Showing posts with label उत्तर प्रदेश. Show all posts
Showing posts with label उत्तर प्रदेश. Show all posts

मी स्मशानभूमी बोलते



मी स्मशानभूमी बोलते

             छोट्या छोट्या वाड्या वस्त्या लोकसंख्या कमी माझी जागा गावाच्या बाहेर वडयाचया कडेला. माझ्याकडे बघून लोक नाक डोळे मुरडतात कारणं मी वाईट आहे माझ्याजवळ भूत राहतात मला कोणतेही संरक्षण नाही. सर्वांच्या मृत्यू नंतर त्यांचा अंतिम विधी करण्यासाठीच माझी निवड झाली यात माझा काय दोष. उन वारा पाऊस यात मी उघडीच असते. लोकांना माझी आणि माझ्या स्वच्छतेची आठवण होते ती म्हणजे कोणीतरी मेल्यावर मग काय एकास एक बोलतो यंदा स्मशानभूमीची सुधारणा करायची. स्वच्छता पाणी शेड कंपाऊंड करायचं हे तेवढ्या पुरतेच बोलन असते. आपल्या नातेवाईक मित्र यांचा. विधी आवरून झाला की पुन्हा कोणी माझ्याकडे येत नाही. कारणं येण्याची गरज नाही. 

                लोकसंख्या वाढली हळूहळू घरे वाढली. वाड्या वस्त्या गावांत बदलल्या आणि गावात झाडा खालच्या पंचाचे रुपांतर ग्रामपंचायत मध्ये झाले सरपंच उपसरपंच सदस्य अशा विविध निवडी झाल्या. विरोधक सत्ताधारी असे गट तयार झाले. आणि माझी थोडी गरिबी लाचारी कमी झाली. मसनवाटा याचे रुपांतर स्मशाभूमीत झाले. कंपाऊंड वॉल. शेड. माझी सुरक्षा. स्वच्छता. अशी विविध माझ्यासाठी खूप कामे होण्यास सुरुवात झाली. मग. सुधारणा झाली आणि माझे नामकरण करण्यात आले. वैकुठधाम. त्रिकुट. मुकतिधाम. अशी एक नाही अनेक नावे कोणाला काय सुचेल तो नाव ठेवायला लागला. कंपाऊंड वॉल वर. विविध अभंग. श्लोक. देवी देवतांची चित्रे विविध पण सुगंधी नसणारी जंगली झाडें. फुलांची झाडे लावण्यास सुरुवात झाली. आणि काय माझे रुपच बदललं. ही सर्व कामे ग्रामपंचायत विकास निधी यातून होत होती त्यात सुध्दा कामांचे टेंडर जादा पैशांचे काम मात्र कमी पैशांत निकृष्ट दर्जाचे स्मशानभूमीच्या कामात सुध्दा लाखो रुपये नेते पुढारी यांचें बगलबच्चे मिळवायला लागले. कारणं स्मशानभूमीचे काम आहे कोण बघायला नाही कोण देखरेख करायला नाही कामांचा दर्जा नाही मी मात्र केविलवाणी हे सगळं नुसतं पाहत होते. माझं काय चालतं नव्हतं. माझी सुधारणा झाली आणि. मग काय. माझ्याजवळ राहायला. रोज एक नवीन सदस्य यायला लागला. संध्याकाळी. दारु पिण्यासाठी. माझ्या जागेसारखी सुरक्षित जागा नाही मग काय दारुडी प्यायला सुध्दा माझ्याजवळ आणि जादा झाल्यावर झोपायला सुध्दा तिथेच. ही तर माणसं होती. कुत्री. रांत्र दिवस माझ्याजवळ झोपायला असायची. काही काही महाभाग बायका सुध्दा चैनी करण्यासाठी माझ्या जागेत येत होते. मग. मी. स्वच्छ असणारी. दारुच्या बाटल्या. तंबाखू पुड्या कागद. अंत्यविधी साठी लागणारे साहित्य त्यासाठी वापरले जाणारे कागद पिशवी. तिरडीचया काठ्या. अशा सर्व कचरा व कचरयाचे ढीग लागायला सुरुवात झाली आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य तयार झाले. किती मनाला माझ्या वाईट वाटलं अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले माझ्यासाठी रखवालदार नेमण्यात आला पण तो सुध्दा वरील सर्व धंदे करणार्या माणसांना मदत करायचा. त्यामुळे त्याचा सुध्दा फायदा हुयाचा. मग तो कशाला काय करेल

          "आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा " हा शब्द जरी कोणी ऐकला तर अंगावर काटा येतो. पण मी. २००० सालापासून हा आवाज ऐकत आली आहे. मला कधी वाईट वाटलं नाही. आणि वाटलं तरी कोणाला सांगायचं. माझ्या भागयातच आहे म्हणून मी हे सगळं सहन करत आले. लहान मुल. तरुण मुल. निमवयसक व्यक्ति. म्हातारी माणसं. अशी सर्व माझ्यातच येवून राहायची मृत्यू नंतर. आजारी व्यक्ती. खून झालेले. जळीत झालेले. आत्महत्या करणारे. अपघातग्रस्त व्यक्ति. मरणाने म्हणजे म्हातारे होवून मरणारे. साधू संत. माळकरी. महिला. अनेक कारणानें मरणारे. हे सर्व माझ्याजवळ आले मी कोणालाच शेवटच्या विधीला नकार दिला नाही. सर्वांना जाळले. त्यांचे सर्व अंत्यविधी झाले. माझ्या जीवावर. अनेक लोकांची घरे चालायला लागली. पहिले रखवालदार. जाळण्यासाठी लाकूड पुरविणारा वखारवाला. बांबू तिरडीचे सामान्. विकणारे. कापड. फळे फुले. अंत्यविधी करणारे ब्राम्हण हे सुद्धा तोंडाला येईल तेवढी दक्षणा मागायला लागलें. सर्व अनागोंदी कारभार चालला होता. मी आपली स्तब्धद होऊन सगळ बघत होते. मरणारा कोणाचा मुलगा. बहिण. भाऊ. वडील. आई. मामा. मावशी. मित्र. सरपंच उपसरपंच नेता. पुढारी. नामांकित व्यक्ती. बेवारस रस्त्यावर मयत होणारे. अशी विविध नातीगोती मी बघितल्यात. कोणी खरोखरच दुःख झाले माझा कोणी तरी मेला म्हणून खरच रडणारे मी बघितले. काही जण बर झाल वाईट चालीचा होता मेला बर झाल. बरेच वर्ष अंथरुणावर पडलेला एकदा मेला तर लोक म्हणायचे बर झाल जीव मोकळा झाला. बायका हांबरडा फोडून हातातील बांगड्या फोडून हाणून बडवून घेताना मी पाहिले आहे वाईट मला सुद्धा वाटत मी काही करू शकत नाही. 

              २००० वर्षांपूर्वी प्लेग पटकी सारखी महामारी साथ आली होती अगदी भयावह परिस्थिती निर्माण झाली. लोक मरणाचे प्रमाण गावच्या गावं मरत होती एकाला जाळलं की दुसरा मेलेला असायचा. मला उसंत सुध्दा घ्यायला वेळ नव्हती. मी कधी मला कंटाळा आला मी आत्ता हे करू शकत नाही असं म्हणलं नाही. अशा विविध साथीचे आजार रोग मी बघितले आहेत नाव जरी काढले तरी माझ्या अंगावर काटा येतो. आज सुध्दा या दोन वर्षांत अशीच वेळ बघायला मिळाली. माणसांत माणूस नाही कोण कुणी मेल तरी त्याला अंतिम निरोप देण्यासाठी बंधन घातले आहे पण लोक मरण्याचे प्रमाण आज सुध्दा मला विचार करायला लावते मला. पण आज माझा धंदा मांडला आहे या ग्रामपंचायत. नगरपरिषद महानगरपालिका. मोठी मोठी शहरें. यातील दलालांनी मृतांचा सुध्दा बाजार धंदा मांडला आहे. गेल्या काळात कोणतेही पैसै न घेता लोकांना जाळणारे आज फक्त पैशासाठी लोकांना जाळत आहेत त्यासाठी येणारा खर्च सुद्धा काही हजारांत आहे. ज्याला जगणं अवघड आहे तो एवढे पैसे माझ्याकडे नाहीत माझ्या माणसांचा अंत्यविधी करा लय उपकार होतील म्हणून पाया पडणारे सुध्दा मी पाहिले आहेत. 

            " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. " याच महत्व कळल आणि शासनाने वृक्ष तोडीवर बंधनं आणली. कारणं कारखाने विविध कंपन्या केमिकल कंपनी. व मला एका माणसाला ४०० किलो जळण लागतं होते. शासनाने वृक्ष तोडीवर कमालीची बंधने आणली. आणि मग. प्रत्त्येक गावात एक स्मशानभूमी आहेच तेथे जळण कमी पडण्यास सुरुवात झाली. जळण व त्यांचे दर आभाळाला टेकले. मग. गॅस वरची स्मशानभूमी अमलात आली मग मात्र मला थोडा आराम मिळाला. माझा त्रास कमी झाला. गॅस वर दहन दिल्यास राख ओंजळीत बसल एवढीच. पण अजून सुद्धा समाजात काही लोक आहेत की ते दहन लाकडावरच देतात त्याशिवाय आत्मा आभाळात जातं नाही अशी समजूत आहे. मला नाही वाटत मेल्यावर स्वर्ग काय आणि नर्क काय त्याला दफन केला काय आणि दहन दिला काय त्याला काय कळणार. 

           "तुझं मड बसविल गावाच्या बाहेर " असं म्हणन त्यावेळी चालतं होतं कारणं त्यावेळी माझी जागा गावाच्या बाहेर होती पण आज माझ्याभोवती गाव वसलेले आहे माझी कंपाऊंड वॉल सुध्दा स्वताच्या घरासाठी वापरणारे मी बघितले आहेत. आत्ता मला भीती वाटत नाही कारण गावच माझ्या भोवती आहे. माणस बोलताना मी ऐकते. माणसं फिरायला माझ्यापर्यंत येतात आज काळ वेळ बदलली असलीं तरी माझी परस्थिती बदलली नाही. माझ सुध्दा राजकारण केलं जातंय. आत्ता मला काही जादा सांगायचे नाही. चांगलें काम कार्य करा प्रेमाणे वागा. चोरी करु नका. महिला छेडछाड करु नका. कोणाची निंदानालस्ती करु नका. कोणाची संपत्ती लबाडी करुन लाटू नका. आपले कुटुंब आपले मित्र सगेसोयरे यांची साथ सोडू नका. गो हत्या. बालहत्या. करु नका. अपहरण. खंडणी गुन्हेगारी. व्यसनापासून दूर रहा. सामाजिक. आर्थिक. राजकीय. शैक्षणिक. वैद्यकीय. या क्षेत्रात. आपली ताकद बुध्दी यानुसार प्रवेश करा.वाहन सावकाश चालवा. सावकारी करु नका. विश्वास घात करु नका. 

        मी स्मशानभूमी बोलते बास मला आत्ता तुम्हाला जादा काही सांगायच नाही कारण तुम्ही हुशार आहात कस वागाव हे तुम्हाला कळत नमस्कार

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बांधकाम कामगार यांना आत्ता टाळेबंदी काळात आपलं व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणे जड जात आहे आपला सयंम ढळू देऊ नका वेळ बदलेल पुन्हा चांगलें दिवस येणार आणि येतील

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या