किती सोसावं आम्ही ?

 


किती सोसावं आम्ही  ?

                          भारतीय समाजव्यवस्थेत मागासलेले समाज घटक म्हणून. अनुसूचित जाती.  अनुसूचित जमाती. विमुक्त जाती भटक्या जमाती.  विशेष मागासवर्गीय. इतर मागासवर्गीय. असे गट आपल्या सोयीनुसार सरकारने पाडले आहेत त्यामागचा उद्देश एवढाच आहे. मतदान मिळविणे. जातीयवाद दंगल. दंगेधोपे जाळपोळ करण्यासाठी आणि जातींमध्ये आपसी मतभेद निर्माण करणे हाच महत्वाचा उद्देश आहे. उपरोक्त मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती. विमुक्त जाती.  भटक्या जमाती या अवर्ण असून उर्वरित प्रवर्ग सवर्ण आहे. जातीव्यवस्था. गावरचनेत. प्रत्येक व्यक्तिच्या वयवसायानूसार जाती ठरविल्या जातात.  महार मांग चांभार. लोहार सुतार कुंभार मोची विणकर. रामोशी बेरड माकडवाला मांगगारुडी कंजारभाट. टकारी. पारधी. गोपाळ. गोलहा. दांगट. कोल्हाटी मदारी. साप गारुडी. चित्रकथी. कुडमोडे. जोशी. डमरू वाले. वासुदेव. रजपूत. भामटा. कैकाडी. बेसतर. वडार अशा एका नाही अनेक जाती जमाती आहेत की त्यांची जात वर्गवारी व्यवसायामुळे ठरली आहे.  अवर्ण जाती जमाती स्तर अनुसूचित जाती म्हणजेच पूर्वा स्पृश्य दलित जाती या गावाबाहेरील बहिष्कृत वस्त्यांमध्ये असून अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी जाती वयवसथाक गावरचनेपासून विभक्त असलेल्या जंगल पाड्यांमध्ये वसलेले आहेत. भटक्या विमुक्त जमाती या गावरचनेबाहेर आहेत. परंतु त्या एक ठिकाणी वसती करून राहत नाहीत. त्यामुळे त्यांना सवताचे वा स्थानिक असे गाव नाही सवताची शेतजमीन वा निरवाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना गाव गाडयवरच अवलंबून राहावे लागते 

        डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जाती आदिवासी व भटक्या जमाती यांच्यातील भेदरेषा अधोरेखित केल्या आहेत. आदिवासी व भटके हे अस्पृश्य नाहीत अस्पृश्यता हा अनु जातीचा महत्वपूर्ण निकष आहे अस्पृश्यता ही निव्वळ सामाजिक. सांस्कृतिक सतरावरिल हीन दर्जा प्रदान करणारी प्रथा नसून ती अस्पृश्य जातींना निरवाहक्षम उत्पादनाच्या साधना पासून दूर करणारी सामाजिक व आर्थिक व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेवर होणार या आर्थिक शोषणाचा निकषांवर अस्पृश्य आदिवासी व भटके यांच्यातील शोषण पिडीत दमनाची भिननता पुढे येते. दलित समाजाला गत काळात मिळणारी वागणूक आपणं सर्वांनी बघितली आहे कंबरेला झाडू बांधून रस्त्यावरुन चालावे लागत होते. गळयात मडक बाधाव लागत असे कारण रस्त्यावर थुंकणयाचा सुध्दा अधिकार नव्हता. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिला जोहार मायबाप घालावा लागत असे. रहाण गावाबाहेर.  पाणवठ्यावर पाणी सुध्दा भरण्याची परवानगी नव्हती. अशी विविध बंधने दलित समाजावर होती. हळूहळू काळ बदलला आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले. आणि समाजाला आपले हक्क व अधिकार याची जाणीव झाली. आणि समाजात विचार आचार संस्कृती याची उन्नती झाली यात सर्वात मोठा वाटा. डॉ बाबासाहेब आंबेडकर.  छत्रपती शाहू महाराज.  महात्मा ज्योतिबा फुले.  सावित्रीबाई फुले. अशी विविध समाजहितासाठी प्रयत्न करणारी विभूती यांचा सिंहांचा वाटा आहे. पण आज सुध्दा काही गावांत समोर नाही मागून का होईना दलित समाजाला जाणीवपूर्वक मानसिक सामाजिक धार्मिक त्रास अवहेलना केली जाते आहे

            वाळवा तालुक्यातील पोखरणी हे खेडे गाव या गावात बराच दलित समाज आहे. याच गावात सरपंच व ग्रामसेवक यांचा जाणिवपूर्वक मनमानी कारभार राजकीय आश्रयाखाली केला आहे या गावातील सरपंच सौ रेखाताई पाटील व गावाच्या विकासासाठी ग्रामीण योजना कोणत्याही  राजकीय दबावाशिवाय राबविण्यासाठी ग्रामसेवक नेमला जातो त्याचा कोणत्याही राजकारणी लोकाशी संबंध नसणारा असावा पण या दोघांनी मिळून ग्रामपंचायत कारभार हा मनमानी सुरू आहे. व अनेक योजनांच्या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला आहे. व दलित व मातंग समाजाच्या विरोधात सातत्याने जाणिवपूर्वक जातीय द्वेषापोटी. व राजकीय द्वेषापोटी काम करीत आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचा कामाबाबत ची प्लॅन इसटिमेंट मागणी लेखी व तोंडी वारंवार करून सुध्दा देण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.  ग्रामसेवक मोरे मॅडम या कामांवर हजर झाल्या पासून कधीही वेळेवर आॅफिस मध्ये येत नाहीत व आल्या नाहीत लोकांना लागणारे विविध दाखले. घराचे ८ अ चे उतारे.  जन्म आणि मृत्यू दाखले. रहिवासी दाखले. व इतर दाखले देण्यासाठी जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत कोणत्याही शासकीय योजनांची माहिती मागासवर्गीय लोकांना व इतर लोकांना दिली जात नाही दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शासन भरिव निधी उपलब्ध केला आहे पण त्यानुसार कोणतेच काम केले जात नाही. या योजनेतून एकादे काम झाले तरी लोंढे वस्ती मध्ये आंबेडकर नगर १ व आंबेडकर नगर २ मध्ये या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहेत त्या बाबतची प्लॅन इसटिमेंटची मागणी केली असता आजपर्यंत जनतेला प्लॅन इसटिमेंट दिली नाही. लोंढे वस्ती मध्ये पथदिवे बसविण्यात आले आहेत. परंतु लोंढे वस्ती या ठिकाणी प्रत्येक पोलवर एकच पथदिवा बसविण्यात आला आहे. व लोंढे वस्ती शेजारी पाटील समाजाच्या घराजवळ दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत आंबेडकर नगर दोन वसाहतीत सुध्दा प्रत्येक दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत मात्र जाणिवपूर्वक व जातीय द्वेषापोटी लोंढे वस्ती मध्ये प्रत्येक पोलवर एकच पथदिवा बसविण्यात आला आहे याची चौकशी करण्यात यावी 

  दलित वस्ती कामांचा ठेका देताना मागासवर्गीय ठेकेदार व मजूर सोसायट्या यांना न देता पोखरणी ग्रामपंचायत यांचेकडून सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांच्या सोयीनुसार अन्य ठेकेदाराला काम दिले आहे दलित वस्ती सुधार योजनेचे ठेकेदार ग्रामसेवक व सरपंच यांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी. मातंग समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे

            पोखरणी संतोषनगर येथे मातंग समाज रहात आहे या ठिकाणी गेल्या दहा वर्षांत कोणत्याही योजनेचा एकही पैसा खर्च केला नाही.  १४ वा वित्त आयोग. १५ वा वित्त आयोग नुसार शासनाकडून येणारा भरिव हा दलित वस्ती सुधार योजनेचा कोणताही निधी आजपर्यंत खर्च करण्यात आलेला नाही. या संदर्भात सुध्दा ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे.  मातंग समाजाला जाणिवपूर्वक दलित विकास निधी पासून व इतर विकास योजनांपासून वंचित ठेवण्याचे राजकारण ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. जर हा सर्व निधी खर्च केला नाही तर तो गेला कुठे याची चौकशी झालीच पाहिजे. ग्रामसभा झाली नाही. झाली असेल तर त्या ग्रामसभेला नागरिक होते का ? सर्व मागण्यासाठी २६ जानेवारी २०२१ पासून सातत्याने जिल्हाधिकारी. मुख्य कार्यकारी.  समाजकल्याण अधिकारी.  गटविकास अधिकारी. तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यावेळी या संदर्भात बैठका घेऊन चर्चा झालेल्या आहेत पण निर्णय शुन्य.  तरी सुद्धा ग्रामपंचायत कारभारामधये कोणताही बदल झालेला नाही म्हणूनच पुन्हा पोखरणी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी व्हावी. यासाठी विविध दलित बांधव मुख्यत्वे प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चा करण्याची तयारी आहे याची शासन प्रशासन यंत्रणेने गांभीर्याने दखल व नोद घ्यावी 

        वेळोवेळी उठाव मागणी करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष या वंचिताकडे केले जात आहे किती सोसावं आम्ही कळत नाही

         समाजसेवा बंद आंदोलन उपोषण मोर्चा रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गोरगरिबांचा आधार माहिती अधिकार

