Showing posts with label महिला दिन. Show all posts
Showing posts with label महिला दिन. Show all posts

जननी सलाम जननी सलाम - महिला हक्क व अधिकार

 


महिला हक्क व अधिकार

          "जननी देवाहूनही श्रेष्ठ " हे वाचायला आणि ऐकायला बर वाटत पण प्रतयक्षपणे आपल्या मनात महिला विषयी आपले विचार काय आहेत महिलांना शासनाने ५०/ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. आज महिला चूल आणि मूल एवढंच न करता पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतं आहेत  सुई तयार करण्यापासून वैमानिक सैनिक. नेव्ही अशा विविध ठिकाणी काम करताना दिसतात. एवढेच काय पण राजकारणात सुध्दा. महत्वाची भूमिका बजावतात. 

              राणी लक्ष्मीबाई.  राजमाता जिजाऊ.  अहिल्याबाई होळकर.  रमाबाई आंबेडकर.  सावित्रीबाई फुले. फातिमा शेख.  किरण बेदी.  मदर तेरेसा. इंदिरा गांधी. अशी एक नाही अनेक विरांगना आपल्या भारत भूमित जन्माला आल्या. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज महिला काम करत आहेत. कौतुकास्पद आहे. 

                  महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक. काय असते आपण सर्वजण बघतो पण त्यासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न सुध्दा आपण करत नाही. कामाच्या ठिकाणी महिलांना हिण वागणूक दिली जाते.  बघण्याचा दृष्टीकोन वाईट असतो.  फक्त वापर करण्याच्या हेतूने महिलांकडे बघितले जाते. त्यांना पगार कमी देणें.  समान वेतन कायद्यानुसार. एकसारखा पगार देणें बंधनकारक आहे.   त्यांना महिला कायद्यानुसार. संध्याकाळी सहा नंतर कामांवर येण्यास. तगादा लावणे कायद्यानुसार गुन्हा आहे.  डिलिव्हरी काळात. सहा महिन्यांची पगारी सुट्टी देणें बंधनकारक आहे.  वागणे बोलणे यांवर निर्बंध घालणे. महिलांच्या वर होणारें अन्याय यासाठी शासनाने विविध कायदे कलम तयार केली आहेत

             वरिल प्रमाणे सर्व शासनाच्या ध्यानात आल्यावर. रोज वृतमानपत्रात. येणार्या. बलात्कार. छेडछाड. अॅसिड हल्ले    रस्त्यात अडविणे.  जिवे मारण्याची धमकी देणे.  असे विविध महिलांबाबत प्रश्न आ वासून उभे आहेत.  

              दिनांक १/ मार्च २०२१ रोजी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ ( प्रतिबंध व निवारण )! अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार व समितीची पुनर्रचना करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे  या अगोदर. महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक म क क २०१०/ प्र क्र म क क दि. ११/०६/२०१०! व महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक म क क २०१० / प्र क्र ६३/ म क क दि १९/०६/२०१४  तसेच. सा प्र वि कार्यालयीन आदेश क्र संकीर्ण _२७१९/ प्र क्र ३६/ का- २१ आस्था दि ०७/०३/२०१९ ‌असे विविध शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत पण त्यांची अंमलबजावणी कितपत झाली माहिती नाही आजही आमच्या आई बहीण सुरक्षित नाहीत. त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. केंद्र शासनाकडून कामाच्या ठिकाणी महिलांचे छळापासून संरक्षण ( प्रतिबंध मनाई व निवारण ) अधिनियम दि २३/०४२०१३ व त्या अंतर्गत दिनांक ९/१२/२०१३ रोजी नियम प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याबाबत महिला व बालविकास विभागाला शासन निर्णय दि १९/०६/२०१४ रोजी सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार मंत्री आसथापनेत अधीनसत मा मुख्यमंत्री सचिवालय.  मा मंत्री व मा राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील कार्यरत महिला अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती अध्यक्ष नियतनवयोमानानुसार सेवानिवृत्त झालया आहेत तसेच समितीचे सदस्य सधसथितीत मुख्यमंत्री सचिवालयात कार्यरत नसल्यामुळे व समितीची पुनर्रचना करण्याचे प्रस्तावित होते. प्रशासन विभाग शासन निर्णय दि ७/३/२०१९ अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम २०१३ अंतर्गत मंत्री आस्थापना अधीनसत मा मुख्यमंत्री सचिवालय. मा मुख्यमंत्री. मा मंत्री व मा राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील प्रतिनियुक्तीने कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लैंगिक छळाबाबत येणाऱ्या तक्रारींची चौकशी करणे व त्यानुसार कार्यवाहीची शिफारस करणे याकरिता प्रत्त्येक शहरात जिल्ह्यात. तालुक्यात राज्यात देशात महिला तक्रार समितीची पुनर्रचना करण्यात यावी 

          (१) मा मुख्यमंत्री सचिवालय. मा उप मुख्यमंत्री. मा मंत्री व राज्यमंत्री कार्यालयात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांना याद्वारे शासन आदेश देत आहे की त्यांना छळासंदरभात कोणतीही तक्रार आल्यास ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष किंवा सदस्य सचिवांकडे सादर करावी

