डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

        मूलभूत हककासंबधीचया तरतुदीवर सर्वात मोठा गहजब करण्यात आला आहे १३! वया कलमास अनेक अपवाद ठेवून मूलभूत हक्कांचा गाभाच खाण्यात आला आहे. अशी टीका करण्यात येते. टिकाकाराना वाटते की मूलभूत हक्क हे अनिर्बंध असल्याशिवाय मूलभूत होऊ शकत नाही. याबाबत ते अमेरिकेच्या घटनेचा आधार घेतात. असे म्हणले जाते की अमेरिकेच्या बिल आॅफ राईट्स मध्ये असलेल्या हक्कांवर बंधने नसल्यामुळे ते खरया अर्थाने मूलभूत आहेत. ही टीका गैरसमजुती वर आधारलेली आहे. असे म्हणताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दुःख होते. मूलभूत हक्क व सामान्य हक्क यामध्ये फरक दर्शविताना जी टीका केली जाते ती रास्त नाही. मूलभूत हक्क हे अनिर्बंध हक्क आहेत असे म्हणणे बरोबर नाही. मूलभूत हक्क व इतर सामान्य हक्क यातील खरा फरक असा आहे की सामान्य हक्क हे करार मदाराने प्राप्त होतात तर मूलभूत हक्क राष्ट्राचा कृपेने मिळतात यामुळे त्या हक्कांवर राष्ट्रांस निर्बंध ठेवता येत नाही

            अमेरिकेतील मूलभूत हक्क अनिर्बंध स्वरूपाचे आहेत असे म्हणणे चुकीचे आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे परिशीलन केल्यास हे सहज दिसून येईल घटना मसुद्यातील कलम १३ समर्थनार्थ सुप्रीम कोर्टाचा एक निकाल उद्धृत केल्यास भरपूर कल्पना येईल. गिटलो विरुद्ध न्युयॉर्क या खटल्यात. गुन्हेगारांची अराजकता या कायद्याचा सनदशीर बद्दलचा प्रश्न उद्भवला होता. हिंसेचा प्रकार करणार्या वरील कायद्यान्वये शिक्षा ठरलेली आहे त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हणते

        घटनेनुसार दिलेल्या भाषणं स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य हे अनिर्बंध पणे भाषणं करण्याचा अथवा बेजबाबदार प्रकाशन प्रसिद्ध करण्याचा परवाना होऊ शकत नाही. फार दिवसांपासून हे तत्व प्रस्थापित झालेले आहे भाषण स्वातंत्र्य दुरूपयोग करण्याचे व दुरूपयोगामुळे ओढविणार या शिक्षेपासून संरक्षण मिळण्याचे लाईन्स हे मूलभूत हक्क देऊ शकत नाही 

          यास्तव अमेरिकेतील मूलभूत हक्क अनिर्बंध आहेत व मसुद्यातील हक्क निर्बंध आहेत हे म्हणणे चुकीचे आहे

          असा युक्तिवाद केला जातो की जर मूलभूत हक्कांवर काही बंधने ठेवावयाची असतील तर खुद्द ती घटनेचेच ठेवावीत परंतु घटना अशी बंधने ठेवणार नसेल तर परस्थिती नुसार ती बंधने ठेवण्याचे कार्य न्यायालयाकडे सोपवावे या युक्तिवादास अमेरिकन घटनेचा आधार घेतला जातो. अमेरिकन घटनेचा हा विपर्यास आहे असे मला वाटते अमेरिकन घटनेत असे काही एक नाही सभा संमेलनात एकत्रित येणयासंबधी हक्का खेरीज कोणत्याच मूलभूत हक्कांवर खुद्द घटनेने बंधने टाकलेली नाहीत त्याचप्रमाणे मूलभूत हक्कांवर निर्बंध ने. ठेवण्यास न्यायालयाला मोकळीक ठेवली आहे. हे म्हणणेही बरोबर नाही. ही बंधने टाकण्याचा अधिकार कांग्रेसचा म्हणजे विधिमंडळाचा आहे. अमेरिकन घटनेत ज्या वेळी प्रथमच मूलभूत हक्क समाविष्ट केले त्या वेळी ते अनिर्बंध होतें. लवकरच अमेरिकेनं कांग्रेसला हे दिसून आले की मूलभूत हक्कांवर मर्यादा ठेवणें अत्यावश्यक आहे. अशा मर्यादा टाकणे हे कितपत सनदशीर आहे हे ठरविण्याचे प्रश्न ज्या वेळी सुप्रीम कोर्टापुढे आला त्या वेळी असा युक्तिवाद करण्यात आला की मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार घटनेने कांग्रेसला दिलेला नाही त्यावेळी बंदोबस्ताचया अधिकारांचे नवे तत्व सुप्रीम कोर्टाने शोधून काढले व अनिर्बंध मूलभूत हक्कांचा पुरस्कार करणारे म्हणणे हाणून पाडले सुप्रीम कोर्टाचे म्हणणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात पुढीलप्रमाणे मांडले आहे

        जे कोणी भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन जनतेची नितीमत्ता खराब करतील जनतेच्या कल्याणाच्या आड येतील गुन्हेगारी उत्तेजन देतील अगर शांततेचा भंग करतील त्यांना शासन करण्याचा अधिकार राष्ट्रास आहे राज्याच्या बंदोबस्तासाठी सुप्रीम कोर्टास हा अधिकार वापरावा लागत असून याबद्दल कोणास आक्षेप घेता येणार नाही

             घटना मसुद्यात हा मार्ग पत्करलेला नाही मूलभूत हक्क अनिर्बंध ठेवून सुप्रीम कोर्टाकडे धावणयाऐवजी थेट हिदसरकार यांनाच नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे एकूण अमेरिकन घटनेत तसेच सदर मसुद्यात मूलभूत हक्क अनिर्बंध नाहीत

        मूलभूत हक्कांचा जोडून मार्गदर्शक तत्वे समिविषट केली आहेत. पार्लमेंट री लोकशाहीसाठी तयार केलेल्या घटनेतील हे अभिनव वैशिष्ट्य आहे. अशा तर्हेचे वैशिष्ट्य फक्त आयरिश सटेटचया घटनेत सापडू शकेल मार्गदर्शनाच्या तत्वावर देखील टीका झालेली आहे असे म्हणण्यात येतं की ही तत्वे म्हणजे केवळ सदिच्छा आहेत त्यांच्या पाठिमागे सत्ता नाही ही टीका अर्थहीन आहे

       मार्गदर्शनाच्या तत्वावर कायदेशीर अधिकार नाही असे कोणी म्हणत असल्यास ते मी मान्य करतो परंतु त्यांना कसलाच अधिकार नाही हे मी कबूल करणार नाही ब्रिटिश सरकार आपल्या साम्राज्यातील वसाहतीतीचया गव्हर्नर जनरल व गव्हर्नरांना ज्याप्रमाणे आदेशपत्र देत असेल त्याप्रमाणे या मार्गदर्शक तत्त्वांची योजना आहे हिंदूंच्या प्रेसिडेंटला व गव्हर्नरांना उधेशून ही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत एका विशिष्ट पक्षास सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदची घटना तयार केलेला नाही सत्ता कोणाच्या हाती असावी हे जनताच ठरवेवील मात्र राज्य करतयानी लोकशाहीच्या कसोट्यांवर उतरले पाहिजे याचा अर्थ असा की जे कोणी सत्ताधारी बनतील त्यांना आपल्या लहरीप्रमाणे ति वापरता येणार नाही राज्यसत्ता वापरतांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन त्यांनी केले पाहिजे राज्यकर्ते यांच्या हातून या तत्वाचा भंग झाल्यास त्याबद्दलचा जाब त्यांना कोर्टापुढे द्यावा लागणार नाही हे खरे तथापि मतदारांपुढे त्याचा जाब द्यावाच लागेल ज्या वेळी खरया लोककल्याणाचा पक्ष राजसत्ता काबीज करण्याची धडपड करील त्या वेळी या तत्वाचे महत्व कळून येईल

      मार्गदर्शनाच्या तत्वामागे कोणतीही शक्ति नाही म्हणून त्यांचा समावेश घटनेत करु नये असे म्हणणे रास्त नाही घटनेमध्ये कोणते स्थान त्यांना द्यावे याबाबत फारतर मतभेद होतील. ज्या कलमांच्या पाठिमागे शक्ति नाही त्यांची अडचण घटनेमध्ये करून ठेवणे बरे नव्हे हे मी कबूल करतो

        काही टीकाकार म्हणतात केंद्र सरकार भलतेच मजबूत आहे तर काहीजण बोलतात सरकार यापेक्षाही दणकट झाले पाहिजे आमच्या मसुद्यात दोहोंचा मध्य साधला आहे केंद्र सरकार यांना अधिक सत्ता असू नये असे तुम्ही कितीही म्हणाला तरी सरकार बळकट झाल्याशिवाय राहणार नाही आधुनिक जगातील परिस्थिति अशी आहे की केंद्र सरकार बलवत्तर अपरिहार्य आहे. अमेरिकेच्या फेडरल सरकारची वृद्धि कशी झाली हे आपण लक्षात ठेवणयाजोगे आहे. घटनेनुसार अमेरिकन फेडरल सरकारला मर्यादित अधिकार होते. तरिपण सरकारने आपले पूर्वीचे क्षेत्र एवढे वाढविले आहे की त्यामुळे घटक राज्ये गिळांकृत झालेली आहेत हल्लीच्या परिस्थितीचा हा परिणाम आहे. हिंद सरकार वर देखील नव्या परिस्थितीचा परिणाम होऊन ते अधिक अधिक भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या या प्रवृततीस आपण आळा घातला पाहिजे. त्यांचे वजन व शक्ति समसमान राहीली पाहिजे. नाहि तर जास्त वजनामुळे ते कोलमडून पडण्याचा प्रसंग यावयाचा

          केंद्र सरकार आणि प्रांत यांचें एक प्रकारचें व केंद्र सरकार आणि संस्थाने यांचें दुसरया प्रकारचें घटनात्मक संबंध ठेवलाबधदल आमच्या मसुद्यावर टीका केली जाते. संस्थांनानी हिंद सरकारच्या सर्व खात्याचा स्विकार करावा. अशी त्यांच्यावर सकति नाही परराष्ट्र संबंध. संरक्षण. दळणवळण. एवढ्या खात्या पुरती सकति आहे. कंकरट लिसटही स्विकारण्याची सकति संस्थांना वर नाही सवताची घटना समिती बोलावून त्यांना आपापली घटना तयार करण्याचे स्वातंत्र्य आहे. असे स्वातंत्र्य असणे दुर्दैवी व. असमर्थनीय गोष्ट आहे. या गोष्टी मुळे खुद्द संस्थानाच्या प्रगतीला धोका पोहोचेल. केंद्र सरकारला आपली सत्ता सर्व ठिकाणी सारखी वापरता येणार नाही. अशी सत्ता असून नसल्यासारखी आहे. युद्धजन्य काळात या घोटाळ्यामुळे राष्ट्रांवर कठिण प्रसंग गुदरलयाशिवाय राहणार नाही. यातून अंत्यंत अनिष्ट गोष्ट ही की संसथानाना आपले सैन्य ठेवण्याची मुभा घटना मसुद्यात अन्वये ठेवलेली आहे. ही तरतुद अंत्यंत प्रतिगामी व धोकेबाज असून त्यामुळे हिंदचे तुकडे होतील आणि केंद्र सरकार उखडले जाईल असे मला वाटते. मसुदा कमिटीचे संस्थांना संबंधीत तरतूद मोठ्या आनंदाने लिहिली आहे. अशातला भाग नाही. प्रांत व संस्थाने यांचें केंद्र सरकारशी असणारे घटनात्मक संबंध सुसूत्रता असावी. आशी मसुदा कमिटीची फार इच्छा होती. दुर्दैव असे की याबाबतीत कमिटीस काहीच सुधारणा करता आली नाही

