बुद्धिचा व्यापार

 


बुध्दिचा व्यापार. 

               आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये. बुद्धिवादी लोक आपणांस पाहावयास मिळतात. काही जण वैधानिक.  तंत्रज्ञान.  शैक्षणिक.  सामाजिक.  आर्थिक तज्ञ.  वैचारिक मंथन.   लोकशाही अभ्यासक.  कायदे पंडित.  मानस उपचार तज्ञ.   मानोस उपचार तज्ञ.खेळाडू.     असे विविध क्षेत्रात अभ्यासक लोक आपल्या  देशांची शान वाढवितात.  पण आज उलट झाल आहे. आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील. उच्च शिक्षण घेऊन. बाहेर पडणारे बुद्धिजीवी वर्ग. आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास. राज्य देश यांची. चारि बाजूने उन्नती विकास करण्यासाठी आपली बुध्दी वापरत नाहीत.  आपल्याला उच्च आर्थिक किंमतीवर आपले व आपल्या देशांचे नाव उच्च स्तरावर जाईल यासाठी. आपली बुध्दी चिकाटी आपल्यातच वापरली पाहिजे. या विचारांकडे पाट फिरविली आहे आणि कोण आपल्या बुध्दिचे उच्च दाम लाविल तिकडेच असे. बुद्धिवंत जातात आणि आपले गाव तालुका जिल्हा राज्य देश यांचे आपण नागरिक आहोत. देशासाठी काहीतरी करणे. आपलं परम कर्तव्य आहे हे आपण विसरतो आणि. फक्त दे पैशासाठी आपली बुध्दी विकतात. मग यांना भारतीय नागरिक म्हणायचे का ? विचार करा. आपल्या देशात सर्व वस्तू तयार करणार्या कंपन्या आहेत.  तशी आर्थिक स्थिती आपल्या देशाची आहे आपणच आपल्या बुध्दीचा वापर करून. आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केल पाहिजे 

              बुध्दिवंताचे स्थलांतर ही एक भयानक आणि जटिल समस्या आहे. यामुळे बुद्धिवंताचे आगमन निर्गम यामुळे देशात जिल्ह्यात तालुक्यात गावात चांगलें वाईट परिणाम होतात. स्थलांतर करणारे तरुण व बुद्धिवंत भरणा आज जास्त आहे.   

* बुद्धिवहन. निर्गमन क्षेत्रात बुधदिवंताचे स्थलांतर मुळे जी उणीव निर्माण होते ती आपणास सर्वांना विचार करायला लावते. यालाच बुद्धिवहन असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही

* बुध्दी अतिरिक्ता. देशातील लोकसंख्येत आवश्यकते पेक्षा जास्त तंत्रज्ञान व उच्च विद्या विभूषित. लोक असतांत व स्थानिक अर्थ व्यवस्थेतही बुद्धिवान लोकसंख्या केव्हाही उपलब्ध होते त्या स्थितीला बुध्दी अतिरकता. अस म्हणता येईल जपान संयुक्त संस्थाने. जर्मनी या देशांत बुध्दी अतिरिकता मोठ्या प्रमाणात आहे

* बुध्दी आदान प्रदान दोन राष्ट्रांत बुद्धिवान लोकांची स्थलांतर प्रक्रिये द्वारे आदला बदल होत असल्यास त्याला बुध्दी आदान प्रदान असं म्हणता येईल. यामुळे राष्ट्राचा आर्थिक.  सामाजिक. सांस्कृतिक व शैक्षणिक. विकासाला चालना मिळते या प्रक्रियेत सहभागी झालेल्या देशांना पारसपारिक. प्रबोधनचा व वैधानिक संक्रमणाचा लाभ मिळतो 

* बुध्दी निर्यात.  व्यवसायिक दृष्टीकोन एका देशातील बुद्धिवान लोकांना दुसर्या लोकांना देशात नियमित पाठविलें जाते. कुशल श्रमिक किंवा तंत्रज्ञान. नियमित आर्थिक करारावर पुरवठा करणे म्हणजे बुध्दी निर्यात होय. अविकासित. व काही प्रमाणात विकसनशील राष्ट्रे अशी बुध्दी निर्यात करून परकिय चलन मिळते. 

         बुधदिवंता चे स्थलांतराचे भिषण परिणाम होतात. बुधदिवंताचे स्थलांतर निर्गमन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतात गरिब व विकसनशील अविकासित देशांना मोठा फटका बसलेला आपणांस दिसतो.  गरिब व अविकासित देश उच्च शिक्षणावर मोठा खर्च करावा लागतो.  तंत्रज्ञान. शास्त्रज्ञ.  अभियंते. वैद्यकीय व्यवसायिक यांच्या शिक्षणावर देशांची गरज म्हणून मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परंतु पदवी मिळालेनंतर हे तंत्रज्ञ व इतर उच्चविद्याविभूषित लोक मोठ्या पगाराच्या व चांगल्या सेवा सुविधांच्या अभिलाषेने श्रीमंत विकसित देशाकडे धाव घेतात आणि आपला देश विसरून जातात  व्यक्तिगत पातळीवर त्यांचा निर्णय योग्यही आहे परंतु  ज्या समाजाने/ शासनाने त्यांच्या शिक्षणावर प्रचंड पैसा खर्च केलेला असतो तो सर्व पाण्यात जातो आणि पदरि पडती ती निराशा. समाजाची शासनाची. बुध्दीवंत यांचेकडून राष्ट्राची उन्नती सेवा घडावी ही अपेक्षा असते परंतु कित्येक तंत्रज्ञ व बुद्धिवंत स्वताच्या स्वार्थापोटी विकसित देशांत आपली बुध्दी विकतात आणि मोठा आर्थिक लाभ मिळतात.  भारता सारख्या विकसनशील देशातून विकसित देशाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. या स्थलांतरामुळे जी बुध्दिची उणीव निर्माण होते तिला बुध्दी वहन असं म्हणलं जातं. बुध्दी वहना मुळे. विकसनशील व अविकासित देशांचा आर्थिक विकासाचा वेग मंदावतो.  

आगमन क्षेत्रातील परिणाम. श्रीमंत विकसित देशात तरुण प्रतिभा संपन्न लोकांची भर पडते. आगमन क्षेत्राला या बुद्धिवंताचा चांगलाच लाभ होतो. इंग्लंड व अमेरिका. वैद्यकीय क्षेत्रात भारतीय वैद्यकीय व्यावसायिकांचा भरणा जास्त असतो. विकसित देशांना तंत्रज्ञ बुद्धिवंत सहज उपलब्ध झाल्याने त्यांची आर्थिक विकास ची. गती अधिक वेगवान जगात बुद्धिवहन समस्या आपल्याला दुसर्या महायुध्दाच्या वेळी प्रकर्षाने जाणवू लागली आहे 

* स्थलांतराचे परिणाम.  स्थलांतराचे परिणाम निर्गमन क्षेत्रात तसेच आगमन क्षेत्रातही दिसून येतात स्थलांतरामुळे स्थलांतरित व्यक्ती नवीन पर्यावरणात व संस्कृतीत वावरते यातूनच पुढे सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन सांस्कृतिक विकास होतो.  निर्गमन क्षेत्रापेक्षा आगमन क्षेत्रात अधिक चांगलें परिणाम दिसून येतात कारण आगमन क्षेत्रात कार्यक्षम व बुद्धिवंत लोकांची भर पडते.   बुध्दीवंत स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रातील तसेच निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येच्या. आकारावर रचनेवर परिणाम होतो.  लोकसंख्या व प्रदेशातील साधनसंपत्ती पुनसथानांकन.  किंवा संतुलन होण्यास मदत होते.  स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येत घटते तर. आगमन क्षेत्रातील लोकसंख्या वाढते.  लोकसंख्येच्या आकारावर म्हणजे एकूण लोकसंख्या व तिची घनता. तिची वाढ बदलते. तसेच जनन. मृतयुता. वयोरचना.  लिंगरचना. व साक्षरता. यात संख्यात्मक बदल होताना आपणास दिसतात.  निर्गमन क्षेत्रात बालके.  महिला. व वृद्धांचे प्रमाण वाढते.  निर्गमन क्षेत्रात बुध्दी वहन.  समस्या निर्माण होते. याउलट आगमन क्षेत्रात बुद्धिवंताची व कार्यक्षम लोकसंख्येची भर पडते.  आर्थिक विकासाला. आगमन क्षेत्रातील लोकसंख्या पोषक असते. 

* आर्थिक परिणाम. आगमन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्यास त्या प्रदेशातील मानव साधनसंपत्ती गुणोत्तर बदलते साधनसंपत्ती यावरील ताण वाढतो.  आर्थिक विकास व नियोजन यांवर वाईट घातक परिणाम होतो.  मुळातच नयुन लोकसंख्या असलेल्या प्रदेशात स्थलांतर घडून आल्यास ते आर्थिक विकासाला पोषक ठरते साधनसंपत्ती विकास होतो.  मात्र अनियोजित व अनिर्बंध स्थलांतर घडून आल्यास प्राथमिक गरजांची पूर्तता नीट होत नाही. नागरि जीवनाच्या अनेक समस्या उद्भवतात.  आगमन क्षेत्रात लोकसंख्या वाढल्याने नियोजनाचा आराखडा बदलावा लागतो.  आरोग्य.  शिक्षण.  पाणी.  वीज.  वाहतूक.  व संदेशवहन. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा.  याचा नियोजन आराखडा व उचित अवलंब झाला नाही तर विशेषत नागरि केंद्रात सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्न घातक होतो.  शहरांची निकोप वाढ होत नाही. गलिच्छ वस्त्या.  प्रदुषण. सार्वजनिक आरोग्य. यांसारखे ज्वलंत प्रश्न निर्माण होतात.  निर्गमन क्षेत्रात कार्यक्षम लोकसंख्या घटते.  परावलंबीतांचे प्रमाण वाढते.  आर्थिक उत्पन्न घटते.  

* सामाजिक परिणाम. स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील सामाजिक भिननतेवर परिणाम होतो.  जाती रचना. समाजपधदती.  विवाहप्रणाली. शिक्षण. चालीरीती या सामाजिक अंगामध्ये विविधता निर्माण होतो. सामाजिक व्हायला वेळ लागतो.  आगमन क्षेत्रात अल्पसंख्यांकांचे प्रमाण वाढून प्रसंगी सामाजिक ताणतणाव निर्माण होतात.  सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.  आगमन क्षेत्रात काही अनुकूल बदलही दिसून येतो.  आगमन क्षेत्रात आचार विचार. आदान प्रदान होते.  नवीन जीवनपद्धती संस्कृती निर्माण होते.  स्थलांतरित लोक नवीन पर्यावरणाशी व संस्कृतीशी मिळते जुळते घेतात तशी त्यांना सवय लागते.  ते अधिक सहनशीलता बनतात.  आगमन क्षेत्रात बुद्धवंताची भर पडल्याने त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळतो. आर्थिक विकास होतो. आंतरजातीय विवाह.  विचारमंथन.  समायोजन. उच्च शिक्षण.  यामुळे समाजाला बुद्धिवंत लोकांचा फायदा होतो.    निर्गमन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढल्याने त्या परिस्थितीत जन्य.  आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनू लागतात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने त्या स्वावलंबी होऊ लागतात.  व्यवसायात संस्था पतसंस्था. पतपेढी.  संघटना.  विक्री संस्था.  लघु उद्योग.   शिक्षण यामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.  मात्र निर्गमन क्षेत्रातील साधनसंपत्ती पुरेपूर विकास होत नाही.  

      अंतर्गत स्थलांतरामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते.  विभिन्न चालिरिती. रुढी परंपरा.  नीतिमूल्ये.  धार्मिक विचार प्रणाली.  सण.  उत्सव.  यांची पारंपारिक ओळख संस्कृती संवर्धन यास वाव मिळतो.   काही वेळेस संस्कृती नीट न झाल्याने अल्पसंख्याक. बहुसंख्यांक. गटबाजी.  भाषावाद.  प्रांतवाद. जातीय संवर्धन.  जातीय संप्रदाय.  निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते.  सांस्कृतिक अवमूल्यन वाढू लागते ज्ञ भारतात व जगातील काही राष्ट्रात. अंतर्गत स्थलांतरामुळे. जातीयवाद. भाषावाद. प्रांतवाद. सांस्कृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

                 समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या