कलाकार -

 कलाकार कलाकार



             नावात मोठे रहस्य दडलेले आहे. मातीला आकार देणारा कुंभार. शिल्पाला आकार देणारा शिल्पकार. लोहाला आकार देणारा लोहार. शैक्षणिक प्रसार करणारे शिक्षण महर्षी. समाजात संबोधन प्रबोधन प्रचार आणि प्रसार करणारे समाजसेवक. असे विविध विभागात काम करणारे कार्यकर्ते लोक आपण बघतो. काही ध्यानात राहतात काही विसरून जातात. कारणं आपल्याला चांगले पचत नाही रूचत नाही मग विचार खुडणयाचे काम आपणच करतो कारण समोर असणारा आपल्या ध्यानात राहतो पण पडद्याच्या मागे असणारे काळाच्या ओघात गायब होतात कारणं त्यांचे कार्य चांगले असते आज पुरस्कार प्रमाणपत्र याचे वाटप त्यांचे कार्य न बघता तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे प्रामुख्याने बघितले जाते किती वाईट आहे बघा ? 

                  आपल्या पूर्वीच्या काळात कलाकार हे फक्त पोट भरण्यासाठी व समाजांत प्रबोधन समाजहिताची आपली जबाबदारी आहे अशी भावना मनात घेवून कार्य करत होते गोपाळ गोलहा. / दांगट / नंदिबैलवाले. / मदारी / सापगारूडी / वासुदेव. / भविष्य कथन करणारे / मनकवडी. / कुडमुडे जोशी. / डमरूवाले / भिक्षेकरी / सोंग घेवून मनोरंजन करणारे / औषध उपचार करणारे / तमाशा / लोकनाट्य. /गोंधळी/बहुरुपी/ जागरण/ पोपटवाले / डोंबारी /पांगूळ/ डवरी / असवलाचा खेळ करणारे / भजन कीर्तन /लग्नात नाचणारे / वरातीपुढे बत्ती डोक्यावर घेऊन / भारुडे. / अशा अनेक जातींचे जमाती मनोरंजन व कला यामाध्यमातून जनजागृती करत होते हे सर्व लोक मागास प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती याची परस्थिती बेताची असायची गरिबी नशीबाला पुजलेली. पोट भरल तरी बस असा विचार करणारी महाराष्ट्र मध्ये भटक्या विमुक्त जाती २८ भटक्या तर १४ विमुक्त जाती नोंद आढळते भारतात ११ कोटी पेक्षा जास्त भटक्या जमाती आहेत काही कागदावर आल्या काहींची नोंद झाली नाही महाराष्ट्रात भटक्या विमुकताची लोकसंख्या ७३ लाखांच्या आसपास जाते अशा भटक्या विमुक्त जमातींचे स्वरुप प्रस्थापित समाजापेक्षा फार वेगळे आहे भटकंती हेच त्यांचे जीवन आहे अर्थार्जनासाठी नव्हे तर पोट भरण्यासाठी त्यांना हे गाव ते गाव मनोरंजन कला सादर करत फिरावे लागते देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी पारंपारिक जातपंचायतीला त्यांना सामोरे जावे लागते रुढी प्रथा पारंपारिक व्यवसाय यातच अडकलेले आहे पूर्वग्रह काम मिळत नाही. भीक कोण देत नाही. शेती नाही. गाव नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण अभाव. समाजव्यवस्थेत हे घटक उदरनिर्वाह साठी भटकू लागले या भटकणारया घटकांचे किंवा समूहाचे गटांचे अध्यात्मिक भटके मनोरंजन करणारे भटके आणि जनावरांच्या पालनपोषणासाठी भटकणारे भटके असं वर्गीकरण झाले स्थिर समाजाची अध्यात्मिक गरज भागविण्यासाठी काही समूह गट भटकंती करत होते अध्यात्मिक गरज भागवून पसा कुडचा धान्यावर आपला उदरनिर्वाह करणारे कलाकार 

            गेल्या काळात गावात जत्रा यात्रा असायच्या. भाकरी घाला तमाशा करणारे कलाकार आपण बघितले आहेत त्यांचा उद्देश फक्त पोट भरण्यासाठी नव्हता तर समाजाला अनमोल संदेश येणार्या काळातील धोके यापासून सावध करणे हा होता. पहाटे पहाटे दाण पावलं दाण पावलं असा संदेश देणारे वासुदेव पिंगळे. हे कलाकार यांचा यामागचा उद्देश होता की पहाटे लवकर उठा निरोगी स्वच्छ हवा घ्या आणि आरोग्य सुदृढ ठेवा हे होते कलाकार. शिवाजी महाराज काळात गोंधळी ही एक कलाकार जमात होती त्यांची कला सादर करण्यामागे वेळोवेळी होणारे हल्ले कोणाकडून केव्हा हल्ला होणार हे गोंधळ सादर करणारे हाडांचे कलाकार आम्ही पाहिले आहेत. पाऊसाचे भविष्य सांगणारे नंदिबैलवाले. येणारा पाऊस केव्हा पडेल आपण विश्वास किती ठेवायचा हे आपण ठरवू सापांचे खेळ करून आपल्याला सापाबधदल समज गैरसमज सांगणारे सापांना मारू नका सांगणारे सापगारुडी हे होय. पोपटवाले. याया भविष्य सांगतो हे सांगणारे भविष्य वाले तर कोणी प्राण्यांपासून भविष्य कथन करणारे. दुरवर उभे राहून एकाच्या बोटांच्या हालचाली वर शब्द ओळखणे याला मनकवडी असे संबोधले जाते. वाचतो गा डोंबारी असे म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी तलवारबाजी असे मैदानी खेळ करणारे कलाकार हे आपल्यातच होते. माकड उड्या या माध्यमातून लहान मुले यांचें व मोठया माणसांचे मनोरंजन करणारे कलाकार. अस्वलाच्या खेळ करणारे कलाकार. 



              आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि मग आपल्यात व आपल्या समाजव्यवस्थेत क्रांतीकारक बदल झाले शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कक्षा नववीन शोध लावले गेले जसे. टेलिफोन / टेलिव्हिजन. / मोबाईल. /सिनेमा थिएटर /बॅन्ड/ डाॅलबि / झांज पथक / लग्नात विधुत रोशनाई / लॅपटॉप / नाटक थिएटर / चित्रपट / असे अनेक कृत्रिम मनोरंजन करणारी सेवा अंमलात आली त्याचवेळी या पोटासाठी जनहितासाठी जनप्रबोधन करणार्या भटक्या विमुक्त जातीचा पारंपरिक व्यवसाय मारला गेला विज्ञान क्रांतिमुळे नशिबाचा किंवा भाग्याचा संबंध नाहिसा झाला ती कल्पना भ्रामक आहे भटक्या जमातीनी मात्र आपला पारंपरिक मनोरंजन व्यवसाय घालवावा स्थिर समाजाची गरज भागविणारे कलाकार उघड्यावर पडले समाजाच्या दया बुध्दी वर भीक मागून जुनी कापडे गोळा करणे मोलमजुरी कष्टाची कामे शोधने. असे व्यवसाय कलाकारांना निकृष्ट जीवन जगण्याची वेळ आली जनावरांच्या चराईसाठी भटकणाऱ्या जमातींची अवस्था याहिपेक्षा दयनीय झाली जनावरें चरण्यासाठी कुरणे बाकिच नाहीत जागोजागी सिमेंट जंगले तयार झाली त्यामुळे जनावरांचे खेळ करून आपला उदरनिर्वाह करणारे यांना जगणे कठीण झाले त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी खडी फोडणे. रस्ते तयार करणे. अशी अंगमेहनतीची कामे शोधायलाच सुरूवात केली रोजगार कमतरता यामुळे ग्रामीण भागात राहणे अवघड झाले मग यांनी शहराकडे स्थलांतर करायला सुरुवात केली शहरात राहण्याचा मोठा प्रश्न मग झोपडी बांधून राहण्यास सुरुवात केली त्यातूनच शहरात झोपडपट्टी वास्तव्य. काळाबाजार. दारु. गुंडगिरी. तयार झालीं आठराविशव दारिद्र्य शिक्षण लाचार. भिकार यांचे. जीवन जगणे त्यामुळे या कलाकार व त्यांची मुल गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली आणि एक गुन्हेगार विश्व तयार झाले याला आपण कारणीभूत आहोत आज जुने पारंपारिक मनोरंजन बघायला मिळत नाही ही वास्तविकता अगदी वाईट आहे



                २२/२३ /२०२० रोजी आपल्याकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देशात यात प्रवेश केला आणि चालू गाडीला घुणा लागावं तसं धावपळ करणारी जगण्यासाठी मिळविणारी सर्वसामान्य जनता टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यात लग्न जावळ मुंजी. व अन्य सण संभारभ यांचेवर अवलंबून असणारे कलाकार मांडववाले. भांडी वाले. लग्न कार्यालय. लग्नात विधुत रोशनाई करणारे व अन्य या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार मालक त्यांचेवर व त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती कलाकार कामगार मालक हे अक्षरशः रस्त्यावर आले होते आपली व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले 

                 शासनाने सर्व क्षेत्रातील लोकांसाठी विविध मंडळे स्थापन केली आहेत पण आपल्या तरुणाईच्या काळात सर्वांचे मनोरंजन करणारे कलाकार ज्यावेळी वयोवृद्ध होतात त्यावेळी त्यांचेवर येणारी वेळ अतिशय वाईट आहे एक वेळ पट्टीचा कलाकार रस्त्यावर भीक मागताना चहा द्या तंबाखूला दोन रुपये द्या. घरच्यांची मदत नाही घराची मुल जबाबदारी घेण्यास तयार नाहीत शासनाच्या नियमानुसार ६०/ वर्षात एकदा अधिकारी व कर्मचारी निवृत्त होतो त्याला पुढचे आयुष्य जगता यावे यासाठी शासन थोडीकाहोईना पेन्शन देते तसी तरतूद कलाकारांच्या बाबतीत करता येणार नाही का ? ६० वर्षाचा व्यक्ति सर्व शासकीय योजनेतून बाद होत असेल तर त्याला मतदानाचा अधिकार कशासाठी त्यांचे मतदार यादीतून नाव वगळून टाका. कलाकार जगला पाहिजे नाहीतर कला व कलाकार गोष्टींच्या रूपाने सांगावें लागतील. 

          आत्ता जादा लिहित नाही लिहताना कोणाच्या आत्मसन्मानाला काही अगाध झाला असेल तर माफी असावी

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा 

आपण जाब विचारु शकतो का ?...

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती...

कुळकायदा कुळकायदा - Land...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

कुटुंब आणि महिला

कुटुंब आणि महिला



               कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो

याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात



            आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते

याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही



            महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात

           पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो

      महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो 

          महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन. 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....

कुळकायदा कुळकायदा - Land....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती....

आपण जाब विचारु शकतो का ?....

