महिला बचत गट आणि शेळी पालन

 



महिला बचत गट आणि शेळी पालन 

        विशेष केंद्रिय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणेसाठी शासनाने सन २०१४/२०१५ करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत शेळी पालन ही योजना शासनाकडे प्रस्थापित करण्यात आली होती. केंद्र सरकारने विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर अनुदानातून १० शेळ्या व एक बोकड ही योझना राबविण्यासाठी सन. २९१४/१५ करिता ५ लाख निधी मंजूर केला आहे सबब शेळी पालन माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून गटांचे बळकटीकरण. महिला. सबलीकरण. महिला सक्षम. करण्याच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. महिलांना ५०/ टक्के आरक्षण बरोबरच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यामध्ये नोकरी विविध लहान लहान उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय कमी व्याज दराने कर्ज योजना. त्यातच सर्वात मोठा आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी. सबलीकरण. यासाठी. सर्व ग्रामीण व शहरी भागात महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातच सर्वात महत्वाची योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात येते ती म्हणजे बचत गटांना शेळी पालन करण्यासाठी भरिव स्वरूपाचे अनुदान शासन उपल्ब्ध करून देत आहे. 

        आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक केंद्रिय २०१९ / प्र क्र २९/का १९ मंत्रालय मुंबई ४०००३२ दिनांक १/१/२०२१ रोजी. जनजाती मंत्रालय नवी दिल्ली यांचें पत्र. क्र. F no. ११०१५/०३/(१३) /२०१४/ दिनांक १९/०६/२०१४ आदिवासी विकास विभाग शासन निर्णय विकेस २०१४/ प्र क्र ७८/ का १९ दिनांक १७ मार्च २०१५ व २८/ मार्च २०१५ आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी जनजाती साठी विविध योजना राबविल्या जातात आदिवासी बांधव मुख्यत्वे डोंगरमाथा. दर्या. डोंगर. अति दुर्गम भागात वस्ती करून राहतात व त्यांची उपजीविका पावसावर आधारित शेती व तत्सम व्यवसाय तसेच वन उपज यावर अवलंबून आहे. मुख्यत्वे पावसावर शेती करत असल्यामुळे प्रत्त्येक वर्षी शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल याची हमी नसते परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुटुंबासह स्थलांतर करावे लागते. शेतीबरोबरच शेतीशी निगडित जोडधंदा केल्यास त्यांना निश्चित उत्पन्नची हमी मिळू शकते. आदिवासी भागात जोड व्यवसाय म्हणून मुख्यतः शेळी पालन केले जाते. शेळी पालन करण्यासाठी जास्त जागेची व भांडवलाची गरज नसते. हा व्यवसाय निश्चित उत्पन्न मिळवून देणारा आहे. या व्यवसायाशी मुख्यत्वे महिला वर्ग निगडित आहे. यास्तव महिला बचत गटांना. १० शेळ्या व एक बोकड यांचे एक युनिट दिल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन बचत गट. बळकटीकरण. सबलीकरण. सक्षमीकरण. होण्यास मदत होईल तसेच त्यांचे स्थलांतर देखिल कमी होईल 

          महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्षमीकरण करण्यासाठी बकरी पालन माध्यमातून बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे त्यांचे स्थलांतर. पैशांची चणचण. भागावी. हे सर्व कमी करण्यासाठी या केंद्र शासनाच्या कार्यक्रम अंतर्गत मंजूर. १० शेळया एक बोकड यांचे साठी केंद्राकडून ५ लाख अनुदान या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनांना या निर्णयाद्वारे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट क्रमांक १ नुसार मंजूरी प्रधान करण्यात येणार आहे. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत तरतुदी मर्यादेत योजना राबविण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेमार्फत त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करणे अधिकारी व कर्मचारी यांना बंधनकारक आहे

             शासनाचे धोरण आहे ते म्हणजे महिला सक्षमीकरण सबलीकरण. बळकटीकरण. हे आहे पण आज बचत गटांच्या नावाखाली. राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रकार दिसत आहेत म्हणजे शासनाच्या योजनांचा आपल्या राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वापर करणारेही आज आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे मूळ उद्देश मागेच राहत आहे

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

सर्व मुस्लिम बांधवांना आपल्या मुलाच्या साठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून शिष्यवृत्ती योजना मिळत आहे. शिक्षण कर्ज योजना सुध्दा चालू आहे आपणच मागे का. आजच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ या कार्यालयाला भेट द्या. आणि आपल्यासाठी शासनाने दिलेले अनुदान याचा लाभ घ्यावा

वणवा वणवा वणवा

 


      वणवा वणवा वणवा

        वृक्षारोपण महाराष्ट्रात सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम वर्षे १९८२ पासून सुरू करण्यात आला ग्रामीण जनतेची जळाऊ लाकूड औषधी वनस्पती. इमारती लाकूड. जनावरांना वैरण. या गरजा भागविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाची महत्वाची आहे रस्ते लोहमार्ग. कालवे. नद्यांचे प्रवाह. शाळा महाविद्यालय. शासकीय मालकीची मोकळी जागा. नापीक क्षेत्र वैयक्तिक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकडून सुमारे ५३० हेक्टर व १'७१६ किलोमीटर सामूहिक जमीनीवर १६;१२ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती खाजगी जमीनीवरील वृक्षारोपण साठी सुमारे ७३ लाख रोपे शासनाकडून पुरविण्यात आली होती सामाजिक वनीकरण विभागाकडून २२ लाख रोपांची लागवड सुमारे ४३२ हेक्टर व १'११० कि मी सामुहिक जमीनीवर करण्यात आली होती आणि त्यासाठी खाजगी जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी १६ लाख रोपे पुरविण्यात आली होती

(१) महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना

(२) महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण

(३) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम

(४) राष्ट्रीय बांबू अभियान

(५) निवडलेल्या पाणलोट क्षेत्रातील वनेतर सामुहिक जमीनीवर वृक्षारोपण वृक्ष लागवड वृक्षारोपण हा वीस कलमी कार्यक्रमाचा एक भाग असून अंमलबजावणी मुख्यतः वन विभाग म वि वि म व सामाजिक वनीकरण संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येत आहे राज्य शासनाने दरवर्षी जिल्हा परिषद. ( कृषी व शिक्षण विभाग ) तसेच इतर विभाग ( वन औधोगिक सा बा वि जलसिंचन विभाग ) यांच्या मदतीने शंभर कोटी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या वनस्पती पशू पक्षी व इतर प्राणि संरक्षण करणे आवश्यक आहे कारणं राज्यांमध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचया फक्त १७/ टक्के क्षेत्र वन आच्छादन आहे राष्ट्रीय धोरणानुसार राज्यांमध्ये एकूण जमीनीच्या ३३ '३३ टक्के वन आच्छादन असायला हवे यासाठीच उपलब्ध असणाऱ्या वनस्पती पशू पक्षी यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे 

*सामाजिक वनीकरण करण्यासाठी खालील काही वृक्षांचा वापर केला जातो

त्यात औषधी व जळाऊ लाकूड इमारती बांधण्यासाठी वापरात येणारे जनावरांना चारा वैरण इत्यादी बाबींचा विचार करून लागवड करण्यात येते

जांभूळ. आंबा. हिरडा. उंबर. बेहडा. करंबळ. करप. करंज. वेहळा. तेल्या. चांबळ. बोंड. खुळखुळा. भूतमारी. चिंगरी. रामेठा. आंबिरी. रानदवान. तमालपत्र. दारुहळद. आंबोली. भालवण. चंद्रिका. अजंन. सांबार. असेना. मोमा. पिसा. ऐन. शिवन. कुंभी. कटक. ओंब. आवळा. कारवी. कढीपत्ता. चिललार. वावडिंग. गारंबी. पांढरी फुले. रानजाई. लता वेली. करवंदे जाळी. लिंब. बिब्बा. निंबाणी. तरवड. बेल. चाफा. केवडा. हाडका. वेत. गेळ. काजू. काळवान. कोकम. नाना. माहरुख. घाणेरी. डोंगरी मारवेल. शिशू. खैर. बाभूळ. बोर. हिवर. निलगिरी. निवडूंग. सादड. नागफणी. कुसाळी. भुरी. अडुळसा. मोगली. मगली एरंड. देवकांचन. पांडल. तेंदू. पांढरा कुडा. मोह तिवस. अंजन. धावडा. सालाई. बांबू. काटेसावर. रोहन. करम. कुडा. हळद. पिंपली. डिकमली. मुरडशिंग. रान तंबाखू. रानतूर. रान आले. रानद्राक्ष. बिदारी. धामन. दोंडा. बेकोठवेल. बिटुकली. वाघकेवढा. बेडशिंग. वरील प्रमाणे सर्व वनस्पती औषधी व कोणत्या ना कोणत्या तरी उपयोगाच्या आहेत यामुळे सम हवामान. जमीनीची धूप कमी. पाणीपुरवठा यामध्ये वाढ. खते. चारा वैरण. जंगल व्यवसाय. इत्यादी फायदे आपणास मिळतात. आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे या जंगलात वनात राहणारे विविध हिंस्र व अहिंसक प्राणी. आणि आपल्या मनाला संतोषजनक वाटावा असा आवाज काढणारे पक्षी. आणि जंगल वन यांना उंदीर व अन्य उपद्रवी प्राणी यांचे पासून संरक्षण करणारे सरपटणारे प्राणी. आत्ता आपण ठराविक प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी यांची माहिती बघू

  शेकरु. उदमांजर. तरस कोल्हा. भेकर रानडुक्कर. बिबळा. चितळ. रानमांजर. पिसुरी. हरण. साळींदर. खवल्या मांजर. वानर. रान मुंगूस. नाग. धामन. अजगर. सरडा मांडूळा. रानपाली. ननाटी. हरणटोळ. विरूळा. रानगवा. अस्वल. पटटेवाले वाघ. सायाळी. ससे. काळवीट. खोकड. नीलगाय. रानकुत्रा. पारंग. चिंकारा. सिंह वाघ. चित्ता.

घोणस. वृक्षसरफ. मण्यार. घोरपड. सापसुरळया. घुबड. हत्ती. चौशिया. ढाण्या वाघ. लांडगा. वरील प्रमाणे सर्व प्राणि एकामेकावर अवलंबून असतात म्हणजे एक जीव दुसर्या जीवाला मारून खातो पण सर्व प्राणी एकसारखी संख्या आपणास बघायला मिळते वाघ सिंह चित्ते. इतर प्राण्यांना खातात पण वाघ सिंह चित्ते यांना कोण खात नाही तर आज आपल्या देशातील जंगलात वनात सगळे वाघ सिंह हत्ती चित्ते का झाले नाही आपणास आज वाघ सिंह वाचवा ही मोहीम राबवावी लागली नसती आत्ता पक्षी 

 स्वर्गीय नर्तक. वनकपोत. पारवे. बुलबुल. तांबट. सुतार. हसरा. कस्तुरी. मोर. धनेश. रानकोंबडी. कोतवाल. सापमार. गरुड. ससाणे. कोकीळ. फुलटोचया. सातभाई. रातवा. कृष्ण गरुड. घारी. गिधडे. सुभग. मधमाशी किटक. दयाळ.कांचन. चंडौल. खंड्या. खाटीक. ससाणे. माळढोक. वंचक. बगळे. पाणकावळा. बदक. काळा वेराटी. पोपट. कापशी घार. टाकचोर. सुरयपक्षी. हळव्या. मोरबगळा. बगळया. नयनसरी. चक्रांग. मैना. भारद्वाज. वेडा. लोहोर. पिंगळा. धोबी. शिंजीर. वरील प्रमाणे सर्व माहिती दिली आहे काही बाकी राहिली असेल

*महाराष्ट्रातील वने व अरण्ये

(१) उष्ण कटिबंधातील सदाहरित जंगले

(२) उष्ण कटिबंधातील निमसदाहरित अरण्ये

(३) उप उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये

(४) उष्ण कटिबंधातील आद्र पानझडी अरण्ये

(५) उष्ण कटिबंधातील रूक्ष पानझडी वृक्ष अरण्ये

(६) उष्ण कटिबंधातील काटेरी अरण्ये

*महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

(१) ताडोबा राष्ट्रीय उद्यान

(२) पेच राष्ट्रीय उद्यान

(३)!गुगमाळ राष्ट्रीय उद्यान

(४) नवेगाव राष्ट्रीय उद्यान

(५) बोरिवली राष्ट्रीय उद्यान

(६) चांदोली अभयारण्य राष्ट्रीय उद्यान

(७) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान

(८) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

वरील ही सर्व संपत्ती आपणास मिळाली आहे आपण भाग्यवान आहोत गत काळात लोकसंख्या कमी होती त्यामुळे लोकांना प्राणी पक्षी कीटक यांना जागा कमी पडत नव्हती आत्ता लोकसंख्या वाढत गेली आणि जागोजागी सिमेंट जंगले धरणे बंधारे यामुळे बेसुमार वृक्षतोड झाली आणि माणसाने प्राण्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला त्यामुळे काही प्राणी पक्षी कीटक नामसेस झाले वृक्षांची तस्करी झाल्यामुळे औषधी वनस्पती यांचा र्हास होण्यास सुरुवात झाली 

          यापेक्षा वेगळे आणि ह्रदय हेलावून टाकणारे प्रकार माणूस करायला लागला वेळ पडल्यास जंगले वने अरण्य अभयारण्य यामध्ये आग लावायचे महापाप माणुसानेच कले आणि मोबाईल टॉवर यातून निघणारा ध्वनी तरंग उठत असतात त्यामुळे पक्षी प्रजनन होण्यासाठी मोठा अडसर पैदा झाला आणि पक्षाच्या नामवंत जाती नामशेष झाल्या वन अरण्य जंगलात जर आग लागली एक भयानक वणवा पेटतो आपल्या नैसर्गिक सौंदर्याने डोंगर कपारी उजळवणारे वृक्ष आपल्या मंजूळ आवाजाने सर्व परिसर मंत्रमुग्ध करणारे पक्षी पशू. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर काय होत असेल जीवाच हाल आपल्या अशा वागण्यामुळे आज बरिच वन जीव. आणि वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे आपण बोलू शकत नाही 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बांधकाम कामगारांना सुरक्षा द्या - चांद शेख

 


सांगली -

आज दि २०/८/२०२१ रोजी सांगली येथे बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे व जिल्हा अध्यक्ष चांद गफुर शेख. यानी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी सुरक्षा संच व अत्य आवश्यक सुरक्षा संच. बांधकाम कामगार यांच्यात कामांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबांची सुरक्षा ध्यानात घेवून मंडळाने. कामांवर सुरक्षित काम करणेसाठी. हेल्मेट. बुट. सुरक्षा बेल्ट. बॅटरी. मच्छरदाणी. चटयी. जेवणाचा डबा. हॅणडगोलज. चार्जर. पेटी. अशा विविध वस्तू बांधकाम कामगार यांना मोफत देण्यात येतात. सोबत बांधकाम कामगार यांची अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत कामगार यांच्या विविध मेडिकल तपासणी करण्यात येते. कामांवर असताना बांधकाम कामगार आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून बांधकाम कामगार यांना विविध प्रकारचे सहकार्य केले जाते 

                आम्ही आज किट वाटप केंद्राला भेट देऊन किट वाटप व आरोग्य अभियान या संबधि विचारपूस केली. त्यावेळी सर्व कर्मचारी यांनी अगदी सरळ व साध्या सोप्या पद्धतीने आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली

मनाला घोर लागलाय

 


मनाला घोर लागलाय

          मनुष्य एकाकी राहण्यापेक्षा गटात समुहात राहणे पसंत करतो म्हणून / सामाजिक प्राणी /आहे असे म्हणले जाते या समूह प्रवृत्ती जोडीनेच माणसांमध्ये आपले. खाजगीपणा जोपासण्याची प्रवृत्ती आढळते. माझं छंद माझ्या आवडी निवडी माझे राग लोभ वैयक्तिक असते.  म्हणजे मी समाजांचा घटक असतोच पण याशिवाय सुध्दा वेगळे खास माझे काही खाजगी जीवन असतेच.  अभ्यासाच्या सोयीसाठी सामाजिक किंवा सार्वजनिक विश्व आणि खाजगी विश्व यांचा आपण सुटा स्वतंत्र विचार करतो पण प्रत्यक्ष जीवनात या दोन्ही विश्वाचा एकामेकाशी संबंध येतोच.  पण विवाह पध्दत असो. किंवा विवाहानंतर पती पत्नी संबध वैयक्तिक नसून हे सामाजिक मूल्य मानदंड यांच्या चौकटीत हे खाजगी संबंध आकाराला येतात त्यातच. कुटुंब जात धर्म. भाषा आणि प्रादेशिक अस्मिता.  वर्ग.  भौगोलिक संदर्भ.  शिक्षण.  समाजकारण.  राजकारण.  वशिलेबाजी.   गटबाजी.  गुन्हेगारी.  टोळीयुद्ध गॅगवार.  खून मारामाऱ्या.  अपहरण.  खंडणी.  लुटमार.  श्रध्दा अंधश्रद्धा.  उच्च जाती.  कनिष्ठ जाती.   सदन घटक. दुर्बल घटक.    शिक्षित अशिक्षित.   अन्न समस्या.  रोजगार समस्या.  निवारा समस्या.  आरोग्य समस्या.  सामाजिक सुरक्षितता.   न्यायव्यवस्था.   झोपडपट्टी समस्या.  बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज.  चळवळी.  संपर्क माध्यम फुटिरता.  हुकूमशाही.  घराणेशाही.  राजकीय शिक्षण अभाव. जातीयवाद.   दहशतवाद.  भ्रष्टाचार.  महागाई.   बेरोजगारी.  अशी एक नाही अनेक प्रश्नांनी मनाला घोर लावला आहे आणि सर्वसामान्य जनता गळतीच्या मार्गावर आहे 

             आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी महागाई शिक्षणाचा बोजवारा.  वाढती लोकसंख्या ध्यानात घेता सर्वांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले आहे त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.  सर्वात मोठा फटका बांधकाम कामगार. असंघटित क्षेत्रातील कामगार यांना झाला आहे.  शासनाची योजना मिळेना.  म्हणजे योजना हजार त्यासाठी नेमले दलाल एजंट दोन हजार लुटालूट अधिकार व कर्मचारी यांना हाताला धरून. म्हणजे कामगार कोमात एजंट दलाल कोमात असा प्रकार आहे यामुळे मनाला घोर लागलाय 

