प्रत्त्येक व्यक्तिचे उपजीविकेचे साधन वेगवेगळे असते उत्पन्न कमी जास्त असते त्यामुळेच आपल्याला समाजात काहीजण गरिब आर्थिक उत्पन्न मधील तफावत उत्पन्नाचे साधन आणि व्यक्तिची मालकी असलेल्या वस्तू इत्यादी बाबीवरून आपण व्यक्तिची विभागणी वेगवेगळ्या वर्गामध्ये करतो. श्रीमंत आणि गरीब यांच्याखेरीज मध्यमवर्गीय आणि अतिदरिद्री असे लोकही समाजात असतात प्रत्त्येक वर्गाचे राहणीमान वेगळे असते त्यांच्या राहणीमानाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात
प्रत्येकाची स्वताच्या वर्गाबधदल काही विशिष्ट कल्पना असते साधारणपणे आपल्या वर्गावर अन्याय होतो. आपल्या वर्गाची कोंडी होते. गुणांचे चीज होत नाही अशी तक्रार सर्वजण करतात मुख्यतः मध्यमवर्गीयांना असे वाटते की आपल्यापाशी पुरेसे कर्तृत्व आहे पण आपल्याला संधी मिळत नाही मध्यमवर्गीय हे बहुतेक वेळा बुध्दीजीवी आणि पांढरपेशे नोकरदार असतात कला संस्कृती इत्यादी क्षेत्रातही त्यांचा वावर असतो पण आपल्यावर अनाठायी निर्बंध लादले जातात यांची त्यांना रुखरुख असते त्याचप्रमाणे श्रीमंत उच्च वर्गीयांना त्यांच्यावरील निर्बंध डाचत असतात आपणच समाजांचे तारणहार आहोत देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आपल्यापाशी आहे असा त्यांचा विश्वास असतो आपल्या कल्पकतेला आणि उधमशीलतेला पुरेसा वाव मिळाला तर आपण सर्वांचेच भले करू असेही त्यांना वाटत असते हे दोन्ही वर्ग. गुणवत्ता. कौशल्य. शिस्त. कार्यक्षमता यासारख्या वैशिष्ट्यांचे खास पुरस्कर्ते असतात कनिष्ठ वर्गीय यांना कमी जास्त प्रमाणात आपल्या कनिष्ठ स्थानाची जाणीव असते पण हे कनिष्ठ स्थान आपल्यावर का व कसे लादले गेले याबाबत निश्चितता नसते आपला वर्ग हा प्रत्यक्ष श्रम करणारा कष्ट. करणारा वर्ग आहे याचे त्यांना भान असते तसेच आपली राहणी. शिक्षण. आणि संस्कृती वैशिष्ट्ये सर्वच उच्चवर्गीय पेक्षा भिन्न आहेत याचीही जाणीव त्यांना असते
आपल्या वर्गीय समाजात प्रत्त्येक वर्ग इतरांबद्दल विशिष्ट ग्रह बाळगून असतो एका बाजूला आपण एकामेकाचे विरोधक आहोत यांची पक्की जाणीव उच्च वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय दोघांनाही असते मात्र त्याच बरोबर मर्यादित अर्थाने प्रगती साधण्यासाठी आपण एकामेकावर अवलंबून आहोत हे ते ओळखून असतात परस्परांविषयी अविश्वास हे त्यांच्या परस्परांचे ठळक वैशिष्ट्य असतें कामगार आळशी. अकुशल. अकार्यक्षम. कामचुकार असतात त्यांना कमी श्रमात अधिक मिळकत हवी असते अशा प्रकारच्या समजुती उच्चवर्गीय बाळगून असतात. उच्चवर्गीयांचा कनिष्ठ वर्गीयाशी होणारा व्यवहार दडपणुकीचा. धाकदपटशाचा आणि अरेरावी तरी असतो किंवा पितृ प्रधान पध्दतीचा उपक्रमाच्या औदार्य भावना होत असते त्यात मित्रत्व किंवा बरोबरीची भावना नसते मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय यांचें परस्परसंबंध याहून वेगळे असतात कनिष्ठ वर्गीयाना नियंत्रणाखाली ठेवण्याच्या कामात मध्यमवर्गीय हे उच्च वर्गीयाचे साथीदार असतात कनिष्ठ वर्गीया बद्दल मध्यमवर्गीयानाही दुरावाच असतो मुख्य म्हणजे उच्च वर्गीय आणि मध्यमवर्गीय यांची मूल्ये साधारणपणे सारखीच असतात सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे सहकार्याची असते उच्च वर्गीय यांचा उपभोगावरील भर. संचयाचा हव्यास यांचें मध्यमवर्गीयांनाही आकर्षणं असते मानसिकदृष्ट्या ते उच्च वर्गीयाशी जोडले गेलेले असतात मात्र उच्च वर्गीयाप्रमाणे ते प्रत्यक्ष नफा कमवत नसल्यामुळे त्यामध्ये नैतिकतेचा अहंगंड असतो