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen




       एक आक्टेबर हा जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो भारतात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७५/ टक्के म्हणजेच ज्येष्ठांची संख्या अंदाजे (९) कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात (२००१ मधील आकडेवारी नुसार ) ८४.५ लाख जेष्ठा पैकी ३९/ लाख (४६.५/टक्के ) पुरूष व ४५ लाख (५३.५/टक्के ) स्त्रिया आहेत साधारणपणे जेष्ठ स्त्रियांमध्ये विधवांचे प्रमाण ५०/टक्के व विदुरांचे प्रमाण २५/ टक्के आहे ग्रामीण भागात ६०/ वर्ष वयानंतर काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ३७/टक्के एवढे आहे 

              सेवानिवृत्ती नंतर. सामाजिक. /कौटुंबिक / स्नेहबंध माणसिक स्वास्थ्य. / शारीरिक आरोग्य / समृद्ध ठेवण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी काही माहिती व टिप्स पाठवत

(१) निवृत्ती म्हणजे नोकरी /व्यवसायातून निवृत्ती जीवनातून नव्हे जे आवडते ते नोकरी व व्यवसाय काळात करता आले नाही ते करण्याची संधी म्हणजे निवृत्ती हा पूर्ण विराम नसून एक स्वल्प विराम आहे आयुर्मान वाढल्याने अजून बरेच आयुष्य बाकी आहे

(२) वार्धक्यातही. 'अजून यौवनात मी ' या सकारात्मक जगण्याचा दृढ निश्चय करा नियती आणि निश्चिचय याची सांगड घातल्याशिवाय निर्मिती होत नाही

(३) स्वताच्या आत्मसन्मान. / अस्तित्व. / आणि स्वताचे सुख. / स्वताचे आरोग्य / हे सर्व अबाधित ठेवण्यासाठी स्वताला. सक्षम ठेवावे. विशिष्ट जेष्ठ नागरिक संघटना संस्था स्थापन कराव्यात. समवयस्क लोकांनी एकत्र यावे सृजनशील कार्य करावे आणि आपली जीवनसंधया आनंदी करावी

(४) निवृत्ती नंतरचा विचार निवृत्ती पूर्वी करणे आवश्यक आहे

(५) सेवानिवृत्ती लाभाची योग्य आपल्यासाठी गुंतवणूक करा उतारतया वयात. आजार / पर्यटन / धार्मिक कार्य / इ साठी कामी येणेसाठी त्याचे नियोजन करा 

(६) निवृत्ती पूर्वीच्या नोकरीमध्ये आलेला अनुभव त्या क्षेत्रातील ज्ञान याचा फायदा करून घेवून निवृत्ती नंतर अर्धवेळ काम करा छोटासा गृह उद्योग काढू शकता

(७) नवीन गोष्टी शिकण्याची / करून बघण्याची आवड ठेवा / एकादी कला. / वैयक्तिक कौशल्य. याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या तुम्हाला आवडेल तो छंद जोपासा. 

(८) कुटुंबात वावरताना स्वस्त भावात आवश्यक असा बदल करणे गरजेचे आहे हे सत्य मनी जाणून घ्या सल्ला देणे / मुला/ सुनांचया निर्यात विनाकारण मध्यस्थी करणे / हेकेखोर पणे वागणे / एकटे पुटपुटने / जोरात बोलणे / कुटुंबातील लोकांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे इ गोष्टी बदलाव्या लागतात दुसर्याच्या स्वभाव बदलाणयापेक्षा सर्वांमध्ये बदल करा 

(९) आपल्या तनमनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी सर्वांची आदर्श कशी दिनचर्या / फिरणे / प्राणायाम / व्यायाम / खेळ / उत्तम आचार विचार / चांगल्या गुणी व आदर्श मित्रांचा सहवास / यशस्वी लोकांचा सहवास / संगीत करमणूक /नवनवीन शिकण्याची आवड / इ गोष्टी स्वताच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व फुलविणयासाठी संधीचा फायदा करून घ्यावा

(१०) स्वताची मिळकतीची कुवतीनुसार कौटुंबिक जबाबदारी घ्यावी

(११) मोठेपणाने व सामंजस्याने वागून आपल्या वागण्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी सर्वांशी प्रेमाने वागा. आपल्या वागण्याचा. बोलण्याचा. वावरण्याचा त्रास कोणालाही होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी

(१२) कुटुंबातील इतरांना आपलीं भीती न वाटता आदर व प्रेम वाटेल असे वागा. तसेच भविष्याकडे वेगाने निघालेल्या या पुढील पिढीला संस्काराचे ब्रेक आणि प्रेरणेचे इंधन दिले पाहिजे

(१३) मनात घालमेल न ठेवता स्पष्ट बोला रोजचा आपल्यामुळे कलह. भांडण होत असेल तर मुला " सुनापासून चार घर दुरच रहा

(१४) एकटेपणा जाणवत असेल तर समवयस्क / समछंदिषट. ग्रुप करावेत अशा मनाला आनंद देणारया ग्रुप मध्ये सहभागी व्हावे

(१५) निवृत्ती नंतर आलेला पैसा व भावी खर्च याचा ताळमेळ आखावा वार्धक्यात आजार शस्त्रक्रियेकरिता अचानक उद्भवणाऱे खर्च मुला मुलींचे विवाह या महत्वाच्या बाबींसाठी लागणारी आर्थिक तरतूद लक्ष्यात घेऊन तो पैसा बाजूला काढावा भावनेच्या भरात. व अंध प्रेमापोटी "पुढयातले ताट आणि बसायचे ताट " मुलांना व कोणत्याही नातेवाईक यांना देवू नका कारण "ठणठणगोपाळ " असेलतर कोणी विचारत नाही

(१६) निवृत्ती नंतर घरात अधिक लक्ष देवू नये आवश्यकतेनुसार देणे लाभदायक ठरते अन्यथा ते इतरांना खुपते 

(१७) निवृत्ती नंतर उतारतया वयात करावी लागणारी कामे समजून घेवून आनंदाने ती केल्यास दोन गोष्टी साध्य होतात तुमचे व तुमच्या मुले सुना यांच्यामधील संबंध दृढ होतात कुटुंबाची प्रगती निश्चित होते परंतु काही कामे आपणास नकोशी वाटत असतील तर त्याबद्दल स्पष्ट बोलून नकार द्यावा

(१८) सुनेचा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस. काही विशेष प्रसंग इ लक्षात ठेवून तिला आवडत्या वस्तू. भेटवस्तू द्यावी तू आमची मुलगीच आहेस. असे बोला

(१९) नातवंडे हा आजी आजोबा यांचा विरंगुळा असतो जीव की प्राण असतो त्यांच्यावर जिवापाड प्रेम करा आपल बालपण नातवंडांच्या समवेत संगतीत परत अनुभवा

(२०) घरात लहान मूल असताना मुलांचे आई-वडील मुलांच्या प्रगतीसाठी ज्या दिशेने प्रयत्न करतात त्याच दिशेने आजी आजोबा यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत आजी आजोबा नातवंडांचे लाड मुलांच्या आई बाबांच्या शिस्तीच्या आड येता कामा नये

(२१) आत्ता काय वार्धक्य आले सारे संपले आजार होणारच राहिले तेवढे दिवस जसे असेल तसे काढायचे ही नकारात्मक आधी बंद करा आपल्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आठवा तुम्ही दोघेच होता तेव्हा. आजही तुझी दोघेच आहात सारे नकारात्मक विचार सोडून नव्याने एकामेकाचा सविकार करा आता थोड मोल्ड व्हा एकामेकाना पुरक व्हा आहार. / आरोग्य / औषध उपचार / पर्यटन / गप्पा / वाचन / याद्वारे एकामेकाची काळजी घेवून आनंदी रहा 

(२२) आत्ता तर मी फक्त माझ्यासाठी जगणार अशा ताजा आनंदी हिरव्यागार मनाने प्रत्त्येक क्षण जगा

(२३) संगीताची जादू अनोखी आहे रोज भजन कीर्तन करा भावगीते/ श्लोक / स्त्रोत / फिल्मी संगीत /जुनी गाणी / स्वास्थ संगीत / पक्षांचे आवाज / समुद्राची साज / यांचे कॅसेट ऐका 

(२४) रुग्ण सेवा / गोरगरीबांची सेवा / गरजूंना मदत / अशी समाजकार्य करा रक्ताची व रक्ताच्या पलीकडची नाती जपा आणि आपले वार्धक्य आनंदी करा जात / धर्म / लिंग / वय / यांच्या बंधनापेक्षा ही रक्ताच्या नात्यापलीकडची नाती वार्धक्यात तुम्हाला सुखद क्षण देऊ शकतील जगण्याला व आनंदाची झालर येईल

(२५) कठोर बोलण्यापेक्षा अबोल रहा छोटी ठीणगी स्फोट घडवून आणते विचारपूर्वक बोला विचारपूर्वक वागा

(२६) घरात पती/ पत्नी / मुल /सुना / सासू सासरे/ कोणाचीही एकाधी गोष्ट पटत नसेल तर त्याबद्दल स्पष्ट बोला जे बोलताय ते सामंजस्य ठेवून बोला तरच तुमच्या बोलण्याचा योग परिणाम होईल अन्यथा वाद वाढेल कमीत कमी अपेक्षा ठेवणे व जास्ती जास्त सामंजस्य ठेवणें गरजेचे आहे

(२७) रागांचा पारा अचानक वाढला तर उच्चरक्तदाब / ह्रदयविकाराचा. असा त्रास होतो रक्तदाब अचानक वाढला असता मेंदूत रक्तस्त्राव होतो हार्ट अॅटेक येवू शकतो

(२८) चंद्र प्रकाश हवा असेलतर सुर्याने मावळायला हवे

(२९) उतारते वय एक नियम कटाक्षाने पाळा कुठेही गेला तरी आरोग्य विषय काढून समुदखी शोधायचा नाही मुला/ सुनाना थोडस खटकल तरी स्वताचे दुःख खरवडून काढायचे नाही

(३०) अध्यात्मात मानसिक आरोग्य चांगले राहते धार्मिक /! वाचन /चित्रपट /सीडी / यांच्या द्वारे आवडत्या भगव़ताला आवळून भकतिसार आंनंद घ्यावा क्षमा / शांती / बंधुत्व /सत्व /जेथे आहे तेथे परमेश्वर आहे

(३१) वार्धक्यात एखाद्या व्यक्तिला मनमोकळे करायला कोण नसल्यास ती व्यक्ती टिव्ही समोर रमते 

(३२) आपल्याला काही महत्व नाही आपल्या विरोधात काही कारस्थान शिजतंय असा नकारात्मक विचार आल्यास घरातल्या इतरा सोबत वारंवार खटके उडतात

(३३) आपण परगावी जात असल्यास इतरांसोबत त्याबाबत चर्चा करू नका

(३४) विश्वास पात्र नोकरच असावेत. नोकरासमोर पैसा दाग दागिने. महत्वाची कागदपत्रे हताळणी करू नये

(३५) दारावरची बेल वाजलयास घाईने दरवाजा उघडू नये खात्री करा कोण आहे 

(३६) तुमच्या मुलांचा मुलींचा अपघात झाला आहे असे कोणी म्हटले तर त्यांच्या सोबत जाऊ नका

(३७) दारावर दागिणे पाॅलिश करून देणारे ठग लोक तुम्हाला लूटू शकतात कशा लोकांना दारात सुध्दा उभे करू नका. अंधश्रद्धेचा / बुवाबाजी / यांच्या नादी लागू नका

(३८) रस्त्यावरून जाणाऱ्या वृध्द स्त्रियांना खोटे नाटे सांगून लूटणारे लोक आहेत अशा वयवृध स्त्रियांनी दाग दागिने घालू नये चुकीचे फोन / अनोळखी व्यक्ती वारंवार घराजवळ फिरणे. / दारावरची बेल सतत वाजणे /याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित पोलिस स्टेशनला संपर्क साधा

(३९) चांगले शेजारी असतील तर वेळ पडल्यास त्यांची मदत घ्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाणे / फोनवर बोलणे /वैयक्तिक माहिती देणे इस्टेटसंदरभात माहिती देणे टाळा

