Articles on Various issues related to common man. जनमतांचा प्रहार जनवार्ता न्युज राष्ट्रीय,सामाजिक,राजकीय,आरोग्य,भारताचा इतीहास,देश आणी विदेशातील घडामोडी जनते समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
माहिती अधिकार कायदा २००५ - RTI Act 2005
माहिती अधिकार कागद सापडतं नाही असे सांगता येणार नाही
माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत शासकीय कार्यालयात. सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग जिथे आपल्या मिळकती मधील एक रुपया जरी जात असेल तर आपणांस त्या एका रुपयांचा व शासकीय क्षेत्रात चालणार्या कामांचा आढावा हिशेब मागण्याचा अधिकार माहिती अधिकार कायदा २००५ मुळे आपणास मिळाला आहे
माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागितली असता अनेक शासकीय व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी बरीच न पटणारी कारणें सांगत असतात सदरहून रेकाॅरड सापडत नाही. हि माहिती देता येत नाही. त्रेयसत पक्षाने आम्हाला सदर माहिती देणे संबधी पत्र व्यवहार केला आहे. अशी उत्तरे मिळण्याचा अनुभव सर्रास आपणास येतो. परंतु सार्वजनिक अभिलेखाचे जतन कसे करावे व मुदती नंतर नष्ट कसे करावे हे त्या त्या विभागाच्या पदांवर असणार्या अधिकारी व कर्मचारी यांनाच मुळातच माहिती नसते. यासंबंधी १५/ फेब्रुवारी २००६ रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००६ हा प्रभावी कायदा लागू केला आहे. त्याप्रमाणे विहित पध्दतीचा अवलंब केल्याशिवाय अभिलेख नष्ट ( म्हणजे सर्व शासकीय निमशासकीय सरकारी कागदपत्रे नष्ट करणे ) करणारी व्यक्तीला पाच वर्ष शिक्षा किंवा दहा हजार रुपये दंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षास पात्र असण्याची तरतूद या अधिनियमात केली आहे
माहिती अधिकार अर्जात जर जन माहिती अधिकारी तर्फे " रिकाॅरड/ दस्तावेज / कागदपत्र / अभिलेख/गहाळ झाले/चोरीला गेले / दिसत नाही/ सापडत नाही/हरवले "" असे उत्तर मिळाले तर" राज्य माहिती आयुक्त"" खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २०१५ चया कलम /७/८/९/नुसार आणि उच्च न्यायालय मुंबई यांच्या २७ फेब्रुवारी २०१५ चया निर्णय आणि आदेश नुसार त्या जनमाहिती अधिकारी वर त्वरित पोलिस स्टेशन मध्ये fir नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करावा
* माहिती अधिकार व महत्वाच्या कालमर्यादा*
(१) सर्वसाधारण माहिती पुरविणे
कलम ७(१)
कालमर्यादा. ३० दिवस
(२) व्यक्तिच्या जीवीत व स्वातंत्र्य विषयी माहिती पुरवणे
कलम. ७(१)
कालमर्यादा. ४८ तास
(३) त्रयस्थ पक्षाच्या संदर्भात माहिती मागितल्यास निर्णय घेणे
कलम. ११(३)
कालमर्यादा. ३०+१०= ४०
(४) सहाय्यक जनमाहिती अधिकारी माहिती/ अपिल अर्ज केल्यास
कलम. ५(२)
कालमर्यादा. अ क्र १-३ व ८ मध्ये दर्शविण्यात आलेला कालावधी मध्ये पाच दिवसांचा कालावधी वाढेल
(५) माहिती अन्य प्राधिकरणाकडे उपलब्ध असेल तर हस्तांतर करण्याची मुदत
कलम. ६(३)
कालावधी. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पाच दिवसांत
(६) दुसऱ्या अनुसूची मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या संघटना बाबत माहिती पुरविणे
(क) जर माहिती मानवी हक्क उल्लंघन आरोपांबाबत असल्यास
(ख ) जर माहिती भ्रष्टाचाराचया आरोपा संदर्भात असल्यास
कलम. २४(१) (४)
(७) अर्जदाराला जादा फी भरण्यास सांगितले असल्यास
कलम. ७(३) (क )
कालमर्यादा. अर्जदाराला जादा फी भरण्यास पाठविण्याचा दिवसांपासून अर्जदाराने ही जादा फी प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी तीस दिवसांच्या कालावधीची परिगणना करताना वगळण्यात येईल
(८) प्रथम अपील करण्याची कालमर्यादा
कलम. १९(१)
कालमर्यादा. ३० दिवसांची विहित मुदत संपल्यापासून किंवा निर्णय प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांत
अपील करणार्या वेळेत अपिल दाखल न करण्यास पुरेसे कारणं होते अशी प्रथम अपिलीय प्राधिकारयची खात्री पटल्यास ३० दिवसानंतरही अपील दाखल करून घेता येते
(९) प्रथम अपीलाचा निर्णय देण्याची कालमर्यादा
कलम. १९(६)
कालमर्यादा. ३० दिवस किंवा असाधारण परस्थितीत विलंबाचे लेखी कारणं निकालपत्र नमूद करून ४५ दिवस
(१०) दुसरे अपील करण्याची कालमर्यादा
कलम. १९(३)
कालमर्यादा. ज्या दिनाकास निर्णय घ्यायला हवा होता किंवा प्रतक्षात मिळाला होता त्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत
अपील करणार्या वेळेत अपिल दाखल न करण्यास पुरेसे कारणं होते अशी माहिती आयोगाची खात्री पटल्यास ९० दिवसानंतरही अपील दाखल करून घेता येईल
(११) दुसर्या अपीलाचा निर्णय देण्याची कालमर्यादा
कालमर्यादा. कायद्यात विहित केलेली नाही
* माहिती अधिकार शुल्क *
(१) अर्ज शुल्क
रुपये १०/
(२) माहिती शुल्क / ए -४ व ए -३ आकारांचे कागद
रूपये/ २ प्रति पेज
(३) मोठया आकारांचे पेज/ नकाशे ई
प्रती देण्यासाठी प्रतयक्ष येणारा खर्च
(४) कागदपत्र/ काम तपासणी शुल्क
पहिल्या तास मोफत / त्यानंतर प्रत्त्येक मिनिटाला किंवा त्याच्या भागाला रूपये ५/
(५) सॅटमपल. माॅडेल
देण्यासाठी प्रतयक्ष येणारा खर्च
(६) डिसकेट/ फलाॅपी/ सी डी/ व्हिडिओ इ/
प्रत्येकी ५० रुपये
(७) मुद्रित स्वरूपाचे साहित्य पुस्तके इ
छापील किमंत
(८) माहिती शुल्क भरण्याची पद्धत. डिमांड ड्राफ्ट / मनीआॅरडर/ रोख / बॅकेस चेक
अर्जाचे शुल्क कोर्ट स्टॅम्प ड्युटी ने सुध्दा भरता येईल
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
अधिनियम २००० - Indian IT Act 2000
महाराष्ट्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती. विमुक्त जाती. भटक्या जमाती. इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ( जातींचे प्रमाणपत्र देण्यासाठी व त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाने अधिनियम २००० अमलात आणले आहे आज सर्व सेवा सुविधा. शासकीय योजना. सामाजिक. आर्थिक. तंत्रज्ञान. शिक्षण व अन्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण कोण आहोत ? कोणत्या जाती जमाती चे आहोत हे सिद्ध करण्याची गरज आहे यासाठी सर्वात मोठा आधार पुरावा म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र माणले गेले आहे