      घटना मसुद्याचा पहिल्या कलमात हिंदचे वर्णन. युनियन आॅफ स्टेटस. राजयसंघ असे केले आहे त्यासंबंधी काहीजण टीका करतात फेडरेशन ऑफ स्टेटस असे हिंदचे वर्णन असावयास पाहिजे असे त्यांचे म्हणणे पडते एकतंत्री राज्यपद्धती असलेल्या दक्षिण आफ्रिकन राज्याचे वर्णन युनियन म्हणून केले आहे. हे खरे आहे. पण कॅनडाचे फेडरेशन असूनही त्यास युनियन म्हणूनच संबोधण्यात येते तेव्हा हिंदचे वर्णन युनियन म्हणून केल्याचे भाषेच्या संप्रदायास काही बाधा येते असे नव्हे. युनियन हा शब्द बुध्दी पुरसकर वापरलेला आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. कॅनडा या घटनेत युनियन हा शब्द का वापरला आहे हे मी सांगू शकतो. मसुदा कमिटीस ही गोष्ट स्पष्ट करावयाची होती की हिंद सरकार हे फेडरल असले तरी प्रांतीय राज्याचा करार मदारामुळे ते स्थापन झालेले नाही. अर्थात कोणत्याही प्रांतीय सरकारास हिंदपासून फुटून निघण्याचा अधिकार नाही. जरी कारभाराविषयी सोयीसाठी देशांचे विभाग पाडले असले तरी देश एक. लोक एक आणि घटनाही एकच आहे. घटक राज्यांना फेडरल सरकारातून फुटून निघण्याचा अधिकार नाही हे प्रस्थापित करण्याकरिता अमेरिकेनं लोकांना यादवी युद्ध खेळावे लागले. यास्तव वरील गोष्ट निर्विवाद पणे कळावी मसुदा कमिटीने युनियन शब्दांची योजना केली आहे

            घटनेतील दुरुस्ती विषयक जी कलमे आहेत त्यावरही कडाडून टीका करण्यात आलेली आहे घटनेत दुरुस्ती घडवून आणणे कठीण आहे कसे म्हटले जाते. काही वर्षांपर्यंत तरी घटनेत साध्या मूजाॅरिटीने दुरुस्ती करता यावी. असेही सुचविण्यात आले आहे. सांप्रतची घटना समिती पौढ मतदान द्वारे निवडणून येणार्या भावी लोकसभेत तो अधिकार नाकारला आहे. अशीही टीका झालेली आहे या टीकाना कोणताही आधार नाही असे मी स्पष्ट पणे म्हणतो अमेरिकेनं व आॅसटेलिया घटनांकडे पाहिल्यास हे दिसून येईल की हिंद घटनेत दुरुस्ती घडवून आणणे सोपे आहे जनमताचा कौल वैगैरेसारखी पध्दती घटना मसुद्यात ठेवलेली नाही केंद्र व प्रांतीय विधिमंडळाच्या हाती घटना दुरुस्ती सत्ता ठेवलेली आहे केवळ दोनच बाबतीत प्रांतीय विधिमंडळाच्या संमतीची अट ठेवलेली आहे घटनेतील बाकी दुरुस्ती लोकसभाच करणार आहे दुरुस्ती संबंधीत एकच अट आहे आणि ती ही की प्रत्येक सभागृहातील हजर असलेल्या व मत देणार या सदस्यांच्या २/३ संख्येने आणि एकूण सदस्यांच्या बहुसंख्येने ही करावी यापेक्षा सोपी पध्दती शोधून काढणे कठीण आहे

              सध्याची घटना समिती व भावी लोकसभा यांच्या दर्जा तील फरक लक्षात न घेतल्यास बराच गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या घटना समितीस पक्षपाती हेतू नाहीत ब-यापैकी व कार्यक्षम घटना बनविणयापलिकडे तिला काही साधवायचे नाही. एखादे विशिष्ट बिल पास करून घ्यावयाचे आहे या हेतूने घटनेचे कोणतेही कलम लिहिलेले नाही भावी लोकसभा घटनेमध्ये दुरुस्ती करणारं असेल तर पक्षीय दृष्टी राहीलं एखादे बिल पास करण्याच्या हेतूनेच भावी लोकसभेतील एखाद्या पक्ष घटनेत दुरुस्ती मागेल अशा पध्दतीने असेल तर सध्याच्या घटना समितीस तसा काहीच पक्षीय हेतू नाही 

      मार्गदर्शक तत्त्वांतून भविष्यात भारतीय समाज अर्थव्यवस्था कशी असावी याचे चित्र रेखाटले आहे. या आदर्शाची उभारणी करण्यासाठी सरकारने झटावे अशी अपेक्षा केली आहे. गेल्या चार दशकातील अनुभवात असे प्रयत्न करताना व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो असे लक्षात आले आहे. या दोन्हीत संतुलन राखण्याचा प्रयत्न घटना दुरुस्तीतून व न्यायालयीन निवाडयातून केलेला दिसतो. तथापि मार्गदर्शक तत्वाच्या दिशेने झालेली प्रगती लक्षणीय नाही. आदर्श लोककल्याणकारी राज्य फार दूरवर आहे

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

हरवलेल्या ज्योतीचा भेटली कुटुंबाला - manavseva Project

 

आयुष्याची नवी वाट...
हरवलेल्या ज्योतीची 'मानवसेवा' मुळे घडली कुटुंबाची भेट


हिंगोली येथील ३० वर्षीय 'ज्योती' मानसिक संतुलन बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावली होती. मानसिक आजारामुळे समाजात तिच्याविषयी एक भीती निर्माण झाल्याची बातमी होती, काही लोकांनी तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवले. बंद खोलीच्या खिडकीतून तिला जेवण पाणी देत होते.

सदर महिलेची माहिती अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाला मिळाली. संस्थेचे कार्यकर्ते सुशांत गायकवाड, अविनाश पिंपळे, पुजा मुठे, सुरेखा केदार, सरीता गोडे यांनी या महिलेची बंद खोलीतून सुटका करीत संस्थेच्या *'मानवसेवा प्रकल्पात'* दि.२३/१०/२०२१ रोजी दाखल केले. ज्योती हिच्यावर मानसोपचार तज्ञ डॉ अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिची मानवसेवा प्रकल्पात काळजी घेवून संरक्षण दिले. संस्थेच्या समुपदेशक पुजा मुठे यांनी ज्योतीचे उपचार पूर्ण करुन समुपदेशनात माहिती घेऊन कुटुंब शोधले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पाने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन दि.१२/०१/२०२२ रोजी ज्योतीला सन्मानाने कुटुंबाच्या ताब्यात देवून पुनर्वसन केले. ज्योतीला तिचे मुले आणि कुटुंब मिळताच अश्रू अनावर झाले. 

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प* 

(मन आणि घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎️ (०२४१) २४२९९४२

📱९०११७७२२३३

अन्यथा न्यायालयात जाणार - डॉ परवेज अशरफी

अन्यथा न्यायालयात जाणार - डॉ परवेज अशरफी

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी व शासकीय कार्यालयात आणि विद्यालय, महाविद्यालय, रेशन दुकानात सरकारी आदेश असल्याचे भासून लसीकरण सक्तीचा करत आहे. या अनुषंगाने एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांना लसीकरण सक्तीचा करता येणार नसल्याचे विविध उच्च न्यायालयाचे आदेश व भारत सरकारचे आरोग्य व परिवार मंत्रालयाचे लेखी पत्राचे हवाले देत लसीकरण सक्तीचा करू नाहीत. अशी विनंती केली. परंतु मा. जिल्हाधिकारी यांनी लसीकरण सक्तीचा करणार नसल्याचे परंतु शासकीय कार्यालयात लसीकरण नसेल तर प्रवेश देणार नसल्याचे सांगितले.

त्या मुळे खासगी कर्यालात्यात, विद्यालय, महाविद्यालयात, राशन दुकान, महामार्ग, येथे शासकीय अधिकारी लसीकरण बाबत विचारणा करीत, त्यांना लसीकरण घ्या नाहीतर दुकान उघडता येणार नाही. विद्यालयात व महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. असे सांगत आहे, यामुळे सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. शासकीय कार्यालय हे सामान्य जनते साठीच असते त्यालाच इंग्रजी मध्ये "It is for the people and by the people" जर शासकीय कार्यालयात जनतेला परवानगी नसेल तर त्या कार्यालयाचा उपयोग काय? असा प्रश्न एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित केला. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी घटने विरोधातला आदेश मागे घेणे व सामान्य जनतेचा मानसिक छळ थांबवण्याची विनंती केली आहे. सामान्य जनतेचे मौलिक अधिकाराचे हणन होत असेल तर मा. जिल्हाधिकारी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

मुस्लिम आणि आरक्षण

 



मुस्लिम आणि आरक्षण   आरक्षण

            स्वातंत्र्यानंतर धर्मातील व्यवस्थेच्या पुरस्कार करणाऱ्या राज्यकर्ते यांनी मुस्लिमांसाठी वेगळा शरियत कायदा चालू ठेवून समान नागरी कायदा होऊ दिला नाही. हिंदू कोड बिल मंजूर झाले. सर्वांना फौजदारी कायदा लागू आहे. पण सर्वांना समान नागरी कायदा लागू करण्याचे प्रयत्न एक गठ्ठा मतांसाठी केले नाही. निवडणूका आल्या की मुस्लिम समाजांचे एक गठ्ठा मतदान असल्यामुळे सर्व पक्षाना सर्व राजकीय नेत्यांना पुढारी यांना मुस्लिम समाजाची प्रकरक्षाने आठवण होते मग अल्पसंख्याक नावाखाली मुस्लिम समाजातील युवकांच्या गावापासून जिल्ह्यापर्यंत पदाधिकारी निवडी चालू होतात. आणि आमचा स्वाभिमानी. सन्मान प्रिय. हुजूरि. न करणारा मुस्लिम समाजातील युवक एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधले जातात. मग निवडणूक असते आमचे युवक आपल्यावर सर्व पक्षाच भार आहे नेता एक दोन वेळा युवकांच्या खांद्यावर हात ठेवला की युवक जीवतोड काम करतो. आश्वासन असते निवडणूक झाली की मुस्लिम आरक्षणाचे आंदोलन उभे करु. सर्वांना मुस्लिम आरक्षण मिळवून देतो. आणि एक वेळ निवडणूक पार पडली की आरक्षण पदाधिकारी वार्यावर जातात. आपल्याला कळणार केव्हा ? मुस्लिम समाजातील एक ही व्यक्ति क्लास वन अधिकारी. कोणत्याही शासकीय आॅफिस मध्ये आमचा गोल टोपीचा अधिकार मी तरी बघितला नाही. तुम्ही बघितला आहे का? 

