जहाल आणि मवाळ
दैनंदिन राजकारणामध्ये. वृत्तपत्रातून. संपर्क माध्यमातून. राजकीय व्यासपीठावरून अथवा नेत्यांच्या तोंडातून असे शब्द प्रयोग सतत केले जातात. अल्पावधीतच त्यांना स्वताच्या एक राजकीय संदर्भ प्राप्त होतो प्रचलित राजकीय व्यवहारांचा संदर्भ असे शब्द अधिकच अरथवाही बनतात. त्या शब्दाच्या उचचराबरोबर आपल्या मनात काही निश्चित राजकीय संदर्भ जागे होतात. त्या प्रकाशात आपण प्रचलित राजकीय वास्तव्य समजावून घेऊ लागतो. हे शब्द कसे वापरले जातात. त्यांचा आपल्या राजकीय व्यवहाराशी संबंध कसा पोहचतो याचा विचार हितसंबंधांचा आविष्कार. सुसूत्रीकरण आणि संघटन हा राजकीय प्रकियेचा गाभा असतो.
हितसंबंधाचा आविष्कार हा प्राय शबदामधूनच घडतो. साहजिकच काही शब्द हे विशिष्ट वर्गाच्या हितसंबंधाशी कायमचेच संलग्न होतात. त्या शब्दाच्या उचचराबरोबर संबंधित गट त्यांचे राजकारणातील अग्रक्रम त्यांची राजकीय शक्ती व प्रतिष्ठा आणि प्रचलित राजकारणातील त्यांचे स्थान या गोष्टी आपल्यापुढे सहज येतात. अशा शब्दांना राजकारणात कळीचे महत्व प्राप्त होतें. कारणं तया शब्दातून संबंधित राजकीय प्रवाह सुत्ररूपाने व्यक्त केलें जातात. उदा. स्वातंत्र्य पूर्व काळात"जहाल आणि मवाळ" या शब्दातून विशिष्ट राजकीय अर्थ व संदर्भ प्राप्त झाला होता. या शब्दाचा उच्चारा बरोबर त्या काळातील राजकीय अंतप्रवाहावर एकदम प्रकाश पडतो असे. म्हणून तत्कालीन राजकीय प्रकियेचया संदर्भात या शब्दांना कळीचे स्वरूप प्राप्त होते राजकारणात कळीचे स्थान प्राप्त झालेल्या शब्दांचे महत्वाचे लक्षण म्हणजे अशा शब्दांना त्यांचे कोशगत अरथापलिकडील. काही विशिष्ट राजकीय अर्थ प्राप्त झालेले असतात. उदा. "जहाल " या शब्दाचा कोशगत अर्थ हा उग्र कडक असतो. पण टिळक युगातील राजकारणाच्या संदर्भात या शब्दांला त्यांच्या त्यांच्या रुढ अर्थापलीकडे"राष्ट्रवादी "" चळवळ्या" सामाजिक सुधारण्यापेक्षा राजकीय सुधारणांना अग्रक्रम देणारा "सनदशीर" अर्ज विनंत्या राजकारणाबद्दल असमाधानी असलेला "ब्रिटिश धारजिणी भूमिका न घेता परकिय सत्तेशी उघडपणे दोन हात करू इचछिणारा असे अनेक अर्थ प्राप्त झाल्याचे आपल्या लक्षात येईल
राजकारणातील कळीचे प्रश्न म्हणजे त्या शब्दाच्या रूढ अर्था व्यतिरिक्त अनेक इतर अर्थ ध्वनित करीत असतात. इतकेच नव्हे तर तत्कालीन राजकीय प्रवाहाचे ते वाहक असतात कळीचे शब्दांचे दुसरें लक्षण म्हणजे त्या शब्दाच्या अर्थासंबधीची लवचिकता हे होय
कळीच्या शब्दांना स्थूलमानाने जरी एक विशिष्ट अर्थ प्राप्त होत असला तरी शास्त्रीय परिभाषिक शबदाप्रमाणे तो अर्थ काटेकोर नसातो. त्या स्थूल अर्थाच्या अनेक छटा संभवतात त्यामुळे अशा शब्दांना अर्थास एक अंगभूत लवचिकपणा प्राप्त झालेला असतो. त्यामुळे राजकारणात विविध संदर्भात सोयीनुसार तो शब्द वापरणे सहज शक्य होते. उदा. आपल्या राजकारणातील. "शहंरी आणि ग्रामीण" हा शब्दप्रयोग घ्या किंवा "कामगार आणि किसान" हे शब्द घ्या. आपल्या राजकीय प्रक्रियेचया संदर्भात या शब्दांच्या अर्थाभोवती काही एक संदिग्धता असतें. जसे उधोगपती संदर्भात बडा जमीनदार हाही किसान असतो. व छोटा अथवा भूमिहीन शेतकरी हाही किसान असतो. साहाजिकच राजकीय संवाद करताना ढोबळमानाने "किसान" शब्द वापरला जातो की शेतकरी वर्गातील सर्व सतर त्यात समाविष्ट होतात व"किसान कल्याण ""किसान शेती" "जय किसान" या शब्दातून वय व्यक्त केल्याप्रमाणे भूमिहीन शेतकरी पासून बड्या शेतकरयापरयणत सर्वच किसानाना दिलासा मिळतो परिणामतः राजकारणामध्ये कळीच्या शब्दांच्या अर्थाभोवती ही संदिग्धता लक्षात घेऊनच विविध नेते वा हितसंबंधी गट प्रकारचें शब्दप्रयोग आपापले राजकारण पुढे येण्यासाठी कल्पकतेने करीत असतात
