श्राध्द - अंधश्रद्धा

 


श्राध्द - अंधश्रद्धा

         देव भावाला भुकेला असतो. जो मनुष्य ज्या भावनेने देवास भजतो तशा स्वरूपात तो व्यक्त होतो मनुष्याची चित्तवृत्ती जशी असते तसे त्यास फल प्राप्त होते. परलोकातही त्यास तशीच गती मिळतो. गुरू. ब्राम्हण. देश. देव. गोमाता. महिला. कुमारी कन्या. बालक. यांचें रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आज कुठेही बघायला मिळत नाहीत 

जल पूर्ण. कुंभ दान. अन्नदान. तिलदान. दक्षिणादान. धान्य दान. गायीला चारा देणे. केवळ पिंडदान करणे. स्नान तिलांजली दान. श्राध्द तिथीस उपवास करावा. श्राध्द दिवशी श्राध्द विधी व विधीचे मंत्र वाचन. 

                         मरणानंतर जीवाला सदगती मिळावी म्हणून अंत्येष्टी करतात. दहाव्या व बाराव्या दिवशी अनेक धार्मिक विधी धर्माच्या रिती रिवाजाप्रमाणे करतात. श्राधदे करतात ती दर महिन्याला व दर वर्षी करतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद वध पक्ष. तो काळ पितरांना उद्देशून करावयाच्या धार्मिक विधीसाठी नेमून दिलेल्या आहे. श्राधदाची परंपरा हिंदू धर्मात पुरातन काळापासून आहे. तशीच ती जैन पारशी. मुस्लिमांना. ख्रिश्चन. वगैरे धर्मातही आहे मूळ श्रध्दा अशी आहे की आपण भूलोकात काहीतरी संकलपूरवक त्याग केला पूजा केली. हवन केले तर भुवलोक. स्वर्गलोक आदि सुक्षम लोकातील मृतांना ते मिळेल व त्यांच्या ईच्छा तृप्त होऊन ते अधिक उच्च स्थितीत पोहचतिल याबाबत क्रियाकर्म काय करावे यात फरक असतो पण मूळ भावना व हेतू एकच असतो. 

            आपल्या जवळची प्रिय व्यक्ती मरण पावलयास त्याची आठवण व त्याची आवड निवड जपण्यासाठी व त्यांना ध्यानात आणून त्याची आठवण म्हणून आपण भाद्रपद महिन्यात पितृपक्ष म्हणून साजरा करतो. जीवन पणी आपले पिता / आजा / पणजा /पितृत्रयी / आई/ आजी / पणजी /पितयाकडील. / सावत्र आई/आईचा पिता /आजा/ पणजा /आईची आई/पत्नी/मुलगे/मुली/काका /मामा/भाऊ / आत्या/ मावशी /बहिण /सासरा /गुरू/ शिष्य/आप्त या सर्वांचे आपण पितृपक्षात श्राध्द करतो पण विचार केला तर जीवन असेपर्यंत आपण त्यांना काय वागणूक देतो. माझ्या आई वडील यांना हे आवडते ते आवडते जीवंत असताना त्यांना कधी विचारलें नाही आणि आज त्यांच्या तिस-या विधीला सर्व पदार्थ आणून ठेवले जातात काय उपयोग आहे का? ज्यांना आपण जगविणयाचे कर्तव्य बजावणयाची गरज होती त्यांनी आपल्या आप्त यांना निराधार केंद्र. वृध्दाश्रम. येथे सोडले आणि आज त्यांच्या नावाने श्राध्द घालून लाडू जिलेबी व अन्य खाद्यपदार्थ यांचें भोजन लोकांना वाढले जाते म्हणजे जे अन्न अन्न जेवन जेवन करून उपाशी मेले त्यांच्यासाठी आज श्राध्द या नावाने महाभोज घातला जातो तो सुद्धा आम्ही आमच्या आपतावर किती प्रेम करत होतो हे दाखविण्यासाठी श्राध्द मोठे मोठे जेवन घातली जातात. ज्यांना कधी सन्मानाची वागणूक मिळाली नाही. वेळोवेळी आपल्या मुलांकडून व इतरांकडून अपमान सहन करावा लागला. आपल्या आप्त लोकांना आपण शिव्या घातल्या. माराहन केली. मग कशासाठी. वरच प्रेम दाखवितात लोक मला कळत नाही ? जे आपले आई वडील आप्त यांनी स्वता मिळेल ते काम करून स्वता उपाशी राहून आपणांस पोसले तेच उपाशी मेले तर कशासाठी पितृपक्ष साजरा करायचा प्रश्न पडतो मोठा ? 

        मरणानंतर जीव वासनामय व मनोमय कोशात असतो त्यावेळी त्याला. वासना. इच्छा. विकार. असे सर्व असतें पण वासना तृप्त करून घेण्यासाठी शरिर हे एक साधन असते ते मरणार या व्यक्तिला नसते. जर उच्च राहणीमान असणार्या लोकात ईच्छा आकांक्षा पूर्ण होणे शक्य असतें. मयत व्यक्तिंना मोक्ष मिळत नाही. त्यामुळे मयत होणारा म्हणजे. अपघातात. आत्महत्या. फास. जळणे. किंवा इतर मार्गाने. जीवाचा अंत करणारे. मोक्षासाठी. भुलोकावर फिरण असतांत. म्हणजे ते भूत होतात असे आपल्या मनात घर करून बसले आहे. मेल्यावर माणूस स्वर्गात जातो की नरकात हे कोणी पाहिले आहे का. ? जीव गेल्यावर मृत शरीर जाळले काय आणि पुरले काय मृत शरिराला काय कळणार. ? नरक आणि स्वर्ग हे माणसाला एक चांगल वाईट काम करण्याची दहशत मनांत असावी म्हणून रचना करण्यात आली आहे. कोण स्वर्गात गेला कुणी बघितलं आहे का. ? ‌‌कोण नरकात गेला काय माहित आहे का ? मग आपणांस प्रिय असणारी व्यक्ती भुत होते काय. ? हे सर्व आपल्या मनाचा वहेम आहे जसं आपण कर्तव्य केले आहे भविष्यात त्याचे फळ तसेच मिळणारं. हा निसर्ग नियम आहे. आपण संपत्ती साठी काहीही संबंध नसणारे लोक यांच्याशी आपला संबंध जोडतो. रोज हजारों निराधार मरतात. त्यांचे श्राध्द कोण करत काय ?  

              श्राध्द कोणी करावे त्यासाठी कोणाला बोलविणे योग्य ब्राम्हण न मिळाल्यास जो असेल तो चालतो. पण मला एक कळत नाही. आपणच. श्राध्द. सत्यनारायण पूजा. व विविध शुभ अशुभ कार्य करण्यासाठी ब्राम्हण यांना बोलाविले जाते मग. ब्राम्हण यांच्यात मयत झाल्येलया लोकांचे श्राद्धाचे जेवन महाभोज घातलेला मी आजपर्यंत बघितला नाही तुम्ही बघितला आहे का ? त्यांच्यात कोणत्याही शुभ अशुभ कार्यक्रमात तुमच्यापैकी कोणी जेवला आहे का ? म्हणजे यांच्यासाठी हे कर्म करणे गरजेचे नाही ते फक्त आपणासाठी आहे. यांना प्रथम भोजन. काळे तीळ. सातू. सुपारया. गंध. पांढरी फुले. तुळशी माका. धुप. तीन ताम्हणे. पळी पंचपात्र तांब्या. दरभ. काजल. मध. पाट. केळीची पाने. द्रोण तुप. स्वयंपाक. गोपीचंदन. जातवे लोकटिचे वस्त्र व. यथाशक्ती दक्षिणा. आणि मयत व्यक्तिला आवडणारे जेवन करावे असे सांगितले जाते. म्हणजे वरील सर्व वस्तू कार्यक्रम झाल्यावर गोळा करून नेणारे यांच्या मागें कधी भूत लागलें आहे का ? श्राद्धाला येणाऱ्या खर्चाचा पेक्षा जास्त दक्षिणा द्यावी. अस सांगितल जाते. 

        श्राद्धात काय करु नये यांवर सुध्दा हे कार्य पार पाडणार या लोकांनी बंधने घातली आहेत. संध्याकाळी. रात्र व सकाळचा संधिकाळ या वेळा श्राद्धासाठी वर्ज्य आहेत. हे सुद्धा आपण आपल्या सवडीनुसार केले आहे. घरतच किंवा तळमजला. किंवा भाड्याने जागा. असावी. जमीन स्वच्छ सारवलेली आसावी. आपले आप्त यांना मरताना झोपायला जागा नाही होती ती कोपरयात अंगावर फाटकी चादर. अंगावर फाटकी कपडे. आणि आत्ता हे काय नविन. फरशी स्वच्छ पुसलेली असावी. किडा मुंगी नसावी. मळलेली नसावी. आत्ता एक खर सांगतो आपले आप्त कीडा मुंगीत झोपले. रात्री मरून पडलेली लोक मी बघितले आहेत त्यांना मुंग्या सुध्दा लागल्या होत्या काहिजण एका जागेवर पडून असल्यामुळे किडे पडलेले मी बघितले आहेत लोक ह्यो मरण मेला तर बरे होईल कोण सेवा करायच याची. आणि आत्ता बघा ? श्राद्धा दिवशी भिकारी यांना भिक देऊ नये आणि ब्राम्हण लोकांना दक्षिणा दिली तरी चालतें. रांगोळी काढू नका. माळा. गजरा. शृंगार यांवर बंधन आहे. श्राध्द धर्माकडे धार्मिक पणाने लक्ष द्यावे गप्पा मारु नये. अमंगल बोलू नये. आणि श्राद्धाचे जेवन ब्राम्हण जेवलयाशिवाय घरातील लोकानी जेवन करू नये असा नियम नाही भेद कसा पेरला गेला आहे बघा रजवल महिला. वांझ महिला. कुषटी. अन्य कुळातील स्त्री. ब्रम्ह हत्यारे. पापी. पशु. घंटानाद. अश्व सानिध्य. अपंग. काणा. नोकर. यांना टाळावे असे सांगितले जाते मग विचार करा मयत यांच्यातील कोण असेल तर त्याचे श्राध्द करणे योग्य आहे का? चालतें कारणं मयत खात नाही त्याच्या नावाखाली आपणच भुत हे खातो. महिला कुळ याचा भेदभाव येथे सुद्धा केल गेला आहे विचार करा ? 

              गुरू अथवा राजा यांच्यापासून लपवून दृष्य कृत्य केली तर यम धरमाकडून त्यांना शिक्षा होते. वायफळ बडबड करणारा. धेनूसाठी खोटे बोलणारे. मुके होतात. ब्रम्ह हत्या करणारे क्षयरोगी होतात. पुस्तक चोर अंध होतो. ब्राम्हणास शिळे अन्न देणारा कुबडा होतो. मधयपी. काळया दातांचा. सोने चोर. कुनखी. गुरु पत्नी बरोबर समागम करणारा. दोष युकत त्वचा असणारा असतो. दान दिल्याशिवाय खाणारा अपतयहीन असतो. सखया भगिनीशी संग करणारा मनुष्य षंढ असतो. प्रतिज्ञा करूनही विप्रास धन न देणारा गिधाड होतो. ब्राम्हणांची निंदा करणारी कासव होतो. अग्नी पदस्पर्श करणारा मांजर होतो. पूर्व जन्माची फळे भोगावी लागतात हे मला पटत नाही. आणि जी कर्म भोगायची राहली आहेत त्यांचा जन्म नीच योनीत होतो म्हणजे वरील प्रमाणे सर्व मुद्दे आपणास चांगल वाईट रस्ता दाखवतात फक्त याचा वापर आचरण असे करावे याचा आपण विचार करण्याची गरज आहे 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या