 


गोरगरिबांचा आधार माहिती अधिकार

          भारताच्या राज्य घटनेनुसार भारतीय नागरिकांना भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून सथापणयाचे घोषित केले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्य घटनेने कार्यकारी मंडळ. विधिमंडळ व न्यायमंडळ या संस्थात्मक संरचेनेची निर्मिती केली आहे. काळाच्या ओघामधये या संघराज्य व्यवस्थेमध्ये व त्याच्या विविध संस्थांमध्ये तसेच नागरिकांना सहभागातही उदासीनता आल्याचे सकृत दिसून येते. आज मितीस म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहाव्या दशकातही नागरिकांचा राज्य कारभारामधये मतदानाशिवाय कोणताही सक्रिय सहभाग दिसून येत नाही

          वास्तविक भारतासारख्या प्रतिनिधीक लोकशाही राष्ट्रात सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महत्वाच्या बाबींवर हिरीरीने मतप्रदर्शन करून नागरिकांकडून राज्य कारभारात सहभाग होणे आवश्यक आहे राज्यघटनेने त्यासाठी नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत हक्क म्हणून बहाल केले आहे. अर्थात नागरिकांना त्याचे माहीतीपूर्ण मत मांडण्यासाठी शासनाच्या कार्यपद्धती माहिती व सार्वजनिक हिताच्या बाबी कशा हाताळल्या जातात याची माहिती मिळणे आवश्यक आहे ही माहिती नागरिकांना प्राप्त व्हावी हा. # माहिती अधिकार अधिनियम २००५ # लागू करण्यामागचं उदेश आहे माहिती अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्य कारभारात अभ्यासू नागरिकाचा सहभाग याची सांगड असणे आवश्यक आहे. ही भूमिका आता जगभर मान्य झाली आहे. जगभर माहीतीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता पावू लागला आहे. व तो नागरिकांना प्राप्त होण्यासाठी देशात खास कायदे पारित करण्यात आले आहेत. भारताने माहीतीचा अधिकार अधिनियम कायदा २००५ पारित करून अशा स्वरूपाचे कायदे केलेल्या देशाच्या समूह प्रवेश केला आहे. तद्वतच सुमारे २५ इतर देशात अन्य स्वरूपात अशा प्रकारे हक्क नागरिकांना बहाल करण्यात आला आहे

              माहिती अधिकार कायद्याचे दुहेरी फायदे आहेत वैयक्तिक पातळीवर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार हवी माहिती त्वरित प्राप्त होते आवश्यक ती प्रमाणपत्र. दस्त ऐवज. विविध शासकीय कार्यालयातून प्राप्त करण्यापासून कार्यालयात प्रलंबित असलेल्या तुमच्या अर्जाची किंवा प्रकरण सधसथिती पर्यंतच्या अनेक बाबीचा यात समावेश होतो. त्यामुळे कार्यालयात हेलपाटे घालावे लागणारे हेलपाटे संदिग्ध माहिती अथवा दुरूततरे या जाचापासून मुक्तता होण्यासाठी. तसेच आपली हक्काची माहिती मिळविण्यासाठी हांजी. हांजी करून अपमानास्पद प्रसंग येण्याचा ही. संभव रहात नाही त्याच बरोबर माहीतीच्या अधिकारामुळे तुम्हाला जागरूक व समाजांचे तितकेच जागरूक व प्रगल्भ नागरिक होण्याचे सामर्थ्य प्राप्त होते ते माहीत अधिकार अधिनियम कायदा २००५ मुळेच

* तुम्हाला तुमच्या गावातील रस्ते विकास. गटार. समाजमंदिर. बाग बगिचे. या कामाचा दर्जा 

*. तुमच्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये चालणारे शासकीय बांधकाम याची वैधता तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपणांस येतो तो माहिती अधिकार मुळे

* तुमच्या गावात तालुका जिल्हा राज्य देश निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे पूर्व चौकशी

* विविध शासकीय निमशासकीय योजनेतील पात्र अपात्र लाभार्थी निवडी इत्यादी बाबत माहिती विचारण्याची संधी आपणांस माहीती अधिकार अधिनियम यामुळे मिळते 

               या अधिकारामुळे कार्यालयीन गोपनीयतेचे वातावरण दूर करून शासकीय यंत्रणेस ते करीत असलेल्या कामाबद्दल उत्तरदायित्व येईल त्याचप्रमाणे तुमच्या सभोवतालच्या नागरिकांना संघटन करून भ्रष्टाचार व बेकायदेशीर व बिनदिक्कतपणे चालू असणार्या कुप्रथा विरूद्ध लढा देता येईल म्हणूनच आपण माहिती अधिकार कायदा आपल्या मुलाबाळांना व पुढील. पिढ्यांना देत असलेली बहुमूल्य देणगीच असणार आहे

             भारतीय संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा पारित केला आहे असून तो १३ आक्टेबर २००५ पासून अंमलात देखील आला. या अधिनियमामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला अंत्यंत बहुमूल्य असा अधिकार प्राप्त झालेला आहे त्या अधिकारांची तसेच या अधिनियमाची तोंड ओळख करून देण्यासाठी तसेच या अधिनियमाची नागरिकांना कशी मदत घेता येईल आणि हा अधिनियम राबविण्यासाठी कोणती यंत्रणा निर्माण करण्यात आली याची माहिती देण्यासाठी ही संकल्पना अमलात आणली आहे

* या अधिनियमामुळे लोकशाही. सामान्य माणसाच्या दारात आली आहे माहिती प्राप्त करण्याच्या दृष्टीने तुम्हाला नागरिक म्हणून लोकसभेच्या विधिमंडळाच्या सदस्या इतकाच अधिकार प्राप्त झालेला आहे

* आत्ता तुम्हाला शासकीय विभाग कशी कामे करतात. शासकीय कामकाज कसे चालते कोणत्या कार्यपद्धती अवलंबिलया जातात आणि जनतेस कशा प्रकारे सेवा देतात हे जाणून घेण्याचा अधिकार आहे

*तुम्ही वेगवेगळ्या खात्याचे न्यायालयीन प्रशासकीय विभागाच्या फाईल्स ( नस्ती ) यादी तुम्हाला जरूर असेल तेव्हा पाहू शकाल

*तुम्ही तुमच्या अर्जाच्या सधसथितीची माहिती हक्काने मागू शकाल व इतर अर्जदाराच्या अर्जाची योग्य माहिती घेऊन तुलना करू शकता

*तुमच्या परिसरात चालू असलेल्या विकास कामांची माहिती तपासणी पडताळणी तुम्ही प्राप्त करू शकाल 

* तुम्हाला कुठलेही शासकीय कामांवर उदा. रस्त्याचे बांधकाम किंवा शाळेचं बांधकाम वापरण्यात येत असलेलें साहित्याच्या साक्षांकित नमुना प्राप्त करता येईल

* तुम्हाला कोणत्याही कामाच्या निविदा चां तुलनात्मक तक्ता प्राप्त होवू शकेल

*तुम्हाला तुमचा अर्ज नाकारण्यात आला याबाबत माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे

*तुम्हाला शासकीय इस्पितळातील औषधाचा साठा माहिती मिळवू शकता

* स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा. ठेवन. साठवन व संरक्षण याबाबत माहिती करून घेता येईल

  अधिनियमाची आवश्यकता

वरील उल्लेख केल्याप्रमाणे माहिती अधिकार कायदा अधिनियम आपणांस या पूर्वी होता काय ? वरीलप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर आपणांस नवे सामर्थ्य प्राप्त झाले आहे असे आपणांस निश्चय वाटतं असेल. माहीतीचे महत्व. विशेषत ती जर आपले माहिती अधिकार आणि हितसंबंध याबाबतची असेल तर तिचे महत्त्व आगळेच असते माहितीच्या अधिकारामुळे भारतीय नागरिकांना शासनाच्या कारभाराबद्दल त्याचप्रमाणे शासन मदत देत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या कारभाराबाबत माहिती मिळविण्याच्या प्रशस्त मार्ग खुला झाला आहे

          हा अधिनियम अस्तित्वात आल्यामुळे यापूर्वीच माहिती देण्याच्या अथवा राखून ठेवण्याचा संदर्भातील कार्यालयीन गोपनियतेचा अधिनियम १९९३ चे तरतुदी नुसार इतर कायद्यातील अशा सर्व तरतुदी निष्प्रभ झाल्या आहेत यापूर्वी महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा अधिकार नागरिकांना महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००३ अन्वये देण्यात आला होता तो अधिनियम आत्ता निरसित झाला असला तरी केंद्रीय कायद्याचे स्वरूप या अधिनियमा सारखें आहे. त्यामुळे आत्ता राज्य शासनाच्या अधिनिसत कार्यालयाबाबत राज्य शासनाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या पध्दतीनुसार माहिती मागविता येईल तर केंद्रशासनाच्या अधिपत्याखाली. कार्यालये/ संस्था कडून माहिती प्राप्त करण्यासाठी पध्दती व फी केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करता येण्याचा अधिकार 

      माहिती अधिकारांचे स्वरूप आपणास शासनाच्या कारभारातील कृती. आकृती. किंवा प्रतिबंधित कृती जाणून घेण्यासाठी नक्कीच आनंद असतो. या अधिनियमानुसार शासनाचे अभिलेख. दस्त ऐवज. लाॅगबुकस. प्राप्त झालेले सल्ले. परिपत्रके. आदेश. निविदा. अहवाल. यांच्या प्रती आपणांस मिळवणं सोपं जातं त्याचप्रमाणे शासकीय प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेले साहित्यांचे नमुने. प्रतिकृती. इलेक्ट्रॉनिक. स्वरूपातील माहिती. इमेल्स इत्यादी बाबी प्राप्त करता येतील. या अधिनियमामधये अभिलेख व साहित्य तपासणी पडताळणी अधिकाराची तरतूद आहे

       माहिती अधिकार कसा वापरता येईल ? 

