कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा.


कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा. 
अबब एवढ कामगार आलें कुठुन ? 

      असंघटित बांधकाम कामगार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार व महिला व मुल यांचेसाठी विविध कल्याणकारी १९ योजना राबविण्यात येतात त्यासाठी बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर दाखला देणे अनिवार्य आहे. कामगार व अधिकारी समोरा समोर अशी नोंदणी पध्दती असताना शासनाकडून बोगस कामगार नोंदणी बंद व्हावी यासाठी आॅनलाइन पध्दतीने बांधकाम कामगार नोंदणी केली जात आहे. त्यात सुध्दा कामगार कल्याण मंडळांची अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी पडत आहे त्यामुळे खराखुरा कामगार नोंदणी प्रक्रिया पासून वंचित राहत आहे. आत्ता विचार करण्याची गरज आहे की रोजच्या रोज हजारो बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने होत आहे. मग एवढे बांधकाम कामगार एका जिल्ह्यात आहेत का ? एवढी बांधकाम साईट चालू आहे का ? महिला बांधकाम कामगार कामावर दिसत नाही मग परवाचे (.२०२० ) २८३०० सुरक्षा संच पुरुष कामगारापेक्षा महिलांना जास्त वाटप झाले ते कसे ? मग त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती ? त्या बांधकाम कामगार नोंदणीसाठी बांधकाम कामगार प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर आहेत त्यांच्या कामावर ऐवढे कामगार आहेत का ? प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर यांना बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारा दाखला ९० दिवस काम केल्याचे देणे अनिवार्य आहे त्या इंजिनिअर यांना कामगार पगार पत्रक जोडणे अनिवार्य करा ? पगार पत्रक नसेल तर इंजिनिअर यांनी शपथ पत्र देणे बंधनकारक करा ? इंजिनिअर कामगारांचा पगार चेक वर देत असेल तर बॅंक तपशील नोंदणी दाखला देताना देणे अनिवार्य करा ? वरील सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे असा आदेश जारी करण्यात यावा यामुळे बोगस कामगार नोंदणी होणार नाही. कारणं खरोखरच कामगार असेल त्यालाच इंजिनिअर दाखला देणारं. बोगसगिरी होणे याला कारणीभूत आहे तो म्हणजे इंजिनिअर 

              २०११ या सांगली जिल्हा कामगार सर्वे नुसार. सांगली जिल्ह्यात. ३३.२/ टक्के कामगारांची नोद आहे. म्हणजे त्या जिल्ह्यात. शासकीय. राजकीय. विविध आस्थापनात काम करणारे अधिकारी व कर्मचारी. कोण आहे कां नाही ? दुकानदार रेशन दुकानदार. व अन्य विविध स्तरांतील लोक काही आहेत का नाही ? अंतिम २०११ सर्वे नुसार महाराष्ट्रात ४४.८/ टक्के असंघटित कामगार आकडेवारी आहे 

          २०१७ चे शासन निर्णयानुसार. व आम्ही केलेल्या कामगार सर्वे नुसार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्या सर्वे नुसार. ४ लाख २९ हजार १५५ एवढे बांधकाम कामगार आहेत असं मंडळाकडून सांगितले आहे. आणि बांधकाम कामगार यांना विविध १९ योजनांसाठी. १२७.७१.८०.१२५ एवढी लाभार्थी कामगारांना आर्थिक लाभ देण्यात आला होता. म्हणजे आत्ता जिल्ह्याची लोकसंख्या किती आणि बांधकाम कामगार किती याच गणित करा आणि उत्तर शोधा वेड लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यातील बांधकाम कामगार नसताना सुद्धा मंडळाकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी आलेला आर्थिक व वस्तू स्वरूपातील मदत बोगस कामगार नोंदणी करून लुठली याला कारणीभूत आहे तो म्हणजे इंजिनिअर कारणं बांधकाम कामगार आहे हे कुणी सिध्द केल. वरील सर्व विभागवार राज्यातील बांधकाम कामगार नोंदणी. जर ५.७५६२८ असा प्रसारीत करण्यात आला आहे. मग आत्ता आपल्या जिल्ह्यात किती बांधकाम कामगार असतील. २०१६/२०१७ पर्यंत. पुणे विभागात २३९३८ आणि २०११/पासून २०१७ पर्यंत १ लाख ७५ हजार ३२० एवढी बांधकाम कामगार नोंदणी दर्शवली आहे. म्हणजे सगळ कामगारच आहेत का ? आपल्या जिल्ह्यात. एवढ कामगार आल कुठून ? मुंबई उपनगर कामगार संख्या. ९५.८/टक्के

    पालघर ठाणे. ८०.१/टक्के

     पुणे ६५.३/ टक्के

     अलिबाग रायगड. ५९.८/ टक्के

     सातारा. ३१.९/टक्के

      रत्नागिरी. ३४.६/ टक्के

       सिंधुदुर्ग ३७.७/टक्के

      कोल्हापूर. ४२.१/ टक्के

       सोलापूर. ३३.३/टक्के

        उस्मानाबाद. २०.३/ टक्के

 ‌‌. लातूर. २६.८/ टक्के

          नांदेड. २५.७/ टक्के

          परभणी. २३.९/ टक्के

          जालना. २०.९/टक्के

         औरंगाबाद. ३७.८/टक्के

         नाशिक. ३६.५/ टक्के

         धुळे. २६.४/ टक्के

         नंदुरबार. १६.१/ टक्के

         जळगाव. २७.०/ टक्के

        बुलढाणा. १७.८/ टक्के

        वाशीम १५.२/ टक्के

        हिंगोली. १६.३/ टक्के

        अकोला. ३१.३/ टक्के

        अमरावती. २८.२/ टक्के

       यवतमाळ. १९.५/ टक्के

        वर्धा. २९.५/ टक्के

         चंद्रपूर. ३२.३/टक्के

          नागपूर ६३.५/ टक्के

           गडचिरोली १७.१/ टक्के

           गोंदिया. २४.८/ टक्के

           भंडारा. २४.३/ टक्के

          सांगली ३३.३/ टक्के

            हि २०११ ची कामगार संख्या महिला व पुरुष यांची आहे आज हीच बांधकाम कामगार नोंदणी पाचपटीत वाढली आहे. त्याला कोण जबाबदार आहे. आजच आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या काढा आणि कामगार नोंदणी काढा म्हणजे तुम्हाला फरक कळेल 

     २०१६ मध्ये. मुंबई कोकण विभाग. पुणे. नाशिक. नागपूर. औरंगाबाद. या विभागातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई २०१६ पर्यंत एकूण नोदीत आस्थापना. ७५३० आहेत मग प्रत्येक जिल्ह्यात विविध कामगार नोंदणी असथापना कोणत्या बेसवर. बांधकाम कामगार नोंदणी करतात हे सर्व जण सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून सर्व आपली कामे करतात का ? 

                      आज बांधकाम कामगार नोंदणी होताना. परराज्यातून कामासाठी येणारे. युपी बिहार राजस्थान आणि विविध परराज्यातून येणार्या बांधकाम कामगारांची कागदपत्रे अपुरी असल्याने नोद होत नाही आपल्यातील कामगार महिला काही प्रमाणात कामांवर जातात मग एवढे बांधकाम कामगार आले कोठुन. म्हणजे. नोंदणी साठी लागणारे दाखले देणारे. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे बोगस कामगार नोंदणी होत आहे हे खरे 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गोरगरीब मुलांना हक्काचे शिक्षण आणि वंचित साठी योजना

 

गोरगरीब मुलांना हक्काचे शिक्षण आणि वंचित साठी योजना 

     समाजकल्याण विभाग यांचेकडून गरिब परस्थिती शिक्षण घेणारे मुलं मुली यांना सगळे शिका "शिक्षण हा आमचा अधिकार आहे. " असे म्हणणारे विद्यार्थी यांचेसाठी प्रत्त्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभाग यांचेकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात 

                  "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " हे सर्व शिक्षणाशिवाय शक्य नाही आत्ता आणि आजच आपण व आपले पालक समाजकल्याण विभागाला भेट द्या आणि योजना मिळविण्यासाठी कागदोपत्री पूर्ततेसह आपला हक्क मिळवा

(१) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ध्यानात घेवून शासनाने अशी योजना चालू केली आहे

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* या योजनेसाठी माध्यमिक विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव संबंधित विधयालयाकडून पाठविला जातो

* अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* विमुक्त जाती भटक्या जमाती. अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* दुर्बल घटकात मोडणारा विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ होतो

    आत्ता या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आली आहे

(२) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

        समाजकल्याण विभागाकडून शाळेतील मुलींची गळती रोखण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे मागासवर्गीय समाजातील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे

    योजना वैशिष्ट्ये / निकष

* या योजनेतून विमुक्त जाती / भटक्या जमाती / अनुसूचित जमातीच्या / मुलीच्या गळतीचे प्रमाण कमी करणे व रोखण्यासाठी करण्यात आला आहे

* इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा. ६०/ रूपये शिष्यवृत्ती मिळते तर आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा १००/ रूपये शिष्यवृत्ती मिळते शैक्षणिक वर्षात दहा महिने ही शिष्यवृत्ती योजना दिली जाते

* संबंधित विद्यालयातून अशा मुलींचे प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो

* शैक्षणिक खर्चाच्या अडचणी सोडविण्यासाठी मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होतो

* या योजनेमुळे ग्रामीण भागात मुलींची शाळेत १००/टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक करण्यात आले आहे

(३) डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह

        समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुलीकरिता अशा प्रकारचे शासकीय वसतिगृह चालविले जाते यामध्ये मिळत असलेल्या सुख सोयी सोयीसुविधा. मागासवर्गीय समाजातील मुला मुलींना शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणीत असलेलें मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अशा वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करता येते

* अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करिता प्रत्त्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा असते 

* निवासी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करीता प्रवेश मिळतो

* निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना. भोजन. निवास. व इतर शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात

*मागासवर्गीय समाजात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्या या या योजनेमुळे सोय होते शिक्षण पूर्ण करण्यासाठी व विकास साधण्यासाठी मदत मिळते

     सदर योजनेत आत्ता बदल करण्यात आला आहे

(४) मुला. मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

      मागासवर्गीय मुला मुलींची व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व मुलींची शिक्षणाची सोय व्हावी व उच्च शिक्षण घेण्यास मदत होऊन त्यांचा विकास व्हावा यासाठी अशी वसतिगृहे समाजकल्याण विभागाकडून चालवली जातात

योजना वैशिष्ट्ये/निकष

*शासकीय वसतिगृहात मुलांना. निवास. भोजन. अंथरुण. पांघरुण. मोफत दिले जाते 

* शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. पाठ्यपुस्तके. वह्या. स्टेशनरी. यांचा मोफत पुरवठा केला जातो

* वैयक्तिक व अभियांत्रिकी. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार. सटेथोसकोप. अॅप्रन. बाॅयलर. सूट. कलानिकेनचया मुलांसाठी. रंग. कलर बोर्ड. ब्रश. कॅनव्हास. मिळते

* वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी मासिक निर्वाह भत्ता मिळतो

* विभागीय पातळीवर दरमहा २००/रूपये. जिल्हा पातळीवर दरमहा ७५/ रूपये व तालुका पातळीवर दरमहा ५०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो

* अशा वसतिगृहात मध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो

* विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये चया आत असावे*इयत्ता आठवी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो

* अशा वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शालेय विद्यार्थी साठी १५/ मे पूर्वी तर महाविद्यालयीन विद्यार्थी साठी ३०/जून किंवा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांपर्यंत असतो

(५) विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन

समाजकल्याण विभागाकडून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता व विद्यावेतन दिले जाते शैक्षणिक व दैनंदिन गरजा भागवतांना या योजनेतून मदत होते

  योजना वैशिष्ट्ये/ निकष

* वैयक्तिक. अभियांत्रिकी. शेती. असे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती मुलांच्या साठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते

*या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २३५/ ते ७४०/ निर्वाह भत्ता मिळतो

* व्यवसायिक शिक्षण घेताना येणारा खर्च फक्त शिष्यवृत्ती वर भागविणे शक्य नसलेमुळे त्यांना निर्वाह भत्ता मिळतो* महाविद्यालयाच्या वसतिगृहात. शासकीय वसतिगृहात. व इतर वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतून निर्वाह भत्ता दिला जातो

* बी एड. डी. एड. असे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधिचे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००/ रुपये विद्यावेतन दिले जाते हे विद्यावेतन शैक्षणिक वर्षात दहा महिन्यांसाठी दिलें जाते

* व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतनचा प्रस्ताव संबंधित महाविद्यालय / संस्था. कडून सरकारकडे पाठवला जातो

(६) भारत सरकारची शिष्यवृत्ती

केंद्र सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते यामुळे विद्यार्थ्यांना आपलीं शैक्षणिक गरज भागविण्यासाठी मदत होते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी व त्यांचे गळती प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकार कडून शिष्यवृत्ती दिली जाते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती शालांत परीक्षेनंतर मिळते

*पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे

*दरमहा. १४०/ रूपये ते ३३०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो

*ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता. शिक्षण शुल्क. परीक्षा शुल्क. व इतर बाबींवरील खर्च शुल्क या स्वरुपात मिळते

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वताच्या विकास करण्यासाठी या योजनेची मदत होते

(७) छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी साठी ही योजना राबविण्यात येते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक. विकास. गुणवत्ता. वाढावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते

*इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला मुलींना ही शिष्यवृत्ती मिळते

*इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत दरमहा ३०० रुपये एकूण ३००० रूपये शिष्यवृत्ती मिळते

(८) पुस्तक पेढी योजना

समाजकल्याण विभागाकडून वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी अनुदान मिळते

* वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. सीए. एम एम बीए. व विधी. अशा महाग पुस्तकांसाठी अनुदान मिळते

*अनुसूचित जमातीच्या व भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*पुस्तकाचा खर्च झेपत नाही म्हणून शिक्षण बंद करावे लागणार या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

*पुस्तक पेढी योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी संबंधित महाविद्यालय यांचेकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविला जातो

(८) सफाई कामगार पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसाय ( सफाई कामगार ) करणार्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा विकास व्हावा यासाठी समाजकल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते

* ही योजना सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे

*योजनेच्या निकषांत बसणारा विद्यार्थी प्रस्ताव शिष्यवृत्ती साठी विधयालयाकडून पाठविलें जातात

* गणवेश. शैक्षणिक खर्च. भागवतांना अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मुलांना मदत मिळते

(९) मोटर वाहन चालक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध युवकांना समाजकल्याण विभागाकडून मोटर चालविण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. स्वावलंबी होण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने युवकांना अधिकृत संसथाचालकाकडून चालक वाहक प्रशिक्षण मिळते

*प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची. वयोमर्यादा. शैक्षणिक. शारीरिक. जातीचा दाखला. ही अट आहे

*प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर. वाहन चालक परवाना. परिक्षा घेऊन.  

*अधिकृत वाहन चालविण्याचे. वाहकाचे प्रशिक्षण. मोफत मिळून संबंधित विभागाचा अधिकृत परवाना मिळतो

(१०) व्यवसायिक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती अल्पशिक्षित बेरोजगारांना. "मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण " या उपक्रमातून मोफत व्यवसायांचे प्रशिक्षण मिळते व्यवसाय उभारणी तरूणांना या प्रशिक्षणाचा उपयोग होतो

योजना वैशिष्ट्ये निकष

* हि योजना फक्त अनुसूचित जातीतील अल्पशिक्षित बेरोजगारांना होणार आहे

* प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे कमीत कमी शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत असावे

* शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण कमीत कमी एक आठवडा व जास्ती जास्त दोन महिने कालावधी पर्यंत मिळते

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे शिक्षण दिले जाते प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थी तरुणास टुलकिट. व १००/ रुपये दरमहा वेतन दिले जाते

*अलपशिक्षणावर व्यवसाय करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होते प्रशिक्षणानंतर तरुणांना स्वताच्या स्वयंरोजगार मिळवता येतो

(११) औधोगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विद्यावेतन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजनेतून विद्यावेतन मिळते त्यामुळे व्यवसायाचे तांत्रिक शिक्षण घेवून विविध क्षेत्रात काम करता येते

योजना वैशिष्ट्ये निकष

* संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा ६०/ रुपये विद्यावेतन मिळते अशांना समाजकल्याण विभागाकडून दरमहा ४०/ रूपये विद्यावेतन मिळते

* तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही अशा विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून. दरमहा १००/ रुपये विद्यावेतन मिळते

* या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६५;२९०/ रुपये पेक्षा जास्त नसावे

* अनुसूचित जमातीच्या व मान्यताप्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरमहा शैक्षणिक खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी यांचा उपयोग होतो

* योजनेच्या निकषांत बसणारा या विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव सरकारकडे संबंधित औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडून पाठविला जातो