            मुस्लिम समाजाला. आरक्षण द्या कारण आपला समाज भटक्या विमुक्त जाती मध्ये मोडतो असे म्हणणारे. यांना समाजाबद्दल काय माहित आहे का. ? मुस्लिम समाजाचा प्रसार करण्यासाठी आपले धर्मगुरू मौहंमद पैगंबर. यांना भटकंती करावी लागली. तर मुस्लिम धर्माचे धर्मगुरू भटकंती करत होते म्हणजे आमची पार्श्वभूमी आम्ही भटके आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही का ? पण कोणताही धर्मग्रंथ आपले समाजांचे वागणे राहणे. चालीरीती हे सिद्ध होते पण तुम्ही भटके आहात हे सिद्ध होत नाही. याचा अर्थ असा होतो की आणि तसा उल्लेख आढळतो पण तो पुरावा होऊ शकतं नाही. मुस्लिम भटके आहेत यासाठी. कारणं धर्मग्रंथ हा समाजाचा पुरावा होऊ शकतो का नाही हे मला माहीत नाही. आज आपण म्हणतो आमचें पूर्वज अडाणी गरजू होते पोटासाठी हे गाव ते गाव फिरत होते. त्यांना शिक्षण कसले ते माहीत नव्हते. त्यावेळी. कुठला कागद. कुठली शाळा. अस्तित्वात होती का नाही काय माहित ? आमच्या पूर्वजांना काय माहित होते एक काळ असा येईल की तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात हे सिद्ध करावे लागेल. पूर्वज अडाणी असल्यामुळे कोणताही १९६७ चा पुरावा आज जातीचा दाखला घेण्यासाठी पुरावा नसल्यामुळे. आमच्या मुलांना. शिक्षण सवलत नाही. नोकरी सवलत नाही. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नाही. म्हणजे योजना हजार आहेत पण त्यात सर्वात मोठा साप घालून ठेवला आहे तो म्हणजे जातीचा दाखला. म्हणजे योजना चालू केले की सर्वसामान्य माणसाच्या मुलांना मिळतच नाही. मुस्लिम समाजाने आज आरक्षण मुद्दा घेण्यापेक्षा. जातीच्या दाखल्यावर उठाव करण्याची गरज आहे. जाचक अटी रद्द करा यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आपली संख्या जास्त आहे त्यामुळे आपली ताकद कोणताही झेंडा न घेता उभी करण्याची गरज आहे सर्वसामान्य माणूस रस्त्यावर कोणताही झेंडा न घेता उतरला पाहिजे त्याशिवाय बदल होणार नाही. नाहीतर मुस्लिम समाजातील मुल नाही नोकरी मग घाल चिकन दुकान. गवंडयाचया हाताखाली जा. भंगार दुकान. गाड्या खरेदी विक्री. कपडे व्यवसाय. असे विविध उद्योग करतानाच दिसणार आणि आपले जीवन कष्टात. दबावात गेले. दहशतीत. हिंदू मुस्लिम. यातच पिसत राहणार आणि मुस्लिम समाजाचा कोणताही मुलगा अधिकार होणार नाही. बंद आंदोलन मोर्चा उपोषण निवेदन. आपल्या समाजाच्या ताकदिवर करा. कारणं सर्वात मोठी ताकद ही समाजाची आहे. तुम्हाला उठवून बसविणारे यांना तरी अल्पसंख्याक म्हणजे काय हे माहित आहे का ? असेल तर त्याची खरी माहिती मुस्लिम समाजाला द्या. मुद्दे आत्ता गरजेचे असतील तरच उठाव करून आपली ताकद दाखवा. संविधानात असणारी खरी माहिती समाजा पर्यंत पोहचवा. 

              राज्यकर्त्यांनी मतांसाठी मुस्लिम अल्पसंख्याक यांचेकडे अधिक लक्ष दिले. हा हिंदू वर अन्याय नाही का अशी हिंदूत्व वादी यांनी तक्रार केली आहे. धर्मनिरपेक्षता प्रतयक्षता नाही. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला असला तरी समान नागरी कायदया अभावी ही व्यवस्था निर्थक आहे घटनेत ४४ क्रमांकाच्या कलम ह्यासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून घटनाकारांनी समाविष्ट केलेले आहे पण ते केवळ शोभेचे तत्व म्हणूनच राहिले आहे.  

             मुस्लिम सुधारणावादाकडे दुर्लक्ष राज्यकर्ते सुधारणांबाबत हिंदूंच्या बाबतीत जेवढे आग्रही आहेत. तेवढे ते मुसलिमाबाबत नाहीत. असा प्रचार करण्यासाठी हिंदू राष्ट्रवादी प्रचारक यशस्वी ठरले. काही प्रश्नांवर सरकारने धरसोड भूमिका घेतली त्यामुळे हिंदू राष्ट्रवाद याना. प्रचारास संधी मिळत आहे. 

         देशनिषठा. देशातील बहुसंख्य मुस्लिमांची निष्ठा भारतावर नसून पाकिस्तान वर आहे अशी समाजात मुस्लिम धर्माबाबत अफवा केली आहे ज्यांना पाकिस्तान वर निष्ठा आहे त्यांनी तिकडेच स्थलांतर करावे असा आक्रमक प्रचार हिंदू जातीयवादी करीत आहेत

         मुस्लिम संख्या राज्यकर्ते यांनी कुटुंब नियोजन बाबत मुस्लिम धोरण शिथिल ठेवले आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हा हिंदू वर अन्याय आहे. त्यामुळे भविष्यात हिंदू हे एक दिवस अल्पसंख्याक होतील काय अशी भीती त्यांच्या मनात आहे 

      मुस्लिम धार्जिणे धोरणे देशातील हिंदूंच्या. काही मंदिरांवर मुस्लिमांनी आक्रमण करून कब्जा घेऊन मशिदी उभारल्या आहेत. त्यांचा पाडाव करून पाकिस्तान धार्जिण मुस्लिमांना धडा शिकवावा असा प्रचार होत आहे 

      स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष व्यवस्थेचा पुरस्कार केला पण समान नागरी कायदा यातून अल्पसंख्याक यांना वगळून त्यांचे धार्मिक कायदे चालू ठेवले. ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम समाज हा आजही अल्पसंख्याक समाज आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आजही त्यांचे प्रमाण ११/ टक्के एवढेच आहे. हया समाजाबद्दल राज्यकर्ते यांची भूमिका लवचिक आहे. १९८७ मध्ये शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा पोटगी संबंधित निवाडा धुडकावून सरकारने कायद्यात दुरुस्ती करून मुस्लिम महिलांना पोटगीचा हक्क नाकारला होता. अनेक पुरोगामी मुसलमानानी ह्या सरकारी पावित्र्याचा कडाडून विरोध केला होता. ह्यातून हिंदूत्व वादी यांना काहीसे अनुकूल वातावरण मिळाले. ह्या वातावरणाचा फायदा घेऊन समस्त हिंदूत्व वादी. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था मोडीत काढायला निघाले. आहेत. बाबरी मशीद सारखा नाजूक प्रश्न. साहसवादी भूमिका घेवून हिंदूत्व वादी. संघटनांनी भारताची न्याय व्यवस्था. व संसदीय व्यवस्था अमान्य केली. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीदचे संरक्षण करण्यात आपली कर्तव्ये विन्मुख हि हिंदू समाजाची सर्वोच्च सेवा असून त्यासाठी आपणं सत्ता गमावली. हौतात्म्य प्राप्त झाले असे समर्थन केले गेले. साहसवाधयाचे केवळ धर्मनिरपेक्ष व्यवस्थेला आव्हान नसून ते न्यायव्यवस्थेला आहे. हेच स्पष्ट होते. बाबरी मशीद पाडावानंतर सरकारने काही मुस्लिम वादी व हिंदूत्व वादी. संघटनांवर बंदी घातली होती परंतु बाहरी लवादाने काही संघटना वरील बंदी अवैध ठरविल्याने त्यांना मोकळीक लाभली आहे. एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत हिंदूत्व वादी. संघटनांचे आव्हान वाढतं असून ते पुढेही वाढत जाईल. अशी स्थिती दिसते. अर्थात ह्या आवहानाचे उद्रेक मधून मधून दिसतील. 

            मुस्लिम समाजाच्या मनात मानसिक भयाची छाया उमटलेली दिसते. धर्मनिरपेक्ष हे सुद्धा त्यांना हिंदू जमातवादी प्रमाणे थोंताड वाटते. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म व सनातन मूल्य बुडविणे असून त्याद्वारे आपली धार्मिक ओळख संपुष्टात येईल. अशी त्यांची समजूत करून देण्यात आलेली आहे. मुस्लिमांचा धर्मनिरपेक्षतेला होणारा निर्थक विरोध लक्षात घेऊन हिंदू जमातवादी त्याला प्रतिउत्तर म्हणून त्याचं मार्गाने बहुसंख्याकाना धर्माच्या नावाखाली संघटन करणे चालू केले आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पत्नी अपत्ये आणि आई बाप निर्वाह आदेश