जर आपणास विशिष्ट माहिती प्राप्त करावयाची असेल तर आपण संबंधित माहिती अधिकारयाकडे अर्ज करावा. आपण जर आडवळणी गावात राहत असाल तर आपला अर्ज त्या विभागाच्या वा त्या खात्याच्या माहिती अधिकाराकडे सादर करावा. हा माहिती अधिकारी तुमच्या अर्जावर ३० दिवसांत कारवाई करेल आणि त्याला कारवाई करावीच लागेल. या अधिनियमात जरि नमुना अर्जाचे बंधनं घालण्यात आले नसले तरीही सोईकरिता म्हणून अर्जाचा नमुना पहा त्यासोबत रूपये १०/ रोखीने अथव ड्राफ्ट चेक अथवा डिमांड ड्राफ्ट अथवा कोर्ट फी स्टॅम्प लावून भरावयाचे आहे. असे न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. एका अर्जात शक्यतो एकाच खातयासंबधीची माहिती विचारल्यास अर्ज लवकर विचारांत घेतला जाऊ शकेल

            आज माहिती अधिकार दिवस आहे. आज काही लोक काही माहिती अधिकार कार्यकर्ते या माहिती अधिकार अधिनियम कायदा २००५ याचा वापर फक्त आणि फक्त पैसा मिळविणे यासाठी करतं आहेत कायदा सर्वांना समान आहे कोणताही असा कार्यकर्ता शासकीय निमशासकीय अधिकारी यांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार दाखल करत असेल तर त्यांना सुध्दा कायदा समान आहे कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी माहिती अधिकार दाखल केल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल उडवाउडवीची उत्तरे देत असेल तर अशा अधिकारी व कर्मचारी यांना कायद्याचा हिसका दाखवावाच लागेल 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काय झालं आंबेघरच

 


काय झालं आंबेघरच

                  सांगली. सातारा कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात बर्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. पाऊस एवढा जोरात होता की लोकांना आपले. जीवनावश्यक वस्तू. महत्वाची कागदपत्रे. मुल बाळ महिला. महतारे आई वडील. प्रमाणापेक्षा प्रिय असणारी जनावरें यांना सुध्दा सावरण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी हालवणयाचा वेळ सुद्धा मिळाला नाही. या पूराचा तडाखा एवढा जोरात होता की २००५/ २०१९ पेक्षा जास्त होता. कोल्हापूर मध्ये. १३ गाव. सांगली २७ गाव आणि उर्वरित ५४ गाव या गावात जनावरे. मृत्यू. माणसाची हालपेषटा. हजारों एककर शेती जमीन पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेली पिकें पूराचया पाण्यात बुडलयाने. नुकसान झाले आपल्या भागातील सर्वात मोठी धरणे म्हणजे कोयणा. चांदोली. या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि लोकांचा जीव धोक्यात आला 

              यात आपलं सुध्दा चुकत कारणं एक महिना अगोदर प्रत्येक जिल्ह्यातील मा जिल्हाधिकारी सो यांनी पूराने पिडीत असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले होते पूराचे पाणी आपल्या गावात आले गावातून आपल्या घरांत घुसले. जनावरांच्या गोठ्यात घुसल्यावर आपण सर्वजण धावाधाव करतो म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबाची जनावरांची जास्त काळजी शासन करतंय आणि आपण निष्काळजी आहोंत आणि मग शासनाने आमच्यासाठी काय केले म्हणत बसताय. भूखसंकलन या घटना वेळोवेळी घडतात. घाटातील दरड कोसळणे. डोंगराला भेगा पडणे. पुल तुटणे. बंधारे वाहून जाणे. शेतात पाणी येणे. विविध इंटरनेट कंपन्या बीसनल जिओ. एअरटेल. वहिआयवी अशा विविध कंपन्यांचे मोबाईल इंटरनेट बंद पडले. त्यामुळे कोणाकडे संपर्क करण्याचा प्रश्नच मिटला. त्यात प्रामुख्याने लाईट नसणं हे आपणांस माहीत आहे. यामुळे पाणी समस्या. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. लाईट नसल्यामुळे पेट्रोल डिझेल पंप बंद. यामुळे परगावाहून मालवाहतूक करणारे वाहने. त्यामुळे जनजीवन विस्कळित होते. पूर येवून गेल्यावर होणारी घाण. मयत जनावरें. कुत्री मांजरे उंदीर घुशी. साप यामधून येणारी दूरगंधी पसरणारी रोगराई पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे आमदार खासदार मंत्री पुढारी नेते हे हेलिकॉप्टर मधून खाली सुध्दा उतरत नाहीत. आणि सर्वात मोठी आत्ता फॅशन झाली आहे ती म्हणजे फोटो सेकसन करण्याची आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी केली भेट दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष मदत कुठ आहे. शासनाने पुरग्रसत भागात दहा किलो गहू. दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोसीन. देण्याची घोषणा केली. पण खरोखरच गरज असणार्या लोकांना ते मिळाले का ? कोणाला मिळाले कोणाला नाही ? सर्व लोकांनी मागणी करण्याची गरज आहे गावातील चोरांनी हा सर्वसामान्य माणसाला आलेली मदत लाटली. 

                आमचा पाटण तालुका. थोर समाजसुधारक लोकनेते क्रांतिकारक. कोकणाचे तोंड माणले जाणारा आमचा पाटण तालुका. येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सर्वात मोठा दानधर्म करण्याचा वारसा असणारे नेते. दुष्काळ पडला मोठा. त्यात सुध्दा आपल्या धान्य गोदामाची दारे जनतेसाठी खुले करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई कोयनेत मोठा भुकंप झाला लोकाची घरं पडली. मोठ्याप्रमाणात नुकसान झाले लोक रस्त्यावर आली. डोक्यावरचे छप्पर उडून गेलं त्यामुळे लोक हवालदिल झाले होते त्यावेळी घरासाठी लागणारे साहित्य देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई हेच होतें. पाटण तालुका म्हणलं की डोंगराळ भाग. कोकणी लोक मनमोकळ्या स्वभावाचे. माफक शेती. भात शेंगा नाचणी वरी. अशी पावसावर अवलंबून असणारी पिकें घेणारे. शेती शिवाय दुसरा व्यवसाय नाही 

              पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथे डोंगराखाली वसलेले एक गाव म्हणजे आंबेघर. कोकण म्हणलं की जोरात पाऊस जुलै महिन्यात असाच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. एवढा मोठा पाऊस होता की कोयना धरणाजवळील पाणी पातळी उंची ५४ फूटावर पोहोचली. पाऊसाने कहर केला आणि डोंगरा शेजारी असणारे आंबेघर गावाजवळ असणारा डोंगर भुसंखलन झाले आणि बघता बघता आंबेघर हे गाव ढिगारयाखाली आलें आज असणारे गाव उद्या तिथे नाही काय वाटल असेल. आणि आलेल्या ढिगारयाखाली लोक अडकून पडली अक्षरशः लोकांचा जीव गुदमरून तडफडून मृत्यू झाला. उभा पाऊस असल्यामुळे घटनास्थळी कोणीही गेले नाही

              अतिवृष्टी हाहाकार उडविलेलया जनतेला शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिली आणि कृष्णा कोयना यासह अन्य धरणांची पाणी कमी होवू लागली. निसर्ग प्रकोपाचा रूद्रवतार झालेल्या पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथील ढिगारयाखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले शनिवारी सायंकाळ पर्यंत अकरा मृत देह सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात लहान मुलांचा ही समावे होता यावेळी सातारा जिल्हा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाटणचे कर्तव्य दक्ष तहसिलदार योगेश टोपे व त्यांचे सहकारी मदतकार्य सक्रिय झाले. आणि त्यांनी स्वतालक्ष घालून अकरा मृत देह बाहेर काढले. तरि सुध्दा तीन लोक सांपडली नाही यातच चार कुटुंबातील १४ जन ढिगारयाखाली गाडले गेलयाचीभीती अजून सुद्धा आंबेघर गावातील लोकांच्या मनात आहे हे तर लोकांचं झाल पण कुठेही पाळीव जनावरे मयत झाल्याची एकही घटना उघड झाली नाही. याचा अर्थ असा होतो की सर्व प्रकरण दाबले गेले काय

