Showing posts with label न्यायालय. Show all posts
Showing posts with label न्यायालय. Show all posts

न्यायालय आणि राजकीय दबाव

 


न्यायालय आणि राजकीय दबाव 

              शासन यंत्रणेच्या तीन अंगापैकी न्यायमंडळ हे एक मोठ अंग आहे नयायमंडळाचा राजकीय प्रकियेशी काय संबंध असा प्रश्न आपणांस पडतो कारण न्यायालय म्हणजे आपापसातील कजजे सोडवून निर्णय देणारी यंत्रणा असेच आपण समजत असतो पण खाजगी वयकतिमधये खटले सोडविणयाबरोबरच कायद्याचा अर्थ लावणयासारखे महत्वाचे कामही न्यायालय पार पाडते शिवाय देशाच्या राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी अनेक देशांमध्ये नयायमंडळावर सोपवली आहे त्यामुळे न्यायमंडळ हे राजकीय प्रकियेचा एक घटक म्हणून घोषित करण्यात आला आहे म्हणून शासनसंस्थेचया अभ्यासात न्यायमंडळ ही एक महत्वाची संस्था आपणास माहीत असणे आवश्यक आहे आपल्या देशातील नयायमंडळाचे स्वरूप आणि स्थान तसेच नयायमंडळाची आत्तापर्यंतची भूमिका यांचा आपणास अभ्यास असणे गरजेचे आहे

       ढोबळ मानाने न्यायमंडळ न्यायदानाचे कार्य करीत असते न्यायदान म्हणजे कायद्याच्या आधारे दोन व्यक्ती किंवा संस्था यांच्यातील वाद तंटा सोडवणे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना कायद्यासमोर एकसारखी वागणूक मिळते की नाही हे पाहणे नैसर्गिक न्यायाचा विचार करून निर्णय देणे ही सुद्धा न्यायालयाची जबाबदारी असते व्यक्ति आणि राज्य संस्था यांच्यातील संघर्ष उद्भवला तरी न्यायमंडळाचे स्थान महत्वाचे ठरते. राज्य संस्था कायदे अमानुष अन्याय नाहीत ना हे न्यायसंस्था तपासू शकतो राज्य संस्था अतिरेका विरूद्ध आणि लहरी कारभाराविरूधद न्यायालयात दाद मागता येते खुद्द राज्यसंस्थेचया अंतर्गत विविध यंत्रणा मधील कायदेविषयक तंटे न्यायालयाच सोडवते ज्या देशांमध्ये केंद्र सरकार आणि प्रदेशाची वेगळी राज्य सरकारे असतात तिथे केंद्र सरकार आणि प्रदेशाची राज्य सरकाररे यांच्यातील कायदेविषयक मतभेद सोडविण्याची जबाबदारीही न्यायसंसथेची असते या राजकीय स्वरूपाच्या जबाबदार्या मुळेच न्यायसंस्था ही शासनाची महत्वाची यंत्रणा बनते नयायमंडळावरिल या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मुळे आपण नयायमंडळाकडून निःपक्षपाती पणाची अपेक्षा करतो न्यायमंडळ हा खरेतर राजकीय प्रकियेचा एक घटक आहे पण तरीही त्याने पक्षीय आणि सत्तेच्या राजकारणापासून म्हणजेच गटबाजी पासून दूर रहावे अशी सर्वांचीच अपेक्षा असते नयायमंडळाचया निःपक्षपाती आणि बिगर राजकीय सवरूपामुळेच नागरिकांना या न्यायव्यवस्थेचा आदर आणि विश्वास वाटतो राजकीय स्वार्थ आणि यांच्यामुळे विधिमंडळ एकवेळ जनहित विसरेल पण सचोटीने न्यायमंडळ मात्र जनहित जोपासेल असा विश्वास खूप लोकांना वाटत असतो या विशवासातूनच नयायमंडळाचे महत्व पुरेसं स्पष्ट होतं आहे