क्रमांक सी बी सी १०/२०१७/ प्र क्र ५०/ मा व क महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग ( जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याची पडताळणी विनियमन) अधिनियम २००० ( २००१ चा महाराष्ट्र २३) यांच्या कलम १८ चया पोटकलम (१)! अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत त्यास समर्थ करणार्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून पुढील नियम करीत असून उक्त अधिनियमाच्या कलम १८ चया पोट कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे शासन आपल्यासाठी प्रसिद्ध करीत आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्ग प्रवर्ग (जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी विनियमन ) २०१२ मधील नियमात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे* नियम क्रं (४) सक्षम प्राधिकारी कडून जातींचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील कार्यपद्धती वापरण्यात यावी* पडताळणी समितीने दिलेले. अर्जदार यांच्या रक्त संबंधातील. वडिलांचे किंवा सख्खे चुलते किंवा वडिलाकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे उपलब्ध असल्यास वैधता प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र दाखल केले असल्यास सदर वैधता प्रमाणपत्रासाठी महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्यांची मागणी न करता सक्षम प्राधिकारी जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासन आदेश आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब नोव्हेंबर २७/२०१७ अग्रहायण ६ शके १९३९ * नियम. (५) मधील नियम (६) मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत
जर अर्जदाराने जात पडताळणी समितीने निर्गमित केलेल्या अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्खे चुलते किंवा वडिलांच्या कडील रक्त संबंधातील कोणत्याही नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सक्षम प्राधिकारी इतर कागदोपत्राची किंवा पुराव्यांची मागणी न करता संबंधीत अर्जदाराने सादर केलेलें वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र निर्गमित करावे* नियम (१६) अर्जदाराने कोणती माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी द्यावयाचे आहेत उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/ किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्खे चुलते किंवा वडिलांच्या रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्रस्पष्टीकरण. (१)! केवळ वर उल्लेख केलेल्या दस्त ऐवज सादर करणे याचा अर्थ. अर्जदारांची शाबिताचया भारापासून मुक्तता झाली असा होणार नाही(२) पडताळणी समितीला आवश्यक वाटेल त्या त्या वेळी अर्जदार मूळ दस्तऐवज सादर करण्यास जबाबदार असेल(३) परंतु संबंधित अर्जदाराने त्यांच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्खे चुलते किंवा वडिलांच्या रक्त संबंधातील नातेवाईक जात वैधता प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचेकडे स्वतकरिता त्यांच्या जातीच्या जात प्रमाणपत्रासह जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र समिती संबंधित अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्खे चुलते किंवा वडिलांच्या रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्रासह अर्जदाराच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झाल्याचे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या संकेतस्थळावर संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील नोटीस बोर्ड यावर प्रसिद्ध करून सदर अर्जदाराच्या मागणीबाबत काही आक्षेप असल्यास सदर माहिती प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे नोंदविण्याचे कळविण्यात येईल
अर्जदाराच्या अरजाबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास त्यास जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी इतर पुराव्यांची मागणी न करता संबंधीत अर्जदारास त्याने सादर केलेलें रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्खे चुलते किंवा वडिलांच्या रक्त संबंधातील इतर नातेवाईक इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल अर्जदाराच्या अरजाबाबत कोणताही आक्षेप उपस्थित झाल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विहित मार्गाने सदर आक्षेपाची चौकशी/तपासणी करील. सदर चौकशी/तपासणी कमाल ६० दिवसांच्या आत पूर्ण करेल व सदर आक्षेपात तथ्य आढळून न आल्यास तात्काळ संबंधित अर्जदारास जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करेल तसेच सदर चौकशी/ तपासणी अंती सदर आक्षेपात तथ्य आढळल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विहित कार्यालयीन पध्दतीचा अवलंब करून संबंधित अर्जदाराच्या जात वैधते बाबतच्या दावा विषयी निर्णय घेतील अजून गोरगरीब जनतेचा सर्वात मोठा मनस्ताप आहे तो म्हणजे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मागण्यात येणारा ७० वर्षाचा पूरावा मला एक समजतं नाही ७० वर्षांपूर्वी आमचे पूर्वज अडाणी अशिक्षित रानटी होतें त्यावेळी पोटासाठी आज हे गाव उद्या ते गाव फिरणारे कुठले शिक्षण घेणार त्यांना कोणता आणि कसला कागद माहिती तरी होता का ? मग ते कुठला पुरावा त्यावेळी जातींचा उल्लेख असणारा ठेवणारं मग आज त्यांच्याच रक्तातील मुलांनी विविध सवलती घेण्यासाठी कुठला पुरावा द्यायचा
साध सोप आहे मुलाला शाळेत दाखल करताना पहिल्यांदा शाळेत दाखला घेतला तेव्हा त्या शाळेच्या दाखल्यावर मुलांच्या पालकांने जातीचा उल्लेख हा खराखुरा केला असेल तर तो जातींचा शेवटचा पुरावा शासन का धरत नाही आज जेव्हा जातीचा दाखला नविन काढला तर त्यात काय जातीचा उल्लेख दुसरा असणार आहे का ? गोरगरीब जनतेला नाहक त्रास देऊ नकासमाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठीबांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूररुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हारेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हामौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हामाहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हासंस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे९८९०८२५८५९
कामचुकार कामचुकार
पाटण तहसिलदार/ तलाठी / मंडलाधिकारी / संबंधित गवहाणवाडी ग्रामपंचायत यांचा मनमानी कारभार आणि फक्त पेपरबाजी
शासन आपल्यासाठी व सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांचा जमीन वाद. होणारी मारामाऱ्या. पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जनतेच्या हितासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व शासन निर्णय जारी करत असतें. त्यामुळे लोकांना वेळोवेळी शासकीय आॅफिसचे उंबरे झिजवायची. वेळ येत नाही पण शासन सर्वसामान्य जनेतेचा विचार करते आहे पण अधिकारी व कर्मचारी आपल्या पदांचा गैरवापर करून गोरगरीब जनतेला विनाकारण नाहक त्रास देत आहेत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ( राज्य म) पुणे यांचेकडून क्रमांक क्र रा भू ४/ र स /मा सू /१८९/२०२१ निवाशी जिल्हाधिकारी सर्व यांच्यासाठी (१४/१/२०२१) रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता
( विषय ) संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेण्याच्या व ७/१२ दुरुस्ती प्रस्ताव आॅनलाइन पध्दतीने स्विकारण्याचा व त्यांचा वेळेत निकालात काढण्यासाठी मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत ई - फेरफार प्रणालीमधये राज्यातील १००/ टक्के अधिकार अभिलेखाचे संगणकीकरण करण्यात आले असून या संगणकीकृत गाव. न. नं. ७/१२ चे आधारे दस्त नोंदणी केली जाते यामध्ये अचूकता येण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत होतो तथापि अजून देखील संगणकृत ७/१२ मध्ये चुका किंवा त्रुटी असल्याचे वेळोवेळी जनतेने निवेदन तक्रार अर्ज शासनाकडे जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या असून तसेच अनेक खातेदार ई- मेल द्वारे किंवा दुरध्वनी अडचणी मांडतात काही खातेदार ई- हक्क प्रणालीद्वारे ७/१२ मधील दुरुस्तीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करतात तरीही त्या दुरुस्ती होत नाहीत अश्या असंख्य तक्रारी इकडे प्राप्त होत आहेत आत्ता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना १००/टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे कॅम्प चया ठिकाणी ७/१२ साठी नवीन अर्ज. कलम १५५ चे आॅनलाइन प्रस्ताव घेण्याचा अधिकार. तहसिलदार/ मंडलाधिकारी. / उपविभागीय अधिकारी/ नायब तहसीलदार / यांच्या परवेक्षणा खाली पार पडतील
ओ डी सी अहवाल तयार करणे. विसंगत ७/१२ ची दुरुस्ती करण्यात आली पाहिजे होती (११/१/२०२१)! चया निर्देशानुसार गाव नमुना नं १( क) मधील नोदी अद्यावत करणे गरजेचे होते कॅम्प हा आठवड्याचा एका ठराविक दिवशी २० जानेवारी २०२१ ते २०/ मार्च २०२१ या कालावधीत प्रत्त्येक तालुक्यात आयोजित करणे गरजेचे होते या कॅम्पचे पर्यवेक्षक म्हणून जिल्हा स्तरावरून व विभागीय स्तरावरून वरिष्ठ महसूल अधिकारी यांची नियुक्ती केली होती काय ? सर्व विषय मांडण्याचे कारणं असे आहे मी अहमद नबीलाल मुंडे रा. गवहानवाडी. ता पाटण. जिल्हा सातारा. सध्या मुक्काम. इस्लामपूर राजेबागेसवारनगर. इस्लामपूर ता वाळवा जिल्हा सांगली पीन कोड ४१५४०९ मा तहसिलदार सो पाटण. यांचेकडे. आॅनलाइन ७/१२ व फेरफार दुरूस्ती साठी. मी मौजे गवहाणवाडी ता पाटण येथील रहिवासी आहे गवहाणवाडी येथील जमीन गट नं ६९/५ या जमीनीस माझे वारसाहक्काने नाव १९९३ सालास नोंद आहे नंतर मी त्यापैकी ०-०२ आर क्षेत्र विक्री केली असून माझे नावांवर ०-०१ आर क्षेत्र शिल्लक आहे आॅनलाइन उतारेवर क्षेत्र ०-०१ गुंठा घरपड दाखविली आहे परंतु आॅनलाइन उतारे वर माझे नाव नोंद झालेले नाही चौकशी केली असता मा तलाठी म्हणजे ब्रम्हदेव माणले जातात त्यांनी सहज सांगून टाकले की फेरफार चूकला आहे म्हणजे फेरफार लिहिणारे कोण आम्ही तुम्ही होतो काय? सर्व क्षेत्र विकले आहे असा फेरफार तयार करणार्या तलाठ्याने समोरून किती पैसे घेतलें आणि सर्व जागेचा फेरफार करून शिल्लक असणारी जमीन मग गेली कोठे ? म्हणजे तलाठी ( ब्रम्हदेव ) एक रेघ मारुन मोकळे झाले त्यांची बदली झाली की यांच्या चूका सर्वसामान्य जनतेने आपले जोडे व पैसा वेळ आॅफिसचे हेलपाटे मारून मरेपर्यंत अधिकार व कर्मचारी यांच्याकडून मिळणारी हिन वागणूक सहन कशासाठी करायची ?
असाच प्रकार मी स्वता भोगला आहे गोरगरीब जनता. बांधकाम कामगार. आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज असा वेळोवेळी आवाज उठवणारा एक सर्वसामान्य माणूस तहसिलदार कार्यालय पाटण येथे. सबब विनंती की आॅनलाइन ७/१२ व फेरफार दुरुस्ती साठी योग्य ती कारवाई व्हावी म्हणून विनंती करण्यासाठी सोबत जुना ७/१२ व फेरफार उतारा/ झेराॅकस जोडून (१) २५/५/२०१९ रोजी पाहिले पत्र दाखल केले आहे(२) २/३/२०२१ मा तहसिलदार सो यांना स्मरण पत्र दाखल केले होते(३) २३/३/२०२१ रोजी मा तहसिलदार यांना अजून एक स्मरण पत्र दाखल केले होते(४)१२/५/२०२१ रोजी मा तलाठी सो ( ब्रम्हदेव ) यांनासुद्धा स्मरण पत्र दाखल केले होते वरील प्रमाणे सर्व पत्र व्यवहार केल्यानंतर मी स्वता तलाठी साहेबाना फोन केला होता त्यावेळी या योजनेची मुदत संपली आहे आम्ही काय तुमच्या घराकडे येऊन नोद घालू का ? अशी उडवाउडवीची उत्तरे दिली मंडलधिकारी साहेबाना फोन लावला असता बघतो करतो तुम्हाला बोलावले जाईल बोलावयचे लांबच पण शासनाचा एक कागद खरब करून कोणताही पत्र व्यवहार सुध्दा मला करून कळविणे योग समजलें नाही यातला सर्वात महत्वाचा मोठा भ्रष्टाचार म्हणजे गवहाणवाडी ग्रामपंचायतीचा. ज्याच्या नावावर जागा नाही घर नाही त्याला घरफाळा पानपट्टी कर कोणत्या निकषांवर आकाराला जातो मला तर माहिती नाही ? तुम्हाला माहिती असेल तर कळवा ? १०हजार ७/१२ व फेरफार नोंदी मार्गी लावल्या म्हणून पेपरबाजी केली ती जर खरी असेल तर माझी नोंदणी प्रक्रिया बाकी राहीलीच कशी ? तोंड बघून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली काय ? तालुक्यात ७/१२ व फेरफार दुरुस्ती कॅम्प किती आणि कोठे झाले का नाही ? समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठीबांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूररुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हारेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हामौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हामाहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हासंस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे९८९०८२५८५९
बाजार बाजार
वरील शब्द आपणास माहीत आहे कारण जीवनात आपण कीतीतरी प्रकारचें बाजार बघितले आहेत. आपला चांगला वाईट असणारा जीवनावश्यक माल नुसता तोंडाचे भांडवल करून ग्राहकांच्या गळ्यात घातला जातो याचा अर्थ असा होतो की आपला माल वस्तू योग्य भावात विकून चांगला मोबदला मिळवणे यासाठी उभे केलेला एक व्यक्ती समूह म्हणजे बाजार म्हणता येईल
खेडेगावात लोकवस्ती कमी असल्यामुळे तेथे पाराखाली भरलेला बाजार आपण बघितला असेल. लोकसंख्या वाढत गेली आणि त्यानुसार बाजाराची व्याप्ती सुध्दा वाढली लोक आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य वस्तू खरेदी करण्यासाठी शहराकडे लोकांचा लोंढा वाढला मग विक्रेते आणि ग्राहक यांचें संबंध दृढ झाले जाहिराती वाढल्या बोगस माल म्हणील तेवढ्या किमतीला विकला जाऊ लागला. शहरात दलाल एजंट मार्केट यार्ड मध्ये शेतक-यांच्या मालावर मोठ्या प्रमाणात नफा मिळवयला लागले नगरपरिषद महानगरपालिका या क्षेत्रात या संस्थांकडून निवडलेले अधिकार कर्मचारी शेतकरी माल विकायला आला की त्याला जागा द्यायची नाही बसायला बाजारकर नावांवर पैश्याची मागणी करायला लागले व्यापारी एखाद्या गरिबाला आपला माल विकायसाठी जागा देत नाहीत. अधिकार व कर्मचारी यांचे आणि स्थानिक व्यापारी यांचें संगनमत करुन शेतकरी व इतर लोकांना नाहक त्रास देत असतात.
वस्तूंचाच भरत नाही त्यातच. म्हैस. बैल शेळ्या मेंढ्या कोंबडी उंट घोडे गाढव माकड कुत्री अशा विविध जनावरांचे बाजार सुध्दा आपण बघितले आहेत पण यांत सुध्दा दलाल एजंट यांचेच राज्य बाजारावर असल्याचे आपणं बघतो मग काय बाजार यांच्या बापाचा आहे काय ? शेतकरी व गोरगरीब लोकांना या सुध्दा बाजारात जागा नाही का ?