       (२) उपरोक्त समिती मा मुख्यमंत्री सचिवालय. मा उपमुख्यमंत्री मा मंत्री व मा राज्यमंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीने कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यापासून लैंगिक छळासंदरभात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करून कारवाई शिफारस करण्यात यावी

      (३) उपरोक्त समितीच्या नावाचा फलक विभागाच्या दर्शनी लावण्यात यावा  २१ अ नुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी

" प्रत्त्येक महिलेला माहिती असने गरजेचे आहे हे अधिकार "

(१) रात्री करू शकत नाहीत अटक

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही. अगदी महिला शिपाईही तसे करु शकत नाही. फारच गंभीर गुन्हा असल्यास न्यायालयात अटकेचे लेखी कारणं द्यावे लागते

      (२) प्रायव्हसीचा अधिकार

बलात्कार पीडिता खासगीत जबाब देऊ शकते. त्या वेळी मॅजिस्ट्रेट सोबत असतात पीडित लेडी काॅनसेटेबल आणि पोलिस अधिका-यांनाही गुप्त जबाब देऊ शकते पोलिस सर्वांसमोर जबाब देण्यासाठी. दबाव आणू शकत नाही

   (३) कितीही काळानंतर तक्रार देता येते

      अनेक महिला समाज  कुटुंब वा इतर कारणांमुळे पोलिसांना घटनेनंतर तक्रार करत नाहीत. अशा वेळी महिला उशिरानेही तक्रार करू शकतात. ही तक्रार नोंदवायला पोलिस नकार देऊ शकत नाहीत. महिला ईमेलचया माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात

(३) झीरो एफ आय आर चा अधिकार

   रेप पीडित महिलेला झीरो एफ आय आर चा अधिकार अाहे अशा केस मध्ये महिला कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार देऊ शकते

(४) चौकशीसाठी बोलवू शकतं नाहीत

 कोणत्याही महिलेला चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावले जाऊ शकत नाही. महिलेची चौकशी तिच्या घरिच एखाद्या महिला पोलिसांच्या उपस्थितीतच करू शकतात

(५) गोपनीयतेचा अधिकार

रेप केस मध्ये महिलेची ओळख गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. पोलिस अथवा प्रसार माध्यमे कोणीही पिडित महिलेचे नाव उजागर करु शकत नाही

(६) डिलिव्हरी काळात महिला कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी करू शकत नाही

(७) कोणत्याही वेळी कोणत्याही हाॅटेलमधये तुम्हाला पिण्याचे पाणी मागणी करता येते तसेच. वाॅशरुमचा वापरही करु शकता तेही मोफत

(८) कायद्यानुसार एखाद्या हाॅटेलमधये अविवाहित जोडप्याला प्रवेश नाकारण्याचा अधिकार नाही

(९) महिलांना एखाद्याच्या विरोधात थेट आयुक्त किंवा उप आयुक्त इमेल किंवा रजिस्टर पोस्टाने तक्रार नोंदवता येते

(१०) एखाद्याला अटक केल्यानंतर २४ तासात कोर्टात हजर करावे लागते. नसता पोलिस त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत

(११) मुली आणि मुलांना कायद्यानुसार. समान वारसाहक्क असतो

(१२) लग्नाला किमान एक वर्ष झाल्याशिवाय एखाद्या दांपत्याला घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही

(१३) पोलिस अधिकारी एखाद्याला अटक करताना किंवा विचारपूस करताना तो पोलिस आहे हे लक्षात येईल असे कपडे परिधान करणे किंवा ओळख दाखवणे बंधनकारक आहे

(१४) सुर्यास्तानंतर आणि सुर्यास्तापूरवी महिलांना अटक करता येत नाही

(१५) एखाद्या महिलेवर थेट व्याभिचाराचा आरोप लावता येणार नाही

(१६) तुमची तक्रार नोंदविण्यास नकार देणा-या किंवा टाळाटाळ करणा-या पोलिसाला ६ महिने ते २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते

(१७) विवाहित जोडप्याला दोन मुले किंवा मुली ( दोन समलिंगी ) दत्तक घेता येत नाही एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घेता येते

(१८) एकटा पुरुष असल्यास त्याला मुलगी दत्तक घेता येणार नाही

(१९) एखाद्याला अटक केल्यावर त्याला अटक का झाली कारणं काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे

(२०) एखाद्याचा रेकाॅडेड फोन काॅल न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो

(२१) गुन्हा कोठेही झाला असेल तरी महिला कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवू शकते पोलिस तक्रार नोंदवून घेण्यास नकार देऊ शकत नाही

(२२) बलात्कार प्रकरणात मोफत कायदेशीर सल्लागार व मदत मिळविण्याचा अधिकार महिलेला असतो

(२३) बलात्कार पीडितेला पोलिसात तक्रार न करता डॉ कडे वैद्यकीय तपासणीसाठी जाता येते