(४०) प्रवासात अनोळखी व्यक्तीशी बोलू नये 

(४१) शारीरिक आरोग्याला काही तक्रारी असतील तर गांभिर्याने डॉ पत्ता. फोन नंबर. डॉ नाव. हे आपल्या जवळील डायरी मध्ये लिहून ठेवा

(४२) स्वताला स्वता जपा शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करावा वेळ पडल्यास औषध उपचार करावा

(४३) हल्ली अनोळखी व्यक्ती यांच्या पेक्षा नातेवाईक व आपली मुले यांचे पासून सुध्दा धोका खाऊ शकतात

(४४) हताश होऊन आत्महत्या विचार करु नका 

(४५) अन्न/ वस्त्र / निवारा / आरोग्याची काळजी / मुलभूत गरजा भागविण्यासाठी. आई वडील जेष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याणार्थ अधिनियम. "२००७"‌ व महाराष्ट्र आई वडील चरितार्थ आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणार्थ नियम "२०१०" मधील नियम "१४" नुसार १०००० प्रतिमहा निर्वाह भत्ता मिळू शकतो नियम. "२०" अन्वये जिल्हा पोलिस अधीक्षक हे जेष्ठ नागरिकांच्या जीवीताचे व मालमत्ता रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करतील असे कायद्याचे संरक्षण जेष्ठ नागरिकांना आहे

(४६) गरजेचे ठरल्यास आनंदाने वृद्धाश्रम सविकारणे पर्याय उपयुक्त ठरतो छळापेक्षा ते परवडले

(४७) आपले वार्धक्य. / आपल्या गरजा / आपले आजार / आणि आपले उर्वरित आयुष्य याचा विचार करून सर्व प्रापटी / पैसा / मुलांच्या हातात देऊ नका कागदपत्रे न वाचता सह्या करु नका

(४८) आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीची विल्हेवाट कशी व्हावी याचे ईच्छा पत्र तयार करा

(४९) वार्धक्यात आर्थिक स्वावलंबन घालवू नका. आजपर्यंतच्या तुमच्या कमाईवर तुमचा अधिकार आहे

(५०) प्रदेशात स्थायी झालेल्या मुलांकडे राहण्यास जाण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घ्या

(५१) जीवनात कळत नकळत आपणाकडून काही व्यक्ती दुखावल्या असू शकतात त्यांच्याशी अबोला असेल तर स्वताहून बोला दुस-याला मानसन्मान द्या. त्यामुळे तो वाढण्याची शक्यता जास्त असते

(५२) फिट राहण्यासाठी रोज सकाळी व्यायाम करा. / ध्यानधारणा / ओंकार जप / रिलॅकसेशन रोज रहा / सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरा / बागेत जा /  

(५३) वाढत्या वयात हलका सकस आहार घ्यावा / आहाराचे प्रमाण समान ठेवा / मद्यपान / तंबाखू / सिगारेट / व्यसन सोडा 

(५४) झोपण्यापूर्वी. आवडते वाचणं / भक्तिगीते / संगीत / गाणी / यांचा आस्वाद घ्या

(५५) आवश्यक तेवढी विश्रांती घ्या / झोप घ्या / जागरण करु नका 

(५६) प्रकृतिसाठी डॉ यांचेकडे गेल्यावर कुठल्या औषधाने / आहाराने / अॅलरजी रिअकसन आली / तर उपचार घेण्याअगोदर डॉ यांना सांगा

(५७) औषधाचा ढोस / औषधवेळ / मनाप्रमाणे बदल करू नका औषधे रोजची म्हणून अंधारात घेवू नका 

(५८) औषधे मुलांच्या पासून लांब ठेवा

(५९) हसणे. खळखळून हा आरोग्य राखण्याचा खरा मंत्र आहे म्हणून खळखळून हसा 

(६०) वार्धक्यात. / मधुमेह / उच्चरक्तदाब / ह्रदयविकाराचा झटका / पक्षाघात / संधीवात / मोतीबिंदू / वृद्धत्व / कंपवात / कर्णबधिरता / किडणी स्टोन / मुतखडा / बद्धकोष्ठता / विसावभोळेपणा / शस्त्रक्रिया / अतिसार / इ आजार उद्भवतात त्यामुळे डॉ सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेवू नका 

         आपण बघतो ज्या लोकांनी आपल्या आयुष्यातील ३५/४० वर्षे एखाद्या आॅफिस मध्ये घालवली आपल्या पेक्षा मोठ्या साहेबांची चाकरी केल्यासारखी कामे केली आणि एक वेळ ६० वर्षांनी निवृत्ती झाली शासनाने ठरवून दिलेला निवृत्ती वेतन योजनेतून आलेला आपणच आपल्या साठी ठेवलेला थोडाफार पैसा येथून पुढचे आयुष्य जगण्यास मिळाला काहीना मिळाला काहीजण वाट बघत आहेत 

      आपल्याला ज्या आई वडील यांनी जन्म दिला आपणास मोठें केले जेव्हा त्यांचे हातपाय थकले त्यावेळी आपण त्यांना पहिल्यासारखी किंमत देतो का ? नाही आपण आपणास आपले म्हातारे आई वडील सांभाळायचे जड होतात आणि आपण त्यांना वृधश्रमाचा रस्ता दाखवतो आपणास लाज नाही वाटत ? 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...

कुळकायदा कुळकायदा - Land

पळवाट पळवाट...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2


        अर्जदाराने जिल्हा अधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांच्याकडे बांधकाम परवानगीसाठी व बिगर शेती आकारणी करून मिळावी यासाठी दोन प्रतीत अर्ज करावा अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे दाखल करावी

(१) मालकी हक्काचे पुरावे म्हणून चालू सातबारा किंवा मिळकत पत्रिका व त्यांच्याशी संबंधित.  फेरफार.  प्रतिज्ञापत्र.  व. क्षतिपत्र. 

(२) बिगर शेती आकारणी करावयाच्या जमीनीच्या चतुसिमा दाखवणारा नकाशा

(३) वैयक्तिक वापरासाठी बांधकाम परवानगी मागणाऱ्या अर्जदाराने संबंधित जागेचा सर्वे नंबर.  गट नंबरचा नकाशा

(४) इंजिनिअर तयार करून स्वाक्षरीने केलेल्या बांधकाम आराखडा ब्ल्यु प्रिंट. ( निल प्रत )  प्रती. जमीनीत जाण्यासाठी अधिकृत पोच रस्ता असल्याचे बांधकाम आराखड्यात उल्लेख असणे बंधनकारक आहे

(अ ) व्यवसायिक कारणांसाठी भुखंड रेखांकन आराखडा मान्यतेसाठी सादर करताना त्यासोबत मोजणी नकाशाची प्रत जोडणे आवश्यक आहे

          कालापव्यय होऊ नये म्हणून अर्जदाराने अर्जाची एक प्रत जिल्हा अधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज केल्याची पोचसह संबंधित सहाय्यक संचालक.  नगररचना.  यांचेकडे दाखल करावा अर्जदाराने अगाऊ दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे सहायक संचालक. नगररचना यांनी तत्पर पुढील कार्यवाही करावी

(आ ) बांधकाम परवानगी साठी दाखल केलेल्या जागे संदर्भात भविष्यात धारणा अधिकाराच्या अनुषंगाने बदल झाल्यास त्यासाठी प्रचलित तरतुदीनुसार शासनास देय आसणारी नजराणयाची व अन्य कोणतीही रक्कम रितसर भरण्यास अथवा कोणत्याही न्यायालयात वाद उद्भवला किंवा नागरी जमीन कमाल व धारणा कायद्याखाली नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकारी अथवा कोणत्याही सक्षम प्राधिकारयाकडे वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहतील असे क्षतिपत्र करून घ्यावे

(इ ) बांधकाम परवानगी मागणी केलेली जागा इतर कोणास हस्तांतरित करून दीलेली नाही त्या क्षेत्रसंबधी इतर अधिकाराने पाॅवर आॅफ अॅटरनी. अथवा इतर कोणत्याही प्रकारे निर्माण होणा-या त्रिपक्षीय हितसंबंधास अथवा हस्तांतर अर्जदार वैयक्तिक जबाबदार राहतील याबाबत आणि बिगर शेती रुपांतरण करताना आवश्यक असलेल्या संबंधित सर्व कायद्यातील तरतुदींचा भंग होणार नाही याबाबत अर्जदाराने द्यावयाच्या प्रतिज्ञापत्र त्याचा उल्लेख करून प्रतिज्ञापत्र घ्यावे

(ई ) मालकी हक्क बाबत अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांशिवाय इतर अधिक पुरावे तपासणी करावयाचे असल्यास किंवा धारणा प्रकाराबाबत माहिती हवी असल्यास कार्यालयात उपलब्ध असलेलें अभिलेख ( स्कॅन डाटा ) कार्यालयीन स्तरावर संबंधित अधिकारी यांनी तपासणी करावेत त्या आधारें मालकी हक्काची खात्री करावी

(इ ) सहाय्यक संचालक.  नगररचना.  अथवा त्यांचा प्रतिनिधी यांनी अर्जदाराने पुरविलेल्या आराखडयाप्रमाणे वस्तू स्थिती प्रतक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करावी सथळपाहणी वेळी सहायक संचालक. नगररचना. यांनी भौगोलिक स्थिती नदि नाले.  / राष्ट्रीय महामार्ग/ राज्य महामार्ग / किंवा प्रमुख जिल्हा मार्ग / उच्च दाब विधुत वाहिनी / जमीनी खालून जाणारे पाणी / गॅस / डेरनेज.पाईप लाईन यांची पाहणी करून त्याबाबतची वस्तू स्थिती व अभिप्राय नमुना करावा त्याचा अहवाल जिल्हाधिकारी किंवा संबंधित महसूल अधिकारी यांना पंधरा दिवसांत द्यावा त्यांनी दिलेला.  नाहरकत दाखला. / अहवालाशीवाय इतर नाहरकत दाखले घेण्याची गरज नाही

(उ ) सहयाक संचालक नगररचना यांना. आवश्यक वाटल्यास. त्यांनी रिबन डेव्हलपमेंट रुल्स अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्याची त्याचप्रमाणे महावितरण  कंपनीची उचचदाबाची अथवा कमी दाबाची विधुत लाईन याबाबत महावितरण कंपनीकडून ना हरकत दाखला घेण्याची अट घालावी त्यांची ही अट विचारात घेऊन संबंधित महसूल अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या किंवा महावितरण कंपनीच्या अधिकारांचा ना हरकत दाखला घ्यावा

(ऊ ) बांधकाम परवानगी मागितलेल्या जागेवर अनाधिकृत बिगर शेती वापर अधिच चालू असलेल्या चे सहाय्यक संचालक. नगररचना. यांच्या पाहणीत आढळून आल्यास किती क्षेत्रावर अनाधिकृत बिगर शेती वापर झाला आहे याचा क्षेत्रासह स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यांच्या अहवालात करावा

( ए ) सहाय्यक संचालक. नगररचना यांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर भरणा करावयाचा रूपांतरण कर. बिगर शेती आणि भोगवटदार. वर्ग. दोन म्हणून धारण केलेल्या जमीनीच्या बाबतीत अशा रुपांतरणासाठी आकारलेला नजराणा किंवा अधिमुलय आणि इतर शासकीय देणी भरण्याबाबत जिल्हाधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांनी अर्जदारास सात दिवसांत कळवावे संबंधित अर्जदारांनी शासनास प्रदान करावयाच्या रक्कमा भरल्या व दिवसांपासून सात दिवसांत जिल्हाधिकारी किंवा महसूल अधिकारी यांनी सहाय्यक संचालक नगररचना यांचेकडून विहित केलेल्या बांधकाम आदेशाचा नमुना बांधकाम परवानगी देण्यात येते

