Showing posts with label handicapped. Show all posts
Showing posts with label handicapped. Show all posts

दिव्यांग विद्यार्थी करीता लेखनिक/ वाचक

 

दिव्यांग विद्यार्थी करीता लेखनिक/ वाचक 

                     आपल्या समाजातील अतिशय मागास आणि वंचित दुसर्याच्या मदतीवर अवलंबून असणारा आपल्या कुटुंबावर व मित्रांवर ओझ वाटणारा. पांगळया. लंगड्या आंधळ्या वेड अशी विविध नांवाने अवहेलना केली जाणारे अंध. कर्णबधिर. अस्थिव्यंग. मतिमंद. बहुविकलांग. कुष्ठरोगी. निराधार/ निराश्रीत. अपंग बेरोजगार. भिक्षेकरी अपंग. अपंग विद्यार्थी. असे विविध प्रकार अपंगामधये शासनाने केले आहेत पण आपले लोक यांना सामाजिक न्याय देण्यास तयार नाहीत. ही आपली मानसिकता आहे. 

      शासनाने अपंग साठी कल्याणकारी योजना तयार केल्या आणि समाजातील या वंचित लोकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. यामध्ये ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यासाठी येणारा विकास निधी यातून पाच टक्के रक्कम अपंग कल्याणासाठी खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. घरकुल योजना. शैक्षणिक योजना. वैद्यकीय योजना. बचत गट योजना. कला कौशल्य विभाग. अपंगांसाठी क्रिडा संकुल. करमणुक क्षेत्र. सुलभ स्वच्छता गृह. मालमत्ता सुट. पिठाची चक्की. अपंगांसाठी शेती अनुदान. अपंग विद्यार्थी शालेय सवलत गणवेश शैक्षणिक सहाय्य निधी. उच्च व तंत्रशिक्षण. अपंग विद्यार्थी साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा. अपंग विद्यार्थी खेळाडू अर्थसहाय्य. अशा विविध योजना सुध्दा शासन विद्यार्थी व दिव्यांग लोकांसाठी राबविण्यात येतात

       ‌. शारीरिक व मानसिक दृष्ट्या दिव्यांग विद्यार्थी अतिशय हुशार असतात कारणं देवाने यांना जन्माला घालताना एक शारीरिक मानसिक शक्ती कमी केली असेल तर त्यांना बौद्धिक शक्ति प्रदान केलेली असते म्हणजे अतिशय सुंदर हुशार असे गुण यामध्ये असतात. यासाठी शासनाने वेळोवेळी शिक्षण संस्थांना अशा हुशार मुलांचा बौद्धिक विकास व समाजातील इतर घटकाप्रमाणे नोकरी व्यवसाय करण्याची शक्ति यावी यासाठी वायाचया ६/१४/ १८ या वयापर्यंत विशेष गरज असणार्या दिव्यांग विद्यार्थी यासाठी लेखनिक/ वाचक उपलब्ध करून त्यांची प्रगती विकास साधण्यासाठी मोलाची मदत करा असा शासन निर्णय शालेय शिक्षण क्रिडा विभाग शासन निर्णय क्र संक्रिरण २०१७/(११८/११९) एस डी दिनांक १५/२/२०१६ व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र संक्रिरण २०१७(११८/१७) एस डी व मंत्रालय विस्तार भवन मुंबई ४०००३२ दिनांक आक्टेबर २०१८ या विषयानुसार इ १ ली ते १२ वी पर्यंत विशेष गरजा असणारया दिंवयाग विद्यार्थी अध्ययन शैली नुसार मुल्यांकन बाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निर्गमित केलेल्या आहेत बालकांचा सकतिचया व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व भारतीय संविधान कलम ४५ नुसार शिक्षण हा प्रत्येक मुलांचा हक्क आहे. वय वर्षे ६ ते १४ वर्षाच्या प्रत्येक बालकास व विशेष गरज असणार्या विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्षे वयोगटापरयणत मोफत व सकतिचे शिक्षण विषयक सुविधा देणे आवश्यक आहे