      आंबेघर गावातील लोकांना शासनाकडून काही मदत देण्यात आली का ? आली असेल तर ती मदत कोणत्या स्वरूपाची होती. त्या तालुक्यातील सामाजिक संघटना. सेवाभावी संस्था युनियन. मान्यवर नेते पुढारी खासदार आमदार यांनी काय केल आंबेघर गावांसाठी त्यांना पर्यायी जागा. घर बांधणीसाठी साहित्य. रेशन अन्न धान्य. कापड. जीवनावश्यक वस्तू. अन्नदान. आहार किट दिली का.मयत व्यक्तिंना आर्थिक मदत देण्यात आली का ? नाही म्हणजे घटनास्थळी जाऊन भेट देण्यापेक्षा मदत काय दिली आपल्या प्रत्येक जिल्ह्याला बरेच आमदार खासदार मंत्री लाभले आहेत पण. मदत करणारे लोक आज दिसायची बंद झाली जनता मनातून ओरडत आहे भेट दौरे करण्यापेक्षा. फोटो काढण्यासाठी निवडणूक भांडवल नको तर जनतेचे शुभचिंतक म्हणून रस्त्यावर या हे आत्ताच संपल नाही दरवर्षी असे विविध प्रकारचे पूर येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या जिल्ह्यात आमदार आहे तेथे विकासाचा अनुशेष आहे 

              बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

निराधार मातेचे सासरी पुनर्वसन



मानवसेवा प्रकल्पातील निराधार मातेचे सासरी पुनर्वसन

सासरला आशाची रितीरिवाजाप्रमाणे संस्थेने केली पाठवणी

खडतर प्रवास थांबवून, मानवसेवेने तिच्या सुखी संसाराची केली सुरुवात

•••••••••••••••••••••••••

अहमदनगर - डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले, कुठे जाणार?, कशी जगणार? अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करीत तिला प्रत्येक प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नव्हता. तिला फसवण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी जाळे टाकले, दलालांच्या जाळ्यात ती अडकत गेली. तिला अनेकदा शोषणाला बळी पडावे लागले. त्यातुन तिला निष्पाप जीव जन्माला आला आणि तिच्याबरोबर त्यांचीही वनवन सुरू झाली. अशा वाईट परिस्थितीमध्ये ते बाळ मृत्यू पावले. या खडतर प्रवासात तिचा जगण्याचा संघर्ष सुरुच होता. नातेवाईकांनी तर तिला केंव्हाच परकं करून सोडलं होत. आई-वडीलांच्या मृत्युनंतर तिला आश्रय घेता येईल, अशी एकही जागा शिल्लक नव्हती. जोडीदाराच्या रूपात तिला चांगला पति मिळाला. दोघांनी संमतीने लग्न केले. काही महिने चांगले सोबत घालवले. पण नंतर भुतकाळाने पुन्हा तिच्या मनात जागा घेतली आणि ती मानसिक रूग्ण बनली. घरात कुणाला काहीही न सांगता ती मानसिक संतुलन बिघडल्याने घर सोडून गेली. पुन्हा तिच्यावर अत्याचाराचे प्रसंग ओढवले अन ती गर्भवती राहून बाळ जन्मास आले. बाळाबरोबर अहमदनगर शहराच्या गल्ली बोळात, रस्त्यांवर, दारोदारी व बसस्थानक परिसरात ही आशा (बदललेले नांव) फिरु लागली. या निराधार महिला मनोरुग्णास श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाने आधार दिला. तिच्यावर उपचार करुन बरी झालेल्या आशा तिच्या कुटुंबीयांनी स्विकार केला नाही. मात्र पतीचे समुपदेशन करुन आशाला सासरी पुनर्वसन करण्यात आले. जशी माहेरवरून मुलगी सासरला पाठवतात त्याच रितीरिवाजाप्रमाणे साडी-चोळी देऊन तिची पाठवणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. अंगावर शहारे आणणारा व थक्क करणारा आशाचा खडतर प्रवास थांबवून, मानवसेवेने तिच्या सुखी संसाराची सुरुवात करुन दिली.

निराधार मनोरुग्णाच्या अवस्थेत शहराल आलेली आशाचे अतोनात हाल झाले, विचार शक्ती हिरावून बसलेल्या महिलेचे काही नरधमांनी शोषण केले. निष्पाप बाळासह शहरात आलेल्या या निराधार मनोरुग्ण महिलेची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वन स्टॉप सेंटर कडून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली. वाईट प्रवृतीबरोबर चांगली प्रवृत्तीही जन्म घेत असते, याप्रमाणे बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात वन स्टॉप सेंटर मार्फत पिडीत आशा 3 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल झाली. 

मानवसेवा प्रकल्पात तिला हक्काचा निवारा मिळाला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने पिडीत महिलेवर उपचार करुन तिचे समुपदेशन करण्यात आले. आशा हळू हळू मानसिक आजारातून सावरत होती. हरवलेली स्मरणशक्ती हळूहळू मिळत होती. आठवणार्‍या सर्व घटना संस्थेचे समुपदेशक सुशांत गायकवाड व स्वयंसेवकांना सागत होती. पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची तिच्या आशा पल्लवीत झाल्या. अतिशय खेळीमेळीने मानवसेवा प्रकल्पात ती राहत होती. मानसिक आजारातून पुर्ण बरी होताच आता चुलते, मावशी आणि जवळचे नातेवाईक स्वीकारतील अशी अपेक्षा निर्माण झाली. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी महिला स्वयंसेवकांसह आशाला व तिच्या बाळाला बारामती येथे पुनर्वसनासाठी घरी पाठवले. मात्र तिचे कुटुंबीय आशाला स्विकारण्यास तयार नव्हते. पती तिला स्विकारेल की नाही, या चिंतेने ती पतीची माहिती सांगत नव्हती. मात्र प्रकल्पातील महिला कार्यकर्त्या सुरेखा केदार यांनी समुपदेशन करुन तिच्या पतीकडील माहिती मिळवली. आशाच्या पतीची माहिती मिळताच दिलीप गुंजाळ यांनी तिच्या पतिकडे संपर्क साधून चर्चा व समुपदेशन केले. नगर तालुक्यातील एका युवकाशी तिचा लग्न झाला होता. संस्थेने त्याच्या पतीची व तिला सांभाळण्याची पुर्ण खात्री करुन घेतली. यानंतर पती व सासरच्या लोकांचे समुपदेशन करुन पतीने तिचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला. पतीबरोबर तिचे सुखी संसार थांटण्यासाठी मानवसेवा प्रकल्पाने आशाचे पुनवर्सन केले. 

आशाच्या पुनर्वसनासाठी सर्व देणगीदार, मार्गदर्शक डॉ. अनय क्षिरसागर, संजय शिंगवी, अ‍ॅड. जयदिप देशपांडे, अविनाश मुंडके, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, शशिकांत चेंगेडे, डॉ. अविनाश मोरे, महेश पवार, शारदाताई होशिंग, डॉ. सुरेश घोलप, पत्रकार सुधीर लंके, अतिक शेख, योगिता मुथा, भरतभाऊ बागरेचा, स्वप्निल कुलकर्णी, नागराज बडगेरी, प्रदीप पेंढारे, अ‍ॅड. वृषाली तांदळे, धिरज तनपुरे, सागर खेत्रे, शिवदास चव्हाण, रेलफोर फाउंडेशनचे नितीन घोडके, रीचर्डस प्रा. लि.चे रोहीत कर्नावट, कोहीनूरचे अश्‍वीन गांधी, मनोज गुगळे, अभिजित काळे, सुधीर लांडगे, किरण गवते, अ‍ॅड. संतोष गायकवाड, उज्वलाताई बागवाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. संस्थेचे स्वयंसेवक सुरेखा केदार, अविनाश पिंपळे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, रोहन नायडू, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, शुभांगी माने, पल्लीवी हिवाळे-तुपे, श्रीकांत शिरसाठ, मच्छिंद्र दुधवडे, ऋतिक बर्डे, प्रसाद माळी, अनिल दुधवडे यांनी उपचार समुपदेशन आणि पुनर्वसनाकरीता परिश्रम घेतले.


*मानवसेवा प्रकल्प*

०२४१-२४२९९४२

धाड - आपले परिचयाचा शब्द

 


धाड 

      धाड - आपले परिचयाचा शब्द

 आपल्या परिचयाचे आहेत वरिल शब्द आपण वेळोवेळी वृतमानपत्रात वाचतो.की. पिकांवर टोळधाड आली आहे. म्हणजे. धाड म्हणजे एखाद्या विषयांचा सुपडासाप करण्यासाठी तयार करण्यात आलेले एक. संरक्षण कवच असे म्हणता येईल. आपल्या आजूबाजूला बघतो. अमुक येथे तमुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेड टाकली धाड घातली. विविध विभागात ठराविक अधिकारी व कर्मचारी यांना अधिकार देवून नेमले आहेत 

              जुगार. दारु भट्टी. मद्यविक्री केंद्र. रेशन विभाग. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. तहसिलदार कार्यालय. पंचायत समिती. जिल्हा परिषद. कामगार विभाग. पाणी पुरवठा. सार्वजनिक बांधकाम विभाग. जलसंधारण विभाग. कृषी विभाग. कृषी उत्पन्न बाजार समिती. आठवडा बाजार. महावितरण कंपन्या. औद्योगिक विकास. विविध कल्याणकारी मंडळ. विविध कर्ज पुरवठा करणारी मंडळे. एस टी महामंडळ. वेश्याव्यवसाय ठिकाणे. विविध सामाजिक अनुदानित विनाअनुदानित संस्था. अन्न व औषध प्रशासन विभाग बालमजुरी. आश्रमशाळा. बेघर निवारा केंद्र. अशी एक नाही अनेक ठिकाणी शासनाला. कोणताही गैरप्रकार घडत असल्याची बातमी लागल्यास त्या प्रकाराचया विरोधात धाड. रेड. धागा. चौकशी करून सदर अहवाल शासनाकडे दाखल करणे बंधनकारक असते

