मानवसेवा प्रकल्पातील निराधार मातेचे सासरी पुनर्वसन
सासरला आशाची रितीरिवाजाप्रमाणे संस्थेने केली पाठवणी
खडतर प्रवास थांबवून, मानवसेवेने तिच्या सुखी संसाराची केली सुरुवात
•••••••••••••••••••••••••
अहमदनगर - डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले, कुठे जाणार?, कशी जगणार? अशा अनेक प्रश्नांचा सामना करीत तिला प्रत्येक प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नव्हता. तिला फसवण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी जाळे टाकले, दलालांच्या जाळ्यात ती अडकत गेली. तिला अनेकदा शोषणाला बळी पडावे लागले. त्यातुन तिला निष्पाप जीव जन्माला आला आणि तिच्याबरोबर त्यांचीही वनवन सुरू झाली. अशा वाईट परिस्थितीमध्ये ते बाळ मृत्यू पावले. या खडतर प्रवासात तिचा जगण्याचा संघर्ष सुरुच होता. नातेवाईकांनी तर तिला केंव्हाच परकं करून सोडलं होत. आई-वडीलांच्या मृत्युनंतर तिला आश्रय घेता येईल, अशी एकही जागा शिल्लक नव्हती. जोडीदाराच्या रूपात तिला चांगला पति मिळाला. दोघांनी संमतीने लग्न केले. काही महिने चांगले सोबत घालवले. पण नंतर भुतकाळाने पुन्हा तिच्या मनात जागा घेतली आणि ती मानसिक रूग्ण बनली. घरात कुणाला काहीही न सांगता ती मानसिक संतुलन बिघडल्याने घर सोडून गेली. पुन्हा तिच्यावर अत्याचाराचे प्रसंग ओढवले अन ती गर्भवती राहून बाळ जन्मास आले. बाळाबरोबर अहमदनगर शहराच्या गल्ली बोळात, रस्त्यांवर, दारोदारी व बसस्थानक परिसरात ही आशा (बदललेले नांव) फिरु लागली. या निराधार महिला मनोरुग्णास श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाने आधार दिला. तिच्यावर उपचार करुन बरी झालेल्या आशा तिच्या कुटुंबीयांनी स्विकार केला नाही. मात्र पतीचे समुपदेशन करुन आशाला सासरी पुनर्वसन करण्यात आले. जशी माहेरवरून मुलगी सासरला पाठवतात त्याच रितीरिवाजाप्रमाणे साडी-चोळी देऊन तिची पाठवणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. अंगावर शहारे आणणारा व थक्क करणारा आशाचा खडतर प्रवास थांबवून, मानवसेवेने तिच्या सुखी संसाराची सुरुवात करुन दिली.
निराधार मनोरुग्णाच्या अवस्थेत शहराल आलेली आशाचे अतोनात हाल झाले, विचार शक्ती हिरावून बसलेल्या महिलेचे काही नरधमांनी शोषण केले. निष्पाप बाळासह शहरात आलेल्या या निराधार मनोरुग्ण महिलेची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वन स्टॉप सेंटर कडून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली. वाईट प्रवृतीबरोबर चांगली प्रवृत्तीही जन्म घेत असते, याप्रमाणे बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात वन स्टॉप सेंटर मार्फत पिडीत आशा 3 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल झाली.
मानवसेवा प्रकल्पात तिला हक्काचा निवारा मिळाला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने पिडीत महिलेवर उपचार करुन तिचे समुपदेशन करण्यात आले. आशा हळू हळू मानसिक आजारातून सावरत होती. हरवलेली स्मरणशक्ती हळूहळू मिळत होती. आठवणार्या सर्व घटना संस्थेचे समुपदेशक सुशांत गायकवाड व स्वयंसेवकांना सागत होती. पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची तिच्या आशा पल्लवीत झाल्या. अतिशय खेळीमेळीने मानवसेवा प्रकल्पात ती राहत होती. मानसिक आजारातून पुर्ण बरी होताच आता चुलते, मावशी आणि जवळचे नातेवाईक स्वीकारतील अशी अपेक्षा निर्माण झाली. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी महिला स्वयंसेवकांसह आशाला व तिच्या बाळाला बारामती येथे पुनर्वसनासाठी घरी पाठवले. मात्र तिचे कुटुंबीय आशाला स्विकारण्यास तयार नव्हते. पती तिला स्विकारेल की नाही, या चिंतेने ती पतीची माहिती सांगत नव्हती. मात्र प्रकल्पातील महिला कार्यकर्त्या सुरेखा केदार यांनी समुपदेशन करुन तिच्या पतीकडील माहिती मिळवली. आशाच्या पतीची माहिती मिळताच दिलीप गुंजाळ यांनी तिच्या पतिकडे संपर्क साधून चर्चा व समुपदेशन केले. नगर तालुक्यातील एका युवकाशी तिचा लग्न झाला होता. संस्थेने त्याच्या पतीची व तिला सांभाळण्याची पुर्ण खात्री करुन घेतली. यानंतर पती व सासरच्या लोकांचे समुपदेशन करुन पतीने तिचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला. पतीबरोबर तिचे सुखी संसार थांटण्यासाठी मानवसेवा प्रकल्पाने आशाचे पुनवर्सन केले.
आशाच्या पुनर्वसनासाठी सर्व देणगीदार, मार्गदर्शक डॉ. अनय क्षिरसागर, संजय शिंगवी, अॅड. जयदिप देशपांडे, अविनाश मुंडके, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, शशिकांत चेंगेडे, डॉ. अविनाश मोरे, महेश पवार, शारदाताई होशिंग, डॉ. सुरेश घोलप, पत्रकार सुधीर लंके, अतिक शेख, योगिता मुथा, भरतभाऊ बागरेचा, स्वप्निल कुलकर्णी, नागराज बडगेरी, प्रदीप पेंढारे, अॅड. वृषाली तांदळे, धिरज तनपुरे, सागर खेत्रे, शिवदास चव्हाण, रेलफोर फाउंडेशनचे नितीन घोडके, रीचर्डस प्रा. लि.चे रोहीत कर्नावट, कोहीनूरचे अश्वीन गांधी, मनोज गुगळे, अभिजित काळे, सुधीर लांडगे, किरण गवते, अॅड. संतोष गायकवाड, उज्वलाताई बागवाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. संस्थेचे स्वयंसेवक सुरेखा केदार, अविनाश पिंपळे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, रोहन नायडू, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, शुभांगी माने, पल्लीवी हिवाळे-तुपे, श्रीकांत शिरसाठ, मच्छिंद्र दुधवडे, ऋतिक बर्डे, प्रसाद माळी, अनिल दुधवडे यांनी उपचार समुपदेशन आणि पुनर्वसनाकरीता परिश्रम घेतले.
*मानवसेवा प्रकल्प*
०२४१-२४२९९४२
No comments:
Post a Comment