                भारताच्या राज्यघटनेही नयायमंडळावर महत्वाची भूमिका सोपविली असून आपल्या न्याय संस्थेनेही गेल्या चाळीस एक वर्षात देशाच्या राजकीय प्रकिरेयेत महत्वाचं कार्य पार पाडले आहे

                 आपल्या देशाचे एक सर्वोच्च न्यायालय आहे ते दिल्ली येथे आहे त्याखेरीज एकूण अठरा उच्च न्यायालये आहेत प्रत्त्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालये असतात. सामान्य नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी दूर जावे लागू नये म्हणून तालुका पातळीवर स्थानिक न्यायालये असतात खालच्या न्यायालयातील निर्णय मान्य नसेल तर त्यावरील न्यायालयात अपील करता येते म्हणजेच दाद मागता येते उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे नागरिकांना अधिकाराच्या रक्षणाची जबाबदारी असतें. त्यासाठी या न्यायालयांना खास अधिकारही दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सर न्यायाधीश खेरीज पंचवीस न्यायाधीश नेमण्याची तरतूद आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवून दिलेली नाही. हे न्यायाधीश काहीवेळा एकट्याने तर काहीवेळा अनेक न्यायाधीशांच्या एक गट मिळून एखाद्या खटल्याची सुनावणी करतात. न्यायाधीशांची संख्या जास्त असेल तर न्यायालयीन कामांचे वाटप करून विलंब टाळता येतो सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. नेमणूक करण्यापूर्वी सर न्यायाधीशांचा सल्ला घेतला जातो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नेमणूकही राष्ट्रपतीच करतात. मात्र त्यापूर्वीच राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांच्याशी सल्लामसलत केली जाते. मुख्य न्यायाधीश नेमताना भारताच्या सरन्यायाधीश यांच्याशी सल्लामसलत केली जाते राष्ट्रपती या नेमणूका मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करतात त्यामुळे न्यायाधीश नेमताना त्यांची विचारसरणी राजकीय कल यांचा विचार होणे गरजेचे असते मात्र सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला मंत्रिमंडळाला विचारांत घ्यावाच लागतो या पध्दतीमुळे पांडित्य किंवा तज्ञ कार्यक्षमता आणि सचोटी यांचाही विचार केला जातो पूर्वी उच्च न्यायालयाच्या बदल्या होत नसतं पण अलिकडे बदल्या करण्याची प्रथा पडली असून त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे या अधिकारामुळे सरकारला अप्रिय निर्णय देणारे न्यायाधीशांच्या बदल्या होण्याचे शक्यता असते. जो न्यायाधीश राजकीय पक्ष यांच्या विरोधात निर्णय देईल त्याला बदली करून घालवणे आत्ता राजकारणी लोकांनी सहज शक्य झाले आहे म्हणजे न्यायव्यवस्थेवर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असते

              न्यायमंडळाचे कार्य व्यवस्थित चाललें आहे याची खबरदारी या न्यायालयाने घ्यायची आहे. कारण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना सहजासहजी पदावरून काढून टाकता येत नाही. त्यांची पद उचचती साठी महाभियोगाची अवघड पध्दत पार पाडावी लागते. संसदेच्या दोन्ही सभागृहानी खास बहुमताने शिफारस केली तरच या न्यायाधीशाना पदच्युत करता येते. प्रशासकीय कारवाई करून न्यायाधीशांच्या गैरवर्तनाबधदल उपाययोजना करता येत नाही नयायाधीशाची निवड करतानाच त्यांच्या सचोटीची खात्री करून घ्यावी आणि नंतर न्यायमंडळाने आपल्या प्रतिष्ठेची स्वताच्या काळजी घ्यावी अशी अपेक्षा या तरतुदी मागे आहे. ती बर्याच अंशी पूर्णही होतें. त्यामुळेच आत्तापर्यंत महाभियोगाचया मार्गाने कोणाही नयायाधिशास पदच्युत केले गेलेले नाही ( मागील घटकात देण्यात आलेल्या माहितीनुसार) १९९१ चया निवडणुकीपूर्वी लोकसभेत एक महाभियोगाची सूचना मात्र दाखल झाली होती. तेव्हा न्यायमंडळाने स्वताच्या शिस्त आणि सचोटी पाळून कारवाईचे प्रसंग टाळावेत अशी अपेक्षा दिसते.  