गरिबां विषयांच्या सहानुभूतीने नसले तरी श्रीमंताबधदल असूयेमुळे मध्यमवर्गीय व्यक्ति नफेखोरी दडपणूक यांच्याबद्दल कधीं कधीं टीकेचा सूर लावतात परंतु कष्ट करणार्यांना. "मालक वर्ग " हा जसा फुकटखाऊ. ऐदी. चैनबाज वाटतो तसे मध्यमवर्गीयांना वाटत नाही कारखान्याच्या संचालक मंडळांवरचया श्रीमंत सभासदांचे लठ्ठ पगार हा त्या श्रीमंतांच्या धाडसाचया कल्पना शक्तीचा आणि नेतृत्वाचा मोबदला आहे असेच मध्यमवर्गीयांना वाटते चांगले वाईट याबाबत आपल्या कल्पना जीवनातील श्रेयाची आपली कल्पना ही सुद्धा आपल्या वर्गीय हितसंबधाप्रमाणे ठरत जाते आपण जर उच्च वर्गीय असलो तर चांगला व्यवसाय करावा व्यवहार भरभराटीला आणावा एक व्यवसाय यशस्वी झाला की आणखी दुसर्या व्यवसायात गुंतवणूक करावी पैसा खेळता ठेवावा सतत उधमशील असावे थोडे बहुत. सामाजिक कार्य करावे. दानधर्म करावा. इत्यादी आपले आदर्श असतात मात्र त्याचबरोबर कामगाराने सचोटीने काम करावे. एकनिष्ठ रहावे. नियम पाळावेत. शिस्तशीर असावे. आज्ञाधारक असावे. अशाही उच्च वर्गीयांचया अपेक्षा असतात त्यासाठी " आदर्श कामगार " गुणवंत कामगार. यांसारखे पुरस्कारही ठेवलें जातात कमीत कमी रजा घेणा-या कामगारांचे कौतुक केले जाते खुद्द कनिष्ठ वर्गीयांना मात्र अशा आदर्शाविषयी फारसा आपलेपणा नसतो जोडधंदा करुन आपली आर्थिक उन्नती करावी असे त्यांना वाटते सतत संघर्षमय वातावरणामुळे मालकांची अरेरावी सहन न करणे बेडरपणे काहीशी बेफिकीर या गुणांना ही बर्याच वेळा महत्व दिले जाते पांढरपेशी जीवनपद्धती हाही कनिष्ठ वर्गीयांचा आदर्श असतो उच्च शाळांमध्ये मुलांना पाठवावे मध्यमवर्गीय संस्कृतीत आपला शिरकाव करून घ्यावा असा त्यांचा प्रयत्न असतो. नैतिकता. चांगुलपणा. आदर्श यांचा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर आपल्या वर्गाचे हितसंबंध असतात आणि त्यांना साजेशे विचार आपण स्विकारण्याची गरज आहे वर्गावरगा मध्ये असलेलें भेद त्यामुळे एकामेकापासून भिन्न असे त्यांचे हितसंबंध यातून त्यांच्यात संघर्षाचे नाते निर्माण होते हा संघर्ष काही वेळ सुप्त स्वरुपात असला तरी सामान्य माणसाच्या जीवनावर त्याची छाया पडतच असते
रोजगार मिळेल का नाही मिळाला तर तो टिकेल का हे प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत असतात मनासारखा रोजगार मिळणे त्यात कुटुंबाच्या गरजा भागवता येणे या बाबी अवघड असतात नोकरी मध्ये सुरक्षितता. समाधान. वगैरेंची शाश्वती नसते या तणावातून आपण वेगळ्या वर्गाचे आहोत ही भावना रूजते व्यक्तिगत आणि संघटनात्मक पातळीवर आपण इतरांपेक्षा मालक. अधिकारी उच्च वर्गीय यांच्यापेक्षा आपले वेगळेपण जोपासून सुरक्षितता मिळविण्याचा प्रयत्न करतो आपल्या समाजातील या आर्थिक तणावामुळे आणि संघर्षामुळे आर्थिक संबंध आणि व्यवहाराकडे बघण्याचा आपल्या दृष्टीने दुटप्पीपणा येतो लाचखोर आणि वशिलेबाजी वाईट असेच आपण मानतो पण स्पर्धा इतकी तीव्र असते की आपण ओळखीपाळखी शोधून त्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो वशिलयाचा उपयोग झाला तर तो आपल्याला हवाच असतो पण वशिलेबाजी नसते असेही आपल्याला वाटते तीच गोष्ट भ्रष्टाचाराची स्वच्छ जीवन प्रामणिकपणा हे आपले आदर्श असतात पण आर्थिक विवेचना स्पर्धा यांच्या भाराने दडपून गेल्यावर आपण लाचखोरी चालवून घेतो आर्थिक स्पर्धा पुरेपूर अंगवळणी पडल्याने नफा घेणें तर आपल्याला मान्यच असते पण काळाबाजार. साठेबाजी. अडवणूक सावकारी. यासारख्या बाबी निष्पन्न होतात त्यांच्यावर आपण उगाच टिका करतो विषम अर्थ व्यवस्था आणि वर्गीय स्पर्धा आपल्यामध्ये दुहेरी नैतिकता निर्माण करत असते
लाचखोरी. भ्रष्टाचार. व वगैराचा आपल्याला जाच होतो तेव्हा आपण त्याचा विरोध करतो पण आर्थिक चढाओढ या गोष्टीचा आपणास फायदा होतो तेव्हा मात्र आपण हा "व्यवहारच आहे ""ही जगराहटीच आहे "किंवा टिकून राहण्यासाठी या गोष्टी करावयाच लागतात असे म्हणत आपण आपल्या कृतींचे समर्थन करतो
कामगारांसाठी विविध योजना विविध कायदे तयार करून सुध्दा कामगारांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत याला कामगार जबाबदार आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...
आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला -...
अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...