आशेवर जीवन कायम

 


                  आपल्या जीवनाला एक भौगोलिक परिणाम असते. यापूर्वी आपण प्रादेशिक अस्मितेचा विचार केला आहेच. पण त्याशिवाय आपण ज्या भागात राहतो. त्या परिसराचे घटक होतों. आपणं केवळ तामिळ तेलगू कन्नड मराठी मुस्लिम मल्याळी असे विविध जातींचे नसतोच. आपल्या प्रादेशिक अस्मितेबरोबर आपल्याला एक विभागीय चेहरा मिळतो. मग आपण दक्षिण/ दक्षिणात्य बनतो. पूर्वेकडील किंवा उत्तरेकडील भारतीय किंवा अन्य जाती धर्माचे असतो. त्याबरोबर आचारविचार शहरि व ग्रामीण जीवनाची छाप असते. आपल्या जीवनाच्या या भौगोलिक संदर्भातून काही राजकीय सामाजिक प्रश्नांना तोंड फुटते 

        आजच्या आपल्या सार्वजनिक जीवनात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय अशी विभागणी झालेली दिसते. शिवाय उत्तर भारताच्या सांस्कृतिक वर्चस्व दक्षिणेला नकोसे वाटते. हिंदीचा आग्रह हा दक्षिणात्याना या उत्तर भारतीय वर्चस्वाचा एक नमुना वाटतो. व याउलट दक्षिणातयाचया भाषेचे वेगळे स्वरूप वेगळी लिपी. त्यांचा वेगळा पोशाख. यांच्यामुळे उत्तर भारतीयांनाही त्यांच्याविषयी साशंकता वाटते. दक्षिणात्य संस्कृती फटकून लाघणारी आहे. त्यांचा इंग्रजीचा आग्रह हा उत्तरेकडील लोकांना नोकर्या पासून दूर राखण्यासाठी आहे असे ग्रह बाळगले जातात. विशेषत तामिळाचया वेगळ्या संस्कृतीमुळे आणि भिननतव टिकविण्याच्या आग्रहामुळे दाक्षिणात्य म्हणजे फुटीर अशीच अनेकांची समजूत असते

          भौगोलिक संदर्भातून निर्माण होणारा असाच आणखी एक वाद म्हणजे ग्रामीण विरुद्ध शहरी हा वाद. सर्व सुखसोयी सुविधा या शहरांना मिळतात. रेल्वे. रस्ते स्वच्छ पाणी. वीज कारखाने. सगळे शहरातच असते. मूठभर शहरी पांढरपेशा चे शासनावर प्रभुत्व असते. अशी तक्रार केली जाते. तर शहरी लोकांना ग्रामीण भागातून पुढे येणारे नेतृत्व. ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था वगैरे गुणवत्ता बद्दल शंका असते. ग्रामीण सवलती देणे. शेतीसाठी सवलती देणे. याला शहरांमधून विरोध होतो. कारण कारखाने. व्यापार. हीच प्रगतीची मुख्य साधनें मानली जातात. निर्णय प्रक्रियेत शहरे. नागरी सुविधा. त्यांनाच प्राधान्य मिळते आणि त्यात चूक आहे शहरी लोकांना वाटत नाही. त्यातही मुंबई. दिल्ली ही महानगरे म्हणजे आर्थिक. राजकीय शक्तीची केंद्रस्थाने. सर्व निर्णय तेथें होतात समाजजीवनावर त्याचा वरचष्मा असतो. भारत म्हणजे जणू ही महानगरे अशीच बर्याच जणांची समजूत असते. त्यामुळे महानगरे विरुद्ध उर्वरित भारत असाही वाद उद्भवतो. "गल्लीत काय चालते " त्यांची फिकीर दिल्लीत केली जात नाही. असेच लोकांना वाटते सत्ता केंद्रे. ( दिल्ली ) आणि स्थानिक समाज ( गल्ली) असा दुजा भाव / असे मत दवत समाजात असतें. आपल्या देशाच्या मोठ्या पसारयामुळे आणि केंद्र सरकारच्या व्यापक. अधिकारामुळे दिल्ली ते गल्ली यांच्यात असं अंतर पडते आपणही अनेक वेळा फक्त राष्ट्रीय प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करत़ो राष्ट्रीय प्रशनाबाबत काळजी करतो. पण त्या तुलनेने स्थानिक पातळीवरील समस्यांची फारशी कोणी दखल घेत नाही. आपल्या गावांचे प्रश्न काय आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण काय सहभाग घ्यायला हवा वगैरे गोष्टी आपल्या गावी नसतात पण राष्ट्रीय प्रश्नांना आपण वर्तमानपत्रात जास्त जागा देतो निर्णय घेताना त्यांना प्राधान्य देतो इतकेच काय. कृती करायची वेळ. आपल्यावरही आपला कल विशिष्ट. मर्यादेत प्रशनापेक्षा मोठ्या. राष्ट्रीय प्रश्नांवर कृती करण्याकडे अधिक असतो. राष्ट्र वाचविण्यासाठी आपण मोर्चा काढतो एखाद्या सर्वसाधारण प्रश्नावर आपणं आंदोलन करतो याचे कारण 

              आशेवर जगण्याचा आपला प्रवास घरापासून सुरू होतों आई वडील भाऊ बहीण यांच्या आशेवर मुलें जगतात की माझे कोणीतरी सुखात दुःखात सहभागी होणारें आहे यामुळे. मोठे झाल्यावर उच्च शिक्षण मिळेल का ? शाळा कॉलेज कसे असेल. हक्काचे व मोफत शिक्षण मिळणार का ? बेमाफी फि वसूली थांबणार का ? यावर नंतर नोकरी मिळेल का ? ती कोणती असेल ? कशी किती पगाराची असेल ? नाहि मिळाली तर काय मोठा प्रश्न ? चोरी. लबाडी. खून मारामाऱ्या अपहरण सारखे गुन्हे करावे लागतील का ? मुलांना. पोलिस. सैनिक भरती. मोठमोठ्या कंपन्या यात. भरती मिळेल का ? एम सी स्पर्धा परीक्षा तारखेनुसार होणार का ? तंबाखू गुटखा खैणी पान मसाला दारु अशा विविध व्यसनापासून मी दूर राहीण का ? लग्न होणार का ?मिळणारी मुलगी मिळवणारे सोयरे. कसे असतील. ? लग्नात खर्च किती होईल ? पैसा कोठून येणार ? कोणते काम करावे लागणार ? मजूरांना मजूरी पाहिजे तसी मिळेल का ? ठेकेदार पगार व वागणूक देणार का ? शेतकरी यांच्या मालाला दलाल एजंट योग्य भाव देणार का ? बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यांना न्याय मिळणार का ? शासन प्रशासन सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेणार का ? महिला अत्याचार हुंडाबळी जाळपोळ. गोरगरीब जनतेला न्याय मिळणार का ? साथीच्या रोगांवर निदान उपचार निघणार का ? भ्रष्टाचारावर अंकुश येणार का ? शासकीय अधिकारी व कर्मचारी विविध पत्र व्यवहार यांना उत्तर देणार का ? पालकांच्या मनाप्रमाणे मुलांना नोकरी शिक्षण हक्क अधिकार स्वतंत्र मिळेल का ?

            अशा एक नाही अनेक प्रकारच्या आपल्याला मिळेल या आशेवर जीवन जगत आहोत आपण. आत्ता विचार करा 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे- अलतमश जरिवाला

अहमदनगर युवा फाऊंडेशनच्यावतीने स्थापना दिन साजरा




 नगर- आज अनेक शहरांची स्थापना कधी झाली, कोणी वसवले हे माहित नाही, परंतु अहमदनगर शहराची स्थापना कधी व कोणी केली याची इतिहासात नोंद असल्याने गेल्या 500 पेक्षा जास्त वर्षाच्या अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा होतो ही ऐतिहासिक बाब आहे. त्या काळी अहमदनगर शहराची गणना जगातील मोजक्याच शहराबरोबर करण्यात येत असत. इतके वैभवशाली असे अहमदनगर होते. काळाच्या ओघात अनेक स्थित्यांतरे पाहिलेल्या अहमदनगर शहरातील सर्व इतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुरातन विभागाशी संपर्क करून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच अहमदनगर शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर जाणारा रस्ता करण्यासाठीही पाठपुरावा करू, असे प्रतिपादन अहमदनगर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी केले.

  अहमदनगर शहराच्या 531 वा स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह याांच्या कबरीवर अहमदनगर युवा फाउंडेशनच्या वतीने चादर अर्पण करून दुआ करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जहागिरदार, अहमदनगर काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे शहर अध्यक्ष अज्जूभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई खान, अहमदनगर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अलतमश जरीवाला, अ‍ॅड.अशरफ शेख, टिपू सुलतान सेनेचे अध्यक्ष सय्यद शाहफैसल, आर्कि. फिरोज शेख, सीए अमित डोंगरे, जनार्धन मुत्याल, रोहित अंदे, इतिहास पुरातन विभागचे जगदीश माळी, सतीश भुसारी, रेहान व नबिहा फ़िरोज़ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना अलतमश जरीवाला म्हणाले की अहमदनगर शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. त्या काळी या शहराची इतकी भरराट झाली होती की व्यापार, कला, राजेशाहीची चर्चा संपुर्ण जगभर होत. एक आधुनिक व वैभवशाली शहर म्हणून ओळख होती. शहराचा इतिहास सुरुवातीपासूनच रोमांचकारी राहिलेला आहे. अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी अहमदनगर शहराचे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे. अशा शहराचा आपण अभिमान बाळगला पाहिजे व ऐतिहासिक ठेवा असलेल्या या वास्तूंचे जतन केले पाहिजे, असे आवाहन केले.

 यावेळी जगदीश माळी, राजूभाई जहागिरदार, अज्जूभाई शेख, सय्यद शाहफैसल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात अ‍ॅड.अशरफ शेख यांनी शहराची स्थापना व इतिहासातील महत्वांच्या घटना सांगितले. राजूभाई जहागिरदार यांनी आभार मानले.

-------

पारदर्शी पंचायत राज प्रशासन "



  "पारदर्शी पंचायत राज प्रशासन "

          आपल्या गावातील ग्रामपंचायत कामकाज सुरळीत व व्यवस्थित चालावे. चालणार्या कामांचा आढावा तपशील. ग्रामसभा बैठका यांना नागरिकांना बोलाविण्यात यावे. 