          लोकशाही मध्ये स्वतंत्र आणि निस्पृह न्यायमंडळ हे अंत्यंत आवश्यक माणले जाते. न्यायमंडळाने राजकीय सोय किंवा सत्ता धारी यांची मर्जी यांचा विचार न करता कायदा आणि न्याय बुध्दी यांचा विचार करूनच निर्णय द्यायचे असतात. न्यायमंडळाकडून हि जी निःपक्षपाती पणाची अपेक्षा केली जाते ती पूर्ण होण्यासाठी न्यायमंडळ सत्ताधाराचया आणि राजकारणी यांच्या दबावापासून पूरेसे अलिप्त आणि सुरक्षित असणे आवश्यक असते. त्यासाठी सेवेची शाश्वती. सुरक्षित आणि आकर्षक सेवाशर्ती. टिकेपासून संरक्षण आणि न्यायमंडळाचया अंतर्गत कारभाराची स्वायत्तता यांसारख्या अनेक बाबी आवश्यक असतता. न्यायाधीशानाही राजकीय कार्यात भाग घेऊ नये. राजकीय मतप्रदर्शन करू नये. पक्षपात करून विशिष्ट बाजूने निर्णय देऊ नये. यांसारखी विविध पथथे पाळायची असतात    

           न्यायाधीशांच्या नेमणूक जरी सरकार करत असेल तरी सरन्यायाधीश/ मुख्य न्यायाधीश यांच्याशी विचारविनिमय करण्याची तरतूद आहे त्यांनी विरोध दर्शविलेल्या व्यक्तिची नेमणूक केली जात नाही. व त्यांच्या सल्ल्यानुसार मान दिला जातो

     न्यायाधीशांचे पगार घटनेतच निश्चित केलेले असतात. पगार व न्यायालयीन प्रशासनाचा खर्च या बाबी संसदेपुढे चर्चेसाठी येत नाही

      महाभियोगाचा चर्चे खेरीज विधिमंडळात न्यायाधीश यांच्या वर्तनाबद्दल चर्चा केली जाऊ शकत नाही

        महाभियोग खेरीज न्यायाधीशांना मुदतीपूर्वी पदच्युत करण्याचा कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे केवळ सरकारला अप्रिय निर्णय दिल्यामुळे न्यायाधीश यांना काढून टाकता येत नाही

        न्यायाधीश यांचा अवमान करणे गुन्हा आहे अवमान झाला आहे की नाही आणि असल्यास त्यासाठी काय शिक्षा करायची हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो

          सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना निवृत्तीनंतर वकिली करता येत नाही. उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ कोणत्याही न्यायालयात नाही

            या तरतुदी असल्या तरीही काही मर्यादा शिल्लक राहताच. न्यायाधीशांच्या बदली करता येणे हे आपण वर पाहिलेच आहे. तसेच खुद्द सरन्यायाधीश नेमताणाही सरकार स्वतंत्र पणे निर्णय घेऊ शकते. १९७३ मध्ये हा संकेत मांडून तीन न्यायाधीशाची सेवाज्येष्ठता डावलून न्यायमूर्ती यांची सरन्यायाधीश नेमणूक झाली होती यावेळी ज्यांची सेवाज्येष्ठता डावलली होती त्यांनीच सरकारला न रूचणारा निर्णय दिला होता त्यामुळे त्यामुळे सरकारवर टिकाही झाली होती पुढे १९७८ मध्येही याच पध्दतीने सरन्यायाधीशाची नेमणूक झाली 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जामीन होण गुन्हा आहे का ?

