Showing posts with label समुह. Show all posts
Showing posts with label समुह. Show all posts

मनाला घोर लागलाय

 


मनाला घोर लागलाय

          मनुष्य एकाकी राहण्यापेक्षा गटात समुहात राहणे पसंत करतो म्हणून / सामाजिक प्राणी /आहे असे म्हणले जाते या समूह प्रवृत्ती जोडीनेच माणसांमध्ये आपले. खाजगीपणा जोपासण्याची प्रवृत्ती आढळते. माझं छंद माझ्या आवडी निवडी माझे राग लोभ वैयक्तिक असते.  म्हणजे मी समाजांचा घटक असतोच पण याशिवाय सुध्दा वेगळे खास माझे काही खाजगी जीवन असतेच.  अभ्यासाच्या सोयीसाठी सामाजिक किंवा सार्वजनिक विश्व आणि खाजगी विश्व यांचा आपण सुटा स्वतंत्र विचार करतो पण प्रत्यक्ष जीवनात या दोन्ही विश्वाचा एकामेकाशी संबंध येतोच.  पण विवाह पध्दत असो. किंवा विवाहानंतर पती पत्नी संबध वैयक्तिक नसून हे सामाजिक मूल्य मानदंड यांच्या चौकटीत हे खाजगी संबंध आकाराला येतात त्यातच. कुटुंब जात धर्म. भाषा आणि प्रादेशिक अस्मिता.  वर्ग.  भौगोलिक संदर्भ.  शिक्षण.  समाजकारण.  राजकारण.  वशिलेबाजी.   गटबाजी.  गुन्हेगारी.  टोळीयुद्ध गॅगवार.  खून मारामाऱ्या.  अपहरण.  खंडणी.  लुटमार.  श्रध्दा अंधश्रद्धा.  उच्च जाती.  कनिष्ठ जाती.   सदन घटक. दुर्बल घटक.    शिक्षित अशिक्षित.   अन्न समस्या.  रोजगार समस्या.  निवारा समस्या.  आरोग्य समस्या.  सामाजिक सुरक्षितता.   न्यायव्यवस्था.   झोपडपट्टी समस्या.  बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज.  चळवळी.  संपर्क माध्यम फुटिरता.  हुकूमशाही.  घराणेशाही.  राजकीय शिक्षण अभाव. जातीयवाद.   दहशतवाद.  भ्रष्टाचार.  महागाई.   बेरोजगारी.  अशी एक नाही अनेक प्रश्नांनी मनाला घोर लावला आहे आणि सर्वसामान्य जनता गळतीच्या मार्गावर आहे 

             आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी महागाई शिक्षणाचा बोजवारा.  वाढती लोकसंख्या ध्यानात घेता सर्वांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले आहे त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.  सर्वात मोठा फटका बांधकाम कामगार. असंघटित क्षेत्रातील कामगार यांना झाला आहे.  शासनाची योजना मिळेना.  म्हणजे योजना हजार त्यासाठी नेमले दलाल एजंट दोन हजार लुटालूट अधिकार व कर्मचारी यांना हाताला धरून. म्हणजे कामगार कोमात एजंट दलाल कोमात असा प्रकार आहे यामुळे मनाला घोर लागलाय 