पत्नी अपत्ये आणि आई बाप निर्वाह आदेश 

                  आज धावपळीच्या जीवनात माणसाच्या आयुष्याला वाहनांची गती प्राप्त झाली आहे. माणूस वेळ नाही फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी धावत आहे. यांतच नवरा बायको एकामेकाना वेळ न देणें मुलांना वेळ न देणें. वयोवृद्ध आई वडील यांना सुध्दा सांभाळणे आजच्या काळात मुलांना जड झाले आहे त्यामुळे पती पत्नी यामधील वाद टोकाला जातो आणि घटस्फोट घेण्यापर्यंत हा निर्णय जातो त्यात हाल होते ते म्हणजे मुलांचे मग न्यायालयात मुलांचा ताबा मिळविण्यासाठी तक्रार दाखल केली जाते न्यायालय दिल तो निकाल समोर असणारे फिर्यादी यांना मानावाच लागतो आणि जर मुलांचा ताबा मुलांच्या आई कडे आला तर ती महिला न्यायालयात सवतासाठी पोटगी व मुलांच्या पालनपोषण साठी धाव घेते आणि कायद्याने तशी तरतूद सुध्दा आहे मग त्या मुलांचा बाप त्या महिलेचा पती नोकरदार असो अथवा कोणीही त्याला न्यायालय आदेशानुसार सर्व मान्य करावे लागते. आत्ता सर्वात मोठा विषय राहतो तो म्हणजे आपल्या आशा अपेक्षा इच्छा आकांक्षा आणि आपल्या पोटाला चिमटा घेऊन जपलेल्या आई वडिलांचा कारणं जो पर्यंत मुल काही करू शकत नाहीत तो पर्यंत आई वडील यांनाच त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळावे लागते आणि एक वेळ अशी येते की आई वडील म्हातारे होतात त्यांना संभाळणे मुलांना जड होते कारणं काय तर वाढती महागाई रहाण्याचा मोठा प्रश्न  अशी फसवी कारणें काढून म्हातारे आई वडील यांना सांभाळण्यास आजची पिढी नकार देत आहे बायकोचे नातेवाईक चालतात पण पतीचे आई वडील आजच्या मुलींना चालत नाहीत मग अशा वयोवृद्ध लोकांना घरातच परकयाप्रमाणे अगदी हिन वागणूक दिली जाते नाहीतर शेवटचा पर्याय म्हणून वृध्दाश्रमात सोडले जाते अशा बर्याच घटना आपण रोज बघतो वाचतो. आसा प्रकार वेळोवेळी होतो असे शासनाच्या ध्यानात आल्यावर शासनाने  श्रावण बाळ योजना.  संजय गांधी निराधार योजना. अशा विविध योजना राबविल्या आणि त्याच जोडीला अशा तक्रारी निकालात काढण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनला तसा अधिकार दिला आहे. जो मुलगाच आपल्या आई वडील पत्नी मुल यांचा संभाळ करू शकत नाही त्याला आई वडील यांच्या प्रापटीत हिस्सा मागण्याचा अधिकार नाही असे आदेश शासन देते 

          फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व २५ जानेवारी १९७४ चा अधिनियम क्रमांक २  यानुसार ३० जानेवारी १९९७ रोजी यथाविधयमान फौजदारी प्रक्रिया संबंधीत कायदा संकलित व विशोधित करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराजयाचया चैविसावया वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियम व कायदे. आई बाप पत्नी मुल यांचा संभाळ करण्यासाठी विशेष तरतूद करून ठेवली आहे त्यानुसार त्यांचे पालन व जनसंपर्क जनप्रबोधन जनजागृती करण्याचे काम आमचें पोलिस बांधव नित्याने करत असतात 

* पुरेशी ऐपत असताना सुध्दा कोणत्याही व्यक्तिने

* स्वताच्या उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या पत्नीचा अथवा

* स्वताच्या निर्वाह करण्यास असमर्थ असलेला आपल्या औरस किंवा अनौरस आज्ञान अपत्य मग ते विवाहित असो वा अविवाहित असो

* तिचे सज्ञान झालेले औरस अनौरस अपत्य म्हणजे विवाहित मुलगी नव्हे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक असामान्य ते मुळे किंवा क्षतीमुळे सवताचा निर्वाह असमर्थ असेल असे अपत्य

* स्वताच्या निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या बापाचा किंवा आईचा निर्वाह करण्याबाबत उपेक्षा केली किंवा तो करण्यास नकार दिला तर अशी उपेक्षा किंवा नकार शाबीत झाल्यावर प्रथम दंडाधिकारी अशा व्यक्तिने आपल्या पत्नीचा अथवा अशा अपत्याचा अथवा बापाचा किंवा आईचा निर्वाह करीता अशा दंडाधिकारी यांना योग्य वाटेल त्या पण मिळून जास्ती जास्त पाचशे एवढ्या मासिक दराने भत्ता द्यावा आणि दंडाधिकारी वेळोवेळी निर्देशित करील त्याप्रमाणे तिनें तो प्रदान करावा असा त्याला आदेश दंडाधिकारी देतील

 ‌.        परंतु खंड ( ख ) मध्ये निर्देशित केलेली अज्ञान मुलगी विवाहित असल्यास तिच्या पतीकडे पुरेशी ऐपत नाही अशी जर दंडाधिकारी यांना खात्री झाली तर अशी अज्ञान मुलगी सज्ञान होईपर्यंत तिच्या बापाने तिला असा भत्ता द्यावा असा आदेश दंडाधिकारी देतील

* अज्ञान याचा अर्थ जी व्यक्ती भारतीय सज्ञानता अधिनियम १८७५( १८७५ चा ९) यांच्या उपबंदधाखाली सज्ञान झालेली नसल्याचे मानलें जाते ती व्यक्ती

* पत्नी. या संज्ञेचा अर्थ जिला पत्नीने घटस्फोट दिलेला असून किंवा जिने त्यांच्यापासून घटस्फोट मिळविलेला असून पुनर्विवाह केलेला नाही अशा महिलांचा समावेश आहे

* असा भत्ता आदेशाचा या. दिनांकापासून किंवा तसा आदेश दिला गेल्यास निर्वाह करीता केलेला अर्जाच्या दिनांकापासून प्रदेय असेल

* जर याप्रमाणे आदेश देण्यात आलेली कोणतीही व्यक्ती पुरेसं   कारण नसताना आदेशांचे अनुपालन करण्यास चुकली तर असा कोणताही दंडाधिकारी आदेशाचा प्रत्येक भंगाबधदल देय असलेली रक्कम वसूल करण्यासाठी द्रवयदंड वसुल करण्याच्या बाबतीत उपबंधित केलेल्या रीतीने वारंट काढू शकेल. आणि वाॅऱटचया अंमलबजावणी नंतर प्रत्येक महिन्याच्या संपूर्ण भत्ता किंवा तिचा कोणताही भाग द्यावयाचा राहिल्यास त्याबद्दल एक महिन्यापर्यंत किंवा तत्पूर्वी भरणा झाल्यास तो होऊ पर्यंत अशा व्यक्तिला कारावासाची शिक्षा होऊ शकेल

              परंतु या कलमाखाली देय असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी ती ज्या दिनांकापासून देय त्या दिनांकापासून एक वर्षाचा कालावधीत अशी रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आल्या शिवाय कोणतेही वाॅरट काढलें जात नाही

           परंतु आणखी असे की आपल्या पत्नीने आपल्याबरोबर रहावे या शरतीवर तिचा निर्वाह करण्याची तयारी अशा व्यक्तिने दाखविली आणि तिने त्या व्यक्ती बरोबर राहण्यास नकार दिला तर अशा दंडाधिकारी यांना तिने दिलेली नकाराची कोणतीही कारणें विचारांत घेता येतील आणि अशी तयारी असली तरीही या कलमाखाली आदेश काढण्यास न्याय कारणं आहे अशी त्याची खात्री झाली तर त्याला तसे करता येईल 

       जर पतीने अन्य महिलेशी विवाह केला असेल किंवा रखेल ठेवली असेल तर त्याच्या पत्नीने त्याचबरोबर राहण्यास नकार देण्यास ते न्याय कारण आहे असे मानले जाईल

* कोणतीही विवाहित महिला परगमनी जीवन जगत असेल किंवा कोणतेही पुरेसे कारणं नसताना ती आपल्या पतीबरोबर राहण्यास नकार देत असेल किंवा ते परस्पर संमतीने विभक्त राहतं असतील तर या कलमाखाली आपल्या पतीकडून भत्ता मिळण्यास ती हक्कदार असणारं नाही

* जिच्या बाजूने या कलमाखाली आदेश देण्यात आला असेल अशी कोणतीही विवाहित महिला परगमनी जीवन जगत आहे किंवा आपल्या पतीबरोबर राहण्यास ती पुरेसं कारण नसताना नकार देत आहे किंवा परस्पर संमतीने विभक्त राहतं आहेत हे शाबीत झाल्यावर दंडाधिकारी आदेश रद्द करण्याचा अधिकार आहे

* कलम १२५ खालील कार्यवाही कशी आणि कोणत्या व्यक्तिबाबत आहे

* ती व्यक्ती जेथे असेल किंवा

* जेथे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तिची पत्नी राहतं असेल

* जेथे ती व्यक्ती आपल्या पतनीबरोबर किंवा प्रकरणपरतवे   अनौरस अपत्याच्या आईबरोबर निकटपूरव राहिली असेल अशा कोणत्याही जिल्ह्यात करता येईल

* अशा कार्यवाही तील सर्व पुरावा निर्वाह खर्च देण्याचा आदेश ज्या वयकतिविरुधद देण्याची सूचना असेल तिच्या समक्ष अथवा तिची जातीनिशी हजेरी अनावश्यक करण्यात आली असेल तर तिच्या वकिलांच्या समक्ष घेतला जाईल आणि तो समन्स खटल्यासाठी विहित केलेल्या रीतीने नोंदविला जाईल

        परंतु निर्वाह खर्च देण्याचा आदेश ज्या व्यक्तिच्या विरुद्ध देण्याची सूचना असेल ती व्यक्ती बजावणी बुध्दी पुरस्कर टाळत आहे किंवा न्यायालयांत हजर राहण्याबाबत बुध्दी पुरसकर दुर्लक्ष करीत आहे अशी दंडाधिकारी यांची खात्री झाली तर दंडाधिकारी यांना एकतर्फी निकाल व कार्यवाही करता येईल. आणि याप्रमाणे दिलेला आदेश कोणताही आदेश त्यांच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत करण्यात आलेल्या अर्जांवरून दंडाधिकारी सबळ कारण दाखविण्यात आल्यावर विरुद्ध पक्ष काराला वादखरच देण्याबाबत अटि धरून न्याय उचित वाटतिल अशा अटिचा अधिनतेने रद्द ठरविता येईल

* कलम १२५ खाली दिलेल्या अरजानुसार खालील काम पार पडते

* कलम १२५ खाली मासिक भत्ता मिळणे किंवा त्याच कलमाखाली प्रकरण परतवे आपल्या पत्नीला अपत्याला बापाला किंवा आईला मासिक भत्ता देण्याचे आदेश मिळालेल्या कोणत्याही व्यक्तिच्या परिस्थितीत बदल झाल्याचे शाबीत झाल्यावर दंडाधिकारी यांना योग्य वाटेल त्या प्रमाणे भत्ता कमी अधिक करता

* जर त्याने भत्ता वाढविला तर त्याचा मासिक दर सगळा मिळून पाचशे रुपये हून अधिक असणार नाही

* जेथे सक्षम दिवाणी न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम म्हणून कलम १२५ खाली केलेला कोणताही आदेश रद्द करावा किंवा त्यात बदल करावा असे दंडाधिकारी यांना वाटल्यास तेथे तदनुसार त्याला आदेश रद्द करता येईल किंवा प्रकरणं परतवे त्यात बदल करता येईल

*ज्या महिलेला आपल्या पतीने घटस्फोट दिला आहे किंवा जिने त्यांच्यापासून घटस्फोट मिळविला आहे तिच्या बाजूने कलमं १२५ खाली कोणताही आदेश काढण्यात आला असेल तेव्हा जर दंडाधिकारी यांची खात्री झाली तर