(२४) बलात्कार झाला किंवा याबाबत डाॅकटरचे मत हा अंतिम पुरावा ग्राह्य धरला जात नाही

(२५) ब्रिथलायझर चाचणीस नकार दिला तर एखाद्याला मद्यपान केल्याच्या आरोपावरून अटक करण्यासाठी पोलिसांना वाॅरंटची गरज नसते

(२६) महिला आरोपीला महिला पोलिसच अटक करू शकते तेही सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या काळात

(२७) कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांना समान वेतन मिळण्याचा हकक असतो

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

महिला आर्थिक विकास - A. MUNDE

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

बचतगट संकल्पना रचना व देखरेख 



          दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना एक आधार मिळावा थोडी थोडी बचत करता यावी यासाठी शासनाने महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे कडून दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यातून स्वयं सहाय्यता महिला बचत गट हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येतो

         परावलंबातून स्वावलंबनाकडे व स्वावलंबनाकडून परस्परावलंबनाकडून जाण्याकरिता स्वेच्छेने सहमतीने एकत्र येऊन केलेला गट म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट होय. यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले आहे कारणं दारिद्र्य रेषेखाली गरिब गरजू असे लोक येतात त्यामुळे त्यांच्या व्यवसायातून व इतर काम करून येणारी मिळकत जेमतेमच असते त्यामुळे त्या व मिळकतितून अगदि अल्पशी बचत करता यावी यासाठी शासनाने महिला आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून महिला बचत गट हि संकल्पना अमलात आणली त्याची रचना कार्यपद्धती देखरेख आर्थिक देवाण-घेवाण. या सर्वांची माहिती सर्वसामान्य गरिब घरातील महिलेला नसते कर्ज प्रकरणे मंजूर झाली किती झाली बचत गटातून वाटप करण्यात आलेल्या कर्जाचे व्याज किती गोळा झाले ज्या महिलेच्या नावावर कर्ज पडले आहे ते कर्ज तीच महिला वापरते का नाहि तर कर्ज नावावर एकाच्या आणि वापरतय एक असे प्रकार होतात महिन्याला बचत गट मिटींग घेतलीं जाते का ? बचतगट अधक्ष उप अधक्ष बचत गट व्यवहार बरोबर चालतेत का  ? घरगुती बचत बँक. भिशी पोस्ट. पतपेढी. व खाजगी पतपुरवठा संस्था खाजगी सावकार. या सर्व माध्यमाच्या तुलनेने अधिक विश्वासाची व अनौपचारिक असे बचत माध्यम आहे

(अ) बचत गट मूलभूत संकल्पना

(१)! १० ते २० गरजू महिलांचा समूह

(२)! गटातील सर्व महिला एकाच वस्तीतील गल्लीतील शेजारी शेजारी राहणाऱ्या समान विचारांच्या समान आर्थिक परिस्थिती असणार्या महिलांचा समावेश

(३) दरमहा ठराविक ठिकाणी ठराविक रक्कम ठरलेल्या दिवशी जमा करतात

(४) गटाला सर्वांच्या मते नाव देणे ( गट प्रमुख. व उप गट प्रमुख ) अधक्ष व सचिव सर्वानुमते निवडले जातात

(५) बचत गटाच्या नावे बॅंक खाते उघडणे अधक्ष सचिव यांना सहि करण्याचा अधिकार दिले जातात

(६)! बचतगट स्थापन झाल्यापासून कमीतकमी ३ ते ६ महिन्यापर्यंत फक्त बचत करणे

(७) त्यानंतर आपल्याच साठलेल्या एकूण बचतीच्या आधारे गटांतील गरजू महिलांना ठराविक व्याज दराने सर्वानुमते कर्ज दिले जाते

 (८) कर्जाची गरज व कारणं ध्यानी घेऊन त्या आधारे कर्ज वाटप करण्यावर भर असतो

(९) गरजू व पिडित महिलेच्या गरजेला प्राधान्य दिले जाते

(१०) सावकरापेक्षा कमी व बॅंकेच्या जवळपास थोडक्यात वाजवी व्याज दराने कर्ज वाटप करून महिलांच्या दैनंदिन गरजा भागविता येतात

(ब) बचतगट व त्याची उद्दिष्टे

(१)एकामेकाशी मोकळी चर्चा करण्याकरिता व्यासपीठ तयार करणे

(२)!विचारांची अनुभव देवाण घेवाण करण्यासाठी एक साधनं निर्माण करणे

(३)! महिलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे

(४)!बचतीची सवय लागण्यासाठी

(५) आत्मशक्ती जाणीव व आत्मसाक्षरते करिता 

(६)! महिलांचा आर्थिक सामाजिक उन्नती

(७) गाव विकासात दबाव गट म्हणून काम करण्यासाठी

(क) बचतगट का ? आणि कशासाठी

(१) बचतगट हे महिला एकत्र आणून विचार करायला लावण्याचे माध्यम आहे तसेच गट व्यवस्थित चालला तर सावकार अदि शोषक घटकांपासून दूर राहणे सहज शक्य होईल

