जामीन होण गुन्हा आहे का ?

 जामीन होण गुन्हा आहे का ? 



                मार्च महिना आला की जो कोणी जामीन असेल त्याच्यावर व कर्जदार यांचेवर टांगती तलवार डोक्यावर दिसते जामीन होणे म्हणजे सर्वच कर्जदार लबाड व फसवे नसतात काही कर्जदार आपणांस झालेल्या जामीनाला कमीपणा किंवा बॅंकेकडून फोन सुध्दा येवू देत नाहीत त्यांना जामीन होणे अडचणींचे जामीनाला वाटत नाही पण काही काही कर्जदार बॅंकेने मुदत देवून सुध्दा वर्षात एकही रूपया बॅंकेत कर्जाला भरत नाहीत मग काय जामीनदार अडचणीत येतो पण मला एक समजतं नाही बॅक कर्ज देताना संबंधित कर्जदार याची प्रापटी माॅरगेज करून त्याची होणारी किंमत त्यापैकी ६०/टक्के रक्कम कर्ज म्हणून मंजूर करते असे मला वाटते आणि या कर्ज व्यवहाराला एक माणूसकी नातं किंवा एखाद्याने दिलेल्या वचनांची परिपूर्णता किंवा दायितवाची फेड करण्याची जबाबदारी जामीनदार यांचेवर येते. जामीनदार यांना कोणताही फायदा कर्जदार किंवा बॅंक यांचेकडून नसतो कारण कर्जदार कर्जाचे पैसे घेऊन त्याचे काम करतो त्या पैशावर बॅंक व्याज मिळवते म्हणजे यात जामीनाला कोणताही फायदा नाही कर्जदार आणि बॅंक हे दोघे देणंघेणं चालू आहे तोपर्यंत जामीनाला विचारत सुध्दा नाहीत ‌ कर्ज थकित झाले किंवा अन्य कोणतीही समस्या निर्माण झाल्यास जामीनदाराला फोन येतो हातातले काम सोडुन जामीनदाराला. तासनतास विनाकारण अपराधी असल्यासारखे बॅंकेत आणून बसविले जाते त्यांना हिन वागणूक दिली जाते का कशासाठी बॅंकेने मिळविलेल्या व्याजातील काही रक्कम जामीनदाराला दिली जात नाही कर्जदार यांचेकडून कोणतीही रक्कम जामीनदार घेत नाही मग कशासाठी कर्जदार पैसे भरत नसेल तर तुम्ही भरा असा तगादा लावणे हे कोणत्या कायद्यात आहे का जेंव्हा कर्जदाराला कर्ज दिले जाते तेव्हा त्याची त्या कर्जाच्या डबल किंमतीची संपत्ती बॅंक लिहून दस्त करून घेत असते मग एकादा कर्जदार थकीत किंवा बॅकेस पैसे भरण्यास टाळाटाळ करत असेल तर जामीनदारांना न त्रास देता सदर प्राॅपटि निलाव करून रक्कम वसूल करण्याचा अधिकार बॅंकेला असताना जामीनदारांना का त्रास देता. कर्जदार मरणाच्या दारात असेल तरी बॅंकेचे पैसे बुडणार नाहीत कारणं मरताना तो संपत्ती घेवून जाणार नाही त्याच्या संपत्तीचा निलाव करून जर बॅंकेचे कर्ज भागत नसेल तर जामीनदार पुढील बघतील पण तुम्ही जर विनातारण कर्ज दिले असेल तर त्याला कोण जबाबदार म्हणजे कर्ज प्रकार. *जामीनकी कर्ज * माझे म्हणने एवढेच आहे जामीनदार यांना नाहक त्रास देवू नका अशा वेळेत जामीनदार सदर विभागाला अर्ज देवून आपला जामीन रद्द करण्याची तरतूद आहे

             जामीनदार होण्यासाठी अनेक मूलभूत बाबींची पूर्तता करावी लागते जामीनदार याने आपली आर्थिक क्षमता. कायमचा राहणेचा पत्ता. ओळखपत्र. आधार. स्टॅम्प. अशी एका कर्जदाराला जेवढी कागदपत्रे लागतात तेवढी कागदपत्रे जामीनासाठी लागतात म्हणजे कर्जदार कोण ? जामीन कोण. ? असा प्रश्न पडतो जर. बॅंक. पतसंस्था. व इतर वित्तीय संस्था यांना जर जामीन एवढा महत्वाचा असेल तर जामीनासाठी भरीव तरतूद करण्यात यावी 

*पोलिस प्रशासन आणि जामीन *हक्काचा जामीन * "स्वेच्छेने जामीन *अटकपूर्व जामीन. *इतर काही महत्वाच्या बाबी * उच्च किंवा सत्र न्यायालयाचे विशेष अधिकार. 

           जामीन म्हणजे एखाद्याने दिलेल्या वचनांची पूर्तता किंवा दायित्वाची फेड करविणयाची जबाबदारी प्रकारचे या अर्थाने हमी. हमीदार. प्रतिभू. संज्ञाचाही वापर होतो फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर बाबींसंबंधी पकडलेल्या किंवा पकडण्याचा संभव असणार्या व्यक्तिस न्यायलयात उपस्थित राहण्याची हमी घेऊन मुक्त करण्याकरिता न्यायाधिशांनी अनुसरलेली ही एक पध्दती आहे त्याला जामीन म्हणतात फौजदारी प्रमाणे दिवाणी कायद्यातही जामीन घेण्याचे अनेक प्रसंग येतात तया दृष्टीने कायद्यात जामीनाकरिता तरतूद करण्यात आली आहे फौजदारी गुन्ह्यांच्या आरोपाखाली पकडलेल्या व्यक्तिस चौकशी होईपर्यंत सोडणयाकरिता जामीनाचा उपयोग होतो फौजदारी कायद्यात विशेषतः गुन्हेगारांच्या दृष्टीने जामीनास विशेष महत्त्व आहे न्याय चौकशी अथवा तपासणी वेळी आवश्यकता पडल्यास उपस्थित राहण्याच्या प्रतिभूतीवर एखाद्याची कारागृहातून स्थानबद्ध किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांमुळे त्याचप्रमाणे संभाव्य अटकेतून तात्पुरती मुक्तता करणे असा फौजदारी कायद्याच्या दृष्टीने जामीनाचा साधारण अर्थ आहेे >

             जामीनदारास आरोपी उपस्थित बद्दल धोका वाटल्यास तर तो संबंधित आरोपीस सुपूर्द करू शकतो वा अटक करू शकतो जामीनदार अर्ज देऊन आपला जामीन केव्हाही रद्द करून घेऊ शकतो अशा परिस्थितीत आरोपीने नवीन जमानतदार देण्याची गरज आहे जामीनाचा उदेश्य शिक्षा करण्याचा नसून चौकशीच्या वेळी आरोपी उपस्थित मिळविण्याचा आहे जामीन नाकारणे किंवा सविकारणे हे एक न्यायिक कृत्य आहे आरोपी प्रतिष्ठीत आहे व तो जामीन देऊ शकतो एवढ्याच कारणांमुळे त्याचा जामीन मंजूर करण्यात येतो

* हक्काचा जामीन * 

फौजदारी कायद्यात काही गुन्हे जामीन योग्य आहेत तर काही गुन्हे जामीन अयोग्य. हक्काच्या. जामीन प्रकारात जामीन योग्य गुन्ह्याबद्दल जामीन मोडतो अशा प्रकारात जामीन हा आरोपीचा हक्क आहे इतकेच नव्हे तर संबंधित पोलिस अधिकारी किंवा न्यायाधीश वाटल्यास त्यास जमानदारा शिवाय नुसत्या मुचलका घेऊनही सोडू शकतो जामीन योग्य गुन्ह्याबद्दल जामीन नाकारता येत नाही पण जामीनावर मुक्तता झालेला आरोपी फरारी झाला किंवा ठरलेल्या तारखेस न्यायालयात उपस्थित झाला नाही तर न्यायालय त्याचा जामीन रद्द करून पुन्हा त्यास जामीनावर सोडत नाही त्यायोगे फौजदारी प्रक्रिया संहितेचया. ४४६ कलमान्वये न्यायालयास असलेल्या इतर अधिकारास बाधा येत नाही

*स्वेच्छाधीन जामीन *

न्यायालयाच्या सवेचछाधीन असलेलें जमीन या प्रकारात मोडतात जामीन अयोग्य गुन्ह्यांचे प्रकार दोन प्रकार आहेत

मृत्युदंड अथवा कारावासाची शिक्षा असलेलें गुन्हे (उदा ) खून (२) इतर शिक्षा गुन्हे. जामीन अयोग्य गुन्ह्यांच्या या दुसर्या प्रकाराबाबत जामीन मंजूर करणे अथवा नाकारने हे न्यायालयावर अवलंबून असते. दोषसिधदी होणा-या शिक्षेचा कडकपणा. उपलब्ध पुराव्याचे स्वरूप. अर्जदाराचे चरित्र. प्राप्तीचे मार्ग व प्रतिष्ठा. तो फरारी होण्याची शक्यता. वरील प्रकारात जामीन केला जात नाही 

              इंग्लंड मध्ये अशा स्थितीत जामीन नाकारणे किंवा जामीन देण्यास विलंब करणे ही बाब प्रजेच्या स्वातंत्र्य विरोधात गुन्हा समजण्यात येतो साधारण जामीन मंजूर करणे हा नियम आहे आणि नाकारणे हा अपवाद आहे. १९२३ चा १८ वा अधिनियम समंत करून पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेत जी सुधारणा करण्यात आली ती नुसार विधिमंडळाने ही हेच मार्गदर्शक ततव घालून दिले आहे नयायालयाने अन्य काही आदेश दिला असल्यास त्याच्या कारणांची नोंद करणे जरूरीचे असते जामीन अयोग्य गुन्ह्याची चौकशी संपल्यानंतर व निकाल देण्याच्या पूर्वी न्यायालयास आरोपीने गुन्हा केला नसल्याचे वाजवी कारणास्तव वाटले तर जामीन न घेता निकाल एकणयास उपस्थित राहण्याच्या मुचकलयावर आरोपी बंदिस्त असेल तर मुक्त करावयास पाहिजे. १९७३ चया सुधारित फौजदारी प्रक्रिया संहितेत कोणत्या परिस्थितीत न्यायालय आरोपीस सशर्त जामीन देऊ शकते या संबंधी कलम ४३७ उपकलम (३) मध्ये तरतूद आहे

* अटकपूर्व जामीन * 

          प्रत्यक्ष अटक होण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या जामीनास अटकपूर्व जामीन म्हणतात १९७३ चया नविन फौजदारी प्रक्रिया संहितेत ही तरतूद केली आहे जामीन अयोग्य गुनहयाबाबत अटक होण्याबाबत एखादे वाजवी कारणं असेल तर अशी व्यक्ती उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय यांचेकडे अटकपूर्व जामीन करिता अर्ज करू शकतो कलम. ४३८ (२) मध्ये नमूद केलेल्या अटिसह कोणतीही अट घालू शकते. दंडाधिकारी यांना अधिपत्र काढण्याची गरज भासली तर न्यायालयाच्या आदेशानुसार अनुरूप त्याने जामीन योग्य अधिपत्र काढावयास पाहिजे

* इतर महत्वाच्या बाबी *

          जामीनाची रक्कम प्रत्त्येक प्रकरणांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन ठरविली जाते. ती अधिक किंवा व बेसूमार नसावी. उच्च न्यायालय व सत्र न्यायालय ही रक्कम कमी करु शकते. कारागृहातील आरोपीस आदेश आलेबरोबर मुक्त करणे गरजेचे आहे. विशिष्ट परस्थिती एखाद्या इसमाकडून शांतता भंग होण्याचा धोका असल्यास शांतता व सदवरतनाबाबत जामीन घेणे अनिवार्य आहे. 

*उच्च किंवा सत्र न्यायालय *

       उच्च व सत्र न्यायालय यांना फौजदारी प्रक्रिया संहिता ४३९ वया कलमानुसार जामीनाबधदल विशेष अधीकार आहेत. कलम. ४३७ उपकलम (३)! मध्ये गुन्हा करण्यात आला असल्यास तर त्या कलमातील उल्लेख केल्याप्रमाणे उद्दिष्टा करिता दोन्ही पैकी कोणतेही न्यायालय इचछेअनरूप कोणतीही अट आरोपींवर लादू शकते दंडाधिकारी यांनी लादलेली अट जामीनावर मुक्तता करतांना रद्द करू शकते मात्र ज्या गुन्ह्याची चौकशी फक्त सत्र न्यायालय करु शकते किंवा ज्या गुन्ह्याची चौकशी होऊ शकत नसेल पण ज्यांना आजावी कारावासाची शिक्षा सांगितली आहे अशा प्रकरणी वकिलास सूचना देणे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३९ उपकलम (२) अन्वये ज्याची व जामीनावर मुक्तता झाली असेल त्यास अटक करण्याचा आदेशही उच्च किंवा सत्र न्यायालय आपल्या विशेष अधिकारात देवू शकते. फौजदारी प्रक्रिया संहिता उदेश आहे यास बाधा आणणारी परस्थिती टाळण्याकरिता ४८२ वया कलमानुसार असलेल्या अंगभूत अधिकार अन्वये उच्च न्यायालय जामीन योग्य गुनहयाकरिता मिळालेला जामीनही रद्द करु शकते इतकेच नव्हे तर आरोपीला अटक करण्याचा आदेश काढू शकते 

    * कलम. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६७ ( अ ) नुसार दिला जाणारा जामीन हा ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर आरोपीस हवालती. स्थानबद्ध. आजीव कारावास. किंवा दहा वर्षे. यांचे दोषपत्र साठ दिवसांत दाखल करणे अनिवार्य आहे

* कलम ४८२ अन्वये सदरिल आरोपीचा जामीन रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयास आहे

** कलम. ४३७ (अ. ) अन्वये आरोपी सुटका जरी झाली तरी जामीन देणे बंधनकारक आहे

* कलम. ४३८ अन्वये जर एखाद्या व्यक्तिस आपणास अटक होण्याची संभावना वाटत असेल आणि सदरील गुन्हा अजामीनपात्र असेलतर तर ती व्यक्ती सत्र न्यायालय अथवा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन ठेवू शकतो

* कलम ४३९ हे कलम ४३७ चा आधार घेऊन जामीन देण्याचा अधिकार सत्र न्यायालयास तसेच उच्च न्यायालयास देते

* जामीनदार कोणत्याही प्रसंगी आपला जामीन रद्द करू शकतो

* आरोपी याने खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे

* आरोपी बंदिवासातून मुक्तता केल्यास तो खटलया दरम्यान पुराव्यांची छेडछाड करणार नाही

*तो जामीनावर असताना साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही

*दुसरा कोणताही अक्षम्य अथवा न्यायालयीन प्रकारासंदरभात गुन्हा करणार नाही

*प्रकरण संपेपर्यंत फरार होणार नाही

* बंदिवासातून बाहेर आल्यावर सामाजिक शांततेस धोका निर्माण होणार नाही

*पोलिस तपासात अडथळा निर्माण करणारं नाही 

        जामीनदाराची भूमिका ही आरोपीच्या खटल्याचे कामी हजर राहणे बंधनकारक आहे 

    . समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा-

कलाकार...

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate....

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३



        या अधिनियमाच्या अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी व मुख्य जबाबदाऱ्या

             आज रेशन हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जागोजागी दोन नंबर ने सापडणारा रेशन चा तांदूळ टनामधये सापडत आहे हा सापडणारा गोरगरीब जनतेचा तांदूळ गोडाऊन मधून बाहेर येताना त्या त्या विभागातील अधिकारी यांच्या निगराणीत व सहि शिवाय बाहेर आला कसा आणि मार्केट व साॅमिल मध्ये लाखों रुपये किंमतीचा तांदूळ सापडतो याला जबाबदार कोण

             शासनाने विविध विभागांतील अधिकारी व आयुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी. अन्न धान्य वितरण अधिकारी. उप नियंत्रक शिधावाटप. तहसिलदार. यांना खालील प्रमाणे जबाबदारी दिली आहे

(१) विभागीय आयुक्त

  प्रमुख जबाबदारी

विभागातील सर्व जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चया अंमलबजावणी संनियंत्रण करणे त्यांच्या मासिक बैठकीत या योजनेचा आढावा घेणे

(२) जिल्हा अधिकारी

नियंत्रण शिधावाटप मुंबई

प्रमुख जबाबदारी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची प्रभावीपणे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सदर योजनेच्या सुरवातीच्या काळात प्रत्त्येक आठवड्यात बैठका घेवून आढावा घेणे आणि अंमलबजावणी उणिवा निराकारण करणे

(३) जिल्हा पुरवठा अधिकारी

अन्न धान्य वितरण अधिकारी

उप नियंत्रक अधिकारी

प्रमुख जबाबदारी

जिल्हा अधिकारी/नियंत्रक शिधावाटप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ चया अंमलबजावणी कारवाई करणे

(४) तहसिलदार/साहयक

अन्न धान्य वितरण अधिकारी

शिधावाटप अधिकारी

प्रमुख जबाबदारी

सदर अधिकारी त्यांच्या पुरवठा विषयक नियमित जबाबदार्या व्यतिरिक्त अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी पुढील जबाबदारी पार पाडतील

(१) पात्र लाभार्थी यादी अंतिम करणे

(२) याद्या प्रसिद्ध करणे

(३) लाभार्थी निवडीबाबत व अन्य अपेक्षांचे निराकरण करणे

(४) रास्त भाव दुकानात विहित कालावधीत धान्य उपलब्ध असेल व अनुज्ञेयप्रमाणे लाभार्थ्यास सर्वसाधारण दर्जाचे (f a q ) धान्य वितरित करणे

(५) भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त झालेलेfaq दर्जाचे अन्न धान्य अंतिमतः लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने रास्त भाव दुकानदारांची मार्गदर्शन पर कार्यशाळा वेळोवेळी घेणे

       आप आपल्या गावात रेशन दुकानदार अन्न धान्य कमी देणे नाव दिसत नाही. थम उठत नाही कारण बारा तास मोलमजुरी करणारे लोक यांच्या हाताला गठ्ठे पडतात त्यामुळे त्यांचा थम उठत नाही तर अशा लोकांना आधार कार्ड ग्राह्य धरुन रेशन अन्न धान्य मिळाले पाहिजे 

        अन्न धान्य वितरणाचा निकष

(१) भूमिहीन मजूर. असंघटित क्षेत्रातील कामगार. बांधकाम मजूर. ऊस तोडणी कामगार. वीटभट्टी कामगार. कोळसा कामगार. हंगामी स्थलांतर करणारे कामगार. 

(२) कातकरी. माडिया. गोंड. आणि कोलमसारखया अतिमागास जमातीचे कुटुंब

(३) अल्प भूधारक. आणि लहान शेतकरी 

(४) ज्या कुटुंबात एक एकर पेक्षा कमी जमीन आहे आणि ज्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे

(५) ज्या कुटुंबात कुटुंब प्रमुखाला गंभीर आजार झालेला आहे

(६) ज्या विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन झालेले नाही

(७) फुटपाथवर. दलदलीच्या जमीनीवर राहणारे बेघर लोक

(८) निराधार महिला. वेश्याव्यवसाय करणा-या महिला. कुटुंब प्रमुख महिला असलेली कुटुंबे. 

(९) तृतीयपंथींची निवड सुध्दा केली आहे

(१०) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब 

वरील प्रमाणे सर्वजण लाभार्थी म्हणून घोषित केले आहे

दिवयांग (अपंग) यांना शासन निर्णयानुसार लवकरात लवकर रेशनकार्ड देणे बंधनकारक आहे आणि ते सुद्धा प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेनुसार देणे बंधनकारक आहे

            वरील प्रमाणे उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण निवेदन मागणी अर्ज. प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अन्न धान्य कृती समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

आज हा संदेश वाचणार या सर्वांनी आप आपल्या जिल्ह्यात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आॅफिस असेलतर त्या आॅफिस ची आजची परिस्थिती काय आहे मंडळ चालू आहे बंद आहे याचा रिपोर्ट मला पाठवा 

       बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ज्या कामगारांनी केली असेल तर सहाय्य कामगार आयुक्त आॅफिस कडून आपणास मॅसेज आला असेल की आपला नोंदणी अर्ज खालील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे तर काळजी करू नका आपण तिथे कामगार नोंदणी केली आहे तेथें जाऊन आपला नोंदणी अर्ज नेटवर ओपन करून रद्द नोंदणी अर्जाची कारणे बघू शकता.

वाचा-

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen...

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA...

कलाकार...


खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj

 खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी.  अनुसूचित जाती जमाती

    


    आपल्या ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून. जिल्हा परिषद या माध्यमातून. पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात वाढती लोकसंख्या आणि रोज वाढत जाणारी बेरोजगारी याला आळा बसावा म्हणून जिल्हा परिषद यांचेकडून   सर्वसामान्य जनतेसाठी 

(१) बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना. याअंतर्गत वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येतो

(२) आदिवासी उपाययोजना. दुधाळ जनावरांचे व शेळ्या वाटप. त्याचे खाद्य यासाठी अनुदान मिळते

(३) अनुसूचित जाती उपयोजना.  दुधाळ जनावरांचे व शेळ्या वाटप त्यांचे खाद्य जंतनाशक यासाठी अनुदान मिळते

(४) जिल्हा परिषद सेस निधी

(१) साहित्य पुरवठा योजना

(२) मैत्रिण योजना

(३) मिलकंग मशीन वाटप

वरील सर्व योजना वाटप करण्याच्या योजना कौतुकास्पद आहेत पण त्यात मोठा अडसर आहे तो म्हणजे जातीच्या दाखल्याचा. म्हणजे एका बाजूने योजना सुरू करायची आणि त्यात असा काय अडसर घालायचा की ती योजना सर्वसाधारण व्यक्तिला मिळाली नाही पाहिजे त्याने सरकारी आॅफिस चे उंबरे झिजवायचे आणि शेवटी जातींचा दाखला नाही म्हणून योजना मिळाली नाही म्हणून गप्प बसायचे आणि या गोरगरीब जनतेसाठी असणार्या योजना मोठे नेते व त्यांचे बगलबच्चे केंव्हा घेतात आपणास कळतंच नाही 

(१) दुधाळ जनावरांचे गट वाटप

आदिवासी क्षेत्राच्या बाहेर असणारे सर्वसाधारण नागरिक.  आदिवासी भागातील रहिवासी आणि अनुसूचित जातीच्या लोकांसाठी जिल्हा परिषद यांचेकडून हि योजना राबविण्यात येते यामध्ये दुभत्या जनावरांना गट घेण्यासाठी ५०/टक्के अनुदान मिळते

* योजना वैशिष्ट्ये निकष

* अनुदान मिळविण्यासाठी पंचायत समितीकडे विहित नमुन्यातील अर्ज करावा लागतो

*लाभार्थींना मे २००१ नंतर तिसरे अपत्य नसावें

*या योजनेअंतर्गत दोन संकरित गाई किंवा म्हैस पुरवठा केला जातो गाय किंमत जास्ती जास्त १४००० रूपये तर म्हैस किमत जास्ती जास्त १६००० निश्चित करण्यात आली आहे

* गटांची किंमत जास्ती जास्त २८००० रुपये निश्चित करुन त्यामध्ये ५०/टक्के म्हणजे १४००० रुपये अनुदान मिळते

* इच्छुक लाभार्थ्यांचे घरी शौचालय आहे असा दाखला जोडणे आवश्यक आहे

*दुधाळ जनावरांना विमा या योजनेतून उतरविला जातो

* लाभार्थी निवड करताना महिला ३३/ टक्के प्राधान्य आहे

(२) जंतनाशक पुरवठा योजना

जिल्हा परिषद यांचेकडून ही योजना अनुसूचित जाती साठी राबवली जाते शेळ्या मेंढ्या व कोंबडी यांना जंतनाशक पाजणे क्षार मिश्रण पुरविणे व परजिवी किटकाचे नियंत्रण करणे औषध पुरवठा करणे यासाठी या योजनेतून १००/टक्के अनुदान मिळते

* योजना वैशिष्ट्ये निकष

* या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्या पशुधनाची माहिती द्यावी

* पशुधनासाठी खासगी ठिकाणावरून जंतनाशक वा अन्य औषध घेण्यास लोक फारसे उत्सुक नसतात कारण ही औषधे संबधिताना परवडतातच असे नाही त्यामुळे १००/ टक्के अनुदानावरील ही योजना लाभार्थी साठी महत्वाची आहे

* पशुपालकांनी नियमित वैद्यकीय अधिकाराच्या सल्ल्यानुसार जनावरें शेळ्या मेंढ्या व कोंबडी नियमित जंतनाशक दिले तर विविध रोगावर नियंत्रण होण्यास मदत होईल

(३) शेळ्यांचे गट वाटप योजना

विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी क्षेत्राबाहेर व अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून ही योजना राबविण्यात येते त्याअंतर्गत शेळ्यांच्या गट घेण्यासाठी अनुदान

*योजना वैशिष्ट्ये निकष

* या योजनेअंतर्गत दहा शेळ्या व एक बोकड असा गट घेण्यासाठी ७५/ टक्के अनुदान मिळते

* निवडलेल्या लाभार्थी मध्ये महिलांना ३३/ टक्के अनुदान मिळते

* इच्छुक लाभार्थी २००५ नंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये नसावीत

* घरि शौचालय असल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे

*इच्छुक लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्याचा प्राधिकृत अधिकारी यांचा दाखला असणे गरजेचे आहे

*शेळ्यांच्या गटांसाठी २५/ टक्के रक्कम लाभार्थी व्यक्तिस भरावी लागते वरची ७५/ टक्के रक्कम अनुदान मिळते. योजनेचा प्रकल्प खर्च. ७१/ हजार २३९ रूपये निर्धारित करण्यात आला आहे त्याच्या २५/ टक्के म्हणजे १७ हजार ८१० रूपये लाभार्थी व्यक्तिस भरावे लागतात तर ५३ हजार ४२९ रूपये अनुदान मिळते

* दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना ( १ हेक्टर ) व अल्प भूधारक ( २ हेक्टर ) सुशिक्षित बेरोजगार  महिला बचत गट.  सदस्य. 

(४) चाळीस शेळ्यांचा गट वाटप योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अवर्षणप्रवण गावाच्या विकासासाठी ही योजना राबविण्यात येते यामध्ये चाळीस शेळ्या व दोन बोकडे या संयुक्त गटांसाठी ५०/ टक्के अनुदान मिळते

* योजना वैशिष्ट्ये निकष

*अर्ज पंचायत समिती कडे सादर करावा लागतो

* अवर्षणप्रवण गावातील १८/६० वयोगटातील व्यक्ति लाभार्थी

* शेळ्यांचे संगोपन.  निवारा. सुरक्षितता.  यासाठी तीन गुंठे जागा आवश्यक आहे 

* शेळया बोकड खरेदी निवारा पाण्याची व्यवस्था. शेडनेट मुरघास.  विधुततीकरण.  कडबा कुट्टी.  आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण.  या सर्वांसाठी तीन लाख रुपये खर्च ग्राह्य धरला जातो त्यामध्ये लाभार्थ्यास ५०/ टक्के म्हणजे दीड लाख रुपयांचे अनुदान मिळते

* ही योजना बॅक कर्ज याशी निगडित आहे

*लाभार्थी व्यक्तिस २००१ नंतर तिसरे अपत्य नसावें

* दारिद्रय रेषेखालील.  अल्प भूधारक.  शेतकरी.   सुशिक्षित बेरोजगार.   महिला शेतकरी. यांना प्राधान्य देण्यात आले आहे 

अंशतः ठाणबंद पध्दतीने शेळीपालन. / मेंढी पालन

राज्य सरकारचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यामध्ये दहा शेळ्या आणि एक बोकड ( दहा मेंढ्या व एक नर मेंढा )असा संयुक्त गट आहे

योजना वैशिष्ट्ये निकष

*ही योजना मिळविण्यासाठी पंचायत समिती यांचेकडे अर्ज दाखल करावयाचा आहे

* लाभार्थी निवड करताना त्यात ३/ टक्के अपंगांना व ३३/ टक्के महिलांना प्राधान्य दिले जाते

* लाभार्थी व्यक्ती चे घरी शौचालय असणे गरजेचे आहे

*ही योजना बॅकशी निगडित आहे

*दारिद्रय रेषेखालील कुटुंब.   अत्यल्प भूधारक.   सुशिक्षित बेरोजगार.  महिला शेतकरी. याना प्राधान्य देण्यात आले आहे

(६) पशुखाद्य अनुदान योजना

जिल्हा परिषद यांचेकडून दुधाळ जनावरांना खाद्य पुरवठा करण्यासाठी १००/ टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येते 

योजना वैशिष्ट्ये निकष

* जिल्हा परिषद यांचेकडून हि योजना १००/टक्के अनुदानावर राबवली जाते त्याअंतर्गत दुधाळ जनावरांसाठी खाद्यपुरवठा केला जातो

योजना वैशिष्ट्ये निकष

* आदिवासी व आदिवासी क्षेत्राबाहेरील.  अनुसूचित जाती जमाती. आदी प्रकारच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो

*इच्छुक लाभार्थ्यास मे २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य नसावें

* दुधाळ जनावरांच्या भाकड ( गाभण ) काळासाठी पशुखाद्य पुरवठा केला जातो

*म्हैस यासाठी २२५/ किलो व गाईसाठी १५०/ किलो पशुखाद्य पुरवठा अनुदानातून केला जातो

*घरी शौचालय असणे गरजेचे आहे

*लाभार्थी अनुसूचित जाती जमाती चा असावा 

(७) कडबा कुट्टी यंत्र

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र यासाठी ५०/ टक्के अनुदान मिळते यामुळे चारा कमी वेळात बारीक होतो खराब होत नाही वाया जात नाही त्यामुळे पशुपालन करणारे यांच्या खर्चात बचत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

* पंचायत समिती यांचेकडे अर्ज दाखल करण्याची गरज आहे

*पाच सहा दुभती जनावरे असणे गरजेचे आहे रहिवासी दाखला आणि घरी शौचालय असल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे

*कडबा कुट्टी यंत्र मिळविण्यासाठी ५०/टक्के अनुदान शेतकरयांना मिळते

*कडबा कुट्टी यंत्र यामुळे चारा. वाया जात नाही

(८) कुक्कुटपालन योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला ५०/ टक्के अनुदान मिळते आधुनिक तंत्रज्ञान व योग्य नियोजन करून हा व्यवसाय केला जातो

योजना वैशिष्ट्ये निकष

* ही योजना मिळविण्यासाठी पंचायत समिती यांचेकडे अर्ज करण्याची गरज आहे

* एक हजार मांसल पक्षी (कोंबड्या ) घेण्यास अनुदान मिळते

*पक्षिगृह ( शेड ) पाण्याची टाकी.   विधुततीकरण अशी व्यवस्था

* एक हजार मांसल पक्षी कोंबड्या शेड व इतर व्यवस्थेसाठी अंदाजित खर्च सव्वादोन लाख रुपये त्याच्या ५०/ टक्के म्हणजे १'१२'५०० रूपये अनुदान मिळते

* अत्यल्प भूधारक व शेतकरी.  सुशिक्षित बेरोजगार.   महिला शेतकरी. ‌यांची निवड केली जाते

* लाभार्थी निवड जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होते

(९) जनावरांचे लसीकरण योजना

केंद्र सरकार योजनेतून ग्रामीण भागात सर्व जनावरांचे लसीकरण मोफत केले जाते खासगी ठिकाणी विविध रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेणे खर्चिक असल्यामुळे ही योजना पशुपालकासाठी फायदेशीर आहे

योजना वैशिष्ट्ये निकष

* या योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही

* जनावरांच्या तोंडाला व पायांना होणारा रोग

* या योजनेअंतर्गत गाय म्हैस. लाळ खुरत प्रतिबंध लस मोफत दिली जाते

*गोवोगावचया पशुधन विकास केंद्राकडून ही सेवा घरपोच दिली जाते

* पशुपालकांना प्रशिक्षण देणे

* ५०००रूपये. अनुदान मिळते लसीकरण.  प्राथमिक औषध उपचार.  चारा पिके.    मुक्त संचार.  गोठा.   दुभत्या जनावरांची काळजी.  यासंदर्भात तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते

(१०) मैत्रिण योजना 

*पंचायत समिती यांचेकडे अर्ज करावा लागतो

*शेळी पालन किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा

२५ /टक्के भरावे लागतात आणि ७५/टक्के अनुदान मिळते

(११) मिलकिंग मशीन 

*पंचायत समिती यांचेकडे अर्ज करावा लागतो

*शौचालय दाखला.   पशुपालकांना योजनेचा लाभ.  किंमत ४८ हजार रुपये.  ५०/टक्के रक्कम भरावी म्हणजे  २४ हजार अनुदान मिळते.  २००१ नंतर तिसरे अपत्य नसावें   ६० गुंठे जमीन असावी.  

(११) मुरघास योजना

*पंचायत समिती यांचेकडे अर्ज करावा

(१२) पशुविमा योजना

*पंचायत समिती कडे अर्ज करावा

(१३) पशुपालकांना साहित्यासाठी अनुदान

(१४) वैराण विकास योजना

(१५) आदर्श गोपालक योजना

(१६) कामधेनू दत्तक योजना

(१७) पशुपालकासाठी बक्षीस योजना

(१८) पशुपालकासाठी प्रशिक्षण

(१९) वंध्यत्व निवारण शिबिर

(२०) लाळ खुरत लसीकरण योजना

(२१) निकृष्ट चारयावर प्रक्रिया

(२२) नर बोकड पुरवठा योजना

        वरील सर्व योजना मिळविण्यासाठी पंचायत समिती यांचेकडे अर्ज करावा लागतो अनुसूचित जाती जमाती भूमिहीन शेतमजूर महिला शेतकरी यांना याचा लाभ देणे बंधनकारक आहे

     आजच आपल्या जवळच्या पंचायत समिती यांच्याकडे चौकशी करा आणि योजनांचा लाभ घ्यावा 

 .            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा-

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate..

राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA...

वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण...

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen...

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate

 अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ 



गोरगरीब कुटुंबातील मुलांना

 मिळणार हक्काचे शिक्षण

     समाजकल्याण विभाग यांचेकडून गरिब परस्थिती शिक्षण घेणारे मुलं मुली यांना सगळे शिका "शिक्षण हा आमचा अधिकार आहे. " असे म्हणणारे विद्यार्थी यांचेसाठी प्रत्त्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभाग यांचेकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात 

                  "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " हे सर्व शिक्षणाशिवाय शक्य नाही आत्ता आणि आजच आपण व आपले पालक समाजकल्याण विभागाला भेट द्या आणि योजना मिळविण्यासाठी कागदोपत्री पूर्ततेसह आपला हक्क मिळवा

(१) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ध्यानात घेवून शासनाने अशी योजना चालू केली आहे

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* या योजनेसाठी माध्यमिक विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव संबंधित विधयालयाकडून पाठविला जातो

* अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* विमुक्त जाती भटक्या जमाती. अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* दुर्बल घटकात मोडणारा विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ होतो

    आत्ता या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आली आहे

(२) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

        समाजकल्याण विभागाकडून शाळेतील मुलींची गळती रोखण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे मागासवर्गीय समाजातील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे

    योजना वैशिष्ट्ये / निकष

* या योजनेतून विमुक्त जाती / भटक्या जमाती / अनुसूचित जमातीच्या / मुलीच्या गळतीचे प्रमाण कमी करणे व रोखण्यासाठी करण्यात आला आहे

* इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा. ६०/ रूपये शिष्यवृत्ती मिळते तर आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा १००/ रूपये शिष्यवृत्ती मिळते शैक्षणिक वर्षात दहा महिने ही शिष्यवृत्ती योजना दिली जाते

* संबंधित विद्यालयातून अशा मुलींचे प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो

* शैक्षणिक खर्चाच्या अडचणी सोडविण्यासाठी मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होतो

* या योजनेमुळे ग्रामीण भागात मुलींची शाळेत १००/टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक करण्यात आले आहे

(३) डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह

        समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुलीकरिता अशा प्रकारचे शासकीय वसतिगृह चालविले जाते यामध्ये मिळत असलेल्या सुख सोयी सोयीसुविधा. मागासवर्गीय समाजातील मुला मुलींना शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणीत असलेलें मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अशा वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करता येते

* अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करिता प्रत्त्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा असते 

* निवासी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करीता प्रवेश मिळतो

* निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना. भोजन. निवास. व इतर शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात

*मागासवर्गीय समाजात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्या या या योजनेमुळे सोय होते शिक्षण पूर्ण करण्यासाठी व विकास साधण्यासाठी मदत मिळते

     सदर योजनेत आत्ता बदल करण्यात आला आहे

(४) मुला. मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

     मागासवर्गीय मुला मुलींची व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व मुलींची शिक्षणाची सोय व्हावी व उच्च शिक्षण घेण्यास मदत होऊन त्यांचा विकास व्हावा यासाठी अशी वसतिगृहे समाजकल्याण विभागाकडून चालवली जातात