(१२) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध कुटुंबासाठी हि योजना राबविण्यात येते भूमिहीन कुटुंबातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांचा विकास व्हावा हा योजनेचा उद्देश आहे

* या योजनेअंतर्गत लाभार्थींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन मिळते

* जमीन खरेदीसाठी योजनेतून ५०/ टक्के अनुदान तर ५०/ टक्के बिनव्याजी कर्ज

*जमीन खरेदीसाठी घेतलेलं ५०/टक्के कर्ज परत फेड करण्याची मुदत १० वर्ष असते. कर्ज मंजूर झाल्यानंतर परतफेड दोन वर्षांनंतर सूरू केल्यास चालते

* अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

* लाभ देताना दारिद्र्य रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. विधवा. परित्यक्ता अर्जदारांना प्राधान्य दिले जाते

*लाभ घेणाऱ्या लाभार्थी साठी वय वर्षे १८/६०/ या दरम्यान असावे लागते

*या योजनेमुळे दुर्बल घटकातील शेतमजूर यांना हक्काचे रोजीरोटी साधनं मिळू शकते

(१२) पाॅवर टिलर योजना

अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून पाॅवर टिलर साठी. १००/टक्के अनुदान मिळते मजुरांच्या वाढत्या दरामुळे पाॅवर टिलरचया साह्याने शेती सहजपणे कसता येते

योजनेची वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी महाराष्ट्र मधील असावा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा

* अर्जदार अल्पभूधारक / कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभार्थी असावा

*अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ४०००० रूपयांपेक्षा कमी असावे

*योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा

*अर्जदाराचा अधिकृत अधिकार्यांकडील जातींचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१२) गटाई कामगारांना पत्र्याचे सटाॅल पुरविणे

गटाई काम करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती लोकांना या योजनेतून स्टाॅल मिळतात त्यामुळे हा व्यवसाय सुरक्षित करणे सोपे जाते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो

*योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ पुर्ण असावे

* ग्रामीण भागातील लाभार्थी उत्पन्न वार्षिक. ४०००० रूपये चया आत असावे व शहरी भागासाठी ५० हजार चे आत असावे

* अर्जदार मागत अम्हणजे सलेलें स्टाॅल त्यांच्या स्वताच्या जागेत असावे

* चर्मकार समाजातील काही दुर्बल घटक रस्त्यावर उघड्यावर रस्त्याच्या कडेला गटाई काम करतात त्यांना सुरक्षितपणे हे काम करण्यासाठी स्टाॅलचा उपयोग होतो

* लोखंडी पत्र्याच्या स्टाॅलबरोबर लाभार्थ्यास चामडी साहित्य घेण्यासाठी ५००/ रुपये अनुदान मिळते

*या समाजाच्या लोकांना या योजनेमुळे उपजीविकेचे साधन उत्पन्नाचे साधन मिळते

* अर्जदाराने अधिकृत अधिकारयाकडील जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१३) आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

समाजातील भेदभाव संपावा समतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी दोन वेगवेगळ्या जातीमधील विवाह केलेल्या व्यक्तिंना या योजनेतून अनुदान मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती / भटक्या जाती / यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू. जैन. लिंगायत. शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यांना अनुदान मिळते

* आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना एकत्रित. ५०'००० रूपये अनुदान मिळते

*आंतरजातीय विवाहानंतर समाजाकडून कुचंबणा होऊ नये म्हणून योजनेतून प्रबोधन केले जाते

*आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन रूपात मिळालेले अनुदान संसार उभारण्यासाठी उपयोगी पडते

* या योजनेमुळे आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत होईल

(१४) कन्यादान योजना

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होवून विवाह करणार्या मागासवर्गीय जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते नवीन संसार उभारताना या जोडप्यांना अनुदानाची मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध ( धनगर वंजारी ) विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते

* सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या वरील जातीच्या जोडप्यांना. १० :००० रूपये अर्थ सहाय्य. वधूचे आई वडील किंवा पालकांच्या नावे धनाअदेश विवाहाच्या दिवशी देण्यात येते

* सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना प्रत्त्येक जोडप्यांमागे. २:००० रूपये प्रोत्साहन अनुदान मिळते

* गरीब कुटुंबांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे विवाहाचा अतिरिक्त खर्च वाचतो

*सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे साधेपणा मुळे विधिवत विवाह करण्यासाठी समाजात प्रबोधन होण्यास मदत होते

(१५) अत्याचारित कुटुंबास अर्थ सहाय्य योजना

अत्याचाराचे बळी ठरणारया अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना समाजकल्याण विभागाकडून अर्थ सहाय्य

योजना वैशिष्ट्ये निकष

* जातीच्या कारणावरून अतयाचारास बळी पडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या योजनेतून अर्थ सहाय्य मिळते

* अनुसूचित जाती जमाती कुटुंबावर / व्यक्तिवर अत्याचार घडल्यास व या गुन्ह्याची नोंद नागरि हक्क संरक्षण अधिनियम १९५५ खाली अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास या योजनेतून अनुदान मिळते

* योजनेतून लाभासाठी जातीचा दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते

* अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर कमीत कमी २५:००० रूपये ते जास्तीत जास्त २ लाख रूपये पर्यंत अर्थ सहाय्य मिळते

*अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांचे /सदस्यांचे या योजनेमुळे पुनर्वसन होण्यास मदत होते

(१६) वृध्द कलावंत पेन्शन योजना

राज्य सरकारच्या या योजनेतून वृध्द कलावंतांसाठी वृध्दापकाळात पेन्शन मिळते. आणि उतरत्या वयात त्यांना उपजीविका करणेस मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी वृध्द कलावंत यांनी विहीत नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा

*तमाशा. नाटक. लोककला. चित्रपट. यामध्ये काम केलेल्या व वयाची ६० वर्ष पूर्ण असलेल्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*इच्छुक वृध्द कलावंत म्हणून काम केल्याची माहिती पुरावे ( फोटो. कात्रणे. प्रमाणपत्र. इत्यादी ) जोडावी

*रेशनकार्ड. गाव कामगार उत्पन्न दाखला. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*पेन्शन योजनेमुळे वृध्द कलावंत लोकांना सुरक्षितता मिळते

(१७) पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना या योजनेतून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळते यामुळे समाजातील युवकांना सैन्य व पोलीस भरतील मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध असावा. प्रशिक्षणासाठी वय. १८ ते २५ दरम्यान असावा. उमेदवारांची छाती. उंची. इत्यादी सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार असावी. उमेदवार. इयत्ता बारावी उत्तीर्ण व शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तीन महिन्यांचा कालावधी असतो. तीन महिने पूर्ण कालावधीत उमेदवारांची राहण्याची सोय प्रशिक्षण संस्थेत केली जाते. पोलिस प्रशिक्षणात. धावने. उंच उडी. लांब उडी. गोळाफेक. पुल अप्स. आॅपटिकलस रससी खेच. चढणे उतरणे. हे प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीत चांगली संधी मिळू शकते.  

     आत्ता आपण वरील मॅसेज पूर्ण पणे वाचला असेल तर आपल्या ध्यानात एक गोष्ट आली असेल ती म्हणजे समाजकल्याण विभाग असो वा कोणताही विभाग त्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अट कायमस्वरूपीअडसर म्हणून घातली जाते ती म्हणजे जातींचा दाखला हा सर्व खेळ आहे कारणं खरोखरच या योजनेस पात्र असणारा लाभार्थी आजच्या घडीला आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करु शकत नाही कारणं त्यांच्याकडे ६० वर्षाचा पूरावा नाही. 