(२) विविध महिला एकत्र परस्परांशी सुख दुःख देवाण घेवाण करणे शक्य होते

(३) बचत गटामुळे महिलांना बचतीची सवय लागते परस्पर माध्यमातून एकमेकांना आर्थिक सहाय्य करून दैनंदिन अडचणी सोडवता येतात

(४) बचत गटामुळे केवळ आर्थिक विकासाचे मार्ग व संधी मिळत असे नव्हे तर त्या बरोबर विविध प्रशिक्षण बाहेरील अनुभव इ मुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तसेच घरात बॅंकेत आणि गावात स्वताची पत निर्माण होते

(५) घरातील गावातील समस्या सोडविताना निर्णय प्रक्रियेत कृतीशील सहभाग घेता येतो

(६)! महिलांना विविध प्रश्न अडचणी याची जाणीव होते व त्या निवारण करण्यासाठी त्या सदैव तयार असतात

(७) बचत गटामुळे महिलांना राजकीय शक्ती प्राप्त करून घेण्याची संधी मिळते

(८) एक व्यक्ति म्हणून जगताना एक स्त्री म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी बचत गटांची गरज आहे

(९) बचत गट हे महिलांना स्वावलंबी मानसिक. आर्थिक वैचारिक. व सामाजिक प्रगती साधण्याचे माध्यम आहे

(ड) स्वयंसहाय्यता बचत गटांची वैशिष्ट्य

(१) बचत गटांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो

(२) सर्व सभासदांच्या सहमतीने निर्णय घेतला जातो

(३) जात लिंग. गरिब सामाजिक प्रतिष्ठा यांचा कोणताही भेदभाव न करता सर्व सभासद समान असतात

(४) महिलांना एकत्र येण्याचे अनौपचारिक व हक्काचे व्यासपीठ म्हणजे बचत गट आहे

(५) सभासदांमध्ये पैसयाचे धन याची फक्त देवाण घेवाण न होता मायेच्या प्रेमाच्या व एकमेकींच्या सुख दुःख गप्पांचा मन व्यवहार होतों

(६)! एकाच वस्तीतील गल्लीतील वाडीतील राहून सुध्दा एकमेकी बद्दल आपुलकी विश्वास नसतो तो गटामध्ये आल्यावर तयार होतो

(७) गटातील महिला एकमेकींना अडचणीतून तोंड देण्यासाठी मानसिक आधार कुटुंबातील घरगुती अडचण सोडवण्यासाठी सुध्दा मदत करतात

(८) महिलाचा उदेश मी पासून आम्ही पर्यंत मोठा होतो

(ढ) बचतीचे इतर माध्यम व बचत गट यातील फरक

(१) घरगुती बचत. डब्यात. मडक्यात. पेटित. किंवा शेजारच्या कडे बहिणीकडे ननंदेकडे  दिसलेली बचत सुरक्षित नसते आणि ती कायम चालू राहतं नाही

(२) बॅंक ताबडतोब आणि अडचणी वेळी अचानक गरजे वेळी पैसे मिळतीलच याची खात्री नाही खाते उघडण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता लागते बॅंकेत यंत्राप्रमाणे फक्त आर्थिक पैसयाचे व्यवहार होतात बचतीचे प्रमाण जास्त लागते

(३) भीशी पोस्ट पतपेढी. खाजगी पतपुरवठा. जमा केलेला पैसा एकदाचं मिळतो ऐनवेळी गरजेला मिळत नाही म्हणून या सगळ्यांपेक्षा सोपा साधा सरळ व्यवहार हा बचत गटांचा असतो

(ण) स्वयंसहाय्यता बचतगट नियमावली

(१) सभासद एकाच गाव गल्ली वाडी

(२) सभासद गरजू व गरीब असावेत

(३) सभासदांमध्ये आपुलकी विश्वास एक विचार एक मत असावे

(४) सभासदांमध्ये जाती भेद असु नयेत

(५) सभासद समान आर्थिक स्तरातील असावेत

(६) सभासद संख्या १०/२०

(७) गटाच्या बैठकीची वेळ तारिख निश्चित असावी

(८) गटाची बैठक फिरती किंवा मध्यवर्ती ठिकाणी असावी

(९) गटाच्या बैठकीत सर्वांनी गोलाकार व पातळीत बसावें

(१०) गटाच्या बैठकीत सर्व सभासद उपस्थित असावेत

(११) गटामध्ये गरजेनुसार गैरहजर राहणाऱ्या सभासदांना दंड आकारण्यात यावा

(१२) गटाची बचत बैठकीतच गोळा केली पाहिजे

(१३)!बचत वेळेवर न भरणाऱ्या सभासदांना दंड केला पाहिजे

(१४) अधक्ष. सचिव. ( संघटिका व सहसंघटिका ) यांची निवड सर्वानुमते व्हायला हवी

(१५)! सभासदांना कर्ज वितरण करताना व्याज दर हा सर्वांनी मिळून ठरविला पाहिजे

(१६)! सभासदांना कर्ज दिल्यानंतर परत फेड समान हप्ते ठरवून सभासदास मुदत देण्यात यावी समान १० हप्ते मर्यादा असावी

(१७) कर्जासाठी जामीनदार बचतगटातीलच असावा

(१८) कर्ज देत असताना अत्यावश्यक गरजेला प्राधान्य द्यावे

(१९) कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यास सभासदावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी

(त) बचतगट सभासद जबाबदारी

(१) सभासदाने नियमित मिटींगला हजार राहणे

(२) गटांची बचत वेळेवर जमा केली पाहिजे

(३) गटांचे नियम तयार करून त्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे

(४) सदस्यांनी गटांचे पैसै भरण्यास बॅंकेत गेले पाहिजे कामांचे वाटप करुन घेणे

(५) मासिक सभेला गैरहजर असणार्या सभासदाला दंड केला पाहिजे

(६) दंड देताना कोणत्याही महिलेने तक्रार मांडू नये

(७) सामूहिक कार्यक्रमास प्रत्येक सभासदाने मदत केली पाहिजे

(८) प्रत्त्येक महिन्याला अधक्षाकडून हिशेब घेतला पाहिजे

(९) रेकॉर्ड व्यवस्थित लिहिले जाते का ? ते पाहणे

(१०) सभासदांचा एकामेकावर विश्वास असला पाहिजे

(११) आकस्मिक गरजेला मदत केली पाहिजे

(१२) एकामेकाना प्रशिक्षण घेण्यास सांगणे प्रशिक्षणात मिळणारी माहिती इतरांना सांगणे

(१३) महिलांना उधोग साठी प्रवृत करणे

(१४) साक्षर महिलांनी निरक्षर महिलांना शिकवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे

(१५) शिक्षित महिलांनी रेकॉर्ड लिहण्यासाठी संघटिकेला मदत केली पाहिजे

(१६) सभेमध्ये गटातील महिलांना कर्ज देताना सर्वानुमते निर्णय घेतला पाहिजे

(१७)! बचतगटामधये ग्राम विकासासाठी कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत

(१८) सभेच्या शेवटी सभेच्या अहवालावर सह्या केल्या पाहिजेत

(थ ) संघटिका व सहसंघटिका यांची जबाबदारी

(१) बचतगट सभेचे आयोजन करणे

(२) गटाच्या मिटींगला गटप्रमुख यांने जातीने उपस्थित राहावे

(३) सर्व गटांचे व्यवहार लिखीत असावेत

(४) बचतगटांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे

(५) बचतगट गटाच्या कामांवर देखरेख योग्य वेळी सहाय्यता आर्थिक मंजूरी बैठक बोलावणे

(६) गटाच्या गरजा व प्रश्न बरोबर ओळखणे आणि त्यांचे उत्तर सहभागाने देणें

(७) बॅंकेतून किंवा गटातून कर्ज. द्यावयाचे असल्यास गटातील सर्व सभासदांना बोलावणे आणि कर्ज समान वाटप करणे

(८) गटाने रेकॉर्ड हाताळणे व व्यवस्थित ठेवणें

(९) प्रत्त्येक महिन्याला सभासदांना बॅंकेत घेऊन जाणे

(१०) गटातील महिलेवर अचानक अडचण आल्यास तीची अडचण विचारात घेऊन सहकार्य करावे

(११) गटातील सभासदांचा विश्वास संपादन करणे

(१२) इतर शासकीय विभागाशी संपर्क साधने त्यांच्याकडून माहिती मिळविणे

(१३) गटाच्या नियमांचे स्वता पालन करणे व इतरांकडून पालन करून घेणे

(१४) सामाजिक कार्यात सभासदांना प्रतिसाद देणे

(१५)! गटामध्ये विविध उपक्रम व योजना राबविण्यात मदत करणे

(१६) सभासदांमध्ये सहकार्याची भावना तयार करणे

(१७) विधवा व निराधार महिलांना योजनांचा लाभ मिळवून देणे

(१८) प्रशिक्षणाला उपस्थित राहणे

(१९) मासिक सभेची पूर्वसूचना देणे

(२०) संघटिकेने आपलीं जबाबदारी दुस-याला दिली पाहिजे

(२१) सर्व सभासदांना समान वागणूक देणे

(२२) क्षेत्र भेटी कार्यक्रमाचे आयोजन

(२३)! उद्योगासाठी महिलांना प्रवृत करणे

(२३) गट आदर्श कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे

(२४) सभासदांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे

(२५) विविध विषयांची तयारी करणे

( द) आदर्श गट संकल्पना

(१) गटांची मासिकं सभा ठरल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी झाली पाहिजे

(२) गटाच्या मासिकं सभेला १००/टक्के उपस्थित असलीं पाहिजे

(३) गटांची मासिकं बचत सभासदाने वेळेवर सभेत दिली पाहिजे

(४) गटांची नियमावली लेखी असायला हवी

(५ ) गटातील कर्ज वाटप घेणें देणे सभेतच झाले पाहिजे

(६) गटातील सर्व लिखाण वेळेवर सभेतच झाले पाहिजे

(७) गटातील मासिकं सभेला गैरहजर असणारे सभासद यांना योग्य दंड करण्यात यावा

(८) गटातील सभासदाने बॅंकेचे व गटांचे कर्ज वेळेत व्याजासह परत फेड करते बंधनकारक आहे