          जबाबदार. गतिमान. प्रतिसादशिल व लोकाभिमुख पंचायत राज व्यवस्थेसाठी. "ग्रामस्थांची सनद " अमलात यावी. पंचायत राज संस्थां मार्फत. ग्रामस्थांना पुरविण्यात येणा-या सेवांचा दर्जा उंचावून योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता आणणे. प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख करणे. यासाठी या विभागाच्या. दि. १०/मार्च २००६ चया शासन निर्णयानुसार. "पारदर्शी पंचायत राज प्रशासन " ही नागरिकांची सनद म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्याची सनद प्रसिद्ध करून झालेला कालावधी व सनदेत सुधारणा करण्याची आवश्यकता तसेच ग्रामस्थांना सुटसुटीत सनद देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. यासाठी. "पारदर्शक पंचायत राज प्रशासन ही नागरिकांची सुधारित करणे आवश्यक आहे

                    सध्याची सनद प्रसिद्ध करून झालेला कालावधी सनदेत सुधारणा करण्याची आवश्यकता व गठीत करण्यात आलेल्या समितीने नविन सनदेस दिलेली मान्यता या बाबी विचारात घेऊन वरिल संदर्भानुसार शासन निर्णय. १० मार्च २००६ अन्वये प्रसिद्ध करण्यात सध्याची. "पारदर्शी पंचायत राज प्रशासन "ही नागरिकांची सनद अधिक्रमित करून नविन ग्रामस्थांची सनद प्रसिद्ध करण्याचा शासन निर्णय घेतला आहे 

            राज्यातील सर्व ग्रामस्थांना पारदर्शक व गतिमान लोकाभिमुख व प्रतिसादशिल. प्रशासनादवारे. जबाबदारी सेवा पुरविणे ही पंचायत राज संस्थेची जबाबदारी आहे. जनतेला स्वताच्या हक्काची अधिकारांची कर्तव्य. जाणीव करून देणे. पंचायत राज संस्थेमार्फत पुरविण्यात येणा-या सेवेचा दर्जा राखण्यासाठी पंचायत राज संस्थेमार्फत काम करणाऱ्या सर्व अधिकार व कर्मचारी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे. त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सेवा पुरविण्याचा स्तर निश्चित करून ग्रामस्थांना सेवा पुरविण्यात विलंब झाला अथवा अधिकार/ व कर्मचारी यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तर ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागावी याबाबत निश्चित स्तर ठरविण्यात आलेला आहे. 

      पंचायत राज संस्थांमार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना त्या त्या योजनांबाबत. गाव. तालुका. व जिल्हास्तरावर जबाबदार असलेलें अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या संविधानिक जबाबदार्या याबाबतची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामस्थांच्या संनदेमधये. खालील परिशिष्ट समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे

          (१) परिशिष्ट

ग्रामविकास विभागाची ( मंत्रालय स्तर ) संरचना व उद्दिष्टे

      ग्रामपंचायत. पंचायत समिती. व जिल्हा परिषद. मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होणे आवश्यक आहे व आवश्यक सेवा तातडीने मिळते गरजेचे आहे. वरील सेवांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावरची संरचना ग्रामस्थांना माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून याबाबतचा सर्व तपशील परिशिष्ट (१) व प्र पत्र (१) मध्ये देण्यात आलेला आहे तसेच ग्रामविकास विभागाच्या संरचनेबाबत मा मंत्री ग्रामविकास ते ग्रामपंचायत. याबाबतचा धावता तक्ता सोबत देण्यात यावा

       (२) परिशिष्ट

पंचायत राज संस्थांची योजनांविषयक जबाबदारी

          पंचायत राज संस्थांच्या स्व उत्पन्नाचया योजना. राज्य सरकारने हस्तांतरित केलेल्या योजना अभिकरण तत्वावर राबविण्यात येणाऱ्या योजना. व केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या समावेश या परिशिष्टात करण्यात आला आहे. तसेच साधारणतः योजना अंमलबजावणी साठी ग्राम तालुका उपविभाग व जिल्हास्तरावर कोणाची जबाबदारी आहे हे निश्चित करण्यात आले आहे

       (३) परिशिष्ट

पंचायत राज संस्थांची संविधानिक जबाबदारी

पंचायत राज संस्थांमार्फत ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने व ग्रामपयतीची कामे. ग्रामसेवकांची कामे. सरपंचाची कर्तव्य. आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद यांची संविधानिक जबाबदारी याबाबतचा सविस्तर तपशील सदर परिशिष्ट मध्ये देण्यात आला आहे

       (४) परिशिष्ट

ग्रामिण विकास योजना प्रगती दर्शक फलक लावण्यात यावे पंचायत राज संस्था मधील महत्वाच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणारया योजनेची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकावर नमुद करण्यासाठी विहित केलेल्या नमुन्यांच्या या परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे

          ग्रामपंचायत राज हे गावच लहान सरकार आहे त्यानुसार चालणारा व्यवहार. चालणार कामकाज. ग्रामपंचायत मध्ये येणारा निधी. व योजना याचा होणारा विनियोग. रास्त चालावा यासाठी पारदर्शी पंचायत राज प्रशासन संस्था अंमलात येणे आणि आणणे गरजेचे आहे

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

महिला हक्क व अधिकार भाग १

 


महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ दि २४ एप्रिल १९९३ रोजी या आयोगाला समंती मिळाली. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग "चार " मध्ये दि २५ एप्रिल १९९३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राज्य पातळीवरील आयोगाची स्थापना करण्याची तरतूद करण्यासाठी अधिनियम भारताच्या संविधानाचे अनुछेद "१४""१५" व "१६" अन्वये महिलांच्या संबंधात हमी देण्यात आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि महिलांचा सामाजिक दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरीता राज्याच्या धोरणाची आणि विशेषत संविधानाच्या अनुछेद. "३८"३९"३९अ व"४२"मध्ये अंतर्भूत केलेलीं निदेशक तत्वे अमलात आणण्यासाठी. महिला अप्रतिष्ठा करणार्या प्रथांचया बाबतीत अन्वेषण करून योग्य त्या सुधारातमक उपाययोजना करण्यासाठी किंवा सुचविण्यासाठी महिलांवर परिणाम करणार्या कायद्याचे परिणामकारक रित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी व महिलांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे व उंचावणे या गोष्टी संबंधित असल्यातरी सर्व बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठी व त्यांच्यासाठी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी एका महिला आयोगाची स्थापना करण्याची गरज शासनाला तरतूद करणे इष्ट होतें यासाठी तात्काळ कायदा करणे आवश्यक वाटले. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यावेळी अधिवेशन चालू. नव्हते. उपरोक्त नियोजनासाठी कायदा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे ज्यामुळे आवश्यक व्हावे. अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबाबत त्यांची खात्री पटली होती. आणि म्हणून दि २५/जानेवारी १९९३ रोजी महाराष्ट्र महिला आयोग अध्यादेश प्रसिद्ध केला होता

उक्त आदेशांचे राज्य विधान मंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे भारतीय गणराजयाचया ४४ व्या वर्षी यानुसार पुढील अधिनियम करण्यात येत आहेत

(१) या अधिनियमास महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ असे म्हणण्यात यावे

*. तो संपूर्ण महाराष्ट्रात राज्यास लागू असेल

*. तो २५ जानेवारी १९९३रोजी अमलात आल्याचे मानण्यात येईल

(२) या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर 

*आयोग म्हणजे कलम ३ अन्वये स्थापना करण्यात आलेला महाराष्ट्र राज्य महिला आयोग

*." पोलिस महासंचालक " म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक

*. "सदस्य" म्हणजे आयोगाचा सदस्य आणि त्यात अध्यक्षांचा व सदस्य सचिवांचा समावेश आहे

* "राष्ट्रीय महिला आयोग " म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम १९९० यांच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेला राष्ट्रीय महिला आयोग

(३) अन्वये स्थापन करण्यात आलेला महिला आयोग

*. "विहित " म्हणजे या अधिनियमाखाली केलेल्या नियमादवारे विहित

*. "महिला " या संज्ञेमधये बालिकांचा किंवा किशोरवयीन मुलीचा समावेश आहे

   (३) (१) राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेनुसार "महाराष्ट्र राज्य महिला आयोग "या नावाने संबोधण्यात यावयाची एक संस्था स्थापन करील व ती संस्था या अधिनियमा अन्वये तिला प्रदान करण्यात आलेले अधिकाराचा वापर करील व नेमून देण्यात आलेली कर्तव्य पार पाडावी

(२) या आयोगामधये पुढील व्यक्तिचा समावेश असेल

* ‌"अध्यक्ष " हि महिलांच्या कल्याणासाठी जिने स्वताला वाहून घेतले आहे अशी मान्यवर महिला असेल

*. सहापेक्षा अधिक महिला नसतील असे शक्यतोवर महिला अशासकीय सदस्य. यांचें नामनिर्देशन राज्य शासन ज्यांनी महिलांसाठी कार्य केले आहे. किंवा ज्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान आहे. तसेच महिला विकासा संबधी बाबींचा प्रशासनाचा किंवा महिलांचे संरक्षण त्यांचा दर्जा उंचावणे किंवा त्यांच्या सर्वसाधारण हितसंबंध संवर्धन यासाठी कार्य करणारे श्रमिक संघटनांचे किंवा महिलांचे स्वयंसेवी संघटनांचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे अशा समर्थ प्रामाणिक व प्रतिष्ठित वयकतिमधून करेल

         परंतु प्रतयेक किमान एक सदस्य हा अनुक्रमे अनुसूचित जातीचा व अनुसूचित जमातीचा व्यक्ति मधील असेल

        परंतु आणखी असे की अध्यक्षांचे नामनिर्देशन करण्यापूर्वी राज्य शासन. महाराष्ट्र राज्यातील महिला संघटनांशी विचारविनिमय करिल

*. पोलिस महासंचालक हा आयोगाचा पदसिध्द सदस्य असेल

*. राज्य शासनाने नामनिर्देशन करावयाचा एक सदस्य सचिव ही राज्य नागरी सेवेत किंवा अखिल भारतीय सेवेत असलेली किंवा राज्याच्या अखत्यारीतील नागरि पद धारण करणारी व समुचित अनुभव असलेली सह सचिवांच्या किंवा त्याहून वरच्या दर्जाच्या महिला अधिकारी असेल

(४) (१) अध्यक्ष व प्रत्त्येक अशासकीय सदस्य तीन वर्षांचा कालावधी साठी पद धारण करील

*. अध्यक्ष किंवा अशासकीय सदस्य यांना न कोणत्याही वेळी राज्य शासनाला संबोधून अध्यक्ष पदांचा किंवा सदस्य पदांचा लेखी राजीनामा देता येतो 

(३) पोट कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी राज्य शासन अधक्ष पदावरील किंवा सदस्य पदावरील व्यक्तिला 

* ती व्यक्ती अमुकत दिवाळखोरी झाली असेल

*. राज्य शासनाच्या मते ज्यात नैतिक अधपाताचा संबंध असेल अशा अपराधासाठी त्या व्यक्तिला सिधदपराध ठरविण्यात आले असेल व कारावासाची शिक्षा देण्यात आली असेल

*. ती व्यक्ती मनोविकल झाली असेल व सक्षम न्यायालयाने तसे जाहीर केलेलें असेल. 