शासकीय बाजार वैयक्तिक लाभाच्या योजना. सामुहिक लाभाच्या योजना. रेशन कार्ड. जेष्ठ नागरिक योजना. महसुली योजना. कामगार योजना. मजूर व शेतकरी. विद्यार्थी व युवक योजना. महिलांसाठी योजना. आदिवासी योजना. पर्यावरण. दलित मुक्ती. विज्ञान. आरोग्य. नागरि स्वातंत्र्य. शेतमजूर प्रश्न. सामाजिक व राजकीय. आर्थिक. वैद्यकीय शिक्षण. मताधिकार. मूलभूत हक्क. धर्मभेद. प्रांतभेद. भाषाभेद वंश. भाषा. लिंग. समतेचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. शोषण विरोधी कायदा. धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा. शैक्षणिक व सांस्कृतिक हकक. सवैधानिक उपाययोजनांचा हक्क. ग्राहक संरक्षण कायदा. व्यसनमुक्ती. लघुउद्योग. अनाथ व अपंग पुनर्वसन. अंधश्रद्धा निर्मूलन. बांधली मजूरांचे सथालांतर. लोककला. बालकल्याण. कायदा आणि न्याय. पाणीपुरवठा व पाणीवाटप. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. जिल्हा परिषद. पंचायत समिती. जिल्हाधिकारी कार्यालय. विज कार्यालय. खाजगी नेते पुढारी. जंगलसंपतती. खनिज संपत्ती. धरणे. कालवे. बोगदे. बंद. आंदोलन. मोर्चे. उपोषण. टाळेबंदी. संचारबंदी. चळवळ. उठाव. विविध करोडो रुपयांचे घोटाळे. विमा कंपन्या. बेरोजगारी. भ्रष्टाचार. सार्वजनिक उत्सव. सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद. फुटीरता. संपर्क माध्यम. जाहिरात. जातीयवाद. लोकसंख्या नियंत्रण. अशा विविध ठिकाणी आपण रोजच जातो आपणास काय वागणूक मिळते आणि आपणास न्याय मिळतच नाही कारणं आधुनिक युगाच्या गतिशिलतेने संपूर्ण भान असलेली व त्यांच्याशी सहजपणे एकरुप होणारी व्यक्ती संकुचित निषठाचा त्याग करून आधुनिकतेशी सुसंगत अशा व्यापक निषटाचा स्वीकार पुरस्कार व प्रचार करणारी धर्म श्रधदाची व बुद्धी निष्ठा व व्यापक माणवी हिताच्या कसोटीवर परखड व्यक्ति आपल्यापुढे अजून कोणी आलें नाहीं. चंगळवाद आणि भोगवादावर प्रखर हल्ला करणारी औधोगिक संस्कृती व तंत्रज्ञानाचे लोकविरोधी विनाशक अ कल्याणकारी म्हणून अमंगल करणारे आज आपल्यावर राज्य करत आहेत
बाजार वरिल शासकीय. निममशासकीय. विविध आॅफिस मध्ये मोठा बाजार चालतो. सर्वसामान्य जनता गोरगरीब व्यक्तिला न्याय कधी मिळालाच नाही. उलट. काही मिळतय का यासाठी गोरगरिबांना हेलपाटे मारून आपल्या चप्पला झिजवावया लागतात. म्हणजे सर्वात मोठा बाजार येथे चालतो कधी बंद होणार माहिती नाही ? कोण बंद करणार माहिती नाही ? न्याय हकक व अधिकार मिळणारं का ? या बाजारात ? कोण आपणास कशाची मागणी करत असेल तर त्याला विचारा शासन तुला पगार देत नाही का ?
बाजाराचे शेवटचे उदा देतो. महिला व लहान मुले यांचा सुध्दा मोठा बाजार समाजातील नामांकित व्यक्ती करतात. मुलांना परदेशात विकले जाते. महिलांची विक्री केली जाते. चांगली गोंडस मुल यांना हात पाय डोळे निकामी करून सिग्नल वर भिक मागण्यासाठी तयार केले जाते किती भयानक प्रकार आहे अंगावर काटा उभा राहतो. नोकरी आमिष दाखवून महिला. युवक युवती यांना फसवणूक बोलावलं जातं आणि त्यांच्या अंगांचा खुला बाजार आज चालू आहे आपल्याला हे कळणार कधी ?
वैद्यकीय बाजार वैद्यकीय सेवा ईश्वरी सेवा होती पण कधी गतकाळात होती आपला परमधरम म्हणून काम करणारे वैध हकीम मोठे मोठे आजार आपल्या वैद्यकीय शिक्षण व झाडापासून तयार औषधाने करत होते. उपचार घरातच केलें जात होतें. घरांचे रुपांतर छोट्या छोट्या दवाखान्यात झाले वैध यांना नविन नाव मिळाले डॉ. दर्जा वाढला. उपचार करण्याच्या नावाखाली पैसा जमावयला सुरुवात झाली. नंतर छोट्या दवाखान्याचे रुपांतर हाॅसपिटल मग काय यांचाच दवाखाना विदेशी औषध उपचार यांचाच मनाला येईल तेवढी फि. उपचार घेणा-या रुग्णाला औषध सुध्दा यांच्याच मेडिकल मधून घेणे बंधनकारक करण्यात आले म्हणजे गोरगरीब जनता सर्वसामान्य माणूस याला लुटण्याचा पुरेपूर सापळा लावला जातो. रुग्ण हक्क सनद कोणत्याही दवाखान्यात नाही. उपचारासाठी कोणतेही दर नाहीत शासनाचा अंकुश नाही वयोवृद्ध व्यक्ती. महिला. लहान मुले. यांना सुध्दा या नराधमांनी सोडलेले नाही. जीवंत व्यक्तिला यांनी सोडले नाही तर मयत व्यक्तिचे प्रेत सुध्दा पैशासाठी अडवून ठेवले जाते. आपल्याला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार आहे. दवाखाना निवडण्याचा अधिकार. मेडिकल निवडण्याचा अधिकार. उपचारात सुधारणा होत नसेल तर दुसर्या दवाखान्यात उपचार घेण्याचा सुध्दा अधिकार आहे. औषधांची किंमत. उपचारांचे दराची विचारपूस करणयाचा अधिकार आहे. विविध योजनांतून मोफत उपचार घेण्याचा अधिकार. महिलांच्या साठी विशेष उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार. लहान मुले यांना विशेष उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार. परवा कोरोना सारखे संकट अजून आहे पण आपणांस डॉ लोकानी आपणांस काय वागणूक दिली आपण बघितली आहे. तपासणी नाही. अंगावर औषधं टाकणे. हाडांच्या रुग्णांसाठी ताप थंडी याच औषध तेही हजारांच्या घरात. लांबून विचारपूस करणे.