 जामीन होण गुन्हा आहे का ? 



                मार्च महिना आला की जो कोणी जामीन असेल त्याच्यावर व कर्जदार यांचेवर टांगती तलवार डोक्यावर दिसते जामीन होणे म्हणजे सर्वच कर्जदार लबाड व फसवे नसतात काही कर्जदार आपणांस झालेल्या जामीनाला कमीपणा किंवा बॅंकेकडून फोन सुध्दा येवू देत नाहीत त्यांना जामीन होणे अडचणींचे जामीनाला वाटत नाही पण काही काही कर्जदार बॅंकेने मुदत देवून सुध्दा वर्षात एकही रूपया बॅंकेत कर्जाला भरत नाहीत मग काय जामीनदार अडचणीत येतो पण मला एक समजतं नाही बॅक कर्ज देताना संबंधित कर्जदार याची प्रापटी माॅरगेज करून त्याची होणारी किंमत त्यापैकी ६०/टक्के रक्कम कर्ज म्हणून मंजूर करते असे मला वाटते आणि या कर्ज व्यवहाराला एक माणूसकी नातं किंवा एखाद्याने दिलेल्या वचनांची परिपूर्णता किंवा दायितवाची फेड करण्याची जबाबदारी जामीनदार यांचेवर येते. जामीनदार यांना कोणताही फायदा कर्जदार किंवा बॅंक यांचेकडून नसतो कारण कर्जदार कर्जाचे पैसे घेऊन त्याचे काम करतो त्या पैशावर बॅंक व्याज मिळवते म्हणजे यात जामीनाला कोणताही फायदा नाही कर्जदार आणि बॅंक हे दोघे देणंघेणं चालू आहे तोपर्यंत जामीनाला विचारत सुध्दा नाहीत ‌ कर्ज थकित झाले किंवा अन्य कोणतीही समस्या निर्माण झाल्यास जामीनदाराला फोन येतो हातातले काम सोडुन जामीनदाराला. तासनतास विनाकारण अपराधी असल्यासारखे बॅंकेत आणून बसविले जाते त्यांना हिन वागणूक दिली जाते का कशासाठी बॅंकेने मिळविलेल्या व्याजातील काही रक्कम जामीनदाराला दिली जात नाही कर्जदार यांचेकडून कोणतीही रक्कम जामीनदार घेत नाही मग कशासाठी कर्जदार पैसे भरत नसेल तर तुम्ही भरा असा तगादा लावणे हे कोणत्या कायद्यात आहे का जेंव्हा कर्जदाराला कर्ज दिले जाते तेव्हा त्याची त्या कर्जाच्या डबल किंमतीची संपत्ती बॅंक लिहून दस्त करून घेत असते मग एकादा कर्जदार थकीत किंवा बॅकेस पैसे भरण्यास टाळाटाळ करत असेल तर जामीनदारांना न त्रास देता सदर प्राॅपटि निलाव करून रक्कम वसूल करण्याचा अधिकार बॅंकेला असताना जामीनदारांना का त्रास देता. कर्जदार मरणाच्या दारात असेल तरी बॅंकेचे पैसे बुडणार नाहीत कारणं मरताना तो संपत्ती घेवून जाणार नाही त्याच्या संपत्तीचा निलाव करून जर बॅंकेचे कर्ज भागत नसेल तर जामीनदार पुढील बघतील पण तुम्ही जर विनातारण कर्ज दिले असेल तर त्याला कोण जबाबदार म्हणजे कर्ज प्रकार. *जामीनकी कर्ज * माझे म्हणने एवढेच आहे जामीनदार यांना नाहक त्रास देवू नका अशा वेळेत जामीनदार सदर विभागाला अर्ज देवून आपला जामीन रद्द करण्याची तरतूद आहे