          खरोखरच सर्वसामान्य माणसाची मुलं मुली शिकावी असे वाटत असेल तर जातीच्या दाखल्याची अट रद्द करा नाहीतर योजना बंद करा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार



माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार 


         10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हा वैश्विक जाहीरनामा अखिल मानव जातीच्या प्रति विविध हक्क व अधिकार. यांची जाणीव करून देण्यासाठी समर्पित केला. म्हणून तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानव अधिकार कार्यकर्त्यांनी हा दिवस 30 कलमी जाहिरनामा मनापासून माहिती करून घेणे गरजेचे आहे
                मानव कुटुंब प्रिय आहे. समूहाने राहणे. आपण जिथे राहतो तिथे आपल्या जीवनासाठी व जगण्यासाठी आवश्यक असणार्या सुख सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी संविधानात आपणांस काही मूलभूत अधिकार व हक्क कर्तव्य आखून दिली आहेत जया अर्थी मानव कुटुंबातील सर्व व्यक्ती चे स्वाभाविक प्रतिष्ठा. व त्यांचे सन्मान न्याय व शांतता यांच्या प्रसथापनेचा पाया आहे ज्या अर्थी मानवी हक्क व अधिकार यांचें हनन अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्य घडून आली त्यामुळे सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. आणि त्यायोगे मानव जातीच्या सदविवेक बुध्दी वर मोठा आघात झाला त्यातून. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद व्यसन. असया समाजासाठी विघातक असणार्या प्रवृत्तीने डोकं वर काढलं. आणि त्यातून मानवाच्या भाषण स्वातंत्र्याचा व उपभोगता घेता व यातळी गरज यापासून त्याची मुक्तता होईल अशा जगाची उभारणी करणे ही सर्वोच्च आकांक्षा म्हणून घोषित करण्यात आली आहे यांच्यावर उपाय म्हणून जुलुम दडपशाही यांच्याविरुद्ध अखेरचा उपाय म्हणून आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने व मानवाला बंड करणे. आंदोलन करणे. उपोषण करणे. व अन्य मार्गाने आपल्या वर झालेल्या अन्यायाची दाद मागणयाची वेळ येवू नये म्हणून मानवी अधिकारांचे संरक्षण कायद्याने करणे गरजेचे आहे म्हणून मानव अधिकार ही संकल्पना अमलात आणली
          राष्ट्र राष्ट्रा मध्ये मित्रत्व संबंध वृद्धिंगत करण्याच्या कार्यासाठी चालना देणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रा चया सनदेमधये मूलभूत हक्क अधिकार मानवी अधिकार प्रतिष्ठा व महत्व महिला व पुरुष समानता समान अधिकार यावरील आपली श्रद्धा निश्चिय पूर्ण पुन्हा व्यक्त केली आहे आणि अधिक अधिक स्वातंत्र्याचे वातावरण समाजप्रगती. घडवून आणण्याच्या व जीवनभर सुधारण्याचा निर्धार केला आहे. संयुक्त राष्ट्रानी सदस्य राष्ट्रसंघटनेचा सहकार्याने व कर्मचारी पदाधिकारी मानवी हक्क व अधिकार मूलभूत अधिकार स्वातंत्र्य जागतिक प्रतिष्ठा. प्राप्त करून देणायाचे व त्याबद्दल जनजागृती जाहिरात संबोधन प्रबोधन व त्यांचे पालन करण्याचे ध्येय साध्य करण्याची मानव अधिकार कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. हा मानवीय अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा सर्व लोकांसाठी ध्येय सिध्दी एक समान आदर्श म्हणून उद्घोषणा करते व त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने व समाजातील प्रत्येक घटकाने हा मानव अधिकार जाहीरनामा सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. अध्यापन व शिक्षण यांच्या द्वारे या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा मान राखला जाण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा प्रगतिक स्वरूपाचा उपाय योजनांच्या द्वारे सदस्य राष्ट्रांच्या लोकांमध्ये व त्यांच्या क्षेत्राधिकार प्रदेशातील लोकांमध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळवून व त्यांचे परिणामकारक पालन केले जाण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत
       # तक्रार कोठे आणि कशी करावी #
        भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत त्यांचा वापर उपभोग घेण्यासाठी विविध तरतूद करण्यात आली आहे प्रशासन शासकीय निमशासकीय कार्यालयाकडून. प्रशासनाकडून एखाद्या व्यक्तिच्या मूलभूत हक्क व अधिकार यांची पायमल्ली होत असेल. अशा सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेच्या मदतीला मानव अधिकार आयोग धावून जातो. आयोगाचा कार्यकाल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे आणि हे मानव अधिकार कार्यकर्त्यांचे परम कर्तव्य आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ हा २८ सप्टेंबर १९९३ रोजी लागू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग नोव्हेंबर २००१ रोजी स्थापन करण्यात आला. 
        #*#* ‌‌. (१) अशी कोणतीही व्यक्ती की ज्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा हनन झाले असेल त्या व्यक्तिस किंवा त्या व्यक्तिच्या वतीने कोणताही व्यक्ती स्वता किंवा पोस्टाने. फॅक्स. वर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करू शकतात
(२) कोणत्याही स्वरूपाचे शुल्क अथवा तिकीट लागत नाही
(३) सदर तक्रार संबंधित अध्यक्ष किंवा मानवी हक्क आयोग यांना संबोधित करून करावी
(४) कोणत्याही शासकीय निमशासकीय अधिकार्यांचे विरोधात तक्रार दाखल करता येते
(५) तक्रार मराठी. हिंदी गुजराती. भाषेतून करता येते
(६) सरकार किंवा सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होत असलेला शारीरिक अत्याचार. मानवी हक्क विषयक. फसवणूक व कोणत्याही प्रकारचा छळ. तसेच सन्मानाने जगण्याच्या प्रयत्नात सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी केलेला अमानविय हस्तक्षेप आदी करण्यासाठी तक्रार करता येते
(७) पोलिस स्टेशनमध्ये आरोपीला झालेली अमानविय माराहान त्याबद्दल तक्रार दाखल करता येते
(८) पोलिस कोठडी. कारागृह. बालसुधारगृह. येथे झालेला अमानवीय छळ. आणि मृत्यू. हरवलेली बालके व व्यक्ती यांचा शोध घेण्यास टाळाटाळ अशावेळी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करता येते
(९) अन्न. वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण. आदि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी अपेक्षित समाजाची शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होणारी हेळसांड या विरोधात मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते 
     माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा मानव अधिकार
  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

राजकीय आणि शासकीय दिवाळी

 

राजकीय आणि शासकीय दिवाळी 

            मनापासून आणि पूर्ण विचार करूनच दिला जाणारा शब्द म्हणजे आश्वासन. हे आपणा सर्वांना माहीत आहे. आश्वासन देत बसणेची सुरवात होते ती आपल्या घरापासून नव्हे तर लहानपणापासून तु शाळेत जा तुला हे देतो ? अशी आश्वासने दिली जातात आणि त्याप्रमाणे आपण वागतो आपले काम करतो.  काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा वर्ग यामध्ये आपण शिकत असताना शिक्षकांनी १००/ टक्के निकालांचे आश्वासन. मुला मुलींनी एकामेकाला दिलेली आश्वासने. मग ती प्रेमाची असो वा लगनाची असो. असे सर्व आपले आयुष्य आश्वासनावर चालत असते 

              आपणं पौढ झालो आणि आपल्याला मतांचा अनमोल अधिकार मिळाला. मग. ग्रामपंचायत.  नगरपालिका. महानगरपालिका. आमदारकी खासदारकी. बॅंक निवडणूक. काॅलेज महाविद्यालय विद्यालय मध्ये होणारी निवडणूक.  सोसायट्या निवडणूक.  शिक्षक संघांची निवडणूक.  कामगार संघटना निवडणूक. एस टी अध्यक्ष पदासाठी निवडणूक.  अशा अनेक माध्यमांतून निवडणूका घेतल्या जातात. आणि कळत नकळत आपल्याला मतदानाचा अधिकार असतो आणि तो कोणत्याही भुलथापांना बळी न पडता बजावयचा असतो. 

            निवडणूका जाहीर झाल्या की सभा. मिटींगा. मतदान संपर्क. मतदार प्रशनाची चाचपणी. .गावचा शहरांचा विकास  अशा विविध प्रशनाची चर्चा सुरू होते #मला निवडून द्या मी गावात पाणी. रस्ते. गटर. स्मशानभूमी. बाग बगिचे.  प्राथमिक आरोग्य केंद्र.  समाजमंदिर.  वृद्धाश्रम.  निवारा केंद्र. अशा विविध माध्यमातून गावांचा विकास करेण. दिला जातो तो शब्द नसतो तर असत ते फक्त आश्वासन. वरील प्रमाणे कोणताही विकासाचा फंडा राबविला जात नाही. आणि राबविला तर  फक्त आणि फक्त पैसा मिळविणे एवढाच उद्देश असतो. मी हे करिन मी ते करिन म्हणून काय उपयोग प्रत्यक्षात काहीच नाही. निवडणूकी पुरतेच मान खाली घालून पाया पडणारे उमेदवार  निवडणून आल्यावर त्या प्रभागात दिसत सुध्दा नाही. याला आपणच कारणीभूत आहोत कारणं मतदानासाठी आपण आपला आत्मसन्मान मटन. दारु. आणि काही पैसे यांवर विकला आहे. आज ५०० पुढच्या वेळी १००० आपण निवडून येणार एवढा आत्मविश्वास उमेदवार यांना आहे. खोटी आश्वासने द्यायची आणि जनतेची दिशाभूल करायची 