* ती व्यक्ती कार्य करण्यास नकार देत असेल किंवा कार्य करण्यास असमर्थ ठरली असेल

* ती व्यक्ती आयोगाकडून अनुपस्थितीची परवानगी न घेता आयोगाच्या लागोपाठ तीन बैठकांना अनुपस्थित राहिली असेल

* राज्य शासनाच्या मते त्या व्यक्तिला त्या पदावर ठेवणें सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हानिकारक ठरेल अशा प्रकारे तिने अध्यक्ष किंवा सदस्य याच्या पदांचा दुरुपयोग केला असेल किंवा असा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदांवर राहण्यास ती अन्य प्रकारे अपात्र किंवा अयोग्य ठरली असेल तर त्याला पदावरून दूर करता येत

        परंतु कोणत्याही व्यक्तिला त्या बाबतीत तिचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी तिला दिल्याशिवाय या पोट कलमान्वये पदावरून दूर करता येणार नाही

(४)पोट कलम (२) किंवा (३) अन्वये किंवा अन्य कोणत्याही प्रकारे रिक्त झालेली पदे राज्य शासनाकडून शक्य तितक्या लवकर. नवीन नामनिर्देशन द्वारे निवडण्यात आलेली व्यक्ती. ज्यांच्या पदांवर त्याचे नामनिर्देशन झाले आहे. त्या व्यक्तीचे ते पद रिक्त झाले नसते तर ज्या मुदती करीता ते धारण केले असते सदर व्यक्ती त्या मुदतीकरिता ते पद धारण करेल

    परंतु अध्यक्षा व्यतिरिक्त अन्य सदस्यांचे पद त्या सदस्यांचा पद अवधी ज्या दिनांकाला संपतो. त्या दिनांकापूरवी रिक्त झाल्यास ते रिक्त पद भरण्यात येणार नाही

(५) अध्यक्ष व सदस्य यांना कोणतेही मानधन देय असलेल्यास ते मानधन व देय भत्ते आणि त्यांच्या पद धारण करण्यासंदर्भात इतर अटी व शर्ती विहित करण्यात येतील

*. राज्य शासन. त्यांच्या मते आयोगाची या अधिनियमाखाली कामे कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व कर्तव्ये कर्मचारी यांची आयोगासाठी तरतूद करेल

*. आयोगाच्या प्रयोजनासाठी नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेली भत्ते वेतन आणि त्यांच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती विहित करील

(६) अध्यक्ष आणि सदस्य यांना देय असलेली भत्ते व वेतन मानधन कलम (५) मध्ये निर्देशित केले आहे. अधिकारी व कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांना देय असलेले वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन यांसह प्रशासकीय खर्चाबाबत कलम (१६) मध्ये निर्देशित केले आहे

(७) केवळ आयोगाचे कोणतेही पद रिक्त असल्यास. किंवा त्यांच्या रचनेत कोणताही दोष आल्यास अथवा अध्यक्ष व सदस्य म्हणून काम करणार्या व्यक्तिच्या नामनिर्देशनात कोणताही दोष आल्यास किंवा आयोगाच्या कार्यपद्धती मध्ये बैठक घेण्यासंदर्भात नोटीस काढणयामधील नियमबाह्य तेस संबंधित बाबींच्या तत्त्वावर परिणाम न करणारी कोणतीही नियमबाहयता असल्याच्या कारणावरून आयोगाच्या कोणत्याही कृतिस किंवा कारयवाहीस हरकत घेता येणार नाही. किंवा ती अवैध ठरणार नाही

(८) आयोगाला त्याची कर्तव्य कार्य प्रभावीरीत्या करण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी आणि अधिकारांचा प्रभावीरीत्या वापर करण्यासाठी तसेच आयोगाकडून वेळोवेळी हाती घेण्यात येतील अशा विशेष प्रश्नावर कार्यवाही करण्याकरिता आवश्यक वाटेल अशा समित्या नेमण्यात येतील  

* आयोगाला वाटेल त्याप्रमाणे एक किंवा अनेक व्यक्तींना पोट कलम (१) अन्वये नेमलेल्या कोणताही सदस्य समिती सदस्य म्हणून करण्याचा अधिकार असेल. आणि आयोगाचा सदस्य नसलेल्या अशा व्यक्ती किंवा व्यक्तिंना समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा आणि बेठकीचया कार्यवाही मध्ये भाग घेण्याचा अधिकार राहील. परंतु त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही

* अशाप्रकारे नियुक्ती झालेल्या व्यक्तीला बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आणि समितीच्या कामासाठी होणा-या खरचादाखल. विहित करण्यात येईल. त्याप्रमाणे मते मिळविण्याचा अधिकार असेल

*. आयोगाच्या कोणत्याही बैठकीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या कोणत्याही व्यक्तीला निमंत्रण देऊ शकेल. किंवा आयोग आवश्यक त्या अधिनियमाच्या कोणत्याही कर्तव्य पार पाडण्यासाठी जिचे सहाय्य किंवा सल्ला त्यास आवश्यक वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीला त्यास वाटेल अशा रितीने व अशा प्रयोजनासाठी सहभागी करु शकेल आणि अशा नियंत्रित केलेल्या किंवा सहभागी करून घेतलेल्या व्यक्तिला ज्या प्रयोजनासाठी त्या प्रतिनिधीला किंवा व्यक्तिंना निमंत्रित करण्यात आले असेल किंवा सहभागी करून घेण्यात आले असेल त्या प्रयोजनासाठी संबधित आयोगाच्या चर्चा मध्ये भाग घेण्याचा अधिकार राहील परंतु मत देण्याचा अधिकार असणार नाही 

(९) आयोग किंवा त्यांच्या समित्या आवश्यक असेल त्या त्या वेळी आणि अध्यक्ष यांना व्यवस्थित वाटेल अशा वेळी व अशा ठिकाणी बैठका घेईल

* आयोग आपली स्वतःची व आपल्या समितीची कार्यपद्धती विनियमित करील

* आयोगाचे सर्व आदेश आणि निर्णय सदस्य/सचिव किंवा सदस्य सचिवाने यासंबंधात रितसर प्राधिकृत केलेला आयोगाचा अन्य कोणताही अधिकारी अधिप्रमाणित करील

(१०) आयोग पुढील सर्व किंवा कोणतेही काम पार पाडील

* संविधान व अन्य कायदे यानुसार महिलांसाठी तरतूद करण्यात आलेल्या संरक्षक उपाययोजना संबंधीच्या सर्व बाबींचे अन्वेषण व तपासणी करणे

* त्या संरक्षक उपाययोजनांच्या अंमलबजावणी संबधी अहवाल दरसाल आणि आयोगास योग्य वाटेल अशा अन्य वेळी राज्य शासनास सादर करील

* महिलांची स्थिती सुधारण्यासाठी राज्याला त्या संरक्षक उपाययोजनांची परिणाम कारक अंमलबजावणी करता यावी यासाठी अशा अहवालात शिफारशी आहेत

* संविधान व इतर कायदे यांच्या महिलांना बाधक होणा-या विद्यमान तरतुदींचा वेळोवेळी आढावा घेणे आणि अशा कायद्यातील कोणत्याही उणिवा अपूर्णता किंवा दोष दूर करण्यासाठी त्या कायद्यामध्ये सुधारतमक वैधानिक उपाययोजना सुचविण्यासाठी सुधारणांची शिफारस करणे

* महिला संबंधित असलेल्या संविधानातील व अन्य कायदयामधील तरतुदी भंग झाला असेल अशा प्रकरणा मध्ये राज्य शासनाकडे किंवा समुचित प्राधिकरणाकडे दाद मागणे

* पुढील गोष्टींशी संबंधित बाबींचा तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आणि त्या बाबींचा सविधिकार दखल घेणे

* महिला अधिकारी हिरावून घेणे

* महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि समानतेचे व विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणे

* महिलांच्या हाल अपेष्टा कमी करणे आणि त्यांच्या कल्याणाची सुनिश्चिती करणे व त्यांना सहाय्य करणे या उद्देशाने घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वे किंवा दिलेल्या सूचना यांचें पालन न करणे 

     आणि अशा बाबीमधून उद्भवणारे प्रश्न व त्यामधील अडचणी राज्य शासनाकडे किंवा समुचित प्राधिकरणाकडे दाद मागणे

* भारताच्या संविधानातील महिला संबंधित असलेल्या तरतुदींचया किंवा महिलांचे संबंधित असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याचे भंगाचया संबंधात कोणत्याही न्यायिक मंचाकडे किंवा न्याय धिकरणाकडे कार्यवाही सुरू करण्यासाठी गरजू महिलांना मार्गदर्शन करणे. व सल्ला देणे

* महिलांच्या बाबतीत करण्यात येणारा भेदभाव आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार यामधून उद्भवणाऱ्या विशिष्ट समस्यांचा किंवा परिस्थितीचा विशेष अभ्यास किंवा चौकशी करण्याची मागणी करणे आणि असा भेदभाव व अत्याचार होऊ नयेत याबाबतच्या कार्यतंत्राची शिफारस करण्यासाठी काही निर्बंध निश्चित करणे

* महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची निश्चिती करण्यासाठी उततेजनातमक आणि शैक्षणिक संशोधन सुरू करणे व जागेची सोय व मूलभूत सुविधा न मिळणे निर्वाह विषयक अपुरया व्यवस्था यासारख्या त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्यास जबाबदार असलेल्या गोष्टी आणि त्यांचे काबाडकष्ट यासारख्या व व्यवसायातील आरोग्य विषयक तंत्रे शोधून काढणे

        उर्वरित महिला आयोग माहिती उद्याच्या मॅसेज मध्ये

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

घाऊक व किरकोळ दुकानदार यांना चाफ बसेल का ?



             धक्का आणि धसका भारतीयांच्या तोंडाचे पाणी पळवणारा ठरला यात काही शंका नाही काल परवा पर्यंत ही व्याधी शरिर निकामी करत होती पण आज या व्याधीने लोकांच्या मनावर कब्जा घ्यायला सुरुवात केली आहे. कोरोना लागण झाली नसेल तरी नजिकच्या काळात अशी लागण आपणांस झाल्यास किंवा आपल्या परिवारातील कोणास झाल्यास तर काय आणि कसे होणार ही धास्ती आज प्रत्येकाच्या मनात घर करुन बसली आहे. ही व्याधी आपला पैसा घालवेल सोबत रोजगार संपर्क शारीरिक क्षमता. सगेसोयरे. यांची ताटातूट करेल अशी भयावह भीती प्रत्येकाला वाटत आहे 

            कोरोना दहशती मुळे घरात बसून मानसिक ताण तणावाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यातच कोरोना काळात लागू करण्यात आलेली संचारबंदी यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले लहान लहान उद्योग बंद पडले. बांधकाम कामगार रस्त्यावर आले घरकाम करणाऱ्या महिलां. भाजीपाला विक्री करणारे.लालपरी चालक वाहक. एकंदरीत या सर्वांचे जगणं मुश्किल झाले काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली यांतच लोकांना काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही उपासमारीची वेळ आली पण जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली काही जणांना परवानगी देण्यात आली मग काय त्यांनी लुटायला चालू केले जादा दराने अन्न धान्य विक्री. करण्यास सुरुवात झाली. जनता जगो अथवा मरो फक्त आणि फक्त पैसा देव झाला. गेल्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली होती 

          जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (पुरवठा विभाग ) सांगली विजयनगर क्र पुरवठा विभाग ५/ केरोसीन /आर / आर ८/४/२०२०. रोजी. विविध सेवाभावी संस्था युनियन यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार करून सदर बाब शासनाच्या ध्यानात आणून दिली होती शासन आपत्ती व्यवस्थापन कायदा. २००५ व जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत घाऊक व किरकोळ विक्री करणारे दुकानदार यांनी जादा दराने अन्न धान्य विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी जीवनावश्यक वस्तू दर पत्रक जारी करण्यात आले होते 

त्याप्रमाणे शासनाने किंवा पुरवठा विभाग सांगली यांनी ठरवून दिलेल्या दराने सदर अन्न धान्य विक्री करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली होती. 

