कोण काय म्हणेल माग बघू नका
आपण समाज प्रिय असणारी व्यक्ती आहे समाजात समूहाने राहतो सणवार लग्नकार्य मृत्यू विधी प्रत्येक धर्माच्या चालीरीती प्रमाणे केले जातात. धर्माप्रमाणे संस्कार परंपरा संस्कृती हे आपण जपतो. मग काय समाजात एकादा गरिब असेल तरी समाज त्याला हिनवतो. आणि एकादा श्रीमंत असेल तरी समाज त्याला सुद्धा हिनवतो. ही समाजाची रित आहे.
आपले दैनंदिन जीवन धकाधकीचे आहे धावपळ आहे आपणास असे वाटते की आपण शिक्षण रुपी उजेडात असून सुद्धा भयंकर अंधारात फिरतो छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी जीवनात मोठे मोठे रहस्य सोडून जातात ज्या गोष्टी आपण कधी साधारण माणतो आणि विसरून सुध्दा लवकर जातो आपल्या या वागण्याचा परिणाम म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी एक दिवस भयंकर परिणाम घेऊन समोर येतात या दैनंदिन गोष्टी आपल्याला आपल्या वाईट परस्थिती काय करावे काय करू नये याची शिकवण आपणांस होते. ज्या देशात आदर नाही जगण्याचे साधन नाही खाण्याला पिण्याला काही नाही. विद्या प्राप्त करण्याचे साधन नाही भ्रष्टाचार. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद कामगार लुट. रेशन घोटाळा. दवाखान्यात लुट. औषध दरामुळे सर्वसामान्य जनतेची लुट. महिला संरक्षण नाही. मुलांना मोफत शिक्षण नाही. ग्रामीण भागात गावगुंडाचा सुळसुळाट. विविध विमा कंपन्यां एजंट दलाल यांचा सुळसुळाट. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार. सर्वसामान्य माणसाला पत्र व्यवहार करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणारे. शासकीय योजना घोटाळा. विविध महामंडळाना राजकारणी लोकांनी पाडलेले भगदाड. शासकीय भरती नाही. नोकरी नाही बेरोजगारी भस्मासुर. वयोवृद्ध निराधार अनुदान विधवा अपंग अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. यांच्यामधील बोगस कारभार. माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील अत्याचार खटले. जाणीवपूर्वक जीवघेणे हल्ले. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ याला निधी नाही कर्मचारी नाही. खाजगीकरण भस्मासुर. घरकुल योजना घोटाळा. देवस्थान श्रध्दा बाजार. गावातील विविध विकास योजना घोटाळा. बेमाफी शिक्षण फी वसुली. घरफाळा पानपट्टी मनमानी पद्धतीने आकारणी आणि पठाणी पध्दतीने वसुली. खते बी बियाणे भरमसाठ वाढलेले दर. मालाला हमीभाव नाही. मार्केट यार्ड नावाखाली शेतकरी यांची लुट. कारखानदारी एफ आर पी ऊस बील यामधील टाळाटाळ. दारूबंदी उठाव. व्यसनमुक्ती केंद्राचा अभाव. संविधान घटना यांच्या माहिताचा अभाव. मोबाईल जास्त वापर डोळ्यांचे रोग कमी वयात चश्मा लागणे. व्यायाम थांबला वजन वाढणे बी पी शुगर मधुमेह रक्तदाब हृदयविकार असे विविध जीवघेणे रोग. मार्केट जाहिरात ग्राहक लुट. निराशा सामाजिक मानसिक आर्थिक कुचंबणा. वरीलपैकी कोणत्याही ठिकाणी राहून कोणत्याही माणसांचे भले होणार नाही प्रगती होणार नाही ग्रामसेवक सरपंच नगरसेवक नगराध्यक्ष दयाळू व प्रामाणिक असायला हवे. राहण्यासाठी योग्य जागा. आजारासाठी योग्य उपचार जर मिळत नसतील अशा ठिकाणी राहून कुठलेही सुख मिळणार नाही विकास होणार नाही अशा गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये राहणे व्यर्थ आहे. दुःख जरूर मिळणार.
