Showing posts with label human being. Show all posts
Showing posts with label human being. Show all posts

माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार



माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार 


         10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हा वैश्विक जाहीरनामा अखिल मानव जातीच्या प्रति विविध हक्क व अधिकार. यांची जाणीव करून देण्यासाठी समर्पित केला. म्हणून तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानव अधिकार कार्यकर्त्यांनी हा दिवस 30 कलमी जाहिरनामा मनापासून माहिती करून घेणे गरजेचे आहे
                मानव कुटुंब प्रिय आहे. समूहाने राहणे. आपण जिथे राहतो तिथे आपल्या जीवनासाठी व जगण्यासाठी आवश्यक असणार्या सुख सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी संविधानात आपणांस काही मूलभूत अधिकार व हक्क कर्तव्य आखून दिली आहेत जया अर्थी मानव कुटुंबातील सर्व व्यक्ती चे स्वाभाविक प्रतिष्ठा. व त्यांचे सन्मान न्याय व शांतता यांच्या प्रसथापनेचा पाया आहे ज्या अर्थी मानवी हक्क व अधिकार यांचें हनन अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्य घडून आली त्यामुळे सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. आणि त्यायोगे मानव जातीच्या सदविवेक बुध्दी वर मोठा आघात झाला त्यातून. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद व्यसन. असया समाजासाठी विघातक असणार्या प्रवृत्तीने डोकं वर काढलं. आणि त्यातून मानवाच्या भाषण स्वातंत्र्याचा व उपभोगता घेता व यातळी गरज यापासून त्याची मुक्तता होईल अशा जगाची उभारणी करणे ही सर्वोच्च आकांक्षा म्हणून घोषित करण्यात आली आहे यांच्यावर उपाय म्हणून जुलुम दडपशाही यांच्याविरुद्ध अखेरचा उपाय म्हणून आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने व मानवाला बंड करणे. आंदोलन करणे. उपोषण करणे. व अन्य मार्गाने आपल्या वर झालेल्या अन्यायाची दाद मागणयाची वेळ येवू नये म्हणून मानवी अधिकारांचे संरक्षण कायद्याने करणे गरजेचे आहे म्हणून मानव अधिकार ही संकल्पना अमलात आणली
          राष्ट्र राष्ट्रा मध्ये मित्रत्व संबंध वृद्धिंगत करण्याच्या कार्यासाठी चालना देणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रा चया सनदेमधये मूलभूत हक्क अधिकार मानवी अधिकार प्रतिष्ठा व महत्व महिला व पुरुष समानता समान अधिकार यावरील आपली श्रद्धा निश्चिय पूर्ण पुन्हा व्यक्त केली आहे आणि अधिक अधिक स्वातंत्र्याचे वातावरण समाजप्रगती. घडवून आणण्याच्या व जीवनभर सुधारण्याचा निर्धार केला आहे. संयुक्त राष्ट्रानी सदस्य राष्ट्रसंघटनेचा सहकार्याने व कर्मचारी पदाधिकारी मानवी हक्क व अधिकार मूलभूत अधिकार स्वातंत्र्य जागतिक प्रतिष्ठा. प्राप्त करून देणायाचे व त्याबद्दल जनजागृती जाहिरात संबोधन प्रबोधन व त्यांचे पालन करण्याचे ध्येय साध्य करण्याची मानव अधिकार कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. हा मानवीय अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा सर्व लोकांसाठी ध्येय सिध्दी एक समान आदर्श म्हणून उद्घोषणा करते व त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने व समाजातील प्रत्येक घटकाने हा मानव अधिकार जाहीरनामा सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. अध्यापन व शिक्षण यांच्या द्वारे या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा मान राखला जाण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा प्रगतिक स्वरूपाचा उपाय योजनांच्या द्वारे सदस्य राष्ट्रांच्या लोकांमध्ये व त्यांच्या क्षेत्राधिकार प्रदेशातील लोकांमध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळवून व त्यांचे परिणामकारक पालन केले जाण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत
       # तक्रार कोठे आणि कशी करावी #
        भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत त्यांचा वापर उपभोग घेण्यासाठी विविध तरतूद करण्यात आली आहे प्रशासन शासकीय निमशासकीय कार्यालयाकडून. प्रशासनाकडून एखाद्या व्यक्तिच्या मूलभूत हक्क व अधिकार यांची पायमल्ली होत असेल. अशा सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेच्या मदतीला मानव अधिकार आयोग धावून जातो. आयोगाचा कार्यकाल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे आणि हे मानव अधिकार कार्यकर्त्यांचे परम कर्तव्य आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ हा २८ सप्टेंबर १९९३ रोजी लागू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग नोव्हेंबर २००१ रोजी स्थापन करण्यात आला. 
        #*#* ‌‌. (१) अशी कोणतीही व्यक्ती की ज्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा हनन झाले असेल त्या व्यक्तिस किंवा त्या व्यक्तिच्या वतीने कोणताही व्यक्ती स्वता किंवा पोस्टाने. फॅक्स. वर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करू शकतात
(२) कोणत्याही स्वरूपाचे शुल्क अथवा तिकीट लागत नाही
(३) सदर तक्रार संबंधित अध्यक्ष किंवा मानवी हक्क आयोग यांना संबोधित करून करावी
(४) कोणत्याही शासकीय निमशासकीय अधिकार्यांचे विरोधात तक्रार दाखल करता येते
(५) तक्रार मराठी. हिंदी गुजराती. भाषेतून करता येते
(६) सरकार किंवा सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होत असलेला शारीरिक अत्याचार. मानवी हक्क विषयक. फसवणूक व कोणत्याही प्रकारचा छळ. तसेच सन्मानाने जगण्याच्या प्रयत्नात सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी केलेला अमानविय हस्तक्षेप आदी करण्यासाठी तक्रार करता येते
(७) पोलिस स्टेशनमध्ये आरोपीला झालेली अमानविय माराहान त्याबद्दल तक्रार दाखल करता येते
(८) पोलिस कोठडी. कारागृह. बालसुधारगृह. येथे झालेला अमानवीय छळ. आणि मृत्यू. हरवलेली बालके व व्यक्ती यांचा शोध घेण्यास टाळाटाळ अशावेळी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करता येते
(९) अन्न. वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण. आदि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी अपेक्षित समाजाची शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होणारी हेळसांड या विरोधात मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते 
     माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा मानव अधिकार
  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE

 रोग मोठा का ? माणूस



           मानव आहे म्हणजे तो आजारी पडणार. पूर्वीच्या काळात आत्ता पेक्षा भयानक आजार साथी होत्या  मोठें मोठें रुग्णालय दवाखाने रक्त लघवी तपासणी केंद्र नव्हती. एक्सरे सारखी सुविधा उपलब्ध नव्हती  काही अपघात झाल्यास फॅकचर प्लास्टर. सारखी सुविधा उपलब्ध नव्हती  बीपी. साखर. मधूमेह. कॅन्सर. असे महाभयंकर महामारी सारखें आजार नव्हते. कारणं असतील तर त्यावेळी त्यांची नावे सुध्दा वेगळी असतील. काही काही आजार त्यावेळी हकीम. वैध. जंगलातून विविध जडीबुटी आणून त्यापासून विविध आणि प्रभावी औषध तयार केले जात होते माणसांची नाडी बघून आजार सांगणारे  गावठी डॉ होते जनसेवा म्हणून उपचार करण्याची वृत्ती होती. 

              आपण एकूण आहे प्लेग पटकी सारखी महामारी आपल्या पूर्वजांवर आली होती त्यात  हा आजार उंदीर या प्राण्यांच्या अंगावर असणारी पिसू चावली की माणसाला. ताप येवून दोन ते तीन दिवसांत माणूस मरत असे. त्यावेळी उंदर सुध्दा जास्त असायची कारण घर मातीची. धान्य मुबलक साठवण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही धान्य असल्यामुळे उंदरांची संख्या जास्त घरांवर पाला पाचोळा असे छप्पर असायचे. प्लेग पटकी सारखी साथ आली की गावच्या गावं मृत्युमुखी पडायचे एकाला दहन केले की दुसरा मृतदेह तयार असायचा. असे एक नाही अनेक दिवस चालायचे. त्यावेळी.अलगीकरण  लाॅकडाऊन सारखी फसवी व्यवस्था होती का ? त्यावेळी लोक आपल्या इच्छेनुसार अलगीकरण करत होते ते म्हणजे गाव सोडणे गावाशी कोणताही संबंध नाही पाहिजे तेवढं अन्न धान्य जनावरे घेवून डोंगरात वास्तव्य करत होते  त्यामुळे गावातील उंदरांची संख्या कमी होण्यास सुरुवात होत होती  त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगलीच मदत होत होती लोकांच्या मनात बदल झाला रोग सुध्दा बदलले सुख सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने विविध गंभीर आजार निर्माण झाले त्यात