             जामीनदार होण्यासाठी अनेक मूलभूत बाबींची पूर्तता करावी लागते जामीनदार याने आपली आर्थिक क्षमता. कायमचा राहणेचा पत्ता. ओळखपत्र. आधार. स्टॅम्प. अशी एका कर्जदाराला जेवढी कागदपत्रे लागतात तेवढी कागदपत्रे जामीनासाठी लागतात म्हणजे कर्जदार कोण ? जामीन कोण. ? असा प्रश्न पडतो जर. बॅंक. पतसंस्था. व इतर वित्तीय संस्था यांना जर जामीन एवढा महत्वाचा असेल तर जामीनासाठी भरीव तरतूद करण्यात यावी 

*पोलिस प्रशासन आणि जामीन *हक्काचा जामीन * "स्वेच्छेने जामीन *अटकपूर्व जामीन. *इतर काही महत्वाच्या बाबी * उच्च किंवा सत्र न्यायालयाचे विशेष अधिकार. 

           जामीन म्हणजे एखाद्याने दिलेल्या वचनांची पूर्तता किंवा दायित्वाची फेड करविणयाची जबाबदारी प्रकारचे या अर्थाने हमी. हमीदार. प्रतिभू. संज्ञाचाही वापर होतो फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर बाबींसंबंधी पकडलेल्या किंवा पकडण्याचा संभव असणार्या व्यक्तिस न्यायलयात उपस्थित राहण्याची हमी घेऊन मुक्त करण्याकरिता न्यायाधिशांनी अनुसरलेली ही एक पध्दती आहे त्याला जामीन म्हणतात फौजदारी प्रमाणे दिवाणी कायद्यातही जामीन घेण्याचे अनेक प्रसंग येतात तया दृष्टीने कायद्यात जामीनाकरिता तरतूद करण्यात आली आहे फौजदारी गुन्ह्यांच्या आरोपाखाली पकडलेल्या व्यक्तिस चौकशी होईपर्यंत सोडणयाकरिता जामीनाचा उपयोग होतो फौजदारी कायद्यात विशेषतः गुन्हेगारांच्या दृष्टीने जामीनास विशेष महत्त्व आहे न्याय चौकशी अथवा तपासणी वेळी आवश्यकता पडल्यास उपस्थित राहण्याच्या प्रतिभूतीवर एखाद्याची कारागृहातून स्थानबद्ध किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांमुळे त्याचप्रमाणे संभाव्य अटकेतून तात्पुरती मुक्तता करणे असा फौजदारी कायद्याच्या दृष्टीने जामीनाचा साधारण अर्थ आहेे >

             जामीनदारास आरोपी उपस्थित बद्दल धोका वाटल्यास तर तो संबंधित आरोपीस सुपूर्द करू शकतो वा अटक करू शकतो जामीनदार अर्ज देऊन आपला जामीन केव्हाही रद्द करून घेऊ शकतो अशा परिस्थितीत आरोपीने नवीन जमानतदार देण्याची गरज आहे जामीनाचा उदेश्य शिक्षा करण्याचा नसून चौकशीच्या वेळी आरोपी उपस्थित मिळविण्याचा आहे जामीन नाकारणे किंवा सविकारणे हे एक न्यायिक कृत्य आहे आरोपी प्रतिष्ठीत आहे व तो जामीन देऊ शकतो एवढ्याच कारणांमुळे त्याचा जामीन मंजूर करण्यात येतो

* हक्काचा जामीन * 

फौजदारी कायद्यात काही गुन्हे जामीन योग्य आहेत तर काही गुन्हे जामीन अयोग्य. हक्काच्या. जामीन प्रकारात जामीन योग्य गुन्ह्याबद्दल जामीन मोडतो अशा प्रकारात जामीन हा आरोपीचा हक्क आहे इतकेच नव्हे तर संबंधित पोलिस अधिकारी किंवा न्यायाधीश वाटल्यास त्यास जमानदारा शिवाय नुसत्या मुचलका घेऊनही सोडू शकतो जामीन योग्य गुन्ह्याबद्दल जामीन नाकारता येत नाही पण जामीनावर मुक्तता झालेला आरोपी फरारी झाला किंवा ठरलेल्या तारखेस न्यायालयात उपस्थित झाला नाही तर न्यायालय त्याचा जामीन रद्द करून पुन्हा त्यास जामीनावर सोडत नाही त्यायोगे फौजदारी प्रक्रिया संहितेचया. ४४६ कलमान्वये न्यायालयास असलेल्या इतर अधिकारास बाधा येत नाही