            आमदार खासदार मंत्री पुढारी नेते यांनी आपल्या जिल्ह्यात २००५/२०१९/२०२१  या काळात महापूर आले. लोकांचें शेती.  जनावरें गोठे. जनावरें वाहून जाणे.  घरांची पडझड.  मयत व्यक्ति.  जीवनावश्यक वस्तू नुकसान. अशा विविध बिकट परिस्थितीत. शासनाने जनतेची फसवणूक केली. जतेला वाटाव शासन आपल्यासाठी काहीतरी करतय म्हणून सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. ते फक्त कागदावरच राहिले.  मोठ मोठे सत्ताधारी विरोधी पक्षनेते यांनी पूर ग्रस्त भागाला भेटी दिल्या. काहीजणांनी आकाशातून तर काहीजणांनी बांधावरून. आणि जनतेला. दिला तो शब्द नव्हता ते होते फक्त आश्वासन. कधीच पूर्ण न होणारें. पूर ग्रस्त भागाला विविध योजना सुरू करण्यात आल्या. सर्वात मोठे दुर्भाग्य आहे ते म्हणजे. २००५ ची पूर ग्रस्त भागांची मदत. दुसरा पूर २०१९ ला आला तरी मिळली नाही. त्यांनंतर २०२१ ला महापूर आला तरी २०१९ ची पूर ग्रस्त भागातील मदत मिळाली नाही. आणि २०२१ ला जो पूर आला त्याची नुकसानभरपाई पंचनामे झाले गावच्या गावं वाहून गेली. पण आज पर्यंत पूराची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी जनतेला उपोषण आंदोलन करावे लागते म्हणजे सर्वात मोठ दुर्भाग्य म्हणावं लागेल मग आश्वासन गेली कुठ? योजना सुरू करायची आणि त्यात अशी काही कागदपत्राची अट घालायची की गोरगरीब ती पूर्ण करू शकत नाही मग तो नुकसान भरपाई मध्ये येत नाही. 

                  आपल्या विकासाची रक्तवाहिनी मानली जाणारी रस्ते ही संकल्पना ज्यांनी अंमलात आणली त्यांनी विकासाला मोठा हातभार लावला. रस्ते विकास रुंदीकरण. यामुळे विकास वाढला. वाहने वाढली. वाहतूक वाढली त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. शासन निर्णयानुसार नियमानुसार. करण्यात येणारी वाहतूक आणि त्या वाहनांचे होणारें अपघात यामध्ये मयत व्यक्तिंच्या वारसांना एक विशिष्ट रक्कम शासन नेते पुढारी आमदार खासदार मंत्री जाहीर करण्याचे आश्वासन देतात पण खरोखरच कोणत्याही वारसाला त्याचा फायदा होत नाही. कारण त्यात मयत व्यक्ति आपलाच आहे त्याच्या बरोबर आपले नाते  सिध्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तो जोडू शकत नाही त्यामुळे कधीच पूर्ण न होणारें आश्वासन आणि त्यामागे पळणारे आपण खरच खुळ आहोत 

           निवडणूका आल्या की समाजातील वंचित घटक. बांधकाम कामगार. सफाई कामगार.  एस टी कामगार.  अशा विविध स्तरांतील कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे कोणतरी आश्वासन देतो. दिवाळीच्या आगोदर ही एक विशिष्ट रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले जाते. आणि आपण सर्वजण खुळयासारखी त्या बोनस रक्कमेची वाट पाहतो. विचार करा शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचारी कचेरीत काम.  टंकलेखन. कारकून. पर्यवेक्षण. बॅंकिंग व्यवस्थापन.  शिक्षण. वैद्यकीय. यासारखे प्रतिष्ठेचे. काम करणारे यांनी आपल्या कामावर रुजू झाल्यापासून बरेच वर्ष आॅफिसला दिलेली असतात त्यांना बोनस मिळण किंवा देण पटत पण असंघटित क्षेत्रातील कामगार यांना बोनस देण सर्वात मोठ पाऊल आहे आणि ते पूर्ण होणारच नाही म्हणून दिला तो शब्द नव्हता ते होते फक्त आश्वासन

            भूकंप. नैसर्गिक आपत्ती यामध्ये सर्वांना घर बांधून देण्याचे आश्वासन. त्यांना दत्तक घेण्याचे आश्वासन. विविध शाळा दत्तक घेण्याचे आश्वासन.  विविध निवारा केंद्र वृध्दाश्रम यांना सेवा देण्याचे आश्वासन. अपंग विकासासाठी देण्यात आलेले आश्वासन. विविध ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचे कर कमी करण्याचे आश्वासन.  विज बिल कमी करतो म्हणून फसव देण्यात आलेलं आश्वासन.  महिलांना सुरक्षा बद्दल देण्यात येणार आश्वासन. विविध योजना राबविण्याचे आश्वासन. अशी एक नाही अनेक आश्वासने फसवी दिली जातात. त्यातील कोणतेही आश्वासन पूर्ती केली जात नाही. 

             उच्च जातीना उत्तम सुविधा चांगल्या संधी आणि प्रतिष्ठेचे व्यवसाय मिळतातं त्यांना करावा लागणारा जीवनसंघरष या व्यवहारिक फायदयामुळे बराचसा सुसह्य होतो 

           म्हणजे आश्वासनावर विश्वास ठेऊ नका. कारणं आश्वासने ही फसवी असतांत 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अन्न व औषध प्रशासनाचा कोल्हापुरात छापा

अन्न व औषध प्रशासनाचा कोल्हापुरात छापा                                    

       

दि. २९/१०/२०२१ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समवेत कोल्हापूर जिल्ह्यातील पुढील नमूद आस्थापनांवर धाडी टाकल्या व कारवाई घेतली. 

 मे. शिवरत्न मिल्क ॲण्ड मिल्क ॲग्रो प्रॉडक्ट, ताकवडे, ता. शिरोळ जि. कोल्हापूर या आस्थापनेवर धाड टाकली असता तेथे Skimmed milk powder व whey powder चा अपमिश्रक म्हणून वापर करून खवा उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळले. सदर ठिकाणी अन्न नमुने घेऊन रु ७४८५०/- किमतीचा ४९९ किलो भेसळयुक्त खवा, रु.९,६८,६२०/- किमतीची ५०९८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, रू.५१८४ ची ४८ किलो Whey Powder, रू.८८,८०४/- चे मिश्रण असा एकूण किंमत रुपये ११,३७,४५८/- चा साठा जप्त करण्यात आला . 

        मे. अमवा मिल्क ॲण्ड मिल्क ॲग्रो प्रॉडक्ट, अकिवाट, ता. शिरोळ जि. कोल्हापूर या आस्थापनेवर धाड टाकली असता तेथे skimmed milk powder, तेल व whey powder चा अपमिश्रक म्हणून वापर करून खवा उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळले. सदर ठिकाणी रु ९९,६००/- किमतीचा ४९८ किलो भेसळयुक्त खवा, भेसळकारी पदार्थ स्किम्ड मिल्क पावडर चा रु १,५७,०८०/- चा ३७४ किलो साठा तसेच पाम कर्णेल तेल ८ ली रु १,५२०/- व व्हे पावडर चा ९९ किलो साठा किंमत रु ११,३८५/-, होल मिल्क पावडर चा रू.९९,३००/- किमतीचा ३९८ किलो साठा तसेच भेसळयुक्त म्हशीचे दूध १८ लिटर असा एकूण किंमत रुपये ३,७०,०५७/- चा साठा जप्त करण्यात आला 

      मे. गणेश मिल्क प्रॉडक्ट, मजरेवाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर या आस्थापनेवर धाड टाकली असता तेथे skimmed milk powder व whey powder चा अपमिश्रक म्हणून वापर करून खवा उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळले. सदर ठिकाणी रु ६०,३४० /- किमतीचा ४३१ किलोचा भेसळयुक्त खवा, भेसळकारी स्किम्ड मिल्क पावडर ९४८ किलो किंमत रु.१,९४,३४०/- बिना लेबल ची पांढरी पावडर (अपमिश्रक) १९८ किलो, किंमत रु २५,६४०/-असा एकूण किंमत रुपये २,९०,३२०/- चा साठा जप्त करण्यात आला. 

चौकशी दरम्यान आढळल्या नुसार मे. गणेश मिल्क प्रॉडक्ट, मजरेवाडी, ता शिरोळ जि. कोल्हापूर यांनी त्यांची आस्थापना मे. बालाजी मिल्क प्रॉडक्ट, मजरेवाडी, ता शिरोळ जि. कोल्हापूर येथे साठवून ठेवलेला whey powder या अपमिश्रक चा साठा करून ठेवला असल्याने तेथे धाड टाकून रू.२,३१,७६८/- किमतीची १९९८ किलो व्हे पावडरही जप्त करण्यात आली .   