* घटस्फोटाच्या दिनांकापासून त्या महिलेने पुन्हा विवाह केला आहे तर तो तिच्या पुनर्विवाह दिनांकी व तेव्हापासून असा तेव्हापासून असा आदेश रद्द करण्यात येतो

* त्या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिला असून त्या पक्षकारांना लागू असलेल्या रूढी प्रमाणे किंवा वयकतिविषयक कायद्या अन्वये अशा घटस्फोट नंतर प्रदेय होणारी संपूर्ण रक्कम तिला मिळालेली आहे मग ती सदर आदेशा पूर्वी आसो वा नंतर असो तर तो दिला जातो

* असा आदेश काढण्यापूर्वी अशी रक्कम दिलेली असल्यास त्या बाबतीत असा आदेश काढल्याच्या दिनांकापासून

* अन्य कोणत्याही बाबतीत पतीने त्या महिलेला प्रतक्षात काही काळापुरता निर्वाह खर्च दिला असल्यास तो कालावधी संपल्याचा दिनांकापासून

* निर्वाह खर्चाच्या आदेशांची एक प्रत जिच्या बाजूने तो आदेश काढण्यात आला त्या व्यक्तिला निर्वाह खर्चाच्या किंवा तिचा कोणी पालक असल्यास त्याला किंवा ज्या व्यक्तिला भत्ता द्यावयाचा आहे तिला विनाशुल्क दिली जाईल कोणताही दंडाधिकारी ज्या व्यक्तिच्या विरुद्ध तो आदेश देण्यात आला ती जेथे असेल अशा कोणत्याही अंमलबजावणी स्थळी अशा दंडाधिकारी यांना पक्षाची ओळख पटल्यावर व देय भत्ता दिलेला नसल्याची खात्री झाल्यावर अशा आदेशांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे

            आजच आशी कोणतीही माहिती आपणांस मिळाली तर त्या आई बाप पत्नी मुल यांची कोठेही पतीकडून मुलांकडून हेळसांड होणारें पिढीत असतील तर त्यांना जवळच्या पोलिस स्टेशनला भेट देवून विरो़धात तक्रार करण्याचा सल्ला द्यावा

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी

९८९०८२५८५९

पाचही बोट तुपात

 

पाचही बोट तुपात

       .     सर्वांना आरोग्य सेवा हे ध्येय सध्या सर्व स्तरांवर गाठण्याचा प्रयत्न शासन करत आहे मात्र त्या दिशेने कोणतीही सापेक्ष वाटचाल होताना आज दिसतं नाही त्याला सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील खाजगीकरण मग ते विमा कंपन्या खाजगी दवाखाने यांना समान कमिशन बेसवर दिल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय योजना राबविण्याचा अधिकार यामुळे आज वैद्यकीय सेवा अडचणीत अणि सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला न परवडणारा झाला आहे  2018 चया बजेट प्रमाणे जाहीर करण्यात आलेली भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजे नफेखोर विमा कंपन्या यांचें उकळ पांढरे करणारी सरकारी पैशांचा अकार्यक्षम वापर करणारी धुळफेक योजना आहे. सरकारी दवाखाने यांची क्षमता वाढविण्यासाठी सरकार प्राधान्याने पैसा वापरत नाही त्याऐवजी उच्च तंत्रज्ञान असणार्या खाजगी दवाखान्यातूकडून काही ठराविक सेवा या योजने अंतर्गत सरकार विकत घेऊन त्या गोरगरीब जनतेला विकत घेऊन त्या गोरगरीब जनतेला उपलब्ध करून देत आहे अशा धोरणामुळे सरकारी सेवा. दवाखाने सुधारण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा उरत नाही. त्यामुळे सरकारी केंद्रातील मिळणारी सेवा दिवसेंदिवस आटत आणि अपुरी पडत चालली आहे त्यामुळे गोरगरीब जनता सर्वसामान्य माणस खाजगी दवाखान्याकडे वळली आहेत 

           भारतीयांना गरजेप्रमाणे दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा पुरविणे ही व्यवस्था उभी करणे शक्य आहे हे निरनिराळ्या तज्ञांनी ठोसपणे मांडले आहे त्यानुसार येत्या दहा वर्षांत हे ध्येय गाठण्यासाठी कालबद्ध धोरण आखणे गरजेचे आहे आणि ते अमलात आणण्यासाठी (१) आरोग्यावर येणार्या खर्चात १००/टक्के वाढ करा (२) सरकारी आरोग्य सेवेत आमुलाग्र सुधारणा आणि अभूतपूर्व वाढ करणे गरजेचे आहे (३) खाजगी सेवेचे नियमन प्रामाणिकपणे करुन प्रामाणिक सेवेसाठी प्रामाणिक दर या तत्वावर सरकारी खाजगी सेवा गरजेप्रमाणे विकत घेऊन मोफत देण्याचे धोरण घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण. औषधं उत्पादन. वैद्यकीय तपासणी यातील नफखोरी बंद करायची आज नितांत गरज आहे

              आपणं २०२० कोरोना काळ सर्वांनी अनुभवला आहे. त्यावेळी आपण सर्वांनी डॉ यांनी व मेडिकल यांनी कोरोना ग्रस्त असो वा अन्य आजाराने म्हणजे. बी पी.  शुगर. सर्दी पडस. मलेरिया काविळ हिवताप डेंग्यू हाडांचे आजार पोटाचे विकार.  अशा विविध आजाराने ग्रस्त असणारे लोक यांना डॉ लोकांनी कोणतीही तपासणी केली नाही मग आजार विकार न तपासणी करता औषधे पेशंटचया अंगावर टाकणे तोंडाला मास्क असेल तरच दवाखान्यात उपचार. सॅनिटायझर. हॅणगोलज असल्यास उपचार नाहीतर दवाखान्यात प्रवेश सुध्दा दिला नाही. काही वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा  असे मानणारे यांनी चक्क दवाखानयाला कुलप घातली आणि तुमच्या जीवाशी खेळ केला. बी पी   शुगर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना रोज घेण्यासाठी औषध सुध्दा मिळाले नाही.  किडणी प्रामबलम असणारे पेशंट यांना डायलसीस करावे लागते कोरोना काळात दवाखान्यात बेड फुल्ल झाले त्यामुळे अशा रोग्यांना अक्षरशः आपला जीव गमवावा लागला. कोण जबाबदार. करोना काळात येणारा खर्च गोरगरीब जनतेला परवडणारा नाही त्यामुळे शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना कोरोना काळात  दिड लाखांपर्यंत उपचार करण्यासाठी मोफत केली आणि गजब प्रकार उघडकीस आला जशी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यात हजारो कोरोना बाधित रुग्ण सापडायला सुरुवात झाली. दवाखान्यात बेड शिल्लक नाही. आॅकिसजन कमतरता. डॉ नर्स यांची कमतरता. अशा विविध प्रश्नांनी डोक वर काढलं. कोरोना बाधित रुग्ण मरण्याची संख्या डबल होण्यास सुरुवात झाली मयताना जाळण्यासाठी स्मशानभूमी मध्ये जागा कमी पडायला लागली.  अर्धवट जळलेली प्रेताचे लचके कुत्री तोडायला लागली. लोकांच्या मनात आपण मरणार आपण आता जगत नाही अशा विविध विचाराने घर केलं. यावेळी डॉ लोकांनी योजनेचे दिड लाख सोडून दोन अडीच लाख कोरोना पेशंटचे दवाखान्याचे बिल केल औषधे कोरोना काळात वापरले जाणारे औषधांचे कीट आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार त्याची किंमत ७५० रूपये होती पण घाबरलेल्या जनतेला तेच कोरोना काळात विलगिकरण अथवा उपचारा दरम्यान वापरलेल्या औषधांची किंमत ७५०० रूपये लावण्यात आली होती. पेशंट ला लागणारी औषधे डॉक्टरांच्या मेडीकल मध्येचं घेण बंधनकारक करण्यात आले होते. कोणतीही डॉ जेनरिक औषध लिहून देत नव्हता जेनरिक औषध आणण्यासाठी सांगतं नव्हते म्हणजे औषध कंपन्या यांचें कमिशन वेगळ मेडिकल वाले यांचें कमिशन वेगळ अशी लुट करण्यात आली. कोरोना पेशंट जवळ कोण नाही काय उपचार केल माहीत नाही  पेशंटला कोणत औषधं दिल माहिती नाही. पेशंट जीवंत आहे का मयताचे बील चालू आहे माहीत नाही. मनमानी कारभार पडद्याच्या मागे चालू होता आपल्या जिल्ह्यात जे कोणतेही दवाखाने धर्मादाय अंतर्गत उपचार करतात ते सोडून ठराविक नामांकित व्यक्ती यांचेच दवाखाने कोविड सेंटर म्हणून निवडले गेले मग काय सरकार यांच शासकीय प्रशासन यांच मग दवाखान्याचे बील यांचेच 

            हिंदी मध्ये एक म्हण आहे. # आम के आम गुठलियोंके दाम # ही म्हण येथे डॉ यांच्याबाबतीत खरी झालेली आपणांस दिसते कारण पेशंट जीवंत आहे तोपर्यंत औषधांचा आणि त्यांचे काॅट भाडे. योजनेचे पैसे आणि कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तिला दवाखान्या पासून स्मशानभूमी पर्यंत आणण्यासाठी   एक किलोमीटर अंतराचे भाडे  ३००० कोरोना काळात मयत झालेला व्यक्तिला लपेटून पीपी किट यामध्ये घालण्यासाठी २८०० रूपये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व सेवा देणारी सर्व शिषटम डॉ यांचीच होती म्हणजे चारी बाजूंनी जनतेला सरकारला लुटणारे सर्वात मोठें परके चोर नव्हते तर आपल्यातीलच होतें 

          कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला गोरगरीब माणसाला मदत करणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना अखेर शासनाने बंद केली आणि आपले मुख्यमंत्री यांनी दवाखाने यांच्या मनमानी कारभाराला चाफ बसावा म्हणून दवाखान्याच्या उपचार पद्धती नुसार उपचार दर निश्चित केले आणि मग काय अचानकपणे मोठा बदल झाला तो म्हणजे जागोजागी हजारो पटींनी सापडणारे कोरोना पेशंट अचानक कमी झाले कधी कोराना काळात कायम फुल्ल असणारे दवाखाने मोकळे पडले स्मशानभूमी मोकळी झाली. अॅमबुलनस धक्क्याला लागल्या. प्रेत जाळणारी यांचं काम आणि ठेका गेला आणि मग आमच्या ध्यानात आले काय आहे गौडबंगाल म्हणजे जो पर्यंत योजना होती जोपर्यंत मनमानी बील आकारता येत होते तोपर्यंत डॉ व इतर मेडिकल वाले व यांच्यावर अवलंबून असणारे सर्व लोक यांची पाची बोटं तुपात होती आत्ता पेशंट गेल कुठ 