(ऐ ) मंजूर रेखांकन मधील भूखंडामधये अर्जदाराने बांधकाम परवानगी मागितल्यास अर्ज केल्यापासून पंधरा दिवसांत बांधकाम परवानगी देणे बंधनकारक आहे

(ओ ) बांधकाम परवानगी मागितलेल्या जागेवर अनाधिकृत बिनशेती वापर कधिच सुरू असेल आणि तसे सहायक संचालक व नगररचना यांच्या अहवालात नमूद असल्यास जमीन महसूल अधिनियम  १९६६ मधील कलम ४५ नुसार संबंधित महसूल अधिकारी यांनी संबंधितांवर दंडनिय कारवाई करावी सदरची दंडनिय कारवाई बांधकाम परवानगी देतानाच करावी

( औ ) वैयक्तिक वापरासाठी परवानगी देताना मोजणी नकाशा ऐवजी सर्वे नंबर. / गट नंबर चया नकाशावरून स्थानिक इंजिनिअर तयार केलेला नकाशा विचारांत घेवून बांधकाम परवानगी द्यावी मात्र बांधकाम परवानगी दिलेल्या जागेची मोजणी नंतर करून घेण्याची अट आदेशात नमूद करावी 

(क ) महसूल अधिकारी त्यांनी बांधकामाची परवानगी देण्याच्या आदेशात क्षतिप्रत व प्रतिज्ञापत्रातील अटी बंधनकारक असल्याची शर्त नमुद करावी

(२) गावठाण गावातील गावठाण क्षेत्रात बांधकामासाठी ग्रामपंचायतींची परवानगी आवश्यक आहे

(३) गावठाण लगतच्या परीघ क्षेत्रातून अधि मुल्य भरून घेवून बांधकाम परवानगी देणे

         गावठाण लगतच्या परिघक्षेत्रात. प्रादेशिक योजनेत नमुद केलेल्या अंतरापर्यंत प्रादेशिक योजनेत नमुद केल्या प्रमाणे अधि मुल्य आकारणी करून बांधकाम परवानगी देता येईल त्याकरिता जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारयानी अधि मुल्य आकारून आणि सहाय्यक संचालक व नगररचना यांचे अभिप्राय विचारात घेऊन बांधकाम परवानगी दिली पाहिजे

(४) प्रमाणभूत बांधकाम नकाशाच्या विविध नमुन्यात परवाना देणे

               नगरविकास विभागाकडील दि ३ जानेवारी २०१५ आणि ग्रामविकास विभागाकडील दि ११ डिसेंबर २०१५ या शासन निर्णयानुसार पत्रकात नमूद केले प्रमाणे लहान भूखंडासाठी.  भूखंड क्षेत्रासापेक्ष. प्रमाणभूत बांधकाम नकाशाचे विविध नमुने. अर्जदाराने सादर करावयाचा अर्ज इत्यादी. नगरविकास विभागाकडून दि. ३/जानेवारी २०१५ चया परिपत्रकासोबत जोडून पाठविले आहेत अर्जदाराने मंजूर रेखांकनातील भूखंड किंवा महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ सह अन्य कोणत्याही अधिनियमानुसार अनाधिकृत अथवा नियमित केलेल्या भूखंडांवर नगरविकास विभागाच्या दि ०३/०१/२०१५ चया परिपत्रकातील प्रमाणभूत बांधकाम आराखड्यानुसार बांधकाम नकाशा मंजूरी मागितल्यास विकास नियंत्रण नियमावलीत तरतुदीनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत परवानगी मंजूरी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी द्यावी



  वरील सर्व परिपत्रकातील सूचना इकोसेनसेटीवह झोन किंवा शासनाचे विशिष्ट निर्बंध असलेल्या क्षेत्रासाठी लागू असणार नाही याची नोंद घ्यावी

    वरील शासन निर्णयानुसार आपण आपल्या जागेसाठी बिगर शेती प्रस्ताव दाखल करतो आपणास विनाकारण हेलपाटे मारावे लागतात बिगर शेती नावाखाली बेमाफी आर्थिक लूट केली जाते शासनाने आपली कागदपत्रे बरोबर असल्यास लवकरात लवकर बांधकाम परवानगी व बिगरशेती प्रस्तावाला मंजुरी द्या असे सांगून सुध्दा कोणतेच काम शासन निर्णयानुसार होत नाही 

समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

वाचा -

 अन् त्याला कुटुंब मिळाले...! - Manavseva Project...

आपण जाब विचारु शकतो का ?....

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...

ओबीसी जनगणना काळाची गरज...


कुळकायदा कुळकायदा - Land

 



           

कलम. (४) अन्वये कुळ माणले गेले आहे कलम (४) अन्वये संरक्षित कुळ माणले गेले आहे अथवा. कलम २ (१०/अ ) अन्वये कायद्यानुसार कुळ माणले गेले आहे

(२) शेतजमीन वहिवाट करण्याची रित

(१) सन १९३२/१९७३ पर्यंत शेतजमीन वहिवाट करण्याच्या ६ पध्दती खालील प्रमाणे आहेत

(२) शेतजमीन स्वता वहिवाट करणे याला "खुद्द " जमीन कसणे असे म्हणत

(३) शेतजमीन स्वताच्या देखरेखीखाली मजूराकडून करुन घेणे

(४) शेतजमीन ( खंडाने ) रोख कसावयास देणे व जमीन कसलयाचा मोबदला म्हणून रोख रक्कम घेणे

(५) शेतजमीन कसलयाचा मोबदला म्हणून पिकातील वाटा खंड म्हणून देणें याला. " बराईने " जमीन कसणे असे म्हणतात

(६) शेतजमीन कसलयाचा मोबदला म्हणून पिकातील निश्चित वाटा घेणे याला अरधलीने. वाटयाने. जमीन कसणे असे म्हणतात

(७) शेतजमीन कसलयाचा मोबदला म्हणून रोख रक्कम आणि पिक असा एकत्रित मोबदला घेणे ज्या प्रकारच्या रितीने जमीन कसली जात असे त्याचा उल्लेख जुन्या गाव नमुना बारा सदरी " रीत " या स्तंभात केला जातो याचा उपयोग कुळ हक्क ठरविण्यासाठी होत असे त्यामुळे सध्या हा प्रकार अस्तित्वात नाही

(२) शेतकरी म्हणजे कोण ? महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २ ((२) अन्वये शेतकरी व्याख्या दिलेली आहे कोणत्याही व्यक्तिने शेतीची जमीन नोंदणीकृत कागदापत्राने विकत घेतली असल्यास ती व्यक्ती शेतकरी आहे का नाही हे ठरविण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नसून तो योग्य त्या अधिकारांचा आहे

(३) शेतमजूर म्हणजे कोण ? 

(१) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम २ (१/ अ ) अन्वये अशी व्यक्ती जी कोणत्याही प्रकारची सवताची जमीन धारण करू शकत नाही आणि कसत नाही परंतु राहते घर धारण करते आणि तिचे एकूण उत्पन्न ५०/टक्के शेत मजूरी पासून मिळते त्याला शेतमजूर असे म्हणतात

(४) कायदेशीर कुळ म्हणजे कोण ? 

कुळाना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे शोषण थांबविण्यासाठी मुंबई कुळ वहिवाट अधिनियम १९३९ आणि मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ हे दोन महत्त्वाचे कायदे करण्यात आले महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११( पूर्वीचा मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ ) कलम ४ अन्वये कुळ म्हणून मानावयाचया व्यक्तिची व्याख्या केली आहे त्याप्रमाणे

(१) जो इसम दुसर्याच्या व मालकीची जमीन वैध किंवा कायदेशीर रित्या कुळ या नात्याने कसत असेल आणि

(२) जमीन मालक आणि अशा कुळात करार झाला असेल तथापि जर असा करार तोंडी असेलतर तर तो न्यायालयात सिद्ध होण्यास पात्र असेल

(३) असा कुळ जमीन प्रत्यक्षात स्वता कसत असेल

(४) जमीन कसणयाचया बदल्यात असे कुळ जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि जमीन मालक तो खंड स्विकारत असेल

(५) व्यक्ती जमीन मालकाच्या कुटूंबातील नसावी

(६) ती जमीन असणार्या वयकतिकडे गहाण नसावी

(७) व्यक्ति पगारावरिल नोकर नसावा

(८) अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तिच्या प्रतक्ष किंवा अप्रतक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशी व्यक्ती कायदेशीर कुळ आहे

(५) संरक्षित कुळ म्हणजे कोण ? 

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११( पूर्वीचा मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८) कलम ४/ अ अन्वये "संरक्षित कुळ " ही व्याख्या केली जाते त्याप्रमाणे सन १९३९ चया कुळ कायद्यानुसार दि ०१/०१/१९३८ पूर्वी सतत ६ वर्ष कुळ म्हणून जमीन असणार्या व्यक्तिची किंवा दि ०१/०१/१९४५ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन असणार्या व्यक्तिची आणि दि. ०१/०११/१९७४ रोजी कुळ म्हणून जमीन असणार्या व्यक्तिला. "संरक्षित कुळ " म्हणले गेले आहे अशा व्यक्तिची नोंद अधिकार अभिलेखात "इतर हक्क " सदरी. " संरक्षित कुळ" म्हणून केली गेली आहे

(६) कायम कुळ म्हणजे कोण ?

महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम २०११( पूर्वीचा मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८) कलम २( १०/ अ ) अन्वये. "कायम कुळाची व्याख्या केलेली आहे त्याचप्रमाणे मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५५ अमलात येण्याच्या निकटपूरवी ज्या व्यक्तिंना वहिवाटीमुळे. रुढी मुळे किंवा न्यायालय निकालामुळे कायम कुळ ठरविले गेले आहे त्यांची तसेच जे मूळगेणीदार किंवा मिरासदार म्हणून जमीन धारण करीत होते आणि ज्यांच्या कुळवहिवाटीस प्रारंभ किंवा अवधी तिच्या प्राचिनतवामुळे समाधानकारक रीतीने सिध्द करता येत नसेल आणि ज्यांच्या पूर्व हक्क अधिकार्यांचे नाव कोणत्याही अधिकार अभिलेखात किंवा सार्वजनिक अभिलेखात उपरोक्त सन १९५५ चा अधिनियम अंमलात येण्याच्या निकटपूरवी कायम कुळ म्हणून दाखल होते त्याची नोंद अधिकार अभिलेखात "इतर हक्क " सदरी "कायम कुळ " म्हणून केली गेली

(७) बेदखल कुळ म्हणजे कोण ?

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११ चया कलम १४ अन्वये कुळाच्या कसुरीमुळे कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे

कुळाचा कसूर म्हणजे काय

(१) कोणत्याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्या त्या वर्षाच्या ३१ मे पूर्वी न भरणे

(२) जमीनीची खराबी अथवा कायम स्वरुपी नुकसान होईल असे कृत्य जाणूनबुजून करणे

(३) जाणूनबुजून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम २७ चे उल्लंघन करून जमीनीची पोट विभागणी. पोटपटटा. किंवा अभिहस्तांतरण करणे

(४) स्वता जमीन न असणे

(५) जमीनीचा उपयोग किंवा शेतीसलगन जोड धंद्यासाठी न करता इतर प्रायोजणासाठी करणे उपरोक्त पध्दतीने कुळानी कसूर केला असता जमीन मालकाने कुळास तीन महिन्यांची लेखी नोटीस दिली असल्यास कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे कशा कुळास बेदखल कुळ असे म्हणतात

(८) शेतजमीनीवर जमीन मालकाचा प्रतक्ष ताबा आहे असे कायद्याने केंव्हा माणले जाते ? 

जर एखाद्या शेतजमीन वहिवाट जमीनीचा मालक किंवा त्यांचे कुटुंबीय करीत असतील तर कुळ कायद्यानुसार असलेले कुळ करीत असेल किंवा उपरोक्त व्यक्ती शिवाय अशी व्यक्ती करीत असेल की जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्यांवरून स्वताच्या वहिवाटीचे समर्थन करू शकेल तर अशा शेतजमीनीवर जमीन मालकाचा. " प्रतक्ष ताबा " आहे असे कायदा माणतो अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने जमीनीचा कब्जा घेणा-या इसमाविरुधद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५९ आणि कलम २४२ अन्वये कारवाई करता येते

(९) व्यक्तिशः जमीन कसणे म्हणजे काय ? 

व्यक्तिशः जमीन कसणे याची व्याख्या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम २(६) मध्ये दिलेली आहे त्यानुसार जी व्यक्ती सवतासाठी स्वताच्या अंगमेहनतीने. अथवा स्वताच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या कष्टाने अथवा स्वताच्या कुटुंबातील व्यक्तींच्या देखरेखीखाली. मजूराकडून. पिकांच्या हिशशया चया स्वरुपात मोबदला न देता रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रुपांत वेतन/मोबदला देऊन जमीन कसून घेते त्याला व्यक्तिशः जमीन कसणे असे म्हणतात तथापि. विधवा. अज्ञान. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग आणि सशत्र दलात नोकरी करणारी व्यक्ती जरी नोकरामारफत मजुरांकडून. किंवा कुळामारफत जमीन कसवून घेत असलीं तरी अशी व्यक्तिशः जमीन कसणे असे माणता येईल

(१०) कुळाने खरेदी करावयाच्या जमीनीची किंमत कशी ठरवली जाते ? 

जर एखादी व्यक्ती कायदेशीर कुळ आहे असे शेतजमीन न्याया अधिकिराने जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ३२ /ग अन्वये कुळाने द्यावयाची व जमीनीची किंमत ठरविण्यात येते कलम ३२/ ह अन्वये अशा खरेदीची किमान कीमत व कमाल किंमत काय असावी याची तरतूद आहे अशी किंमत कुळ व संरक्षित आणि साधे कुळ याबाबत वेगवेगळी असु शकते

      कायम कुळाच्या बाबतीत

(१) शेतजमीन खंडाच्या सहा पट रक्कम अधिक

(२) कृषक दिनी येणे असलेल्या खंडाची रक्कम ( असल्यास ) अधिक

(३) कुळाने न भरलेल्या पण जमीन मालकास करावयास लागणार्या जमीन महसूल उपकराचया रकमा अधिक

(४) कृषक दिनापासून कलम ३२/ ग अन्वये जमीन खरेदीच्या किंमत ठरविण्यात येण्याच्या दिनांकापासून खरेदी पर्यंत कीमतीवर. द सा द शे ४'५/टक्के या दराने होणारे व्याज

    वरील सर्वांची बेरीज

संरक्षित आणि साध्या कुळासाठी

(१) शेतजमीनीचया आकारणीचया वीस पटीहून कमी नाही आणि २०० पटीहून जास्त नाही अशी रक्कम अधिक

(२)जमीन मालकाने बांधलेल्या वास्तू विहीर. बांधारे. लावलेली झाडे यांचें मुल्य

(३) कुळाने न भरलेल्या व जमीन मालकास भरावयास लागणारा जमीन महसूल उपकराचया रक्कम अधिक

(४)!कृषकदिनापासून कलम ३२/ ग अन्वये जमीन खरेदी किंमत ठरविण्यात येण्याच्या दिनांकापरयणत कालावधीसाठी खरेदी किंमतीवर द सा द शे ४'५/टक्के या दराने होणारे व्याज

    वरील सर्वांची बेरीज

कुळाने जर जमीन मालकास जमीनीच्या भरपाई पोटी काही रक्कम दिली असल्यास अशी रक्कम तसेच त्या जमीनीत काही झाडे असल्यास आणि जमीन मालकाने त्या झाडापासून काही उत्पन्न घेतलें असले तर ती रक्कम खरेदी रक्कमेतून वजा करण्याची तरतूद आहे

(११) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ३२ ते ३२ र बाबत माहिती

कायदा ३२ यात दिनांक १/४/१९५७ हा कृषी दिन ठरविण्यात आला आहे या दिनांकास कायदेशीर कुळ म्हणून जमीन धारण केली असेल तर त्या कुळाने ती जमीन सर्व बोजापासून मुक्त अशी आपल्या जमीन मालकाकडून खरेदी केली आहे असे मानण्यात येईल

(१) कलम ३२ अ कुळाने कमाल क्षेत्रापरयणत जमीन खरेदी केली आहे असे मानण्यात येईल कमाल क्षेळत्रापेक्षा जास्त जमीन कुळाला खरेदी करता येणार नाही

(२) कलम ३२"ब कुळाने अंशतः मालक आणि अंशतः कुळ म्हणून जमीन धारण केली असेल आणि त्याने अंशतः मालक म्हणून जमीन धारण केलेल्या जमीनीचे क्षेत्र कमाल धारण क्षेत्राइतके किंवा त्याहून जास्त असेल तर कुळाने जमीन खरेदी केली आहे असे मानण्यात येईल

(३) कलम. ३२ " क जेव्हा कुणाकडे एकापेक्षा अधिक जमीन मालकाकडील जमीन स्वतंत्र पणे कसण्यासाठी ताब्यात असतील तेव्हा कुळाला प्रत्त्येक जमीन मालकाकडून खरेदी करावयाचे क्षेत्र व ठिकाण पसंत करण्याचा अधिकार असेल

(४) कलम. ३२"ड कुळाच्या ताब्यात कुळ म्हणून केली असणारी एखादी जमीन मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ अन्वये तुकडा असेल तरीही कुळाला तो तुकडा खरेदी करण्याचा अधिकार असेल

(४) कलम ३२"इ कुळाने जमीन खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जमीनीची विल्हेवाट कलम १५ अन्वये लावता येईल

(५) कलम ३२ " फ जमीन मालक अज्ञान. विधवा. सशत्र सैन्य दलात नोकरीस असेल किंवा शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असेल तर अशा जमीन मालकास कलम. "३१" मध्ये नमुना केलेल्या अवधित कुळ वहिवाट समाप्त करण्याचा हक्क असतो. अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर. विधवा महिलेचे हितसंबंध नष्ट झाल्यानंतर. सशत्र सैन्य दलातील नोकरी संपुष्टात आल्यानंतर किंवा शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग व्यक्तीं बरा झाल्यानंतर एका वर्षाच्या काळात कुळाला आपला जमीन खरेदी हक्क बजावता येईल हा एका वर्षाचा काळ वर. नमुद घटना पूर्ण झाल्यापासून मोजण्यात येईल कुळाला माहिती मिळाल्यापासून नाही

(६) कलम. ३२ ‌"ग " यानुसार शेतजमीन न्याया अधिकिराने. कुळाने द्यावयाची जमीनीच्या खरेदी किंमत ठरविण्यात येईल

(७) कलम "३२" यानुसार कुळाने खरेदी करावयाच्या जमीनीची किंमत व कमाल किंमत ठरविली जाते

(८) कलम. "३२" ह. यानुसार कुळाने खरेदी करावयाच्या जमीनीची किमान किंमत व कमाल किंमत ठरविली जाते

(९) कलम "३२" आय यानुसार कायम कुळाने धारण केलेलीं जमीन जर पोटकुळाला. पोटपटटयाने दिली असेल तर अशा पोटकुळाने विहित मर्यादेपर्यंत कृषकदिनी जमीन खरेदी केली आहे असे मानण्यात येते पोटकुळाने द्यावयाच्या खरेदीच्या व किमतीतून सहा पट रक्कम जमीन मालकास व उर्वरित रक्कम कुळास दयावी लागते

(१०) कलम "३२" जे वगळण्यात आले आहे

(११) कलम. "३२" के. यानुसार खरेदीदार कुळाने जमीन खरेदीची रक्कम एक वर्ष कालावधीच्या आत एकरकमी किंवा द सा द शे ४'५/टक्के व्याजासह बारापेक्षा जास्त नाही इतक्या वार्षिक हप्त्याने वसुली करण्याचा न्यायाधिकरणाला आहे

(१२) कलम. "३२" ल. निरसित करण्यात आले आहे

(१३) कलम. "३२" म. यानुसार कुळाने खरेदीची संपूर्ण रक्कम शासकीय तिजोरीत जमा केल्यानंतर कुळाला न्यायाधिकरण मार्फत जमीन खरेदीचे प्रमाणपत्र देण्यात येते जर अशी रक्कम कुळाने जमा करण्यात कसूर केला आणि ती रक्कम जमीन महसूलाचया थकबाकी प्रमाणे वसूल केली गेली तर खरेदी परिणाम शुन्य होईल

(१३) कलम "३२" मम यानुसार जर वर नमूद केल्याप्रमाणे खरेदी परिणाम शुन्य असेल परंतु जमीन खरेदीदार कुळाच्या कब्जात असेल तर सदर खरेदी रक्कम एक रकमी भरण्यासाठी न्याया अधिकिराने चौकशी अंती कुळाला आणखी एक वर्षाचा अवधी देऊ शकेल

(१४) कलम "३२" न यानुसार खरेदी परिणाम शुन्य झाली असेल तर जमीन मालकाला कुणाकडून खंड वसुल करण्याचा अधिकार आहे

(१५) "३२" ओ. यानुसार जर कृषकदिनानंतर कुळवहिवाट निर्माण झाली असेल तर कुळवहिवाट निर्माण झाल्यापासून एका वर्षाचा आत कुळाने जमीन खरेदिसाठी न्याया अधिकिराने अर्ज करण्याची तरतूद आहे

(१६) कलम. "३२" पी. यानुसार कुळाने जमीन खरेदीचा हक्क मुदतीत बजावला नसेल तर जमीन परत घेण्याचा अधिकार व त्याची विल्हेवाट लावण्याचा हक्क न्याया अधिकिराने आहे

(१७) कलम. "३२" कयू. यानुसार कलम "३२" ग. ची प्रकिया चालू असताना न्यायाधिकरण जमीनीवर असलेल्या बोजयाची निश्चिती करते

(१८) कलम. "३२" आर. यानुसार जमीन खरेदीदाराने खरेदी नंतर अशी जमीन व्यक्तिशः कसणयात कसूर केल्यास त्याला जमीनीतून काढून टाकून त्या जमीनीची विल्हेवाट लावण्याचा हक्क न्यायधिकरणाला आहे

(१२)सात बारा इतर हक्कात "कु का. ४३ चया बंधनास पात्र असा शेरा असतो त्याचा नेमका अर्थ काय ? महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम "४३" अन्वये कुळाने कलम. "३२"३२ फ " आय. ३२" ‌३३ क " किंवा "४३'१'ड " अन्वये खरेदी केलेलीं तसेच कलम. "३२ _प किंवा "६४" अन्वये विक्री केलेलीं जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरत करता येणार नाही गहाण. बक्षीस किंवा पट्ट्याने. देता येणार नाही तथापि महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी. २०१४ मध्ये कलमात सुधारणा केली आहे त्यानुसार कुळांना. कुळ कायदा कलम "३२- म चे कलम प्रमाणपत्र मिळून १०/वर्षाचा कालावधी. लोटला आहे अशा जमीनीची खरेदी/ विक्री / गहाण / अदलाबदल. / गहाण / पट्टा. / अभिहस्तांतरण करण्यासाठी शासन परवानगी आवश्यकता असणार नाही कशी तरतूद केली आहे त्याला कलम. "३२- म " चे कलम चे प्रमाणपत्र मिळून. १०/ वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि त्याला सदर जमीन विकण्याची इच्छा आहे त्याने शेतजमीन विकण्यापूरवी त्याचा विक्री करण्याचे मत तहसिलदार कार्यालय यांना लेखी कळविणे कसा कर्ज मिळाल्यानंतर दोनच दिवसात तहसिलदार कार्यालय त्या अर्जदारास. तो विक्री करणार असलेल्या शेतजमीनीची महसूल आकारणी चाळीस पट नजराणा रककमेचे. लेखाशिरष. नमुद असलेलें चलन तयार करून देते ही चाळीस पट नजराणा रक्कम संबंधित शेतकरयाने. चलनानुसार. शासकीय कोषागारात जमा करावी त्यांनतर तो विक्री व्यवहार करू शकतो हे चलन आणि खरेदीची कागदपत्रे पाहून तलाठी यांनी गाव नमुना. ६/ मध्ये त्याची नोंद करावयाची आहे या चलनाशिवाय कोणत्याही आदेशांची आत्ता गरज भासणार नाही जर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या सात बारा वर असलेला "कु का कलम ४३ चया ब़धनास पात्र. " असा शेरा जरी रद्द करावयाचा असल्यास तरी वरिल प्रमाणे अर्ज व चलन हजर केल्यास असा शेरा रद्द करता येतो परंतु महत्वाचे म्हणजे हि तरतूद फक्त कुळ कायदा कलम "४३" चया बंधनास पात्र असलेल्या जमीनीना लागू असेल वाटप केलेल्या नवीन शर्ती वरील शासकीय जमीनी "कु का कायदा ८४-क " वाटप केलेल्या नवीन शर्ती वरील जमीनी. वतन / इनाम. सिलींग कायद्यानुसार वाटप केलेल्या जमीनीना ही तरतूद लागू होणार नाही

       जर कुळ कायदा कलम. "३२-म " प्रमाणपत्राला १०/ वर्षाचा कालावधी लोटला नसेल तर सक्षम अधिकारी यांचेकडून कुळ कायदा कलम "४३" अन्वये परवानगी देणे बंधनकारक आहे कुळ कायदा "४३" अन्वये परवानगी न घेता व जमीनीची विक्री व्यवहार करून ताबा दिल्यास असा ताबा अवैध असेल तसेच आशा जमीन विक्री व्यवहार करताना कलम. "४३" अन्वये परवानगी नसेल तर विक्री कागदपत्रे अवैध ठरतील कोणतेही न्यायालय असा व्यवहार वैध ठरविण्यास असमर्थ असेल

(१३) जमीन मालक / कुळ / आणि जमीनीचा विक्री व्यवहार

हा व्यवहार अवैध असतो तो कसा ? कुळ वहिवाट अधिनियम हा कुळाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी त्यांची पिळवणूक होऊ नये आणि त्यांना कोणी फसवू नये या उद्देशाने तयार करण्यात आला आहे जमीन मालकाला. कुळ कसत असलेली जमीन त्यालाच विकत देण्याची इच्छा असल्यास. कलम. "६४" अन्वये त्याची पद्धत विहित केलेली आहे कुळ वहिवाट अधिनियमाखालील कोणत्याही जमीनीची खरेदी विक्री शेत जमीन न्यायाधिकरणाचया परवानगी शिवाय करता येणार नाही



(१४) शेतजमीन मालक व्यतिरिक्त अन्य व्यक्तिचे नाव वर्षभर वहिवाट सदरि लागली म्हणजे तो आपोआप कुळ बनतो का ? 

हा फार मोठा गैरसमज आहे कुळ कायदा कलम "४" मध्ये कुळ म्हणून मानावयाचया व्यक्ति ची व्याख्या नमुद आहे कुळ कायदा कलम. "३२-ओ " मध्ये कुळ कायदा कलम "३२ ओ " मध्ये जमीन मालक दिनांक १/४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीचया बाबतीत. जातीने जमीन कसणारया. कुळास अशी कुळवहिवाट सुरू झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत त्याने धारण केलेलीं जमीन मालकाकडून खरेदी करण्याचा हक्क असतो " असे नमुद असले तरीही कुळ कायदा कलम " ३२ ओ " अन्वये कुळ जाहिर करणेसाठी खालील पात्रात आवश्यक आहे

(१) कुळकादयाने कुळास दिलेल्या हक्क बजावत नसेल किंवा त्याची इच्छा नसेल त्याने एका वर्षाच्या आत त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार ) विहित रीतीने कळवणे बंधनकारक आहे

(२) अशा प्रकारे कळविल्या नंतर शेतजमीन न्यायाधिकरण (तहसिलदार ) या प्रकरणी नोटीस बजावून चौकशी करतात या चौकशी वेळी खालील मुद्दे स्पष्टपणे/ निसंगदिपणे सिध्द होणे आवश्यक आहे

(३) अर्जदार / कुळ आणि / मालक यांच्यात "कुळ मालक " असे नाते आहे का ? 

(४) "कुळ आणि मालक. " यांचे नाते आणि न्यायालयात निसंगदिपणे"करार " झाला आहे का ? 

(५) कुळ मालकाला रोखीने खंड देते काय? 

(६) कुळ देत असलेला खंड मालक स्विकारतो का ? आणि त्याची पावती देतो का ? 

(१५) एखाद्या मालकाला कुळावयतिरिकत अन्य व्यक्ती ला शेतजमीन करता येत नाही ते विधीग्राहय ठरत नाही

कुळ वहिवाट अधिनियम त्यांच्या हकक व संरक्षण करण्यासाठी अमलात आणला आहे तो कसत असलेली जमीन बेकायदेशीर हिरावून घेऊ नये यासाठी तयार करण्यात आला आहे जमीन मालकाने कुळ कसत असलेली जमीन. कुळाने खरेदी करण्यास नकार दिला तरीही कलम "६४" अन्वये त्याला शेतजमीन न्यायधिकरणाचया परवानगी शिवाय अन्य व्यक्तिला विकता येणार नाही अशी विक्री बेकायदेशीर ठरून कलम "८४" क अन्वये कारवाई होणेसाठी पात्र ठरेल

(१७) एकादी सहकारी संस्था/ सहकारी संस्थेमार्फत शेतजमीन खरेदी विक्री विधीग्राहय योग्य आहे

कुळ वहिवाट अधिनियम कलम "६४-अ" अन्वये सहकारी संस्थेस अथवा अशा सहकारी संस्थेमार्फत शेतजमीन खरेदी झाल्यास अशा वयवहारास कुळ कायदा कलम. "६३व ६४ लागू होणार नाही " मुंबई सहकारी संस्था अधिनियम १९२५ अन्वये झालेली असावी अन्यथा असा व्यवहार अवैध ठरतो आणि कुळ कायदा कलम "८४-क " नुसार कारवाई करण्यात येते

(१७) नगरपालिका शेत्रात कुळ कायदा अधिनियम लागू करता येत नाही

(१) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम "४३- क अन्वये बृहन्मुंबई. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम "१९४९" मुंबई बरो नगरपालिका अधिनियम "१९५२ "मुंबई जिल्हा नगरपालिका अधिनियम "१९०१" अन्वये स्थापित नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रे. कटक क्षेत्र. मुंबई नगररचना अधिनियम "१९५४" अन्वये नगररचना योजनेत समाविष्ट क्षेत्रे यांना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम. ३१/ते ३२-र / ३३ अ ब क आणि ४३ तरतूद लागू होत नाही

(१८) शेतकरी नसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी करता येत नाही कलम "६३ अन्वये शेतकरी नसलेला व्यक्ति शेतजमीन खरेदी करु शकत नाही असा व्यवहार बेकायदेशीर कलम. "८४" नुसार ठरवला जातो आणि सदर इसमाला कारवाईला सामोरे जावे लागते

ज्या व्यक्तिची शेतजमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली आहे तसा पूरावा दिला तर त्याला शेतकरी मानता येते

(१९) शेतकरी नसलेली व्यक्ती औधोगिक प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदी करू शकते महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम "६३"एक- अ अन्वये " प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत असलेल्या औधौगिक किंवा शेतकी क्षेत्रामध्ये स्थित जमीन. दहा हेक्टर. मर्यादेत अधिन राहून खरेदी करू शकते

      पण शेतजमीन खरेदी केलेपासून पंधरा दिवसांच्या आत सदर जमीन औधौगिक वापरात घेणे बंधनकारक आहे अन्यथा सदर शेतजमीन मूळ मालकास परत घेणेचा अधिकार आहे

(२० ) अल्पभूधारक शेतकरी जो शेतकरी मालक / व कुळ म्हणून एक हेक्टर (२'५ एकर ) पेक्षा जास्त शेतजमीन वहिवाट तो त्याला अल्पभूधारक शेतकरी म्हणतात

(२१) लहान शेतकरी जो शेतकरी मालक व / कुळ म्हणून एक हेक्टर ( २-५एकर ) पेक्षा जास्त शेतजमीन वहिवाट तो तो लहान शेतकरी असतो

(२२) दूबऀल घटक दोन हेक्टर पेक्षा जास्त नाही अशी कोरडवाहू शेतजमिनी धारण करणारा (दुष्काळ प्रवण म्हणून जाहीर क्षेत्रातील तीन हेक्टर ) लहान शेतकरी आणि ज्यांचे बिगर शेती वार्षिक उत्पन्न १३;५००/ पेक्षा जास्त नाही त्याला दूरबल घटक मानता येईल

(२३) दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती ज्याचे पैसा अथवा माल किंवा अंशतः आणि अंशतः माल अशा सर्व मार्गांनी मिळवणारे उत्पन्न एकूण वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु २०/०००पेक्षा आणि शहरी भागात रु २५/००० पेक्षा जास्त नाही त्याला दारिद्र्य रेषेखालील व्यक्ति संबोधले आहे

(२४) शेतकरी नसणारी व्यक्ती एखाद्या अधिकार यांच्या परवानगीने शेतजमीन खरेदी करू शकते ज्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न रु बारा हजार पेक्षा जास्त नसेल असा बिगर शेतकरी व्यक्ति महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम "६३ (१) (ब ) अन्वये शेतजमीन विकत घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकतात

      वरील प्रमाणे सर्व माहिती आपल्याला आपले हक्क व अधिकार सांगणारे आहेत

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा 

ओबीसी जनगणना काळाची गरज...

पळवाट पळवाट....

आपण जाब विचारु शकतो का ?..

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ....