(१) गहू. २६/३२ रूपये किलो

(२) तांदूळ साधा २८/३४ रूपये

(३) ज्वारी. २२/३५ रु किलो

(४) साखर. ३४/३७ रु किलो

(५) बाजरी. २५/२८ रु किलो

(६) शेंगदाणे. १००/११०रु किलो

(७) मैदा. ३०/३२ रु किलो

(८) पोहे. ४०/४५ रु किलो

(९) तुरडाळ. ९०/१०० रु किलो

(१०) उडिद डाळ. १००/१२० रु किलो 

(११) हरबरा डाळ. ६५/७० रु किलो

(१२) मुगडाळ. १२०/१३० रु किलो

(१३) शेंगतेल. १४० रु किलो

(१४) करड ई तेल. १३०/१४० रु किलो

(१५) सुर्यफुल तेल १००/११० रु किलो

(१६) सरकी तेल. ९५/१०५ रु किलो 

       वरील प्रमाणे सर्व दर गेल्या वर्षी सर्वसामान्य जनता गोरगरीब माणूस यांच्या हितासाठी जारी करण्यात आले होते आज सुध्दा अशीच परिस्थिती आ वासून उभी राहिली आहे सध्या टाळेबंदी जारी करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हातावरचे पोट असणारे कामगार यांना काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही आणि जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली किराणा दुकानदार व घाऊक व्यापारी यांनी जादा दराने अन्न धान्य विक्री करून जनतेला लुटायच चालू केल आहे 

           गेल्या वर्षी जर अन्न धान्य विक्री दरपत्रक जारी करण्यात आले असले तर मग आत्ता सुध्दा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली पुरवठा विभाग यांचेकडून असेच दरपत्रक जारी करण्यात यावे आणि जनतेला लुटणारया चोरांना चांगला चाफ बसावा. आपण खरेदी करणारी वस्तू रास्त आहे का त्याच भाव रास्त आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. शटर झाकलेले असते त्यामुळे आपणांस देण्यात आलेला माल रास्त वजन केले आहे का हे सुद्धा पहा. जरा विचार करा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५८

फोटो Photo

 


       हा शब्द बरेच काही सांगून जातो आपण आणि आपला अहमभाव. क्रोध. प्रेम माया. गरिबी. परस्थिती संबोधन. प्रबोधन. संस्कृती निसर्ग. नद्या तलाव धरणे बंधारे. डोंगर सुंदरता याच आकलन करून देणारे चित्र म्हणजे फोटो होय. आपला चेहरा जसा असेल तसा तुम्हाला आरसा दाखवत असतो. मग आपण आरशावर राग काढून काय उपयोग. आपल्यात बदल झाला पाहिजे. जरा पाठीमागे जाऊन बघितले तर आपल्या ध्यानात असे येईल पहिले. तंत्रज्ञान सुधारले नव्हते. त्यावेळी सुध्दा फोटो काढले जात होते. त्याला रेखाटन हुबेहूब प्रतिकृती तयार करणारे फोटो काढणारे अनेक मौल्यवान कलाकार आपल्यात होतें 

    आपल्या लहान मुलं जन्माला आले की हौस म्हणून आपणं त्याचा पहिला फोटो काढतो. त्यानंतर रांगताना. चालताना. फोटो काढले जातातच त्यात आपली हौस दडलेली असते. नंतर मुलांचे शिक्षण चालू होते शाळा कॉलेज पुढील शिक्षण सरकारी शिक्षण राजकीय शिक्षण सामाजिक शिक्षण आर्थिक शिक्षण वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान शिक्षण. अशी विविध शिक्षण घेत असताना वेळोवेळी फोटोंची गरज लागते वेगवेगळ्या पोझ मधील असतात यातच आपण महत्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे नंतर लग्नातील फोटो. पर्यटन स्थळे पहायला जाताना फोटो. राजकीय वाटचाल आणि फोटो. ग्रामपंचायत. पंचायत समिती जिल्हा परिषद. विधानसभा राज्यसभा. मंत्री आमदार खासदार व अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सुध्दा फोटोंवर कल असतो. अपंगांना निधी वाटप करताना पांढरी कपडे घालून गावचे पुढारी फोटोत येण्यासाठी धडपड चाललेली असते. निधी शासनाचा पण माझ्यामुळे मिळाला हा अहमभाव त्यात दडलेला असतो. नामांकित नेत्यांच्या डिजिटल मध्ये फोटो आला की मग काय साहेबाबरोबर आपले समंद चांगले आहेत काय काम असेल तर सांगा आणि बेडूक फुगलयागत फुगायला सुरवात होते. पण आपल्या परिसरातील रस्ता गटर कचरयाचे ढीग जागोजागी साचलेले घाण पाणी आपल्या परिसरातील वाढती गुन्हेगारी याचे आपण कधी फोटो काढतो का नाही कारणं आपल्याला त्या परिसरातील नगरसेवक यांची भीती असते वाढदिवस. मग काय शुभेचछूक यांचीही डिजिटल वर लाईन लागते. दादा. भाई. मेहरबान. बापू. भावी आमदार. गरिबांचा वाली अशी एक नाही पन्नास नाव असणारे कार्यकर्ते तुम्हाला आम्हाला फोटो मुळे कळतात. गावातील एखादे मंदिर बांधकाम. रस्ता गटर बांधकाम. सार्वजनिक भवन. सार्वजनिक संडास याचा नारळ सुध्दा नामांकित व्यक्ती यांच्याकडून फोडला जातो पण या कार्यक्रमाचा फोटो मात्र कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत घेतला जातो आम्ही आहे म्हणून गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशांचा विकास आहे आम्हाला जनतेची किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी व माझे काम पक्षाला कळाले तरच पुढील पंचवार्षिक मध्ये मला संधी मिळेल म्हणून फोटो गरजेचा आहे. महापूर. अवेळी अवकाळी पाऊस. भुकंप. महामारी रोगाची. ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. अशा वेळी प्रसंग बघण्यासारखा असतो. पूरात सापडलेल्या लोकांना आमचें जवान जीवावर खेळून वाचवतात आणि फोटो काढताना पाचसे जण गोळा होतात बघा आम्ही पूरात जीवांची पर्वा न करता लोकांना वाचविले. हे पुढचे नियोजन त्यासाठी फोटो. रोग महामारी काळात अन्न धान्य वाटप करताना फोटो हा गरजेचा भाग आहे. आपल्याला मदत करायची नसते फोटो काढून त्या गरिबांची परस्थिती सर्वांच्या समोर आणायची असते. म्हणजे जेवन वाटप करताना. जेवणाचे पॅकेज देताना. कपडे वाटप. वह्या पुस्तके वाटप. एखाद्याच्या घरातील कर्ता पुरुष मयत झाला असेल तर त्याचा मयताचा धनादेश देताना. गौरव. सन्मान. पारितोषिक वितरण. एवढेंच काय पण मयताच्या घराला भेट दिली म्हणून. फोटो. निवेदन देताना. पोलिस स्टेशनला निवेदन देताना मंत्री खासदार आमदार यांची भेट घेताना फोटो घेतलें जातात कारणं आपले शासकीय व राजकीय शेत्रातील वजन दाखवणे. साहेब आपल ऐकतात यांचा आव आणण्यासाठी अधिकार व कर्मचारी यांचे सोबत फोटो काढले जातात आशा वर्कर्स. डॉ नर्स यांचा सत्कार घेणें त्यांना वस्तू भेट देणे रुग्णांना फळे औषध वस्तू वाटप करताना फोटो काढणे आम्ही समाजासाठी काम काय केलं आणि काय करतो याच प्रदर्शन करण्यासाठी फोटो काढायचे आणि जनमाहिती साठी जारी करायचे. म्हणजे काम केलं की जनतेला पक्षाला कळल पाहिजे एवढ्याच उद्देशाने हे सर्व केल जात एखाद्याला दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र जरी मिळाले तरी फोटो महत्वाचा असतो. तरी आपणाकडे मयताला गेल्यावर खांदा देताना फोटो काढण्याची पद्धत नाही नाहितर या समाजाच्या ठेकेदारांनी फोटो काढले असते आणि आम्ही अजून काय समाजासाठी करु म्हणून हे फोटो कशात वापरले असते कुणास ठाऊक. पिडित व्यक्तिच्या सोबत बसून विचारपूस करताना फोटो. आंदोलन उपोषण ठिकाणी भेट देताना फोटो. रस्त्यावर टाॅरफिक बाजूला करून रस्ता करून दिला म्हणून पाच मिनिटांत सर्वत्र फोटो. आंदोलनकर्ते यांच्याबरोबर चालत असताना सुध्दा फोटो काढा. 

      महामारी काळात अमुक समाज हे काम करून समाजांचे तारणहार म्हणून काम करतं आहे यांचे वेगवेगळे फोटो. आम्ही हे केल आम्ही ते केलं. करायच ईतभर दाखवायचं हातभर असे काम फोटो मुळेच होते. आरोपी. गुंड. बलात्कार. चोरी. अपहरण खून. मारामाऱ्या. खंडणी. कोण पळून गेले अशा पण रस्त्यावर भीक मागणारी मुल फाटकी तुटकी कपडे घालून फिरणारे गरिब लोक. रेशन दुकानातील अन्न धान्य घेण्यासाठी लागलेली रांग याच फोटो आपण कधी काढत नाही कारण आपणांस याची लाज वाटते. बातमीचं फोटो पहिल्या पानावर. म्हणजे फोटो अशा शेत्रातील लोकांच्या साठी किती फायद्याचे आहेत बघा. मोठमोठ्या घरात शोपीस म्हणून लावलें जाणारे फोटो त्यात. लहान मुलांला स्तनपान करणारी महिला. उगवता सूर्य. धावणारे घोडे. पक्षांचे थवे. जनावरांचे कळप. वाघ सिंह. बाजार विविध शासकीय इमारती. गावातील. तालुक्यातील. जिल्ह्यातील. राज्यातील. देशातील. विविध नेते. थोर पुरुष यांचे फोटो व पुतळे विविध समाजाची मंदिरे. प्रार्थना स्थळे. देवदेवतांचे विविध अवतारातील फोटो नामांकित मृत व्यक्तिचे फोटो. याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कसा असतो त्याच्या फोटोकडे बघून आपण नमस्कार करतो ही फोटोंची ताकद आहे. 

विविध जाहिरात करण्यास फोटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात आपले सौंदर्य जगाला दाखवण्यासाठीच फोटो काढले जातात. साबण तेल शॅम्पू व विविध उत्पादने यांचीही जाहिरात प्रबळ होते ती म्हणजे फोटो मुळेच 

          वरील प्रमाणे सर्व विषय आपली आपलीं ताकद दाखवने आपण दिलदार आहोत समाजांचे आहोत. आपले जीवन समाजासाठी आहे. आपल्या मनातील भावना. चेहर्यावरील भावना. पैशांचा कैप. घमेंड. आकड. हे सर्व एका फोटो मुळे आपल्याला कळते म्हणून फोटो महत्वाचा आहे आनंदात. दुःखात. जल्लोष. यांत महत्वाची भूमिका बजावली जाते ती फोटो मुळे आपण काहीतरी समाजासाठी करतो त्याचा ढोल वाजवून सांगण्याचे माध्यम फोटो होय. गरिबांचा फोटो फक्त रेशनकार्ड आणि मतदान ओळखपत्र यांवरच असतो आणि शेवटचा मृत्यू दाखल्यावर.  

          थोर साधू संतांनी सांगितले आहे परोपकार करा पण त्याचे भांडवल करु नका. मुस्लिम धर्माचे धर्म गुरू मोहम्मद पैगंबर यांनी कुराण मध्ये सांगितले आहे एका हाताने केलेलें दान दुसर्या हाताला कळता कामा नये. यामुळे सार्वजनिक ठिकाणी चालणारे महाभोज आयोजन रांत्र दिवस चालू असते कुणी दिल कुठण आल माहीत नाही कसलाही फोटो नाही कसलही त्या परोपकाराचे भांडवल नाही याला खरा धर्म म्हणलं पाहिजे

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५८

मी स्मशानभूमी बोलते



मी स्मशानभूमी बोलते

             छोट्या छोट्या वाड्या वस्त्या लोकसंख्या कमी माझी जागा गावाच्या बाहेर वडयाचया कडेला. माझ्याकडे बघून लोक नाक डोळे मुरडतात कारणं मी वाईट आहे माझ्याजवळ भूत राहतात मला कोणतेही संरक्षण नाही. सर्वांच्या मृत्यू नंतर त्यांचा अंतिम विधी करण्यासाठीच माझी निवड झाली यात माझा काय दोष. उन वारा पाऊस यात मी उघडीच असते. लोकांना माझी आणि माझ्या स्वच्छतेची आठवण होते ती म्हणजे कोणीतरी मेल्यावर मग काय एकास एक बोलतो यंदा स्मशानभूमीची सुधारणा करायची. स्वच्छता पाणी शेड कंपाऊंड करायचं हे तेवढ्या पुरतेच बोलन असते. आपल्या नातेवाईक मित्र यांचा. विधी आवरून झाला की पुन्हा कोणी माझ्याकडे येत नाही. कारणं येण्याची गरज नाही. 

                लोकसंख्या वाढली हळूहळू घरे वाढली. वाड्या वस्त्या गावांत बदलल्या आणि गावात झाडा खालच्या पंचाचे रुपांतर ग्रामपंचायत मध्ये झाले सरपंच उपसरपंच सदस्य अशा विविध निवडी झाल्या. विरोधक सत्ताधारी असे गट तयार झाले. आणि माझी थोडी गरिबी लाचारी कमी झाली. मसनवाटा याचे रुपांतर स्मशाभूमीत झाले. कंपाऊंड वॉल. शेड. माझी सुरक्षा. स्वच्छता. अशी विविध माझ्यासाठी खूप कामे होण्यास सुरुवात झाली. मग. सुधारणा झाली आणि माझे नामकरण करण्यात आले. वैकुठधाम. त्रिकुट. मुकतिधाम. अशी एक नाही अनेक नावे कोणाला काय सुचेल तो नाव ठेवायला लागला. कंपाऊंड वॉल वर. विविध अभंग. श्लोक. देवी देवतांची चित्रे विविध पण सुगंधी नसणारी जंगली झाडें. फुलांची झाडे लावण्यास सुरुवात झाली. आणि काय माझे रुपच बदललं. ही सर्व कामे ग्रामपंचायत विकास निधी यातून होत होती त्यात सुध्दा कामांचे टेंडर जादा पैशांचे काम मात्र कमी पैशांत निकृष्ट दर्जाचे स्मशानभूमीच्या कामात सुध्दा लाखो रुपये नेते पुढारी यांचें बगलबच्चे मिळवायला लागले. कारणं स्मशानभूमीचे काम आहे कोण बघायला नाही कोण देखरेख करायला नाही कामांचा दर्जा नाही मी मात्र केविलवाणी हे सगळं नुसतं पाहत होते. माझं काय चालतं नव्हतं. माझी सुधारणा झाली आणि. मग काय. माझ्याजवळ राहायला. रोज एक नवीन सदस्य यायला लागला. संध्याकाळी. दारु पिण्यासाठी. माझ्या जागेसारखी सुरक्षित जागा नाही मग काय दारुडी प्यायला सुध्दा माझ्याजवळ आणि जादा झाल्यावर झोपायला सुध्दा तिथेच. ही तर माणसं होती. कुत्री. रांत्र दिवस माझ्याजवळ झोपायला असायची. काही काही महाभाग बायका सुध्दा चैनी करण्यासाठी माझ्या जागेत येत होते. मग. मी. स्वच्छ असणारी. दारुच्या बाटल्या. तंबाखू पुड्या कागद. अंत्यविधी साठी लागणारे साहित्य त्यासाठी वापरले जाणारे कागद पिशवी. तिरडीचया काठ्या. अशा सर्व कचरा व कचरयाचे ढीग लागायला सुरुवात झाली आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य तयार झाले. किती मनाला माझ्या वाईट वाटलं अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले माझ्यासाठी रखवालदार नेमण्यात आला पण तो सुध्दा वरील सर्व धंदे करणार्या माणसांना मदत करायचा. त्यामुळे त्याचा सुध्दा फायदा हुयाचा. मग तो कशाला काय करेल

          "आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा " हा शब्द जरी कोणी ऐकला तर अंगावर काटा येतो. पण मी. २००० सालापासून हा आवाज ऐकत आली आहे. मला कधी वाईट वाटलं नाही. आणि वाटलं तरी कोणाला सांगायचं. माझ्या भागयातच आहे म्हणून मी हे सगळं सहन करत आले. लहान मुल. तरुण मुल. निमवयसक व्यक्ति. म्हातारी माणसं. अशी सर्व माझ्यातच येवून राहायची मृत्यू नंतर. आजारी व्यक्ती. खून झालेले. जळीत झालेले. आत्महत्या करणारे. अपघातग्रस्त व्यक्ति. मरणाने म्हणजे म्हातारे होवून मरणारे. साधू संत. माळकरी. महिला. अनेक कारणानें मरणारे. हे सर्व माझ्याजवळ आले मी कोणालाच शेवटच्या विधीला नकार दिला नाही. सर्वांना जाळले. त्यांचे सर्व अंत्यविधी झाले. माझ्या जीवावर. अनेक लोकांची घरे चालायला लागली. पहिले रखवालदार. जाळण्यासाठी लाकूड पुरविणारा वखारवाला. बांबू तिरडीचे सामान्. विकणारे. कापड. फळे फुले. अंत्यविधी करणारे ब्राम्हण हे सुद्धा तोंडाला येईल तेवढी दक्षणा मागायला लागलें. सर्व अनागोंदी कारभार चालला होता. मी आपली स्तब्धद होऊन सगळ बघत होते. मरणारा कोणाचा मुलगा. बहिण. भाऊ. वडील. आई. मामा. मावशी. मित्र. सरपंच उपसरपंच नेता. पुढारी. नामांकित व्यक्ती. बेवारस रस्त्यावर मयत होणारे. अशी विविध नातीगोती मी बघितल्यात. कोणी खरोखरच दुःख झाले माझा कोणी तरी मेला म्हणून खरच रडणारे मी बघितले. काही जण बर झाल वाईट चालीचा होता मेला बर झाल. बरेच वर्ष अंथरुणावर पडलेला एकदा मेला तर लोक म्हणायचे बर झाल जीव मोकळा झाला. बायका हांबरडा फोडून हातातील बांगड्या फोडून हाणून बडवून घेताना मी पाहिले आहे वाईट मला सुद्धा वाटत मी काही करू शकत नाही. 

              २००० वर्षांपूर्वी प्लेग पटकी सारखी महामारी साथ आली होती अगदी भयावह परिस्थिती निर्माण झाली. लोक मरणाचे प्रमाण गावच्या गावं मरत होती एकाला जाळलं की दुसरा मेलेला असायचा. मला उसंत सुध्दा घ्यायला वेळ नव्हती. मी कधी मला कंटाळा आला मी आत्ता हे करू शकत नाही असं म्हणलं नाही. अशा विविध साथीचे आजार रोग मी बघितले आहेत नाव जरी काढले तरी माझ्या अंगावर काटा येतो. आज सुध्दा या दोन वर्षांत अशीच वेळ बघायला मिळाली. माणसांत माणूस नाही कोण कुणी मेल तरी त्याला अंतिम निरोप देण्यासाठी बंधन घातले आहे पण लोक मरण्याचे प्रमाण आज सुध्दा मला विचार करायला लावते मला. पण आज माझा धंदा मांडला आहे या ग्रामपंचायत. नगरपरिषद महानगरपालिका. मोठी मोठी शहरें. यातील दलालांनी मृतांचा सुध्दा बाजार धंदा मांडला आहे. गेल्या काळात कोणतेही पैसै न घेता लोकांना जाळणारे आज फक्त पैशासाठी लोकांना जाळत आहेत त्यासाठी येणारा खर्च सुद्धा काही हजारांत आहे. ज्याला जगणं अवघड आहे तो एवढे पैसे माझ्याकडे नाहीत माझ्या माणसांचा अंत्यविधी करा लय उपकार होतील म्हणून पाया पडणारे सुध्दा मी पाहिले आहेत. 

            " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. " याच महत्व कळल आणि शासनाने वृक्ष तोडीवर बंधनं आणली. कारणं कारखाने विविध कंपन्या केमिकल कंपनी. व मला एका माणसाला ४०० किलो जळण लागतं होते. शासनाने वृक्ष तोडीवर कमालीची बंधने आणली. आणि मग. प्रत्त्येक गावात एक स्मशानभूमी आहेच तेथे जळण कमी पडण्यास सुरुवात झाली. जळण व त्यांचे दर आभाळाला टेकले. मग. गॅस वरची स्मशानभूमी अमलात आली मग मात्र मला थोडा आराम मिळाला. माझा त्रास कमी झाला. गॅस वर दहन दिल्यास राख ओंजळीत बसल एवढीच. पण अजून सुद्धा समाजात काही लोक आहेत की ते दहन लाकडावरच देतात त्याशिवाय आत्मा आभाळात जातं नाही अशी समजूत आहे. मला नाही वाटत मेल्यावर स्वर्ग काय आणि नर्क काय त्याला दफन केला काय आणि दहन दिला काय त्याला काय कळणार. 

           "तुझं मड बसविल गावाच्या बाहेर " असं म्हणन त्यावेळी चालतं होतं कारणं त्यावेळी माझी जागा गावाच्या बाहेर होती पण आज माझ्याभोवती गाव वसलेले आहे माझी कंपाऊंड वॉल सुध्दा स्वताच्या घरासाठी वापरणारे मी बघितले आहेत. आत्ता मला भीती वाटत नाही कारण गावच माझ्या भोवती आहे. माणस बोलताना मी ऐकते. माणसं फिरायला माझ्यापर्यंत येतात आज काळ वेळ बदलली असलीं तरी माझी परस्थिती बदलली नाही. माझ सुध्दा राजकारण केलं जातंय. आत्ता मला काही जादा सांगायचे नाही. चांगलें काम कार्य करा प्रेमाणे वागा. चोरी करु नका. महिला छेडछाड करु नका. कोणाची निंदानालस्ती करु नका. कोणाची संपत्ती लबाडी करुन लाटू नका. आपले कुटुंब आपले मित्र सगेसोयरे यांची साथ सोडू नका. गो हत्या. बालहत्या. करु नका. अपहरण. खंडणी गुन्हेगारी. व्यसनापासून दूर रहा. सामाजिक. आर्थिक. राजकीय. शैक्षणिक. वैद्यकीय. या क्षेत्रात. आपली ताकद बुध्दी यानुसार प्रवेश करा.वाहन सावकाश चालवा. सावकारी करु नका. विश्वास घात करु नका. 

        मी स्मशानभूमी बोलते बास मला आत्ता तुम्हाला जादा काही सांगायच नाही कारण तुम्ही हुशार आहात कस वागाव हे तुम्हाला कळत नमस्कार

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बांधकाम कामगार यांना आत्ता टाळेबंदी काळात आपलं व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणे जड जात आहे आपला सयंम ढळू देऊ नका वेळ बदलेल पुन्हा चांगलें दिवस येणार आणि येतील

"मिले सुर मेरा तुम्हारा " "तो सूर बने हमारा "



             आपण लोकशाही राज्यात असलो तरी. कळत नकळत काही भयानक प्रश्न आपला पिच्छा सोडत नाहीत यातून सर्वसामान्य जनता गोरगरीब माणूस. हेच काम पण विविध देश राज्य सुध्दा सुटलं नाही पंजाब आसाम. काश्मीर ह्या प्रशनाबरोबर ईशान्य कडील नागालॅनड मिझोराम मणिपूर. व त्रिपुरा. ह्या राज्यात सुध्दा फुटिरतेचे प्रश्न निर्माण होताना आपण पाहतो. नागालँड मधील फुटिराचे सोशॅलिसट. कौन्सिल ऑफ नागालँड. मणिपूर पीपल्स लिबरेशन आर्मी. त्रिपुरा टारयबलस. वहाॅलंटियरस. इत्यादी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत त्यासाठी त्यांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबला आहे. ह्यामुळे ईशान्य कडील राज्यातही राजकीय अस्थिरता आली असून त्याचे आवाहन आपल्या एकात्मतेपुढे ठाकले आहे. ईशान्य सेव्हन सिस्टर युनायटेड लिबरेशन आर्मी ही चळवळ ह्या भागांचे स्वातंत्र्य राष्ट्र बनवू पाहत आहे. ह्या सर्व प्रशनामागे आर्थिक विषमता व विकासाचे प्रश्न निगडित आहेत. स्वातंत्र्यानंतर हे प्रदेश विकासापासून वंचित राहीले. त्यांच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. त्यांची सोडवणूक करण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरलेले नाही. विकासाचे केंद्रीकरण एका बाजूला व विषमतेचे केंद्रीकरण एकाच बाजूला सातत्याने घडविलयाने हे सर्व प्रश्न उभे ठाकले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न हा काही पक्षीय राजकारणाचा विषय नाही. तरी तो पक्षीय करण्याचे प्रयत्न होताना दिसतात. राजकीय पक्षांना अशा गहन प्रश्न विचार निःपक्षपाती राष्ट्र हित लक्षात घेऊन सखोल पध्दतीने करण्याची गरज वाटत नाही. त्यांची सर्व शक्ती निवडणुका वर केंद्रित झालीं आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे. तामिळनाडू हा श्रीलंकेतील अतिरेक्यांचा मोठा अड्डा बनला आहे. आणि बहुतेक राजकीय पक्ष तामीळ टायगर्सविरुधद कठोर भूमिका घेण्यास कचरत नाहीत. बिहार. झारखंडमध्ये. प्रदेशाला स्वायत्तता नेमकी कशी व किती ह्यावरून राजकीय पक्षांत मतभेद आहेत.  

          राष्ट्रीय एकात्मतेसंदरभात गुंतागुंत सोडविण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाययोजना झाल्या. राष्ट्रीय एकात्मता मंडळांची स्थापना तर १९६० पासूनच झालेली आहे. पंजाब आसाम संबंधी करार होऊनही गुंतागुंत सुटली नाही. तर ती कायमच राहिली. पूर्ण सोडवणूक म्हणून सुचविलेले तोडगे अर्धवट उपाय आहेत. ते सिध्द झाले आपल्या राजकीय प्रक्रियेत प्रत्त्येक प्रदर्शनाचे. "राजकारण "करण्याची प्रथा असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रश्न त्याला अपवाद राहीलेले नाहीत. एकात्मतेच्या प्रशनातून एका राजकीय पक्षांचे "झारखंडचे स्वायत्त प्रादेशिक मंडळ असावे. " असे म्हणताच दुसरा म्हणतो " वनाचल " चे स्वतंत्र राज्य असावे. असे म्हणत नारा लावावा. एकात्मतेच्या प्रशनातून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान मिळत आहे. ह्याचे कसलही गांभिर्य राजकीय पक्षाजवळ नाही. केंद्र सरकार आत्ता अविकसित भागात विकासाची विविध कामे योजना जाहीर करतं आहे. परंतु त्यात फारशी कळकळ आपुलकी व पुढाकार फारसा दिसत नाही. आसाममध्ये दुसरा तेल शुद्धीकरण कारखाना अजून उभारण्यास सुरुवात झाली नाही. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी समयबधद योग्य व मूलभूत हाती घेणे गरजेचे आहे. त्याला महत्व न देता अशा एक नाही अनेक प्रश्नांना प्रचारी स्वरुप प्राप्त झाले आहे. "अपना उत्सव"राष्ट्रीय एकात्मता दौड ""प्रतिकात्मक दांडी यात्रा " असे उत्सवी थाटाचे आपला पक्ष आपला प्रभाव वाढविणे असे विविध उपक्रम राबविले गेल्याने एकात्मता प्रशनाचे गांभिर्य कमी झाले 

      राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन विचारांत घेता पुढील काही उपाययोजना करणे गरजेचे आहे

(१) धर्म व राजकारण ह्याची फारकत धर्म व राजकारण ह्याची कायद्याने फारकत करणे आवश्यक आहे. कारणं आज धार्मिक मुद्द्यावर सर्वात मोठें राजकारण केले जात आहे. कायदा हा मोठ मोठे नामांकित व्यक्ती साठीच असतात कारण त्याला मोडणे आणि अमलात आणणे हे त्यांनाच जमते त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल असे नाही ज्या दिवशी जात धर्म ही संज्ञा संपेल त्या दिवशी राजकारण संपेल. त्यासाठी अनौपचारिक पातळीवर करावे लागणारे कार्यही होणे आवश्यक आहे 

(२) रोजगार निर्मिती आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या देशात असणारा बेरोजगाराचा महापूर कारण भरती नाही उधोग व्यवसाय नाही उधोग व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही. पण सरकार ह्या सर्वांना नोकरी व्यवसाय संधी देऊ शकत नाहीत. त्यासाठी विविध उपाययोजना करून सवयंम रोजगाराच्या वाढत्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे

(३)! स्थलांतर रोखणे हा तर भयानक प्रकार आहे. कारण ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना नोकरी व व्यवसाय यासाठी ग्रामीण भागात विविध योजना राबविण्यात याव्यात. त्यामुळे शहराकडे येणारा लोकांचा लोंढा थांबवता येईल. त्यामुळे शहरात राहण्याचा. पाण्याचा. अन्न धान्य याची गरज. वाढती लोकसंख्या महागाई. झोपडपट्टी. वाढती गुन्हेगारी. यासाठी ग्रामीण विकासावर भर देऊन शहराकडे होणारी अफाट गर्दी कमी करणे. त्यासाठीच योजना आखणे गरजेचे आहे

(४) विकास महामंडळ स्थापना आज आपणं बघतो विविध समाजाच्या लोकांसाठी विविध विकास महामंडळ स्थापन करण्यात आली आहेत. आणणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास महामंडळ. डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ. अशी विविध महामंडळ आहेत पण त्यातून कोणत्याही गोरगरिबांना लाभ मिळत नाही. याचा सर्व लाभ नेते पुढारी यांच्या बगलबच्चे यांनाच मिळतो. मागास भागासाठी विकास मंडळे स्थापन करून त्याचा हेतू पूर्वक व जनतेच्या हितासाठी विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा

(५) जातीयवाद निर्मूलन आपल्या देशांची जननी व राजकारणाचा गाभा माणला जाणारा महत्त्वाचा भाग म्हणजे जातीयवाद. जातीयता निर्मूलन करुन पक्षातीत पातळीवर प्रामणिकपणे प्रयत्न होणे आज कळीचा मुद्दा ठरला आहे

(६) लोकसंख्या नियंत्रण आपल्या पुढं सर्वात मोठा आ वासून उभा असणारा प्रश्न आहे तो म्हणजे दिवसा दिवस वाढवणारी लोकसंख्या त्यामुळे. घटते रोजगार. घटती सुख सुविधा. यासाठी वैद्यकीय उपाययोजना व लोकसंख्या तोटे समजावून सांगितले पाहिजेत. लोकसंख्या वाढ थोपविण्यासाठी परिणामकारक उपाययोजना आखणे गरजेचे आहे

(७) आचारसंहिता. अंमलात आणून राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता आखून तीची अंमलबजावणी पक्ष व इतर साठी कडक करणे गरजेचे आहे

(८) व्यापक सहभाग राजकीय प्रक्रियेत जनतेचा सहभाग हा. "मतदार " करिता राहिला पाहिजे. तो संकुचित न ठेवता व्यापक बनवावा. ह्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे

(९) भ्रष्टाचार निपटणे. आपल्या सर्व शासकीय राजकीय सामाजिक आर्थिक यामधील सर्वात मोठा शाप म्हणजे भ्रष्टाचार आहे. आपणच भ्रष्टाचाराला बढावा देतो. आपण देतो म्हणून हे अधिकारी व कर्मचारी लाच घेतांत. आणि तेथूनच भ्रष्टाचाराला वाव मिळतो यासाठी निवडणूक कायद्यात दुरुस्ती करून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

(१०) अल्पसंख्याक विकास समाजातील अल्पसंख्याक व दुर्बल घटक ह्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आवश्यक आहे

       अर्थात राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न हा भावनिक आहे. मिले सुर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा हे 

वास्तवतेत येण्यासाठी समाजातील विविध स्तरांचे ऐक्य साधणे आवश्यक आहे. ह्यासाठी जनतेच्या ह्रदयाला भिडणारे कार्यकर्ते हवेंत. 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

हातावर चे पोट- Daily workers

 


    हातावर चे पोट 

१ मे १९२१ रोजी मुंबई कामगार कार्यालयाची स्थापना झाली प्रत्यक्षात ही स्थापना त्या वेळेचे मुंबई प्रांत गव्हर्नर लॉर्ड लाईड यांनी गोरगरीब असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या कामगार कार्यालयाची स्थापना केली अशा प्रकारे स्थापन झालेले संपूर्ण भारतातील पहिले कार्यालय होते. आणि त्यापासून आजपर्यंत जवळपास ७७ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण केली आहेत. कामगार कार्यालयाचे मुख्यालय मुंबई येथे असून या कार्यालयाकडून. "( प्रादेशिक विभाग )

(१) कोकण विभाग / मुंबई

(२) पुणे विभाग / पुणे

(३) नागपूर व अमरावती / नागपूर

(४) नाशिक विभाग / नाशिक

(५) औरंगाबाद विभाग / औरंगाबाद

  १९२६ साली या कार्यालयाचे नाव बदलण्यात आले १९३९ साली कार्यालय विभाजन करण्यात आले. १९५३ पूर्वी मुंबई कामगार कल्याण कार्यालय स्थापन होईपर्यंत कामगार कल्याण याचे काम संचालक कामगार कल्याण यांचेमार्फत पाहिले जात होते. १९५३ नंतर वेगळे कामगार कल्याण कार्यालयाची स्थापना करण्यात आली. १९७९ मध्ये कामगार कल्याण कार्यालयाची फेररचना करण्यात आली.  

कोरोना मुळे सर्व सामान्य जनतेला बांधकाम कामगार व अन्य व्यक्ती अडचणीत सापडला आहे शासनाने या परस्थिती वर मात करण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी बांधकाम कामगारांच्या हाताला काम नाही उपासमारीची वेळ आली आहे म्हणून कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून जीवीत नोंदणी असणार्या कामगाराचया खात्यात सानुग्रह अनुदान २००० देत आहे शासन कामगार जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहे यात उलटं कामगाराचे शुभचिंतक म्हणणारे त्या सानुग्रह अनुदानातून प्रत्येकी २००० तून २००/३००/काढून घेत आहेत आमच्या मुळे हे पैसे तुम्हाला मिळाले आहेत असे सांगितले जाते कोणीही कामगाराने अशा एजंट लोकांना १/रुपयां सुध्दा देवू नका तशी मागणी कोण करीत असेल तर पोलिस स्टेशनला जावून भेटा  

कामगारानो जागे व्हा 

एजंट गिरी बंद करा पुढे या तक्रार करा 

     बांधकाम कामगारांना हे अंदाजे दरपत्रक माहिती आहे का

१ ‌. ५००० मिळवून देण्यासाठी १५००

२ २०/००० मिळवून देण्यासाठी ५००० 

३ ‌‌. १ ००००० मिळवून देण्यासाठी २५०००

४ २००० मिळवून देण्यासाठी ५००

५ ‌ २००००० मिळवून देण्यासाठी ५०/०००

६. ५ लाख मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये 

७. /६०००० मिळवून देण्यासाठी १५/०००

८ १० हजार मिळवून देण्यासाठी ३ हजार 

९. /२४००० हजार मिळवून देण्यासाठी ७ ‌‌हजार 

१०/ सुरक्षा संच मिळवून देण्यासाठी ५००/रुपये 

११. /६००० व्यसन मुक्ती साठी मिळवून देण्यासाठी ३०००

१२. / ११वी १२ वी साठी १०००० मिळवून देण्यासाठी ३००० 

13. नोंदणी फी:- १०००

 हे कोणी ठरवले आहे हे लाभ मिळवून घेण्यासाठी पैसे देणारा खरा कामगार नाही 

कामगारानो जागे व्हा कोणीही एजंट संघटना सेवाभावी संस्था युनियन लाभ मिळवून दिला म्हणून पैस मागू शकत नाही 

तसे निदर्शनास आल्यास पोलिस स्टेशनला संपर्क साधावा 

   मजूरांचे राज्य यावे 

का कामगार व मजूरांचा नायक नको

कामगार व मजूर ग्रांमपंचायत सदस्य का नको

कामगार व मजूर नगरपालिका नगरसेवक का नको 

कामगार व मजूर पंचायत समिती सदस्य का नको

कामगार व मजूर जिल्हा परिषद सदस्य का नको

कामगार व मजूर सहकारी संस्था सदस्य का नको

कामगार व मजूर खासदार का नको

कामगार व मजूर आमदार का नको

कामगार व मजूरांना शहाने करायचं नाही कामगारांन फक्त काम करायचं आणि निवडणुकीत जय जय म्हणायचे कोणाचं निवडणूकिच जेवून दारु कोठे आहे पैसे पाच वर्षांसाठी किती दिलं  

   बांधकाम कामगाराची खेडी व शहरी भागात सहजतेने तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून खालील प्रमाणे अधिका-यांना शासनाने घोषित केले आहे

विभागाचे नाव

ग्राम विकास विभाग

१ गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व

नगरविकास विभाग 

२ ‌ आफिसर महानगरपालिका सर्व

नगरविकास विभाग 

३ मुख्य अधिकारी नगरपरिषद सर्व

सार्वजनिक बांधकाम विभाग

४ उप अभियंता सर्व

जलसंधारण विभाग

५ उप अभियंता सर्व

पाणीपुरवठा विभाग 

६ उप अभियंता सर्व 

कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग 

७ साहयक कल्याण आयुक्त सर्व 

८ कामगार विकास अधिकारी सर्व

९ कामगार कल्याण अधिकारी सर्व 

कामगार विभाग  

कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य

अप्पर कामगार आयुक्त

कामगार उपायुक्त

सहाय्यक कामगार अधिकारी

कामगार अन्वेषक 

दुकाने निरिक्षक 

वरील सर्व अधिकारी वर्गाला कामगार नोंदणी करण्यासाठी शासनाने नोंदणी अधिकारी म्हणून नेमले आहे पण आजवर कोणतेही कामगारांच्या नोंदणी या अधिकाऱ्यांनी केलेल्या नाहीत कारण माहित नाही  

शासनाचा निर्णय दिनांक ०२/जानेवारी २०१८ ला कामगार हितासाठी जारी करणेत आला आहे अधिकारी वर्गाने थोड गांभीर्याने घेतले तर कामगार नोंदणी जलद व सापेक्ष होण्यास मदत होईल विचार करा 

    दि 1 मे 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे मंडळ असंघटित कामगार म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या कामांवर मजूरीसाठी जाणारे जे अडाणी गरजू व्यसनी असतात मिळणार या पगाराच्या पैसयातुन कसाबसा उदरनिर्वाह चालवत आहेत हे सर्व शासनाने लक्षात घेऊन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले त्यात कामगार हितासाठी विविध 19. कल्याणकारी योजना राबविण्यात येतात नोंदणी साठी वय वर्षे 18 ते 60. निश्चित करण्यात आले आहे यामध्ये कामगार लग्नापासून ते त्यांच्या बायकोसाठी आरोग्य योजना मुलांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजना व स्वता कामगारांसाठी विमा आरोग्य अशा विविध योजना राबविण्यात येतात 

  परवा शासनाने वेळोवेळी कामगार कामावर असताना विविध प्रकारचे अपघात होताना शासनाच्या निदर्शनास आले या सर्व परस्थिती चां आडावा घेऊन कामगारांना अपघात पासुन वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुरक्षा संच देण्याचे ठरविले त्यांचे वाटप सुध्दा मंडळाच्या अटि शर्ती नुसार करण्यात आले आपल्या सांगली जिल्ह्यात असे कितीतरी सुरक्षा संच आले असतिल त्याचा आकडा मला सांगता येणार नाही 

    मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून योजना आणली संच वाटप झाले की मंडळांची जबाबदारी संपली काय आज सुरक्षा संच वाटप तर झाले पण कोठेही सुरक्षा संच कामावर कामगार वापरत नाही मंडळाकडे आमची मागणी आहे अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षा संच ज्या भागात झाले आहेत तेथे महिन्यातून एक वेळ सर्वे करण्यात यावा जो कामगार सुरक्षा संच वापरत नाही त्या कडून तो मागे घेण्यात यावा अन्यथा मंडळाची फसवणूक केली या कारणांमुळे त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

   जिल्ह्यात पुरुष कामगारापेक्षा महिलांना सुरक्षा संचांचे काय उपयोग नसताना कोणत्या कारणाने वाटप झाले व कल्याणकारी मंडळांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

सुरक्षा संचामध्ये. हेल्मेट हंडणगोलज सतरंजी सुरक्षा बेल्ट बॅटरी बुट मोठी पत्र्याच्या पेटी जेवनाचा डबा असे बरेच साहित्य आहे .

    कामगार चळवळी

स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्या करिता कामगारांनी वेळोवेळी केलेलेसंघटितप्रयत्‍न. अर्थात अशीच ळवळहोण्या करिता एका बाजूला उत्पादन-साधनाच्या मालकी पासून वंचित झालेले व मोलाने काम करण्या शिवाय कोणतेही अन्य उप‌जीविकेचे साधन नसलेले कामगार, तर दुसर्‍याबाजूलाउत्पादन-साधनांची मालकी असलेले आणि कामगारांची पिळवणूक करून आपला नफा जास्तीत जास्तवाढ विण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले भांडवलदार, असे परस्परविरोधी हितसंबंधांचे दोनवर्गसमाजात अस्तित्वात आले पाहिजेत. सरंजामशाही व कुटिरोद्योग ह्यांचा र्‍हास व भांडवल शाहीचा उदय, ह्यानंतरच खर्‍या अर्थाने कामगार वर्ग निर्माण झाला व भांडवलदारा पासून संरक्षण करण्या करिता त्यास चळवळ करावी लागली. त्यापूर्वी-देखील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कामगार चळवळ नव्हती, असे नव्हे; पणत्या चळवळी मागे समाजातील इतर घटकां पासून आपले हित संबंध पूर्णतः वेगळे आहेत, ही जाणी वतित कीशी ठळक पणे नव्हती.

आर्थिक इतिहासात राजकीय (कामगारांना मतदानाचा हक्क, कायदेमंडळ प्रतिनिधित्व) तसेच आर्थिक कारणांकरिताही (वेतनवाढ, सामाजिकसुरक्षा, कल्याणयोजना उपलब्ध करणे, वेतनघट रोखणे, औद्योगिक व्यवस्थापनात सहभागिता वगैरे) कामगार चळवळी झालेल्या आढळतात. प्रगत देशांतूनही कामगार संघटनांना वैधिक मान्यता आणि भांडवलदार व शासन ह्यांच्यापासून संरक्षण, ह्यांसाठीही कामगार चळवळी घडून आल्या. सर्व प्रकारच्या कामगार चळवळींचे अंतिम हेतू कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारणे, रोजगारप्राप्ती, संघटनेतील कामगारांच्या रोजगारीबाबतच्या अग्रहक्कास मान्यता आणि कामगार हिताच्या दृष्टिकोनातून कामाच्या परिस्थितीचे नियंत्रण करणे, हेच असतात.