*स्वेच्छाधीन जामीन *

न्यायालयाच्या सवेचछाधीन असलेलें जमीन या प्रकारात मोडतात जामीन अयोग्य गुन्ह्यांचे प्रकार दोन प्रकार आहेत

मृत्युदंड अथवा कारावासाची शिक्षा असलेलें गुन्हे (उदा ) खून (२) इतर शिक्षा गुन्हे. जामीन अयोग्य गुन्ह्यांच्या या दुसर्या प्रकाराबाबत जामीन मंजूर करणे अथवा नाकारने हे न्यायालयावर अवलंबून असते. दोषसिधदी होणा-या शिक्षेचा कडकपणा. उपलब्ध पुराव्याचे स्वरूप. अर्जदाराचे चरित्र. प्राप्तीचे मार्ग व प्रतिष्ठा. तो फरारी होण्याची शक्यता. वरील प्रकारात जामीन केला जात नाही 

              इंग्लंड मध्ये अशा स्थितीत जामीन नाकारणे किंवा जामीन देण्यास विलंब करणे ही बाब प्रजेच्या स्वातंत्र्य विरोधात गुन्हा समजण्यात येतो साधारण जामीन मंजूर करणे हा नियम आहे आणि नाकारणे हा अपवाद आहे. १९२३ चा १८ वा अधिनियम समंत करून पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेत जी सुधारणा करण्यात आली ती नुसार विधिमंडळाने ही हेच मार्गदर्शक ततव घालून दिले आहे नयायालयाने अन्य काही आदेश दिला असल्यास त्याच्या कारणांची नोंद करणे जरूरीचे असते जामीन अयोग्य गुन्ह्याची चौकशी संपल्यानंतर व निकाल देण्याच्या पूर्वी न्यायालयास आरोपीने गुन्हा केला नसल्याचे वाजवी कारणास्तव वाटले तर जामीन न घेता निकाल एकणयास उपस्थित राहण्याच्या मुचकलयावर आरोपी बंदिस्त असेल तर मुक्त करावयास पाहिजे. १९७३ चया सुधारित फौजदारी प्रक्रिया संहितेत कोणत्या परिस्थितीत न्यायालय आरोपीस सशर्त जामीन देऊ शकते या संबंधी कलम ४३७ उपकलम (३) मध्ये तरतूद आहे

* अटकपूर्व जामीन * 

          प्रत्यक्ष अटक होण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या जामीनास अटकपूर्व जामीन म्हणतात १९७३ चया नविन फौजदारी प्रक्रिया संहितेत ही तरतूद केली आहे जामीन अयोग्य गुनहयाबाबत अटक होण्याबाबत एखादे वाजवी कारणं असेल तर अशी व्यक्ती उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय यांचेकडे अटकपूर्व जामीन करिता अर्ज करू शकतो कलम. ४३८ (२) मध्ये नमूद केलेल्या अटिसह कोणतीही अट घालू शकते. दंडाधिकारी यांना अधिपत्र काढण्याची गरज भासली तर न्यायालयाच्या आदेशानुसार अनुरूप त्याने जामीन योग्य अधिपत्र काढावयास पाहिजे

* इतर महत्वाच्या बाबी *

          जामीनाची रक्कम प्रत्त्येक प्रकरणांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन ठरविली जाते. ती अधिक किंवा व बेसूमार नसावी. उच्च न्यायालय व सत्र न्यायालय ही रक्कम कमी करु शकते. कारागृहातील आरोपीस आदेश आलेबरोबर मुक्त करणे गरजेचे आहे. विशिष्ट परस्थिती एखाद्या इसमाकडून शांतता भंग होण्याचा धोका असल्यास शांतता व सदवरतनाबाबत जामीन घेणे अनिवार्य आहे. 