                  शासनामार्फत देण्यात येणार्या विविध लोक उपयोगी सेवा सुविधा. योजना. त्याचे कार्य. कालमर्यादा. मालाचा दर्जा. त्यासाठी असणार्या तक्रारी. निवेदन. यांचे निवारण करण्याची पध्दती यांबाबत माहीती. प्रचार प्रसार जाहिरात. जनप्रबोधन. जनकल्याण. व्हावे यासाठी शासनाने ३/२/२००८ रोजी नागरि सनद तयार केली त्यानुसार प्रत्त्येक शासकीय निमशासकीय अनुदानित विनाअनुदानित संस्था यामध्ये चालणारे काम त्याचा आढावा निकष माहिती करून घेण्यासाठी सनद तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शी व अधिक बळकट होईल शासकीय सेवा यामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यवहारात बदल होईल. अशी अपेक्षा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. ग्राहक संरक्षण हित. वजन मांपे कायद्याची अंमलबजावणी शेतकरयांना हमी भाव ग्राहकांना सुरक्षित व निश्चित दरात अन्न धान्य व वस्तू वितरण व्हावे. यात नागरिकांचा सहभाग मिळवून सदर कामाच्या अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी दृष्टीने या नागरि संसदेतील निश्चित माहिती उपयोगी ठरेल 

            माहिती अधिकार कायदा २००५ अमलात आणण्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य माणसाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यातील कामकाज जाणून घेणे हे आहे. पण तसं होत नाही. कारण माहिती अधिकार दाखल करणार्या व्यक्तिवर प्राणघातक हल्ले. होत आहेत. दमदाटी देणें. जीवे मारण्याची धमकी देणें. 

            आज सर्वच क्षेत्रात काळाबाजार. भ्रष्टाचार चालूच आहे. अधिकारी व कर्मचारी ठराविक दलाल एजंट यांना हाताला धरून सर्वसामान्य जनतेची कामे करत आहेत त्यातच. सर्वसामान्य माणसाला योजना माहीत नाही. आपल्यासाठी शासनाने काय केले आहे हे सुद्धा माहित नाही. प्रत्त्येक शासकीय विभागाला. योजना संबधी प्रचार प्रसार जाहिरात करण्यासाठी शासन एक ठराविक रक्कम देतय पण आज कुठेही. मेळावे. वृतमापत्र जाहिरात. बॅनर. पत्रक. यासाठी लाखों रुपये शासन खर्च करतय मग आपल्याला माहीती कळतच नाही.  

      प्रशासनाने. यासाठी. सापेक्ष पणे कोणताही भेदभाव न करणारे अधिकारी व कर्मचारी नेमून. जागोजागी. धाड. रेड. चौकशी करण्यासाठी टिम नेमणे गरजेचे आहे. नेमण्यात येणारे अधिकारी. लाच न घेणारे असावेत. नसेल तर एखादी सेवाभावी संस्था युनियन. यातील विश्वास पात्र लोकांना हा अधिकार देण्यात यावा. कारणं यांच कोणासी लागेबांधे नसणार आहेत. आपणांस मिळणारा अहवाल स्वच्छ व बिगर पक्षपाती पणाने मिळणारं आहे. 

          धाड. घातली तर त्यासाठी शासनाने सर्वसामान्य जनतेची मदत घ्यावी. चौकशी यांचेजवळ करावी. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

श्राध्द - अंधश्रद्धा

 


श्राध्द - अंधश्रद्धा

         देव भावाला भुकेला असतो. जो मनुष्य ज्या भावनेने देवास भजतो तशा स्वरूपात तो व्यक्त होतो मनुष्याची चित्तवृत्ती जशी असते तसे त्यास फल प्राप्त होते. परलोकातही त्यास तशीच गती मिळतो. गुरू. ब्राम्हण. देश. देव. गोमाता. महिला. कुमारी कन्या. बालक. यांचें रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आज कुठेही बघायला मिळत नाहीत 

जल पूर्ण. कुंभ दान. अन्नदान. तिलदान. दक्षिणादान. धान्य दान. गायीला चारा देणे. केवळ पिंडदान करणे. स्नान तिलांजली दान. श्राध्द तिथीस उपवास करावा. श्राध्द दिवशी श्राध्द विधी व विधीचे मंत्र वाचन. 

                         मरणानंतर जीवाला सदगती मिळावी म्हणून अंत्येष्टी करतात. दहाव्या व बाराव्या दिवशी अनेक धार्मिक विधी धर्माच्या रिती रिवाजाप्रमाणे करतात. श्राधदे करतात ती दर महिन्याला व दर वर्षी करतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद वध पक्ष. तो काळ पितरांना उद्देशून करावयाच्या धार्मिक विधीसाठी नेमून दिलेल्या आहे. श्राधदाची परंपरा हिंदू धर्मात पुरातन काळापासून आहे. तशीच ती जैन पारशी. मुस्लिमांना. ख्रिश्चन. वगैरे धर्मातही आहे मूळ श्रध्दा अशी आहे की आपण भूलोकात काहीतरी संकलपूरवक त्याग केला पूजा केली. हवन केले तर भुवलोक. स्वर्गलोक आदि सुक्षम लोकातील मृतांना ते मिळेल व त्यांच्या ईच्छा तृप्त होऊन ते अधिक उच्च स्थितीत पोहचतिल याबाबत क्रियाकर्म काय करावे यात फरक असतो पण मूळ भावना व हेतू एकच असतो. 

            आपल्या जवळची प्रिय व्यक्ती मरण पावलयास त्याची आठवण व त्याची आवड निवड जपण्यासाठी व त्यांना ध्यानात आणून त्याची आठवण म्हणून आपण भाद्रपद महिन्यात पितृपक्ष म्हणून साजरा करतो. जीवन पणी आपले पिता / आजा / पणजा /पितृत्रयी / आई/ आजी / पणजी /पितयाकडील. / सावत्र आई/आईचा पिता /आजा/ पणजा /आईची आई/पत्नी/मुलगे/मुली/काका /मामा/भाऊ / आत्या/ मावशी /बहिण /सासरा /गुरू/ शिष्य/आप्त या सर्वांचे आपण पितृपक्षात श्राध्द करतो पण विचार केला तर जीवन असेपर्यंत आपण त्यांना काय वागणूक देतो. माझ्या आई वडील यांना हे आवडते ते आवडते जीवंत असताना त्यांना कधी विचारलें नाही आणि आज त्यांच्या तिस-या विधीला सर्व पदार्थ आणून ठेवले जातात काय उपयोग आहे का? ज्यांना आपण जगविणयाचे कर्तव्य बजावणयाची गरज होती त्यांनी आपल्या आप्त यांना निराधार केंद्र. वृध्दाश्रम. येथे सोडले आणि आज त्यांच्या नावाने श्राध्द घालून लाडू जिलेबी व अन्य खाद्यपदार्थ यांचें भोजन लोकांना वाढले जाते म्हणजे जे अन्न अन्न जेवन जेवन करून उपाशी मेले त्यांच्यासाठी आज श्राध्द या नावाने महाभोज घातला जातो तो सुद्धा आम्ही आमच्या आपतावर किती प्रेम करत होतो हे दाखविण्यासाठी श्राध्द मोठे मोठे जेवन घातली जातात. ज्यांना कधी सन्मानाची वागणूक मिळाली नाही. वेळोवेळी आपल्या मुलांकडून व इतरांकडून अपमान सहन करावा लागला. आपल्या आप्त लोकांना आपण शिव्या घातल्या. माराहन केली. मग कशासाठी. वरच प्रेम दाखवितात लोक मला कळत नाही ? जे आपले आई वडील आप्त यांनी स्वता मिळेल ते काम करून स्वता उपाशी राहून आपणांस पोसले तेच उपाशी मेले तर कशासाठी पितृपक्ष साजरा करायचा प्रश्न पडतो मोठा ? 

        मरणानंतर जीव वासनामय व मनोमय कोशात असतो त्यावेळी त्याला. वासना. इच्छा. विकार. असे सर्व असतें पण वासना तृप्त करून घेण्यासाठी शरिर हे एक साधन असते ते मरणार या व्यक्तिला नसते. जर उच्च राहणीमान असणार्या लोकात ईच्छा आकांक्षा पूर्ण होणे शक्य असतें. मयत व्यक्तिंना मोक्ष मिळत नाही. त्यामुळे मयत होणारा म्हणजे. अपघातात. आत्महत्या. फास. जळणे. किंवा इतर मार्गाने. जीवाचा अंत करणारे. मोक्षासाठी. भुलोकावर फिरण असतांत. म्हणजे ते भूत होतात असे आपल्या मनात घर करून बसले आहे. मेल्यावर माणूस स्वर्गात जातो की नरकात हे कोणी पाहिले आहे का. ? जीव गेल्यावर मृत शरीर जाळले काय आणि पुरले काय मृत शरिराला काय कळणार. ? नरक आणि स्वर्ग हे माणसाला एक चांगल वाईट काम करण्याची दहशत मनांत असावी म्हणून रचना करण्यात आली आहे. कोण स्वर्गात गेला कुणी बघितलं आहे का. ? ‌‌कोण नरकात गेला काय माहित आहे का ? मग आपणांस प्रिय असणारी व्यक्ती भुत होते काय. ? हे सर्व आपल्या मनाचा वहेम आहे जसं आपण कर्तव्य केले आहे भविष्यात त्याचे फळ तसेच मिळणारं. हा निसर्ग नियम आहे. आपण संपत्ती साठी काहीही संबंध नसणारे लोक यांच्याशी आपला संबंध जोडतो. रोज हजारों निराधार मरतात. त्यांचे श्राध्द कोण करत काय ?  