           त्यातच राहीली कसर महागाईनी भरून काढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे. भाजी पाला फळं यापासून.  गहू ज्वारी बाजरी मका. अशी खाद्यान्न. विविध खाद्य तेल. कपडे. जागांचे भाव.  बांधकाम मटेरियल.  अशी विविध उत्पादने यांचें दर आज गगनाला भिडले आहेत.  गोरगरीब जनतेला जगणे अवघड झाले आहे.  गाडी जीवनावश्यक वस्तू झाली आहे पेट्रोल डिझेल यांचे दर विचार करायलाच लावतात रोज दर वाढत आहे.  घरगुती वापरासाठी वापरला जाणारा घरगुती गॅस सिलिंडरचा दर तर आठ दिवसाला वाढवतोय.  गरिबांचे थोडी अर्धा गुंठा जागा घेऊन घर बांधण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.  भाड्याने राहणारे घरभाडे परवडत नाही एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपाशी राहतात कारणं बेरोजगारी यामुळे मिळेल ते काम करून सुध्दा दोन वेळच भागत नाही. महागाई भस्मासुर गोरगरीब जनतेला खाऊन टाकणारं यात सुखी कोण असेल तर. शासकीय नोकर.  राजकारणी लोक.  शिक्षण संस्था चे शिक्षक. कारणं यांना कायमचा पगार चालूच आहे.शासन यांना महागाई भत्ता देतय त्यांचं जमलय ?    रेशन वाला अन्न धान्य देत नाही.  आमच बी खातोय सगळ्या गावाचं बी खातोय.  शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बरीच माया गोळा केली आहे.  वयोवृद्ध.  नागरिक. अपंग. विधवा.  निराधार. यांच्या योजना पैसे चारलयाशिवाय मंजूर होत नाहीत  त्यातच राहील साहील रोजची गरज असणारा आपला अविभाज्य घटक म्हणजे  डॉ. यांची बेमाफी फी.  नुस्ता पैसा मिळविण्याचे धोरण. जीवंत माणसांचे वेगळ आहे हे मयत माणसांकडून सुध्दा पैसा वसूल करतात.  यांची आणि मेडिकल यांचे साटेलोटे औषधांच्या किमती मनाला येईल तेवढ्या आणि ज्या डॉ कडे उपचार घेतला आहे त्याचे औषध त्यांनी ठरवलेल्या मेडिकल मध्येच मिळणार. मग डॉ यांचा हिस्सा काढून मेडिकल वाल्यांची मिळकत हे सर्व आपल्या गरिबाकडून वसुली केली जाते   म्हणजे गोरगरीब जनतेला कोणी वाली नाही यामुळे मनाला घोर लागलाय

              शिक्षणाची गंगा घरोघरी सगळे शिकू.  सगळे साक्षर होऊ.  ही घोषणा आज कागदावरच राहिली कारणं. जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या.  आणि विविध राजकारणी लोकांनी आप आपल्या शिक्षण संस्था काढल्या. त्यांना बेमाफी फी घेतली जाते उदा.  सांगायचे असेल तर आज कमीत कमी दोन वर्ष होत आली शिक्षण संस्था बंद आहेत पण आपल्या ध्यानात एक गोष्ट आली नाही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात वर्षांची. शिक्षण संस्थांनी फी भरून घेतली आणि मार्च पासून शाळा कोरोना मुळे बंद करण्यात आल्या. म्हणजे पालकांनी विद्यार्थी यांची भरलेली फी गोळा करून शिक्षण संस्था बंद झाल्या. असे आपल्या महाराष्ट्रात किती शिक्षण संस्था असतील किती पैसा गोळा झाला असेल. काय अंदाज आहे का ? नाही. आत्ता सुध्दा शाळा चालू होणार पण सर्व वर्षांची फी भरून घेतल्यावर मार्च पासून शाळा बंद होणार नाहीत याची कोण जबाबदारी घेतय का ? पालकांच्या कष्टाचा व्याजाने काढून विद्यार्थी यांची फी भरली ती बुडणार नाही याची कोण ग्वाही देतय का ? यातच एक पळवाट काढली ती म्हणजे आॅनलाइन शिक्षण. मोबाईलवर. शाळा घेतात परिक्षा घेतात.  जी मुल शाळेत ११/५/ या वेळेत शाळेत शिक्षकापुढे असून सुद्धा शिकत नाहीत त्यांना मोबाईल शिक्षण कळणार का ? आई बाबा म्हणतंय पोरग मोबाईलवर तास घेतय शिकतय. पण त्या खुळ्या ना काय माहित हे कडव मोबाईलवर गेम खेळतय.  म्हणजे शिक्षणाचा बोजवारा उडाला हे शंभर टक्के खरे आहे का ? काही ठिकाणी मोबाईलला रेंज नाही. तर काही मुलांनी आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल मिळाला नाही घरची परिस्थिती नाही या कारणाने आत्महत्या केली हे सुद्धा आपण बघितल आहे. असच जर सगळ चाललं तर येथून पुढे निर्माण होणारी पिढी खुळी मनोरूग्ण निर्माण होणारं आज दोन वर्ष होत आली शाळेचा आणि मुलांचा संपर्क तुटला आहे आत्ता तीच मुल शाळेकडे वळतील काय ? मला नाही वाटत ? या सर्व प्रकारांचा मनाला घोर लागलाय

            स्पर्धा परीक्षा.  एम पी सी.  यासाठी मुलानी रांत्र दिवस अभ्यास केला. शासनाने आज २०१५ पासून आजपर्यंत मुलांना तारखा द्यायच्या आणि रद्द करायच्या असा लपंडाव लावला आहे.  एम पी सी स्पर्धा परीक्षा.  अभ्यास करणारी मुले सकाळी व्यायाम. करायला उठतात. आणि नंतर अभ्यासिका लावण्याची परस्थिती नसते त्यामुळे कामावर जाऊन घरच्या परिस्थितीला हातभार लावायचा आणि मग त्यातून आपल शिक्षण पुस्तक. या मुलांना खाण्यास सुध्दा त्याच प्रमाणे असतें. एवढ्या खडतर प्रवासाने या मुलांचे जीवन ग्रासलेले असते.  आत्ता एकवेळ एम पी सी परिक्षेची तारिख फायनल झाली. आणि मुलं पुन्हा व्यायाम अभ्यास याकडे वळली आजून सुध्दा भरवसा लागेना परिक्षा होईल की नाही याचा तरीही तयारी करतात ही मुल त्यातच आत्ता परीक्षा तारीख जाहीर झाली जागोजागी स्पर्धा परीक्षा यासाठी लागणारी पुस्तके याची दुकानें सजली. मग काय पुस्तकाचे दर मनाला येईल तसे. लुटायच चालू झालं. ?  आणि सर्वात मोठी लुट केली ती म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केलेल्या सर्व अॅकेडमी. यांची वर्षांची फी ५०/६० हजार रुपये गोळा केले आणि आज दोन वर्ष अॅकेडमी बंद आहे म्हणजे यानी कोट्यवधी रुपये मिळवले आणि आज पुन्हा आपली दुकाने उघडली आहेत ती म्हणजे फी भरून घेण्यासाठी. आज पालकांनी जर समजा आपण फीचे पैसे भरले आणि स्पर्धा परीक्षा वर्ग जर बंद पडले तर आमचें पैसे माग द्यावे लागतील अशी अट घालून पैसे भरा. कारणं आपल्या जिल्ह्याचा विचार करू नका महाराष्ट्रात अशा अॅकेडमी किती असतील कोट्यवधी रुपये हे जर वर्षी आपल्या घशात घालत आहेत यातील काही स्पर्धा परीक्षा शाळा अॅकेडमी राजकारणी लोकांच्या सुध्दा आहेत. सावध व्हा सावध रहा   काही मुल एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झाले २/३/ वर्ष नोकरी नाही त्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याला आपणच जबाबदार आहोत. 

                      शासनाने एम पी सी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वयाची अट घातली आहे. जर समजा. याच वर्षी काही मुलाच वय संपतय त्या मुलानी रांत्र दिवस अभ्यास व्यायाम केला असेल तर त्याचे सर्व कष्ट पाण्यात गेले.वय जास्त असल्यामुळे लग्नाला कोण मुली देत नाही. म्हणजे आई वडील यांनी मुलांच्या नोकरीची वाट बघायची का लग्न करायच ? मोठ प्रश्न आहे    शासनाने या मुलांचा सुध्दा विचार करणे गरजेचे आहे  अशी सर्व मुल मानसिक दृष्ट्या कमकुवत झाली आहेत. मग अशा वातावरणामुळे ही मुले. गुन्हेगारी.  खंडणी. अपहरण. चोरी. लुटमार. अशा मार्गाला लागणार याला शासन जबाबदार आहे.  या एम पी सी स्पर्धा परीक्षा मधील सर्वात वाईट प्रकार आहे तो म्हणजे वशिलेबाजी. यामुळे खरोखरच अभ्यासू मुलं माग राहीली आणि ढ मुल आज विविध शासकीय ठिकाणी नोकरी करत आहेत वाईट आहे. 