      ‌.    यासाठी शासनाने हे अवलंबण्याची गरज आहे त्याशिवाय डॉ मनमानी कारभार बंद होणार नाही आणि मजल्यावर मजले कोट्यावधी रुपयांची बेनामी मालमत्ता गोळा होणार नाही यासाठी (१) महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेवेच्या हक्काचा कायदा करावा (२) सरकारी आरोग्य खर्चात हनुमान उडी घेण्याची गरज आहे (३) विविध उपाययोजना करून आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे आहे (४) सरकारी केंद्रासाठी औषध खरेदी व वितरण प्रणाली अमलात आणणे आवश्यक आहे (५) आरोग्य मनुष्यबळ धोरण म्हणजे कंत्राटीकरण बंद करणे आवश्यक आहे (६) बिगर आॅलोपथिक उपचार पद्धती मधील दुजा भाव देणे बंद करा (७) महाराष्ट्रात धर्मादाय रूग्णालयात गरिब व कमकुवत थरातील रुग्णांसाठी २०/ टक्के खाटा राखीव ठेवण्याचे बंधन ठेवा (८) महिला आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या (९) सरकारी आरोग्य यंत्रणा आर्थिक दृष्ट्या बळकट करण्याची गरज आहे (१०) आरोग्य योजना कारभार भ्रष्टाचार मुक्त होणे गरजेचे आहे (११) राज्य जन आरोग्य परिषद व जन संपर्क. आरोग्य समिती नेमणे आवश्यक आहे (१२) राज्य आणि जिल्हा स्तरावर आरोग्य सभा असणे गरजेचे आहे (१३) राज्य जन आरोग्य परिषदेमध्ये समाजसेवक स्वयंसेवी संस्था आरोग्य क्षेत्रातील तज्ञ असतील हे पाहणे महत्त्वाचे आहे 

        निसर्ग सुध्दा डॉ लोकांच्या बाजूने आहे कारणं वेळोवेळी वातावरणांत होणारा बदल. अवेळी पाऊस अवेळी कडाक्याची थंडी अवेळी पडणारे आग ओकणारे ऊन यामुळे माणसाचे शरीर साथ देत नाही लोक मोठ्या प्रमाणात विविध शारीरिक आजाराने ग्रस्त आहेत त्यांना दवाखान्यात जाण्या खेरिज पर्याय उरला नाही आज आपल्या गावात तालुका जिल्हा शहर यामध्ये दवाखान्या पुढे आजारी लोकांची रांग लागली आहे मनमानी फि मनमानी औषध दर मग काय लुटच लुटच चालू आहे कोण चाफ लावणार आहे का ? प्रश्न मोठा आहे. त्यातच तरूण पिढी बेरोजगारी शासकीय भरती नाही हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आणि त्यातच निसर्गाचा विविध रोगांच्या माध्यमांमधून घाला यामुळे पूर्णपणे मानसिक विकलांग झाले आहेत शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर येणारी पिढी मतिमंद आणि गुलामच तयार होणार आहे त्याची सुरुवात झाली आहे ती म्हणजे आॅनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विचार करा आत्ता नाही तर कधीच नाही 

  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जगा आणि जगू द्या



जगा आणि जगू द्या

       ‌‌ माणसाने माणसाशी कसे वागल पाहिजे हे शिकविण्याचे काम मानवाधिकार आयोग करत असतो. आणि ही मानवधिकाराची सर्वाधिक उत्तम आशय असणारी व्याख्या आहे. कोणत्याही ठिकाणी जर माणूस माणसाशी माणूस म्हणून वागत नसेल तर त्याठिकाणी मानवधिकाराचे हनन होते. हे आपल्या ध्यानात पकके येते. जगा आणि जगू द्या हे मानवाधिकाराचे मानवी मुल्य आहे मानवाधिकार कार्यकर्ते यांनी ही बाब कायम ध्यानात ठेवण्याची आज गरज आहे. समाजातील इतर व्यक्ती जशा सन्माने जातात किंवा आपणांस जर सन्माने जगाव अस वाटत तर समाजातील इतर घटकांना सुध्दा सन्माने जगण्याचा अधिकार आहे. असे थोडे विस्ताराने आपण सर्वांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. आज आपणं बघतो आपल्या आजूबाजूला सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला महिला वंचित घटक यांना आपले दैनंदिन जीवन जगत असताना मानवीय अडथळे बरेच येत आहेत. म्हणजे राजकारणी दबाव. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मानसिक त्रास आर्थिक लुट लुबाडणूक अशी विविध प्रकरणे यासाठी लढा उभा करणे म्हणजे माणसाच्या अधिकारासाठी कोणताही पक्षपाती पणा न करता धावून जाणे होय यासाठी मानवाधिकार आयोगाचे कार्यकर्ते यांचे परम कर्तव्य आहे

              माणवी हक्काच्या रक्षणासाठी व मानवीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी व संवर्धन हे कार्य करणार्या कार्यकर्ते यांना मानवी हकक या संकल्पनेचा प्राथमिक परिचय व्हावा यासाठी कार्यकर्ते यांचें मार्गदर्शन शिबिर घेणे गरजेचे आहे यामुळे बर्याच सोप्या आणि सुलभ पद्धतीने मानवाधिकार समजणे सोप होईल 

* मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा संयुक्त राष्ट्रे १९४८

* भारतीय संविधान आणि मानवाधिकार यांचा संबंध

* राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोग यांचेकडे तक्रार कशी आणि कोठे करावी

* मानवाधिकार व पोलीसांची भूमिका

* भारतीय संविधानाच्या दृष्टिकोन यातून नागरिकांची कर्तव्ये 

       या पाच महत्वाच्या गोष्टी कार्यकर्ते यांना समजावून घेणे सोप होईल त्यामुळे त्यांना मानवाधिकार आयोगाचे काम करताना कोणतीही अडचण येणार नाही मानवाधिकार कार्यकर्ते यांना आपले मानवाधिकाराचे काम किती व्यापक व सखोल आहे याची जाणीव होण्यास मदत होईल

          माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत पर्यंत म्हणजेच बालक. स्त्रिया. कामगार. श्रमिक. शेतकरी. शेतमजूर. भूमीहीन सामाजिक न्यायापासून वंचित असणारे घटक. अनुसूचित जाती जमाती. तसेच आदिवासी व भटके. अल्पसंख्याक. अल्पभाषीक आणि साधन संपत्तीपासून वंचित असणारे लोक यांना अन्न वस्त्र निवारा शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक आर्थिक या गरजा पूर्ण होण्याचा हक्क तसेच रोजगाराचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे अशी संविधानिक तरतूद आहे. जे जनतेचे हक्क व अधिकार आहेत ते जनतेच्या पदरांत पडलेच पाहीजेत यासाठी लढा उभा करण्यासाठी एकमेव माध्यम आहे ते म्हणजे मानवाधिकार गुंडगिरी. अवैध धंदे दहशतवादी कायदेभंगातील दोषी व्यक्तिला कायदेशीर तरतुदी प्रमाणे कायद्यानुसार व प्रशासन यंत्रणा माध्यमातून योग्य ते शासन झालेच पाहिजे हे अगदी खरे आहे पण आज वाढत असलेला राजकीय दबाव. वाढती गुन्हेगारी अपराधी व्यक्तिचे ही दंडशकतिकडून मानवीय अधिकाराचे हनन झालेच नाही पाहिजे. इतका मानवाधिकार कार्यकर्ते व जनतेच्या मनात व्याप्ती व्यापक झाली पाहिजे. आणि मुळात हे सर्व मानवाधिकार कार्यकर्ते यांना कळले पाहिजे 

    ‌. समाजात नेहमी सबल घटक दुर्बल घटकातील लोकांचे शोषण करतात यातच मानवी हक्कांचे सुरवातीला हनन होते मग व्यक्तिची प्रतिष्ठा बळी दिली जाते. माणसांचे हक्क आणि प्रतिष्ठा नाकारली की व्यक्ती गुलाम होतो आणि मग गुलामाचे आर्थिक सामाजिक व राजकीय असे चारी बाजूंनी शोषण केले जाते आणि ते सोपे होऊन जाते. मानव अधिकारांची लढाई लढताना फक्त अधिकारावरच भर देऊन चालणारं नाही त्यामुळे आपण आपले मानवीय कर्तव्य विसरलो तर अधिकारांची लढाई कधीचं जिकंता येणार नाही त्यामुळे मानव अधिकार कार्यकर्ते यांनी व्यक्ति म्हणून एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य जबाबदारी पूर्ण केली पाहिजे व्यक्तिचे कर्तव्य आणि अधिकार हया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

          आज रेशन घोटाळा.बोगस कामगार नोंदणी घोटाळा. आर्थिक विकास महामंडळ कर्ज वितरण करताना होणारा नाहक त्रास. शासकीय अधिकारी व कागदपत्रे पूर्ण असून सुद्धा पैशासाठी कामांत हालगरजी पणा. जळीत प्रकरणं पंचनामा होणारा उशीर सापेक्ष पंचनामा न होणे. आत्महत्या. बलात्कार छेडछाड प्रकरणांत सदर पोलिस स्टेशनला तक्रार घेण्यास टाळाटाळ. कामगारांना होणारी माराहान. दैनंदिन जीवनात लागणार्या वस्तूंचे भाव निश्चित करणेबाबत. दवाखान्यात डॉ यांचेकडून आकारले जाणारे बेमाफी बील. औषधांच्या मनमानी किंमती अशा विविध समस्यांविषयी तुम्ही कोणतीही मनात भीती न बाळगता आमच्याकडे तक्रार करू शकता तुमचा मुद्दा बरोबर असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु 

      तक्रार लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे

   ‌‌. समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पुस्तक रस्त्यावर चप्पल शोरूममध्ये

 

पुस्तक रस्त्यावर चप्पल शोरूममध्ये 

                   आपला पहिला गुरू पुस्तकच असते आपल्याला सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक वैयक्तिक वैद्यकीय शालेय सर्व शैक्षणिक क्षेत्रात न्यायालयीन आपल्याला जगाचा आरसा दाखविणारे पुस्तकच असते. माणसाला चांगलं जगणं चांगलं बोलणं उच्च राहणीमान आपल्याला कळण यासाठी पुस्तक गरजेचे आहे

          रामायण. महाभारत. बायबल. कुराण ज्ञानेश्वरी अशी समाजाला पाप पुण्य याची महती सांगणारी समाजसेवक क्रांतिकारक सेनानी असे बरेच समाजसेवक यांची आपणांस ओळख करून देणारी. गावाचा शहरांचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा इतिहास त्यामधील नविन गोष्टी जगासमोर आणण्यासाठी लिहण गरजेचे आहे त्यामुळे आपल्या आत्ताच्या पिढीला कळत या गावात देशात काय होतें 