अन् त्याला कुटुंब मिळाले...! - Manavseva Project

 हरवलेला सतीश ‘मानवसेवा’ च्या उपचारानंतर कुटुंबात



अहमदनगर, मंगळवार दि.२३ मार्च २०२१

वयाच्या १२ वर्षी मुलाच्या मनावर आघात झाला. परिस्थितीचे गुलाम होवून जगण्याची वेळ आली होती. उपचारासाठी हातात पैसे नाही. मानसिक विकलांग मुलावर उपचार आणि पोटाची खळगी भरता येईल म्हणुन एक बाप मुलाला घेवून ऑगस्ट २०१९ मधे गावसोडून निघाले होते. रेल्वेच्या प्रवासादरम्यान मुलगा सतीश हरवला. संपुर्ण रेल्वेत शोधले, शोधून सापडला नाही. आणि दि.८ ऑगस्ट २०१९ रोजी औरंगाबाद रेल्वे पोलीस स्टेशन येथे सतीश हरवल्याची नोंद केली.

मन हरवलेला सतीश अनवाणी पायाने अहमदनगर कडे चालतच आला. रस्त्यात मिळेल ते खाऊन चालतच थेट अहमदनगर शहरात पोहचला. संपुर्ण जग कोरोनाने हदरलेले असतांना सतीश मात्र अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय परिसरात कोपरा धरुन बसलेला होता. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय समाजसेवा अधिक्षक मा. श्री सुरेश कदम सर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या निराधार बेघर मानसिक विकलांगाला मानवसेवा प्रकल्पामधे आधार मिळणेकरीता कळविले. या बेघर मानसिक विकलांग व्यक्तीला दि. ६ मे २०२० रोजी मानवसेवा प्रकल्पात आधार दिला. मानवसेवा प्रकल्पाच्या समुपदेशन, उपचारानंतर सतिश बोलू लागला. मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक प्रसाद माळी यांनी सतिशचे समुपदेशन केले. सतिशने समुपदेशना दरम्यान फक्त शाळेचे नाव सांगितले. सरदार वल्लभाई पटेल विद्यालय रायगाव यावरुन इंटरनेटच्या मदतीने मुख्याध्यापक श्री जाधव सर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. श्री जाधव सर यांनी धाड गावातील असल्याचे सांगितले आणि त्यांनी तेथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क करताच सतिश हा बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावातील असल्याची खात्री झाली. सतिशचे वडील श्री पंढरीनाथ जुमडे व भाऊ यांना कळताच दि २३ मार्च २०२१ रोजी मानवसेवा प्रकल्पात पोहचले. मानवसेवा प्रकल्पाच्या मायेच्या उपचाराने सतिशला त्याचे कुटुंब मिळाले. हरवलेला मुलगा दोन वर्षानंतर मिळताच वडील व भावाला अश्रू अनावर झाले. मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवकांनी सतिशला वडील व भाऊ यांच्या ताब्यात देवून शुभेच्छा दिल्या. 

सतिशच्या उपचार व पुनर्वसनासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप, संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री संजय शिंगवी, मा. श्री शशिकांत चेंगेडे, प्रा. श्री अविनाश मुंडके, प्रा.डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, सौ.शारदाताई होशिंग, मा. अतिक शेख, श्री महेश पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. आणि मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक राहुल साबळे, अजय दळवी, प्रसाद माळी, कृष्णा बर्डे, अशोक मदणे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, अनिता मदणे, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, नितीन बर्डे, सोमनाथ बर्डे यांनी परिश्रम घेतले. 

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*

•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ ०२४१ २४२९९४२

📱 ९०११७७२२३३ / ९११२०५९१९१ /९११२०४९१९१

वाचा -

एम आय एम विद्यार्थी राहुरी कारखाना अध्यक्ष पदी साहिल पठाण तर उपाध्यक्ष पदी संजय सांगळे - AIMIM Rahuri ...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation.....

थुंकी एक विष -A.Munde...

ओबीसी जनगणना काळाची गरज..

पळवाट पळवाट


 पळवाट पळवाट



        आणि राष्ट्रीय एकात्मता या परस्परांशी निगडित संकल्पना आहेत आपण एक आहोत हि एकात्मतेची भावना असलेला आपला समूह आहे राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी भावनिकदृष्ट्या लोकसमुदाय एकात्म किंवा एकसंघ करणे गरजेचे आहे समान भाषा.  समान धर्म. समान इतिहास.  समान संस्कृती. आणि प्रादेशिक सलगता या बाबी राष्ट्रीय निर्मिती साठी पोषक असतात त्यासुद्धा आवश्यक बाबी नाहीत कारण अमेरिका किंवा भारतासारखे खंडप्राय. बहुभाषिक.  आणि धर्म. जाती   संस्कृती. यांची विविधता असणारे देश आज अस्तित्वात आहेत देशाच्या नागरिकांमध्ये आपण एक आहोत. आपली शासकीय. प्रशासकीय. राष्ट्रीय एकात्मता हि एक आहे अशी भावना तयार होणे याला एकात्मता असे म्हणतात या भावनेमुळे व्यक्ती. जाती धर्म. भाषा. आणि प्रांत. यांच्या पलीकडे जाऊन आपण व आपले राष्ट्र या व्यापक. व्यवस्थेतेशी. निगडित होते राष्ट्रीय व आपले हक्क व अधिकार न्याय  अतिक्रमणं काळात. लोक राष्ट्राच्या बांधवांचा विचार करतो आणि अडचणी काळात एकामेकाला मदत मदत करतो. सवभाषेचा दुराग्रह. जातीयवाद. संप्रदायवाद. आणि अतिरेकी प्रादेशिकता  व शासन व प्रशासन यांच्या मनमानी कारभार यामुळे नागरिकांमध्ये दुरावा निर्माण होतो परस्परांविषयी आदर. अधिकार व कर्मचारी यांच्याविषयी आदर अविश्वास संपुष्टात आल्याने राष्ट्रीय एकात्मता कमकुवत होते राष्ट्रीय एकात्मतेशी विसंगती असणार्या संकुचित प्रवृतीवर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि त्यांच्या प्रसाराला आळा घालणे गरजेचे आहे

(१) जातीचा दाखला

(२) बांधकाम कामगार नोंदणी

(३) शासकीय योजना

(४) शिक्षण व्यवस्था

(५) बॅंक आर्थिक कर्ज योजना

(६) माहिती अधिकार

(७) रेशन व्यवस्था

(८) शासकीय पत्र व्यवहार

(९) इतर विषय

पळवाट हा शब्द आपणास नवीन नाही अशी पळवाट आपण रोज शासकीय किंवा निमशासकीय कार्यालये विविध ठिकाणी आपण बघतो काम न करणे आणि न पटणारे कारणं देऊन नागरिकांना दिवसेंदिवस आॅफिसला हेलपाटे मारायला लावणे

(१) बांधकाम कामगार नोंदणी

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार यांचेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने १९ योजनांचा समावेश होतो  मंडळाचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे. १८/६० शासनाने ठरवून दिले आहेत मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंशदान फी भरून व इंजिनिअर व ठेकेदार कंत्राटदार यांचे ९० दिवस काम केलेचे प्रमाणपत्र अनुयाय करण्यात आले आहे  आज लाखोंच्या घरात बांधकाम कामगार आहेत असे काही जणांचे मत आहे रोजच्या रोज सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये होणारी नोंदणी साठी गर्दी ध्यानात घेता एवढे कामगार जर एका गावात तालुक्यांत जिल्ह्यात असतील तर तेथील लोकसंख्या किती आणि मग खरोखरच कामगार असणारे किती याची आपण कधी चौकशी केली का ?  

हि बोगस नोंदणी बंद व्हावी यासाठी मंडळाने आॅनलाइन पध्दतीने नोंदणी सुरू केली आहे त्यासाठी कामगार भवनाला नोंदणी असणारे इंजिनिअर हे आपल्या रजिस्ट्रेशन नंबर सह कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देणे मंडळाने बंधनकारक केले आहे त्यामुळे जो इंजिनिअर व ठेकेदार कंत्राटदार बांधकाम कामगार यांना ९० दिवस काम केलेला दाखला देणार आहेत त्यांनी कामगार टॅक्स भरला आहे का ? त्यांचे रजिस्ट्रेशन आहे का ? नुतनीकरण केले आहे का ? रजिस्ट्रेशन केलेपासून कामगार भवनाचा शासन निर्णयानुसार  टॅक्स भरला आहे का ? याची चौकशी होणार म्हणाल्यावर इंजिनिअर लोकांनी कामगार नोंदणी दाखले देणे बंद केले कामगार नोंदणी होण्यास अडचण येण्यास सुरुवात झाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी  कामगार नोंदणी सोपी व सुटसुटीत पध्दतीने होणेसाठी  शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार. २०१४/२०१६/२०१७/ २०१८  वेळोवेळी शासन निर्णय जारी करून सुध्दा  थोडक्यात. ग्रामसेवक.  गटविकास अधिकारी. नगरपालिका महानगरपालिका वनविभाग जलसंधारण विभाग. महावितरण. असे बरेच विभागातील बांधकाम विभाग व त्यात येणारे उपबांधकाम अभियंता यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषित केले आहे पण आज एकही अधिकारी व कर्मचारी शासन निर्णयानुसार काम करत नाही त्यांना कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले मागितले असता आम्हाला परवानगी नाही. ? संघटना आहेत त्यांना १००/ रुपये चया स्टॅम्प वर लिहून द्या की ज्या कामगारांना दाखले देणेचे आहे त्यांचा आम्ही सापेक्ष सर्वे केला आहे किती काम चोर पणा आहे बघा संघटना रजिस्ट्रेशन शासन देतय म्हणजे संघटना मोठी का ? शासनाने निवडलेला अधिकार व कर्मचारी  हे उत्तर पळवाट काढण्यासारखे नाही का ? विचार करा 

(२) जातीचा दाखला

माणसाला आपल्या जाती धर्माविषयी गर्व असतोच पण मला एक कळत नाही जात कोणी निर्माण केली आपल्या व्यवसायाने मग मी अमुक जातींचा हा तमुक जातींचा आपल्या मनात खोलवर कुणी भरवले. त्यातच.  अनुसूचित जाती जमाती.  भटक्या विमुक्त जाती. व इतर मागासवर्गीय जाती अशी वर्गवारी केली आहे त्यामुळे   आपली प्रगती खुंटली आणि सामाजिक राजकीय लोकांनी जातीच राजकारण करण्यास सुरुवात केली  त्यातूनच जातीयवाद धर्मवाद दंगे धोपे जाळपोळ. लुटमार  असे मार्ग निवडून प्रत्येकाने आपली वोट बँक निश्चित केली ही वोट बँक कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी सर्व वर्गवारी केलेल्या जाती जमाती यासाठी विविध शैक्षणिक कर्ज. उधोग कर्ज. जसे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ.  मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ. महात्मा फुले आर्थिक विकास. डॉ बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास महामंडळ.  अशी विविध जाती जमाती यांचेसाठी मंडळे स्थापन करण्यात आली गोरगरीब जनतेला मदत मिळावी शासनाचा उद्देश बरोबर आहे पण त्यात एक मोठा अडसर घातला तो म्हणजे जातींचा दाखला. ६० वर्षाचा पूरावा.  नात्यातील व्यक्तिचा जातीचा दाखला. वरील प्रमाणे विचार केला तर आपले पूर्वज भटकंती करणारे होते असे म्हटले तर त्यावेळी. भिल्ल. कातकरी. १२ बलुतेदार. हे ६० वर्षाच्या पाठीमागे शिकले होते का ? त्यावेळी शिक्षण व्यवस्था होती का ? हे गाव ते गाव पोटासाठी वणवण भटकंती करणारे कुठे राहणार. ? काय काम करतं होते ? आज हे सर्व आपण तोंडी सांगू शकतो त्याचा कुठेही लेखी पुरावा नाही मग यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र कसे मिळणार ? एखादे कुटुंब पोटासाठी आपले राज्य सोडून उदा. कर्नाटक मधील एक कुटुंब बरिच वर्ष महाराष्ट्र राज्य येथे रहिवासी आहे त्यांचे रेशनकार्ड आधार कार्ड. लाईट बील. व अशी कागदपत्रे येथील आहेत ते पूर्वी भटकंती करत होते असा उल्लेख त्यांच्या पूर्वजांच्या जातीच्या दाखल्यावर उल्लेख आहे हिंदू. वडर. असा उल्लेख आहे त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात प्रमाणपत्राची गरज आहे तर ते कर्नाटक येथील आहेत म्हणून नाकारण्यात येत आहे म्हणजे. समाज हित. नागरी कल्याण बाजूला ठेवून केवढा मोठी पळवाट काढली जात आहे विचार करण्याची गरज आहेे >