डॉ ला देव माणले जाते पण आत्ता यांचें रुप काय आहे
विचार करा बाजार बंद झाला पाहिजे असे एक नाही अनेक बाजार चालू आहेत आपल्या आजूबाजूला चालणारा बाजार बंद झालाच पाहिजे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
शोषण आणि आपण शोषण विरुद्ध आपले हक्क
. भारतीय समाजव्यवस्था विषमता अंत्यंत स्पष्ट व डोळ्यात भरण्याइतकी आहे समाजातील दुर्बल घटकांचे उघड उघड शोषण होत आहे हि व्यवस्था समतेचा आधार सांगणार्या लोकशाही तत्वाज्ञानी विसंगती आहे याची जाणीव आपणास आहे म्हणून स्वातंत्र्य मिळालेनंतर आणि आपण लोकशाही स्विकारण्याचे ठरविले नंतर त्याला अनुकूल असे सामाजिक मन यंत्रणा तयार करण्याची जरूर होती मुलभूत हककामधये शोषणाच्या विरोधात कायदा केलेचा समावेश जाणिवेचा निर्देशक आहे
व्यक्ति प्रतिष्ठा कोणत्याही व्यक्ती शारीरिक प्रतिष्ठेचा यथायोग्य मान राखणे आवश्यक आहे व्यक्तिच्या शारीरिक क्षमतेवर आणि प्रतिष्ठेवर अवमानी बंधने टाकणे म्हणजे तिच्या आतमगौरवावर घाला घालण्यासारखे आहे व्यक्तिच्ये शरिर हि व्यक्तिची संपती आहे म्हणून कोणा एका व्यक्तिच्या देहावरच कोणी मालकि सांगत असेल किंवा त्या व्यक्तिच्या इच्छेविरुद्ध तो वापर करत असेल तर तिचे शोषण होते असे म्हणता येईल गुलामगिरी वेठबिगारी कामगार शोषण आपल्या संविधान मध्ये प्रतिबंध करण्यात आला आहे
व्यक्तिची गुलाम म्हणून खरेदी विक्री किंवा महिलांना वेश्याव्यवसाय वा अन्य अनैतिक कामासाठी खरेदी विक्री हे भारतीय संविधानात बेकायदेशीर ठरविले आहे अज्ञान व दारिद्र्य यातून येणाऱ्या असहाय्यतेपणामुळे आपल्या देशात लहान लहान मुला मुलींना कामगार म्हणून अल्प मोबदल्यात किंवा फुकट काम राबवले जाते त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही व उद्याचे भविष्य असणारी ही मुले देशाचे आधारस्तंभ ठिसूळ होतात म्हणून १४ वर्षांखालील मुलांना अवजड कामे किंवा खाणीसारखे अवघड काम चहागाडी. वडापाव गाडी चायनीज याठिकाणी लहान मुलांना काम करायला लावणे आपल्या भारतीय संविधानात बंदी केलेलीं आहे समाज शोषणमुक्त निर्माण झाल्याशिवाय हे अन्याय दूर होणार नाहीत
या जाणिवेतून शोषणाविरुद्ध हे हक्क देण्यात आले आहेत यासाठी योग्य ते कायदे करण्याची गरज आहे शासनावर जबाबदारी देणेत आली आहे थोडक्यात म्हणजे एका व्यक्तीला व्यक्तिचे शोषण करण्याचा तिच्या व्यक्तिगत सवाभिमानात हस्तक्षेप करणे याचा हक्क नाही हे शोषणाविरुद् हक्कानी स्पष्ट केले आहे
शोषण म्हणजे काय
(१) कामगारांचे कामांवर मिळणारी वागणूक मिळणारा पगार एकसारखा नाही हे शोषणच आहे
(२) महिला कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक त्याचा कडे बघण्याचा दृष्टीकोन पगार तफावत हा सुद्धा शोषणाचा भाग आहे
(३) १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे पगार न देणे
(४) एकमेकांत फरक करणे
(५) समतेचा हक्क नसणे
(६) स्वातंत्रयाचा हक्क नसणे
(७) धार्मिक विधी व संस्कार यांचा हक्क
(८) शिक्षण सवैधानिक उपाययोजना
(९) ऑफिस मध्ये महिला कर्मचारी यांना मिळणारी वागणूक
अशा विविध भागातून आपले व सर्वसामान्य जनता गरिब यांचे शोषण झालेले आपणास पहावयास मिळते
गरज आहे शोषणासंबधी कायद्याचे प्रचार व प्रसार करण्याची
वरील प्रमाणे प्रचार व प्रसार समाजसेवा वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व असणारे तरुण व्यक्ति आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य येथून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड झेरॉक्स एक फोटो
संपर्क साधावा
९८९०८२५८५९
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन कृती समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
सर्व मुस्लिम बेरोजगार तरुणांना विनंती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यात कार्यालय आहे संपर्क साधा आणि मंडळाकडून आर्थिक मदत मिळवून आपला व्यवसाय सुरू करुन उधोजक बना
जहाल आणि मवाळ
जहाल आणि मवाळ दैनंदिन राजकारणामध्ये. वृत्तपत्रातून. संपर्क माध्यमातून. राजकीय व्यासपीठावरून अथवा नेत्यांच्या तोंडातून असे शब्द प्रयोग सतत केले जातात. अल्पावधीतच त्यांना स्वताच्या एक राजकीय संदर्भ प्राप्त होतो प्रचलित राजकीय व्यवहारांचा संदर्भ असे शब्द अधिकच अरथवाही बनतात. त्या शब्दाच्या उचचराबरोबर आपल्या मनात काही निश्चित राजकीय संदर्भ जागे होतात. त्या प्रकाशात आपण प्रचलित राजकीय वास्तव्य समजावून घेऊ लागतो. हे शब्द कसे वापरले जातात. त्यांचा आपल्या राजकीय व्यवहाराशी संबंध कसा पोहचतो याचा विचार हितसंबंधांचा आविष्कार. सुसूत्रीकरण आणि संघटन हा राजकीय प्रकियेचा गाभा असतो.
हितसंबंधाचा आविष्कार हा प्राय शबदामधूनच घडतो. साहजिकच काही शब्द हे विशिष्ट वर्गाच्या हितसंबंधाशी कायमचेच संलग्न होतात. त्या शब्दाच्या उचचराबरोबर संबंधित गट त्यांचे राजकारणातील अग्रक्रम त्यांची राजकीय शक्ती व प्रतिष्ठा आणि प्रचलित राजकारणातील त्यांचे स्थान या गोष्टी आपल्यापुढे सहज येतात. अशा शब्दांना राजकारणात कळीचे महत्व प्राप्त होतें. कारणं तया शब्दातून संबंधित राजकीय प्रवाह सुत्ररूपाने व्यक्त केलें जातात. उदा. स्वातंत्र्य पूर्व काळात"जहाल आणि मवाळ" या शब्दातून विशिष्ट राजकीय अर्थ व संदर्भ प्राप्त झाला होता. या शब्दाचा उच्चारा बरोबर त्या काळातील राजकीय अंतप्रवाहावर एकदम प्रकाश पडतो असे. म्हणून तत्कालीन राजकीय प्रकियेचया संदर्भात या शब्दांना कळीचे स्वरूप प्राप्त होते राजकारणात कळीचे स्थान प्राप्त झालेल्या शब्दांचे महत्वाचे लक्षण म्हणजे अशा शब्दांना त्यांचे कोशगत अरथापलिकडील. काही विशिष्ट राजकीय अर्थ प्राप्त झालेले असतात. उदा. "जहाल " या शब्दाचा कोशगत अर्थ हा उग्र कडक असतो. पण टिळक युगातील राजकारणाच्या संदर्भात या शब्दांला त्यांच्या त्यांच्या रुढ अर्थापलीकडे"राष्ट्रवादी "" चळवळ्या" सामाजिक सुधारण्यापेक्षा राजकीय सुधारणांना अग्रक्रम देणारा "सनदशीर" अर्ज विनंत्या राजकारणाबद्दल असमाधानी असलेला "ब्रिटिश धारजिणी भूमिका न घेता परकिय सत्तेशी उघडपणे दोन हात करू इचछिणारा असे अनेक अर्थ प्राप्त झाल्याचे आपल्या लक्षात येईल