              विशेष गरज असणारे दिंवयाग विद्यार्थ्यांना सदर शासन निर्णयातील प्रपत्र अ ब प्रपत्र ब मध्ये नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक सवलती सुविधा शालेय विद्यार्थी व इयत्ता १० वी व १२ वी चया विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये प्रपत्र ब. मध्ये नमूद केलेल्या लेखनिक/ वाचक या संदर्भातील तरतुदींचा समावेश आहे त्यामध्ये प्रामुख्याने पुढील महत्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे

*# लेखनिक

* इ १ ली ते ९ वी आवश्यकतेनुसार लेखनिक घेण्यात परवानगी देण्यात यावी त्याकरिता लेखनिक हा मागील वर्षातील असावा

* इ १० वी ते १२ वी पर्यंत विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना गरजेनुसार प्रोढ लेखनिक घेण्याचे स्वातंत्र्य आहे

*# लेखनिक घेण्याबाबत निकष

* लेखनिक निवडताना प्राधान्याने परिक्षा द्यावयाच्या वर्गाच्या एक इयत्ता खालच्या वर्गाचा विद्यार्थी निवडण्यात यावा

* उपरोक्त १ मध्ये नमूद प्रमाणे लेखनिक उपलब्ध होत नसल्यास प्रौढ लेखनिक घेता येतो

* प्रौढ लेखनिक शाळेतील अथवा अन्य शाळेतील शिक्षक खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक प्रतिनिधी विद्यार्थी यांचें जवळचे नातेवाईक नसावेत तथापि विशेष बाब म्हणून जवळच्या नातेवाईकांना लेखनिक म्हणून देण्याचा अधिकार ( प्रकरणांची शहानिशा करून) संबंधित अध्यक्ष विभागीय मंडळ यांना राहतील

* दिवयांग विद्यार्थ्यांना मागील इयत्तेचा विद्यार्थी अथवा प्रौढ लेखनिक म्हणून देण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना राहतील दिवयांग विद्यार्थ्यांच्या असणार्या अडचणी व गरजा याबद्दलची जाणीव व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना असल्याचे हे अधिकार त्यांना राहतील

*# दिवयांग विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याकरिता शिफारस देण्याची जबाबदार पध्दती

इयत्ता १० वी १२ वी चया विद्यार्थ्यांकरिता शाळेतील मुख्याध्यापक/ कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य सदर विद्यार्थ्यांसाठी लेखनिक देण्याबाबत स्पष्ट अभिप्राय/ शिफारशीसह संबंधित विभागीय शिक्षण मंडळाकडे आॅगसट पर्यंत करतील विभागीय मंडळ प्रस्तावाच्या मानयतेबाबत अहवाल १५ दिवसांच्या आत संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना लेखी कळवतील

* ज्या विद्यार्थ्यांना लेखनिक दिलेजातील त्या लेखनिकाच्या तपशील शाळेचे मुख्याध्यापक/ कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य संबंधित ( प्रौढ लेखनिकाचे शासनमान्य. ओळखपत्राची प्रत व पालकांचा अर्ज या तपशीलासह ) विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करतील

* अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऐनवेळी लेखनिक देण्याबाबत निर्णय संबंधित परिक्षा केंद्र प्रमुखास घ्यावा लागल्यास त्यांना त्याबाबतचा अधिकार राहील त्यांनी संपूर्ण वस्तुस्थिती सह विभागीय परीक्षा मंडळाची त्याकरीता कार्य ततर मान्यता द्यावी तसेच विभागीय मंडळाने याकरिता योग्य ते सहकार्य करावे

*# लेखनिक/ वाचक उपलब्धतेबाबत मार्गदर्शक सूचना

* लेखनिक/ वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेल्या सामान्य विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे

* इच्छूक विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज/ संमतीपत्र भरून घेण्यात यावेत

* लेखनिक/ वाचक हे शाळेतील किंवा त्या परिस्थितील वास्तव्यास असावेत

* लेखनिक/ वाचक नोंदणी करताना लेखनिक विद्यार्थी असल्यास त्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे

* लेखनिक/ वाचकांना इयत्ता विषय. परिक्षेचा कालावधी वेळ. दिवयांग विद्यार्थ्यां बाबत पूर्व कल्पना देण्यात यावी

* लेखनिक/ वाचक म्हणून नोंदणी केलेलें विद्यार्थी/ प्रौढ व्यक्ती परिक्षेदरमयान अपरिहार्य कारणामुळे नकार दिल्यास अथवा उपस्थित राहू न शकल्यास पर्यायी व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी

* नोंदणीकृत लेखनिक/ वाचक यांचे समुपदेशन करण्यात यावे

* मुख्याध्यापक/ वर्गशिक्षकानी लेखनिक/ वाचक होण्यास सामान्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करावे

*# लेखनिक/ वाचक बॅकबाबत

* विशेष गरजा असणारया दिवयांग विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी लेखनिक/ वाचकांची आवश्यकता असते या विद्यार्थ्यांना लेखनिक/ वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेलें विद्यार्थी आणि वयाने प्रौढ असलेलें सामान्य नागरिकही सहहय करु शकतात अशा दिवयांग विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचें मार्फत इच्छूक लेखनिक/ वाचकांची बॅंक तयार करण्यात येत आहे. सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी आपल्या शाळेतील परिसरातील विद्यार्थी/ प्रोढ नागरिक यांना या समाजपयोगी कामासाठी प्रेरित करावे जे इच्छूक विद्यार्थी/ प्रौढ नागरिक सवयंव प्रेरणेने लेखनिक वाचक म्हणून काम करण्यास इच्छूक असतील त्यांची माहिती देणे यासाठी शासन आदेश करत आहे

        मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी सदर शासन निर्णयातील २ मधील २.४ नुसार या संदर्भातील आपले काम जबाबदारीने पार पाडावे कोणताही दिवयांग विद्यार्थी निर्धारित सेवा सुविधा पासून वंचित राहणार नाही हे सर्व शैक्षणिक क्षेत्रातील काम करणारे यांचे परम कर्तव्य आहे

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अबब एवढे दिव्यांग आहेत का ? अबब एवढे दिव्यांग आहेत का ?



अबब एवढे दिव्यांग आहेत का ? 

                समाजातील वंचित दिन शारीरिक दुबळा कुटुंबावर ओझ समजला जाणारा घटक म्हणजे दिव्यांग होय. घरातील वागणूक हीनतेची वागणूक. समाजात. पांगळया. लंगड्या. बहिरया. कानया. आंधळ्या. अशा विविध शब्द की जे आपल्या व दिव्यांग व्यक्तिच्या कानांत गरम तेल ओतल्या प्रमाणे ऐकावे लागतात. पण शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असल्यामुळे काहीच करू शकत नाही. शासनाच्या हा सर्व प्रकार ध्यानात आला. अशा वंचित घटकांसाठी. हक्काचे व्यासपीठ असावे म्हणून. २०११ साली. अपंग जनगणना करण्यात आली. त्यानूसार. या समाजाकडून सतावलेलया. अपंग लोकांच्या उन्नती व विकासासाठी. अपंग कल्याण मंडळ सुरू करण्यात आले त्यानुसार अपंगांचा विकास उन्नती व्हावी यासाठी विविध सामाजिक. आर्थिक. वैद्यकीय वैयक्तिक. शैक्षणिक. अशा विविध योजना राबविण्यात आल्या त्यामुळे शासनाने अपंग लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले 