(९) गटांचे व बॅंकेचे कर्ज परत फेड न करणार्या सभासदावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी

(१०) गटातील महिलेला वयक्तिक उपयोगासाठी कर्ज हवे असल्यास तीला गटाने मदत केली पाहिजे

(११) गटांचा सामुहिक उधोग असल्यास त्यावर महिलांची देखरेख असली पाहिजे

(१२) बचतगटांनी व्हिडीसी सभासदांचे सहकार्य घेऊन गटांचे काम केले पाहिजे

(१३) गटातील प्रत्त्येक सभासदाने कोणत्याही अडचणीला सामोरे जावून समोर येण्याची तयारी ठेवली पाहिजे

(१४) गटाने बॅंक व्यवहार चांगला ठेवला पाहिजे

(१५) गटाने आपल्या गावातील अडचणी लक्षात घेऊन त्या निवारण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

(१६) गटाने ग्राम विकासासाठी योग्य ते कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत

(१७) गटाच्या मासिकं सभेत सामाजिक व गावातील प्रशनावर चर्चा व्हायला हवी

(१८) गटाच्या कामकाजाची सर्व सभासदांना माहिती असायला हवी

(१९) गटातील वैयक्तिक अडचणी दूर करण्यासाठी सभासदांनी एकामेकाला मदत केली पाहिजे

(२०) गटाने त्रेमासिक सहामाही. वार्षिक सभा बोलावली पाहिजे

(२१) शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ सदस्याने घेतला पाहिजे

(२२) गटातील सभासदांमध्ये सहनशीलता असायला हवी

(२३) गटांचा इतर कार्यालयाशी संपर्क असला पाहिजे

(२४) गटांचा निर्णय सामूहिक असायला हवा

                 महिला सबलीकरण व्हावे आर्थिक विकास होण्यासाठी अनेक गरजू गरीब दारिद्र्य रेषेखालील महिला एकत्र येवून आपापल्या परीने आपलीं बचत उभीं करत असतात त्यामुळे महिला संघटन लवकरात लवकर होते पण आज महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे पण आज या एकामेकांच्या सुखात दुःखात आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी एकत्र आलेल्या महिला बचतगटांना राजकारण्यांचे वारे लागतं आहे  नामांकित व्यक्तिनी निवडलेली काही महिला या गटात मिसळून आयत तयार संघटन आपापल्या  फायद्यासाठी वापरतात काय याचा धोका वाढला आहे गॅस वाढला काढा मोर्चा डिझेल पेट्रोल महाग काढा मोर्चा महागाई वाढली मोर्चा काढा अशा विविध कारणांसाठी मोर्चा काढला पाहिजे कारणं गरज सर्वांची आहे पण वयक्तिक बचत गटाच्या माध्यमातून असे मोर्चे निघाले पाहिजेत त्याला राजकारण आणि नेते यांची गरज नाही रोज करा तवा खा अशा कोणत्याही व्यक्तिचा मोर्चासाठी वापर करु नका स्वता संघटन करा आणि मग बघ

  मी कोणत्याही पक्ष संघटना सेवाभावी संस्था याचे समर्थन करत नाही

 समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

जागतिक महिला दिन - WORLD WOMEN'S DAY ...

तिचे मानसिक संतुलन बिघडले - मानवसेवा ने दिले adhar- Manavseva project....

बालविवाह बालविवाह - A.MUNDE ...

तिचे मानसिक संतुलन बिघडले - मानवसेवा ने दिले adhar- Manavseva project...

जागतिक महिला दिन - WORLD WOMEN'S DAY

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 जगत जननी सलाम



    ‌                   धर्ती आणि स्त्री 

धरती सर्व विश्वाचा भार आपल्या हातांवर घेणारी धरती पुराण काळात उल्लेख आहे धरती आणि स्त्री यांना बरेच काही सहन व सहनशीलता सहनशक्ती करण्याची ताकद देवाने दिलेली आहे धरती वर उभयचर जलचर खेचर माणूस असे विविध जीव वावरत असतात निसर्ग झाडें झुडपे. धबधबे. हीरवळ. आणि याच धरतीमधून आपणास खाण्यास सकस अशी विविध पिके घेतली जातात हा सर्व सकारात्मक विचार झाला आत्ता नकारात्मक विचार असा आहे धर्तीवर माणसाचे वास्तव्य वाढले झाडें झुडपे यांची अमानुष कत्तल केली गेली गगणला स्पर्श करणार्या सिमेंटची जंगले तयार झाली त्यासाठी जमिनींची बेमाफी खुदाई करण्यात आली बांधकाम करण्यासाठी लागणारे पाणी मिळवण्यासाठी जमीनीत २००/३००/ फुटांपर्यंत बोअरवेल घेतली जाते जागोजागी अशी बोअरवेल घेवून जमीनीची अक्षरशः चाळण केली गेली विहीर नाले तलावे धरणे नदिपात्राची दुर्दशा याला कारणीभूत माणव आहे पण सहज आणि निमुटपणे हे सर्व सहन करणारी धरती याच जमीनीवर बंबारी झाली अनु बाॅमब चाचणी येथेच कितेक युद्ध याच धर्तीवर झाली रात्रंदिवस चालणारी वाहने याच धर्तीवर आपणास खेळ खेळण्यासाठी मैदाने. याचाच अर्थ धरती शिवाय पर्याय नाही कधी कोपली नाही आणि जर कधीं कोप आणि धर्तीवर चाललेला अन्याय सहन झाला नाही तर डोळ्यांचे पापणी लवेल एवढा जरी राग आला तर गावच्या गावं मोठी शहरे यांचें काय होते ते आपणं पाहिले आहे भुकंप नावाने सुध्दा आपला थरकाप उडतो कोयना धरण. किल्लारी. सुनामी. हे आपण नुकत एकूण आहे भोगले नाही किती सहन करायच या धरतीन म्हणून धर्ती आणि स्त्री यात सहन करण्याची शक्ती आहे ती कोणात फारशी नाही 

             स्त्री. प्रेमाचा. मायेचा आपुलकीचा. मराठी संस्कृती चा अभिमान असा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही शासनाने. मुलगी झाली हो. मुलगी जन्माला आली लक्ष्मी आली मुलगी आगमनाचे स्वागत करा पण असे घडते काय मुलगी संख्या घरात जास्त असल्यास येणाऱ्या मुलीच नाव ठरलेलं असतं. नकुशी. म्हणजे नको असणारी. वाढवताना सुध्दा मुला पेक्षा मुलगीला वागणूक वेगळीच असते सगळ्यात दुजा भाव मग ते खाणं पिणं कपडे काम. शिक्षण. राहण्यावर बंधन. फिरण्यावर बंधनं वागणूक हीणतेची मिळते मुलांना मात्र कोणतेही बंधन नाही त्यांनी कसेही वागले तरी चालेल पण बंधन फक्त मुलीवर हळूहळू मुलीचं वय वाढत असतें लगेचच आई वडील यांना मुलीच्या वयाच्या विचार न करता लग्नाची घाई होते

           गत काळात बालविवाह करण्याची प्रथा होती लहान वयात लग्न झाल्यास सासरचे रितीरिवाज. माणसात मिसळणे. संसाराची गोडी लागावी परस्थिती. वय वाढले तर लग्नात हुंडा देण्याच्या भितीपोटी अशा विविध कारणे लावून बालविवाह करण्याकडे लोकांचा कल होता नंतर समाजातील समाजसेवक यांनी हि व ब्रिटिश सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार केला आणि बालविवाह प्रथा बंद झाली आज लग्न करताना हुंडा देणे ही नवीन प्रथा रूजू झालीं मुलगा नोकरी असेल तर. जमीन जुमला. जास्त असेलतर आई वडील यांना एकुलता एक असेल तर आणि जर तो सरकारी नोकरीत असेल तर अशा विविध बेसवर हुंडा लग्न मोठ्या कार्यालय उच्च प्रतीचे शोभेल असे जेवण पाहुणचार. मागण्याचा व देणेचा व्यवहार जसे नवरदेव विकणे आहे अशा पध्दतीने पार पडतो मुलीच्या आई वडील यांची परस्थिती हुंडा देण्याची नसेल तर फक्त मुलीच्या सुखासाठी जमीन जनावरे सोने व अन्य सामान विकणारे आई वडील मी पाहिले आहेत काय त्यांनी मुलगीला जन्म देवून पाप केले आहे काय विचार करायला लावणारा विषय आहे समाजात काही समाजसेवक आणि महिला क्रांती झाली आणि १९६१ साली हुंडाप्रतिबंधक कायदा तयार झाला वरिल प्रमाणे सर्व मागण्या मान्य करून अखेर लग्न सोहळा पार पडतो मुलगी सासरी येते आणि सासरची मंडळी लालची नसल्यास जीवनाचे सोन जगात अशी काही घरे मी पाहिली आहेत की जिथे सुन लेक म्हणून वागवली जाते सासरची मंडळी लालची असल्यास पहिल्या दिवसापासून घालून पाडून बोलणे सासु सासरे नंदन यांच्याकडून जाचाला सुरवात होते बायकांची मोठी ताकद असते ती म्हणजे नवरयाची सात नवरा त्यांच्या आई वडील बहिण यांचे ऐकणारा असेलतर लग्न करून आलेल्या मुलीन कोणाकडे पाहायचं जाच सुरू होतो जेवन न देणे माराहाण करणे. शारीरिक वेदना देणे मानसिक त्रास. भाजने. कोंडून घालणे. आणि जर या सर्वांचे नाहि जमत असे दिसल्यास अंगावर राॅकेल टाकून जाळण्यासारखे प्रकार होताना दिसतात आणि याच कारण असते ते म्हणजे माहेरून. पैसा. गाडी. जागावाटपाबाबत. सोने दागिने. अशा विविध मागण्यासाठी सासरी मुलीचा छळ केला जातो पण एकंदरीत विचार केला तर मोठ्या हौसेने मुलींचे लग्न करून देणारया आई वडील यांचा काय दोष सासरच्या छळाचा मुलगी आपल्या आई वडील यांना त्रास होईल म्हणून वाच्यता सुध्दा करतं नाही आणि निमूटपणे सहन करते एक वेळ अशी येते कि त्या मुलीला तीचा जीव गमावावा लागतो अजून थोडा समाज सुधारला आणि मुलगी शिकवा तरच देश व घर शिकेल याचा खरा अर्थ समाजाला कळला आणि समाजात उठाव साक्षरता यामुळे कौटुंबिक हिंसाचार यापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने हिंसाचार प्रतिबंधक २००५ हा प्रभावी कायदा तयार केला 

     वरील प्रमाणे बालवधू किंवा प्रौढ वधू यांचे सासरी जीवन व्यवस्थित चाललें तर मुलींवर मातृत्व येते कमी वयात लग्न झालेल्या मुली बाळंतपणात दगावणयाचे प्रणाण जास्त असते त्यातून काही सुखरुप झालेल्या मुलींनी मुलीला जन्म दिला तर जाचात डबल वाढ होते मुलगा किंवा मुलगी होण्यास मुलीलाच कारणीभूत ठरविले जाते आणि घरात होणारे सर्व बिघडलेल्या कामांचा अपशकुनी म्हणून त्या मुलींवर अक्षेप घेतला जातो नाहक त्रास देणे एवढाच उद्देश असतो यात मुल मोठी होतात शाळेत जाणे त्यांचे आवरणे घरातील वाढा उष्टी काढा धुन रानातील काम शेणघाण यातच त्या माऊलींचे आयुष्य झगडत असते दुःख सांगणार कोणाला मुलगा मोठा झाला लग्न झाले आणि तो बायकोचा हात धरून शहराकडे राहावयास गेला घरात म्हातारी आणि म्हातारा दोघच वय झालेलं दवाखाना औषध यासाठी पैसा नाही जे काय होते ते मुलाला शिकविण्यासाठी खर्च केले आपल्या उतरत्या वयात आई वडील यांची देखभाल करील या विश्वासाने आत्ता या दोघांचं काय एक म्हनं आहे बाप मरावा पण आई जगावी आपली आई भिक मागून स्वता उपाशी राहून मुलाला जेवूं घालेल आई नावात सर्व विश्वाचे रहस्य दडलेले आहे देवाने सुध्दा जन्म जिच्या पोटी घेतला ती एक स्त्री आहे एवढे महत्व स्त्री जन्माला आले आपला विचार बदलण्याची गरज आहे

          आज काय परस्थिती आहे मुली शिकल्या साक्षर झाल्या पुरुषांबरोबर प्रत्त्येक कामात खांद्याला खांदा लावून काम करायला सुरुवात केली आहे वैमानिक. नौदल सैनिक पोलिस. असे कोणते काम नाही कि ते महिला करू शकत नाहीत सर्व बौद्धिक खेळ. मैदानी खेळ. यात सुध्दा प्रविण आहेत महिलांसाठी छेडछाड विरोधी कायदा. घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा. बलात्काराविषयी कायदे. असे विविध कायदे महिलांना संरक्षण देण्यासाठी राबविले जातात पण आज खरोखरच महिला सुरक्षित आहे का ? रोज एकतरी बातमी वाचण्यात येथेच शाळेत मुली सुरक्षीत नाहीत. रस्त्यावर छेडछाड होण्याचा धोका आहे. बाजारात गेलेली मुलगी घराकडे मागे येई पर्यंत आई दरवाजाकडे बघत असते कारण आज महिला सुरक्षित नाही कायदा कागदावर नको अमलात आणा  

                 ज्या देशात महिला सुरक्षीत नाही तो देश सुरक्षित असू शकतो का

                आज महिला दिन. ८ मार्च. आपण कोणाचा सन्मान करतो जे कायम आपल्या नजरेसमोर आहेत पण अशा माझ्या काही आई बहीण आहेत कि ज्या बांधकाम कामगार. वीटभट्टी कामगार. धुनी भांडी काम करणारे. सफाई कामगार. अशा आपण विचार ही करु शकणार नाही अशा ठिकाणी काम करतात त्यांच्या जीवावर लाखों रुपये मिळवणारे मजल्यावर मजले बांधणारे यांनी कधी या अशा महिलांचा कामाच्या ठिकाणी सन्मान केला आहे का ? नाही आपणास लाज वाटते एका कामगारांचा सन्मान करण्याची 

       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

आपल्या सहकार्याची गरज आहे

वाचा - 

लेखकांना जपले पाहिजे - नजीर शेख ...

न्याय विकणारी साखळी साखळी - A.Munde...

मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई -FDA...

बालविवाह बालविवाह - A.MUNDE ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या