राजकारणातील कळीचे प्रश्न म्हणजे त्या शब्दाच्या रूढ अर्था व्यतिरिक्त अनेक इतर अर्थ ध्वनित करीत असतात. इतकेच नव्हे तर तत्कालीन राजकीय प्रवाहाचे ते वाहक असतात कळीचे शब्दांचे दुसरें लक्षण म्हणजे त्या शब्दाच्या अर्थासंबधीची लवचिकता हे होय कळीच्या शब्दांना स्थूलमानाने जरी एक विशिष्ट अर्थ प्राप्त होत असला तरी शास्त्रीय परिभाषिक शबदाप्रमाणे तो अर्थ काटेकोर नसातो. त्या स्थूल अर्थाच्या अनेक छटा संभवतात त्यामुळे अशा शब्दांना अर्थास एक अंगभूत लवचिकपणा प्राप्त झालेला असतो. त्यामुळे राजकारणात विविध संदर्भात सोयीनुसार तो शब्द वापरणे सहज शक्य होते. उदा. आपल्या राजकारणातील. "शहंरी आणि ग्रामीण" हा शब्दप्रयोग घ्या किंवा "कामगार आणि किसान" हे शब्द घ्या. आपल्या राजकीय प्रक्रियेचया संदर्भात या शब्दांच्या अर्थाभोवती काही एक संदिग्धता असतें. जसे उधोगपती संदर्भात बडा जमीनदार हाही किसान असतो. व छोटा अथवा भूमिहीन शेतकरी हाही किसान असतो. साहाजिकच राजकीय संवाद करताना ढोबळमानाने "किसान" शब्द वापरला जातो की शेतकरी वर्गातील सर्व सतर त्यात समाविष्ट होतात व"किसान कल्याण ""किसान शेती" "जय किसान" या शब्दातून वय व्यक्त केल्याप्रमाणे भूमिहीन शेतकरी पासून बड्या शेतकरयापरयणत सर्वच किसानाना दिलासा मिळतो परिणामतः राजकारणामध्ये कळीच्या शब्दांच्या अर्थाभोवती ही संदिग्धता लक्षात घेऊनच विविध नेते वा हितसंबंधी गट प्रकारचें शब्दप्रयोग आपापले राजकारण पुढे येण्यासाठी कल्पकतेने करीत असतात
राजकारणातील कळीच्या शब्दांचे आणखीही एक वैशिष्ट्य असते. वरवर पाहता हे शब्द प्रयोग वर्णन पर वा विश्लेषण पर असतात. पण त्याच वेळी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी मुळे संबंधितांना त्यातून काही विशिष्ट जाती वर्गाच्या अथवा जातीसंबधी अचूक बोधही होत असतो. उदा दलित पददलित. या शब्दांना इतिहासाच्या विविध टप्प्यांवर जे राजकीय संबंध चिकटलेले आहेत. त्यामुळे या शब्दांच्या वापरासरशी सर्वांनाच त्यातील जात - वर्गीय वास्तवाचा बोध होतो. या दृष्टीने पाहता कळीचे शब्दप्रयोग हे राजकारणात विशिष्ट हितसंबंधांचा प्रभावी आविष्कार करीत असताना. हे सहजच लक्षात येईल साहजिकच आपापल्या राजकीय शक्तिचया संवर्धनासाठी व संचलनासाठी या शब्दाचा अर्थपूर्ण वापर राजकीय व्यवहारात केला जातो*डावे आणि उजवेआपल्या राजकीय व्यवहारात डावी आघाडी. डावा विचार. डावे पक्ष. उजवे पक्ष. उजवी विचारसरणी असे शब्द वारंवार वापरले जातात. यातील "डावे"आणि"उजवे" म्हणजे काय ? या शब्दांच्या उच्चारा बरोबर आपल्या मनात कोणते राजकीय संदर्भ जागे होतात कोणाला माहिती ? *हरिजन आणि दलित
स्वातंत्र्यपूर्व काळात फुले आंबेडकर चळवळीने अस्पृश्य वर्गात जी सामाजिक व राजकीय जागृती केली त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न हा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या ऐरणीवर आला* किसान आणि कामगारपहिल्या महायुद्धाच्या सुमारास भारतातील भांडवलशाहीच्या विकासाला गती आली. कारखानदारी वाढली. शहरीकरणास वेग आला. आणि युद्धामुळे आर्थिक संकट जगावर पसरले. भारतातील वाढत्या कारखानदारीला खिळ बसली. वेतन कपात. टाळेबंदी. मजूर कपात. बेरोजगारी वाढली. कारखान्यात काम करणारा कामगार रस्त्यावर आला आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत होत गेला. परिणामी भारताच्या राजकारणात कामगार शक्तीचा उदय झाला. १९२४/ ते १९२९ कामगार हक्कासाठी लढे होण्यास सुरुवात झाली* आदिवासी आणि वनवासीदलित या शबदाप्रमाणे आदिवासी/ वनवासी हे शब्दप्रयोग आपल्या वर्तमान राजकीय प्रक्रियेतील कळीचे शब्दप्रयोग झाले आहेतआदिवासी यांच्यावरील अत्याचार/आदिवासी विकास योजना/आदिवासी राज्याची मागणी/वनवासी कल्याण आश्रम/आदिवासी साहित्य/आदिवासी पुनर्वसन या शब्दातून आदिवासी हा शब्द आपल्या राजकीय जाणिवेच्या क्षेत्रात शिरतो*पांढरपेशा व बहुजनसमाज
महाराष्ट्राच्या राजकारणात पांढरपेशा वर्ग व बहुजनसमाज या शब्दांना काही निश्चित ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणूनच येथील राजकीय प्रक्रियेत हे शब्द सर्वच राजकीय पक्ष वा संघटना सर्रास पणे वापरतात व त्याद्वारे आपापले राजकारण पुढे रेटीत असतात वरील सर्व विषय आपणांस बरेच काही सांगून जातो म्हणजे राजकारणात महत्वाचे काय असेल तर जातींचे व समाजांचे एकामेकात मतभेद निर्माण करून राजकारणी आपला स्वार्थ साधत असतात यांचा अर्थ असा होतो की जातीयवाद संपला की राजकारण संपले म्हणजे जात ही आपल्या भारताची आई आहे समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठीबांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूररुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हारेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हामौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हामाहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हासंस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे९८९०८२५८५९
वाहन चालविताना गुन्हे
वाहन चालविताना गुन्हे
आपल्यात सर्वांच्या कडे स्वताच्या वाहन नसतं. मग आपण सार्वजनिक. खाजगी वाहन. पॅसेंजर वाहनं. अशा विविध वाहनातून आपली येण्या जाण्याची गरज भागवत असतो. मग विविध अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यातून वाहनातून प्रवास करताना. मिळणारी वागणूक. दरापेक्षा जास्त पैसे घेणे. वाहनातून आपले साहित्य चोरी होणे. कधी कधी पॅसेंजरला लुटने असे प्रकार आपण बघतो. जसे आपणांस प्रवास करताना काही कायदे तयार केले आहेत. तसेच वाहनं चालविताना वाहनं चालक आणि मालक यांच्यासाठी सुध्दा सर्वसामान्य जनता गोरगरीब जनता प्रवास करणारे प्रवाशी यांना कोणती आणि कशी वागणूक सुरक्षा दिली गेली पाहिजे यासाठी विविध कायदे महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिले आहेत आज हे कायदे कलम यांची अंमलबजावणी कशी होते यांवर आपणच लक्ष ठेवलें पाहिजे कारण प्रशासन प्रत्त्येक व्यक्ति जवळ पोहचू शकत नाही
(१) अधिक भाड्याची मागणी करणेगुन्हा * २१(१२) आर आर आर/ १७७चार्ज *२००/रूपये
(२) कर्कश हॉर्न बसविणेगुन्हा * २१(४) आर आर आर/१७७चार्ज *रु ३०० किंवा २००/
(३) घाबरणारा आवाजगुन्हा * २१(५) आर आर आर/१७७चार्ज.* रु ३००किंवा २००/
(४) शांती क्षेत्रात भोंगा वाजविणेगुन्हा *२१(२) आर आर आर/१७७चार्ज * रु ३००किंवा २००/
(५) शर्यत लावणेगुन्हा * १८९ मोककाचार्ज * रु १०००/
(६) धोकादायक ओवरटेकगुन्हा * ६१(१) आर आर आर/१७७चार्ज * रु ३०० किंवा २००/
(७) जंक्शन/ काॅरनर वेग कमी न करणेगुन्हा * ८ आर आर आर/१७७चार्ज *रु ३०० किंवा २००/
(८) वळण घेताना वेग कमी न करणेगुन्हा * ३ आर आर आर / १७७चार्ज * रु ३००किंवा २००/
(९) मालावर धोकादायक माणसांची वाहतूकगुन्हा * १०८ एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००किंवा २००/
(१०) नियमबाह्य जनावरे वाहतूकगुन्हा * ८३१ एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३०० किंवा २००/
(११) वाहनातून उंच मालाची वाहतूकगुन्हा * २२९ एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००किंवा २००/
(१२) फुटपाथवर वाहनं चालविणेगुन्हा *१३६ एम एम व्ही आर/१७७चार्ज * रु ३००किंवा २००/
(१३) निष्काळजीपणे वाहनं मागें घेणें गुन्हा * २३३ सी एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३०० किंवा २००/
(१४) विनाकारण हाॅरन वाजविणेगुन्हा * २१(१)! ए आर आर/१७७चार्ज * ३०० किंवा २००
(१५) खबरदारीचा इशारा न देता वाहनं थांबविणे/ चालविणेगुन्हा * १३ आर आर आर/१७७चार्ज * रु ३०० किंवा २००
(१६) रस्त्याच्या उजव्या बाजूने येणेगुन्हा * ९ आर आर आर/१७७चार्ज * रु ३०९/ किंवा २००/
(१७) दुसरें वाहन पुढे न नेण्यास अडथळा करणेगुन्हा * ७ आर आर आर/१७७चार्ज. रु ३००/ किंवा २००/
(१८) टॅक्सी/ रिक्षा/ सार्वजनिक बॅच/ धारकाचे गुन्हे (वाहतूकीचे भाडे कार्ड न दाखविणे)गुन्हा * ७४(२)!(५)!/१७७चार्ज * रु २००
(१९) वाहन तळापासून दूर टॅक्सी/रिक्षा उभी करणेगुन्हा * २१(५) एम एम व्ही आर/१७७चार्ज* रु ३००/ किंवा २००/
(२०) फ्लॅग खाली करून वाहनं तळांवर टॅक्सी उभी करणेगुन्हा * २१(७) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(२१) नजीक/ जलद अशा रस्त्याने जाण्यास नकार/प्रवाशी मध्येच सोडणेगुन्हा * २१(८) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(२२) सोबत किलनर घेणेगुन्हा * २१(१०) एम एम व्ही आर/१७७चार्ज. * रु ३०९/किंवा २००/
(२३) दर पत्रकापेक्षा जास्त भाडे घेणेंगुन्हा * २१(१२) एम एम व्ही आर/१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(२४) सेवेत धुम्रपान करणेगुन्हा * २१(१२)!एम एम व्ही आर /१७७/चार्ज *रु ३००/ किंवा २००/
(२५) निटनेटका गणवेश न घालणेगुन्हा * २१(१८) एम एम व्ही आर/१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(२६) मिटर झाकणेगुन्हा * २१(सी) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००
(२७) भाडे नाकारणेगुन्हा * २१(डी ) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/किंवा २००/
(२८) बॅच बिल्ला न लावणेकिंवा तो दिसेल असा न लावणेगुन्हा * २४(२) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/किंवा २००/
(२९) असभ्य वर्तनगुन्हा * २१(१७) एम एम व्ही आर/१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(३०) सार्वजनिक सेवेतील चालकांचे असभ्य वर्तनगुन्हा * २०(७) एम एम व्ही आर/१७७चार्ज * रू ३००/ किंवा २००/
(३१) सार्वजनिक सेवेतील निटनिटका गणवेश नसणेगुन्हा * २०(८) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(३२) भाडे पटवून घेणें/प्रवाशाना प्रार्थना करणेगुन्हा * २१(५) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३०० किंवा २००/
(३३) टेरिफ कार्ड न दाखविणेगुन्हा * ७४(०२)!एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(३४) टॅक्सी/रिक्षा माल वाहतूकगुन्हा * ६६( ए) अॅकट २०००चार्ज * रु २०००
(३५) गाडी चालवताना संगीत वाजविणेगुन्हा * १९०(२) मोवाकाचार्ज * रु २०००
(३६) जादा पॅसेंजरगुन्हा * २१(२०) / १७७ मोवा का चार्ज * रु २०००
(३७) ब्रीजवर वाहन पार्क करणेगुन्हा * २१(५)!/१७७ मोवाकाचार्ज * रु २००/
(३८) प्रवाशाने भाडे देण्यास नकार / नुकसानगुन्हा * १०५(०१) एम एम व्ही आर /१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(३९) पोलिस सिग्नल/ इशारा विरूद्ध वाहनं चालविणेगुन्हा * ११९/१७७किंवा २२ आर आर आर/१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
(४०) गणवेशातील पोलीसांनी इशारा दिला असता न थांबणेगुन्हा * १३२/१७७चार्ज * रु ३००/ किंवा २००/
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठीबांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूररुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हारेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हामौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हामाहिती अधिकार नियोजन समिती सांगलीसंस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे९८९०८२५८५९x
बनावट कोरोना औषधाचा साठा जप्त -FDA
बनावट Favipiravir Tablets औषधाची विक्री वर अन्न औषध प्रशासनाची जप्तीची कारवाई
कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक असलेल्या Favipiravir Tablets चा बनावट साठा मुंबईत विक्री होत असल्याची गोपनीय बातमी अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागस प्राप्त झाली होती. सदर औषधाचा साठा विक्री साठी मुंबईतील काही विक्रेते कडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली या बाबत गोपनीयरित्या पडताळणी करण्यात आली. दि २४.०५.२०२१ रोजी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी मुंबईतील तीन औषध विक्रेते शिवसुष्ट्री सर्जीमेड , गोरेगाव पूर्व, मेडीटेब वर्ल्डवाईड, कांदिवली पूर्व व निरव ट्रेडलिंक, मुंबई. या ठिकाणी धाड टाकून मे मक्स रिलीफ हेल्थकेअर, सोलन, हिमाचल प्रदेश यांनी उत्पादित केलेला Favipiravir Tablets व Hydroxy Chloroquin औषध बनावट असल्याच्या संशयावरून सुमारे रु १.५४ करोडचा साठा जप्तीची कारवाई घेण्यात आली. या बाबत पुढील चौकशी केली असता मे मँक्स रिलीफ हेल्थकेअर, सोलन, हिमाचल प्रदेश हि उत्पादन संस्था अस्थित्वात नसल्याची माहिती औषध नियत्रक, हिमाचल प्रदेश यांनी इमेल द्वारे कळविली. तसेच राज्यातील घाऊक विक्रेत्यास विक्री केलेली संस्था मे मँक्स रिलीफ हेल्थकेअर, गौतम बुद्ध नगर, नोयडा उत्तर प्रदेश, या संस्थेस औषध विक्री परवाना नसल्याची माहिती मिळाली. मे मँक्स रिलीफ हेल्थकेअर, सोलन, हिमाचल प्रदेश हि उत्पादन संस्था अस्तित्वात नसल्याने या कंपनीचा Favipiravir Tablets साठा प्रतिबंधित करण्यासाठी सर्व राज्य औषध नियंत्रक यांना कळविण्यात आले होते.