योजना वैशिष्ट्ये/निकष

*शासकीय वसतिगृहात मुलांना. निवास. भोजन. अंथरुण. पांघरुण. मोफत दिले जाते 

* शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. पाठ्यपुस्तके. वह्या. स्टेशनरी. यांचा मोफत पुरवठा केला जातो

* वैयक्तिक व अभियांत्रिकी. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार. सटेथोसकोप. अॅप्रन. बाॅयलर. सूट. कलानिकेनचया मुलांसाठी. रंग. कलर बोर्ड. ब्रश. कॅनव्हास. मिळते

* वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी मासिक निर्वाह भत्ता मिळतो

* विभागीय पातळीवर दरमहा २००/रूपये. जिल्हा पातळीवर दरमहा ७५/ रूपये व तालुका पातळीवर दरमहा ५०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो

* अशा वसतिगृहात मध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो

* विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये चया आत असावे*इयत्ता आठवी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो

* अशा वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शालेय विद्यार्थी साठी १५/ मे पूर्वी तर महाविद्यालयीन विद्यार्थी साठी ३०/जून किंवा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांपर्यंत असतो

(५) विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन

समाजकल्याण विभागाकडून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता व विद्यावेतन दिले जाते शैक्षणिक व दैनंदिन गरजा भागवतांना या योजनेतून मदत होते

  योजना वैशिष्ट्ये/ निकष

* वैयक्तिक. अभियांत्रिकी. शेती. असे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती मुलांच्या साठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते

*या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २३५/ ते ७४०/ निर्वाह भत्ता मिळतो

* व्यवसायिक शिक्षण घेताना येणारा खर्च फक्त शिष्यवृत्ती वर भागविणे शक्य नसलेमुळे त्यांना निर्वाह भत्ता मिळतो* महाविद्यालयाच्या वसतिगृहात. शासकीय वसतिगृहात. व इतर वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतून निर्वाह भत्ता दिला जातो

* बी एड. डी. एड. असे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधिचे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००/ रुपये विद्यावेतन दिले जाते हे विद्यावेतन शैक्षणिक वर्षात दहा महिन्यांसाठी दिलें जाते

* व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतनचा प्रस्ताव संबंधित महाविद्यालय / संस्था. कडून सरकारकडे पाठवला जातो

(६) भारत सरकारची शिष्यवृत्ती

केंद्र सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते यामुळे विद्यार्थ्यांना आपलीं शैक्षणिक गरज भागविण्यासाठी मदत होते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी व त्यांचे गळती प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकार कडून शिष्यवृत्ती दिली जाते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती शालांत परीक्षेनंतर मिळते

*पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे

*दरमहा. १४०/ रूपये ते ३३०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो

*ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता. शिक्षण शुल्क. परीक्षा शुल्क. व इतर बाबींवरील खर्च शुल्क या स्वरुपात मिळते

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वताच्या विकास करण्यासाठी या योजनेची मदत होते

(७) छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी साठी ही योजना राबविण्यात येते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक. विकास. गुणवत्ता. वाढावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते

*इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला मुलींना ही शिष्यवृत्ती मिळते

*इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत दरमहा ३०० रुपये एकूण ३००० रूपये शिष्यवृत्ती मिळते

(८) पुस्तक पेढी योजना

समाजकल्याण विभागाकडून वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी अनुदान मिळते

* वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. सीए. एम एम बीए. व विधी. अशा महाग पुस्तकांसाठी अनुदान मिळते

*अनुसूचित जमातीच्या व भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*पुस्तकाचा खर्च झेपत नाही म्हणून शिक्षण बंद करावे लागणार या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

*पुस्तक पेढी योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी संबंधित महाविद्यालय यांचेकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविला जातो

(८) सफाई कामगार पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसाय ( सफाई कामगार ) करणार्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा विकास व्हावा यासाठी समाजकल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते

* ही योजना सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे

*योजनेच्या निकषांत बसणारा विद्यार्थी प्रस्ताव शिष्यवृत्ती साठी विधयालयाकडून पाठविलें जातात

* गणवेश. शैक्षणिक खर्च. भागवतांना अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मुलांना मदत मिळते

(९) मोटर वाहन चालक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध युवकांना समाजकल्याण विभागाकडून मोटर चालविण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. स्वावलंबी होण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने युवकांना अधिकृत संसथाचालकाकडून चालक वाहक प्रशिक्षण मिळते

*प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची. वयोमर्यादा. शैक्षणिक. शारीरिक. जातीचा दाखला. ही अट आहे

*प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर. वाहन चालक परवाना. परिक्षा घेऊन.  

*अधिकृत वाहन चालविण्याचे. वाहकाचे प्रशिक्षण. मोफत मिळून संबंधित विभागाचा अधिकृत परवाना मिळतो

(१०) व्यवसायिक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती अल्पशिक्षित बेरोजगारांना. "मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण " या उपक्रमातून मोफत व्यवसायांचे प्रशिक्षण मिळते व्यवसाय उभारणी तरूणांना या प्रशिक्षणाचा उपयोग होतो

योजना वैशिष्ट्ये निकष

* हि योजना फक्त अनुसूचित जातीतील अल्पशिक्षित बेरोजगारांना होणार आहे

* प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे कमीत कमी शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत असावे

* शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण कमीत कमी एक आठवडा व जास्ती जास्त दोन महिने कालावधी पर्यंत मिळते

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे शिक्षण दिले जाते प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थी तरुणास टुलकिट. व १००/ रुपये दरमहा वेतन दिले जाते

*अलपशिक्षणावर व्यवसाय करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होते प्रशिक्षणानंतर तरुणांना स्वताच्या स्वयंरोजगार मिळवता येतो

(११) औधोगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विद्यावेतन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजनेतून विद्यावेतन मिळते त्यामुळे व्यवसायाचे तांत्रिक शिक्षण घेवून विविध क्षेत्रात काम करता येते

योजना वैशिष्ट्ये निकष

* संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा ६०/ रुपये विद्यावेतन मिळते अशांना समाजकल्याण विभागाकडून दरमहा ४०/ रूपये विद्यावेतन मिळते

* तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही अशा विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून. दरमहा १००/ रुपये विद्यावेतन मिळते

* या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६५;२९०/ रुपये पेक्षा जास्त नसावे

* अनुसूचित जमातीच्या व मान्यताप्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरमहा शैक्षणिक खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी यांचा उपयोग होतो

* योजनेच्या निकषांत बसणारा या विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव सरकारकडे संबंधित औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडून पाठविला जातो

(१२) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध कुटुंबासाठी हि योजना राबविण्यात येते भूमिहीन कुटुंबातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांचा विकास व्हावा हा योजनेचा उद्देश आहे

* या योजनेअंतर्गत लाभार्थींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन मिळते

* जमीन खरेदीसाठी योजनेतून ५०/ टक्के अनुदान तर ५०/ टक्के बिनव्याजी कर्ज

*जमीन खरेदीसाठी घेतलेलं ५०/टक्के कर्ज परत फेड करण्याची मुदत १० वर्ष असते. कर्ज मंजूर झाल्यानंतर परतफेड दोन वर्षांनंतर सूरू केल्यास चालते

* अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

* लाभ देताना दारिद्र्य रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. विधवा. परित्यक्ता अर्जदारांना प्राधान्य दिले जाते

*लाभ घेणाऱ्या लाभार्थी साठी वय वर्षे १८/६०/ या दरम्यान असावे लागते

*या योजनेमुळे दुर्बल घटकातील शेतमजूर यांना हक्काचे रोजीरोटी साधनं मिळू शकते

(१२) पाॅवर टिलर योजना

अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून पाॅवर टिलर साठी. १००/टक्के अनुदान मिळते मजुरांच्या वाढत्या दरामुळे पाॅवर टिलरचया साह्याने शेती सहजपणे कसता येते

योजनेची वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी महाराष्ट्र मधील असावा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा

* अर्जदार अल्पभूधारक / कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभार्थी असावा

*अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ४०००० रूपयांपेक्षा कमी असावे

*योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा

*अर्जदाराचा अधिकृत अधिकार्यांकडील जातींचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१२) गटाई कामगारांना पत्र्याचे सटाॅल पुरविणे

गटाई काम करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती लोकांना या योजनेतून स्टाॅल मिळतात त्यामुळे हा व्यवसाय सुरक्षित करणे सोपे जाते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो

*योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ पुर्ण असावे

* ग्रामीण भागातील लाभार्थी उत्पन्न वार्षिक. ४०००० रूपये चया आत असावे व शहरी भागासाठी ५० हजार चे आत असावे

* अर्जदार मागत असलेलें स्टाॅल त्यांच्या स्वताच्या जागेत असावे

* चर्मकार समाजातील काही दुर्बल घटक रस्त्यावर उघड्यावर रस्त्याच्या कडेला गटाई काम करतात त्यांना सुरक्षितपणे हे काम करण्यासाठी स्टाॅलचा उपयोग होतो

* लोखंडी पत्र्याच्या स्टाॅलबरोबर लाभार्थ्यास चामडी साहित्य घेण्यासाठी ५००/ रुपये अनुदान मिळते

*या समाजाच्या लोकांना या योजनेमुळे उपजीविकेचे साधन उत्पन्नाचे साधन मिळते

* अर्जदाराने अधिकृत अधिकारयाकडील जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१३) आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

समाजातील भेदभाव संपावा समतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी दोन वेगवेगळ्या जातीमधील विवाह केलेल्या व्यक्तिंना या योजनेतून अनुदान मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती / भटक्या जाती / यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू. जैन. लिंगायत. शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यांना अनुदान मिळते

* आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना एकत्रित. ५०'००० रूपये अनुदान मिळते

*आंतरजातीय विवाहानंतर समाजाकडून कुचंबणा होऊ नये म्हणून योजनेतून प्रबोधन केले जाते

*आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन रूपात मिळालेले अनुदान संसार उभारण्यासाठी उपयोगी पडते

* या योजनेमुळे आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत होईल

(१४) कन्यादान योजना

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होवून विवाह करणार्या मागासवर्गीय जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते नवीन संसार उभारताना या जोडप्यांना अनुदानाची मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध ( धनगर वंजारी ) विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते

* सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या वरील जातीच्या जोडप्यांना. १० :००० रूपये अर्थ सहाय्य. वधूचे आई वडील किंवा पालकांच्या नावे धनाअदेश विवाहाच्या दिवशी देण्यात येते

* सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना प्रत्त्येक जोडप्यांमागे. २:००० रूपये प्रोत्साहन अनुदान मिळते

* गरीब कुटुंबांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे विवाहाचा अतिरिक्त खर्च वाचतो

*सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे साधेपणा मुळे विधिवत विवाह करण्यासाठी समाजात प्रबोधन होण्यास मदत होते

(१५) अत्याचारित कुटुंबास अर्थ सहाय्य योजना

अत्याचाराचे बळी ठरणारया अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना समाजकल्याण विभागाकडून अर्थ सहाय्य

योजना वैशिष्ट्ये निकष

* जातीच्या कारणावरून अतयाचारास बळी पडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या योजनेतून अर्थ सहाय्य मिळते

* अनुसूचित जाती जमाती कुटुंबावर / व्यक्तिवर अत्याचार घडल्यास व या गुन्ह्याची नोंद नागरि हक्क संरक्षण अधिनियम १९५५ खाली अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास या योजनेतून अनुदान मिळते

* योजनेतून लाभासाठी जातीचा दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते

* अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर कमीत कमी २५:००० रूपये ते जास्तीत जास्त २ लाख रूपये पर्यंत अर्थ सहाय्य मिळते

*अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांचे /सदस्यांचे या योजनेमुळे पुनर्वसन होण्यास मदत होते

(१६) वृध्द कलावंत पेन्शन योजना

राज्य सरकारच्या या योजनेतून वृध्द कलावंतांसाठी वृध्दापकाळात पेन्शन मिळते. आणि उतरत्या वयात त्यांना उपजीविका करणेस मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी वृध्द कलावंत यांनी विहीत नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा

*तमाशा. नाटक. लोककला. चित्रपट. यामध्ये काम केलेल्या व वयाची ६० वर्ष पूर्ण असलेल्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*इच्छुक वृध्द कलावंत म्हणून काम केल्याची माहिती पुरावे ( फोटो. कात्रणे. प्रमाणपत्र. इत्यादी ) जोडावी

*रेशनकार्ड. गाव कामगार उत्पन्न दाखला. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*पेन्शन योजनेमुळे वृध्द कलावंत लोकांना सुरक्षितता मिळते

(१७) पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना या योजनेतून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळते यामुळे समाजातील युवकांना सैन्य व पोलीस भरतील मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध असावा. प्रशिक्षणासाठी वय. १८ ते २५ दरम्यान असावा. उमेदवारांची छाती. उंची. इत्यादी सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार असावी. उमेदवार. इयत्ता बारावी उत्तीर्ण व शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तीन महिन्यांचा कालावधी असतो. तीन महिने पूर्ण कालावधीत उमेदवारांची राहण्याची सोय प्रशिक्षण संस्थेत केली जाते. पोलिस प्रशिक्षणात. धावने. उंच उडी. लांब उडी. गोळाफेक. पुल अप्स. आॅपटिकलस रससी खेच. चढणे उतरणे. हे प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीत चांगली संधी मिळू शकते.  

     आत्ता आपण वरील मॅसेज पूर्ण पणे वाचला असेल तर आपल्या ध्यानात एक गोष्ट आली असेल ती म्हणजे समाजकल्याण विभाग असो वा कोणताही विभाग त्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अट कायमस्वरूपीअडसर म्हणून घातली जाते ती म्हणजे जातींचा दाखला हा सर्व खेळ आहे कारणं खरोखरच या योजनेस पात्र असणारा लाभार्थी आजच्या घडीला आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करु शकत नाही कारणं त्यांच्याकडे ६० वर्षाचा पूरावा नाही. 

          खरोखरच सर्वसामान्य माणसाची मुलं मुली शिकावी असे वाटत असेल तर जातीच्या दाखल्याची अट रद्द करा नाहीतर योजना बंद करा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम२०१३ कायदा  रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ....

राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA....

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2...

कलाकार - ...

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA


महाराष्ट्र- मुंबई


सध्या महाराष्ट्रात कोविड च्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, संभाव्य वाढणा-या रुग्णांचे हित लक्षात घेऊन ऑक्सिजन, रेम्डेसिवीर इंजेक्शनची व रक्ताची पुरेशी उपलब्धता व्हावी याकरीता अन्न व औषध प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.  औषध नियंत्रण,भारत सरकार यांनी सदर औषधाच्या उत्पादन व विक्री/वितरणासाठी मे.सिप्ला लि., मे. हेटेरो हेल्थकेअर व मे. मायलॅान लि.,  मे. झायडस कॅडिला, मे. डाँ. रेडिज,  मे. ज्यूबीलंट लाईफ सायंसेस व मे. सन फार्मा. या औषध उत्पादकांना उत्पादन व विक्री/वितरणासाठी अनुमती दिलेली असून, सध्या एकूण 7 औषधी उत्पादकांचा Remidesivir Injection चा साठा गंभीर रूग्णांकरीता उपलब्ध आहे. सदरच्या औषधांचे विक्री वितरण हे त्यांच्या भिवंडी, नागपूर व पूणे इत्यादी डेपोमधून संपूर्ण राज्यात शासकिय /निमशासकिय रूग्णालये , संस्था व वितरकांना पुरवठा होत आहे.

सदर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची परिस्थिती पाहता डॉ. राजेंद्र शिंगणे , माननीय मंत्री महोदय,अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, श्री. सौरभ विजय, माननीय सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व श्री. अभिमन्यू काळे, माननीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांनी दिनांक ०४.०४.२०२१ रोजी रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादकांचे व मेडिकल ऑक्सिजन उत्पादक यांचे प्रतिनीधी व प्रशासनाचे अधिकारी यांचे सोबत तातडीची बैठक घेतली व महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त इंजेक्शनचा  पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.  तसेच त्यानुसार सर्व उत्पादकांनी प्राधान्याने  महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे 5000०  ते ६०००० इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात Remdesivir Injection चा फारसा तुटवडा नाही.

          शासनाने दिनांक 30/03/2021 च्या आदेशान्वये राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठयापैकी 80 टक्के साठा हा वैदयकिय वापरासाठी राखीव ठेवला आहे.

        महाराष्ट्र  राज्यातील दररोजचे ऑक्सीजनचे उत्पादन 1250 मेट्रीक टन इतके असून त्यापैकी 700 टन साठा वैदयकिय कारणासाठी वापरला जात आहे.

       ऑक्सीजनची सर्वत्र योग्य व जलद वाहतूक केली जावी म्हणून आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी दिनांक 03.04.2021 च्या आदेशान्वये राज्यातील 06 महत्वाच्या उत्पादकांचे 80 टक्के टँकर्स मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत.

          

          भविष्यात ऑक्सीजनची अधिकची गरज भासल्यास त्या दृष्टीने शासनाने गुजरात व छत्तीसगड मधून ऑक्सीजन आणण्यास सुरुवात केली आहे.

         तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठया संख्येने नाहीत अशा राज्यामधुन देखील ऑक्सिजन प्राप्त करुन घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरु आहे. त्यामुळे मेडीकल ऑक्सीजनची रुग्णासाठी करण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होवू नये या बाबीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अदयापपावेतो  अशी कोणतीही घटना तथा तक्रार अन्न व औषध प्रशासनास  प्राप्त झालेली नाही.

सदर औषधाचा कोवीड रूग्णांसाठी वापर करण्याबाबत जेव्हापासून अनुमती देण्यात आलेली आहे तेव्हापासून सदर औषधाच्या विक्री,वितरण व साठा यावर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण ठेवत आहे. Remdesivir Injection हे औषध तसेच आणीबाणीच्या प्रसंगी गरजू रूग्णास औषध सहज उपलब्ध्‍ व्हावे व सदर औषधाचा काळा बाजार होवू नये याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना काटेकोरपणे पाळत ठेवण्याबाबतच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर औषधाच्या किंमत आकरणीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. 

तसेच सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत झपाटयाने होत असलेली वाढ विचारात घेवून रेम्डेसीवीर इंजेक्शनचा वापर यथोचीत व योग्यरित्या करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे सर्व रुग्णालयांना करण्यात येत आहे. 

 Medical Oxygen व Remdesivir Injection यांच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठयाबाबत माहिती प्रत्येक जिल्हात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच त्यांच्या उत्पादकांना देखिल महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त साठयाचा पुरवठा करण्याबाबत सुचित करण्यात आलेले  आहे. सध्या महाराष्ट्रात Medical Oxygen, Remdesivir Injection औषधाचा पुरेसा साठा उपलबध होत असून तुटवडा होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

तरी Medical Oxygen व Remdesivir Injection कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत त्यांना औषध मिळून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. असे निर्देश मा.मंत्री अन्‍न व औषध प्रशासन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. 

मुंबई व राज्यतील इतर रक्तपेढयांकडे किती रक्त व त्याचे घटक उपलब्ध आहेत व ते किती कालावधीसाठी पुरेसे आहेत याबाबत अधिकाऱ्यांकडून मा’ मंत्री महोदया यांनी  आढावा घेतला असता दिनांक 03.04.2021 रोजी मुंबईतील रक्तपेढ्याकडे एकूण 3181 युनिट रक्त व रक्त घटक असल्याचे आढळून आले आहे’ तसेच राज्यात एकूण 29928 युनिट रक्त व घटक उपलब्ध असल्याचे दिसुन आले. सदर साठा अंदाजे 5 ते7 दिवसासाठी पुरेसा असुन पुढील कालावधीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा येवू नये यासाठी सर्व रक्त पेढयांनी लहान मोठे रक्तदान शिबीरे  कोव्हीड 19 च्या संदर्भात घ्यावयाची दक्षता पाळून आयोजित करावे असे आवाहन मा. मंत्री महोदय यांनी केले. अधिकाऱ्यांनी या संदर्भात सजग राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावी असेही निर्देश मा. मंत्री महोदय यांनी यावेळी दिले.

वाचा

तेढ अनुदान आणि विना अनुदानाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांचा- Granted and Non Granted Secondary school's...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2..

कलाकार...

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2

व्याख्या व संकल्पना



(१) समुचित शासन (२)!सक्षम अधिकारी (३) सार्वजनिक प्राधिकारी (४) माहिती (५) अभिलेख (६) विहित (७) त्रयस्थ पक्ष (८) सहाय्यक जनमाहिती अधिकारी (९) जन माहिती अधिकारी (१०) प्रथम अपिलीय अधिकारी (११) केंद्रीय माहिती अधिकारी (१२) राज्य माहिती आयोग

         (१) समुचित शासन केंद्र सरकार किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासन यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या.  घटित करण्यात आलेल्या.  त्यांच्याकडे मालकी असलेल्या.   त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीदवारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणाच्या बाबतीत.  केंद्र सरकार असा आहेे

>

        राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या. घटित करण्यात आलेल्या त्यांच्याकडे मालकी असलेल्या त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीदवारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणाच्या बाबतीत राज्य शासन असा आहे

              समुचित शासनाची जबाबदारी

 * कलम (१२)! प्रमाणे केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे

* कलम (१५) प्रमाणे. राज्य माहिती आयोग स्थापन करणे

* कलम (२६) समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे

" प्रशिक्षण. शिक्षण.  प्रचार. प्रसार.  

" दुर्बल घटकातील व्यक्तींच्या जागृकतेसाठी उपक्रम 

" मार्गदर्शन करणे

" सार्वजनिक प्राधिकरणाना मार्गदर्शन करणे

* कलम (२७) नियम करणे

* कलम ४(४) प्रसार प्रसिध्दी माध्यमांच्या खरचाएवढी किंवा मुद्रणालय खर्चा एवढी किंमत

* कलम ६ चया पोट कलम (१) अन्वये देय असलेली फि 

* कलम ७ ची पोटकलमे (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि 

* कलम १३(६)  अन्वये वेतन भत्ते आणि

* कलम १६(६) माहिती आयोग वेतन सेवाशर्ती

* कलम १९(१०) दुसर्या अपिलाबाबत नियम.  मार्गदर्शक सूचना.  आदेश देणे.  विहित करणे.   आवश्यक असेल अशी बाब 

* कलम २९ नियम सभागृहा पुढे ठेवणें

" सक्षम अधिकारी " 

* लोकसभा.  / राज्यसभा. / विधानसभा. अध्यक्ष

* राज्यसभा / विधानसभा   सभापती

* सर्वोच्च न्यायालय.  भारताचे मुख्यमंत्री. न्यायमूर्ती

* उच्च न्यायालय   उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

* सविधानाप्रमाणे. किंवा संविधानाअनवये 

* स्थापन / घटित. करण्यात आलेले प्राधिकरण.   राष्ट्रपती

* संविधान अनूछेद २३९ अन्वये नियुक्त. करण्यात आलेला. 

"सक्षम अधिकारी जबाबदारी

* सार्वजनिक.  प्राधिकरणाना. मार्गदर्शक करणे

     कलम. २८ नियम करणे.  कलम. ४(४) अन्वये प्रसार प्रचार. प्रसिध्दी. माध्यमांचा खर्च. किंवा मुद्रणांक खर्चा एवढी रक्कम

*. अधिकारी. कर्मचारी. प्रशिक्षण

कलम. ६ ची पोट कलम (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि

* मार्गदर्शिका तयार करणे 

कलम ७चे पोट कलमे (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि विहित करणे आवश्यक असेल अशी बाब मार्गदर्शक सूचना आदेश देणे


"सार्वजनिक प्राधिकरण " 

* सविधाना प्रमाणे किंवा तदनवये 

* संसदेने तयार केलेल्या कायद्यानुसार

* राज्य विधान मंडळाने तयार केलेल्या कायद्यानुसार

    स्थापन घटित करण्यात आले आहे

शासनाची मालकी असलेला. तयाचे नियंत्रण असलेला किंवा त्यांच्याकडून निधी नुसार प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो अशी अशासकीय संघटना

" सार्वजनिक प्राधिकरण जबाबदारी " 

* प्रशिक्षण व निधी उपलब्ध

* जन माहिती अधिकारी / अपिलीय अधिकारी

* माहिती अधिकाराचा कायदा व सामाजिक लेखा परिक्षण

* संघटनात्मक वर्तन रिती व आंतरवैयकतिक. संबंध प्रशिक्षण

* जनसंपर्क व प्रतिसादाच्या. प्रशासन कौशल्य प्रशिक्षण

* माहिती पुरविण्यासाठी पुरेसा निधी जन माहिती अधिकाराला उपलब्ध करून देणे

* स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटन करणे व अद्यावत ठेवणें

* आवश्यक फलक लावणे

* आवश्यक सुविधा पुरविणे

* माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रत

* माहितीचा अधिकार नियमांची प्रत

* शासन निर्णय.  शासन आदेश. परिपत्रक प्रती

*. बॅनर्स. पोस्टर.  माहिती पत्रके

* सी डी. / फिल्म/ रजिस्ट्रर. / कोरया. अर्जाचे नमुने

* अहवाल पाठविण्याचे विविध नमुने

* मार्गदर्शक पुस्तिका. कार्यान्वित. स्थायी आदेश ई 

" कलम. २/४/५/ते ११/२५/" 

* सार्वजनिक प्राधिकरण यांची कार्ये

* कलम. ४ अंमलबजावणी

* अभिलेख व्यवस्थापन

* जनमाहिती अधिकारी

* सहाय्यक जन माहिती अधिकारी

* प्रथम अपिलीय अधिकारी

* पदनिरदेशन

* अर्ज असेल त्याप्रमाणे माहिती प्रकट करणे

* फलक लावणे

* व्यवस्था करणे

* प्रशिक्षण

*अहवाल पाठविणे

"माहिती"

कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य

अभिलेख.   दस्त ऐवज.  ज्ञापने.  ई-मेल.  अभिप्राय.  सुचना.  प्रसिध्दी पत्रके.   परिपत्रके.   आदेश.   रोजवहया.  संविदा.  अहवाल.   कागदपत्रे.   नमुने.   व प्रतिमाने.   ( माॅडेल ) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात.    आधारसामग्री.   अभिलेख.  दस्त ऐवज हस्तलिखित.  व फाईल ई. 

बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

"माहिती अधिकार कलम ३ "

     माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोग याचा अर्थ कलम १२/ पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला केंद्रीय माहिती आयोग असा आहे

राज्य माहिती आयोग. याचा अर्थ कलम १५/ पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला राज्य माहिती आयोग असा आहे

  " माहिती अधिकार कलम. ३

*माहिती अधिकार कोणासाठी ? 

या अधिनियम तरतुदी अधिन राहून सर्व नागरिकांना माहिती घेणेचा अधिकार असेल 

" माहिती अधिकार भाग. _२ 

*स्वयम् प्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती ( १ ते १७ बाबी ) कलम (४) 

* स्वयम् प्रेरणेने प्रकटन नमुने ( स्वस्त धान्य दुकान ) 

* महाराष्ट्र अभिलेख व्यवस्थापन अधिनियम. २००५ महत्वाची तरतूद

" माहिती अधिकार कलम. (४) 

स्वयम् प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सार्वजनिक प्राधिकरणावरील आ बंदने 

* (क ) सार्वजनिक प्राधिकरण त्याच्याजवळ असलेली सर्व माहिती

* योग्य रितीने सूचिबध करिल

* त्याची निर्देश सूची. तयार करील आणि ज्यांचे संगणकीकरण करणे योग्य आहे अशा सर्व अभिलेखाची माहिती

* संगणकीकरण करून विविध प्रणालीचा  वापर करून. नेटवर्क मार्फत ते जात आहेत

" (ख " प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरण अधिनियम अधिनियमित झाल्यापासून  १२० दिवसांच्या आत ( १७ प्रकारची ) माहिती प्रसिद्ध करील आणि दरवर्षी ती प्रकाशने अद्यावत करील

* प्राधिकरणाची. रचना.  कार्य.  आणि कर्तव्य.  यांचा तपशील 

* प्राधिकरणातील. अधिकारी.  कर्मचारी.  यांचे अधिकार. आणि कर्तव्य. 