विषय मांडण्याचे कारणं एवढंच आहे की आपल्या जीवनाशी संलग्न असलेल्या गोष्टी मी वर नमूद केलेल्या आहेत आपल्या जीवनात राजकारण सर्वात मोठा भस्मासुर आहे तो आपले मन धन कायम आपल्या काबूत ठेवतो. आज प्रत्येक राजकीय पक्षाची विविध नांवाने संघटना सेवाभावी संस्था युनियन मित्र मंडळ. सार्वजनिक कार्यक्रम संकुल. विविध नांवाने गट तयार झाले आहेत. त्यात प्रामुख्याने आपली शिकून फिरणारी नोकरी नाही अशी मुल या राजकीय लोकांचे टार्गेट आहे. म्हणजे आपली मुल कस्टडी रूम मध्ये आणि राजकारणी यांची मुल स्टडी रूम मध्ये गुन्हे आमच्या मुलांच्या नावांवर. म्हणून हे सर्व बदलण्याची गरज आहे धर्माच्या नावावर. समाजातील विभूती नावावर. विविध समाजाच्या नावावर.कामगार संघटना महिला अत्याचार निवारण समिती. बालमजुरी कायदा अंमलबजावणी. जेवढ्या संघटना असतील त्यांचे पदाधिकारी निवडण्यासाठी त्या त्या गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील पदाधिकारी निवडीचे पेव आज निवडणूक आल्यावर फुटले आहे.
माझी सर्व सामान्य माणसाला जनतेला एकच सांगणे आहे की पद घ्या एखाद्या सर्वसामान्य पणे निःपक्ष पणे काम करणारी संस्था युनियन त्याचा अध्यक्ष कोण आहे त्यापेक्षा त्याचे समाजाबद्दल लोकांबद्दल काय आहेत. समाज प्रबोधन. सर्व शासकीय योजना. माहिती अधिकार. रेशन. रुग्ण. व व्यसनमुक्ती. समाजात चांगले विचार पेरणारे. # म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी #. असे व्यक्तिमत्व असावे. प्रतयेकाला तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे हे न पाहता निस्वार्थी पणे मार्गदर्शन करणारा असाव. समाजात अशा लोकांना वेड म्हणलं जात. साधी राहणी. नेता माग नाही. पण आपण एक विसरतो की नेता पाच वर्षे असतो सत्ता पाच वर्षांने बदलते पण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदापुढे. फक्त नाव बदलत पण तहसिलदार जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी ही शासकीय पदे तशीच राहतात. म्हणजे आमच तुमच भांडण शासनाबरोबर आहे त्यामुळे फक्त तुम्हाला जे काय पाहिजे त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी ही फक्त एका समाजसुधारक व्यक्ति व त्यांच्या सहकाऱ्यां मध्ये आहे फक्त ती जागविणयाचे काम विना राजकीय आश्रय असणार्या संघटना सेवाभावी संस्था युनियन करत असतात. या संस्था युनियन यांचे पद घेण्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार करतात. पण एखाद्या पक्षाचे पद असेल तर बिना चप्पलच चालत जाईल नवस केल्यासारखे नेत्यांच्या घरला किती किळसवाणा प्रकार आहे बघा. पदर खा आणि यांचाच जयजयकार करा आरे आपण आपला स्वाभिमान घाण टाकला आहे काय. आपल्याला अजून कळल नाही राजकारण हे गजकर्ण आपल्या घरांत पोहचलं मग कळणार कधी
आम्ही लोक म्हणजे कोण ? अनेकदा असा प्रश्न पडतो की ज्याच्या नावे ही घटना उदघोषित केलेली आहे. #. आम्ही भारतीय लोक # म्हणजे नेमके कोण ? हेच शब्द का वापरले आहेत ? त्यांचे एक कारण आहे असे सांगता येईल की स्वातंत्र्याचा लढा हा प्रामुख्याने इंग्रजी अंमलाखालील प्रांतांत लढला गेला घटना समितीत संस्थानातील एकही जनतेचा प्रतिनिधी नव्हता. जे होते ते संस्थानिकांनी नियुक्ती केलेले प्रतिनिधी होते असे असले तरी या घटनेमागील शक्ति आणि ती घडविण्याचे श्रेय प्रांतांतील व संस्थानातील सामान्य लोकांचें आहे संस्थानिकांचे व मुठभर नेत्यांचे नाही हे त्यातून ध्वनित होते. दुसरें म्हणजे चळवळीच्या काळात मुसलमान व शिख दलित अशा लोकसमूहाचया प्रत्येकाच्या हितासाठी लढणारया विविध संघटना विना राजकारणी होत्या
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा परिषद
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment