Showing posts with label जात. Show all posts
Showing posts with label जात. Show all posts

काय आहे 1967

 

काय आहे 1967

             आज सर्वत्र जातीचा दाखला काढण्यासाठी 1967 चा पुरावा मागितला जातो मला आजपर्यंत या 1967 चा अर्थ मला कळला नाही. मग आपण जरा घटनेच्या तरतूदी प्रमाणे विचार करू

             मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्क यांच्यातील विरोधी प्रामुख्याने खाजगी संपत्तीचा हक्काचा ( पूर्वीचे कलमं ३१) संदर्भात राजकीय वादात मांडला जाऊ लागला कारणं १९७८ पूर्वी घटनेने एकीकडे व्यक्तिला खाजगी संपत्ती बाळगण्याचा अधिकार दिला होता. तर दुसरीकडे मार्गदर्शक तत्वांचा सार्वजनिक संपत्तीचे वाटप करण्याचे ( कलम ३९ ख ) आणि संपत्तीच्या मक्तेदारीस प्रतिबंध करण्याचे ( कलम ३९ ग ) नुसार निर्देश दिले आहेत या संदर्भात सरकारने खाजगी मालमत्ता अधिकार दुय्यम माणला आहे जेव्हा न्यायालयाने खाजगी संपत्तीच्या हक्कास प्राधान्य देणे चालू ठेवले. ( गोखलनाथ खटला १९६७ ) तेव्हा प्रथम १९७१ मध्ये व नं १९७६ मध्ये गुंता सोडविणे साठी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि संपत्तीचा अधिकार घटनेतील मूलभूत हककातून गाळून टाकण्यात आला. तसेच घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांचा अग्रक्रम समतेच्या व स्वातंत्र्याच्या हकका पुरताच ( कलम १४ व १९ ) मर्यादित ठेवला. आपल्या घटनेच्या तत्वज्ञानात दोन वेगळे विचारप्रवाह आहेत.  उदारमतवादी आणि समाजवादी. उदारमतवादी विचारांचे प्रतिबिंब मूलभूत हक्काच्या प्रकरणांवर पडेल आहे समाजवादी विचारांची छाप मार्गदर्शक तत्वावर पडली आहे या दोन्ही समन्वय घडवून आणण्याची अवघड भूमिका सर्वोच्च न्यायालयास पार पाडावी. 

        १९६७ साली काही विरोधी पक्षानी एकत्र येऊन काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न केला

        १९६२ सालापरयणत भारतीय मतदारांनी काँग्रेस पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य त्यांचे नेतृत्व  व राज्य चालवण्याची त्या पक्षाची क्षमता इत्यादी गोष्टींचा विचार करून सत्ता काँग्रेस चे हाती दिली परंतु १९६७ साली काँग्रेसला व त्या पक्षाला मोठा धक्का व हादरा दिला काँग्रेस वर्चस्वाला आणि एक पक्ष प्रबळ पध्दतीला जबर धक्का १९६७ चे चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत बसला. लोकसभेत काँग्रेस पक्षाला ५२० पैकी २८३ जागा ( ५४.४२/ टक्के) जागा मिळाल्या मतांची टक्केवारी ४०.७३/ टक्के पर्यंत खाली आली व विरोधी पक्षानी अनेक ठिकाणी युती करून सरळ लढत दिल्याने काँग्रेस पक्षाला केंदस्थानी जेमतेम बहुमताच्या आधारे सरकार स्थापन करता आले १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला दारूण पराभवामुळे एक प्रबळ पक्षपधदती संपुष्टात येऊन तिची जागा बहुपक्ष घेणार असे वाटू लागले देशांमध्ये निर्माण झालेल्या इंदिरा लाटेमधये १९६७ मध्ये विरोधी पक्षानी मिळविलेले यश धूऊन गेले मेघालय.  मणिपूर. गोवा. या भारतीय संघराज्यानी लहान घटकांना अपवाद वगळता इंदिरा काँग्रेसची सरकारे सर्वत्र प्रचंड बहुमताने स्थापना झाली. अशा रितीने १९६७ ते १९७१ या कालखंडात एक प्रबळ पक्ष पध्दतीला लागलेले ग्रहण सूटून भारतीय राजकिय पध्दती एक प्रबळ पक्ष पद्धती स्थान निश्चित झाले असा समज झाला.  काँग्रेस पक्षाला १९६७ पेक्षाही मोठा प्रमाणावर एक प्रबळ पक्ष पध्दतीला जबरदस्त हादरा बसला. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत एक प्रबळ पक्ष पध्दती अस्तित्वात आली होती १९६७ मध्ये पहिला धक्का बसला. राजकीय ध्रुवीकरणाला प्रयत्नांना यश आले नाही तरी दोन वा अधिक पक्षानी एकत्र येऊन संमिश्र मंत्री मंडळे स्थापन करण्याची पध्दती केंद्रामध्ये व अनेक घटक राज्यांमध्ये रुढ होऊ पाहत आहे याची सुरुवात १९६७ मध्ये बिहार.  उत्तर प्रदेश. मध्य प्रदेश.  इत्यादी राज्यांमध्ये झाली तथापि हा प्रयोग त्यावेळी टिकू शकला नाही   १९६२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत या पक्षाला चांगले यश मिळाले आणि १९६७ मध्ये हा पक्ष लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष बनला.  भारतीय क्रांती दल याची स्थापना १९६७ मध्ये असंतुष्ट काँगेस जणांनी केली भांडवलशाही आणि समाजवाद या दोन आर्थिक विचार प्रणाली मध्ये समन्वय आणण्याच्या हेतू असलेला पक्ष काही अंशी गांधीवादी विचाराने प्रेरित झाला होता. भारतीय जनता पक्षाला १९६७ मध्ये ९.४१/ मते व ३५ जागा मिळाल्या.  लोकशाही. राज्य श्रमिक. शेतकरी व कष्टकरी. जनतेचे असेल आणि त्यात मध्यमवर्ग व बुद्धी जीवी वर्ग. यांनाही स्थान असेल अशी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची होती परंतु १९६७ मध्ये इतर पक्षाशी हातमिळवणी करून या पक्षाने पश्चिम बंगाल व अन्य राज्यात सत्तेत भागीदारी स्वीकारल्यावर पक्षातील अति डावे कार्यकर्ते या धोरणाशी सहमत झाले नाहीत.  

        आत्तापर्यंत आपला अनुभव असा आहे की आपल्या मूलभूत हक्काच्या संरक्षणाची तरतूद व यंत्रणा याबाबत संविधानात स्पष्टता असूनदेखील संसदेने आपल्या मूलभूत हक्काच्या तरतुदी घटना दुरुस्ती करून बदल केलेले आहे त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की संसदेच्या या अधिकारांची मर्यादा काय आहे ? हा संसदेचा अधिकार मर्यादित आहे की अमर्याद आहे ? कारण १९६७ सालापरयणत असे गृहीत धरले गेले होते की व्यक्तिंना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कात बदल करण्याचा संसदेला अधिकार आहे परंतु १९६७ साली गोखलनाथ खटला प्रकरणातील निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका बदलली. घटना दुरुस्ती एक कायदाच असल्याने अनुच्छेद १३(२) मधील तरतूद घटना दुरुस्ती सारख्या संसदेच्या कृत्याला देखील लागू आहे सबब घटना दुरुस्ती आधार घेऊन संसंदेला मूलभूत हक्कांबाबत कसलाही बदल करता येणार नाही अशी ताठर भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली. यामुळे संसदेच्या मूलभूत हक्कांबाबत घटना दुरुस्ती करण्याचा शकतिवर मर्यादा आली. संविधानातील मूलभूत हक्कांचा भाग अपरिवर्तनीय आहे.  त्रिकालाबाधित आहे अशी अंत्यंत टोकाची भूमिका घेऊन एका अर्थाने लोकांच्या सार्वभौमत्ववावर मर्यादा आणली यातून न्यायमंडळ श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ असा गंभीर प्रश्न निर्माण झाला व आपल्या लोकशाही वयवसथेपुढे एक आव्हानच उभे राहिले

      १९६७ नंतर काही काळ देशांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली बहुदा त्याचा परिणाम म्हणून अनेक विद्यार्थी संघटनांनी फी वाढ विरोधात तसेच शिक्षणसंस्थेत सहभाग मिळणे साठी आंदोलने सुरू केली युवक क्रांती दल या संघटना अमलात आल्या श्रमिक संघटना आदिवासी व शेतमजूर लढे उभे राहिले.  १९६७ साली काही संयुक्त विधयक दलाच्या स्थापनेपासून आघाड्या उभारुन काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न केला.  

      मला यातून काहीच कळलं नाही आपल्यात कोणी जाणकार असेल तर मला १९६७ चा आणि जातीच्या दाखल्यांच्या पुराव्याचा काय संबंध आहे ते सांगा

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

इदाते समिती

 

इदाते समिती

                  आपल्याला सर्वात मोठा असलेला शाप म्हणजे जात वर्गवारी. त्यानुसार अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती अशी वर्गवारी करण्यात आली आहे आणि या वर्गवारी वर आजचे आणि उद्याचे राजकारण अवलंबून आहे. त्यात  नोकरी आरक्षण * शिक्षण आरक्षण.* आर्थिक आरक्षण * सामाजिक सुरक्षा * अशा विविध मुद्यांवर जनतेला भावनिक करून राजकीय लोक आजपर्यंत राजकारण करत आले आहेत. 
           विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग राज्यातील शासन मान्यता खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांतील व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विमुक्त जाती.  भटक्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा करण्याची बाब  *31 मार्च 2016 व दिनांक 16. डिसेंबर 2017 व 1 जानेवारी 2018 रोजी पर्यंत विचाराधीन होती त्यानुसार सुधारित उत्पन्न मर्यादा सन 2017/2018 या शैक्षणिक वर्षात प्रथम/द्वितीय/तृतीय /व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे त्यानुसार शैक्षणिक 2017/2018/ या शैक्षणिक वर्षापासून रूपये 6 लाख वरून रूपये 8 लाख करण्यास शासनाने मंजुरी दिली 
     ‌.          देशातील भटक्या विमुक्त जाती यांना त्यांचे संविधान प्रमाणे हक्क व अधिकार मिळावेत यासाठी 9 जानेवारी 2015 रोजी शासनाने एक समिती गठीत केली त्याचे नाव होते भिकुजी इदाते आयोगाने 8 जानेवारी 2018 रोजी आपला भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा स्वतंत्र अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला. 
* भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना घटनात्मक संरक्षण देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग नेमण्यात यावा व त्याची नोंदणी राज्यव्यापी नोंदणी करून अनुसूचित जाती जमाती प्रमाणे त्यांना शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक धार्मिक हक्क व अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी वेगळं आयुक्तालय असावे
* महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात या भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या मुलांसाठी वेगळे वसतिगृह असावित
* धोरण आखणीत या वर्गाची विशेष दखल. कायदेशीर. आर्थिक विकास. या माध्यमातून घेतली जावी 
* भटके विमुक्त शब्दांची व्याख्या योग्य निकषांवर करण्यात यावी
* एकाच जातींची वेगवेगळ्या नावांनी राज्य निहाय नोंद झलेली आहे. तर राष्ट्रीय पातळीवर जातींची एकाच नांवाने नोंद झालेली आहे
* व्यक्ती. प्राणी पक्षी  यांचीही जनगणना झाली पाहिजे
* जनगणना करून शिक्षण नोकर्या राजकारण क्षेत्रात भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना योग्य न्याय मिळावा
*भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना सरकारी सवलतीचा लाभ देणे व त्यांची नोंद होणे यासाठी सन 2003 मध्ये बाळकृष्ण रेणके समिती स्थापन करण्यात आली परंतु समितीच्या अहवालामध्ये त्रुटी आढळल्याचे कारणं देऊन विद्यमान केंद्रीय सरकारने इदाते समितीची स्थापना केली होती
* भारतात सध्या 2017 सर्वे नुसार 571 विमुक्त/ 1062भटके /अरधभटके अशा एकूण 1658 जाती जमाती आहेत
       सर्वांना समान हक्क व अधिकार न्याय स्वातंत्र्य पाहिजे असेल तर जातींचा अडसर दूर करण्याची गरज आहे कारणं जात ही आज आपल्या मुलाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे  15/टक्के एस सी व साडेसात टक्के सत्ताधारी जात वर्गाच्या नियंत्रणात असते विकासाच्या नावाखाली ही सत्ताधारी ही आर्थिक विकास महामंडळ मधील रक्कम ते आपल्या मर्जीने कोणाचाही विचार न घेता सत्तेच्या जोरावर खर्च करतात
                समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859 
बांधकाम कामगारांसाठी ज्या बांधकाम कामगारांनी आॅनलाइन पध्दतीने नोंदणी केली आहे पण त्यांना संबंधित कामगार आयुक्त मधून कोणताही मॅसेज किंवा कामगार नोंदणी अर्ज संबंधित 
* तुमचा कामगार नोंदणी अर्ज नाकारण्यात आला आहे किंवा
* तुमचा कामगार नोंदणी अर्ज स्विकारण्यात किंवा मंजूर झाला आहे
     असा कोणताही मॅसेज दोन/तीन महिने आलेला नाही अशा बांधकाम कामगार यांनी आमच्याशी संपर्क साधा
          कामगार आयुक्त यांचे म्हणने नुसार बांधकाम कामगार नोंदणी मॅसेज केव्हा आला पाहिजे असे कोणतेही दिवस विहित करण्यात आलेले नाहीत    म्हणजे शासकीय निमशासकीय कार्यालयात विवीध दाखले नोंदणी प्रमाणपत्र किंवा इतर कोणताही शासकीय कागद नोंदवून अथवा त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी एक कालावधी निश्चित करण्यात आला आहे पण तो नियम सहहयक कामगार आयुक्त यांना बंधनकारक नाही

जातीच भांडवल

 

जातीच भांडवल 


आज सर्वत्र जातीचे राजकारण भांडवल केल जात कोणतीही योजना. विकास योजना आर्थिक विकास महामंडळ यांची कर्ज योजना. विविध संस्था. सेवाभावी संस्था. शासकीय निमशासकीय कार्यालये. विविध सोसायट्या. सुतगिरणी. विविध शालेय शिक्षण. नोकरी आरक्षण. व विविध ठिकाणी असणारी आरक्षणे. यासाठी एकच जाचक अट घातली जाते ती म्हणजे जात प्रमाणपत्र. आणि १९६७ चा जातीचा पुरावा आणि तो आपण दाखल करू शकत नाही कारणं त्यावेळी आमचे पूर्वज पोटासाठी हे गाव ते गाव फिरत होते तेव्हा त्यांना कोणताही स्थानिक निवारा नाही. कोणताही स्थानिक व कायमस्वरूपी व्यवसाय नाही मग जगायचं साधन नाही त्यांना जातीचा पुरावा कसला असतो. आपल्या पुढच्या पिढीला त्याची अडचण येणार आहे. कागद कशाला म्हणतात. हे ज्यांना माहीत नव्हते त्यांचेकडे जातीचा दाखला जातीचा पुरावा असेल का? मजूर सोसायट्या फक्त नावालाच आहेत त्यात एकही मजूर सभासद नाही मग अनुसूचित जाती जमाती सुतगिरणी.  अल्पसंख्याक विकास महामंडळ. दिनदयाळ सूतगिरणी. ही नाव जातीच्या नावाखाली  भांडवल करून चोरांनी. लाखो नाही करोडो रुपयांची टेंडर घेवून आपले खिसे भरले म्हणून म्हणतो ज्या दिवशी जात संपेल त्या दिवशी राजकारण संपेल कारण यांच्याकडे तुमच्या आमच्यात भांडण लावून राजकारण करणे बंद होईल 
              भारतीय घटनेच्या कलम ३४१ अन्वये राष्ट्रपती आदेशानुसार भारतीय समाजातील काही जातीय गटांना. अनुसूचित जाती जमाती असे घोषित केले आहे. सन १९५० मध्ये अमलात आलेल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने अनुसूचित जाती या शब्दप्रयोगाचा स्वीकार केला. सर्वसाधारणपणे मागासवर्गीय सामाजिक गट सूचित करण्याच्या हेतूने. # अनुसूचित जाती # हा शब्द प्रयोग केलेला आपणास आढळतो भारतीय राज्यघटनेने कलम ३६६ अन्वये अनुसूचित जातीची व्याख्या केली आहे भारतीय घटने पुरता विचार करावयाचा झाल्यास घटनेच्या कलम ३४१ अनुसार ज्या जनजाती अथवा जाती यांचें भाग अथवा त्यातील गट यांचा अनुसूचित जाती म्हणून उल्लेख केला असेल त्या सामाजिक गटांना. अनुसूचित जाती. असं माणले गेले आहे # अनुसूचित जाती # भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४१ (१) अनुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना अनुसूचित जमाती असं संबोधलं गेलं आहे यात एकाकी डोंगरांवर व जंगलात राहणारे व ज्यांना आधुनिक संस्कृती व जीवनाचा परिचय होए शकला नाही अशांचा समावेश होतो. अशा लोकांना # गिरीजन # किंवा आदिवासी असं म्हणलं जातं आहे यांचें मागासलेला पणा हे मुख्यतः आर्थिक व सांस्कृतिक आहे. इतर सर्व भारतीया पेक्षा शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला समाज म्हणजे अनुसूचित जाती जमाती होय. महाराष्ट्र डोंगराळ प्रदेशात घनदाट अरण्यात आदिवासी लोकांचे वास्तव्य आढळते ते बर्याच भागात विखुरलेले आहेत राज्यात आदिवासी लोकांचे वास्तव्य प्रामुख्याने सह्याद्री पर्वत. सातपुडा पर्वतरांगा. व गोंडवन विभागात ( विदर्भ मराठवाडा )येथे या जमातींचे वास्तव आढळते आदिवासी लोकांचे वर्गीकरण सर्वांनी आपल्या आपल्या स्वार्थापोटी केले आहे यात अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती. असं वर्गीकरण आपणांस पाहावयास मिळते
        अनुसूचित जाती # महाराष्ट्र शासनाने वर्गीकृत जातींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुसूचित जातींमध्ये. महार.  मांतग.  चर्मकार.  यांची लोकसंख्या जास्त आहे. याचप्रमाणे होलिया.  लोहार.  ढोर.  खाटीक. मेडगी.  मेहतर.  डोंब.  बेरड.  शेणवी.  इत्यादी जातीच्या लोकाचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र अनुसूचित जातींमध्ये नवबौद्ध यांचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे सन १९९१ चया जनगणने नुसार अनुसूचित जाती लोकसंख्या अंदाजे ८७.५८.००० एवढी सांगण्यात आली आहे. त्यांचे त्यावेळी असणारे प्रमाण लोकसंख्येच्या केवळ ११/ टक्के आहे. अनुसूचित जाती मध्ये त्यावेळी असणारे साक्षरता प्रमाण ६५/ टक्के आहे.  १९८२ साली अनुसूचित जातीची लोकसंख्या. ४४.८०.००० होती. त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ७-१ / टक्के होते.  २००१ सालीच्या जनगणने नुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या ९८.८२ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या ५०.६३ लाख एवढी नोदवली गेली आहे. व महिलांची लोकसंख्या ४८.१९/ लाख.  आहे. ग्रामीण भागात अनुसूचित जातीचे प्रमाण  ६१.७/ लाख लोक ग्रामीण भागात राहतात. राज्यात अनुसूचित जातीचे प्रमाण १०.२/ टक्के एवढेच अंदाजे देण्यात आले आहे अनुसूचित जाती  अगेर. अनमुक. आरेमाला.  आरवा माला.  बहना बहाना. बाकड बंट. बलाही. बलाई. बसोरा. बुरुड. बांसोर. बासोडी. बेडाजंगम. बुडगाजंगम. बेरड. भांबी. भांभी. असादरू. चामडिया. चमार. चमारी. चांभार. चमगार. हरळयया. हराळी. खालपा. माचीगर. मोचीगार. मादर. मादिक. मोची. तेलगू. मोची. कोमटी. राणीगार. रोहीदास. नोना. रामनामी. रोहित. समगार. सतनामी. सूर्यवंशी. सूरजवंशी. भंगी. मेहतर. ओलगाणा. सखी. मलकाना.  हलाल खोर.  लालवेगी. वाल्मिकी. कोरार.  झाडमलली.  बिंदला. बयागार. चलवादी. चेननदासर.  होलया. दसारी. डककल. डोलकलवार. चढोर. कककयया. दासर. कंकयया. डोहोर. डोम. डुमार. येललमवार. गंडा. गंडी. गरोड. गारो. घासी. घासीया.  हललीर. हलसार. हसलार. हुलसवार. लोहार. वलहार. होलय.  होलेर.  होलय. होलया. होलिया. कैकाडी. अकोला अमरावती भंडारी बुलढाणा नागपूर वर्धा व यवतमाळ जिल्हे आणि राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्ह्यात 
खंगार. कनेरा. मिरधा. खाटिक. चिकवा. चिकवी. कोलपूल. वंडलु. कोरी. लिंगडेर.  मादगी. मादिगा.  महार.  मेहरा. तराळ. घेमू मेगू. माहयावंशी.  धेड. वणकर. मारू. वणकर.  माला. माला दासारी.  माला हनाई.  मालाजंगम.  माला मस्ती.  माला साले. नेटकानी. माला संन्याशी. मांत. मातंग. मिनिमदिग.  दखनी.  मांग. म्हशी. मदारी. गारुडी. राधेमांग. मांग गारोडी.  मांग गारूडी.  मनने मस्ती. मेघवाल. मेधवार. मिठा अयलवार. मुक्री. नाडियाहादी. पासी. सांसी. शेणवा. चेणवा. सेडमा. रावत. सिंधोललू. चिंदोललू. तिरगार. तिरबंदा. तुरी. महाराष्ट्रात अनुसूचित जाती संख्या एकूण ५९ जातीचा समावेश करण्यात आला आहे
#* अनुसूचित जमाती #*
महाराष्ट्रात अनुसूचित जमाती सुमारे ४७ आहेत. यांचे वास्तव्य प्रामुख्याने डोंगराळ भागात व अरण्यात आहे. यांचे वास्तव्य सह्याद्री पर्वतमय प्रदेश.  सातपुडा पर्वतमय प्रदेश.  गोंडवन प्रदेश ( विदर्भ मराठवाडा) त्यामध्ये प्रामुख्याने # सह्याद्री पर्वतमय प्रदेश महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा प्रदेश व्यापलेला आहे. कोकणातील ठाणे   रायगड. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील. नाशिक. अहमदनगर. पुणे. जिल्ह्यात मुख्यत्वे. पश्चिम भागात अनुसूचित जमाती राहताना आपणांस दिसतात. सह्याद्री पर्वतमय प्रदेशात महादेव कोळी. वारली. पारधी. ठाकर. मल्हार. कोळी. भिल्ल. काथोळी.  कातकरी. इत्यादी जमाती आढळतात 
        आदिवासी जमाती  महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेत  ठाणे रायगड. तसेच नाशिक अहमदनगर व पुणे. जिल्ह्याचा पश्चिम भाग. सातपुडा पर्वतरांगेत नंदुरबार धुळे जळगाव अमरावती तसेच अकोला व बुलढाणा जिल्हा. विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर. व गडचिरोली तर मराठवाडा नांदेड व परभणी हिंगोली जिल्ह्यांत अनुसूचित जमाती राहतात विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा धानोरा इटापलली. अहेरी. सिरोचा नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी. अककलकुवा. नवापूर. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा ठाणें जिल्ह्यातील तळासरी डहाणू. मोखाडे व जव्हार तालुके. नाशिक जिल्ह्यातील सुरगणा व कळवण. तालुक्यात अनुसूचित जमातीचे वास्तव आहे # अनुसूचित जमाती # लोकसंख्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या १९८१ साली सुमारे ५८ लाख होती तर १९९१ साली ती ७३ लाखांपर्यंत वाढली महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीची टक्केवारी ९.३ आशी दर्शवली आहे अनुसूचित जमाती मध्ये सन १९९१ ची जनगणने नुसार साक्षरतेचे प्रमाण सुमारे ३७/ टक्के आहे. यामध्ये पुरुषाचे प्रमाण ४९/ टक्के तर महिलांचे प्रमाण फक्त २४ टक्के दाखवण्यात आले आहे सन २००२ ची जनगणने नुसार महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८५.७७ लाख आहे त्यात. पुरुषांची संख्या ४३.६८ लाख एवढी आहे. महिलांची लोकसंख्या ४२.४९ लाख एवढी आहे. राज्यात अनुसूचित जमाती ८.५ टक्के आहेत. ग्रामीण भागात अनुसूचित जमाती ८७.३ टक्के लोकांचे वास्तव्य आहे.   सन १९९१ ची जनगणने नुसार महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या सुमारे २० लाख आहे 
        महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या अनुसूचित जातीच्या सर्वे नुसार अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या ९८.८१.६५६ असून तिची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी १०.२० अशी दर्शविण्यात आली आहे  त्यानुसार पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे  ७.६२ लाख ( टक्केवारी ७.७१/टक्के ) 
नागपूर ६.९६ लाख
सोलापूर ५.७८ लाख
नांदेड ४.९८ लाख
अहमदनगर ४.८५ लाख
असे जिल्ह्याचे प्रथम क्रमांक येतात  महाराष्ट्रात वरील पाच जिल्ह्यांची मिळून अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी ३०.५ अशी आहे 
रत्नागिरी २४.५१५ लाख
सिंधुदुर्ग ३८.५३६ लाख
नंदुरबार ४१.४१२ लाख
रायगड ५३.६६७लाख 
हिंगोली १.०७.६९७ लाख 
कोल्हापूर ४.५० लाख
अमरावती ४.४७ लाख
नाशिक ४.२७ लाख
लातूर ४.०४ लाख
मुंबई उपनगर ४.०२ लाख
औरंगाबाद ३.७६ लाख
ठाणे ३.४० लाख
सांगली ३.१३ लाख
चंद्रपूर २.९७ लाख
भंडारा २.०२ लाख
जळगाव २.८७ लाख
बीड २.८१ लाख 
यवतमाळ २.५३ लाख
सातारा व उस्मानाबाद  २.४६ लाख
बुलढाणा २.४२ लाख
वरील सर्व अनुसूचित जाती जमाती ची जिल्हावार लोकसंख्या आहे 
अनुसूचित जमाती महाराष्ट्रातील
महादेव कोळी.  वारली. पारधी. गोंड. कोकण. ठाकर. मल्हार कोळी. भिल्ल काथोडी. गोमित. ढाणका. माडिया. गोंड. कोया. हळबा. गोंड. ही सर्व यादी अनुसूचित जमाती यांची आहे 
             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

शेळी अडकली जात वर्गवारी मध्ये

 

शेळी अडकली जात वर्गवारी मध्ये

      शासन दुर्गम अतिदुर्गम भागातील लोकांना हक्काचा शेती निगडित व्यवसाय मिळावा यासाठी शेळीपालन. कुक्कुटपालन. मत्स्यपालन. वराह पालन. ससे पालन. शेततळे. असे विविध शेतीसी निगडित व्यवसाय करून तरुणांना व आपल्या लोकांना लागलेला बेरोजगारी शाप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 

             शासन विविध शेती निगडित व्यवसाय सुरू करत आहे पण त्यात मोठा साप सोडला जातो तो म्हणजे. जात वर्गवारी. अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती. इतर मागासवर्गीय जमाती. अशी वर्गवारी करून. काय त्या योजनांचा फायदा म्हणजे आमचे पूर्वज फक्त पोटभर अन्न मिळावा यासाठी आज हे गाव उद्या ते गाव फीरत होते मग त्यांच्याकडे आपण कोणत्या जातीचे आहोत कोणत्या प्रवर्गातील आहोत हे काय माहित त्यामुळे शासनाने पळवाट काढली आणि जातीचा दाखला पाहिजे असेलतर १९६७ चा पूरावा गरजेचा आहे वर उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वज अडाणी अशिक्षित त्यांना काय माहित जात व जात वर्गवारी. कसला जातीचा दाखला. कसला असतो तो कागद. माहिती नाही. त्यामुळे आज आपल्या तरुण पिढीला शासनाकडून जारी करण्यात आलेल्या विकास योजनाचा लाभ होत नाही म्हणजे

              २०१४/२०१५ रोजी शासनाने आदिवासी विकास महामंडळ यांचेकडून आदिवासी समाज सबल व्हावा यासाठी. आदिवासी शेळी पालन योजना केंद्राकडून ५ लाखांचा निधी उपलब्ध करून जारी करण्यात आली होती. त्यामध्ये. १० शेळ्या व एक बोकड बचत गटांना प्राधान्य देण्यात आले होते मला सांगा आदिवासी लोकांना महिलांना काय माहित बचत गट कशाला म्हणतात. आदिवासी जात प्रमाणपत्र काय असत. कशाला जात कोण शेळी पालन योजना मागायला या योजना व यातून मिळणारा लाभ फक्त आणि फक्त मंत्री पुढारी आमदार खासदार व त्यांचे बगलबच्चे घेतात त्यांना अट नाही का. म्हणजे ज्याच्या हातात काठी म्हैस त्याची असा प्रकार आहे. जात किंवा जातीच्या दाखल्याची अट न घालता सर्व योजना ओपन करा ज्याच्यात बॅंक अर्थसहाय्य घेवून त्याचा परतावा करण्याची धमक असेल त्याला योजनाचा लाभ घ्यावा. नाहीतर मी अस बघितले आहे की ह्या सर्व योजना पंचायत समिती यांचेकडून राबविल्या जातात. म्हणजे एकाद अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून एक दिवसांचा शेळी पालन प्रकल्प तयार केला जातो. एक दिवसासाठी शेळया एक दिवसांचे शेड. आणि एकवेळ लाभ मिळाला की शेड आणि शेळया गायब अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा मोठा आर्थिक लाभ दिला जातो. # तेरि भी चुप मेरी भी चूप # असा प्रकार वरचेवर पहायला मिळतो म्हणजे याला कारणीभूत आहेत ते म्हणजे पशुसंवर्धन विभाग व त्यांचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

        २०१७/२०१८ मराठवाडा पॅकेज धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद. यवतमाळ. गोंदिया. व सातारा. आणि दुसर्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यात. सर्वसामान्य. गोरगरीब व मागास दुर्गम अतिदुर्गम जिल्ह्यासाठी. शासनाकडून २० शेळया आणि २ बोकड असा गट वाटप करणे हा निर्णय विचाराधीन होता. आज शासनाने व मंत्रीमंडळ बैठकीत ९ जुलै २०२१ रोजी ही शेळी पालन योजना राबविण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत 

               योजनेनुसार १००/ टक्के निधी हिस्सा हा लाभार्थी व्यक्तिने वित्तीय संस्थेकडून उभा करायचा आहे. यासाठी सर्वसाधारण रक्कम २ लाख ३१ हजार ४०० रुपये असा आहे 

* २० शेळया प्रति शेळी ६००० 

१ लाख २० हजार

* २ बोकड प्रति बोकड ८०००

१६०००

* शेळीसाठी शेड ४५० चौ फुट. प्रति २१२ रू चौ फुट रूपये 

९५ हजार ४०० रूपये 

* एकूण रक्कम २. ३१ .४०० असी अनामत रक्कम शासनाने ठरवून दिले आहे 

                बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी पंचायत समिती पाटण या कार्यालयाला भेट दिली आणि संबंधित पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळी पशुसंवर्धन अधिकारी यांनी अशी माहिती दिली की अजून ही योजना आमच्याकडं आलेली नाही. त्यापेक्षा वाईट म्हणजे तालुक्याला फक्त आणि फक्त ७ गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यात अपंग व्यक्तींना ३/ टक्के आरक्षण इतर मागासवर्गीय जमाती. अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती यांना सुध्दा आरक्षण ठेवण्यात आले आहे मग राहिलं काय बाकिच्या लोकांच्या साठी. म्हणजे शेळी अडकली जात वर्गवारी मध्ये खरच आहे 

              आपल्या खरच प्रगती करायची असेल तर जात वर्गवारी रद्द करणयाची गरज आहे ज्या दिवशी जात वर्गवारी नष्ट होईल तेंव्हा राजकीय पक्षाचे भांडवल संपेल. जनता गोरगरीब लोक यांच्यासाठी ऐपतीप्रमाणे विकास महामंडळ यांची दरवाजे उघडा ज्याच्यात धमक असेल तोच स्वताच्या हिमतीवर अनुदान घेईल आणि परतफेड सुध्दा करेल मग कशी शेळी अडाकतया बघू जात वर्गवारी मध्ये

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

धर्म - आपण कोणत्या जातीचे आहोत

 


         आपण कोणत्या जातीचे आहोत हे विचारलें आज प्रामुख्याने जाते पण कोणीही आपणांस तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे विचारत नाही आणि कोठेही जात प्रमाणपत्रासारखी. धर्माचे प्रमाणपत्र नाही हा सर्वात मोठा तेढ आहे. 

                  कार्य करणेच धर्म आहे. मानवतेपेक्षा कोणताच धर्म नाही. पण तरीही जेव्हा आपण आपल्या चारही बाजूंना अनेक प्रकारचें धर्म पाहतो. तेव्हा आपल्यालाही जाणीव होते की. मानवतेबरोबरच आता कुठल्या ना कुठल्या धर्माचे नाते जुळले आहे. यासाठी धर्माबाबत आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्त्येक माणूस जेव्हा धर्म बंधनात अडकलेला आहे तेव्हा त्यांना लोकांना धरमज्ञान देणे गरजेचे आहे. या ज्ञानाचया मदतीने आपण मानवतेचा धर्म सोबत घेऊन आपले जीवन सुधारु शकतो

        दान अध्ययन. आणि कर्म यांनी आपला दिवस सार्थक करावा. दान आणि ज्ञान दोन्हीही गोष्टी माणसासाठी जास्त महत्वाच्या आहेत हे दोन्ही केलें तर माणस चे मन लागेल त्याला आनंदी समाधानी राहता येईल. त्याचा वेळ व्यर्थ जाणार नाही. माणसाला धर्म. अर्थ. काम. मोक्ष या चार मधील कुठल्याही एकाच्या प्राप्तीसाठी जर प्रयत्न केला नाही आणि अशा प्रकारचें कार्य केले नाही. ज्यामुळे असे फळ मिळावे तर मानव जन्म व्यर्थ आहे. त्या माणसांचे या पृथ्वीवर येणे व्यर्थ आहे. असा पुरुष स्वतः स्वःतावर व या पृथ्वीवर ओझे ठरतो. जीवनाचा उपयोग वेळेच्या बाहेर चांगल्या कामांत लावून करता येईल चांगलें कार्यच जीवन महान करते. हे आपणास विसरून चालणार नाही. कि जीवन अस्थायी आहे. यासाठीच या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्कर्म करण्यात घालवावा. यासाठी या जन्माच्या प्रत्त्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. मृत्यू आला तर मग काहीच राहणार नाही. न हे शरिर. न कल्पना. न अशा. प्रत्त्येक वस्तू मृत्यू सोबत संपून जातील

        सर्वात मोठी देवता आग आहे. देवता प्राण्यांच्या ह्रदयात निवास करतात. साधारण बुध्दी असणार्या साठी. या दगडाच्या मूर्ती देवीदेवता असतात. ते या मूर्ती मध्ये देवांचे दर्शन घेतात. परंतु हे कधीही विसरू नये की चांगला व्यवहार करणयारे व तीव्र बुध्दीच्या ज्ञानी लोकांसाठी या पृथ्वीवर धरतीच्या कणाकणात ईश्वर आहे यांच्यासाठी जगाच्या प्रत्त्येक ठिकाणांवर ईश्वरच ईश्वर आहे हे आपणांस धर्म सांगतो

             सत्य सर्वात मोठी गोष्ट आहे. सत्य जर सोडले तर बाकी सर्व मिथथा आहे. हे सत्य आहे की सूर्य व्याप्त आहे. हेही सत्य आहे की वायू सत्य सांगतो याचप्रमाणे या जगातील सर्व वस्तू फक्त सत्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच प्राणयाने नेहमीच सत्याचे पालन करावे. फक्त याच एका आधारावर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपणास विजय मिळतो. पुरुष सुरवातीपासूनच चंचल आहे. या जगात काही स्थायी नाही. लक्ष्मी चंचल आहे ती एका जागेवर थांबत एका जवळ राहत नाही ती रमणी आहे. पण ज्यांनी तीचा आदर केला त्याच्याजवळ लक्ष्मी कायम वास्तव्यास राहते हेही आपणस धर्म शिकवतो. आणि याचप्रकारे या जगातील प्रत्येक वस्तू आपला दिनक्रम करत असते. धन. नाते. गोते. सर्व चंचल आहे. यातील काहीही नेहमी कुणाची सोबत करित नाही. जोपर्यंत पैसा आणि संपत्ती आपणाजवळ आहे तोवरच सर्व आपल्या सोबत आहे. हे सुद्धा आपणांस धर्म शिकवतो

            फक्त धर्मच श्रेष्ठ आहे. तो अटळ सत्य आहे. आणि ते म्हणजे ज्ञानभंडार. ज्ञानच स्थायी आहे. ते कधीच प्राण्यांची सोबत सोडत नाही. माणसाची श्रवन शक्ति सर्वात महान असतें. ते ऐकून ज्ञान मिळते. ते ऐकून मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे प्राणी प्रत्त्येक चांगली वस्तु फक्त ऐकून ग्रहन करतो. तो चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी ऐकतो. परंतु वाईटापासून दूर राहून त्यांने त्याने फक्त चांगल्या व ज्ञानाचया गोष्टी ऐकावयात. हे आपणास धर्म सांगतो. नियती सर्वात बलवान आहे. प्राणयासोबत जे काही होणार आहे होणार असेल त्यानुसार बुध्दी. व तसंच प्राण्यांचा व्यवहार होऊन जातो. नियतीचा प्रभाव त्यांच्या पूर्ण शरिरावर पडतो जे होणार आहे ते अटळ आहे. जे व्हायचे आहे ते होणारच. व्हायचे ते होतेच. मृत्युला जगात सर्वात मोठी शक्ती माणले जाते. आणि अटळ सुध्दा माणले जाते. कारण मृत्यू या जगात सर्वांना गरिब श्रीमंत लहान मोठा सर्वांना खाऊन टाकतो. संसार नष्ट झाल्यानंतर राज्य शिल्लक राहते मृत्यू कधी झोपत नाही. कायम जागृत असतो. यासाठी मृत्युला विसरून चालणार नाही. मृत्युला ध्यानात ठेवून नेहमीच. चांगली कामे. चांगला व्यवहार करावेत. जीवनाचे खरे लक्ष वाईट करणे नाही. चांगलें करणे आवश्यक आहे. आपण जे काम करतो जसे करतो तसे फळ मिळतें. यामुळे मानव या संसाराच्या मायाजाल मध्ये बांधला आहे. आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा हे सगळे इथेच राहून जाते. इथले काहीही प्राणयासोबत जात नाही. त्यांच्याबरोबर जाते ते म्हणजे त्याने आपल्या पूर्ण आयुष्य भर केलेलें चांगलें वाईट कर्म हे सर्व ज्ञान आपणांस धर्म देतो

              संसारात फक्त कर्मच मुख्य आहे. करमाचेच फळ माणसाला मिळते. ही तर गोष्ट स्पष्ट आहे. माणसाला फक्त धर्माचे च. फळ मिळतें. तर मग प्राण्यांसाठी हे अत्यावश्यक आहे की नेहमी चांगलें काम करावे. इंद्रियांवर संयम आणि जीवांवर दया केल्याने बुध्दीची शुध्दी होते. कर्म प्राण्याला लहान किंवा मोठे करते. यासाठी नेहमी चांगलें कर्म करा. वाईटापासून दूर रहा. घृणा. क्रोध. लोभ माया. मोह. यांचा त्याग करा. ज्याप्रमाणे फुलात सुगंध. तिळात तेल. लाकडात आग. दुधात तूप. उसात साखर. या सर्व वस्तूंचा आपण बाहेरून त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही. आपण या सर्व गुणांचा फक्त आपण विचार करू शकतो. देव आत्मयात आहे. आपण आत्मा शरिरापासून वेगळ करू शकत नाही. माणसाच्या शरिरात आत्मा आहे हे आपण ओळखू शकत नाही. माणसाच्या विचारांवर आपण ओळखू शकतो. म्हणूनच प्राणयापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. देव कुठे आहेत ? दगडात आहे का ? उंच उंच मंदिरात आहेत का ? देव फक्त आपल्या भावनेत आहेत. भावना श्रध्दा निर्माण करते. आपली जसी भावना आहे तसे देवांचे रूप. मग त्याची मूर्ती कशीही असो. हे सर्व आपणांस धर्म शिकवतो

                ज्या लोकांनी काम. क्रोध. लोभ. माया. अहंकार. यांवर विजय मिळविला ते महान झाले. प्रत्त्येक ठिकाणी प्रत्त्येक क्षेत्रात त्यांना विजय मिळाला. जग नेहमी अंचल राहत नाही. तर मग माणसं हा विचार का करतात? ते इथं नेहमीच राहणार आहेत पण मृत्यू तर एक दिवस येणार आहे. त्याला कधीच विसरू नका. यासाठी कधीच वाईट लोकांसोबत राहू नका. शक्य असेल तर पुण्य मार्गाने कार्य करा. यासाठी फक्त ज्ञानी आणि सज्जन लोकांसोबत रहा. या मार्गाने आपण आपल्या जीवनात सुख समाधान आनंद प्राप्त करु शकतो. सर्व प्राणी मात्रावर दया करा. निस्वार्थ पणाने कार्य करा. खोटे बोलू नका. महिला मुल कुमारी कन्या यांचा अपमान करू नका. हेच काय यापेक्षा अनेक कार्य आपण भगवी कफनी कपडे न घालता. माळ धारण न करता. चंदन लेप न लावता. लोकांना ज्ञान देतो तोच नेहमीचं साधू असतो. घाण कपडे घालणारे. घाण दात ठेवणारे. कायम प्रमाणापेक्षा जास्त जेवणारे. घाणेरडे शब्द बोलणारे. सुर्योदय सुर्यास्त होताना झोपणारे. यांना स्वता लक्ष्मी जरी धनवान बनविण्याचे ठरविले तरी हे गरिब आळशी राहतात. ते नेहमीच निर्धन राहतात. ज्ञान व शास्त्र अगणित आहे. विद्येची कुठली मर्यादा नाही. परंतु हे जीवन मर्यादित आहे. यात बर्याच अडचणी आहेत. म्हणूनच प्रत्त्येक प्राणयाने ज्ञान आत घ्यायला हवे. ज्ञानी लोक चांगली गोष्ट मनांत पचवितात. तेच महान होतात. त्यांचे जीवन महान होते. असे पुष्कळ लोक आहेत जे मोठें मोठं धर्मग्रंथ वाचूनही त्यांना ज्ञान प्राप्त होतं नाही. चांगलें जेवन जेवल्यानंतर चव कळत नाही. म्हणूनच धर्मग्रंथ वाचूनही काही उपयोग नाही. म्हणूनच धर्मग्रंथ वाचण्यापेक्षा त्यातील ज्ञान ग्रहन केलें तरच लाभ मिळतो हे सर्व ज्ञान आपणांस धर्म देतो शिकवितो

            चांगलें कर्म करणारे लोक त्यांनी काम. क्रोध. लोभ. माया. मोह. यापासून दूर रहाणे गरजेचे आहे आसे लोक मुक्ति प्राप्त करतात त्यांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. फक्त भजन कीर्तन. पूजा विधी. नमाज. पडून मुक्ति मिळत नाही कर्म तर केलेच पाहिजे. कर्म यथार्थ आहे. धर्म आदर्श आहे. ज्ञान हा प्रश्न कुंज आहे. जो जीवनाच्या अंतापर्यंत रस्ता अलौकिक करित राहतो

              महाभारत. रामायण. कुराण. बायबल. असे विविध धर्म ग्रंथ आहेत पण त्या धर्मग्रंथात देण्यात आलेली शिकवन समान एकसारखी आहे. कोठेही रक्त सांडून शांती मिळणार नाही. म्हणूनच. आपण देवाला नवस करतो त्यात आपण माझी अमुक इच्छा पूर्ण होऊ दे मी तुला कोंबडा कोंबडी बकरे. कापतो असे म्हणतो पण आजपर्यंत कोणाच्या ऐकण्यात सुध्दा नाही की कोणी असं नवस केल की मी देवाला वाघ सिंह यांचा बळी देतो. का सांगा कारण गरिब दिनदूबळे यांचाच बळी दिला जातो 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जात कोणती सिध्द करण्याची गरज आहे?

 


जात कोणती सिध्द करण्याची गरज आहे. 

      अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती आणि इतर मागास मागासवर्गीय ही बाब आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना आपल्या मुलांना शिकण्याची सवलत असं विविध समाजासाठी नवीन नवीन योजना रोज शासन जारी करत आहे पण त्यात मोठा साप आहे तो म्हणजे जातींचा दाखला. आपले पूर्वज अडाणी अशिक्षित रानटी असल्यामुळे पोटासाठी हे गाव ते गाव फिरणारे होतें कुठ राहण्याचा ठिकाणा नाही. जिथं पोटभर अन्न आणि राहण्यास व्यवस्थित जागा. हाताला काम मिळेल ते आपलं गाव असी मानसिकता त्यावेळी आमच्या पूर्वजांची होती. त्यांना जातीच गांभीर्याने विचार कधी केला नाही. मुस्लिमांचे एक घर गावांत असावं कारणं गावातील कोंबडी बकरी कापून आपला उदरनिर्वाह चालवणारे असावे. आज मुस्लिम समाजच नव्हे तर इतर समाज सुध्दा अडचणीत आले आहेत या जातीच्या तेढामुळे. आमच्या पूर्वजांना काय माहित कागद. काय माहित आपल्या मुलांना आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतील की मी अमुक जातींचा आहे आज अवघड झाले आहे की आपणालाच कळणा की आपण कुठल्या जातींचे आहोत आज सिध्द करा नाहीतर योजनेपासून वंचित आज आपण ठराविक भटक्या जमाती