(३) शासकीय योजना

घरकुल योजना सर्व गोरगरीब जनतेला सवताचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासन. पंतप्रधान आवास योजना.  रमाई आवास योजना.  वाल्मिकी आवास योजना. इंदिरा गांधी आवास योजना. राजीव गांधी आवास योजना शबरी आवास योजना. बेघर वसाहत  अशी विविध प्रकारची घरकूल योजना राबविण्यात येतात त्यासाठी  लाभार्थी भारताचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.  भारतात कोठेही त्यांच्या नावांवर स्वताचे पक्के घर अथवा जागा नसावी. त्याने कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. घर नसणारा. जागा नसणारा. असा कोण आहे का ? आणि असेल तर तो आभाळातून पडला का ? जंगलात रहिवाशी होता का ? कारण त्याची वडिलांची जी काय थोडी प्रापटी असेलतर ती वारसाहक्काने मुलाला मिळणार मग तो बेघर कसा ? एकत्रित कुटुंब असल्यास घरकुल योजनेचा लाभ एकालाच मिळतो. बेघर वसाहतीत राहणारे लोक त्यांचे प्रत्येकाचे गावात घर आहे. बेघर वसाहतीत मिळालेले घर भाडेतत्वावर दिले जाते अथवा नोटरी करून विक्री केलेलीं किती घरे मी पाहिली आहेत आणि ज्याला खरोखरच घर नाही त्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. विचारणा केली असता असे उत्तर दिले जाते की त्यांची पाठीमागील परस्थिती बिकट होती आज सुधारली आहे मग त्यांची घरे काढून घेवून गरजूंना देता येणार नाहीत का ? प्रत्त्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडे आपल्या मागणीला. न पटणारी अशी पळवाट आहे विचार करण्याची गरज आहे

(४) शिक्षण व्यवस्था

आपल्याला शिक्षण मिळाले नाही तर आपल्या मुलांना शिकण्याची संधी मिळावी अशी प्रत्त्येक पालकांची इच्छा असते पण आजच्या शिक्षण व्यवस्थेमुळे खूप हुशार असणारी मुले घरच्या गरिबीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यासाठी शासन विविध शैक्षणिक योजना चालू करत आहे पण त्यात सुध्दा शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यासाठी जातं प्रमाणात अनिवार्य करण्यात आले आहे आणि ६० वर्षाचा पूरावा नसल्याने हि गरिब मुले शैक्षणिक योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत विचारणा केली असता अमुक योजना तमुक जातीसाठी आहे तुम्ही त्यात बसतं नाही आणि नेत्यांचे बगलबच्चे यांचा न कोणता अडसर लावता जातींचा पाहिजे तो पाहिजे तसा योजनेला उपयोग होणारा दाखला निघतो तो कसा त्यांनी कुठला लेखी पुरावा दिला. ही मोठी पळवाट आहे विचार करण्याची गरज आहे

(५) बॅक विविध मंडळांची कर्ज योजना

बॅंकेकडून विविध आर्थिक योजना राबविण्यात येतात त्यात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ ठक्कर बाप्पा आदिवासी विकास.  अंत्योदय दिनदयाळ योजना. अशा विविध आर्थिक योजनाची जाहिरात जोरात आणि विशेष रुपाने केली जाते त्यामुळे सर्वसामान्य गरिब गरजू तरुण आपल्या शहरातील राष्ट्रीयकृत बँकेत आपला एक उधोग निवडून कर्ज मागणी अर्ज दाखल करतो सुरवातीला त्याला सांगण्यात येते सदर कर्ज विना जामिन विना तारण आहे शासनाने गरिबांच्या घरातील तरुण बेरोजगार राहू नये यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे  अशा सांगण्यानुसार तरुण आपला वेळ आणि पैसा कागदपत्रे गोळा करण्यासाठी घालवतात दोन तीन महिने हेलपाटे मारल्यानंतर बॅक अधिकार व कर्मचारी त्यांना सांगतो तुमचे प्रकरण मंजूर आहे पण आय टी रिटर्न. आणि जी एस टी. काढून घ्या लगेच पुढचा प्रोसेस करतो बघा दोन लाखांचे कर्ज काढणारा कशाला आय टी रिटर्न व जी एस टी भरतो का  आणि त्यातून जर कर्ज प्रकरण मंजूर झालेच तर बॅंक मॅनेजर टक्केवारी ठरते केवढी मोठी पळवाट आहे विचार करण्याची गरज आहे

(६) माहिती अधिकार

सर्व शासकीय व जनहिताच्या आॅफिस मध्ये चालणारे कामकाज यांचा लेखाजोखा व आढावा घेण्याच्या चां अधिकार सर्वसामान्यांना माहिती अधिकार कायदा २००५ नुसार शासनाने बहाल केले आहे  आपण आपल्या मतानुसार एखाद्या आॅफिस मध्ये चालणारे काम निकृष्ट दर्जाचे आहे असे आपणास वाटल्यास आपणं माहिती अधिकार दाखल करतो आणि स्वच्छ व पारदर्शक माहिती मिळेल अशी अपेक्षा धरतो पण त्या आॅफिस मध्ये असणारे जनहित माहिती अधिकार अधिकारी आपणास माहीत देताना एक शब्द सातत्याने वापरला जातो की सदर आपण मागितलेली माहिती ही वैयक्तिक पातळीवरील असल्यामुळे ही माहिती आम्ही आपणास देवू शकत नाही सदर माहिती साठी जिल्ह्यायातील संघटना व समाजसेवक यांनी लेखी व मौखिक स्वरूपात आमच्याकडे पत्र व्यवहार केला आहे त्यामुळे आम्ही ही माहिती देवू शकत नाही उदा. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून आम्ही. २०१८/२०१९/२०२०/ चे औजारे खरेदी साठी देण्यात आलेल्या अनुदानित नोंदणी कामगार यांची माहिती नाव पत्ता सह मिळावी देण्यास काही अडचण आहे का ? नाही जनहित माहिती अधिकार अधिकारी असे उत्तर देतात की सदर माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्याने ती आम्ही आपणास देवू शकत नाही बरोबर आहे समजा मी मागितलेली माहिती वैयक्तिक कशी कारण आम्ही कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांची माहिती मागितली नाही बरोबर जर मंडळांची माहिती वैयक्तिक असेलतर मंडळ वैयक्तिक आहे का ? असेल तर ते कसे वैयक्तिक आहे ते सांगा ? याचा अर्थ असा होतो की त्या कारणाला अर्थ नसणारे कारणं सांगून कामचोर पळवाट काढली जाते विचार करण्याची गरज आहे

(७) रेशनकार्ड व्यवस्था

गोरगरीब जनतेला रास्त दरात अन्न धान्य उपलब्ध व्हावे यासाठी रेशनकार्ड हि प्रकिया अमलात आणली त्यात उत्पन्न अट आहे  त्यानुसार प्रत्येक घटकाला रेशनकार्ड वितरीत केले जाते शासन निर्णयानुसार दोन चाकी गाडी.  पकके घर. शासकीय नोकरी.  एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न.  अशा लोकांना रेशन अधिनियम कायदा २०१३ नुसार अन्न धान्य लाभ घेता येत नाही त्यातच मोठा घोटाळा म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब. २००५ साली दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे करण्यात आला होता तो कोणाच्याही घरापर्यंत न जाता. मोठे शेतकरी. व्यापारी. उद्योगपती. नेत्यांचे बगलबच्चे. चार पाच मजली इमारत असणारे. असे लोक दारिद्र्य रेषेखाली घालण्यात आले कोणी केला  सर्वे. माहित नाही ? अधिकारी कोण होता माहित नाही ? केवळ शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी यांचें नाव दारिद्र्य रेषेखाली घेण्यात आले महिला बचत गट अट दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य पण त्यात एक ते दोनच महिला दारिद्र्य रेषेखालील असतांत नाव दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गट. रेशनकार्ड घोटाळ्या संदर्भात किंवा माझ नाव दारिद्र्य रेषेखाली का नाही ? विचारणा केली असता असे तुमचे नाव बसतं नाही ? सर्वे केला आणि त्यात ह्या जीवनावश्यक वस्तू असलेमुळे आपण अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे असे सांगितले जाते म्हणजे केवढी मोठी पळवाट आहे विचार करण्याची गरज आहे

(८) शासकीय पत्र व्यवहार

निवेदन.  तक्रार अर्ज.  मागणी अर्ज.  स्मरण पत्र.  इशारा पत्र.  आंदोलन पत्र.  महसूल विभाग कडे करण्यात आलेला पत्र व्यवहार.   पुरवठा विभाग.   ग्रामपंचायत.  जिल्हा परिषद.  पंचायत समिती.   जिल्हा अधिकारी.  नगरपरिषद.   महानगरपालिका.    आरोग्य विभाग.  बांधकाम विभाग.  संजय गांधी निराधार.  अपंग कल्याण योजना.  अशा विविध ठिकाणी आपण आपल्या विविध मागण्यासाठी सर्रास पत्र व्यवहार करतो आणि आपल्या पत्र्याच्या उत्तराची वाट पाहतो पण आज कोणत्याही पत्र्याची. एक दोन नव्हे. पाच दहा वर्षे आपणास उत्तरे दिली जात नाहीत आपण विचारणा केली असता अशी पळवाट काढली जाते कि तो संदर्भ आमच्या ऑफिसशी संबंधित नसल्यामुळे चौकशी साठी पुढे पाठवण्यात आला आहे तुम्ही वाट बघा अन्यथा सदर आॅफिस बरोबर संपर्क करा ही सर्वात मोठी पळवाट आहे कारणं. आपण केलेला पत्र व्यवहार हा समजा.  नगरपरिषद येथे आपण पत्र व्यवहार केला आहे आणि त्यावर पत्ता जर जिल्हा अधिकारी सांगली यांचा असेल किंवा माहिती साठी प्रत असा उल्लेख असेल तर तो पत्र व्यवहार सदर आॅफिसला पाठविणे हे संबंधित कार्यालयाचे कर्तव्य आहे पण सर्रास पळवाट काढली जाते विचार करण्याची गरज आहे

      अशी प्रत्त्येक ठिकाणी आपणास पळवाट काढून उत्तरे दिली जातात आत्ता आपण सतर्क होण्याची गरज आहे 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

ओबीसी जनगणना काळाची गरज...

आपण जाब विचारु शकतो का ?...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

एम आय एम विद्यार्थी राहुरी कारखाना अध्यक्ष पदी साहिल पठाण तर उपाध्यक्ष पदी संजय सांगळे - AIMIM Rahuri...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या