              महाराष्ट्रात अपंग प्रकारानुसार (१) अंध (२) कर्णबधिर (३) मूक वाचादोष (४) पांगळे (५) मंद बुध्दी (६) मनोरुग्ण. (७) शारीरिक अपंग (८) मानसिक अपंग. व असे विविध अपंग लोक आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये वास्तव्य करतात आपण रोज बघतो आणि हळहळणे याशिवाय काही करू शकत नाही. महाराष्ट्रात सन २०११ ची जनगणने नुसार अपंगांची. लोकसंख्या. २९.६३.३९२ ( सुमारे २९.६३ लाख ) आहे असा अंदाज आहे २००२ साली अपंगांची लोकसंख्या १५.६९.५८२ ( सुमारे १५.७० लाख ) होती या दहा वर्षांत कालखंडात अपंगांच्या लोकसंख्येमधये १३.९३.८०० ( सुमारे. १३.९४ लाख ) वाढ झालेली आपणांस समजते. याचा अर्थ अपंगांच्या लोकसंख्येत ८८.८ टक्क्याने वाढ झालेली आहे ही खरोखर चिंताजनक बाब आहे. अशा वंचित दुर्बल घटकांची संख्या विक्रमी वाढ झाली आहे. या दृष्टीने समाजशास्त्र. लोकसंख्या शास्त्र. आरोग्य तज्ञ. आणि राजकारणी यांनी एकत्रितपणे या योग्य उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अपंग ही एक गंभीर समस्या होईल असे भय आज आपणांस वाटत आहे. 

  *अपंग प्रकार अंध

लोकसंख्या ५.७४.८०८

टक्केवारी. १९.४

 * अपंग प्रकार. कर्णबधिर

लोकसंख्या. ४.७४.१४३

टक्केवारी. १६.०

* अपंग प्रकार. मूक वाचादोष

लोकसंख्या. ४.७४.१४३

टक्केवारी. १६.०

* अपंग प्रकार. पांगळे

लोकसंख्या. ५.४८.२२८

टक्केवारी. १८.५

* अपंग प्रकार मंद बुध्दी

लोकसंख्या. १.६०.०२३

टक्केवारी. ५.४

* अपंग प्रकार. मनोरुग्ण

लोकसंख्या ५९.२६८

टक्केवारी २.०

इतर ५.०९.७०३ टक्केवारी १७.२

एकाधिक. १.६२ .९८७ 

टक्केवारी ५.५

एकूण अपंग लोकसंख्या २९.६३.३९२ टक्केवारी १०० टक्के असी जनगणना अपंग लोकांची नोंदणी सांगते

महाराष्ट्रात अपंग लोकसंख्येत ठाणें पालघर जिल्ह्याचा ( २.५४.३८३ ) सर्वात पहीला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात गडचिरोली. सिंधुदुर्ग. गोंदिया. वर्धा. यामध्ये सर्वात कमी अपंग लोकसंख्या आहे. 

* अंध अपंग 

  सरासरी जनगणने नुसार महाराष्ट्रात अंध अपंग संख्या ५.७४.८९८ सुमारे ५. ७५ लाख एवढी आहे. महाराष्ट्रात एकूण अपंग लोकसंखे पैकी अंध अपंगांची टक्केवारी १९.४ आहे आणि आणि अपंग प्रकारात सर्वात जास्त आहे महाराष्ट्रात पुरुष अंध अपंग सुमारे ३.११.३८० सुमारे ३.११ लाख असून एकूण पुरुष अपंगात पुरुष आकडेवारी 

नुसार टक्केवारी. १८.४ आहे

महाराष्ट्रात महिला अपंगांची संख्या २.६१.८४८ सुमारे २.६२ असून एकूण महिला अपंगात महिला अपंगांची टक्केवारी २०.६ एवढी आहे अनुसूचित जाती जमाती अंधाची लोकसंख्या ८५.९१२ व ४५ .७२५ आहे. ग्रामीण भागात व नागरी भागात अंध अपंगांची लोकसंख्या ३.२ लाख आणि २.५३ लाख आहे आपण जर अंदाज काढला की महाराष्ट्रात ग्रामीण परिसरात अंधाची लोकसंख्या सर्वात जास्त ३.२१.५६४ एवढी विक्रमी आहे 

* कर्णबधिर अपंग जनगणने नुसार महाराष्ट्रात कर्णबधिर अपंगांची लोकसंख्या ४.७४.१४३ सुमारे ४.७४ असून एकूण अपंग लोकसंख्येत कर्णबधिर टक्केवारी १६.० एवढी आहे महाराष्ट्र कर्णबधिर पुरुष लोकसंख्या २.६५.६८९ म्हणजे २.६६ लाख असून एकूण पुरुष अपंगात याची आकडेवारी १५.७ आहे. महिलांची कर्णबधिर लोकसंख्या सुमारे २.३ लाख आहे. अनुसूचित जाती जमाती कर्णबधिर अपंगांची लोकसंख्या सुमारे ५९ हजार आणि ३८ हजार आहे. कर्णबधिर ग्रामीण भागात व शहरी भागात सुमारे लोकसंख्या साधारण समान म्हणजे २.४ लाख आहे 

* मूक वाचादोष जनगणने नुसार महाराष्ट्रात मूक वाचा दोष लोकसंख्या ४.७४.१४३ सुमारे ४.७४ लाख आहे एकूण अपंग लोकसंख्येत मूकबधिर टक्केवारी १६.० आहे महाराष्ट्रात मूक वाचा दोषाची लोकसंख्या पुरुष व महिला लोकसंख्या सुमारे २.६ लाख आहे. अनुसूचित जाती जमाती आणि कर्णबधिर टक्केवारी सुमारे १०. टक्के आणि ९ टक्के आहे. ग्रामीण भागात व शहरी भागात कर्णबधिर लोकसंख्या सुमारे २.४२ लाख आणि २.३२ आहे 

* पांगळे. जनगणने नुसार महाराष्ट्रात पांगळयाची संख्या ५.४८. २२८ सुमारे ५. ४८ लाख आहे असून अपंग लोकसंख्ये पैकी १८.५ टक्के पांगळे लोक आहेत अंध अपंगांच्या खालोखाल पांगळयाची लोकसंख्या आहे पुरुष पांगळे लोकांची संख्या ३.५७ लाख असून याची एकूण पुरुष अपंग लोकसंख्येत २१.१ टक्के आहे. पुरुष पांगळे लोकसंख्या सर्वात जास्त आहे महिला पांगळयाची संख्या. १.९१ लाख. ( १५.०/टक्के) अनुसूचित जाती जमाती पांगळयची संख्या सुमारे ७९ हजार आणि ४४ हजार आहे. ग्रामीण भागात व शहरी भागात पांगळयाची संख्या सुमारे ३.६३ आणि १.८६ टक्के आहे. महार महाराष्ट्रात महिला पेक्षा पुरुषाची आणि नागरी क्षेत्रापेक्षा ग्रामीण पांगळयाची संख्या लोकसंख्या जवळ जवळ दुप्पट जास्त आहे

* मंदबुद्धी. सर्वसाधारणपणे जनगणने नुसार महाराष्ट्रात मंदबुद्धी लोकसंख्या १.६०.०२३ ( ५.४/टक्के) एवढी आहे. मंदबुद्धी सर्वात जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात ९१.६३७ असून या खालोखाल शहरी भागात ६७.४५७ मंदबुद्धी आहेत महाराष्ट्रात वर उल्लेख केल्याप्रमाणे वर्गवारी मंदबुद्धी लोकसंख्येची सर्वसाधारण टक्केवारी ५ आहे 

* मनोरुग्ण आपल्या सर्वसाधारण जनगणने नुसार महाराष्ट्रात मनोरुग्ण ५९.२६८ सुमारे ५९ हजार असून एकूण अपंगात याची आकडेवारी फक्त २ टक्के आहे पुरुष मनोरुग्ण व ग्रामीण क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ३३ हजार आहेत

इतर अपंग महाराष्ट्रात इतर अपंगांची लोकसंख्या ५.०९.७०३ सुमारे ५.१ लाख आहे महाराष्ट्रात अंध आणि अपंग यांच्या खालोखाल इतर अपंगांची लोकसंख्या टक्केवारी १७.२ अशी नोंदविली आहे इतर अपंगात महाराष्ट्रात पुरुष अपंगांची लोकसंख्या सुमारे २.८ लाख व महिला इतर अपंगांची लोकसंख्या २.३ लाख आहे. अनुसूचित जाती जमाती मध्ये इतर अपंगांची लोकसंख्या ९१ हजार असून याची टक्केवारी २२.४ एवढी आहे ग्रामीण भागात व शहरी भागात अपंगांची लोकसंख्या सुमारे २.७५ लाख आणि २.४० एवढी आहे. 

* एकाधिक अपंग. महाराष्ट्रात एकाधिक अपंगांची लोकसंख्या १.६२.९८७ सुमारे १.६३ लाख असून एकूण अंपंगाशी एकाधिक अपंगांची टक्केवारी ५.५ एवढी आहे. एकाधिक अपंगांत. पुरुष लोकसंख्या ९५ हजार महिला लोकसंख्या ७० हजार. अनुसूचित जाती जमाती मधील एकाधिक अपंगांची लोकसंख्या सुमारे २३ हजार ( ५.६/टक्के) आणि १३ हजार (६.१/ टक्के) होती आणि आहे. ग्रामीण भागात शहरी भागात. परिसरात एकाधिक अपंगांची लोकसंख्या सुमारे ,१.१ लाख आणि ५८ हजार आहे महाराष्ट्रात. एकूण अपंगांची लोकसंख्या २९.६३.३९२ आहे. पुरुष आणि महिला अपंगांची लोकसंख्या सुमारे. १६.९ लाख आणि १२.७ लाख आहे. अनुसूचित जाती जमाती अपंगांची लोकसंख्या सुमारे ४.१ लाख आणि २.२ लाख आहे. ग्रामीण व शहरी भागात एकूण अपंगांची संख्या सुमारे १६.७ लाख आणि १३ लाख आहे 

* सांगली. ९३.१३१

*सातारा. ९७.१९७

 *कोल्हापूर. १.०८.५२८

 *सोलापूर १.१६.५७९

* सिंधुदुर्ग. २३.७९०

* रत्नागिरी. ३३.९१६

* रायगड. ६०.५८६

* पुणे. २.२६.३०६

* ठाणे पालघर. २.५४.३८३

* नाशिक १.१६.०३७

* मुंबई ब्रांद्रा. ९८.७३३

* मुंबई उपनगर. २.४३.२८१

* नंदुरबार. २८.०२१

*. धूळे. ५७.४१९

* जळगाव. १.३९.५८७

* औरंगाबाद. ९९.९३४

* अहमदनगर. १.२२.६६५

*. बीड. ५९.४५७

* उस्मानाबाद. ५१.३८५

* लातूर. ७६.०८०

* नांदेड. ९४.११६

* परभणी. ६२. ४२७

* जालना. ६६.६०८

* हिंगोली. ३०.४५५

* वाशिम. ३२.३२३

* बुलढाणा. ७२.४१५

*अकोला. ४७.१६२

* अमरावती. ७७. ९८८

* यवतमाळ. ६६.५३६

* चंद्रपूर. ७९.३५५

* वर्धा. २९.९१८

* नागपूर. १.१६.३३९

* भंडारा. ४४.४१२

* गोंदिया. २६.४५०

* गडचिरोली. २३.६०५ 

वरील असणारी आकडेवारी अंदाजे आहे. अपंग. निशकत. अंध. कर्णबधिर. मूक/ वाचादोष. पांगळे. मनोरूग्ण. इतर अपंग. एकाधिक अपंग. यांची. एकूण असणारी संख्या पूर्ण महाराष्ट्राची आहे. 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

लवकरात लवकर बोगस कामगार नोंदणी थांबविण्यासाठी व बोगस कामगार नोंदणी साठी जबाबदार व महत्वाचा दुवा असणारे इंजिनिअर यांची चौकशी करा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करायच आहे प्रत्येक समाजातील संघटना. कामगार हितचिंतक यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यातून उठाव करायचा आहे. तरी हाक दिली आहे साथ द्या आत्ता बोगस कामगार नोंदणी साठी जबाबदार असणार ना. दंड व शिक्षा झालीच पाहिजे

खेळ - अपंग जीवनाचा

 


