Articles on Various issues related to common man. जनमतांचा प्रहार जनवार्ता न्युज राष्ट्रीय,सामाजिक,राजकीय,आरोग्य,भारताचा इतीहास,देश आणी विदेशातील घडामोडी जनते समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार
रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE
रोग मोठा का ? माणूस
मानव आहे म्हणजे तो आजारी पडणार. पूर्वीच्या काळात आत्ता पेक्षा भयानक आजार साथी होत्या मोठें मोठें रुग्णालय दवाखाने रक्त लघवी तपासणी केंद्र नव्हती. एक्सरे सारखी सुविधा उपलब्ध नव्हती काही अपघात झाल्यास फॅकचर प्लास्टर. सारखी सुविधा उपलब्ध नव्हती बीपी. साखर. मधूमेह. कॅन्सर. असे महाभयंकर महामारी सारखें आजार नव्हते. कारणं असतील तर त्यावेळी त्यांची नावे सुध्दा वेगळी असतील. काही काही आजार त्यावेळी हकीम. वैध. जंगलातून विविध जडीबुटी आणून त्यापासून विविध आणि प्रभावी औषध तयार केले जात होते माणसांची नाडी बघून आजार सांगणारे गावठी डॉ होते जनसेवा म्हणून उपचार करण्याची वृत्ती होती.
आपण एकूण आहे प्लेग पटकी सारखी महामारी आपल्या पूर्वजांवर आली होती त्यात हा आजार उंदीर या प्राण्यांच्या अंगावर असणारी पिसू चावली की माणसाला. ताप येवून दोन ते तीन दिवसांत माणूस मरत असे. त्यावेळी उंदर सुध्दा जास्त असायची कारण घर मातीची. धान्य मुबलक साठवण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही धान्य असल्यामुळे उंदरांची संख्या जास्त घरांवर पाला पाचोळा असे छप्पर असायचे. प्लेग पटकी सारखी साथ आली की गावच्या गावं मृत्युमुखी पडायचे एकाला दहन केले की दुसरा मृतदेह तयार असायचा. असे एक नाही अनेक दिवस चालायचे. त्यावेळी.अलगीकरण लाॅकडाऊन सारखी फसवी व्यवस्था होती का ? त्यावेळी लोक आपल्या इच्छेनुसार अलगीकरण करत होते ते म्हणजे गाव सोडणे गावाशी कोणताही संबंध नाही पाहिजे तेवढं अन्न धान्य जनावरे घेवून डोंगरात वास्तव्य करत होते त्यामुळे गावातील उंदरांची संख्या कमी होण्यास सुरुवात होत होती त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगलीच मदत होत होती लोकांच्या मनात बदल झाला रोग सुध्दा बदलले सुख सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने विविध गंभीर आजार निर्माण झाले त्यात
एड्स. काविळ डेंग्यू. मलेरिया हिवताप. घटसर्प क्षय धनुर्वात असे एक नाही अनेक रोग व्हायरस निर्माण झाले लोकांचे खाणपान बदलले. राहणसाण बदलले विविध व्यसने तंबाखू गुटखा खैणी पान मसाला शासनाने बंधनं घालून सुध्दा कोठे जागा मिळेल तिथे थुंकणे या थुंकी वर बसणारया विविध माशा डास रोग पसरविण्याचे एक मोठे माध्यम आहे आपले रस्त्यावरचे उघडे खाद्यपदार्थ खाणे यामुळे सुध्दा विविध आजार आपणास होतात
आज एक नवीन व्हायरसने जवळपास दिड वर्ष महामारी सारखें थैमान घातले आहे श्वासोच्छ्वास घेणे. संपर्क. गर्दित जाणे. मांस मासे अंडी यामुळे याचा प्रसार होतों असे सांगितले जाते या व्हायरस रोगाने एखादा व्हायरस रोगाने बाधित झाल्यास. त्याला. अलगीकरण करणे. त्याचा इतरांशी संपर्क टाळणे. सॅनिटाईजर. मास्क व्हायरस रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी औषध उपचार असे विविध उपाययोजना करण्यात येतात त्यातून हा व्यक्ती मृत झाल्यास त्याला स्पर्श करायचा नाही. त्याची अंत्यविधी सुध्दा करण्यास आपणास परवानगी नाही. दवाखान्या पासून स्मशानात स्मशानभूमीत. मृतदेहाची विटंबना झालेली आपण बघितली आहे. काही काही मृतदेह कुत्र्यानी लचके तोडले. काय माणसांचे जीवन आहे हे आपल्या ध्यानात आले नेऊन दहन करेपर्यंत फक्त होणारे बील भरण्याचा आपणास अधिकार आहे
आपल्या रक्तातील व्यक्ती. आपले मित्र. सगेसोयरे. यांना आपणं असा व्हायरस रोग येण्याअगोदर दवाखान्यात बघायला जात होतो त्याची विचारपूस करत होतो. त्याला मदत करत होतो एखादा मृत्युमुखी पडल्यास त्याचे सर्व अंत्यविधी कार्यक्रम समाज रितीरिवाज प्रमाणे करत होतो
आज काळ वेळ बदलली आणि आपले महणनारे. आज आपल्यापासून लांब होत आहेत व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तिकडे कायतरी भयानक आजार झाला आहे अशी मानसिकता तयार करून समाज पाहत असतो कायम जवळ असणारे आज कोण जवळ येत नाही बोलत नाही अशी वागणूक बाहेरचे देण्यातच पण मी पाहिले आहे की व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याची घराची लोक सुध्दा वाईट आणि एक वेगळ्या प्रकारे बघत असतात की त्या रोगी माणसाला रोगापेक्षा या वागणूकी मुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि मनोधैर्य खचते आणि आजारापेक्षा या वागणूकीने आणि रोगाच्या दहशती मुळे मरताना आपण पाहिले आहे. रोगांचे भांडवल झाले जागोजागी रुग्णालये तयार झाले
मानवता हाच खरा धर्म आहे रोग आत्ता आला आहे माणूस अगोदर आहे म्हणून मानव धर्म श्रेष्ठ करा रोगी लोकांना हीण वागणूक देऊ नका त्यांना धीर द्या कारणं कोणी कोणाचें दुःख वाटून घेत नाही सुख वाटून घेऊ शकते. रोगी लोका बरोबर सकारात्मक विचारात बोला. त्यांना त्या आजाराबरोबर लढण्याची प्रेरणा द्या मदत करा कारणं माणसांपेक्षा रोग मोठा नाही आपणांस माणूस हवा आहेे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबासाठी एप्रिल ते मे दोन महिन्यांचे. गहूं आणि तांदूळ मोफत वाटण्याचा शासनाचा निर्णय
माहिती अधिकार आत्ता माहिती अधिकार दाखल केल्यानंतर ३० दिवस वाट पाहण्याची गरज नाही कारण माहित अधिकार कायदा २००५ नुसार शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार १० दिवसांत संबंधित माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे
शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
-
कलम १६ कलम २१ काय आहे? माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद...
-
उज्ज्वला योजना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या भागातील महिलांचे जीवन सुधारावे यासाठी शासनाने महिलांचा. धूर. आरोग्य ...
-
खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील...