काय झालं आंबेघरच
सांगली. सातारा कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात बर्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. पाऊस एवढा जोरात होता की लोकांना आपले. जीवनावश्यक वस्तू. महत्वाची कागदपत्रे. मुल बाळ महिला. महतारे आई वडील. प्रमाणापेक्षा प्रिय असणारी जनावरें यांना सुध्दा सावरण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी हालवणयाचा वेळ सुद्धा मिळाला नाही. या पूराचा तडाखा एवढा जोरात होता की २००५/ २०१९ पेक्षा जास्त होता. कोल्हापूर मध्ये. १३ गाव. सांगली २७ गाव आणि उर्वरित ५४ गाव या गावात जनावरे. मृत्यू. माणसाची हालपेषटा. हजारों एककर शेती जमीन पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेली पिकें पूराचया पाण्यात बुडलयाने. नुकसान झाले आपल्या भागातील सर्वात मोठी धरणे म्हणजे कोयणा. चांदोली. या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि लोकांचा जीव धोक्यात आला
यात आपलं सुध्दा चुकत कारणं एक महिना अगोदर प्रत्येक जिल्ह्यातील मा जिल्हाधिकारी सो यांनी पूराने पिडीत असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले होते पूराचे पाणी आपल्या गावात आले गावातून आपल्या घरांत घुसले. जनावरांच्या गोठ्यात घुसल्यावर आपण सर्वजण धावाधाव करतो म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबाची जनावरांची जास्त काळजी शासन करतंय आणि आपण निष्काळजी आहोंत आणि मग शासनाने आमच्यासाठी काय केले म्हणत बसताय. भूखसंकलन या घटना वेळोवेळी घडतात. घाटातील दरड कोसळणे. डोंगराला भेगा पडणे. पुल तुटणे. बंधारे वाहून जाणे. शेतात पाणी येणे. विविध इंटरनेट कंपन्या बीसनल जिओ. एअरटेल. वहिआयवी अशा विविध कंपन्यांचे मोबाईल इंटरनेट बंद पडले. त्यामुळे कोणाकडे संपर्क करण्याचा प्रश्नच मिटला. त्यात प्रामुख्याने लाईट नसणं हे आपणांस माहीत आहे. यामुळे पाणी समस्या. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. लाईट नसल्यामुळे पेट्रोल डिझेल पंप बंद. यामुळे परगावाहून मालवाहतूक करणारे वाहने. त्यामुळे जनजीवन विस्कळित होते. पूर येवून गेल्यावर होणारी घाण. मयत जनावरें. कुत्री मांजरे उंदीर घुशी. साप यामधून येणारी दूरगंधी पसरणारी रोगराई पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे आमदार खासदार मंत्री पुढारी नेते हे हेलिकॉप्टर मधून खाली सुध्दा उतरत नाहीत. आणि सर्वात मोठी आत्ता फॅशन झाली आहे ती म्हणजे फोटो सेकसन करण्याची आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी केली भेट दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष मदत कुठ आहे. शासनाने पुरग्रसत भागात दहा किलो गहू. दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोसीन. देण्याची घोषणा केली. पण खरोखरच गरज असणार्या लोकांना ते मिळाले का ? कोणाला मिळाले कोणाला नाही ? सर्व लोकांनी मागणी करण्याची गरज आहे गावातील चोरांनी हा सर्वसामान्य माणसाला आलेली मदत लाटली.
