Showing posts with label आशा. Show all posts
Showing posts with label आशा. Show all posts

आशेवर जीवन कायम

 


                  आपल्या जीवनाला एक भौगोलिक परिणाम असते. यापूर्वी आपण प्रादेशिक अस्मितेचा विचार केला आहेच. पण त्याशिवाय आपण ज्या भागात राहतो. त्या परिसराचे घटक होतों. आपणं केवळ तामिळ तेलगू कन्नड मराठी मुस्लिम मल्याळी असे विविध जातींचे नसतोच. आपल्या प्रादेशिक अस्मितेबरोबर आपल्याला एक विभागीय चेहरा मिळतो. मग आपण दक्षिण/ दक्षिणात्य बनतो. पूर्वेकडील किंवा उत्तरेकडील भारतीय किंवा अन्य जाती धर्माचे असतो. त्याबरोबर आचारविचार शहरि व ग्रामीण जीवनाची छाप असते. आपल्या जीवनाच्या या भौगोलिक संदर्भातून काही राजकीय सामाजिक प्रश्नांना तोंड फुटते 

        आजच्या आपल्या सार्वजनिक जीवनात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय अशी विभागणी झालेली दिसते. शिवाय उत्तर भारताच्या सांस्कृतिक वर्चस्व दक्षिणेला नकोसे वाटते. हिंदीचा आग्रह हा दक्षिणात्याना या उत्तर भारतीय वर्चस्वाचा एक नमुना वाटतो. व याउलट दक्षिणातयाचया भाषेचे वेगळे स्वरूप वेगळी लिपी. त्यांचा वेगळा पोशाख. यांच्यामुळे उत्तर भारतीयांनाही त्यांच्याविषयी साशंकता वाटते. दक्षिणात्य संस्कृती फटकून लाघणारी आहे. त्यांचा इंग्रजीचा आग्रह हा उत्तरेकडील लोकांना नोकर्या पासून दूर राखण्यासाठी आहे असे ग्रह बाळगले जातात. विशेषत तामिळाचया वेगळ्या संस्कृतीमुळे आणि भिननतव टिकविण्याच्या आग्रहामुळे दाक्षिणात्य म्हणजे फुटीर अशीच अनेकांची समजूत असते

          भौगोलिक संदर्भातून निर्माण होणारा असाच आणखी एक वाद म्हणजे ग्रामीण विरुद्ध शहरी हा वाद. सर्व सुखसोयी सुविधा या शहरांना मिळतात. रेल्वे. रस्ते स्वच्छ पाणी. वीज कारखाने. सगळे शहरातच असते. मूठभर शहरी पांढरपेशा चे शासनावर प्रभुत्व असते. अशी तक्रार केली जाते. तर शहरी लोकांना ग्रामीण भागातून पुढे येणारे नेतृत्व. ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था वगैरे गुणवत्ता बद्दल शंका असते. ग्रामीण सवलती देणे. शेतीसाठी सवलती देणे. याला शहरांमधून विरोध होतो. कारण कारखाने. व्यापार. हीच प्रगतीची मुख्य साधनें मानली जातात. निर्णय प्रक्रियेत शहरे. नागरी सुविधा. त्यांनाच प्राधान्य मिळते आणि त्यात चूक आहे शहरी लोकांना वाटत नाही. त्यातही मुंबई. दिल्ली ही महानगरे म्हणजे आर्थिक. राजकीय शक्तीची केंद्रस्थाने. सर्व निर्णय तेथें होतात समाजजीवनावर त्याचा वरचष्मा असतो. भारत म्हणजे जणू ही महानगरे अशीच बर्याच जणांची समजूत असते. त्यामुळे महानगरे विरुद्ध उर्वरित भारत असाही वाद उद्भवतो. "गल्लीत काय चालते " त्यांची फिकीर दिल्लीत केली जात नाही. असेच लोकांना वाटते सत्ता केंद्रे. ( दिल्ली ) आणि स्थानिक समाज ( गल्ली) असा दुजा भाव / असे मत दवत समाजात असतें. आपल्या देशाच्या मोठ्या पसारयामुळे आणि केंद्र सरकारच्या व्यापक. अधिकारामुळे दिल्ली ते गल्ली यांच्यात असं अंतर पडते आपणही अनेक वेळा फक्त राष्ट्रीय प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करत़ो राष्ट्रीय प्रशनाबाबत काळजी करतो. पण त्या तुलनेने स्थानिक पातळीवरील समस्यांची फारशी कोणी दखल घेत नाही. आपल्या गावांचे प्रश्न काय आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण काय सहभाग घ्यायला हवा वगैरे गोष्टी आपल्या गावी नसतात पण राष्ट्रीय प्रश्नांना आपण वर्तमानपत्रात जास्त जागा देतो निर्णय घेताना त्यांना प्राधान्य देतो इतकेच काय. कृती करायची वेळ. आपल्यावरही आपला कल विशिष्ट. मर्यादेत प्रशनापेक्षा मोठ्या. राष्ट्रीय प्रश्नांवर कृती करण्याकडे अधिक असतो. राष्ट्र वाचविण्यासाठी आपण मोर्चा काढतो एखाद्या सर्वसाधारण प्रश्नावर आपणं आंदोलन करतो याचे कारण 

              आशेवर जगण्याचा आपला प्रवास घरापासून सुरू होतों आई वडील भाऊ बहीण यांच्या आशेवर मुलें जगतात की माझे कोणीतरी सुखात दुःखात सहभागी होणारें आहे यामुळे. मोठे झाल्यावर उच्च शिक्षण मिळेल का ? शाळा कॉलेज कसे असेल. हक्काचे व मोफत शिक्षण मिळणार का ? बेमाफी फि वसूली थांबणार का ? यावर नंतर नोकरी मिळेल का ? ती कोणती असेल ? कशी किती पगाराची असेल ? नाहि मिळाली तर काय मोठा प्रश्न ? चोरी. लबाडी. खून मारामाऱ्या अपहरण सारखे गुन्हे करावे लागतील का ? मुलांना. पोलिस. सैनिक भरती. मोठमोठ्या कंपन्या यात. भरती मिळेल का ? एम सी स्पर्धा परीक्षा तारखेनुसार होणार का ? तंबाखू गुटखा खैणी पान मसाला दारु अशा विविध व्यसनापासून मी दूर राहीण का ? लग्न होणार का ?मिळणारी मुलगी मिळवणारे सोयरे. कसे असतील. ? लग्नात खर्च किती होईल ? पैसा कोठून येणार ? कोणते काम करावे लागणार ? मजूरांना मजूरी पाहिजे तसी मिळेल का ? ठेकेदार पगार व वागणूक देणार का ? शेतकरी यांच्या मालाला दलाल एजंट योग्य भाव देणार का ? बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यांना न्याय मिळणार का ? शासन प्रशासन सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेणार का ? महिला अत्याचार हुंडाबळी जाळपोळ. गोरगरीब जनतेला न्याय मिळणार का ? साथीच्या रोगांवर निदान उपचार निघणार का ? भ्रष्टाचारावर अंकुश येणार का ? शासकीय अधिकारी व कर्मचारी विविध पत्र व्यवहार यांना उत्तर देणार का ? पालकांच्या मनाप्रमाणे मुलांना नोकरी शिक्षण हक्क अधिकार स्वतंत्र मिळेल का ?

            अशा एक नाही अनेक प्रकारच्या आपल्याला मिळेल या आशेवर जीवन जगत आहोत आपण. आत्ता विचार करा 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या