* प्राधिकरणामधये. निर्णय घेण्याची. कार्यपद्धती.  पर्यवेक्षण उत्तरदायित्व प्रणाली

* प्राधिकरणाची. कार्य पार पाडण्याची " मानके "

" (१) (ख ) माहिती अधिकार

" कार्य पार पाडण्यासाठी नियम.  विनिमय सुचना

* प्राधिकरणातील. दस्त ऐवजाचे विविध प्ररवगातील विवरण 

* धोरण तयार करण्याची व्यवस्था  / तपशील

* प्राधिकरणातील बैठकाचे कार्य वृत / बैठका लोकांसाठी

* प्राधिकरणातील अधिकारी / कर्मचा-यांची निर्देशिका 

* अधिकारी / कर्मचारी यांची मासिक वेतन. / नुकसान भरपाई देण्याची पद्धती

(१) (ख ) 

* सर्व योजनांचा तपशील.  अर्थ संकल्प.  संवितरीत केलेल्या रककमाचा तपशील

* अर्थ सहाय्य.  कार्यक्रमाची अंमलबजावणी.  रीत.  वाटप.  केलेल्या रक्कमा लाभार्थी तपशील

* सवलती. परवाने.  प्राधिकारपत्रे.  दिलेल्या व्यक्तिचा तपशील

* इलेक्ट्रॉनिक माहिती चा तपशील

* नागरिकांना उपलब्ध सुविधा ( वाचनालय इ ) चा तपशील

* पी. आय. ओ.  नावे. पदनाम. व इतर तपशील

* विहित करण्यात येईल अशी माहिती

" (१) (ग ) "

ज्यामुळे लोकांना बाधा पोहचते अशी महत्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करताना संबंधित सर्व वस्तू स्थिती प्रसिद्ध करील

" (१)  (घ ) माहिती अधिकार

आपल्या प्रशासन किंवा नयायिकतव निर्णयाबाबत कारणे बाधित व्यक्तिंना कळविणे 

(२) प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरण नियमित कालांतराने संपर्काच्या विविध साधनांद्वारे. स्वताहून माहिती पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहील

(३) प्रत्त्येक माहिती विस्तृत प्रमाणात आणि लोकांना सहजपणे उपलब्ध होईल अशा स्वरूपात आणि अशा रितीने प्रसारीत करण्यात येईल

(४) हि सर्व माहिती जन माहिती अधिकारी यांचेकडे इलेक्ट्रॉनिक किमतीला उपलब्ध असावी

" आपण आपल्या ग्रामपंचायत विभागात चालणार्या कामांची माहिती अशी आणि कोणत्या विभागांची माहिती मागू शकतो त्यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ आपलीं ढाल आहे

आपला अधिकार आहे

सार्वजनिक प्राधिकरण ग्रामपंचायत कार्यालय करिता माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख ) ( १ ते १७ ) अंतर्गत करावयाच्या स्वयम् प्रकटनाचा नमुना प्रतिवर्षी अद्यावत करणे अनिवार्य आहे

(१) सर्वसाधारण माहिती

* पदनाम

* सरपंच. * तंटामुक्ती समिती अध्यक्ष *ग्रामसेवक ( ग्रामपंचायत सचिव ) * तलाठी * कोतवाल. * ग्रामपंचायत शिपाई. *पाणी पुरवठा कर्मचारी *कृषी सहायक *व इतर

(२) जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ग्रामपंचायत भिंती वर लावणे बंधनकारक आहे

* जन माहिती अधिकारी

*प्रथम अपिलीय अधिकारी

*द्वितीय अपिलीय अधिकारी

(३) ग्रामपंचायत गावातील लोकसंख्या तपशील

*प्रकार

* एकूण लोकसंख्येच्या

*अनुसूचित जाती

*अनुसूचित जमाती

* मतदार

* कुटुंबाचा प्रकार 

* एकूण कुटुंब

*. दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका

* अंत्योदय शिधापत्रिका धारक

" संचिकेत ठेवावयाची माहिती "

प्रकार ग्रामपंचायत लोकसंख्या तपशील

* गावांची एकूण लोकसंख्या

* अनुसूचित जाती

*अनुसूचित जमाती

*इतर मागासवर्गीय

* अल्पसंख्याक

         इतर

*एकूण मतदार

*अनुसूचित जाती

*अनुसूचित जमाती

* इतर मागासवर्गीय

*अल्पसंख्याक

          इतर

*विशेष क्षमता असलेली व्यक्ती

* शेतकरी जमीनधारक

* अनुसूचित जाती ( जमीन धारक )

*अनुसूचित इ ( जमीन धारक )

*इतर मागासवर्गीय ( जमीन धारक ) 

* अल्पसंख्याक ( जमीन धारक )

           कुटुंब प्रकार

* दारिद्रय रेषेखालील कुटुंब

* दारिद्रय रेषेवरील कुटुंब

* अंत्योदय कुटुंब

* अन्न पूर्णा कुटुंब

* घरात शौचालय सुविधा असलेली कुटुंबे

* घरात शौचालय नसलेली कुटुंब

* विद्युत जोडणी असलेली कुटुंबे

* विद्युत जोडणी नसलेली कुटुंब

* शेतजमीन असलेली कुटुंबे

* भूमिहीन कुटुंब

* अल्पभूधारक कुटुंब

* घरात नळ जोडणी असणारे कुटुंब

* घरात नळ जोडणी नसणारे कुटुंब

* कच्च्या घरात राहणारे कुटुंब

* पक्क्या घरात राहणारे कुटुंब

* गायरान जमीन

*लागवडीसाठी योग्य नसणारी जमीन

* पडिक जमीन

* गावांची महसुली जमीन

            इतर

ग्रामपंचायत भागात पशूधन माहिती पशूधन प्रकार

*गाय. *बैल.  *म्हैस. *शेळी.  *मेंढी.  *उंट. *कोंबडी. 

(७) ग्रामपंचायत कर्मचारी. कर्तव्य.  जबाबदारी.  व अधिकार तलाठी.  ग्रामसेवक. इत्यादी यांची माहिती संचिकेत ठेवणे

*तलाठी. /पटवारी *ग्रामसेवक / ग्रामपंचायत ग्रामपंचायत सचिव*पाणीपुरवठा विभाग *

            इतर उपरोक्त नमूद कर्मचारी.  गावात मुक्कामी असणे बंधनकारक आहे

(८) ग्रामसभा बैठका प्रकारhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

* वाॅरड सभा.   *ग्रामसभा *ग्रामपंचायत सभा *ग्रामसचिवालय. 

(९) ग्रांमपचायत स्तरावरील योजना

         समितीचे नाव

*सामाजिक न्याय समिती

*ग्राम दक्षता समिती म न रे गा

*ग्राम आरोग्य समिती

*ग्राम दक्षता समिती ( सार्वजनिक विवरण )

*शाळा व्यवस्थापन समिती

"  (९) ‌ग्रामपंचायत करासंबधीचा माहिती"

         कराचा प्रकार

*घरपट्टी. *पानपट्टी. *स्वच्छता कर. *विद्युत कर. *व्यवसाय कर *जमीन महसूल * सांडपाणी व्यवस्थापन * दिवाबत्ती कर * बाजार कर. * इतर कारणाकरिता

* विहीरीतील पाण्याच्या वापरासाठी कर *नाले सफाई. * चौकी फि. *कोंडवाडा *

(१०) ग्रामपंचायत गाव विकास अंदाज पत्र

*२००८ उत्पन्न २००९ खर्च

* २००९ उत्पन्न २०१० खर्च

*२०११ उत्पन्न २०१२ खर्च

*२०१२ उत्पन्न २०१३ खर्च

(११) ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे स्त्रोत

*नदि / धरण *तलाव *हातपंप *खाजगी विहिरी *सार्वजनिक विहिरी

(१२) ग्रामपंचायत केंद्र शासन साहायित चालवल्या जाणाऱ्या योजना

*इंदिरा आवास योजना

*मंजूर किती. बाध किती कारण काय ? 

(१३) ग्रामपंचायत विकास कामांचा तपशील अंदाजे रक्कम खर्च *रस्ते *विहीर पुनर्भरण *चेक डॅमस *नाले गटर. *सांडपाणी व्यवस्थापन *अंगणवाडी. *शाळा.  सामाजिक बांधिल *पाणी पुरवठा (१४) ग्रामपंचायती मार्फत करण्यात येणारी खालील कामांचा तपशीील >

*जन्म मृत्यू नोंदणी *घर दुकान मुल्यांकन *जमीन मालकि व महसूल

सरकारी दुध संस्था /सहकारी बँक /पोस्ट कार्यालय /अग्नी शमन दल /पशूवैधकीय दवाखाना /खते / बियाणे / वितरण केंद्र /महिला मंडळ /युवक मंडळ /आपत्ती व्यवस्थापन /पोलिस चौकी पत्ता /पोलिस निरिक्षक / उपनिरीक्षक /पोलिस मित्र / सामाजिक सुरक्षा /अधिकारे व पत्ते

वरील प्रमाणे सर्व माहिती आपणास घेण्याचा अधिकार आहे आपला अधिकार आजच वापरा  काही मदत पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा

९८९०८२५८५९

वाचा -

कुळकायदा कुळकायदा - Land...

तेढ अनुदान आणि विना अनुदानाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांचा- Granted and Non Granted Secondary school's...

वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण...

कुटुंब आणि महिला...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या