              श्राध्द कोणी करावे त्यासाठी कोणाला बोलविणे योग्य ब्राम्हण न मिळाल्यास जो असेल तो चालतो. पण मला एक कळत नाही. आपणच. श्राध्द. सत्यनारायण पूजा. व विविध शुभ अशुभ कार्य करण्यासाठी ब्राम्हण यांना बोलाविले जाते मग. ब्राम्हण यांच्यात मयत झाल्येलया लोकांचे श्राद्धाचे जेवन महाभोज घातलेला मी आजपर्यंत बघितला नाही तुम्ही बघितला आहे का ? त्यांच्यात कोणत्याही शुभ अशुभ कार्यक्रमात तुमच्यापैकी कोणी जेवला आहे का ? म्हणजे यांच्यासाठी हे कर्म करणे गरजेचे नाही ते फक्त आपणासाठी आहे. यांना प्रथम भोजन. काळे तीळ. सातू. सुपारया. गंध. पांढरी फुले. तुळशी माका. धुप. तीन ताम्हणे. पळी पंचपात्र तांब्या. दरभ. काजल. मध. पाट. केळीची पाने. द्रोण तुप. स्वयंपाक. गोपीचंदन. जातवे लोकटिचे वस्त्र व. यथाशक्ती दक्षिणा. आणि मयत व्यक्तिला आवडणारे जेवन करावे असे सांगितले जाते. म्हणजे वरील सर्व वस्तू कार्यक्रम झाल्यावर गोळा करून नेणारे यांच्या मागें कधी भूत लागलें आहे का ? श्राद्धाला येणाऱ्या खर्चाचा पेक्षा जास्त दक्षिणा द्यावी. अस सांगितल जाते. 

        श्राद्धात काय करु नये यांवर सुध्दा हे कार्य पार पाडणार या लोकांनी बंधने घातली आहेत. संध्याकाळी. रात्र व सकाळचा संधिकाळ या वेळा श्राद्धासाठी वर्ज्य आहेत. हे सुद्धा आपण आपल्या सवडीनुसार केले आहे. घरतच किंवा तळमजला. किंवा भाड्याने जागा. असावी. जमीन स्वच्छ सारवलेली आसावी. आपले आप्त यांना मरताना झोपायला जागा नाही होती ती कोपरयात अंगावर फाटकी चादर. अंगावर फाटकी कपडे. आणि आत्ता हे काय नविन. फरशी स्वच्छ पुसलेली असावी. किडा मुंगी नसावी. मळलेली नसावी. आत्ता एक खर सांगतो आपले आप्त कीडा मुंगीत झोपले. रात्री मरून पडलेली लोक मी बघितले आहेत त्यांना मुंग्या सुध्दा लागल्या होत्या काहिजण एका जागेवर पडून असल्यामुळे किडे पडलेले मी बघितले आहेत लोक ह्यो मरण मेला तर बरे होईल कोण सेवा करायच याची. आणि आत्ता बघा ? श्राद्धा दिवशी भिकारी यांना भिक देऊ नये आणि ब्राम्हण लोकांना दक्षिणा दिली तरी चालतें. रांगोळी काढू नका. माळा. गजरा. शृंगार यांवर बंधन आहे. श्राध्द धर्माकडे धार्मिक पणाने लक्ष द्यावे गप्पा मारु नये. अमंगल बोलू नये. आणि श्राद्धाचे जेवन ब्राम्हण जेवलयाशिवाय घरातील लोकानी जेवन करू नये असा नियम नाही भेद कसा पेरला गेला आहे बघा रजवल महिला. वांझ महिला. कुषटी. अन्य कुळातील स्त्री. ब्रम्ह हत्यारे. पापी. पशु. घंटानाद. अश्व सानिध्य. अपंग. काणा. नोकर. यांना टाळावे असे सांगितले जाते मग विचार करा मयत यांच्यातील कोण असेल तर त्याचे श्राध्द करणे योग्य आहे का? चालतें कारणं मयत खात नाही त्याच्या नावाखाली आपणच भुत हे खातो. महिला कुळ याचा भेदभाव येथे सुद्धा केल गेला आहे विचार करा ? 

              गुरू अथवा राजा यांच्यापासून लपवून दृष्य कृत्य केली तर यम धरमाकडून त्यांना शिक्षा होते. वायफळ बडबड करणारा. धेनूसाठी खोटे बोलणारे. मुके होतात. ब्रम्ह हत्या करणारे क्षयरोगी होतात. पुस्तक चोर अंध होतो. ब्राम्हणास शिळे अन्न देणारा कुबडा होतो. मधयपी. काळया दातांचा. सोने चोर. कुनखी. गुरु पत्नी बरोबर समागम करणारा. दोष युकत त्वचा असणारा असतो. दान दिल्याशिवाय खाणारा अपतयहीन असतो. सखया भगिनीशी संग करणारा मनुष्य षंढ असतो. प्रतिज्ञा करूनही विप्रास धन न देणारा गिधाड होतो. ब्राम्हणांची निंदा करणारी कासव होतो. अग्नी पदस्पर्श करणारा मांजर होतो. पूर्व जन्माची फळे भोगावी लागतात हे मला पटत नाही. आणि जी कर्म भोगायची राहली आहेत त्यांचा जन्म नीच योनीत होतो म्हणजे वरील प्रमाणे सर्व मुद्दे आपणास चांगल वाईट रस्ता दाखवतात फक्त याचा वापर आचरण असे करावे याचा आपण विचार करण्याची गरज आहे 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना

 


इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना 

             राज्यात निराधार अंध अपंग शारीरिक आजाराने त्रस्त व्यक्ती व निराधार विधवा. परित्यक्ता. देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कृत. #. संजय गांधी निराधार अनुदान योजना # व वृध्द लोकांसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना.  विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिवयांग व्यक्तिसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात.  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थ सहहयात वाढ करण्याबाबत.  मा लोकप्रतिनिधी. विविध संघटना.  स्वयंसेवा संस्था व अनेक नागरिक यांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी मागणी अर्ज.  मोर्चे.  उपोषण. अशा विविध माध्यमातून वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता.  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थ सहहयात दरमहा रुपये. ६०० होती. शासनाकडे मागणी पाठपुरावा करून रूपये १०००/ व सदरहून योजनेतील विधवा लाभार्थ्यांना. १ मुल. असल्यास त्याच्या पालनपोषणासाठी. दरमहा. ११०० रूपये. व विधवा महिलेस दोन मुल असल्यास दरमहा रूपये १२०० इतकं अर्थसहाय्य देण्याबाबत. मा मंत्री ( वित्त) महोदयांनी सन २०१९/२०२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय. भाषणामध्ये घोषणा करण्यात आली आहे.  त्यानुसार सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना देण्यात येणाऱ्या अर्थसाह्य वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

      विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याबाबत गठीत संजय गांधी निराधार अनुदान योजना.   समितीची कार्यकक्षा.  योजनेचे निकष.  लाभार्थी पात्रता अटी व शर्ती त्याचप्रमाणे अनुदान वाटपाचे करावयाच्या कारवाई बाबतचे संदर्भ. १/१४ येथील शासन निर्णय व परिपत्रक या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. तसेच विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याकरीता करावयाच्या कार्यपद्धती/कार्यवाही या शासन निर्णयानवये विहित करण्यात येत आहे 

       योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

(१) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न (२) आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन (३) पात्रतेची अहरता (५) वयाचा दाखला (६) उत्पन्नाचा दाखला (७) रहिवासी प्रमाणपत्र (८) अपंगांचे प्रमाणात (९) असमर्थता रोगाचा दाखला (१०) अनाथ निराधार असल्याचा दाखला 

   अर्ज करण्याची पद्धत व अर्जाची छाननी करण्याचा अधिकार

(१) तलाठी. (२) तहसिलदार (३) नायब तहसीलदार (४) ग्रामसभा. (५) केंद्र शासनाच्या निकषानुसार वर्षातून दोनदा ग्रामसभा सथावर अपात्र लाभार्थी शोध मोहीम घेणे बंधनकारक आहे

    आर्थिक सहाय्य मंजूर करणे व त्यांचे वितरण या शासन निर्णयानुसार धयायवयाचे आर्थिक सहाय्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मार्फत मंजूर केले जातात. नवाने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांत लाभार्थी माहिती दर महिन्यास शासनाला कळविणे बंधनकारक आहे