दि ३०.०५.२०२१ रोजी मे मँक्स रिलीफ हेल्थकेअर चे मालक श्री सुदीप मुखर्जी हे चौकशी कामी हजर झाले असता त्यांचेकडे या औषध उत्पादन व विक्री बाबत कोणतेच कागदपत्रे उपलब्ध करू शकले नाहीत. तसेच औषध उत्पादन व विक्री परवाना बाबत माहिती देऊ शकले नाहीत. श्री मुखर्जी यांनी ज्या परवान्याच्या छायाप्रती सादर केल्या ते बनावट कागदपत्रे असल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले.
याप्रकरणी समता नगर, कांदिवली पूर्व व गोरेगाव , पूर्व पोलिस ठाण्यांमध्ये औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे १९४० अंतर्गत दि ३०.०५.२०२१ व ३१.०५.२०२१ रोजी गुन्हा नोंदवून मे मक्स रिलीफ हेल्थकेअर चे मालक श्री सुदीप मुखर्जी यांना पुढील चौकशी कामी पोलिसांच्या ताब्यात दिले. या बाबत पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई माननीय डॉ. राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन, माननीय श्री राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन व श्री सौरभ विजय, मा. सचिव, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग यांनी अशा औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनेच्या अनुषंगाने श्री परिमल सिंग, मा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन, श्री समाधान पवार, सहआयुक्त दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभाग मुख्यालय, बृहन्मुंबई व ठाणे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यांनी संयुक्तपणे भाग घेऊन कारवाई केली.
मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी जनतेने औषधांची खरेदी परवानेधारक दुकानदाराकडून खरेदी बिलाद्वारे करावी व जर एखादे संशयास्पद औषधबाबतची माहिती आढळल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन केले आहे.
असुन फायदा नसून खोळांबा
अल्पसंख्याक योजना व शिष्यवृत्ती
(१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे
सदर अर्ज आॅनलाइन पध्दतीने करणे आवश्यक आहे
(२) पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
सदर योजना अल्पसंख्याक मंत्रालय व भारत सरकार यांचेकडून राबविली जाते उच्च तंत्रज्ञान तंत्रशिक्षण विभागातर्फे. उच्च संचणालय पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते ११वी १२वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजना पात्र ठरविण्यासाठी वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेलें असावेत
(३) मेरीट कम मिन्स् शिष्यवृत्ती
सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत असून राज्यांमध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण तांत्रिक शिक्षण व व्यवसाय शिक्षण या विभागात शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २-५० लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत
(४) व्यावसायिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना
उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीच्या नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील गुणवत्ताधारक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उच्च व्यावसायिक व १२वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचया कुटुंबाची मिळणार या वार्षिक उत्पन्न मर्यादा २-५० लाखावरुन ६ लाख करण्यात आली आहे
(५) मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान. गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. व उर्दू. या विषयांचे शिक्षण देणे तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इयत्ता ९वी १०वी ११वी व १२ वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे
(६) अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये औधोगिक प्रशिक्षण संस्था व दिवयांग (अपंग ) शाळांमध्ये पायाभूत सुविधा सोयी पुरविण्यासाठी अनुदान योजना
(७) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह (केंद्र व राज्य )
विद्यार्थिनींसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य) अल्पसंख्याक समाजातील मुलीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मा न्या सचचर समितीने केलेल्या शिफारशीनुसार अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरू करणे हि शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे बांधण्यात येत आहे
(८) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना
(९) मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना
कर्ज मर्यादा. २-५० लाखांपर्यंत
व्याजदर फक्त ३/टक्के
१००/टक्के कर्ज
परतफेड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्ष शैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात याची सविस्तर माहिती मंडळ कार्यालयात मिळेल कर्ज मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे
(१०) राजीव गांधी शिक्षण कर्ज योजना
कर्ज मर्यादा. दोन लाख पन्नास हजार
व्याजदर फक्त ३/टक्के
१००/टक्के कर्ज
परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५. वर्षे
पात्रता
अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा मुस्लिम. शिख. पारशी. बुध्दीषट व जैन. समाजाचा
समावेश
अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा
वयोमर्यादा १ते ३२ वर्ष
कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शहरी भागात. रुपये. १/०३/०००पेक्षा कमी ग्रामीण भागात ८१००० पेक्षा कमी
राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज
अल्पसंख्याक असल्याचा पुरावा
आधार कार्ड /इलेक्शन कार्ड/ बॅंक पासबुक झेरॉक्स /पॅन कार्ड /यापैकी एक
अर्जदार व जामिनदार आधार कार्ड/इलेक्शन कार्ड /पारपतरक /बॅंक पासबुक /वाहन लायसन्स /पॅन कार्ड /पैकी एक
उत्पन्न प्रमाणपत्र
कुटुंब नावे तहसिलदार/तलाठी /यांचा उत्पन्न दाखला /शासकीय/खाजगी /क्षेत्रतातील कर्मचारी असल्यास फाॅरम १६
(११) मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना
राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता ८वी९वी१०वी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील मुला मुली साठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुधारित स्वरुपात राबविण्याबाबत
आज अलिकडे अल्पसंख्याक कार्यशाळा. अल्पसंख्याक मेळावे. अल्पसंख्याक हक्क व अधिकार. नियोजन. जिल्ह्यात अल्पसंख्याक अध्यक्ष आपल्या वाहनांना आपल्या अध्यक्ष पदाच्या मोठ्या मोठ्या पाट्या लावून फिरतात एक वेळ अशी आली कि अल्पसंख्याक दिन आॅनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला प्रत्त्येक जण आपापल्या राजकीय वर्तुळात या अल्पसंख्याक समाजातील लोकांचा कसा वापर करता येईल याकडे जादा लक्ष आहे
अल्पसंख्याक समाजा बद्दल जर कोणाला कळवाळा असेल तर त्यांनी एकाच काम करा ते म्हणजे अल्पसंख्याक असल्याचा पुरावा देणे हि अट रद्द करा जुना समाज अडाणी होता कागदाची किंमत त्यांना त्यावेळी कळली नाही त्यामुळे ६० वर्षाचा पुरावा मिळणे शक्यच नाही
अल्पसंख्याक योजनेअंतर्गत शिक्षणासाठी कर्ज योजना आहे पण त्या योजनेचा कर्ज पुरवठा मंडळाने करणे गरजेचे आहे कारण मंडळाने जर कर्ज प्रकरणे मंजूर केली तरि बॅंका हि प्रकरणे निकाली काढत नाही त्यात विनाकारण अटि घालून कर्ज प्रकरणे बाद केले जाते नाहि तर मग बॅंक मॅनेजर यांना टक्केवारी दिली तरच कर्ज प्रकरणाला मंजुरी मिळते किती वाईट आहे बघा
वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अन्न धान्य सुरक्षा रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
माहिती अधिकार
आपण जर एखाद्या शासकीय आॅफिस मध्ये माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्या संदर्भात असणारि माहिती हि त्या कार्यालयाच्या लेटर हेड वर देणे बंधनकारक आहे अशी माहिती मिळत नसेल तर कार्यालय दिरंगाई वरिष्ठांकडे तक्रार दाखल करा
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
-
कलम १६ कलम २१ काय आहे? माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद...
-
उज्ज्वला योजना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या भागातील महिलांचे जीवन सुधारावे यासाठी शासनाने महिलांचा. धूर. आरोग्य ...
-
खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील...