जलकुंभ
पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्यांचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे . पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. मासे पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. पाण्याचे तापमान कमी केले असता ०° सेल्सियस तापमानाला ते घनरुप घेऊ लागते. तापमान अजून कमी केल्यास ४°सेल्सियस तापमानापर्यंत ते आकुंचन पावते. परंतु त्यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते आणि त्याची घनता कमी होते आणि त्याबरोबरच परिणामी ४°सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असलेल्या पाण्यावर तरंगू लागते. याला पाण्याची अपवादात्मक प्रसरणशीलता म्हणतात. यामुळे बर्फाळ हे प्रदेशातील जलचर बर्फाखालील पाण्यात जगत असतात. अणु बॉंब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी ही माणसाची मुलभूत गरज आहे .
अमृत. जल निर. जीवन. अशा विविध नांवाने पाण्याची ओळख आहे. गतकाळात पाण्याचा स्त्रोत होता तो म्हणजे नदी. झरे. ओढे. यातून लोक आपल्या व जनावरे यांना लागणारे पाणी व शेतीला लागणारे पाणी उपलब्ध करुन घेत होतें. मुबलक पाणी कोणतेही प्रदुषण नाही कारणं औधोगिक क्षेत्र नव्हते. त्यामुळे पाण्यात विविध केमिकल कंपन्या यामधून निघणारे मानवी जीवनाला घातक द्रवरूप केमिकल नदीत सोडल जात नव्हते त्यामुळे माणूस शंभर वर्षे जगत होता. नंतर काळ बदलला आणि मानवाच्या गरजा अशा अपेक्षा वाढल्या. लोकसंख्या वाढली लोकांना आधुनिकतेची चाहूल लागली लोक आळशी झाली. लोकांना पाण्यासाठी नदी ओढे झरे यांचें पाणी आणने व्यवस्थित आणि कमीपणाचे वाटायला लागले. मग गावा गावात लहान जलकुंभ तयार करण्याची संकल्पना मानवाच्या मनात आली. गावात नदीचे पाणी एका विशिष्ट ठिकाणी आणल जाऊ लागले. आणि गावातील लोक एका ठिकाणी येवून पाणी भरायला सुरुवात झाली. वरचेवर लोकसंख्या भरमसाठ वाढली. पाण्याची गरज वाढली. मग ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका तयार झाल्या आणि गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये मोठ मोठ्या पाण्याच्या टाक्या तयार झाल्या. गावाला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या टाक्या महत्वाची भूमिका बजावित आहेत. ज्याप्रमाणे सेवा सुविधा वाढल्या त्याप्रमाणे पाण्याचा खर्च सुद्धा भरमसाठ वाढला पूर्वी मोफत मिळणारे पाणी आज लिटरमध्ये आलें त्याची पानपट्टी वाढली. गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये तयार झालेल्या पाण्याच्या टाक्या बोगस बांधकाम मटेरियल वापरून बांधल्या आणि कमी वर्षातच काही पाण्याच्या टाक्या कोसळल्या. यात नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचे बगलबच्चे कंत्राटदार इंजिनिअर ठेकेदार यांनी जनतेचा पैसा लुटला. शेतकरी यांच्यासाठी विविध जल प्राधिकरणाकडून विविध योजना राबविण्यात आल्या पण त्याचे सुध्दा राजकारण चालू आहे
आपल्या परिचयाचा भाग म्हणजे घाट माथा. काही दुर्गम भाग की जिथे पाऊसाळयात मुबलक पाऊस पडतो पूर परिस्थिती निर्माण होते. पण जल सुरक्षा व संवर्धन यांची माहितीचा अभाव असल्यामुळे आल पाणी गेल पाणी अशी परिस्थिती तयार होते आणि काही दिवसांतच त्या गावाला तालुक्याला पाण्यासाठी वणवण करावी लागते. नाहीतर आठवड्यातून एकदा पाणी येते त्यावर सुध्दा भांडणं मारामाऱ्या कशासाठी पाण्यासाठी ही केवढी शोकांतिका आहे. आपल्या सुध्दा जिल्ह्याला बाजूने नदी आहे पण आज सुध्दा काही गाव अशी आहेत की त्या गावांना पिण्यासाठी पाणी नाही. कश्यामुळे आपण याचा कधी अभ्यास केला आहे का राजकारणी तेढ यामुळे आजही जनतेला या राजकारणी लोकांमुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय मालकीची किंवा गायरान जमीन पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी वापरात आणायची आहे पण अशी असणारी गायराने. मुलाणकी देवसकी. अशा जमीनी अगोदरच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी सार्वजनिक प्रयोजन दाखवून आपले आपले साखर कारखाने. कृषी विद्यापीठ. मोठे दवाखाने. औद्योगिक विकास महामंडळ. सुतगिरणी. अशा विविध स्वताच्या फायद्यासाठी बळाकावलया आहेत मग जागाच शिल्लक नाही अस कारण वेळोवेळी सांगितले जाते. आज पलूस या गावात चालू असणार्या. ठिय्या आंदोलनला आम्ही भेठ दिली म्हणजे. नदी उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार आहे कारणं पलूस हे गाव पूरबाधित गाव आहे पण अशा गावांत सुध्दा पाण्याची टाकी बांधायला जागा द्या या मागण्यासाठी आज २२ दिवस ठिय्या आंदोलन करावे लागते म्हणजे. संबंधित पालकमंत्री जिल्हाधिकारी. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांना मान खाली घालायला लावणारा प्रकार आहे. आंदोलन कर्ते यांनी केलेल्या पत्रव्यवहार नुसार पलूस शहराला पाणीपुरवठा हा अनियमित व कमी प्रमाणात होत असतो पलूस शहरांची लोकसंख्या ध्यानात घेता पलूस शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता आहे. या मागणीच्या प्रस्ताव महाराष्ट्र शासन व जलप्रधिकरण विभागाकडे पाठविण्यात आला एक. सध्या प्रस्थितीत असलेल्या पाण्याच्या टाकी जवळील नवीन बस स्थानका शेजारी गट क्र ७०/अ /३ मधील ४६ गुंठे क्षेत्र हे सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे यांना कृषी मार्गदर्शन केंद्र साठी कबजेपटटी २००९ साली देण्यात जिल्हाधिकारी अटि शर्ती घालून देण्यात आली आहे. सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे यांना मंजूर झालेल्या जागेपैकी काही जागा शासकीय प्रयोजनासाठी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी भविष्यात आवश्यक असलेस शासनास परत घेता येईल व त्यांची कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई प्रतिगृहिताना मागता येणार नाही या जिल्हाधिकारी अट नंबर ११ चया अटी शर्ती नुसार ही जागा आपल्या शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी मा जिल्हाधिकारी यांना आपल्या पलूस नगरपरिषद मार्फत मागणी करून या जागेमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करावी. ही गट क्रमांक ७० अ /३ जागा मध्यवर्ती उंच ठिकाणी आहे पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची साठवणूक व वितरण करण्यासाठी योग्य आहे तसेच पलूस शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ही जवळच आहे त्यामुळे नगरपरिषद यांचा खर्चही वाचणार आहे तसेच पाणीपुरवठा योजना ही कमी वेळात कमी खर्चात वेळेत सुरू होईल ही पाणीपुरवठा योजना दुसर्या ठिकाणी सुरू केल्यास अतिरिक्त खर्च वाढणार आहे. शासनाचा वेळ आणि पैसा वर्थ जाणार आहे सध्या असणारी पाणीपुरवठा योजना जवळीलच या गट क्रमांक ७० अ /३ मधील ४६ गुंठे जी शासन निर्णयानुसार व जिल्हाधिकारी आदेशानुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरायची आहे अशा अटि शर्ती नियम ११ मध्ये घालून दिल्या आहेत तरी सी जागा पलूस नगरपरिषद यांना मिळावी व ती मिळवून देण्यासाठी संबंधित मुख्याधिकारी यांनी प्रयत्न करावे तसेच संबंधित जिल्हा यांचे पालकमंत्री. त्या मतदारसंघातील मातब्बर नेते यांनी सुध्दा आपले वैयक्तिक हेवेदावे विसरून जनतेचे कल्याण करण्यासाठी एकत्र यावे या मागणीसाठी आज २२ दिवस झाले. सागर पाटील. रोहित पाटील हे ठिय्या आंदोलन करत आहेत पण दुःखाची बाब आहे की कोणताही अधिकारी व कर्मचारी यांना भेट देण्यासाठी आलेला नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसिलदार कार्यालय हे मिनी जिल्हाधिकारी कार्यालय माणले जाते. त्यामुळे तहसिलदार साहेब यांनी या मागणीचा विचार करायला हवा होता पण तसं झालं नाही आपल्या देशात अजूनही लोकशाही आहे का ? आपण सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक जाब विचारण्याचा अधिकार आहे का ?
पाणी सर्वात मोठा जीवनाचा स्त्रोत आहे. आपल्याला जीवंत राहण्यासाठी पाणी गरजेचं आहे. सर्व शुभ अशुभ कार्यक्रमात सर्वात मोठा रोल असतो तो म्हणजे पाण्याचा. दुष्काळ भागातील लोकांना पाण्याच्या एका एका थेंबाची किंमत विचारा. दुसरिकडे शाॅवर खाली मनमोकळ पाणी सोडून आंघोळ करणारे. पाण्याची चावी मोकळी सोडून पाण्याचा अपव्यय करणारे. जागोजागी लिकेज आसणारी टाईप लाईन यामधून गळती होणारे लाखो लिटर पाणी. पाणीपुरवठा करणारे टॅकर यामधून गळती होणारे पाणी. पाणी फिल्टर नावाखाली लाखो लिटर पाणी वेसटज होते शासन म्हणतंय पाणी बचाव पाण्याचा व्यर्थ वापर टाळा. पाणी अनमोल आहे हे सगळ कानाच्या मागून जातं आहे एक वेळ आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे आजच सावध व्हा
नदीत गणपती विसर्जन. वाळू काढणारया बोटी यातून होणारी आॅईल गळती. कारखाने विविध केमिकल. गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश यामधून येणारे सांडपाणी नदीतसोडल जात. यामुळे जलचर प्राणी आणि मानवी जीवन धोक्यात येतं त्यामुळे लोकांना विविध साथीचे आजार होतात. म्हणजे जल प्रदुषण वाचविणे आज ऐरणीचा मुद्दा झाला आहे स्वच्छ निर्मळ पाण्याला दुषित करण्याचे महापाप आपणच करतो वाईट होणार आहे एक दिवस पाण्या विरहित जीवन जगण्याची वेळ येणार
आज सर्वत्र बिसलरी पाणी पिण्याचे चोचले वाढले आहेत. पाणी कुठल आहे. नदीच आहे. बोअरच आहे. का अन्य कुठल आहे आपल्याला माहीत नसतं बाटली नवीन आतील पाणी चकचकीत दिसतं त्याचा दर्जा काय. अस पाणी बाटली केव्हा पॅक केली आहे. हे सर्व आपणांस माहीत आहे का ?
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८८०८२५८५९
बांधकाम कामगार यांनी सुरक्षा संच मागणी अर्ज २०२० मध्ये केले होते काही कामगारांचे सुरक्षा संच अर्ज ईनवहट केले गेले होते काही कारणास्तव कामगारांना ते सुरक्षा संच आणता आले नाहीत त्यांनी सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांनी संपर्क साधावा