समस्यांना महिलांना मुलींना रोज सामना करावा लागतो 

                शाळेत जाणारी मुलगी. बाजारात बाजार आणण्यास गेलेली मुलगी परत घरात येई पर्यंत तीची आई वडील घराच्या दरवाज्याकडे डोळे लावून बसतात कारणं बाहेर भली मोठी गिधाड फिरत असतात आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारी महिला आज सुरक्षित नाही  महिलांना. वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणारे आपणातीलच आहेत . त्यांच्या वरिल. अन्याय दूर करण्यासाठी महिला कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे बलात्कार करणार्या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात न देता जनतेच्या ताब्यात द्या. महिला वावर जास्त असणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत 

    त्यामुळे उनाड फिरणारा या गिधाडांना चाफ बसेल 

            कामगार संघटीत आणि असंघटित कामगार असे दोन प्रकार असतात त्यात मोलमजुरी करणारे. बिगारी काम करणारे. बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना  वेतन जेमतेम असते. त्यातूनच अडाणी गरजू व्यसनी गरिब अशी छाप यांच्यावर पडलेली असते    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून अशा बांधकाम व्यावसायिक कामगार यांच्यासाठी १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने कुटुंबातील. मुलं. वैयक्तिक कामगार. यांना भविष्य निर्वाह करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजना मिळविण्यासाठी कोणतेही एजंट दलाल यांची गरज भासत नाही. पण कामगार हितचिंतक आहे असा आव आणून आज जागोजागी विविध कामगार संघटना सेवाभावी संस्था युनियन व इतर माध्यमातून बेमाफी फि घेवून कामगार नोंदणी केली जाते   लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांकडून मंडळातून मिळणाऱ्या लाभातून मोठा वाटा काढून घेतला जातो  बोगस कामगार नोंदणी केली जाते बांधकामासी कोणताही संबंध नसणारे लोक आज मंडळांचा लाभ संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्त मधील अधिकार व कर्मचारी यांच्या तुम्ही खा आम्ही खातो असा फंडा वापरला जातो  अशी बरीच प्रकरणे आहेत लिहायला वेळ कमी पडेल मग मला सांगा यांना काय म्हणता येईल मृत्यू झालेल्यांना खाणारे बरे ही तर जीवंत माणसांना या मार्गाने खात आहेत

        आत्ता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्यावर अन्याय झाला आहे त्याचा न्याय मिळावा जाब विचारता यावा यासाठी. शासकीय आॅफिस.  ग्रामपंचायत. पंचायत समिती.  जिल्हा परिषद. तहसिलदार कार्यालय अंतर्गत येणारे सर्व विभाग. जिल्हा अधिकारी. अशे सर्व शासकीय क्षेत्रातील आॅफिस मध्ये निवेदन.  तक्रार अर्ज. मागणी अर्ज. स्मरणपत्र. बंद. आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन. अशा विविध विषयांवर वेळोवेळी अर्ज करत असतात पण आजपर्यंत माझ्या पाहण्यात नाही की कोणत्याही शासकीय आॅफिसने कोणत्याही पत्र व्यवहाराचे लेखी उत्तर दिले नाही  असे का ? आपण लोकशाही राज्यात आहोत. लोकांनी लोकांच्या साठी तयार केलेले राज्य आहे पण सर्वसामान्य जनतेला काहीच किंमत नाही. एकाधा व्यक्ति उपोषणाला बसतो पण कोणीही त्या उपोषण स्थळी जाऊन भेट देत नाही याउलट एखाद्या नामांकित व्यक्तिच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित असते हे काय आहे  शासनाने गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे पण खरोखर एक विचार येतो शासकीय अधिकारी नावालाच आहेत यांच्या किल्ल्या राजकारणी लोकांच्या हातात आहेत 

        यांना काय म्हणता येईल मृत्यू झालेल्यांना खाणारे बरे पण जीवंत लोकांना खाणारे कोण ?

        आपणं डॉ यांना देव मानतो आज आपणं बघतो की वैद्यकीय सेवेचा व्यवसाय सुरू केला आहे  दवाखान्यात दाखल झाल्यापासून फी आकारण्यास सुरवात होतें ती अमुक आजारासाठी अमुक अशी नाही तोंडाला येईल ती फी. दवाखान्यात मेडिकल त्याच डॉ लोकाच मग त्याच्या उपचार घेताय म्हणून त्यांचे औषध त्यांच्याच मेडिकल मध्ये मिळणार दुसरीकडे मिळणार नाही. औषधांची किमंत किती आहे हे विचारायचे नाही. पेशंट बरा होऊ अथवा नाही यांचे बिल माफात झाले की सांगितले जाते तुमचा पेशंट दुसरीकडे हालवा. ?  पेशंट मयत झाल्यास पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जात नाही. आपण भावनिक असतो आपला व्यक्ती मयत असतो आपण ईकड १०/२० टक्के नी पैसे काढतो आणि यांच्या मढयावर घालतो  मेडिकल हा एक पैसा मिळवण्याचा मार्ग आहे  दहा गोळ्यांचे पाॅकीट. ५० रुपये म्हणजे पाच रुपयांला एक गोळी त्याची विक्री दहा रुपये प्रमाणे केली जाते. सलाईन बाॅटल. ४० रु मेडिकल वाले विकणार १०० रु डॉ तीच सलाईन बाॅटल अडमिट असणार्या पेशंटला  लावली की त्याची किंमत खाट भाडे. आय सी यु चार्ज वेगळा. जनरल चार्ज वेगळा. म्हणजे सर्व मिळून दिवसांचे.  कमीत कमी १०/००० हजार बिल होत असावे. म्हणजे आय सी यु मध्ये पेशंटला कोणती वैद्यकीय सेवा दिली जाते हे नातेवाईक यांना सुध्दा माहिती नसते. आणि आपण विचारत नाही. मी पाहिले आहे. एका तासांपूर्वी व्यवस्थित बोलत असणारा पेशंट नाहिसा होतो. मयत असणार्या पेशंटला सुध्दा आॅकसिजन वर ठेवून काही डॉ पैसे उकळतात. दवाखान्यात कोठेही  रुग्ण हक्क सनद लावली जात नाही. वैद्यकीय सेवेप्रमाणे रुग्णांचे बिल आकारण्यात यावे  आपण विचारत नाही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे वर्षाला एक मजला डॉ वाढवत आहेत जागोजागी मोठ्याप्रमणात माया गोळा केली आहे. महिला बाबतीत  बाळंतपण काळात. नैसर्गिक रीत्या जरी बाळंतपण होत असेल तरी सुद्धा सिझर करण्याचा सल्ला दिला जातो 

      .  मग यांना काय म्हणता येईल आपण विचार करा. सजग नागरिक व्हा प्रश्न विचारा नाहितर ही अशी अनेक ठपून बसली आहेत कवा पड पडत्या आणि मी खातोय 

       समजा काही कारणांमुळे एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश बंद  किंवा लाॅकडाऊन करण्यात आला की मग किराणा दुकानदाराचे सोनं होतंय कारण. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत ही दुकाने जसे. किराणा. दुध. भाजीपाला फळे. यांना सुट देण्यात येते. पण वेळेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या वेळेचा फक्त फायदाच करुन घेण्यासाठी. मालाचा दर डबल केला जातो. मग. तेल. शेंगदाणे. गुळ. ज्वारी. गहू बाजरी. मका. व अन्य किराणा माल. अगोदर सटाॅक केला जातो आणि मग आम्हाला माल मिळत नाही असे कारणं दाखवून जनतेला लुटले जाते  नासका कुजक्या. भाज्या फळं विकली जातात. अशा जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री करणारे दुकानदार त्यांचेवर कोणाचा अंकुश आहे का ? यांना काय म्हणता येईल

         विविध उत्पादनांची आज आपणं मार्केटला.  निर्मिती होताना बघतो. तयांची मोठ्याप्रमाणात टेलिव्हिजन वृतमानपत्र. व विविध माध्यमातून आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात एका वर एक मोफत पाकिटावर किंमत जास्त आत माल कमी. तेल किलोचा भाव वेगळा लिटरचा वेगळा  आज आॅनलाइन शापिंग च याड प्रत्येकाला लागलंय किंमत अगोदर भरुन घेतलीं जाते अन्यथा पॅकिंग फोडण्याच्या आधी आत काय आहे कसे आहे ते आपल नशीब. अशी एक नाही अनेक गिधाड आपल्या भोवती फिरत आहेत कवा कोण सापडतो त्या टार्गेट मध्ये. हा सर्वात मोठा प्रश्न आहे 

        यांना काय म्हणता येईल तुमच्याकडे उत्तर आहे का ? 

        बॅंक. पतसंस्था. विविध सोसायट्या. पतपेढी. फायनान्स कंपन्या. खाजगी सावकार.  सरकारमान्य सावकार. भिशी मंडळे. अशा विविध आर्थिक उलाढाल करणारी माध्यमे आपण बघतो  त्यात एक म्हनं आहे. * ऊस मुळासकट खाल्ला. * याचा अर्थ असा होतो की  एखाद्याने एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले तर त्यावर व्याज किती आकारण्यात आले आहे त्या कर्जाला मुदत किती आहे. जामीन कोण आहेत याचा पाठपुरावा आपणच करायचा असतो. मी पाहिले आहे की अशी कर्जे काढणारे एक तर फास लावून घेतात अन्यथा आपले गाव सोडून जातात आपलीं सर्व संपत्ती विकून सुध्दा अशी कर्ज भागत नाहीत ती म्हणजे आपल्या गलथानपणामुळे. आज खाजगी सावकारकी बर्याच प्रमाणात वर डोकं काढत आहे. व्याजाला व्याज. घरदार शेतीवाडी लिहून घेतलीं जाते वेळ पडल्यास घरातल्या महिलांना सुध्दा वेठीस सरकारी लाईसनस देण्याची तरतूदही आहे त्यामुळे त्याला सरकारमान्य सावकारी म्हणले तर वावगे ठरणार नाही  धरले जाते अशी बरीच गिधाड आपणास आपल्या भोवती दिसतात त्यावर शासन अंकुश नाही 

      यांना पाठबळ कोण देत विचार करा उत्तर सापडेल 

       अशी बरीच मोठी गिधाड आपणास खाण्यास तयार आहेत  त्यातच सत्तेची लालसा असणारे आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जातील आजची तरुण पिढी यांना बळी पडत आहे सवलत. शोषण. यातला फरक समजून घ्या 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

 संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

घृणा...

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE ...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या