खेळ - अपंग जीवनाचा 

               जन्मापासून अवयव निकामी असणारा व्यक्ति म्हणजे अपंग होय. आज आपण आपल्या आजूबाजूला अशी अपंग व्यक्ती बघतो. त्यात मनोविकलांग. शारीरिक विकलांग. कसे दोन प्रकार असतात. त्यातच मानसिक अपंग. शारीरिक अवयव अपंग असणारे व्यक्ती. समाजाचा व त्यांच्या कुटुंबाचा अशा अपंग लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन अगदी वेगळाच असतो. समाजातील काही लोक. यांना. लंगड्या. पांगळया. बहिरया.मुकया लुळया. अशा विविध. अगदी खालच्या थराला जाऊन यांना संबोधतात. आरे. ज्याला एखादा जरी शारीरिक अवयव कमी असेल तर त्याला त्याचे दुःख विचारा. ज्याच्या घरांत. एकदा अपंग व्यक्ती आहे एखादे मुलं आहे त्यांना व त्याची सेवा करणार्या माउलीला त्याचे दुःख याचा जर आपण विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो. त्या माऊलीला एक दिवस अशा अपंग मुलाला सोडून गावाला जाता येत नाही कोणाकडे जाता येत नाही. कोणीही आपले लहान मुल या माऊलीच्या हातात देत नाही कारण तीचे मुल अपंग आहे म्हणून. समाजाला अंधश्रद्धेची किड लागली आहे. खेळणारी बागडणारी मुल बघताच त्या आईचा उर भरून येतो  

          शासकीय आॅफिस मध्ये अपंग व्यक्ती यांना वर जाता येत नाही. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपले आॅफिस सोडून खाली येत नाहीत. कारणं त्यांना तयाचे एसी आॅफिस सोडायचे नाही उन्हात जायाच नाही पण विचार करा एक अपंग आपल्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत त्यांची कागदपत्रे देण्यासाठी उनहातच उभा असतो. पण अधिकारी व कर्मचारी यांना कसलीही किंमत देत नाहीत. हा अपंग केविलवाणा चेहरा करून माझ्या मदतीसाठी कोण येतय का याची वाट पाहत असतो. पण मदत मिळत नाही

          आज एक नवीन प्रकार पहावयास मिळतो तो म्हणजे नैसर्गिक अपंगत्व आणि अपघाती अपंगत्व. असे नविन प्रकरण समोर येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पैसे घेवून अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जात आहे की जे अपघाती अपंग आहेत त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. प्रमाणपत्रावरिल टक्केवारी वाढविणे. यासाठी सुध्दा लाच द्यावी लागत आहे. त्यासाठी एजंट दलाल यांचे आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ यांचें लागेबांधे आहेत. यांनी ग्रिहाईक आणायचं तुमचं भरा आणि आमचं पण भरा. असा नविन फंडा राबविला जात आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ आम्ही अपंग व्यक्तींना पाहिल्याशिवाय अपंग प्रमाणपत्र देत नाही. मग विचार करा. दोन्ही पायाने अपंग व्यक्तींना एस टी मधून प्रवास करताना काय त्रास होत असेल. एस टी महामंडळ मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेले असते अपंग व्यक्तींना चढणे व उतरणे साठी वाहक मदत करील. पण प्रत्यक्षात त्याच त्याला होईना मग तो अपंग व्यक्तींना मदत करील का ? नाही मग तो अपंग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येण्यास काय काय त्रास सहन करतो. माझे मत आहे की शासन सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ अधिकारी व कर्मचारी यांना पगार देत मग यांनी गावोगावी फिरून अपंग सर्वे केला म्हणून काय बिघडले. हे दवाखान्यात बसून शासनाचा पगार लाटतात. 