*उच्च किंवा सत्र न्यायालय *

       उच्च व सत्र न्यायालय यांना फौजदारी प्रक्रिया संहिता ४३९ वया कलमानुसार जामीनाबधदल विशेष अधीकार आहेत. कलम. ४३७ उपकलम (३)! मध्ये गुन्हा करण्यात आला असल्यास तर त्या कलमातील उल्लेख केल्याप्रमाणे उद्दिष्टा करिता दोन्ही पैकी कोणतेही न्यायालय इचछेअनरूप कोणतीही अट आरोपींवर लादू शकते दंडाधिकारी यांनी लादलेली अट जामीनावर मुक्तता करतांना रद्द करू शकते मात्र ज्या गुन्ह्याची चौकशी फक्त सत्र न्यायालय करु शकते किंवा ज्या गुन्ह्याची चौकशी होऊ शकत नसेल पण ज्यांना आजावी कारावासाची शिक्षा सांगितली आहे अशा प्रकरणी वकिलास सूचना देणे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३९ उपकलम (२) अन्वये ज्याची व जामीनावर मुक्तता झाली असेल त्यास अटक करण्याचा आदेशही उच्च किंवा सत्र न्यायालय आपल्या विशेष अधिकारात देवू शकते. फौजदारी प्रक्रिया संहिता उदेश आहे यास बाधा आणणारी परस्थिती टाळण्याकरिता ४८२ वया कलमानुसार असलेल्या अंगभूत अधिकार अन्वये उच्च न्यायालय जामीन योग्य गुनहयाकरिता मिळालेला जामीनही रद्द करु शकते इतकेच नव्हे तर आरोपीला अटक करण्याचा आदेश काढू शकते 

    * कलम. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६७ ( अ ) नुसार दिला जाणारा जामीन हा ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर आरोपीस हवालती. स्थानबद्ध. आजीव कारावास. किंवा दहा वर्षे. यांचे दोषपत्र साठ दिवसांत दाखल करणे अनिवार्य आहे

* कलम ४८२ अन्वये सदरिल आरोपीचा जामीन रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयास आहे

** कलम. ४३७ (अ. ) अन्वये आरोपी सुटका जरी झाली तरी जामीन देणे बंधनकारक आहे

* कलम. ४३८ अन्वये जर एखाद्या व्यक्तिस आपणास अटक होण्याची संभावना वाटत असेल आणि सदरील गुन्हा अजामीनपात्र असेलतर तर ती व्यक्ती सत्र न्यायालय अथवा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन ठेवू शकतो

* कलम ४३९ हे कलम ४३७ चा आधार घेऊन जामीन देण्याचा अधिकार सत्र न्यायालयास तसेच उच्च न्यायालयास देते

* जामीनदार कोणत्याही प्रसंगी आपला जामीन रद्द करू शकतो

* आरोपी याने खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे

* आरोपी बंदिवासातून मुक्तता केल्यास तो खटलया दरम्यान पुराव्यांची छेडछाड करणार नाही

*तो जामीनावर असताना साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही

*दुसरा कोणताही अक्षम्य अथवा न्यायालयीन प्रकारासंदरभात गुन्हा करणार नाही

*प्रकरण संपेपर्यंत फरार होणार नाही

* बंदिवासातून बाहेर आल्यावर सामाजिक शांततेस धोका निर्माण होणार नाही

*पोलिस तपासात अडथळा निर्माण करणारं नाही 

        जामीनदाराची भूमिका ही आरोपीच्या खटल्याचे कामी हजर राहणे बंधनकारक आहे 

    . समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा-

कलाकार...

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate....

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या