       एड्स. काविळ डेंग्यू. मलेरिया हिवताप. घटसर्प क्षय धनुर्वात असे एक नाही अनेक रोग व्हायरस निर्माण झाले लोकांचे खाणपान बदलले. राहणसाण बदलले विविध व्यसने  तंबाखू गुटखा खैणी पान मसाला शासनाने बंधनं घालून सुध्दा कोठे जागा मिळेल तिथे थुंकणे या थुंकी वर बसणारया विविध माशा डास रोग पसरविण्याचे एक मोठे माध्यम आहे आपले रस्त्यावरचे उघडे खाद्यपदार्थ खाणे यामुळे सुध्दा विविध आजार आपणास होतात 

        आज एक नवीन व्हायरसने जवळपास दिड वर्ष महामारी सारखें थैमान घातले आहे  श्वासोच्छ्वास घेणे. संपर्क.  गर्दित जाणे.  मांस मासे अंडी यामुळे याचा प्रसार होतों असे सांगितले जाते या व्हायरस रोगाने एखादा व्हायरस रोगाने बाधित झाल्यास. त्याला. अलगीकरण करणे. त्याचा इतरांशी संपर्क टाळणे. सॅनिटाईजर. मास्क व्हायरस रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी औषध उपचार असे विविध उपाययोजना करण्यात येतात त्यातून हा  व्यक्ती मृत झाल्यास त्याला स्पर्श करायचा नाही. त्याची अंत्यविधी सुध्दा करण्यास आपणास परवानगी नाही. दवाखान्या पासून स्मशानात स्मशानभूमीत. मृतदेहाची विटंबना झालेली आपण बघितली आहे. काही काही मृतदेह कुत्र्यानी लचके तोडले. काय माणसांचे जीवन आहे हे आपल्या ध्यानात आले नेऊन दहन करेपर्यंत फक्त होणारे बील भरण्याचा आपणास अधिकार आहे 

                  आपल्या रक्तातील व्यक्ती. आपले मित्र. सगेसोयरे. यांना आपणं असा व्हायरस रोग येण्याअगोदर दवाखान्यात बघायला जात होतो  त्याची विचारपूस करत होतो. त्याला मदत करत होतो  एखादा मृत्युमुखी पडल्यास त्याचे सर्व अंत्यविधी कार्यक्रम समाज रितीरिवाज प्रमाणे करत होतो 

           आज काळ वेळ बदलली आणि आपले महणनारे. आज आपल्यापासून लांब होत आहेत व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तिकडे कायतरी भयानक आजार झाला आहे अशी मानसिकता तयार करून समाज पाहत असतो कायम जवळ असणारे आज कोण जवळ येत नाही बोलत नाही अशी वागणूक बाहेरचे देण्यातच पण मी पाहिले आहे की व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याची घराची लोक सुध्दा वाईट आणि एक वेगळ्या प्रकारे बघत असतात की त्या रोगी माणसाला रोगापेक्षा या वागणूकी मुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि मनोधैर्य खचते आणि आजारापेक्षा  या वागणूकीने आणि रोगाच्या दहशती मुळे मरताना आपण पाहिले आहे. रोगांचे भांडवल झाले जागोजागी रुग्णालये तयार झाले 

      मानवता हाच खरा धर्म आहे रोग आत्ता आला आहे माणूस अगोदर आहे म्हणून मानव धर्म श्रेष्ठ करा रोगी लोकांना हीण वागणूक देऊ नका त्यांना धीर द्या कारणं कोणी कोणाचें दुःख वाटून घेत नाही सुख वाटून घेऊ शकते. रोगी लोका बरोबर सकारात्मक विचारात बोला. त्यांना त्या आजाराबरोबर लढण्याची प्रेरणा द्या मदत करा कारणं माणसांपेक्षा रोग मोठा नाही आपणांस माणूस हवा आहेे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबासाठी एप्रिल ते मे दोन महिन्यांचे. गहूं आणि तांदूळ मोफत वाटण्याचा शासनाचा निर्णय

माहिती अधिकार आत्ता माहिती अधिकार दाखल केल्यानंतर ३० दिवस वाट पाहण्याची गरज नाही कारण माहित अधिकार कायदा २००५ नुसार शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार १० दिवसांत संबंधित माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे

भूक भूक भूक -Humger Hunger..

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

"

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या