Showing posts with label न्याय व्यवस्था. Show all posts
Showing posts with label न्याय व्यवस्था. Show all posts

चांगल रुचत नाही चांगल पचत नाही

 


                    आपल्या देशांचे राजकारण. समाजकारण. अर्थकारण. प्रशासकीय विभाग. शैक्षणिक विभाग. विविध कल्याणकारी योजना. विविध सामाजिक संघटना. सामाजिक हिताची कार्यालये. अशी विविध माध्यमातून आपला व आपल्या समाजांचा गोरगरीब जनतेचा. सर्वसामान्य माणसाचा. आपल्या सामाजिक व्यवहारांचा एक भाग असतो. समाजाची वैशिष्ट्य आकांक्षा यांचें प्रतिबिंब राजकारणात. सामाजात प्रशासनावर पडते. तसेच यामध्ये होणार या विविध निर्णयामुळे सामाजिक व्यवहारांवर परिणाम झालेला आपण पाहतो. अशा पध्दतीने सामाजिक व्यवहार आणि राजकारण प्रशासन हे सर्व एकामेकाशी संलग्न असतात. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. विविध भाषेप्रमाणे आपल्याला आपले गाव तालुका जिल्हा राज्य देश याचा अभिमान असतो. त्या त्या प्रदेशांचा निसर्ग तेथील संस्कृती. प्रादेशिक इतिहास. साहित्य कला. त्या त्या विभागात असलेली शासन व्यवस्था याचा सुध्दा आपणास अभिमान असतो. विविध जाती जमाती विविध भाषा वेशभूषा राहणीमान चालीरीती सणवार मंगल कार्य दहन दफन विधी. त्या भागातील प्रशासकीय कार्यालये न्याय व्यवस्था याचा आपणावर चांगलाच प्रभाव असतो. 

              आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सर्वसामान्य माणसाला शासनाकडून मिळणाऱ्या राबविण्यात येणारया विविध कल्याणकारी आर्थिक सामाजिक शैक्षणिक महसुली अशा विविध योजना राबविल्या जातात त्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाकडून एक अधिकारी व कर्मचारी शासनाकडून निवडले जातात त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद. शहरी भागासाठी नगरपरिषद विभाग. महानगरपालिका. तहसिलदार. प्रांताधिकारी. नायब तहसिलदार. ग्रामसेवक. तलाठी. मंडलधिकारी. आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या अंतरंग. समाजकल्याण. महिला व बाल कल्याण विभाग. अपंग कल्याण विभाग. कामगार आयुक्त भवन. विविध योजनांसाठी आर्थिक पूरवठा करणारे विभाग. आरोग्य विभाग. शिक्षण विभाग. पाणीपुरवठा. विविध कर वसुली. नागरिकांना मिळणार या सुख सुविधा. गटर रस्ते. सफाई कामगार. गावातील सांडपाणी व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापन. असे एक नाही अनेक विभाग सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांच्यासाठी शासन नियोजन करत असतें. त्यासाठी सक्षम अधिकारी व कर्मचारी कार्यकारी अधिकारी. संचालक समिती. नियोजन समिती. यातून अधिकारी नेमले जातात. 

          वरील सर्व विभाग आणि यांच्याशी आपला संबंध संपर्क रोजचाच आहे. आपणाला आपल्या मागणी तक्रारी दाखल करण्यासाठी आपणांस वरिल विभागासी आपला दैनंदिन संबंध येतोच पण आज वरिल सर्व योजना राबविण्यासाठी किंवा अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी सक्षम असतात त्यांना मदत आपणच नागरिक म्हणून करणे आवश्यक आहे. 

            आपणांस चांगले जेवण जास्त पचत नाही. आणि आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले तर ते आपणांस रुचत नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही कारण. एखाद्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात ग्रामपंचायत किंवा नगरपालिका पोलिस स्टेशनला पंचायत समिती. येथे एखादा प्रामाणिकपणे नोकरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी आला की समाजातील काही लोक त्या अधिकारी व कर्मचारी यांचा आदर सत्कार करतात. की आत्ता आमच्या गावाला शहराला तालुक्याला जिल्ह्याला नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकारी अधिकारी व कर्मचारी मिळाला असे सर्वसामान्य जनतेला वाटते पण असेच मत त्याच गावातील शहरातील तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य. नगरसेवक. व राजकीय क्षेत्रात असणार्या लोकांना त्याचा अडसर वाटायला सुरुवात होते कारणं त्यामुळे अशा लोकांचे बोगस उधोग. गुन्हेगारी दहशतवाद. भ्रष्टाचार सामाजिक भुरटे चोरटे. सक्तीने वर्गणी गोळा करणे. खंडणी गोळा करणे. दमदाटी. छेडछाड. जीवन. नोकरी. व्यापार. आर्थिक राजनैतिक यावर अंकुश अडसर ठरणारे अधिकारी व कर्मचारी अशा राजकीय सामाजिक क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणार्या लोकांना चालत नाहीत. 

            कर्तव्य दक्ष अधिकारी व कर्मचारी यांना जीवे मारण्याची धमकी देणे. त्यांना आपला हेतू साधून घेण्यासाठी आर्थिक अमिष दाखवणे. यातून सुध्दा जर अधिकारी व कर्मचारी ऐकत नसेल तर त्याच्या अंगावर जाणे शिवीगाळ करणे किंवा शेवटी त्याला त्याला आपला राजकीय सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या कचाट्यात अडकिवणे. आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आपत्ती काळ. रोगाचा प्रादुर्भाव. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन यावेळी राजकीय व सामाजिक संघटना यांच्याआगोदर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी उन वारा पाऊस थंडी यांची काळजी न करता आपल्या सेवेसाठी सर्वात अगोदर घटनास्थळी धाव घेणारे हेच अधिकारी व कर्मचारी आहेत पण आपले दुर्दैव आहे की असे अधिकारी व कर्मचारी जास्त काळ शहरात गावात तालुका जिल्हा राज्य यामध्ये जास्त काळ नोकरी करताना दिसत नाहीत कारणं आपणांस चांगले पचत नाही चांगले रुचत नाही 

            आपल्या गावांचा शहरांचा तालुक्याचा जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी हेच अधिकारी व कर्मचारी उपयोगी पडतात त्यामुळे असे कोणतेही अधिकारी व कर्मचारी आपल्या मनाने बदली करून घेत नाहीत तर ते राजकीय व इतर दबावापोटी आपली बदली करून घेतात असे कोठेही अधिकारी व कर्मचारी करत असतील तर सर्वसामान्य जनतेने अशा कर्तव्य दक्ष अधिकारी याची बदली रद्द होण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे 

                अधिकारी व कर्मचारी हे नाममात्र आहे काय असे वाटत कारणं निर्णय कोण घेतय आणि फक्त मंजुरी आदेश वर सही करण्याचा अधिकार आहे पण त्या निर्णयाबद्दल बोलण्याचा अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना नाही. संघटित गुन्हेगारी असुरक्षितता. महिला अत्याचार. यासारख्या समस्यांमुळे सामाजिक सुरक्षा. प्रश्न महत्वाची बनत आहे. त्याशिवाय आंदोलने. दंगेधोपे. यामुळे सार्वजनिक शांतता आज धोक्यात आली आहे. यावर नियंत्रण आणणारे अधिकारी व कर्मचारी आपणांस पचत व रुचत नाहीत. कोरोना काळात सफाई व वैद्यकीय सेवा देणारे अशा वर्कर. डॉ. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा नाहक त्रास देण्यात आला होता 

           भारतीय जनतेला काही महत्वाचे अधिकार देण्यासाठी व त्यासाठी वचनबद्ध राहण्यासाठी हे संविधान समंत केले आहे संविधानाने सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. निर्माण केले आहे. समाजवाद धर्मनिरपेक्षता व लोकशाही ही या सार्वभौम गणराजयाची मूलभूत तत्वे आहेत. सर्व नागरिकांना सामाजिक. आर्थिक. व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व उपासना यांचें स्वातंत्र्य व दर्जाची आणि संधी समानता निश्चित प्राप्त करून दिली आहे. पण आम्हाला चांगले रुचत नाही आणि पचत नाही

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

पाऊस काळात पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे कारणं पाण्यापासून बरेच आजार होण्याची शक्यता असते. स्वच्छता पाळा रोगराई टाळा. आपले घर आपला परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या परिसरात कीटक नाशक औषधे फवारणी करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचेकडे पत्र व्यवहार करा

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या