            आज प्रत्येक मुलाच्या पालकांच्या मनाला घोर लागला आहे.  कोणाला मुलांच्या नोकरीचा. कोणाला अधिकारी व कर्मचारी यांच्या वागण्याचा. कोणाला आपणांस स्वातंत्र्य दिले आहे पण ते वापरण्याचा अधिकार नाही.  कोणाला हाताला काम नाही.  हातात पैसा नाही त्यामुळे उपासमारी यामुळे आत्महत्या करायची काय याचा   

            जगणं झालं अवघड मरण झालं स्वस्त 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कलेला मिळाला न्याय

 


          कलेला मिळाला न्याय

ज्या प्रमाणे मातीला आकार देणारा कुंभार असतो त्या प्रमाणेच कलेला आकार देणारा कलाकार असतो. समाज प्रबोधन. समाज जागृती. प्रचार प्रसार जाहिरात. करण्यासाठी कलाकारांचा अभिनय विचारात घेता येईल. ज्या प्रमाणे. बॅंड वाले. बॅजो वाले. तमाशगीर. पिंगळे. बहुरूपी. वाघ्या मुरळी. गोंधळी. डोंबारी खेळ करणारे. कडक लक्ष्मी वाले. पारंपरिक मैदानी खेळ. नाटकं पटनाटय चित्रपट. असे एक नाही अनेक कलाकार आपण गेल्या 2020 पासून टाळेबंदी जारी केले मुळे सर्व शुभ कार्य यांवर जमाव बंदी घालण्यात आली होती त्यामुळे या कलाकार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. ज्यांना वाजविणयाशीवाय कोणतेही काम येत नाही त्यांचे जीवन खडतर बनले होते. 

            वेळोवेळी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या सर्व कलाकार यांनी एकत्र येऊन कलाकार संघटन निर्माण केलं आणि वेळोवेळी शासनाकडे पत्र व्यवहार करून त्याचा पाठपुरावा केला आणि शासनाला कलाकार लोकांच्या व्यथा जाणवून दिल्या आणि एक वेळ एक दिवस असा आला की त्या दिवशी शासनाने कलाकार मानधन देण्याचे ठरविले. आणि गोरगरीब कलाकार यांना न्याय मिळाला 

          न्याय मिळाला खरा पण एक शंका आहे ती म्हणजे प्रकाशित साहित्य. लेखणाची कागदपत्रे. कलावंतांच्या कार्यक्रमाची छायाचित्रे. वृतमानपत्रात बातम्या. जाहिराती. आकाशवाणी अथवा. दुरदरशन कार्यक्रमाचे पुरावे. निमंत्रण पत्रिका. प्रापत प्रमाणपत्राची माहिती ज्यात अर्जदार याचा उल्लेख असावा. मला नाही वाटत सर्व कलाकार यांचेकडे वरिल कागदपत्रे असतील. कारणं. गोंधळी कोणीही प्रमाणपत्र देत नाही.बॅडवाले. बॅजोवाले. यांना कोण देणार प्रमाणपत्र. पारावरचा भाकरीसाठी होणारा तमाशा आपण बघितला आहे. त्यावेळी प्रमाणपत्र होत काय. 

            शासनाच्या विविध योजना. पोलिओ. कामगार प्रचार प्रसार. माहीती. जनजागृती. समाजप्रबोधन. रोगराई काळात समाजात प्रबोधन करण्यासाठी शासन विविध पटनायक पथनाट्य करणारी लोक शासनाकडून नेमले जातात. केंद्र/राज्य शासनाच्या साहित्य अकादमी/संगीत नाटक अकादमी /राज्य शासनाचे साहित्य व सांस्कृतिक विषयक पुरस्कार /पश्चिम क्षेत्र किंवा दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र. /सांस्कृतिक कार्य संचालनालय/आकाशवाणी/दुरदरशन साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे पुरावे

       जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या वाड्मयीन विषयक अथवा कलाविषयक नोंदणी कृत सांस्कृतिक संस्थांचे शिफारस पत्र. नामांकित संस्था. नामांकित व्यक्ती. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावा.  

* खालील कागदपत्रांसोबत संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा *   

महाराष्ट्र शासनामार्फत कीर्तनकार,प्रवचनकार,गायक,वादक इ.कलाकारांना महीना 2400/- मानधन सुरू झाले असून आपण छापील फॉर्मवर माहिती भरून द्यायची आहे.

आवश्यक कागदपत्र 

1) रेशनिंग कार्ड झेरॉक्स 

2) आधार कार्ड 

3) शाळा सोडल्याचा दाखला 

4) रहिवासी दाखला 

5) बँक पासबूक 

6) पति पत्नीचा फोटो,पत्नी नसेल तर स्वताचा फोटो 

7)तहसीलदार.उत्पन्नाचा दाखला 

    उत्पन्न 40.000/- च्या आत 

    असावें 

8) कलेचा प्रकार 

9) सन 2010 च्या आतील कलेचे पुरावे.उदा.कार्यक्रम पत्रिका,पुरस्कार चिन्ह,सत्काराचे फोटो इ.

10) शिफारस पत्र, 

       वारकरी प्रबोधन समिती 

       महाराष्ट्रराज्य.आणि 

       ,खासदार,आमदार,जि.प.सदस्य,प.स.सदस्य,सरपंच,नगरसेवक.( किमान 2010सालाच्या आतील वारकरी संस्था रजिस्टर असावी )

11) सरकारी लाभ मिळत नसल्याचे नोटिस 100/- रु.च्या स्ट्यम्पपेपरवर लेखी.

12 ) वयाची अट किमान 50 वर्षे 

13) सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी 3 झेरोक्स,झेरोक्स सत्यप्रत असावी 

14) पंचायत समिती समाज कल्याण खाते या विभागात कागद पत्रांची पूर्तता करून पोच घ्यावी 

       हा सर्व विषय नविन नाही याअगोदर सुध्दा कलाकार मानधन योजना पंचायत समिती विभागाकडून राबविली जात होती त्यावेळी उत्पन्न अट 48000 हजार होती. लाभार्थी भारतीय रहिवासी असावा. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. यांच्या सक्षम प्राधिकारी यांनी रहिवासी दाखला देणें गरजेचे होते. अर्धांग वायू. क्षय रोग. कर्करोग. कुष्ठरोगी. शारीरिक व्यंग. किंवा अपघाताने अपंगत्व आल्यास. जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय प्रमाणपत्र. कलेचा प्रकार. कलाकार किती वर्षांपासून या क्षेत्रात आहे.  

         मी असे जाहीर करतो/करते की मी वर दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून सदरची माहिती चुकीची आढळल्यास माझ्या विरुद्ध कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात यावी होणा-या कारवाईस मी पात्र आहे आणि असल्याची मला जाणिव आहे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

 


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना

                शहरांमधील वाढती लोकसंख्या यामुळे तेथे उपलब्ध असणाऱ्या लोकांना पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही त्यातच शहराकडे रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील लोकांचा लोंढा. यामुळे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे वाढती झोपडपट्टी. वाढती गुन्हेगारी. यात होणारी वाढ व लोकांचे कष्टमय जीवन याचा विचार शासनाने करून ज्या त्या भागातील लोकाना त्याच भागात पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी व त्यांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी # महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना # या नावाने योजना राबविण्यात आली. 

              # हरघर गोठे. घरघर गोठे. पाणंद रस्ते. खडीकरण योजना. अशा विविध योजना राबविण्यात येतात त्या माध्यमातून सर्व लोकाना ग्रामीण विकास योजना आणि लोकांच्या हाताला रोजगार हे तत्व आहे. यासाठी शासनाने ( दि ०९ आक्टेबर २०१०)( दि ०१ आक्टेबर २०१६)( दि ०५ नोव्हेंबर २०१८)(दि ०५/०८/२०२०)( दि ०२/०९/२०२०) असे वेळोवेळी शासन जारी केले आहेत त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण मजूरांना रोजगाराची शाश्वती हमी मिळावी व त्या माध्यमातून भत्ता निर्मिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ अन्वये महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे तदनंतर # महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना # अधिनियम २००५ अंतर्गत राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना टप्याटप्याने सुरू करण्यात आली असून दि ०१ एप्रिल २००८ पासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सुचना. / निर्देश संदर्भित शासन परिपत्रक अन्वये नियोजन विभागाकडून देण्यात आलेले आहेत

          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मुलभूत उद्देश ग्रामीण भागातील पौढ व्यक्तिंना अकुशल कामांची मागणी केल्यानंतर कामे उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून सामाजिक पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणे हा ही या योजनेचा उद्देश आहे. सधसथिती राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे घेण्यात येत असून या माध्यमातून सामाजिक सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्यात येत आहे

     सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली कामे ही ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व शाश्रवत विकासाच्या दृष्टीने सहहयभूत ठरली आहे. सधसथिती सुरू असलेल्या कोविड १९ महामारीचया पार्श्वभूमीवर सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवून रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर शेतकरी यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे.

      पुणे जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी हरघर गोठा घरघर गोठा हा उपक्रम अगदी सापेक्ष पणे व यशस्वी रित्या राबविला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी पाणंद रस्ते व इतर रस्ते खडीकरण करणे. दलित वस्ती सुधार. प्रास्तावित केले आहेत. सदर उपक्रम शेतकरयासाठी वैयक्तिक भत्ते निर्माण करण्याबरोबर रोजगार निर्मिती होणार आहे सदर उपक्रम अंतर्गत 

(१) गाय म्हैस यांचेसाठी पक्के गोठे. गवहाण आणि शेण मलमूत्र संचय वेगळी सोय

(२) बचत गटाच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे बांधणे

(३) कुक्कुटपालन शेड ( निवारा ) बांधणे

(४) शेळी पालन निवारा

       इत्यादी मालमत्तेची निर्मिती करणे सदर कामामध्ये केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे अकुशल कुशल प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी प्रतयेक लाभार्थ्यांना गोठ्याच्या कामाबरोबरच बांधावर किंवा क्षेत्रावर कमीत कमी २०/२५ फळझाडे / वृक्ष लागवड करणेसाठी मनरेगा अंतर्गत अतिरिक्त काम करावे लागते. तसेच गावांमध्ये रस्ते खडीकरण कामे हाती यावीत सदर कामाबरोबरच मृद व जलसंधारण गाळमुकत धरणांची कामे घरोघरी शोष खड्डे व घरकुल बांधणे इत्यादी कामेसुद्धा जलसंधारण. इत्यादी कामे या योजनेनुसार हाती घ्यावी

              संदर्भ क्रमांक ५ अन्वये दिनांक २ सप्टेंबर २०२० या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मध्ये म ग्रा रो ह यो अंतर्गत घेण्यात येणार्या महत्वाचा एकूण ९० कामाची मजुरी कुशल खर्च निहाय यादी देण्यात आलेली आहे. सदर यादीतील अनुक्रमांक ७२ मध्ये रस्ता खडीकरण विशेषतः पाणंद रस्ते तयार करणे.या कामाचा समावेश करण्यात आलेला आहे उपरोक्त नमूद कामे घेतल्यास कुशल अकुशल खर्चाचे प्रमाण राखण्यास मदत होते

              सदर योजनेअंतर्गत अभिनव उपक्रमांद्वारे मागेल त्याला काम मिळेल लोकांचे स्थलांतर थांबविले जाईल कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल शेतकरी स्वावलंबी होईल आणि गावे समृद्धी कडे वाटचाल करतील तसेच सदरची कामे घेतल्यास वैयक्तिक कामाबरोबर सामुहिक कामे घेवून गावांचा विकास साधला जाईल कुशल अकुशल (६०/४०) प्रमाण राखले जाईल

         आजच आपल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन आपल्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आजच आपले ग्रामसेवक यांनी भेटून आपले जाॅब कार्ड तयार करा आणि आपल्या हक्काचे काम मिळवा. महिन्यात पंधरा दिवस काम शासन किंवा ग्रामपंचायत देवू शकत नसेल तर तुम्हाला बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक आहे आपल्या ग्रामीण भागात गावात कोणी बोगस जाॅब कार्ड काढून शासनास खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करत असेल तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करा आणि आपले कर्तव्य पार पाडा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्याचे सापेक्ष उत्तर देताना संबंधित आॅफिस चे लेटरहेड वर देणे बंधनकारक आहे

दुष्काळ १९७२ चा?

 


१९७२ दुष्काळ

                  आपण आत्ता सुध्दा आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या कडून दुष्काळाचे ऐकतो. दुष्काळ पडला आणि आम्ही सुकडी. मिलो खाल्ला. तसा आणि तेवढा मोठा दुष्काळ कधी पडला नाही. दुःखाचा काळ म्हणजे दुष्काळ अस म्हणलं तर वावगे ठरणार नाही १९७२ साली आत्ता असणारे शेती तंत्रज्ञान. पाणी अडविण्याचा अभाव. चुकिची शेती पध्दत. लोकसंख्या प्रमाणात. लोकांच्या आशा आकांक्षा कमी होत्या. जेवढ मिळेल त्यात संतुष्ट होणारें लोक. मोठ मोठी वृक्षांची घनदाट जंगल. जनावरांना मुबलक चारा. वाहत्या नद्या स्वच्छ पाणी. आजारांचे प्रमाण होते पण लोकांच्या खाण्यासाठी जनावरें असल्यामुळे दुध. दही. सकस आहार. केमिकल विरहित वातावरण. अशी सर्व जीवनप्रणाली अस्तित्वात होती 

                १९७२ चा तो काळ म्हणजे एक अतिशय ह्रदय भरून टाकणारा काळ येण्यास आपणच कारणीभूत होतो आणि आहे. कारणं आपल्याच अशा आकांक्षा वाढल्या आपणच झाडें तोडली. जनावरांचा चारापाणी संपला. जनावरें कमी झाली. शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा वापर केला जात असे आज शेती कामासाठी टृकटर विविध शेतीची कामे करण्यासाठी मशिन आल्या त्यामुळे जनावरा पासून मिळवणारे खत पाणी संपले आणि रासायनिक खते बी बियाणे यांचा वापर चालू झाला रासायनिक खते वापरामुळे जमीनीचा पौत कमी झाला जमीनीची उपजाऊ दर्जा कमी झाला त्यामुळे अन्न धान्य तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे कुपोषण सारख्या महाभयंकर संकटाने आपणांस आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात झाली. वर्षाच्या वर्षाला पाडणारा पाऊस. आपल्या जमीनीच्या खपापुरता पडतो मग काही वेळा पूर येतात त्यावेळी पाणी अडविणयाची गरज नाही. तंत्रज्ञान नाही. अज्ञान जास्त असल्यामुळे. येणारे पाणी वाहून जात होते. जमीनीत त्या पाण्याचा अडवून निचरा करण्यासाठी मार्गदर्शन करणारे लोक नाहीत. त्यामुळे आले पाणी गेले पाणी असा प्रकार होत होता. 

त्यामुळे आपणांस हळूहळू पाण्याची कमतरता जाणवू लागली. दुष्काळ लगेच पडत नाही किंवा येत नाही त्यासाठी बरेच दिवस आपल्या काही चुकिचे निर्णयांची आठवण होते तो पर्यंत वेळ निघून जाते

         जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळी सर्वात मोठा फटका बसतो तो म्हणजे जनावरे त्यांना पाऊस पाणी नसल्यामुळे चारा नाही त्यामुळे जनावरें उभ्या उन्हात उघड्या माळरानावर फिरत असतात. अंगावर माॅस नाही चालायला अंगात जीव नाही. काही जनावरे विना चारा पाण्याची टाचा खुडून मरतात. त्यांना खाण्यास गिधाडे सुध्दा ज्या भागात दुष्काळ पडतो तिकडं फिरकत सुद्धा नाहीत मेलेल्या जनावरांमुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराई पसरते त्याचा परिणाम जी लोक दुष्काळाचा सामना करत असतात त्यांच्यावर होते. जनावराप्रमाणे माणसाचे हाल सुध्दा असेच होतें लोकांना खाण्यास अन्न नाही पिण्यास पाणी नाही लोक अन्नासाठी गावोगावी फिरायला लागलें. लहान मुल महिला म्हातारी माणसं. यांचे अगदी विचार करण्यापलीकडचे हाल होते काही लोक उपासमारीची हालत सहन करू शकत नाहीत त्यामुळे आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून आत्महत्या करतात. दुष्काळामुळे गावांत कोण नाही त्यामुळे या आत्महत्या व दुष्काळात उपासमारीने मयत व्यक्तिंना दहन दफन सुध्दा मिळाले नाही. कोल्हे कुत्रे व इतर जंगली जनावरे यांना खात होती किती वाईट आहे. दुष्काळात काही समाजसेवक मदत देतात पण सर्वजण जर अशा परिस्थितीत असले तर कोण कोणाला मदत करणारं

          आपणांस वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी जगणे व जगविण्यासाठी रोजगार पाहिजे मग काय औधोगिक वसाहत. एम आय डी सी. विविध केमिकल कंपनी. यामुळे आपणास उधोग मिळाला पण आरोग्य गेले नविन नविन नाव बदलून रोग आले. पिण्याचे दुषित पाणी त्यामुळे पोटाचे आजार विकार वाढ झाली. 

               आपण आज सुध्दा १९७२ सारख्या महाभयंकर दुष्काळात आहोत. कारणं आज आपण सक्षम नाही. रोजगार नाही. नोकरी नाही. भरती नाही. व्यसन. खून मारामाऱ्या अपहरण खंडणी. बलात्कार महिला अत्याचार. भ्रष्टाचार. लुटमार मग ती शासकीय अधिकारी असो अथवा. सार्वजनिक दलाल एजंट. वाढती गुन्हेगारी. वाढती लोकसंख्या. अंधश्रद्धेचे बळी. शिक्षणाचा अभाव. स्वातंत्र्याचा अभाव. भिक मागणारी मुलं. गैरमार्गाने पैसा मिळविणे. शासकीय योजना आहेत त्या गोरगरीब जनतेला मिळत नाहीत. गोरगरीब जनतेला सकस अन्न धान्य रास्त किंवा मोफत चांगलें स्वच्छ धान्य वितरण करण्याचा शासन निर्णय घेतय पण काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे गोरगरीब उपासीच आहे त्याला पोटभर अन्न सुध्दा मिळत नाही सर्वात जास्त कुपोषण आपल्या देशात आहे हा सर्व प्रकार १९७२ दुषकाळापेक्षा मोठा दुष्काळ आहे. 

             दुष्काळ ग्रस्त. पूर ग्रस्त. प्रकल्प ग्रस्त. असे विविध प्रकारचे ग्रस्त लोकांची कॅटेगरी केली जाते. त्यांना या बिकट परिस्थिती मुळे होणारे नुकसान भरपाई देण्यासाठी शासन विविध योजना शासन निर्णय जारी करत आहे नुकसानाचे पंचणामे करून पिडित लोकांना भरपाई दिली जाते. त्यात सुध्दा अधिकारी व कर्मचारी हा माझा हा तुझा असा भेदभाव करतात ज्या घराच्या उंबरठ्यावर पाणी येत नाही तो योजनेत बसतो आणि ज्यांचे घर पूराचया पाण्याने पडतात किंवा वाहून जातात ते मोकळं राहतात. अन्न धान्य वितरण करतांना पिडिताना अन्न धान्य मिळतच नाही. असा भेदभाव पक्षपाती पणा केला जातो

      म्हणून म्हणतो १९७२ चया दुषकाळापेक्षा सर्वात मोठा दुष्काळ आत्ता आहे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बलात्काऱ्यांसाठी शरीयत सारखा कायदा लागू करा. - प्रा.ताज मुलानी

 


( दलित मुस्लीम विकास मंच तर्फे राष्ट्रपतींना निवेदन सादर)

       बीड (प्रतिनिधी )  

*महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात दिवसेंदिवस वाढणारा व भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारा अल्पवयीन मुलींना बलात्कार करून ठार मारणाऱ्या त्या नराधमांना शरीयत सारखा कायदा ज्यामध्ये भर चौकात फाशी देणे किंवा शिरच्छेद करणे किंवा जिवंत पुरण्यासारख्या कठोर कायदा , राष्ट्रपतींनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून देशात हा लागू करावा या मागणीचे निवेदन मा. राष्ट्रपतींना मा.जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत दलित मुस्लीम विकास मंच द्वारे प्रा. ताज मुलानी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात मार्गदर्शक शेख इसाक शेठ, महिला आघाडीच्या रहिमाबाजी, संघटनेच्या कायदे सल्लागार ॲड.गिता करमाळकर, जिल्हाध्यक्षा जिजाबाई साळवे, संघटनेचे युवा नेते सय्यद ईनामआदी उपस्थित होते*

  भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मानाचे स्थान असून त्यांचा सन्मान केला जातो भारतीय संस्कृतीत कोणत्याही ठिकाणी स्त्रियांची अवहेलना केली गेली नाही त्यामुळे जगात भारतीय संस्कृतीची छाप आहे परंतु सध्या काही माथेफिरू नराधमांकडून या संस्कृतीचा नाश होत असल्याचे दिसत आहे संपूर्ण भारत देशात रोज दिवसेंदिवस शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुलींवर जबरदस्तीने बलात्कार करून जिवे मारण्याच्या घटना गेल्या पाच दहा वर्षापासून वाढत चाललेले आहे त्यात चढताक्रमच दिसत आहे त्याचे कारण आहे की, असे हे नराधाम कायद्यातून पळवाटा काढून निर्दोष सुटका करून घेत आहेत.

 त्याकरिता या नराधमांविरोधात जर का शरीयत सारखा कायदा झाला व त्यांना भर चौकात फासावर लटकावले किंवा त्यांचा शिरच्छेद केला गेला किंवा जिवंत पुरले गेले तर त्याचा भयंकर प्रभाव पडेल व या घटनांवर अंकुश लागून या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याकरिता मा.राष्ट्रपती महोदयांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून बलात्कारासाठी शरीयत सारखा कायदा लागू करावा अशी मागणी दलित मुस्लिम विकास मंच तर्फे राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे .जर का हा कायदा त्वरित लागू केला गेला नाही तर महाराष्ट्रातून जनजागृती करून संपूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. ताज मुलानी सर ,महिला आघाडीच्या रहिमाबाजी, मार्गदर्शक शेख इसाक शेठ, कायदे सल्लागार ॲड.गिता करमाळकर, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जिजाबाई साळवे आणि संघटनेचे युवा नेते सय्यद ईनाम आदींनी दिला आहे.

               *आपला स्नेहांकित*

              ( सुभाष टाकणखार)

           मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख

       दलित मुस्लीम विकास मंच

आजपर्यंत झालं नाही आत्ता करण्याची गरज आहे

 


          पूर्वीच्या काळात आयुर्वेदिक औषधे वनस्पती पासून तयार केली जात होती. त्यावेळी अशा आयुर्वेदिक औषधाने उपचार करणारे. वैध. हकिम. असे लोक वैद्यकीय सेवा आपले परम कर्तव्य म्हणून पार पाडत होते. लोकसंख्या कमी असल्यामुळे अशी उपचार पद्धती. जंगले अस्तित्वात असल्याने मुबलक औषध देणारी औषधी वनस्पती. आणि त्या वनस्पतींची पारख करणारे लोक. उपचार साधा होता पण गोरगरीब लोकांना परवडणारा होता पैश्याची ओढ नाही. आत्ता असणारे भयानक आजार तेव्हासुद्धा होतें फक्त त्यांची नावे वेगळी होती. प्लेग पटकी. हिवताप. मलेरिया. काविळ. डेंग्यूचा ताप. एनफुलेंगजा. विविध तापाचे आजार. विविध हाडांचे आजार. विविध पोटाचे आजार विविध त्वचेचे आजार. असे मानवी अवशेषानुसार भयानक आजार तेव्हासुद्धा होतें. त्यावेळी असे काही आजार होते की पूर्ण गावच्या गावं मरायची. त्यावेळी सुध्दा माणसांचे अपघात होत होते. हातापायाचे हाड मोडणे. असे होत होते मग त्यावेळी असणार्या औषधी वनस्पती यांच्या वापराने हे सर्व आजार बरे होत होतें. त्यावेळी आत्ता आहेत तसे मोठे दवाखाने नव्हते. महिलांचे विविध शारीरिक आजार यासाठी सुध्दा त्यावेळी दवाखाने नव्हते महागडी औषधे नव्हती तरी सुद्धा लोक आजारी पडत होतें आणि लवकर बरे होत होतें

      काळ बदलला आणि जंगल संपली आपल्याला निसर्गाने दिलेल्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांच्या र्हास झाला. वैध हकिम. यांचे रुपांतर डॉ या मोठ्या नावात झाले. उपचार पद्धती बदलली. घरात होणारे उपचार दवाखान्यात भाड्याच्या खाटेवर होण्यास सुरुवात झाली. आयुर्वेदिक औषधांची जागा. इंग्रजी औषधांनी घेतली. द्रवरुप औषध होतें त्यांचे रुपांतर गोळ्या. कॅपसूल मध्ये झाले. लहान लहान असाणारे दवाखाने हे टोलेजंग इमारती तयार झाल्या. त्याप्रमाणे. औषधांची किंमत. दवाखान्याची फि. दवाखान्यात कोणत्या आजाराला किती खर्च कोणत्या औषधांचे बिल दर किती यांचा कोठेही उल्लेख नाही. मनमानी दराने उपचार पद्धती अवलंबली जाते. कारणं माणूस आजच्या काळात जेवनाशिवाय राहू शकतो पण औषधाविना नाही. कारणं त्याला कारणीभूत आपली जीवन शैली. व्यायाम नाही. एकाजागी बसून काम. अनियमित पणे वेळी अवेळी जेवण. झोपेचा अभाव. मानसिक तणावाखाली. फळें फुले भाजीपाला यांवर केमिकल वापर. कमी वेळेत तयार होणारें अन्न धान्य. सायकल गेली गाडी आली त्यामुळे चालन थांबल. त्यामुळे साखर. बी पी. मधूमेह. थाॅयराईड. त्वचेचे विकार. वजन वाढणे. अवेळी अवयात केस पांढरे होणे. डोळ्यांचे आजार. गुडघे कंबर दुखणे. मनोविकलांग. मानसिक दुर्बलता. शारीरिक दुर्बलता. असे एक नाही अनेक आजाराने आजची पिढी ग्रासली आहे. त्यामुळे अशा वेळेचा. अशा लोकांचा डॉ यांनी पूर्णपणे फायदा उचलला आहे कारण जेवढे आजार त्यावर तेवढेच दवाखाने आज तयार होत आहेत. त्याप्रमाणात औषधांचे भरमसाठ दर. मनमानी पद्धतीने फि वसुली. आज अनेक वेळा विविध मागण्यासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज दाखल झाले मोठमोठी आंदोलन झाले. पण आजपर्यंत औषधांच्या दरासाठी किंवा डॉ यांच्या दवाखान्याच्या बिलासाठी. फिसाठी. कोठेही आंदोलन झालेले आहे असे बघण्यात नाही. कारणं माणूस आहे तो आजारी पडणार आहे त्याला औषधांची गरज आहे. म्हणूनच आपण आजपर्यंत औषधांसाठी खर्च करत आलो आहे आत्तापर्यंत झाले नाही आत्ता करण्याची गरज आहे 

      मानव दोन ठिकाणी आपले हात जोडतो एक देवाजवळ कारणं त्याने जीवन दिलें म्हणून. आणि दुसरे डॉ जवळ कारणं डॉ आपले जीवन वाचवतो. अपूरा निवारा साधन. कुपोषण. दारिद्रय. यामुळे आरोग्याची हेळसांड होणे अनेकांच्या नशिबी येते. शुध्द पाण्याचा अभाव यामुळे विविध साथीचे आजार रोग यांचें थैमान यांना सामोरे जावे लागते अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे औषधपाणी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण या सर्वांहून महत्वाची गोष्ट म्हणजे तज्ञ वैद्यकिय सेवा आणि औषधें या सुविधा बहुसंख्यांक लोकांना मिळतच नाहीत. खेड्यात डॉ नर्स नसणे. लहान दवाखान्यात शस्त्रक्रियेची साधने नसणे. शहरांमधील सरकारी दवाखान्यात रोग्याच्या कडे दुर्लक्ष होणे त्यांना वेळेत आरोग्य सेवा न देणें. औषधांचा दर्जा कनिष्ठ असणे. या सर्व गोष्टी आपल्याला परिचयाच्या आहेत त्याचबरोबर वातानुकूलित टोलेजंग खाजगी दवाखाने. भरमसाठ फी आकरणारे निष्णात तज्ञ. श्रीमंत लोकांसाठी असणार्या. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा याही गोष्टी आपण पाहतोच. राजकीय नेते पुढारी यांना उच्च प्रतिची वैद्यकीय सेवा दिली जाते. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता. किमान वैद्यकीय सेवा आणि स्वस्त औषधें उपलब्ध कशी करून द्यायची हा आपल्यापुढे एक मोठा प्रश्न असतो. त्यासाठी जीवरक्षक औषधांच्या किंमतीवर मर्यादा घातल्या जातात. औषध उपचारांचा खर्च भरून दिला जातो. सरकारी दवाखान्याचा व्याप वाढवला जातो. ग्रामिण भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या जातात. रोगप्रतिबंधक लस टोचणयाचे कार्यक्रम घेऊन रोग निर्मूलनाचे प्रयत्न केले जातात. या सर्वांमुळे किमान आरोग्यसेवा सहज मिळावी अशी अपेक्षा असतें. आरोग्य सेवेच्या प्रतीमधये असणारा फरक मात्र कायमच राहतो. तसेच कित्येक सुविधा प्रामुख्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळतात. रोजंदारी. बांधकाम कामगार. हातावर चे पोट असणारे लोक. असंघटित सर्व विभाग. गरिब स्तरातील महिलांना. बालकाना. नोकरदार सारख्या सुविधा मिळत नाहीत ही आपल्या बरोबर. केवढा मोठा दुजा भाव आहे हे बघा. शिवाय महिलांची आरोग्याची तर जास्तच हेळसांड होते. त्यांच्या आरोग्य शिक्षणासाठी स्वतंत्र आणि प्रभावी अशा यंत्रणा अभाव आहे 

            सर्वांना आरोग्य सेवा हे ध्येय गाठण्यासाठी सरकारी दवाखान्याची क्षमता वाढविण्यासाठी सरकार प्राधान्याने पैसा वापरत नाही त्याऐवजी उच्च तंत्रज्ञान असणार्या खाजगी दवाखान्याकडून काही ठराविक सेवा या योजनेअंतर्गत सरकार विकत घेऊन त्या गरिब जनतेला उपलब्ध करून देत आहे. अशा धोरणामुळे सरकारी सेवा दवाखान्यात सुधारायला सरकारकडे पुरेसा पैसा शिल्लक राहतं नाही प्रत्त्येक भारतीय व्यक्तिला गरजेप्रमाणे दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा पुरविणारी व्यवस्था अमलात आणण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेवेच्या हक्काचा कायदा करण्याची गरज आहे. सरकारी खर्चात वाढ करा. आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. औषध तुटवडा कमी करण्याची गरज आहे. समग्र माणूस बळ तयार करून. वैद्यकीय सेवेचे खाजगीकरण कंत्राटीकरण थांबविणे गरजेचे आहे. 

      औषधांची किंमत ज्या दवाखान्यात उपचार घेतला त्याचे औषध त्याच दवाखान्याच्या मेडिकल मध्ये घेणे बंधनकारक नाही कारण त्या औषधांची किंमत मनमानी दराने लावली जाते उपचार पद्धती कोणती. उपचार खर्च. आपल्याला पाहिजे तशी वैद्यकीय मदत मिळणे आपला अधिकार आहे. 

             आत्ता आजपर्यंत जे झाले नाही ते आत्ता आपणांस करण्याची गरज आहे म्हणजे आंदोलन औषधांच्या दरासाठी. आंदोलन डॉ मनमानी कारभारासाठी. आंदोलन रुग्ण हक्क सनद प्रमाणे सर्व अंमलबजावणी होण्यासाठी आत्ता आंदोलन झालेच पाहिजे. मग उठा निःसंकोचपणे विचारा. एकत्र या नाहीतर हे सर्व डॉ आपली जन्माची संपत्ती जमापूंजी हडप केल्याशिवाय राहणार नाही 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५

 


लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५

            आपल्या गावात आपल्यासाठी शासनाने पंचायत राज म्हणजे एक लहान मंत्रालय निर्माण केले आहे त्यानुसार आपल्याला कोणत्या लोकसेवा कोणत्या आणि कोणते शुल्क भरून निश्चित वेळेत देणें बंधनकारक करण्यात आले आहे

        ‌ ‌ राज्यातील पात्र व्यक्तिना पारदर्शक. कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारांत घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ हा २८ एप्रिल २०१५ रोजी लागू करण्यात आला आहे. आ अध्यादेश कलम ३ मध्ये नमूद केल्यानुसार प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अध्यादेश लागू झाल्यानंतर ३ महिन्यांचा कालावधीच्या आत आणि त्यांनंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा. पदनिरदेशित अधिकारी. प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा या अध्यादेशाखाली. अधिसूचना करणे आवश्यक आहे. सदरहून अध्यादेश निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने त्या पुरवित असलेल्या सेवा अधिनियम अंतर्गत अधिसूचित करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे

          प्रशासकीय अधिपत्याखाली राज्यातील सर्व ग्रामस्थांना पारदर्शक गतिमान लोकाभिमुख व प्रतिसादशिल प्रशासना नुसार जबाबदारीने सेवा पुरविणे ही पंचायत राज संस्थांची जबाबदारी आहे. पंचायत राज संस्थेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा पैकी नागरिकांना दैनंदिन जीवनातील सातत्याने आवश्यक असणार्या व ज्या लोकसेवाचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा घेतला आहे व ज्या सेवा महत्वाच्या आहेत. अशा लोकसेवाची निश्चिती करण्यात आली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ तयार करण्यात आला आहे. पदनिरदेशित अधिकारी प्रथम व व्दितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा या बाबतची अधिसूचना दिनांक. १० जुलै २०१५ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. सदर अधिसूचना अन्वये अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा बाबतची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आली आहे

          एकसुत्रता व समानता. करावयाचा अर्ज. अर्जासोबत जोडायची कागदपत्रे. कर्जाचा नमुना प्रमाणपत्र. सूचना फलक लावणे. अधिकारी व कर्मचारी यांचे पद नाव यांचा स्पष्ट उल्लेख. प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी.  

           सेवेचे नाव. 

(१) जन्म नोंदणी दाखला

 * कालावधी. ५ दिवस

 ‌* पद निर्देशन अधिकारी. ग्रामसेवक

 * प्रथम अपिलीय अधिकारी. सहायक गटविकास अधिकारी

 * द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

* अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क. २० रूपये

* कोणत्या ठिकाणाहून सेवा. ग्रामपंचायत

(२) मृत्यू नोंदणी दाखला

* कालावधी. ५ दिवसांत

* पदनिरदेशित अधिकारी. ग्रामसेवक

*प्रथम अपिलीय अधिकारी. सहायक गटविकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी. गटविकास अधिकारी

*अर्ज स्विकारण्याचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय

* अर्ज. उपलब्ध आहे

*सेवा शुल्क. २० रूपये

सेवा उपलब्ध ग्रामपंचायत कार्यालय

(३) विवाह नोंदणी दाखला

* कालावधी ५ दिवस

*पदनिरदेशित अधिकारी ग्रामसेवक

*प्रथम अपिलीय अधिकारी सहहयक गट विकास अधिकारी

*द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

* अर्ज करण्याचे ठिकाण. ग्रामपंचायत कार्यालय

* अर्ज उपलब्ध आहे

* सेवा शुल्क २० रुपये

* सेवा देणार ग्रामपंचायत कार्यालय

(४) रहिवासी दाखला

*कालावधी. ५ दिवस

* पदनिरदेशित अधिकारी. ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*सेवा उपलब्ध अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय

*सेवा उपलब्ध अर्ज उपलब्ध आहे

* अर्जाचा विहित नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क २० रूपये

* सेवा देणार कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय

(५) दारिद्र्य रेषेखालील दाखला 

* कालावधी. ५ दिवस

*अधिकारी. ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*सेवा देणार कार्यालय ग्रामपंचायत