भांडवलशाहीशी लढा देऊन वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी कामगारांनी वेळोवेळी स्वीकारलेले तत्त्वज्ञान आणि मार्ग ह्यांत विविधता आढळते. यूटोपियावाद, आदर्शवाद, राज्यकेंद्रित समाजवाद, साम्यवाद, अराजकतावाद, फेबियन समाजवाद, श्रेणी समाजवाद, श्रमिकसंघवाद, ख्रिश्चन समाजवाद, कामगार संघटनावाद, सहकारवाद वगैरे विविध तत्त्वज्ञानांचा कामगार चळवळींवर वेगवेगळ्या काळांत प्रभाव पडलेला दिसतो. इंग्‍लंडमध्ये चार्टिस्ट व यंत्रांचा नाश करण्यास प्रवृत्त झालेल्या लुडाईट ह्यांची विचारसरणी कामगार चळवळीस काही काळ प्रेरक झाली होती. काही तत्त्वज्ञांस विद्यमान समाजरचनेत घटनात्मक मार्गाने परिवर्तन घडवून आणणे मान्य होते. इंग्‍लंडमधील फेबियन समाजवादी व श्रेणी समाजवादी विचारवंत ह्या वर्गात मोडतात. राज्यसंस्था ही कायम स्वरूपाची संस्था असून सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता तिचा साधन म्हणून उपयोग करता येईल, असा ‌त्यांचा विश्वास होता.


जर्मनीतील तत्त्ववेत्ता फेर्दीनांट लासाल (१८२५-१८६४), हाही त्यांपैकीच एक होय. कामगाराचे वेतन निर्वाहाच्या पातळीवर जखडून ठेवल्यामुळे कामगारांची पिळवणूक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अनिवार्य आहे व तीमध्ये कामगारांच्या हिताचे संरक्षण होऊ शकणार नाही; म्हणून भांडवलशाही नाहीशी करून सहकार संस्थांवर ‌अधिष्ठित अर्थव्यवस्था स्थापन केली पाहिजे आणि त्याकरिता शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशी लासालची विचारप्रणाली होती. सरकारकडून कर्ज घेऊन सहकारी संघटना स्थापून वस्तूंचे उत्पादन करावे व ह्या सहकारी संस्थांचा कारभार नीट चालावा, त्यांचे भांडवल सुरक्षित रहावे ह्याकरिता शासनाने कायदे करावेत, अशी त्याची योजना होती. ह्याउलट असे परिवर्तन क्रांतिकारक मार्गानेच होऊ शकेल, असे मानणारे काही तत्त्वज्ञ होते; पक्षीय राजकारण व संसदीय मार्ग ह्यांवर त्यांचा विश्वास नव्हता. मार्क्सवाद, श्रमिकसंघवाद, फ्रान्समधील ‘कॉन्फेडरेशन जनरेली दर ट्रव्हेल’ व इंग्‍लंडमधील ‘नवीन कामगार संघटना’ (न्यू युनियनिझम) आदी ह्या वर्गात मोडतात. ह्यांपैकी मार्क्सच्या विचारांचा जगातील कामगार चळवळींवर फारच प्रभाव पडला. कामगार चळवळींचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असून ह्या चळवळीद्वारा क्रांती घडवून सर्व जगात साम्यवाद प्रस्थापित करता येणे शक्य आहे, असे मार्क्सचे म्हणणे होते. इतर तत्त्वज्ञांचा दृष्टिकोन हा राष्ट्रवादी होता; कामगार चळवळीचा विस्तार राष्ट्राच्या भौगोलिक मर्यादेपुरताच त्यांना अभिप्रेत होता.सर्वसाधारणपणे कामगार चळवळींमागे धर्माचा प्रभाव फारसा आढळत नाही. जर्मनीतील ख्रिश्चन कामगार संघटना ह्या कॅथलिक लोकांना समाजवादापासून बचावण्याकरिता स्थापन झाल्या होत्या, त्याचप्रमाणे इंग्‍लंडमधील ख्रिश्चन समाजवादी तत्त्वज्ञानही धार्मिक प्रवृत्तीला आवाहन होते. अर्थात अशा विचारांचा पगडा फार काळ टिकला नाही. कामगार चळवळींच्या इतिहासाच्या सिंहावलोकनातून दोन ठळक प्रवृत्ती दिसतात : मंदीच्या काळात सर्वसामान्यपणे कामगार क्रांतिकारक विचारसरणीचे अनुयायी होतात; कारण बेकारी उद्‌भवते व तीमुळे कारखानदारांचे सौदा करण्याचे सामर्थ्य वाढून कामगारवर्ग व त्यांची चळवळ निष्प्रभ होते. अशा वेळी कामगारांचा प्रचलित अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडून ती उलथून पाडण्याचे आवाहन त्यांच्या बाबतीत प्रभावी होते. याउलट भरभराटीच्या काळात जवळजवळ पूर्ण रोजगारी असल्यामुळे कामगारांची स्पर्धाशक्ती वाढलेली असते. अशा वेळी ते मवाळ तत्त्वज्ञानाचे अनुयायी होतात. कारण रोजगारीची निश्चितता आणि कामगारांचे लक्ष ताबडतोब मिळणार्‍या फायद्याकडे असल्यामुळे बौद्धिक व तात्त्विक नेतृत्त्वाची ते कदर करीत नाहीत. कामगार संघटनेच्या सदस्यांत होणारी वाढही आर्थिक चक्रानुसार होते. पूर्ण रोजगारीच्या काळात सदस्यांची संख्या वाढते, तर मंदीच्या काळात ती घटते.


पहिल्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या समाजवादी तत्त्वांचा प्रभाव रशिया व त्याच्या वर्चस्वाखाली देशांत सध्या आढळून येतो. इतर अनेक देशांतही समाजवादी तत्त्वज्ञान स्वीकारलेल्या कामगार संघटना आहेत; तथापि त्या तितक्याशा प्रभावी नाहीत. याउलट प्रचलित अर्थ-चौकटीतच कायद्याच्या साहाय्याने व कामगारांची सौदाशक्ती वाढवून कामगारांच्या हितसंरक्षक चळवळी आढळतात. अशा विचारसरणीचा प्रभाव अमेरिका, जर्मनी व फ्रान्समधील कामगार चळवळींवर आहे. लोकशाहीच्या व घटनात्मक मार्गाने अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणता येणे शक्य आहे, अशा विचारप्रवाहाच्या कामगार चळवळी इंग्‍लंड, भारत वगैरे देशांत आढळतात. विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर भांडवलशाहीच्या स्वरूपातही फरक होत चालला आहे. एका बाजूला भांडवलदार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मक्तेदारी निर्माण करून प्रचंड औद्योगिक संस्था निर्माण करीत आहेत, तर दुसर्‍या बाजूला त्यांना तोंड देण्याकरिता कामगारांच्याही बलाढ्य संघटना निर्माण होत आहेत. त्याचबरोबर स्वसंरक्षणाकरिता भांडवलशाहीने कामगार संघटनेचे अस्तित्व तिचा सांघिक सौदा म्हणजेच सामुदायिक वाटाघाटी करण्याचा हक्क, कल्याणकारी राज्य व नियंत्रित भांडवलशाही ह्या कल्पनांनाही मान्यता दिली आहे. शासनाने कामगार कल्याणाकरिता काही कायद्यांवाटे कारखानदारांवर काही नियंत्रणे घातली आहेत. इतकेच नव्हे, तर काळाची पावले ओळखून भांडवलशाहीदेखील कामगारास कारखान्यांच्या नफ्यात आणि व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यास थोडीथोडी प्रवृत्त झालेली दिसत आहे.


भारतात पहिल्या महायुद्धानंतर खर्‍या अर्थाने कामगार चळवळीची वाढ होऊ लागली व ह्या काळातच तिला राष्ट्रव्यापी स्वरूप आले. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि रशियन राज्यक्रांती; परिणामी १९२० साली ‘अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस’ (आयटक) प्रस्थापित झाली. १९२६ साली कामगार संघटनेला कायदेशीर स्वरूप आले. १९२९ साली आयटकमध्ये फूट पडून ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन’ची स्थापना झाली. ह्या संघटनेने शांततेच्या सनदशीर मार्गाने कामगारांची गार्‍हाणी दूर करण्याचे ध्येय पुढे ठेविले होते, तर याउलट आयटक साम्यवादी होती. ह्यानंतर आयटकमध्ये आणखी फूट पाडून जहालवाद्यांनी १९३१ साली वेगळी कामगार संघटना प्रस्थापित केली. १९४० साली ह्या सर्व संघटनांचा समझोता झाला, परंतु युद्धविषयक धोरणाबाबत झालेल्या मतभेदांमुळे रॉयनी वेगळ्या कामगार संघटनेची स्थापना केली.


दुसर्‍या महायुद्धोत्तर काळात राष्ट्रीय सभेतील पुढार्‍यांच्या पुरस्काराने व साम्यवादाचे वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने ‘इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस’ची (इंटक) स्थापना झाली. महात्मा गांधींच्या तत्त्वानुसार कामगारांची गार्‍हाणी निवारण्याचे ध्येय इंटकने आपल्यापुढे ‌ठेविले. यानंतर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी ‘हिंद मजदूर सभा’ नामक कामगार संघटना स्थापन केली. त्याचबरोबर जनसंघपुरस्कारित ‘भारतीय मजदूर संघ’ ह्या नावाची नवी कामगार संघटना अस्तित्वात आली. ‘युनायटेड ट्रेड युनियन कॉंग्रेस’ ही राजकारणापासून अलिप्त असलेली आणखी एक कामगार संघटना आहे.


प्रत्येक धंद्यात एकच कामगार संघटना असावी, कामगार चळवळ पक्षीय राजकारणापासून अलिप्त ठेवावी आणि कार्यकर्ते व पुढारी संघटनेतूनच निर्माण व्हावेत, अशा धोरणाचा सध्या पुरस्कार केला जात आहे. विशेषतः नियोजनात्मक अर्थव्यवस्थेत अशा दृष्टिकोनाची अनिवार्य जरूरी आहे. भारतातील कामगार चळवळ ही वेतन, महागाई भत्ता, बोनस इ. कारणांमुळे झाली. ह्या चळवळीचा एक विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील कापडगिरण्यांतील कामगारांनी संप केला असता, कामगार व कारखानदार ह्यांतील मतभेद सामोपचाराच्या मार्गांनी कसे सोडविता येतील, याबद्दल गांधीजींनी घालून दिलेला आदर्श. आज भारतात कामगार व मालक ह्यांच्यातील तेढ सोडविण्याकरिता औद्योगिक समित्या, वेतनमंडळे, संयुक्त शासन मंडळे व सक्तीचे लवाद, ह्या यंत्रणेचा उपयोग केला जात आहे. त्याबरोबरच कामगार व कारखानदार ह्यांच्यातील तंटे सामोपचाराने, शांततेच्या मार्गाने आणि सामुदायिक वाटाघाटींच्या साहाय्याने सुटावेत, असे शासनाचे धोरण आहे व अशाच तर्‍हेची विचारसरणी ‘‌गिरी दृष्टिकोन’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे

  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर 

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या