           त्यातच राहीली कसर महागाईनी भरून काढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे. भाजी पाला फळं यापासून.  गहू ज्वारी बाजरी मका. अशी खाद्यान्न. विविध खाद्य तेल. कपडे. जागांचे भाव.  बांधकाम मटेरियल.  अशी विविध उत्पादने यांचें दर आज गगनाला भिडले आहेत.  गोरगरीब जनतेला जगणे अवघड झाले आहे.  गाडी जीवनावश्यक वस्तू झाली आहे पेट्रोल डिझेल यांचे दर विचार करायलाच लावतात रोज दर वाढत आहे.  घरगुती वापरासाठी वापरला जाणारा घरगुती गॅस सिलिंडरचा दर तर आठ दिवसाला वाढवतोय.  गरिबांचे थोडी अर्धा गुंठा जागा घेऊन घर बांधण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.  भाड्याने राहणारे घरभाडे परवडत नाही एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपाशी राहतात कारणं बेरोजगारी यामुळे मिळेल ते काम करून सुध्दा दोन वेळच भागत नाही. महागाई भस्मासुर गोरगरीब जनतेला खाऊन टाकणारं यात सुखी कोण असेल तर. शासकीय नोकर.  राजकारणी लोक.  शिक्षण संस्था चे शिक्षक. कारणं यांना कायमचा पगार चालूच आहे.शासन यांना महागाई भत्ता देतय त्यांचं जमलय ?    रेशन वाला अन्न धान्य देत नाही.  आमच बी खातोय सगळ्या गावाचं बी खातोय.  शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बरीच माया गोळा केली आहे.  वयोवृद्ध.  नागरिक. अपंग. विधवा.  निराधार. यांच्या योजना पैसे चारलयाशिवाय मंजूर होत नाहीत  त्यातच राहील साहील रोजची गरज असणारा आपला अविभाज्य घटक म्हणजे  डॉ. यांची बेमाफी फी.  नुस्ता पैसा मिळविण्याचे धोरण. जीवंत माणसांचे वेगळ आहे हे मयत माणसांकडून सुध्दा पैसा वसूल करतात.  यांची आणि मेडिकल यांचे साटेलोटे औषधांच्या किमती मनाला येईल तेवढ्या आणि ज्या डॉ कडे उपचार घेतला आहे त्याचे औषध त्यांनी ठरवलेल्या मेडिकल मध्येच मिळणार. मग डॉ यांचा हिस्सा काढून मेडिकल वाल्यांची मिळकत हे सर्व आपल्या गरिबाकडून वसुली केली जाते   म्हणजे गोरगरीब जनतेला कोणी वाली नाही यामुळे मनाला घोर लागलाय

              शिक्षणाची गंगा घरोघरी सगळे शिकू.  सगळे साक्षर होऊ.  ही घोषणा आज कागदावरच राहिली कारणं. जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या.  आणि विविध राजकारणी लोकांनी आप आपल्या शिक्षण संस्था काढल्या. त्यांना बेमाफी फी घेतली जाते उदा.  सांगायचे असेल तर आज कमीत कमी दोन वर्ष होत आली शिक्षण संस्था बंद आहेत पण आपल्या ध्यानात एक गोष्ट आली नाही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात वर्षांची. शिक्षण संस्थांनी फी भरून घेतली आणि मार्च पासून शाळा कोरोना मुळे बंद करण्यात आल्या. म्हणजे पालकांनी विद्यार्थी यांची भरलेली फी गोळा करून शिक्षण संस्था बंद झाल्या. असे आपल्या महाराष्ट्रात किती शिक्षण संस्था असतील किती पैसा गोळा झाला असेल. काय अंदाज आहे का ? नाही. आत्ता सुध्दा शाळा चालू होणार पण सर्व वर्षांची फी भरून घेतल्यावर मार्च पासून शाळा बंद होणार नाहीत याची कोण जबाबदारी घेतय का ? पालकांच्या कष्टाचा व्याजाने काढून विद्यार्थी यांची फी भरली ती बुडणार नाही याची कोण ग्वाही देतय का ? यातच एक पळवाट काढली ती म्हणजे आॅनलाइन शिक्षण. मोबाईलवर. शाळा घेतात परिक्षा घेतात.  जी मुल शाळेत ११/५/ या वेळेत शाळेत शिक्षकापुढे असून सुद्धा शिकत नाहीत त्यांना मोबाईल शिक्षण कळणार का ? आई बाबा म्हणतंय पोरग मोबाईलवर तास घेतय शिकतय. पण त्या खुळ्या ना काय माहित हे कडव मोबाईलवर गेम खेळतय.  म्हणजे शिक्षणाचा बोजवारा उडाला हे शंभर टक्के खरे आहे का ? काही ठिकाणी मोबाईलला रेंज नाही. तर काही मुलांनी आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल मिळाला नाही घरची परिस्थिती नाही या कारणाने आत्महत्या केली हे सुद्धा आपण बघितल आहे. असच जर सगळ चाललं तर येथून पुढे निर्माण होणारी पिढी खुळी मनोरूग्ण निर्माण होणारं आज दोन वर्ष होत आली शाळेचा आणि मुलांचा संपर्क तुटला आहे आत्ता तीच मुल शाळेकडे वळतील काय ? मला नाही वाटत ? या सर्व प्रकारांचा मनाला घोर लागलाय