       ‌. आज आपली वाचनातील गोडी कमी झाली कारण आज मोबाईल फोन ट्विटर फेसबुक ई-मेल हाॅटसाप अश्या माध्यमांमुळे लोक मोबाईल वर अडकून पडली. रांत्र दिवस लोक मोबाईल वर बसायला लागली. भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी माझा इंडिया डिजिटल इंडिया झाला पाहिजे यासाठी कॅमपुटर. इंटरनेट मोबाईल अशी उत्पादने तयार करण्यात आली. आज याचा वापर चांगल्या कामासाठी कमी आणि वाईट कामासाठी जास्त होण्यास सुरुवात झाली 

               आज ग्रंथालय र्हास होण्यास सुरुवात झाली आहे आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये ग्रंथालय असतें ते एका जुन्या घरांत त्याचे छप्पर पाऊसाळयात गळत आणि त्यातील काही काही पुस्तकावरील धुळ सुध्दा झाडली जातं नाही ग्रंथालय लाईट नाही असेल तर वाचता येणयापुरतीच वाचायला येणारी यांची संख्या बोटावर मोजता येईल एवढी. ग्रंथालयात जुनी नवीन पौराणिक ऐतिहासिक कथा आत्मचरित्र अशी बरीच दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळतात पण आज लोकांना याबद्दल जागृत करण्याची गरज आहे आपण बघतो आज रस्त्यावर सेल लावून जमिनींवर ठेवून पुस्तके विक्रीसाठी ठेवली जातात म्हणजे जगाला आधार जीवन मंत्र देणारी पुस्तके आज रस्त्यावर आली आहेत केवढी मोठी शोकांतिका आहे

      आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य आपण बाजारपेठेत बघतो लाखों रुपये खर्च करून टोलेजंग चप्पल शोरुम असतें. आतील फर्निचर लाख रुपये असतं. लाईट म्हणाला की पाचसे ते हजार वॅट चे बल लावून सर्वच झगमगाट असतो किती मोठी तफावत आहे. ज्ञानाचा प्रचार प्रसार प्रसिध्दी करणारे आज रस्त्यावर आले आणि चप्पल शोरूममध्ये सजविलेले जाते चप्पल किंमत १०० पासून १० हजारांच्या वर सुद्धा असेल म्हणजे अशा आणि एवढया महाग चपपलचीजागा सुध्दा तशीच पाहिजे पण ज्ञानाचा दिवा लावणारे रस्त्यावर

           आजचं आपणं मनांत ठाणून ठरवून आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये शाळांमध्ये जिथे जिथे ग्रंथालय आहे तेथें ग्रंथालयांचे पुनर्भरण करण्याची गरज आहे आपला वेळ आणि थोडा पैसा या ग्रंथालयासाठी खर्च करण्याची गरज आहे 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार आत्ता संस्था पतसंस्था बॅंका सर्व आर्थिक वित्तीय संस्था यांना दाखल करता येणार आहे

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

टांगती तलवार

 

*# टांगती तलवार *#

             पूर्वी लोक गरिब होती पैसा कमी होता एकामेकाची गरज काढण्यासाठी वस्तू अदलाबदल केली जात असे. त्याला कोणतेही व्याज नाही कोणताही फायदा मिळविण्याचा उदेश नाही. एकामेकाची गरज काढणे हेच महत्वाचे होतें. 

          आज परस्थिती बदलली. अवेळी अवकाळी पडणारा पाऊस. टोळधाड. कोरोना सारखे संकटं यामुळे शेतीच्या मालाला कवडीमोल भाव लागत आहे त्यामुळे शेतकरी शेताची मशागत नांगरणी. पेरणी. बी बियाणे खते याचे सरकार लावत असलेले मनमानी दर शेतातून येणारे उत्पन्न कमी शेतीसाठी कर्ज काढायचे तर जिल्ह्यातील राष्ट्रिय कृत सहकारी संस्था पतसंस्था बॅंका शेतकरी वर्गाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. काही जणांची कर्जे थकित असतांत यामुळे काही बॅंका सर्वसामान्य माणसाला शेतकरी यांना दारात सुध्दा उभे करत नाहीत. सरकारी आणि सहकारी बॅंकांकडून कर्जासाठी त्यांच्या विविध नियम अटी शर्ती आहेत. विविध कागदपत्रे गोळा करावी लागतात. त्याशिवाय अनेक वेळा फेर्या माराव्या लागतात. यातून संबंधित व्यक्ती यांना पैसै मिळत नाहीत त्यामुळे   मात्र याउलट मोठं शेतकरी बडयांना मात्र अशा बॅंका.  राजकीय वशीला लावून तात्काळ कर्ज उपलब्ध होते मग नाईलाजाने शेतकरी यांना खाजगी सावरकरांच्या पाशात अडकाव लागते. 

            आपण रोज एक तरी बातमी वाचतो दूरदर्शन वर पाहतो की सावकारी कर्जाला कंटाळून सर्व कुटुंबाने विष पिऊन आत्महत्या केली. रोज एक शेतकरी सर्वसामान्य माणूस आत्महत्या करत आहे. त्याला जबाबदार आहे ते आर्थिक क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय कृत बॅंका कारणं यांना शासन आदेश असूनही ते कर्ज देत नाहीत. आपण बघतो खाजगी सावरकरांनी त्यात सुध्दा सरकार मान्य सावकारी करणारे सुध्दा सावरकर समाजात सोडले आहेत त्यात राजकीय नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुढारी यांचें बगलबच्चे सामिल आहेत एका बाजूने पैसा दुसरिकडने सत्ता म्हणजे गोरगरिबांना लुटायला कोणी परके आले नाहीत आपणच तयार केलेले आज आपले घरदार बायका पोर यांना विकायला सुध्दा माग बघणार नाहीत. नोंदणीकृत सावकाराकडून शेती कर्जास तारणवर शेकडा वार्षिक ९ ते १२ टक्के आणि बिगर शेती कर्जास १५ ते १८ टक्के वार्षिक व्याज आकारणी करावी असा नियम आहे.  आणि अशा नोंदणीकृत सावरकरांनी त्यांच्या हद्दीतील लोकांना कर्ज वितरण करावे.   पण खरोखरच तस घडत का? मात्र प्रत्यक्षात हे सावकार २०/२५ टक्के व्याज महिन्याला आकारतात एखाद्या महिन्याचे व्याज वेळेवर आले नाही तर महिन्याचे व्याज डबल घेतले जाते. नाहीतर दंड आकारणी केली जाते. नाहीतर सदर व्यक्तिला माराहान. डांबून ठेवणे. घर जागा गाडया लिहून घेण. वेळ पडल्यास बायकोची मागणी करणे मुलांना उचलून नेणे. असा अमानुष छळ केला जातो 

बेकायदेशीर सावकारी - कायदा

नव्या सावकारी कायद्याने बेकायदेशीर सावकारीला चाप

नव्या सावकारी कायद्याने बेकायदेशीर सावकारीला चाप

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली असून आता राज्यातील बेकायदेशीर वा अवैध सावकारीला निश्चितपणे लगाम बसेल, हे मात्र निश्चित.. या नव्या कायद्याविषयी थोडे..

नव्याने लागू केलेल्या महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार राज्यातील बेकायदेशीर वा अवैध सावकारीला निर्बंध घालण्यात आले असून परवानाधारक सावकारांसाठीही नवी नियमावली या अध्यादेशनुसार शासनाने निश्चित केली आहे. या सावकारी कायद्यातील प्रमुख बाबीमध्ये परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना पिकासाठी व शेतीसाठी कर्ज देताना त्यांची स्थावर मालमत्ता आता तारण घेता येणार नसून कर्जाच्या मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही. तारण व विनातारण कर्जासाठी शासनाने निश्चित केलेले व्याजदर आकारणे बंधनकारक आहे. तसेच दर तीन महिन्याला शेतकऱ्याला पावती देणेही बंधनकारक केले असून दरवर्षी सावकारी परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. 

या कायद्यानुसार खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरिक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे, या बाबी आढळल्यास कलम 41 अन्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद आणि 50 हजारपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच कोरी वचनचिठ्ठी, बंधपत्र किंवा इतर प्रकारची कागदपत्रे घेतल्याचे निदर्शनास आल्यास 3 वर्षापर्यंत कैद किंवा 25 हजार दंड यापैकी एक किंवा दोन्ही शिेक्षेची तरतूद या कायद्यात केली आहे.

सुधारित अध्यादेशातील महत्वाच्या तरतूदींची माहिती शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी संक्षिप्त माहिती पुस्तिका सहकार विभागामार्फत तयार करण्यात आली असून यामध्ये परवाना मिळविण्याची पद्धती, परवाना नाकारणे, आर्थिक वर्ष, परवाना रद्द करणे, निबंधकाचे तपासणीचे व न्यायालयीन अधिकार, सावकाराने बेकायदेशीररित्या बळकावलेली स्थावर मालमत्ता परत करणे, सावकारी व्यवसाय करीत असतांना कोरी कागदपत्रे न करणे, आवश्यक हिशेब पुस्तके, नोंदवह्या ठेवणे, व्याजदरावर बंधन, कर्जाचे अधिकार, दंड व शिक्षेची तरतूद, कर्जदारांस मिळणाऱ्या संरक्षणाचा समावेश आहे. 

महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत असून सहकारी पतपुरवठ्यातही राज्य देशात आघाडीवर आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्यास शासनाने प्राधान्य दिले असले तरीही काही अपरिहार्य कारणास्तव शेतकरी व शेतमजूरांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज भासते. अशा परीस्थितीत सावकारांकडून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून मुंबई सावकारी अधिनियम 1946 नुसार राज्यात सावकारी व्यवसायाचे नियमन करण्यात येत होते, मात्र या कायद्यातील तरतुदी पुरेशा व प्रभावी ठरत नसल्यामुळे सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक नियंत्रित करणे अडचणीचे होत होते. सावकारांनी अवैधरित्या कर्जदार शेतकऱ्यांची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारणे, यावर पुरेसे निर्बंध आणता येत नव्हते तसेच सावकारीतील गैरप्रकार उघडकीस आल्यास या अपराधापोटी लावली जाणारी शिक्षा अथवा दंड याबाबतची तरतूद सावकारांवर जरब बसण्याइतकी पुरेशी नव्हती. या सर्व बाबींचा विचार करुन शासनाने राज्यातील बेकायदेशीर सावकारीला चाप लावण्यासाठी आणि परवानाधारक सावकारांवर काही बंधणे घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश-2014 हा 16 जानेवारी 2014 पासून संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. 

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 नुसार परवानाधारक सावकाराना कांही अटी आणि नियम निश्चित केले असून परवाना मिळण्याची पद्धतही निश्चित केली आहे. यानुसार सावकारी व्यवसाय करण्यासाठी रीतसर अर्ज सहाय्यक निबंधकांकडे करणे बंधनकारक केले आहे. सावकारी परवान्याचा कालावधी आता 1 एप्रिल ते 31 मार्च असा राहील. या कायद्यानुसार निबंधकांना दिवाणी न्यायलयास असलेले न्यायिक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. 