*सेवा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा निःशुल्क

* सेवा देणार कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय

(६) हयातीचा दाखला

* कालावधी. ५ दिवस

*अधिकारी ग्रामसेवक

*प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

*द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*अर्ज स्विकारण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

*सेवा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क निःशुल्क

* सेवा उपलब्ध करून देणारे कार्यालय ग्रामपंचायत

((७) ग्रामपंचायत येणे बाकी दाखला

*. कालावधी ५ दिवस

*अधिकारी ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

*द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

* सेवा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

* सेवा शुल्क २० रूपये

* सेवा उपलब्ध करणारे कार्यालय ग्रामपंचायत

(८)! शौचालय दाखला

* कालावधी ५ दिवस

* अधिकारी ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*सेवा अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

* सेवा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

* सेवा शुल्क २० रूपये

* सेवा देणार कार्यालय ग्रामपंचायत

(८) नमुना ८ अ चा उतारा

*कालावधी. ५ दिवस

* अधिकारी ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

*द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

* अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

*सेवा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क २० रूपये

* सेवा उपलब्ध कार्यालय ग्रामपंचायत

(१०) निराधार असल्याचा दाखला

* कालावधी २० दिवस

* अधिकारी ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

* अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

*सेवा उपलब्ध करण्याच्या अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क निःशुल्क

* सेवा देणार कार्यालय ग्रामपंचायत

(११) विधवा असल्याचा दाखला

* कालावधी २० दिवस

* अधिकारी ग्रामसेवक

*प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

* सेवा उपलब्ध करण्यासाठी अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क २० रूपये

*सेवा उपलब्ध होण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

(१२) परित्यक्ता असल्याचा दाखला

* कालावधी. २० दिवस

* पदनिरदेशित अधिकारी ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

* सेवा उपलब्ध करण्यासाठी अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क २० रुपये

* सेवा देणारे कार्यालय ग्रामपंचायत

(१२) विभक्त कुटुंबाचा दाखला

* कालावधी २० दिवस

* अधिकारी ग्रामसेवक

* प्रथम अपिलीय अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी

* द्वितीय अपिलीय अधिकारी गट विकास अधिकारी

*सेवा घेण्यासाठी अर्ज करण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

*सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अर्जाचा नमुना उपलब्ध आहे

*सेवा शुल्क २० रूपये

* सेवा मिळण्याचे ठिकाण ग्रामपंचायत

       वरील प्रमाणे सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत राज बांधिल आहे. यावेळी कोणताही अधिकारी व कर्मचारी लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे काम करत नसेल किंवा त्यापेक्षा जास्त पैशांची मागणी करत असेल तर त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार करा. शासनाने आपल्या सेवेसाठी यांची नेमणूक केली आहे 

      निवेदन अर्ज स्विकारण्यास कोणताही अधिकारी व कर्मचारी नकार देऊ शकत नाही दिलेल्या अर्जाचे उत्तर लेखी देणें बंधनकारक आहे

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कारभार इस्लामपूर तहसिलदार कार्यालयाचा

 


इस्लामपूर तहसिलदार

  कार्यालयात सक्षम अधिकारी नाहीत असा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला आहे. तहसिलदार कार्यालय हे तालुक्याच्या ठिकाणी असणारे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ज्या लोकांना आपले विविध पत्र व्यवहार. मागणी अर्ज स्मरण पत्र. निवेदन. महसूल संबधी विषय. रेशन कार्ड संबधी विषय. जमीनीचा असणारा विषय. अशी विविध प्रकारची कामे लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी तहसिलदार कार्यालय एक न्यायालय म्हणून आपले काम करत असते. पण यातील अधिकारी व कर्मचारी. यांनी तहसिलदार कार्यालय एक पैसा मिळविण्याचे साधन केलं आहे. त्यातच. स्टॅम्प घोटाळा जागोजागी एजंट दलाल यांना पैसा दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही जसे रेशनकार्ड कोणताही अर्ज निकाली काढण्यासाठी काहीतरी द्यावे लागते. तहसिलदार यांच्या गैरहजेरीत तहसिलदार कार्यालयात कोणत्याही कामात अडचण येवू नये म्हणून नायब तहसीलदार यांची निवड केली जाते तहसिलदार यांच्या गैरहजेरीत येणारे पत्र व्यवहार विविध विषयांवर चर्चा मार्गदर्शन करण्यासाठी व लोकांचे तंटे सोडविण्यासाठी नायब तहसीलदार यांची मदत होत असते. 

          बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी स्वताच्या मागणीसाठी नाहीतर सर्वसामान्य जनता यांच्यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार करत असते पण त्या कोणत्याही पत्र व्यवहाराचा कोणताही लेखी स्वरूपात उत्तर दिले जात नाही. याउलट आम्ही दाखल निवेदन तहसीलदार साहेब नसतील त्यावेळी कोणत्याही अधिकारी. व कर्मचारी यांनी आमच्या मागणी अर्जाला दाखल तारीख सुध्दा दिली नाही. हेच काम राजकारणी लोकाच असतं तर. आपल आॅफिस सोडून भेटायला सुध्दा जातात हे अधिकारी निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज दाखल करणारा हा एक भारतीय नागरिक आहे त्याला आपल्या पत्राची दाखल तारीख देण्यासाठी अधिकारी नसेल नायब तहसीलदार नकार देत असेल तर या अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही निवेदन मध्ये काय लिहिलं आहे त्याची मागणी काय आहे त्याला न्याय मिळेल किंवा नाही हे वरिष्ठ अधिकारी यांच्या हातात आहे तुम्हाला दाखल तारीख देण्यास काय अडचण आहे 

           शासकीय कर्मचारी व अधिकारी महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल) नियम १९७९ अन्वये किंवा अशा कर्मचारी यांना कर्तव्यपालनातील कोणतीही कसूर किंवा कामात दिरंगाई यांच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे मग अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी

     उदा दाखल खालील पत्र व्यवहार बघा

(१४/५/२०२०) रोजी तहसिलदार यांना टाळेबंदी काळात आवश्यक वस्तूंच्या नावाखाली परवाना देण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करणे बाबत

(२२/६/ ‌२०२० ‌)रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी मडळाचा लाभ मिळण्यासाठी सर्व शासकीय विभागातील सर्व उप बांधकाम अभियंता यांना बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी म्हणून घोषित केले आहे त्यासाठी सर्वांना आदेश देण्यासाठी निवेदन सादर

(१८/६/२०२०/) रोजी ए पी एल शिधापत्रिका धारकांना धान्य मिळावे. यासाठी पत्र व्यवहार

(२२/७/२०२०))(१५/६/२०२०)(१३/७/२०२०)(२७/७/२०२०)(३०/७/२०२०)(१४/७/२०२०) (४/८/२०२०)(२६/८/२०२०)(१०/९/२०२०)(२१/९/२०२०)(१८/९/२०२०)(२३/८/२०२०)(२९/७/२०२०)(१७/८/२०२०)(४/८/२०२०)(३०/६/२०२०)(१९/६/२०२०)(२२/६/२०२०)(१/३/२०२१)(१०/५/२०२१)(१९/५/२०२१)(१२/८/२०२१)

           वरील प्रमाणे सर्व पत्र व्यवहार आत्मनिर्भर योजनेअंतर्गत परगावाहून पोटासाठी आलेल्या कामगारांना अन्न धान्य देणेबाबत. वेळोवेळी लाभार्थी यादी जमा करताना. रेशन कार्ड मधील नविन रेशनकार्ड काढणे. नाव कमी करणे. नाव वाढविणे. मयत लोकांची रेशनकार्ड मधील नावे कमी करणे. बांधकाम कामगार जीवीत नोंदणी ग्राह्य धरून त्याचा दारिद्र्य रेषेखाली समावेश करणे. अपंगांसाठी वेगळी शिधापत्रिका देणे त्वरित देणें पण आज एक वर्ष पूर्ण झाले तरी शिधापत्रिका नाही. शासकीय गोदाम तपासणी व पडताळणी करण्याची परवानगी. अशा विविध मागण्यासाठी आम्ही संबंधित तहसीलदार कार्यालय यांच्याशी वेळोवेळी सापेक्ष पणे पत्र व्यवहार केला आहे पण आजपर्यंत कोणत्याही पत्राचे उत्तर संबंधित विभागाने दिले नाही उलट त्या मागणीचा कोणताही विचार यांनी केला नाही. अशा पत्र व्यवहाराने कार्यालयात केवळ रद्दी गोळा झाली आहे अन्न सुरक्षा योजनेत सहभागी होण्यासाठी वर्षांपासून अर्ज पेंडीग आहेत राजकारणी लोकांना शिपाई अडवत नाही सर्वसामान्य माणसाला साहेब मिटिंगमध्ये आहेत असं सांगितलं जातं 

           असा प्रकार जर एका तहसिलदार कार्यालयात असेल तर प्रत्त्येक तालुक्यात एक तहसिलदार कार्यालय आहे त्यात सुध्दा असाच प्रकार असेल. कोणताही पत्र व्यवहार निवेदन अर्ज कोणताही अधिकारी घेण्यास नकार देऊ शकत नाही असे असेलतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करता येते

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या