राजकारणातील कळीच्या शब्दांचे आणखीही एक वैशिष्ट्य असते. वरवर पाहता हे शब्द प्रयोग वर्णन पर वा विश्लेषण पर असतात. पण त्याच वेळी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी मुळे संबंधितांना त्यातून काही विशिष्ट जाती वर्गाच्या अथवा जातीसंबधी अचूक बोधही होत असतो. उदा दलित पददलित. या शब्दांना इतिहासाच्या विविध टप्प्यांवर जे राजकीय संबंध चिकटलेले आहेत. त्यामुळे या शब्दांच्या वापरासरशी सर्वांनाच त्यातील जात - वर्गीय वास्तवाचा बोध होतो. या दृष्टीने पाहता कळीचे शब्दप्रयोग हे राजकारणात विशिष्ट हितसंबंधांचा प्रभावी आविष्कार करीत असताना. हे सहजच लक्षात येईल साहजिकच आपापल्या राजकीय शक्तिचया संवर्धनासाठी व संचलनासाठी या शब्दाचा अर्थपूर्ण वापर राजकीय व्यवहारात केला जातो
*डावे आणि उजवे
आपल्या राजकीय व्यवहारात डावी आघाडी. डावा विचार. डावे पक्ष. उजवे पक्ष. उजवी विचारसरणी असे शब्द वारंवार वापरले जातात. यातील "डावे"आणि"उजवे" म्हणजे काय ? या शब्दांच्या उच्चारा बरोबर आपल्या मनात कोणते राजकीय संदर्भ जागे होतात कोणाला माहिती ?
*हरिजन आणि दलित
स्वातंत्र्यपूर्व काळात फुले आंबेडकर चळवळीने अस्पृश्य वर्गात जी सामाजिक व राजकीय जागृती केली त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न हा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या ऐरणीवर आला
* किसान आणि कामगार
पहिल्या महायुद्धाच्या सुमारास भारतातील भांडवलशाहीच्या विकासाला गती आली. कारखानदारी वाढली. शहरीकरणास वेग आला. आणि युद्धामुळे आर्थिक संकट जगावर पसरले. भारतातील वाढत्या कारखानदारीला खिळ बसली. वेतन कपात. टाळेबंदी. मजूर कपात. बेरोजगारी वाढली. कारखान्यात काम करणारा कामगार रस्त्यावर आला आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत होत गेला. परिणामी भारताच्या राजकारणात कामगार शक्तीचा उदय झाला. १९२४/ ते १९२९ कामगार हक्कासाठी लढे होण्यास सुरुवात झाली
* आदिवासी आणि वनवासी
दलित या शबदाप्रमाणे आदिवासी/ वनवासी हे शब्दप्रयोग आपल्या वर्तमान राजकीय प्रक्रियेतील कळीचे शब्दप्रयोग झाले आहेत
आदिवासी यांच्यावरील अत्याचार/आदिवासी विकास योजना/आदिवासी राज्याची मागणी/वनवासी कल्याण आश्रम/आदिवासी साहित्य/आदिवासी पुनर्वसन या शब्दातून आदिवासी हा शब्द आपल्या राजकीय जाणिवेच्या क्षेत्रात शिरतो
*पांढरपेशा व बहुजनसमाज
महाराष्ट्राच्या राजकारणात पांढरपेशा वर्ग व बहुजनसमाज या शब्दांना काही निश्चित ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणूनच येथील राजकीय प्रक्रियेत हे शब्द सर्वच राजकीय पक्ष वा संघटना सर्रास पणे वापरतात व त्याद्वारे आपापले राजकारण पुढे रेटीत असतात
वरील सर्व विषय आपणांस बरेच काही सांगून जातो म्हणजे राजकारणात महत्वाचे काय असेल तर जातींचे व समाजांचे एकामेकात मतभेद निर्माण करून राजकारणी आपला स्वार्थ साधत असतात यांचा अर्थ असा होतो की जातीयवाद संपला की राजकारण संपले म्हणजे जात ही आपल्या भारताची आई आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९