आमचा पाटण तालुका. थोर समाजसुधारक लोकनेते क्रांतिकारक. कोकणाचे तोंड माणले जाणारा आमचा पाटण तालुका. येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सर्वात मोठा दानधर्म करण्याचा वारसा असणारे नेते. दुष्काळ पडला मोठा. त्यात सुध्दा आपल्या धान्य गोदामाची दारे जनतेसाठी खुले करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई कोयनेत मोठा भुकंप झाला लोकाची घरं पडली. मोठ्याप्रमाणात नुकसान झाले लोक रस्त्यावर आली. डोक्यावरचे छप्पर उडून गेलं त्यामुळे लोक हवालदिल झाले होते त्यावेळी घरासाठी लागणारे साहित्य देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई हेच होतें. पाटण तालुका म्हणलं की डोंगराळ भाग. कोकणी लोक मनमोकळ्या स्वभावाचे. माफक शेती. भात शेंगा नाचणी वरी. अशी पावसावर अवलंबून असणारी पिकें घेणारे. शेती शिवाय दुसरा व्यवसाय नाही
पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथे डोंगराखाली वसलेले एक गाव म्हणजे आंबेघर. कोकण म्हणलं की जोरात पाऊस जुलै महिन्यात असाच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. एवढा मोठा पाऊस होता की कोयना धरणाजवळील पाणी पातळी उंची ५४ फूटावर पोहोचली. पाऊसाने कहर केला आणि डोंगरा शेजारी असणारे आंबेघर गावाजवळ असणारा डोंगर भुसंखलन झाले आणि बघता बघता आंबेघर हे गाव ढिगारयाखाली आलें आज असणारे गाव उद्या तिथे नाही काय वाटल असेल. आणि आलेल्या ढिगारयाखाली लोक अडकून पडली अक्षरशः लोकांचा जीव गुदमरून तडफडून मृत्यू झाला. उभा पाऊस असल्यामुळे घटनास्थळी कोणीही गेले नाही
अतिवृष्टी हाहाकार उडविलेलया जनतेला शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिली आणि कृष्णा कोयना यासह अन्य धरणांची पाणी कमी होवू लागली. निसर्ग प्रकोपाचा रूद्रवतार झालेल्या पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथील ढिगारयाखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले शनिवारी सायंकाळ पर्यंत अकरा मृत देह सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात लहान मुलांचा ही समावे होता यावेळी सातारा जिल्हा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाटणचे कर्तव्य दक्ष तहसिलदार योगेश टोपे व त्यांचे सहकारी मदतकार्य सक्रिय झाले. आणि त्यांनी स्वतालक्ष घालून अकरा मृत देह बाहेर काढले. तरि सुध्दा तीन लोक सांपडली नाही यातच चार कुटुंबातील १४ जन ढिगारयाखाली गाडले गेलयाचीभीती अजून सुद्धा आंबेघर गावातील लोकांच्या मनात आहे हे तर लोकांचं झाल पण कुठेही पाळीव जनावरे मयत झाल्याची एकही घटना उघड झाली नाही. याचा अर्थ असा होतो की सर्व प्रकरण दाबले गेले काय
आंबेघर गावातील लोकांना शासनाकडून काही मदत देण्यात आली का ? आली असेल तर ती मदत कोणत्या स्वरूपाची होती. त्या तालुक्यातील सामाजिक संघटना. सेवाभावी संस्था युनियन. मान्यवर नेते पुढारी खासदार आमदार यांनी काय केल आंबेघर गावांसाठी त्यांना पर्यायी जागा. घर बांधणीसाठी साहित्य. रेशन अन्न धान्य. कापड. जीवनावश्यक वस्तू. अन्नदान. आहार किट दिली का.मयत व्यक्तिंना आर्थिक मदत देण्यात आली का ? नाही म्हणजे घटनास्थळी जाऊन भेट देण्यापेक्षा मदत काय दिली आपल्या प्रत्येक जिल्ह्याला बरेच आमदार खासदार मंत्री लाभले आहेत पण. मदत करणारे लोक आज दिसायची बंद झाली जनता मनातून ओरडत आहे भेट दौरे करण्यापेक्षा. फोटो काढण्यासाठी निवडणूक भांडवल नको तर जनतेचे शुभचिंतक म्हणून रस्त्यावर या हे आत्ताच संपल नाही दरवर्षी असे विविध प्रकारचे पूर येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या जिल्ह्यात आमदार आहे तेथे विकासाचा अनुशेष आहे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९