सावकारांनी बेकायदेशीररीत्या बळकाविलेली स्थावर मालमत्ता परत करण्याच्या पद्धतीनुसार कोणत्याही वैध अथवा अवैध सावकाराने विक्री, गहाण, लीज, अदलाबदल किंवा कोणत्याही मार्गाने एखाद्या कर्जदाराची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली असेल, अशा कर्जदाराने जिल्हा निबंधकांकडे अर्ज केल्यास जिल्हा निबंधक अशा प्रकरणांची तपासणी करु शकतात. स्थावर मालमत्तेचे व्यवहार, बदलामध्ये झाले असल्यास असा दस्त जिल्हा निबंधक रद्द करु शकतात व ही मालमत्ता कर्जदार किंवा त्यांच्या वारसांच्या ताब्यात देण्याचे आदेश देऊ शकतात. परवानाधारक सावकारांनी केलेल्या सर्व व्यवहारांची हिशेब पुस्तके, नोंदवह्या ठेवणे त्यांच्यावर बंधनकारक असून अशा सावकारास कर्जदारांकडून मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही. तसेच व्याजावर व्याज लावता येणार नाही. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या व्याजदरानुसारच तारण व विनातारण कर्जव्यवहार करणे बंधकाराक राहील. तसेच कर्जदाराने मागणी केल्यास कर्जखाते उतारा सावकाराने देणे आवश्यक आहे. 

या नव्या सावकारी कायद्यानुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरीक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे या बाबी आढळल्यास पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपये दंडाची शिक्षा, हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद किंवा 50 हजारापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. कोरी वचन चिठ्ठी, बंधपत्र वा इतर प्रकारची कागदपत्रे घेतल्यास 3 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाची शिक्षा आहे. परवानाधारक सावकाराने सर्व आवश्यक अभिलेख न ठेवल्यास वा या तरतुदींचे पालन न केल्यास 25 हजार पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तर तरतुदीपेक्षा जास्त व्याज आकारणी केल्यास प्रथम अपराधास 25 हजारापर्यंत तर नंतरच्या अपराधास 50 हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. कर्जाच्या तरतुदीसाठी सावकाराने कर्जदाराचा विनयभंग, छळवणूक केल्यास 2 वर्षापर्यंत कैद किंवा 5 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

या कायद्यान्वये कर्जदारासही संरक्षण दिले असून कर्जदाराने सावकारांकडून घेतलेली रक्कम 15 हजारपेक्षा जास्त नसल्यास व कर्जदार हा स्वत: शेती करणारा असल्यास डिक्रीद्वारे ही रक्कम वसुली संदर्भात कर्जदारास अटक करता येणार नाही. शासनाकडून या कायद्याची अंमलबजाणी केली जात असली तरी शेतकऱ्यांनीही शक्यतो सहकारी संस्थाकडूनच कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे. अपरिहार्य कारणास्तव सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलीच तर सावकार परवानाधारक आहे, याची खात्री करावी. 

       सांगली   / वाळवा / मिरज / तासगाव /कडेगांव /विटा / पलूस/ शिराळा/आटपाडी /कवठेमहांकाळ/ जत/  अशा विविध तालुक्यात आज बाजारबुणगे कमी वेळात कमी श्रमात जास्त पैसा मिळविण्याच्या दृष्टीने सावकारी व्यवसाय करतांना दिसत आहेत. कोरोना काळात संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून आपण आर्थिक अडचणीत सापडलो आहोत याचा परिणाम गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर अशा घटकांवर झाला आहे. बहुतेकांना भिशी. कटटाभिशी.  खाजगी सावकार. बॅंक. पतसंस्था. पतपेढी. अशा विविध आर्थिक क्षेत्रातील समस्यांना सामोरे जावे लागले आहे त्यामुळे काहीजण खाजगी सावकाराकडे सरकले आहेत. आपल्या सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी ३६ तर चालू वर्षात २७ खाजगी सावकारावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून काहीजण अजून सुद्धा बाहेर आहेत. आपले कर्तव्य दक्ष पोलिस यांच्यामुळे आशा खाजगी सावकार की करणारे यांना चांगला चाफ लावला आहे 

          सर्वात मोठें संकटं सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक शेतकरी शेतमजूर यांच्यापुढे आ वासून उभे केले आहे ते म्हणजे सरकार मान्य सावकारी म्हणजे आपणच निवडून दिलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक आमदार खासदार मंत्री पुढारी नेते यांनी आपल काळा पैसा  बॅंक संस्था. पतसंस्था. सोसायट्या. यामधून आपले समाजाचे एक गठ्ठा मतदान टिकविण्यासाठी विविध मार्गाने वाटप करण्यास सुरुवात केली आहे. आज २०२० पासून कोरोना सारखे महाभयंकर संकटाने थैमान घातले होते लोक टाळेबंदी काळात घरातच अडकून पडले आहेत. लोकांच्या हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ज्या व्यक्तिच्या हाताला काम नाही कुटुंबाला कोरोना काळात पालनपोषण करू शकत नाही तो बॅंकेचे व अन्य आर्थिक संस्थांचे कर्जाचे हफ्ते कसे भरणार मोठ संकट आहे ना ? म्हणजे २०२० पासून आजपर्यंत ज्याच्या वाहन कर्ज. घर कर्ज. तारण कर्ज. सोनं गहाण.  खाजगी सावकार अशा विविध ठिकाणी एकही रूपया भरला नाही. आर्थिक संस्थांतील कोणी तुम्हाला कर्जासाठी विचारणा करायला आल नाही. शासनाचा आम्ही आदर करतो त्यामुळे कोरोना काळात तगादा लावून वसुली करत नाही असा होत नाही.  कारणं तुम्ही तुमच्या प्रापटया. बॅकेला कर्जासाठी लिहून दिल्या आहेत.  तुम्ही आज नाही भरल तरी या सरकार मान्य सावरकरांचे व्याज चालूच आहे. एक वेळ अशी येणार आहे की अशा सर्व वित्तीय संस्था आपल्या पोटाला चिमटा घेऊन मिळविलेल्या जागा. घर. सोनं. अन्य संपत्ती लिहून घेणार हे शंभर टक्के. यांना तुमच्याशी काही देण घेण नाही विषय आहे तो म्हणजे फक्त व्याजाचा

            म्हणूनच म्हणतो खाजगी आणि सरकारी सावरकर यांच्यापासून सावध राहा सरकार तुमच्या हिताचा कोणताही निर्णय घेणार नाही विचार सुध्दा करू नका

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

लसीकरण च्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक - डॉ परवेज अशरफी

 

लसीकरण च्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात व शहरात मा. जिल्हाधिकारी यांच्या इख्त्यारीत असलेल्या कार्यालया मार्फत असे तोंडी आदेश काढण्यात आले आहे की ज्या व्यक्तीने कोविड लस घेतली नाही त्या व्यक्तीला पगार मिळणार नाही, त्यंना सरकारी सुविधाचा लाभ घेता येणार नाही, त्याच बरोबर पेट्रोल पण मिळणार नाही. याचाच अर्थ सामान्य जनतेला लस घेण्यासाठी मजबूर किंवा सक्ती करण्याचा षड्यंत्र काही कार्यालय करीत असल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या माद्यमातून आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी माहितीच्या अधिकारात अशी माहिती दिली आहे की कोविड लस घेणे अनिवार्य नसून सावैच्छिक आहे. जनसूचना अधिकारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ यांनी RT-PCR TEST स्वैच्छिक असल्याची माहिती दिली आहे.

त्याच बरोबर मेघालय उच्च न्यायालय, शिलोंग, गुव्हाटी उच्च न्यायालय, गुजरात उच्च न्यायालय ,मणिपूर उच्च न्यायालय,,इम्फाल यांनी लसीकरण साठी असे कोणतेही आदेश देण्यास मनाई केली आहे. ज्यामुळे सामान्य जनतेचे भारतीय संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारचे हणन होईल. लसीकरण न केलेल्या व्यक्तींना त्यांच्या मुल सुविधा पासून वंचित ठेवणारे आदेश म्हणजे भारतीय संविधान आर्टिकल १४,१९,२१ चे हणन करणे. भारतातील प्रत्यक नागरिकाला वैधकीय उपचार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब यांना दिले. असंवैधानिक आदेश देणार्यावर कारवाही करण्याची विनंती करण्यात आली 

 

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रनिहाय मतमोजणी बंद व्हावी

 

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रनिहाय मतमोजणी बंद व्हावी

सरसकट एकत्र मतमोजणी करण्याची पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची मागणी

गुप्त मतदान पद्धतीचा उद्देश सफल होत नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान केंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केली जात असताना गुप्त मतदान पद्धतीचा उद्देश सफल होत नसून, प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी ही मतदान केंद्रनिहाय न करता त्या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रात झालेले मतदान एकत्र करुन मोजण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून, भारताच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. तर वेळप्रसंगी उच्च न्यायालयात देखील जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

प्रभागनिहाय मतमोजणीद्वारे कोणत्या भागातून कोणत्या उमेदवाराला किती? मतदान झाल्याचे निदर्शनास येते. यामुळे गुप्त मतदान पद्धतीला हरताळ फासला जात आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी ही मतदान केंद्रनिहाय न करता, त्या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रात झालेले मतदान एकत्र करून घेण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने धरण्यात आला आहे. 

संघटनेच्या वतीने भाडभ्रष्ट उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी डिच्चू कावा मोहिम हाती घेण्यात आली आहे. निष्क्रीय व भ्रष्ट उमेदवारांना धडा शिकवण्यासाठी नागरिकांची तयारी आहे. मात्र उमेदवारांना माहित पडेल या भितीने त्या विरोधात मतदान करण्यास नागरिक घाबरतात. मतदान केंद्रनिहाय मतमोजणी होत असल्याने कोणत्या भागातून किती मतदान झाल्याचे कळते? यामुळे नागरिकांनी केलेल्या गुप्त मतदानाला अर्थ राहत नाही. निवडणुकित पैसे खर्च करणारे धनदांडगे उमेदवार आपल्या विरोधात मतदान झाल्याचे लगेच ओळखू शकतात. त्यामुळे निवडणूक मतमोजणीमध्ये क्रांतिकारक उपाय करण्याची गरज भासत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

प्रत्येक मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवरील मतांच्या ईव्हीएम मशीनला कोड अथवा नंबर टाकून मतमोजणी केली जाऊ शकते. मतदान केंद्रनिहाय मतदान मोजणी न करता सरसकट कोड अथवा नंबरप्रमाणे मोजणी झाल्यास कोणत्या भागातून किती मते पडली हे उमेदवाराला समजू शकणार नाही. यामुळे नागरिकांना न घाबरता डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करुन भाडभ्रष्ट उमेदवारांना धडा शिकवता येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिमेला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी...................

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या