      सदरची कारवाई मा. ना. श्री. राजेंद्रजी शिंगणे, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य व मा. ना. श्री. राजेंद्रजी यड्रावकर, राज्य मंत्री, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांचे सुचनेनुसार श्री. परीमल सिंग, आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता व गुप्तवार्ता विभागाने पार पाडली आहे . 


कलाकारांची दिवाळी कडू

 


कलाकारांची दिवाळी कडू

              कलेला आकार देणारा कलाकार मातीला आकार देणारा कुंभार शिल्पास आकार देणारा शिल्पकार. लोखंड वितळून त्याला आकार देणारा लोहार मातीला आकार देणारा कुंभार समाजात आपल्या कले द्वारे समाज प्रबोधन संबोधन. करमणूक जनजागृती जाहिरात करणारे एकमेव नाव आहे ते म्हणजे कलाकार असे विविध कलाकार आपण बघतो काही ध्यानात राहतात. आणि काही विसरून काळाच्या पडद्याआड जातात.  

         बॅण्ड वाले. बॅनजोवाले. तमाशगिर. गोपाळ गोलहा. दांगट. नंदिबैलवाले. मदारी. साप गारुडी. वासुदेव. भविष्य कथन करणारे. मनकवडी. कुडमोडे जोशी. डमरू वाले. भिक्षेकरी. विविध रुप घेणारे सोंगाडे. लोकनाट्य. गोंधळी. बहुरूपी. जागरण. आरकेसटरा. पोपटवाले. डोंबारी. पांगूळ. डवरी. अस्वलाचे खेळ करणारे. भजन कीर्तन द्वारे जनजागृती करणारे. लग्नात विविध कला सादर. करणारे. असे एक नाही अनेक कलाकार आपल्या नशिबाला पुजलेली गरिबी पोटासाठी मिळेल त्या सुपारीवर आपली कला सादर करणारे कलाकार. जवळपास ढोबळ मानाने या अशा कलाकारांचा सर्वे केला तर असे निदर्शनास आले की भारतात ११ कोटी पेक्षा जास्त कलाकार संख्या आहे त्यातील महाराष्ट्रात ७३ लाख संख्या आहे हे सर्व जण पोटासाठी आज हे गाव उद्या ते गाव असा प्रवास असतो. भीक कोण देत नाही. शेती नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण नाही. हव तस हाताला काम नाही रोज सकाळी दान पावल म्हणणारा वासुदेव. पाऊसाचे भाकित करणारा नंदीबैल वाला. पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची म्हणणारी ती नृतकी. भविष्य कथन. ठराविक अंतरावर उभे राहून आपली कला सादर करणारे मनकवडी. नाचतो गा डोंबारी म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी छातीवर दगड फोडणे असे मैदानी खेळ करणारे. असे विविध कलाकार पोटाच्या आकांताने ओरडत असतो आणि आपण टाळ्या वाजवत असतो स्वता खरोखरच रडणारा कलाकार याचा तो अभिनय आहे म्हणून आपण त्याचा आनंद घेत असतो. सगळ व्यवस्थित चालला होत कलाकार आणि मुल बायका. म्हातारे आई वडील यांना कसेबसे दोन वेळचे जेवण मिळत होत पण जास्त काळ ही प्रस्थिती राहिली नाही. 

            २२/२३ मार्च ला कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकट आले आणि शासनाने लोकांच्या संपर्कामुळे गर्दि यामुळे कोरोना सारखी महामारी वाढण्याचा धोका शासनाच्या ध्यानात आला त्यामुळे शासनाने मार्च २०२० मध्ये. वाडी वस्ती गाव तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी केली. आणि जगण्यासाठी पैसा मिळविणारा जीव वाचवण्यासाठी घरातच बसून राहीला. शासनाने विविध सामाजिक कार्यक्रम. लग्न. मुंजी. वाढदिवस. जंयती. पुण्यतिथी. असे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यातच जत्रा. यात्रा. रद्द करण्यात आल्या त्यामुळे. या सर्व कार्यक्रमात वाजाप काम करणारे कलाकार यांच्या हाताला काही कामच राहिलं नाही. कलाकारांच्या हाताला काहीच काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली काही कलाकारांना ही उपासमारीची वेळ बघणे अवघड झाले एकवेळ लोकांच्या सहवासात राहून वाहवाह मिळविलेल्या कलाकाराने आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा 

            कलाकारांच्या विविध अडचणींवर. प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी. सांगली मधून कलाकार महासंघ यांनी ग्रामपंचायती पासून मंत्रालयापर्यंत मार्च २०२० ते २०२१ पर्यंत कलाकारांना काम नाही त्यांचे सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाले यांना शासनाने या टाळेबंदी काळात कोणतीही मदत दिली नाही. यासाठी पत्र व्यवहार करून. जागोजागी बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन. बोंब मारो आंदोलन. हायवे आंदोलन. अशी वेगवेगळी आंदोलने १४ महिन्यात करण्यात आली. पण शासनाला या कलाकारांची दया आली नाही. शेवटी मुख्यमंत्री यांनी तिस-या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर ११ आक्टेबर २०२१ रोजी. कार्यक्रमावर लावणेत आलेले निर्बंध हटविण्यात आले आणि कार्यक्रम करण्यास मार्ग मोकळा झाला पण सर्व काही पूर्व नियोजित आणि पहिल्या सारखें होण्यास बराच वेळ लागणार आहे. शासनाने कोरोना काळात कलाकारांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून एकही रूपया कलाकारांना दिला नाही. 

            ६०/६५ वयोवृद्ध गटातील अ ब क गटानुसार मानधन देणें निर्णय आहे त्यानुसार शासनाने ५६ हजार वयोवृद्ध कलाकारांना २८ कोटींचे पॅकेज जाहीर केले पॅकेज जाहीर करून बरेच दिवस झाले पण खरोखरच कलाकारांना आत्ता दोन महिन्यांचे मानधन अनुदान आत्ता मिळाले म्हणजे जाहीर झाले कधी मिळालं कधी यांचा काही मेळ आहे का ? कोरोना काळातील दोन वर्षांची नुकसान भरपाई. व शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मानधन वेळेत मिळाले असतें तर आज सर्वांच्या घरांत दिवाळी साजरी होत आहे. प्रत्येक जणांचे तोंड गोड होणार आणि आमचा कलाकार तोंड कडू करून बसला आहे. म्हणजे संस्कृती व आपले संबोधन प्रबोधन प्रचार प्रसार करणारे कलाकार यांच काय ? 

             टाळेबंदी जारी करण्यात आली तेव्हा कलाकार यांनी हाताला मिळेल ते काम मिळेल त्या मजूरीवर केलें 

                शासनाकडून निर्णय जाहीर झाला पण त्याची अंमलबजावणी कलाकार जीवंत आहे तोपर्यंत करणे गरजेचे आहे शासनाने विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी विविध आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत पण आपल्या तरूणाईच्या काळात कलाकार वयोवृद्ध होत आहेत. त्यावेळी त्यांच्यावर येणारी वेळ अतिशय वाईट आहे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पटटिचा कलाकार रस्त्यावर भिक मागताना दिसत आहे. चहा तंबाखू द्या. घरच्यांची मदत नाही. मुल पोसत नाहीत. शासनाच्या शासन त्यांच्या नोकरी प्रमाणेच थोडी का होईना पेन्शन देत असतें म्हणजे ६० वर्षात सेवानिवृत्त झाल्यावर. त्यांचे पुढचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी शासनाचा उपक्रम आहे पण कलाकार कशातच नाही. मग कलाकारांना पेन्शन योजना सुरू होणार का ? त्यांची अंमलबजावणी होणार का ? कलाकार जगला पाहिजे नाहीतर गोष्टींच्या रूपात कला व कलाकार आपल्या मुलांना सांगावें लागतील 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कोण काय - म्हणेल माग बघू नका

 


कोण काय म्हणेल माग बघू नका

              आपण समाज प्रिय असणारी व्यक्ती आहे समाजात समूहाने राहतो सणवार लग्नकार्य मृत्यू विधी प्रत्येक धर्माच्या चालीरीती प्रमाणे केले जातात. धर्माप्रमाणे संस्कार परंपरा संस्कृती हे आपण जपतो. मग काय समाजात एकादा गरिब असेल तरी समाज त्याला हिनवतो. आणि एकादा श्रीमंत असेल तरी समाज त्याला सुद्धा हिनवतो. ही समाजाची रित आहे. 