        योजना राबविण्यासाठी शासनाने गठीत करण्यात आलेली समिती

(१) मा पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती अध्यक्ष

(२) मागासवर्गीय ( अ जा / अ ज अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(३) महिला अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(४) इतर मागासवर्गीय/ वि जा. भ ज प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी दोन सदस्य

(५) सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(६) अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(७) संबंधित तालुक्यातील शासन नोंदणी कृत स्वयंसेवी संस्थांच्या अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(८) संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(९) संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(१०) पंचायत समिती गटविकास अधिकारी/ मुख्य अधिकारी नगरपालिका/ प्रभाग अधिकारी महानगरपालिका ( शासकीय प्रतिनिधी ) 

(११) तहसिलदार/ नायब तहसीलदार (शासकीय प्रतिनिधी ) 

समिती बैठका /लाभार्थ्यांच्या याद्या/ लाभार्थी मरण पाल्याची सूचना/ लाभार्थी तपासणी पडताळणी पध्दती/ दक्षता समिती पथके

            वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व लोकांनी आपल्या आपल्या विभागांना भेट द्या आणि चौकशी करून योजनचा लाभ घ्या 

           समाजसेवा बंद आंदोलन उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५

गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळणार हक्काचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती

 


गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळणार हक्काचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती 

      समाजकल्याण विभाग यांचेकडून गरिब परस्थिती शिक्षण घेणारे मुलं मुली यांना सगळे शिका "शिक्षण हा आमचा अधिकार आहे. " असे म्हणणारे विद्यार्थी यांचेसाठी प्रत्त्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभाग यांचेकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात 

                  "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " हे सर्व शिक्षणाशिवाय शक्य नाही आत्ता आणि आजच आपण व आपले पालक समाजकल्याण विभागाला भेट द्या आणि योजना मिळविण्यासाठी कागदोपत्री पूर्ततेसह आपला हक्क मिळवा

(१) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ध्यानात घेवून शासनाने अशी योजना चालू केली आहे

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* या योजनेसाठी माध्यमिक विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव संबंधित विधयालयाकडून पाठविला जातो

* अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* विमुक्त जाती भटक्या जमाती. अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* दुर्बल घटकात मोडणारा विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ होतो

    आत्ता या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आली आहे

(२) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

        समाजकल्याण विभागाकडून शाळेतील मुलींची गळती रोखण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे मागासवर्गीय समाजातील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे

    योजना वैशिष्ट्ये / निकष

* या योजनेतून विमुक्त जाती / भटक्या जमाती / अनुसूचित जमातीच्या / मुलीच्या गळतीचे प्रमाण कमी करणे व रोखण्यासाठी करण्यात आला आहे

* इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा. ६०/ रूपये शिष्यवृत्ती मिळते तर आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा १००/ रूपये शिष्यवृत्ती मिळते शैक्षणिक वर्षात दहा महिने ही शिष्यवृत्ती योजना दिली जाते

* संबंधित विद्यालयातून अशा मुलींचे प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो

* शैक्षणिक खर्चाच्या अडचणी सोडविण्यासाठी मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होतो

* या योजनेमुळे ग्रामीण भागात मुलींची शाळेत १००/टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक करण्यात आले आहे

(३) डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह

        समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुलीकरिता अशा प्रकारचे शासकीय वसतिगृह चालविले जाते यामध्ये मिळत असलेल्या सुख सोयी सोयीसुविधा. मागासवर्गीय समाजातील मुला मुलींना शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणीत असलेलें मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अशा वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करता येते

* अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करिता प्रत्त्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा असते 

* निवासी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करीता प्रवेश मिळतो

* निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना. भोजन. निवास. व इतर शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात

*मागासवर्गीय समाजात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्या या या योजनेमुळे सोय होते शिक्षण पूर्ण करण्यासाठी व विकास साधण्यासाठी मदत मिळते

     सदर योजनेत आत्ता बदल करण्यात आला आहे

(४) मुला. मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

      मागासवर्गीय मुला मुलींची व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व मुलींची शिक्षणाची सोय व्हावी व उच्च शिक्षण घेण्यास मदत होऊन त्यांचा विकास व्हावा यासाठी अशी वसतिगृहे समाजकल्याण विभागाकडून चालवली जातात

योजना वैशिष्ट्ये/निकष

*शासकीय वसतिगृहात मुलांना. निवास. भोजन. अंथरुण. पांघरुण. मोफत दिले जाते 

* शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. पाठ्यपुस्तके. वह्या. स्टेशनरी. यांचा मोफत पुरवठा केला जातो

* वैयक्तिक व अभियांत्रिकी. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार. सटेथोसकोप. अॅप्रन. बाॅयलर. सूट. कलानिकेनचया मुलांसाठी. रंग. कलर बोर्ड. ब्रश. कॅनव्हास. मिळते

* वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी मासिक निर्वाह भत्ता मिळतो

* विभागीय पातळीवर दरमहा २००/रूपये. जिल्हा पातळीवर दरमहा ७५/ रूपये व तालुका पातळीवर दरमहा ५०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो

* अशा वसतिगृहात मध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो

* विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये चया आत असावे*इयत्ता आठवी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो

* अशा वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शालेय विद्यार्थी साठी १५/ मे पूर्वी तर महाविद्यालयीन विद्यार्थी साठी ३०/जून किंवा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांपर्यंत असतो

(५) विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन

समाजकल्याण विभागाकडून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता व विद्यावेतन दिले जाते शैक्षणिक व दैनंदिन गरजा भागवतांना या योजनेतून मदत होते

  योजना वैशिष्ट्ये/ निकष

* वैयक्तिक. अभियांत्रिकी. शेती. असे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती मुलांच्या साठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते

*या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २३५/ ते ७४०/ निर्वाह भत्ता मिळतो

* व्यवसायिक शिक्षण घेताना येणारा खर्च फक्त शिष्यवृत्ती वर भागविणे शक्य नसलेमुळे त्यांना निर्वाह भत्ता मिळतो* महाविद्यालयाच्या वसतिगृहात. शासकीय वसतिगृहात. व इतर वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतून निर्वाह भत्ता दिला जातो

* बी एड. डी. एड. असे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधिचे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००/ रुपये विद्यावेतन दिले जाते हे विद्यावेतन शैक्षणिक वर्षात दहा महिन्यांसाठी दिलें जाते

* व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतनचा प्रस्ताव संबंधित महाविद्यालय / संस्था. कडून सरकारकडे पाठवला जातो

(६) भारत सरकारची शिष्यवृत्ती

केंद्र सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते यामुळे विद्यार्थ्यांना आपलीं शैक्षणिक गरज भागविण्यासाठी मदत होते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी व त्यांचे गळती प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकार कडून शिष्यवृत्ती दिली जाते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती शालांत परीक्षेनंतर मिळते

*पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे

*दरमहा. १४०/ रूपये ते ३३०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो

*ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता. शिक्षण शुल्क. परीक्षा शुल्क. व इतर बाबींवरील खर्च शुल्क या स्वरुपात मिळते

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वताच्या विकास करण्यासाठी या योजनेची मदत होते

(७) छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी साठी ही योजना राबविण्यात येते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक. विकास. गुणवत्ता. वाढावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते

*इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला मुलींना ही शिष्यवृत्ती मिळते

*इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत दरमहा ३०० रुपये एकूण ३००० रूपये शिष्यवृत्ती मिळते

(८) पुस्तक पेढी योजना

समाजकल्याण विभागाकडून वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी अनुदान मिळते

* वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. सीए. एम एम बीए. व विधी. अशा महाग पुस्तकांसाठी अनुदान मिळते

*अनुसूचित जमातीच्या व भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*पुस्तकाचा खर्च झेपत नाही म्हणून शिक्षण बंद करावे लागणार या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

*पुस्तक पेढी योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी संबंधित महाविद्यालय यांचेकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविला जातो

(८) सफाई कामगार पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसाय ( सफाई कामगार ) करणार्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा विकास व्हावा यासाठी समाजकल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते

* ही योजना सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे

*योजनेच्या निकषांत बसणारा विद्यार्थी प्रस्ताव शिष्यवृत्ती साठी विधयालयाकडून पाठविलें जातात

* गणवेश. शैक्षणिक खर्च. भागवतांना अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मुलांना मदत मिळते

(९) मोटर वाहन चालक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध युवकांना समाजकल्याण विभागाकडून मोटर चालविण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. स्वावलंबी होण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने युवकांना अधिकृत संसथाचालकाकडून चालक वाहक प्रशिक्षण मिळते

*प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची. वयोमर्यादा. शैक्षणिक. शारीरिक. जातीचा दाखला. ही अट आहे

*प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर. वाहन चालक परवाना. परिक्षा घेऊन.  