1/अलितकार 2/बगळले 3/वगळले 4/बडीआ 5/बजनिआ 6/बाजीगर 7/बुटटाल 8/भांड छपपरभांड मुस्लिम. भांड 9/भवैया किंवा तारगल 10/भाविण 11/भिसती किंवा पखाली. सकका. 12/ वगळले 13/बारी किंवा बारई 14/ बेरिया 15/ बेसदेवा 16/ भंडभुज. भुजवा. भूरजी. भरड भूंजा. भूरंजी. भुंज 17/ भाटा 18/ भट भाट 19/ चमथा 20/चांदलगुंडा. 21/ चरण किंवा गढवी 22/ चारोडी 23/चिपपा छिपा 24/दास किंवा दांगडीदास 25/ दावगर 26/ देपला 27/देवळी 28/देवदिग. देवाडिया. शेरीयार. व मोईली. 29/ वगळले 30/ ढोली. हशमी. डफली. 31/ वगळले. 32/ वगळले. 33/वगळले. 34/ वगळले. 35/ गंधारप. 36/गुजरात बोरी 37/वगळले. 38/ वगळले. 39/ गढवी 40/ वगळले 41/ वगळले 42/ गोचकी 43/ गुरव लिंगायत. गुरव. 44/ वगळले 45/ गवंडी. गुर्जर. कडीया. 46/हलेपेक 47/ वगळले 48/ वगळले 49/ जगीयास 50/ जजाक 51/ जतिया 52/ जातिगार 53/ जव्हेरी. परजीया. सोनी. 54/ वगळले. 55/ जोगीण 56/ जोहरी 57/ जुलाह. अन्सारी. 58/ जंगम. माला. जंगम. /विरभद्र/ लिंगायत जंगम. 59/ वगळले. चितारी. जिनगर. 60/ जाडी 61/. वगळले. 62/ कममी 63/ कापडी 64/ वगळले 65/ खाटी 66/ वगळले 67/ वगळले 68/ वगळले 69/ कोंगाडी. 70/कोरचर 71/ वगळले 72/ कचोरा 73/ कादेरा 74/ कामाटी 75/ कसबी. 76/ वगळले 77/ वगळले 78/ वगळले 79/ वगळले 80/ कुचबंध 81/ कुछारिया 82/ कुंभार. कुमहार. कुंबार. कुलाला. मूलया. लिंगायत. कुभार. 83/ कुणबी. पोटजाती. लेवा. कुणबी. लेवा पाटील. लेवा पटटिदार. मराठा. कुणबी व कुणबी मराठा. 84/वगळले. 85/ कची कोइरी. कोईरी. कायरी. व कुशवाहा. 86/ काठी 87/ कासार. पोटजाती. कंचार कचारी. 88/ लाभा 89/लडीया लढीया. लरिया. 90/ लडाफ. लडडाफ. नदाफ मनसुरी. 91/ लखेरिया. 92/ वगळले. हडाड. मिस्त्री. लुहार. लुवार. 93/ माचची 94/ मानभाव. महानुभव. भोपी. मानभाव. भोपी. 95/ वगळले. 96/ मारवार. बोरी. 97 / मे 98/ मिना 99/महली 100/ मेदार 101/महाली 102/ मिठा 103/ वगळले 104/ मथुरा 105/नामधारी 106/ नामधारी पैक 107/ निरशिकारी. 108/ नावी. न्हावी. सलमानी. हजाम. वारिक. नाभिक. नापित. महाली. वालंद. हडपद. हजजाम. नावीसेन. सलमानिया लिंगायत न्हावी. 109/ नेथुरा 110/ नोनीया. लोनिया. लुनिया. नुनिया. 111/ नककाशी. 112/ नीली. 113/ नीलकांती. 114/ नेकार जाडा 115/ पधरिया. 116/ पडीयार. 117/ पात्रदावरू. 118/ फासेचरी. 119/ फुगडी. 120/ पखाली. सकका. 121/ पांचाळ 122/ पांका 123/ पेरकी. पेरकेवाड. पेरीक. पेरीके. पेरका. 124/ पुतली. गर 125/ परीट. किंवा धोबी. तेलुगू. मडेलवार. परीट. लिंगायत परीट. लिंगायत धोबी. 126/ पाटकर. सोमवंशीय. सहस्त्रार्जुन क्षत्रिय. पटवेकरी. पडवेगार. पटेगार. पटटेगार पटवी. क्षत्रिय. पाटकर. खत्री क्षत्रिय. 127/ फुलारी. लिंगायत फुलारी. 128/ राचेवर 129/ राईकर. रायीकर 130/ बंडी 131/ रचबंधिया. 132/ रंगारी. 133/ रॅग्रेझ. 134/ राओला. रावत. राऊतीया. 135/ रंग्रेज. भावसार. रंगारी 136/ वगळले 137/ वगळले 138/ वगळले. 139/ वगळले 148/ संजोगी. 141/ सरानिया. 142/ वगळले 143/ वगळले 144/ वगळले 145/ सुपपालिंग. 146/ सुथारिया. सिंधमधील 147/ साहिस. साईस. शिस. 148/ सपेरा. 149/ शिलावाट. 150/ वगळले 152/ वगळले 153/ शिंपी. तेलुगू. दर्जी. तेलुगू. शिंपी. इदगिसी. दर्जी. साईसुतार. जैन. शिपी. श्रावकशिंपी. शेतवाल. सैतवाळ. सैतवाल. मेरूशिंपी. क्षत्रिय. शिंपी. 154/ सोनार. मारवाडी. सोनार. मारवाडी. सुतार मारवाडी. सुवर्णकार. 155/ तांडेल 156/ वगळले. 157/ तारगला 158/ थेटवार. 159/ थोरीया. 160/ तांबट. त्वष्टा. कासार. कासार. 161/ थोगती. 162/ वडी. 163/ वगळले. 164/ वंसफोड हिंदू. धरकर 165/ वगळले. 166/ वरथी. 167/ वगळले 168/ येरकुला 169/ आगरी. आगळे. किंवा काळण. 170/ भावसार. 171/ कुरहीन. 172/ नीलगार. 173/ कोसकांती. देवांग. 174/ सुतार. सुथारवाढ ई. वढई. बढई. वाढी. वाडी. वधाई. पोटजाती. झाडे. सुतार. पांचाळ. सुतार. लिंगायत सुतार. 175/ फुतगुडी. 176/ वगळले 177/ पिंजारा. पिंजारी. मनसुरि. 178/ वगळले. 179/ भिलाला 180/ वगळले. 181/ तेली. तिळवण. तेली. मराठा. तेली. तराणे. तेली. देशकरतेली. एरंडेल तेली. एकबैल तेली. सावतेली. एक बहिया तेली. 182/ माळी. पोटजाती. फुलमाळी. फुलें. हळदे. काचा. कडू. बावने. अधपभू. अधशेटी. जिरे. उंडे. लिंगायत माळी. इ. बागवान मुस्लिम. धर्मिय. भारत बागवान. मरार. मराळ. कोसरे. गासे. वनमाळी. सावतामाळी. चौकळशी. वाडवळ. राईन. बागवान. पाचकळशी. तत्सम जाती. सोमवंशीय पाठारे. क्षत्रिय पाठारे. क्षत्रिय पाचकळशी. पाठारे. क्षत्रिय सुतार. सासटीकर. घोडेखाऊ. एस के पी. 183/ लोणारी. 184/ वगळले. 185/ तलवार. कानडे. कानडी 186/ रघवी. 187/ भंडारी. बावरची. भटीयारा. मुस्लिम धर्मिय. 188/ गानली किंवा गांडली. 189/ पोवार. किंवा पवार. पोवार किंवा पवार आडनावे. भोवर भोडर भोयीर. 190/ काथार. काथार. वाणी. लाड. शाखीय. वाणी. कंठहार वाणी. वैश्य वाणी. कुलवंत वाणी. नेवीइधाकड. मिटकरी. वरणी. वाणी. बोरळ. लिंगायत वाणी. बोराळ. बोरूळ. बोरड. तांबोळी. लिंगायत तांबोळी. 191/ मोमीन. अन्सारी. 192/फकिर. बंदरवाला. 193/ वगळले. 194/ घडशी. 195/ तांबोळी. पान फरोश. मुस्लिम धर्मिय. 196/ अनुसूचित जातीतून. खिरचन धर्म सविकारलेले. 197/ लंझाड. लंझाड. 198/ यादव. अहिर. 199/ लाडसी. 200/ वगळले. 201/ वगळले. 202/ अत्तार. 203/ औधिया. 204/ बादक. बारव. 205/ बगळू. 206/ मारवार. बाओरी. मारबार. 207/ उदासी वगळले. 208/ बालसंथनम. 209/ मथुरा. बंजारा. 210/ शिंगाडे. बंजारा. 211/ लंबाडे. 212/ फानडे. बंजारा. 213/ सुनार बंजारा. 214/ धालिया बंजारा. 215/ शिंगाडया बंजारा. 216/ बाआॅरिया. 217/ कोळी बारीया. 218/ बधिनी. 219/ बेगरी. 220/ भामपटटा किंवा घंटीचोर परदेशी. 221/ पोंग. 222/. दासर. 223/ उचिला. 224/ भांडदुरा. बिललवा. थिया. बेलछेडा. 225/ खारवी. धीवर. भोई. 226/ भोयर. 227/ बिंदली. 228/ बुरबुक. 229/ चादर. 230/ चक्रवदय दासर. 231/ चांडाळ. 232/ चेनवू किंवा चेननवार. 233/ चिमूर. 234/ चिंताला. 235/ डाकलेरू. 236/ दर्जी. 237/ वगळले. 238/ कुरबा. कुरबार. 239/ हरकांत्रा मांगेली. मांगेले. पागे. संदुरी. 240/. वॅटस. भवाल. रजाक. 241/ डोममारा. 242/. गाडाबा किंवा गोडबा. 243/ गंगाणी. 244/ गारोडी. 245/ गोललेर. 246/ गोदाळ. 247/ हाबुरा. 248/ हरणी. 249/ हिल रेडिडसि. 250/ देवेरी. 251/ विनकर. वनया. बनकर. बुनकर. 252/. काछिया. 253/ कोराध. पाडलोर. 254/ कलाल. कलार. लाड. लाडवक. गौड. 255/ कांदेल. 256/ कसेरा. 257/ कसाई. कसाब. कुरेशी. 258/ कटीपामुला. 259/ किरार. 260/. खिरचन कोळी. 261/ कोराचार किंवा कोरवे. 262/ कोडक सह कोरवा. 263/ कोमाकपु. 264/ कोंडू. 265/ लखारी. 266/ लोहार. गाडा. दोडी. खतवली. पांचाळ. पंचाल. 267/. चुनारी. 268/ वगळले. 269/ माहिल. 270/ मैदासी. 271/ माझवार. 272/ मातियार. 273/ मानकर. खालु. 274/ मोंडीवार. माॅडीवारा. 275/. मुंडा. 276/ हजाम. कालसेरु. नावलिगा. कानशी. नाभिक. नाई. वालंद. 277/ पाचटभोटला. पाचटबोटला. 278/ पदमपरि. 279/. भिसती. 288/. पामूला. 281/. पंचमा. पंचम. 282/. पंडा. 283/. फर. 284/ पिंजारी. 285/ पुरवाली. 286/ राचभोया. 287/ राउतिया. 288/. संगारी. 289/. संताल. 290/. साऊनता किंवा सोनता. 291/. सावतेली. 292/. सारे. 293/ भावगर शिव. शिंपी. नामदेव. 294/. शिंगडाव. किंवा शिंगाडया. 295/. सिंधूर. 296/ सोरे. 297/. सुनना. 298/ सुननाई. 299/. भडाई. 300/. वढडेर कालावडेर. किंवा पाथरवट किंवा पाथरोड. 301/ गणिया. गांची. 302/. थोटेवाडू. 303/ तिमाली. 304/ वालवाई. 305/ वणाडी. 306/. येनाडिवाडस. 307/ येरगोलावाड. किंवा थेलला. पामालवाडस. 308/ ओडेवार. 309/. मण्यार बांगडीवाला. मणियार. मणेरी. 310/ जातगार. 311/. कराडी. 312/ कुकूवाले. 313/ वगळले खातवाढई. 314/. वगळले. 315/ कोहळी. 316/ खाटिक. कुरेशी. खाटिक कसाई. 317/ डांगरी. 318/ वेडू वाघरी. 319/ धावड. 320/ निरहाळी निराळी. 321/ चित्रकथी. हरदास. 322/ बेसता. बेसती. बेसतल. 323/. परिवार. 324/ सावलकर. 325/ हणबर. 326/ दोडे. गुजर. गुजर. लेवे. गुजर रेवे. गुजर रेवा. गुजर सुर्यवंशी. गुजर बडगुजर. तत्सम जाती. लोंढारी पेंढारी. 327/ अलकरी. 328/ गडरिया. 329/ मच्छिमार. दालदि. 330/ भालदार. 331/ अलकरि. 332/ पेंढारी. 333/ यलम. येलम. यललम. 334/ महात. माहूत. महावत. 335/ फकीर. 336/ लोंध. लोधा. लोधी. 337/ नालबंध. 338/ कुलेकडगी. कुललेकडगी. कुलाकडगी. कुललाकडगी. लिंगायत कुललेकडगी. 339/ मुजावर. 340/ मुलाणा मुलाणी. मुलाणे. 341/ ईस्ट इंडिया. ईस्ट इंडियन. खिरचन ईस्ट इंडियन. कॅथाॅलिक. 342/ नेवेवाणी. 343/ वगळले. 344/ मुस्लिम धर्मिय काकर. 345/ दोरीक. 346/ पटवा. 347/ राठोड. आर्थिक निकषांच्या आधारावर. 348/ मारवाडी न्हावी. 349/ गुरडी. गुरडि. कापेवार. गुराडी. गुरडा कापेवार. गुरडकापू. गुरडी रेड्डी.  

        वरील प्रमाणे आपण आपल्या जाती आणि पोटजाती आहेत. यात ज्या जाती वगळले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचा अर्थ असा आहे की. त्या जातीचा लेखाजोखा. शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही त्यामुळे शासनाने त्या जाती नामशेष झाल्या आहेत असे ग्रहीत धरले आहे त्यामुळे त्या जाती वगळले म्हणून उल्लेख करण्यात आला आहे म्हणजे आपण आणि आपल्या जातीची कॅटेगरी काय आहे आपण कशासाठी आणि का जगतोय याचा विचार करण्याची गरज आहे. 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या