              आपले दैनंदिन जीवन धकाधकीचे आहे धावपळ आहे आपणास असे वाटते की आपण शिक्षण रुपी उजेडात असून सुद्धा भयंकर अंधारात फिरतो छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी जीवनात मोठे मोठे रहस्य सोडून जातात ज्या गोष्टी आपण कधी साधारण माणतो आणि विसरून सुध्दा लवकर जातो आपल्या या वागण्याचा परिणाम म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी एक दिवस भयंकर परिणाम घेऊन समोर येतात या दैनंदिन गोष्टी आपल्याला आपल्या वाईट परस्थिती काय करावे काय करू नये याची शिकवण आपणांस होते. ज्या देशात आदर नाही जगण्याचे साधन नाही खाण्याला पिण्याला काही नाही. विद्या प्राप्त करण्याचे साधन नाही  भ्रष्टाचार. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद कामगार लुट. रेशन घोटाळा. दवाखान्यात लुट. औषध दरामुळे सर्वसामान्य जनतेची लुट.  महिला संरक्षण नाही.  मुलांना मोफत शिक्षण नाही. ग्रामीण भागात गावगुंडाचा सुळसुळाट.  विविध विमा कंपन्यां एजंट दलाल यांचा सुळसुळाट.  शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार.  सर्वसामान्य माणसाला पत्र व्यवहार करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणारे.  शासकीय योजना घोटाळा.  विविध महामंडळाना राजकारणी लोकांनी पाडलेले भगदाड.  शासकीय भरती नाही.  नोकरी नाही बेरोजगारी भस्मासुर.  वयोवृद्ध निराधार अनुदान विधवा अपंग अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. यांच्यामधील बोगस कारभार.  माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील अत्याचार खटले. जाणीवपूर्वक जीवघेणे हल्ले.  मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ याला निधी नाही कर्मचारी नाही.   खाजगीकरण भस्मासुर.  घरकुल योजना घोटाळा.  देवस्थान श्रध्दा बाजार.  गावातील विविध विकास योजना घोटाळा.  बेमाफी शिक्षण फी वसुली.  घरफाळा पानपट्टी मनमानी पद्धतीने आकारणी आणि पठाणी पध्दतीने वसुली.  खते बी बियाणे भरमसाठ वाढलेले दर. मालाला हमीभाव नाही.  मार्केट यार्ड नावाखाली शेतकरी यांची लुट.  कारखानदारी एफ आर पी ऊस बील यामधील टाळाटाळ.   दारूबंदी उठाव.  व्यसनमुक्ती केंद्राचा अभाव.  संविधान घटना यांच्या माहिताचा अभाव.  मोबाईल जास्त वापर डोळ्यांचे रोग कमी वयात चश्मा लागणे.  व्यायाम थांबला वजन वाढणे बी पी शुगर मधुमेह रक्तदाब हृदयविकार असे विविध जीवघेणे रोग. मार्केट जाहिरात ग्राहक लुट. निराशा सामाजिक मानसिक आर्थिक कुचंबणा.   वरीलपैकी कोणत्याही ठिकाणी राहून कोणत्याही माणसांचे भले होणार नाही प्रगती होणार नाही ग्रामसेवक सरपंच नगरसेवक नगराध्यक्ष दयाळू व प्रामाणिक असायला हवे.  राहण्यासाठी योग्य जागा.  आजारासाठी योग्य उपचार जर मिळत नसतील अशा ठिकाणी राहून कुठलेही सुख मिळणार नाही विकास होणार नाही अशा गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये राहणे व्यर्थ आहे. दुःख जरूर मिळणार. 

                    विषय मांडण्याचे कारणं एवढंच आहे की आपल्या जीवनाशी संलग्न असलेल्या गोष्टी मी वर नमूद केलेल्या आहेत आपल्या जीवनात राजकारण सर्वात मोठा भस्मासुर आहे तो आपले मन धन कायम आपल्या काबूत ठेवतो. आज प्रत्येक राजकीय पक्षाची विविध नांवाने संघटना सेवाभावी संस्था युनियन मित्र मंडळ. सार्वजनिक कार्यक्रम संकुल. विविध नांवाने गट तयार झाले आहेत. त्यात प्रामुख्याने आपली शिकून फिरणारी नोकरी नाही अशी मुल या राजकीय लोकांचे टार्गेट आहे. म्हणजे आपली मुल कस्टडी रूम मध्ये आणि राजकारणी यांची मुल स्टडी रूम मध्ये गुन्हे आमच्या मुलांच्या नावांवर.  म्हणून हे सर्व बदलण्याची गरज आहे  धर्माच्या नावावर. समाजातील विभूती नावावर.  विविध समाजाच्या नावावर.कामगार संघटना महिला अत्याचार निवारण समिती. बालमजुरी कायदा अंमलबजावणी.     जेवढ्या संघटना असतील त्यांचे पदाधिकारी निवडण्यासाठी त्या त्या गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील पदाधिकारी निवडीचे पेव आज निवडणूक आल्यावर फुटले आहे. 

              माझी सर्व सामान्य माणसाला जनतेला एकच सांगणे आहे की पद घ्या एखाद्या सर्वसामान्य पणे निःपक्ष पणे काम करणारी संस्था युनियन त्याचा अध्यक्ष कोण आहे त्यापेक्षा त्याचे समाजाबद्दल लोकांबद्दल काय आहेत. समाज प्रबोधन. सर्व शासकीय योजना.  माहिती अधिकार. रेशन. रुग्ण. व व्यसनमुक्ती. समाजात चांगले विचार पेरणारे. # म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी #. असे व्यक्तिमत्व असावे.  प्रतयेकाला तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे हे न पाहता निस्वार्थी पणे मार्गदर्शन करणारा असाव.  समाजात अशा लोकांना वेड म्हणलं जात. साधी राहणी. नेता माग नाही.  पण आपण एक विसरतो की नेता पाच वर्षे असतो सत्ता पाच वर्षांने बदलते पण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदापुढे. फक्त नाव बदलत पण तहसिलदार जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी ही शासकीय पदे तशीच राहतात. म्हणजे आमच तुमच भांडण शासनाबरोबर आहे त्यामुळे फक्त तुम्हाला जे काय पाहिजे त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी ही फक्त एका समाजसुधारक व्यक्ति व त्यांच्या सहकाऱ्यां मध्ये आहे फक्त ती जागविणयाचे काम विना राजकीय आश्रय असणार्या संघटना सेवाभावी संस्था युनियन करत असतात. या संस्था युनियन यांचे पद घेण्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार करतात. पण एखाद्या पक्षाचे पद असेल तर बिना चप्पलच चालत जाईल नवस केल्यासारखे नेत्यांच्या घरला किती किळसवाणा प्रकार आहे बघा. पदर खा आणि यांचाच जयजयकार करा आरे आपण आपला स्वाभिमान घाण टाकला आहे काय. आपल्याला अजून कळल नाही राजकारण हे गजकर्ण आपल्या घरांत पोहचलं मग कळणार कधी 

              आम्ही लोक म्हणजे कोण ? अनेकदा असा प्रश्न पडतो की ज्याच्या नावे ही घटना उदघोषित केलेली आहे. #. आम्ही भारतीय लोक # म्हणजे नेमके कोण ? हेच शब्द का वापरले आहेत ? त्यांचे एक कारण आहे असे सांगता येईल की स्वातंत्र्याचा लढा हा प्रामुख्याने इंग्रजी अंमलाखालील प्रांतांत लढला गेला घटना समितीत संस्थानातील एकही जनतेचा प्रतिनिधी नव्हता. जे होते ते संस्थानिकांनी नियुक्ती केलेले प्रतिनिधी होते असे असले तरी या घटनेमागील शक्ति आणि ती घडविण्याचे श्रेय प्रांतांतील व संस्थानातील सामान्य लोकांचें आहे संस्थानिकांचे व मुठभर नेत्यांचे नाही हे त्यातून ध्वनित होते. दुसरें म्हणजे चळवळीच्या काळात मुसलमान व शिख दलित अशा लोकसमूहाचया प्रत्येकाच्या हितासाठी लढणारया विविध संघटना विना राजकारणी होत्या

               समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा परिषद

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वैयक्तिक स्वातंत्र्य

वैयक्तिक स्वातंत्र्य

            व्यक्तिजीवनाचा विकास. व्यक्तिच्या गुणांचा विकास करण्याचे स्वातंत्र्य व संधी समाजव्यवस्था व राष्ट्राच्या स्थैर्याचया दृष्टीने आवश्यक आहे. हा खरया लोकशाही व मानवी हक्क व अधिकार समाता आणि स्वातंत्र्य हक्कामुळे व्यक्तिला किमान सभ्य आणि सुरक्षित जीवन जगण्याला आवश्यक असे वातावरण मिळते. परंतु एवढ्या मुळे व्यक्तिचे प्रश्न सुटणार नाहीत व्यक्तिचे जीवन अधिक अर्थपूर्ण व सुसंस्कृत होण्यासाठी आचार विचार उच्चार या स्वातंत्र्याबरोबर श्रध्दा विश्वास यांसारख्या मानसिक क्रिया बाबत स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीच्या संवर्धनला अनुकूल वातावरण व वैयक्तिक प्रगतीसाठी शिक्षणाच्या समान संधी या सर्वांची आवशयकता आसते आणि हे सर्व कागदोपत्री देऊनही व्यक्ती त्याचा उपभोग घेण्यासाठी आर्थिक दृष्टीने सक्षम नसेल. तिचे जर समाजातील अन्य व्यक्ती किंवा गट आपल्या स्वार्थासाठी गोरगरीब जनता.  महिला. मुल. यांच जर शोषण करत असतील तर त्या शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार हक्क व्यक्तिला आवश्यक आहे. यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आर्थिक व मानसिक परावलंबनातून मुक्त होऊ शकेल सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणार्या हक्काचा आपण विचार अवलंब केला पाहिजे
                    स्वातंत्र्याच्या हक्कात व्यक्तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यात प्रामुख्याने शारीरिक व मानसिक संदर्भात विचार केलेला आहे.  कोणत्याही व्यक्तिच्या शारीरिक हालचालींवर बंधने पडली की तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला मुळातच बाधा येते.  शारीरिक हालचालींवर कठोर मर्यादा पडल्या की उर्वरित वैयक्तिक स्वातंत्र्यावर आपोआप अधिक बंधने येतात.  उदा. पोलिसांनी आपल्याला काही कारणास्तव पकडले काही आरोपाखाली कोठडीत बंद करून ठेवले तर व्यक्तिशः आपल्या हालचालींना प्रतिबंध होतो.  आपण काहीच करू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ असा होतो की वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकोचाची सुरवात तेथूनच होते हे सर्व लक्षात घेऊन या वस्तुस्थितीची दखल घेऊन संविधान व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल मांडणी केली आहे. हे हक्क सर्वांना आहेत
            वेळप्रसंगी राज्याला मरयादाभंग करणारे गुन्हेगार दहशतवादी नक्षलवादी असे वर्तन करणार्या व्यक्तिंना प्रतिबंध करावा लागतो. त्यासाठी त्याला अटक केली जाते. तर त्याबद्दल आपणांस कितपत माहिती आहे. येथूनच आपले वैयक्तिक स्वातंत्र्य याला सुरुंग लागतो म्हणजे. एखाद्या व्यक्तिला अटक झाली म्हणजे तो गुन्हेगार सिध्द होत नाही. न्यायालयात त्या व्यक्तिचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्या व्यक्तिला निरापराध मानले पाहिजे. म्हणून अटकेतील व्यक्तिला सुध्दा काही अधिकार संविधानात दिले आहेत.  बेकायदेशीर अटकेला विरोध करणे. केंव्हाही कोणताही पोलिस तुम्हाला विनाकारण अटक करू शकत नाही. अटक करण्यापूर्वी अटकेचे कारणं सांगणे अनिवार्य आहे.  अटक झालेल्या व्यक्तिला स्वताचा बचाव करण्यासाठी वकील नेमण्याचा अधिकार आहे.  अटक झाल्यापासून चोवीस तासांच्या आत आरोपींला जवळच्या न्यायदंडाधिकारी समोर हजर करणे आवश्यक आहे.  चौकशी किंवा अन्य कारणांसाठी अधिक काळ व्यक्तिला अटकेत ठेवणें आवश्यक असेल. तर पोलिसांना न्यायदंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.  या संदर्भात नयायमंडळाची भूमिका अर्थपूर्ण आहे. कारणं पोलिस किंवा शासनकर्ती व्यक्ति यांच्यावर कांहीच बंधने नसतील तर ते अटकेतील व्यक्तिला शारीरिक व मानसिक अपाय किंवा इजा करु शकतील. जुलूम जबरदस्तीने तिचा कबूली जबाब घेऊ शकतील म्हणून अटकेत असतानासुद्धा व्यक्तिला शारीरिक व मानसिक इजा होणार नाही याची दक्षता संविधानाने घेतलेली आहे. व्यक्तिच्या स्वातंत्र्यावर राजकारणी लोकांकडून अतिक्रमण विरूद्ध व्यक्तिला संरक्षण दिलेले आहे 
            अटकेत असलेल्या व्यक्तिबाबत काही हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला आणि व्यक्ती गुन्हेगार ठरली तरी तिला व्यक्ती म्हणून कायद्याने काही सरक्षणे मान्य केली आहेत. उदा. गुनहयाबाबत व्यक्तिला गुन्हा घडला तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा देऊ नये. विरोधी जबाब किंवा विरोधी साक्ष देण्यास सक्ती करु नये. कोणाही व्यक्तीला जिवंत राहण्याचा हक्क व अधिकार हिरावून घेतला जाणार नाही इत्यादी राजकारणी लोकांचें हेवेदावे सुडापोटी लहरी द्वेष बुध्दी आकस किंवा सुडापोटी एखाद्या व्यक्तिचा बळी दिला जाऊ नये यासाठी हे सर्व व्यवस्था केली आहे. अर्थात प्रतिबंधक स्थानबद्ध ते खाली अटक केलेल्या व्यक्तिंना यातून वगळलेले आहे. परंतु तो अपवाद आहे. प्रतिबंधक सथानबधदता वेगळे नियम आहेत व ते राजकारणी लोकांवर बंधनकारक आहेत
        वैयक्तिक स्वातंत्र्याचा विविध अनाठायी कारणें लावून खून केला जात आहे. संविधानाने आपल्याला मुक्त संचार करण्याचें स्वातंत्र्य दिले आहे.  व्यवसाय करण्याचे तेही कोणीही व्यक्ती कोठेही आपला व्यवसाय सुरू करू शकतो.  सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे.  शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना तरुणांना व्यवसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे.  स्थलांतरित कामगार यांना हक्काचे काम समान वेतन किमान वेतन कायद्यानुसार वेतन व संरक्षण मिळाले पाहिजे.  महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे डिलिव्हरी काळात पगारी तीन महिने रजा मिळाली पाहिजे.  सर्वांना कुशल अकुशल कामांवर शासकीय योजनाचा लाभ निष्पक्षपणे मिळाला पाहिजे.  मुलांची बालमजुरी बंद झाली पाहिजे त्यांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.  ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यामधून येणारा मिळकत कर घरपट्टी पाणीपट्टी यांच्या मनमानी कारभार पध्दतीवर सर्वांना आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य आहे.  आपली संस्कृती आपला धर्म नितिमूलय. आचार विचार यांचे आचरण करण्याचा सर्वांना हक्क व अधिकार आहे.  सार्वजनिक ठिकाणी येणे जाणे यांवर कोणीही बंधन घालू शकत नाही.शासकिय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा संविधान अधिकार आपणांस आहे.   
      मूलभूत हक्क व अधिकार हे नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. सकारात्मक स्वरूपात मूलभूत हक्क व अधिकार व्यक्तिचे स्वातंत्र्य सुरक्षित करतात आणि त्याचा व्यक्तिगत विकासाचा मार्ग प्रशस्त करतात दुसर्याच्या बाजूला हे हक्क शासनाच्या विविध घटकांवर अधिकारावर बंधने घालतात राज्याने काय करावे काय करू नये याचे आदेश त्यातच असतांत त्यामुळे व्यक्तिच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा राज्याच्या प्रयत्नात प्रतिबंध होतो 
              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९ 
माहिती अधिकार दाखल केल्यावर तुम्हाला माहिती मिळाली नाही तर ३० दिवसांनंतर अपिल दाखल करू शकता
रेशन संबंधित अन्न सुरक्षा योजनेत सहभागी होणेसाठी आजच अन्न सुरक्षा योजनेचा अर्ज भरा आणि संबंधित पुरवठा विभागात दाखल करा
  बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करताना आपणाकडे कोण जादा पैसे मागत असेल तर आजच तक्रार करा अन्यथा आपल्या घरातील शिकलेली व्यक्ती सोबत घेवून जवळच्या नेट कॅफे मध्ये समोर कामगार नोंदणी अर्ज भरा

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या