*अधिकृत वाहन चालविण्याचे. वाहकाचे प्रशिक्षण. मोफत मिळून संबंधित विभागाचा अधिकृत परवाना मिळतो

(१०) व्यवसायिक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती अल्पशिक्षित बेरोजगारांना. "मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण " या उपक्रमातून मोफत व्यवसायांचे प्रशिक्षण मिळते व्यवसाय उभारणी तरूणांना या प्रशिक्षणाचा उपयोग होतो

योजना वैशिष्ट्ये निकष

* हि योजना फक्त अनुसूचित जातीतील अल्पशिक्षित बेरोजगारांना होणार आहे

* प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे कमीत कमी शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत असावे

* शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण कमीत कमी एक आठवडा व जास्ती जास्त दोन महिने कालावधी पर्यंत मिळते

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे शिक्षण दिले जाते प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थी तरुणास टुलकिट. व १००/ रुपये दरमहा वेतन दिले जाते

*अलपशिक्षणावर व्यवसाय करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होते प्रशिक्षणानंतर तरुणांना स्वताच्या स्वयंरोजगार मिळवता येतो

(११) औधोगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विद्यावेतन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजनेतून विद्यावेतन मिळते त्यामुळे व्यवसायाचे तांत्रिक शिक्षण घेवून विविध क्षेत्रात काम करता येते

योजना वैशिष्ट्ये निकष

* संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा ६०/ रुपये विद्यावेतन मिळते अशांना समाजकल्याण विभागाकडून दरमहा ४०/ रूपये विद्यावेतन मिळते

* तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही अशा विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून. दरमहा १००/ रुपये विद्यावेतन मिळते

* या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६५;२९०/ रुपये पेक्षा जास्त नसावे

* अनुसूचित जमातीच्या व मान्यताप्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरमहा शैक्षणिक खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी यांचा उपयोग होतो

* योजनेच्या निकषांत बसणारा या विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव सरकारकडे संबंधित औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडून पाठविला जातो

(१२) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध कुटुंबासाठी हि योजना राबविण्यात येते भूमिहीन कुटुंबातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांचा विकास व्हावा हा योजनेचा उद्देश आहे

* या योजनेअंतर्गत लाभार्थींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन मिळते

* जमीन खरेदीसाठी योजनेतून ५०/ टक्के अनुदान तर ५०/ टक्के बिनव्याजी कर्ज

*जमीन खरेदीसाठी घेतलेलं ५०/टक्के कर्ज परत फेड करण्याची मुदत १० वर्ष असते. कर्ज मंजूर झाल्यानंतर परतफेड दोन वर्षांनंतर सूरू केल्यास चालते

* अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

* लाभ देताना दारिद्र्य रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. विधवा. परित्यक्ता अर्जदारांना प्राधान्य दिले जाते

*लाभ घेणाऱ्या लाभार्थी साठी वय वर्षे १८/६०/ या दरम्यान असावे लागते

*या योजनेमुळे दुर्बल घटकातील शेतमजूर यांना हक्काचे रोजीरोटी साधनं मिळू शकते

(१२) पाॅवर टिलर योजना

अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून पाॅवर टिलर साठी. १००/टक्के अनुदान मिळते मजुरांच्या वाढत्या दरामुळे पाॅवर टिलरचया साह्याने शेती सहजपणे कसता येते

योजनेची वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी महाराष्ट्र मधील असावा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा

* अर्जदार अल्पभूधारक / कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभार्थी असावा

*अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ४०००० रूपयांपेक्षा कमी असावे

*योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा

*अर्जदाराचा अधिकृत अधिकार्यांकडील जातींचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१२) गटाई कामगारांना पत्र्याचे सटाॅल पुरविणे

गटाई काम करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती लोकांना या योजनेतून स्टाॅल मिळतात त्यामुळे हा व्यवसाय सुरक्षित करणे सोपे जाते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो

*योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ पुर्ण असावे

* ग्रामीण भागातील लाभार्थी उत्पन्न वार्षिक. ४०००० रूपये चया आत असावे व शहरी भागासाठी ५० हजार चे आत असावे

* अर्जदार मागत असलेलें स्टाॅल त्यांच्या स्वताच्या जागेत असावे

* चर्मकार समाजातील काही दुर्बल घटक रस्त्यावर उघड्यावर रस्त्याच्या कडेला गटाई काम करतात त्यांना सुरक्षितपणे हे काम करण्यासाठी स्टाॅलचा उपयोग होतो

* लोखंडी पत्र्याच्या स्टाॅलबरोबर लाभार्थ्यास चामडी साहित्य घेण्यासाठी ५००/ रुपये अनुदान मिळते

*या समाजाच्या लोकांना या योजनेमुळे उपजीविकेचे साधन उत्पन्नाचे साधन मिळते

* अर्जदाराने अधिकृत अधिकारयाकडील जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१३) आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

समाजातील भेदभाव संपावा समतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी दोन वेगवेगळ्या जातीमधील विवाह केलेल्या व्यक्तिंना या योजनेतून अनुदान मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती / भटक्या जाती / यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू. जैन. लिंगायत. शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यांना अनुदान मिळते

* आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना एकत्रित. ५०'००० रूपये अनुदान मिळते

*आंतरजातीय विवाहानंतर समाजाकडून कुचंबणा होऊ नये म्हणून योजनेतून प्रबोधन केले जाते

*आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन रूपात मिळालेले अनुदान संसार उभारण्यासाठी उपयोगी पडते

* या योजनेमुळे आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत होईल

(१४) कन्यादान योजना

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होवून विवाह करणार्या मागासवर्गीय जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते नवीन संसार उभारताना या जोडप्यांना अनुदानाची मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध ( धनगर वंजारी ) विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते

* सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या वरील जातीच्या जोडप्यांना. १० :००० रूपये अर्थ सहाय्य. वधूचे आई वडील किंवा पालकांच्या नावे धनाअदेश विवाहाच्या दिवशी देण्यात येते

* सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना प्रत्त्येक जोडप्यांमागे. २:००० रूपये प्रोत्साहन अनुदान मिळते

* गरीब कुटुंबांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे विवाहाचा अतिरिक्त खर्च वाचतो

*सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे साधेपणा मुळे विधिवत विवाह करण्यासाठी समाजात प्रबोधन होण्यास मदत होते

(१५) अत्याचारित कुटुंबास अर्थ सहाय्य योजना

अत्याचाराचे बळी ठरणारया अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना समाजकल्याण विभागाकडून अर्थ सहाय्य

योजना वैशिष्ट्ये निकष

* जातीच्या कारणावरून अतयाचारास बळी पडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या योजनेतून अर्थ सहाय्य मिळते

* अनुसूचित जाती जमाती कुटुंबावर / व्यक्तिवर अत्याचार घडल्यास व या गुन्ह्याची नोंद नागरि हक्क संरक्षण अधिनियम १९५५ खाली अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास या योजनेतून अनुदान मिळते

* योजनेतून लाभासाठी जातीचा दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते

* अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर कमीत कमी २५:००० रूपये ते जास्तीत जास्त २ लाख रूपये पर्यंत अर्थ सहाय्य मिळते

*अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांचे /सदस्यांचे या योजनेमुळे पुनर्वसन होण्यास मदत होते

(१६) वृध्द कलावंत पेन्शन योजना

राज्य सरकारच्या या योजनेतून वृध्द कलावंतांसाठी वृध्दापकाळात पेन्शन मिळते. आणि उतरत्या वयात त्यांना उपजीविका करणेस मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी वृध्द कलावंत यांनी विहीत नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा

*तमाशा. नाटक. लोककला. चित्रपट. यामध्ये काम केलेल्या व वयाची ६० वर्ष पूर्ण असलेल्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*इच्छुक वृध्द कलावंत म्हणून काम केल्याची माहिती पुरावे ( फोटो. कात्रणे. प्रमाणपत्र. इत्यादी ) जोडावी

*रेशनकार्ड. गाव कामगार उत्पन्न दाखला. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*पेन्शन योजनेमुळे वृध्द कलावंत लोकांना सुरक्षितता मिळते

(१७) पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना या योजनेतून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळते यामुळे समाजातील युवकांना सैन्य व पोलीस भरतील मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध असावा. प्रशिक्षणासाठी वय. १८ ते २५ दरम्यान असावा. उमेदवारांची छाती. उंची. इत्यादी सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार असावी. उमेदवार. इयत्ता बारावी उत्तीर्ण व शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तीन महिन्यांचा कालावधी असतो. तीन महिने पूर्ण कालावधीत उमेदवारांची राहण्याची सोय प्रशिक्षण संस्थेत केली जाते. पोलिस प्रशिक्षणात. धावने. उंच उडी. लांब उडी. गोळाफेक. पुल अप्स. आॅपटिकलस रससी खेच. चढणे उतरणे. हे प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीत चांगली संधी मिळू शकते.  

     आत्ता आपण वरील मॅसेज पूर्ण पणे वाचला असेल तर आपल्या ध्यानात एक गोष्ट आली असेल ती म्हणजे समाजकल्याण विभाग असो वा कोणताही विभाग त्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अट कायमस्वरूपीअडसर म्हणून घातली जाते ती म्हणजे जातींचा दाखला हा सर्व खेळ आहे कारणं खरोखरच या योजनेस पात्र असणारा लाभार्थी आजच्या घडीला आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करु शकत नाही कारणं त्यांच्याकडे ६० वर्षाचा पूरावा नाही. 

          खरोखरच सर्वसामान्य माणसाची मुलं मुली शिकावी असे वाटत असेल तर जातीच्या दाखल्याची अट रद्द करा नाहीतर योजना बंद करा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या