              कोरोना काळात तर सर्व टाळेबंदी लाॅकडाऊन जारी केल्यामुळे सर्व बंद त्यातच अपंग व्यक्तिला काम करता येतच नाही जे काही करत होतें त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. त्यातच आमचें अपंग बांधव कोरोना पाॅझिटिवह आले त्यांना विलगीकरण कक्षात त्यांच्या घरातच ठेवण्यात आले. त्यांना खाण्याचा प्रश्न पडला.पैसा नाही त्यामुळे औषधांचा प्रश्न. ज्यांनी यांचे विलिनीकरण घरात केलें त्यांनी त्यांची बाकीची सोय केली का ? शासनाने ज्यांना गरज नाही त्यांना मोफत धान्य वाटप केले. आणि या अपंगांसाठी कोणत्याही प्रकारची मदत उभी केली नाही त्यातच समाजातील काही समाजसेवक यांनी अन्न धान्य किट या अपंग लोकांना दिलें. एवढेंच काय पण अपंग लोकांसाठी असणारी पेन्शन सुध्दा आधार कार्ड दिसत नाही. कागदपत्रे अपुरी अशी फसवी कारणे दाखवून सहा सहा महिने पेन्शन सुध्दा जमा झाली नाही. विचारणा करण्यासाठी संबंधित आॅफिस मध्ये या अपंग व्यक्तींना जाता येत नाही कोण अधिकारी व यांची विचारणा करत नाही. शासन म्हणतंय की प्रत्त्येक शासकीय कार्यालयात एक अपंगांसाठी मदत करणारे मदतनीस नेमण्यात यावे पण खरोखरच आहेत का ? अन्न सुरक्षा योजनेत शासनाने नमुद केले आहे की ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे. वयोवृद्ध महिला. विधवा अपंग व्यक्तींना. महिन्याला दहा किलो धान्य मोफत देण्याचा निर्देश दिला आहे पण कोण राबवितो. अपंगाना वेगळी शिधापत्रिका त्वरित द्यावी आणि देताना अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करून द्या असा शासन निर्णय असून सुद्धा आज एक वर्ष झाले तरी काही अपंग व्यक्तींना वेगळी शिधापत्रिका मिळाली नाही. सर्कल चौकशी. गोडाऊन इन्चार्ज यांची चौकशी. इतकेच काय पण. आॅफिस मधून अपंगांची जाणूनबुजून प्रकरणे गहाळ करणे असे प्रकार पाहावयास मिळतात. मग अशा अधिकारी व कर्मचारी यांचेवर शासन निर्णय अवमान केला प्रकरणी निलंबनाची कारवाई का करण्यात येवू नये 

            ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्यासाठी येणारा वार्षिक निधी यातील ३/५/ निधी अपंग कल्याणासाठी वापरणे बंधनकारक आहे यासाठी. शासनाने. १९९६/ २००५/२०१०/२०१२/२०१४/२०१५/२०१६/२०१७/२०१८/ नुसार अपंग वयकतिसाठी समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग अधिनियम १९९५ सन १९९६ पासून लागू करण्यात आला त्यातील कलम ४० अन्वये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या गावाच्या नगराच्या विकासासाठी येणार्या रककमेतील ३/५/ टक्के अपंग कल्याणासाठी वापरायची आहे 

         अपंग शालेय शिक्षण. उच्च शिक्षण. खेळाडू राष्ट्रिय सतरिय. आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती. घरकुल. अपंग विना जामीन विना तारण कर्ज योजना. वैद्यकीय मदत. प्रवास सवलत. दुकान शाॅपिंग माॅल. मंडी. दुकान उभारण्यासाठी अर्थ सहाय्य. बस स्टॉप. डेपो मध्ये वहिलचेअर उपलब्ध करून देणे. अपंग बचत गट. अपंग लग्नासाठी मदत. रात्र निवारा अपंग भुवन. पेन्शन योजना. अपंग बेरोजगार भत्ता. अपंग योजनांचा प्रसार प्रचार.    

         यासाठी विविध प्रकारच्या कॅटेगरी करण्यात आली आहे त्यानुसार ८० ते १००/टक्के

            ६० ते ८०/टक्के

             ४०/ ते ६०/टक्के अशी वर्गवारी करण्यात आली आहे पण वरिल सर्व योजना कागदावरच आहेत त्यासाठी आत्ता सर्व अपंग बांधवांनी उठाव करण्याची गरज आहे शासन झोपले आहे त्याला ढोल वाजवून जाग करण्याची गरज आहे 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या