            स्पर्धा परीक्षा.  एम पी सी.  यासाठी मुलानी रांत्र दिवस अभ्यास केला. शासनाने आज २०१५ पासून आजपर्यंत मुलांना तारखा द्यायच्या आणि रद्द करायच्या असा लपंडाव लावला आहे.  एम पी सी स्पर्धा परीक्षा.  अभ्यास करणारी मुले सकाळी व्यायाम. करायला उठतात. आणि नंतर अभ्यासिका लावण्याची परस्थिती नसते त्यामुळे कामावर जाऊन घरच्या परिस्थितीला हातभार लावायचा आणि मग त्यातून आपल शिक्षण पुस्तक. या मुलांना खाण्यास सुध्दा त्याच प्रमाणे असतें. एवढ्या खडतर प्रवासाने या मुलांचे जीवन ग्रासलेले असते.  आत्ता एकवेळ एम पी सी परिक्षेची तारिख फायनल झाली. आणि मुलं पुन्हा व्यायाम अभ्यास याकडे वळली आजून सुध्दा भरवसा लागेना परिक्षा होईल की नाही याचा तरीही तयारी करतात ही मुल त्यातच आत्ता परीक्षा तारीख जाहीर झाली जागोजागी स्पर्धा परीक्षा यासाठी लागणारी पुस्तके याची दुकानें सजली. मग काय पुस्तकाचे दर मनाला येईल तसे. लुटायच चालू झालं. ?  आणि सर्वात मोठी लुट केली ती म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केलेल्या सर्व अॅकेडमी. यांची वर्षांची फी ५०/६० हजार रुपये गोळा केले आणि आज दोन वर्ष अॅकेडमी बंद आहे म्हणजे यानी कोट्यवधी रुपये मिळवले आणि आज पुन्हा आपली दुकाने उघडली आहेत ती म्हणजे फी भरून घेण्यासाठी. आज पालकांनी जर समजा आपण फीचे पैसे भरले आणि स्पर्धा परीक्षा वर्ग जर बंद पडले तर आमचें पैसे माग द्यावे लागतील अशी अट घालून पैसे भरा. कारणं आपल्या जिल्ह्याचा विचार करू नका महाराष्ट्रात अशा अॅकेडमी किती असतील कोट्यवधी रुपये हे जर वर्षी आपल्या घशात घालत आहेत यातील काही स्पर्धा परीक्षा शाळा अॅकेडमी राजकारणी लोकांच्या सुध्दा आहेत. सावध व्हा सावध रहा   काही मुल एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झाले २/३/ वर्ष नोकरी नाही त्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याला आपणच जबाबदार आहोत. 

                      शासनाने एम पी सी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वयाची अट घातली आहे. जर समजा. याच वर्षी काही मुलाच वय संपतय त्या मुलानी रांत्र दिवस अभ्यास व्यायाम केला असेल तर त्याचे सर्व कष्ट पाण्यात गेले.वय जास्त असल्यामुळे लग्नाला कोण मुली देत नाही. म्हणजे आई वडील यांनी मुलांच्या नोकरीची वाट बघायची का लग्न करायच ? मोठ प्रश्न आहे    शासनाने या मुलांचा सुध्दा विचार करणे गरजेचे आहे  अशी सर्व मुल मानसिक दृष्ट्या कमकुवत झाली आहेत. मग अशा वातावरणामुळे ही मुले. गुन्हेगारी.  खंडणी. अपहरण. चोरी. लुटमार. अशा मार्गाला लागणार याला शासन जबाबदार आहे.  या एम पी सी स्पर्धा परीक्षा मधील सर्वात वाईट प्रकार आहे तो म्हणजे वशिलेबाजी. यामुळे खरोखरच अभ्यासू मुलं माग राहीली आणि ढ मुल आज विविध शासकीय ठिकाणी नोकरी करत आहेत वाईट आहे. 

            आज प्रत्येक मुलाच्या पालकांच्या मनाला घोर लागला आहे.  कोणाला मुलांच्या नोकरीचा. कोणाला अधिकारी व कर्मचारी यांच्या वागण्याचा. कोणाला आपणांस स्वातंत्र्य दिले आहे पण ते वापरण्याचा अधिकार नाही.  कोणाला हाताला काम नाही.  हातात पैसा नाही त्यामुळे उपासमारी यामुळे आत्महत्या करायची काय याचा   

            जगणं झालं अवघड मरण झालं स्वस्त 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या