बालविवाह बालविवाह
भारतातच नव्हे तर सर्व समाजात मंगलमय आणि आपसी संबंध जोडणारा सामाजिक नियमानुसार दोन मन दोन कुटुंबे जोडणारा दुवा म्हणजे लग्न. माणले जाते. आपल्या समाजातील समाजसेवक यांनी महिला शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविली त्यामुळे बरे वाईट महिलांना कळण्यास सुरवात झाली आणि आपल्यात होणारे बालविवाह बंदी आली पण आज सुध्दा काहीप्रमाणात बालविवाह होताना आपणास दिसतात आणि ब्रिटिश राज्यकर्ते यांनी १८९२साली संमती विवाह कायदा केला या कायद्यानुसार वयात आलेल्या स्त्रिशी तिच्या संमतीने शरीरसंबंध ठेवण्याचा अधिकार आला अशी तरतूद करण्यात आली यांचाच अर्थ विवाहाचीच शारीरिक आणि मानसिक जबाबदारी पेलण्याची क्षमता प्राप्त झाल्यानंतरच व्यक्तिस विवाह परवानगी मिळे पूर्वी विवाहासाठी कायदेशीर वयोमर्यादा १४ वर्षांची होती ती आज १८ वर्षांची केली आहे तर पुरुष वयोमर्यादा २१ वर्षांची केली आहे या कायदेशीर पध्दतीत विसंगत वर्तन म्हणजे. बालविवाह. होय म्हणजेच १८ वर्षांखालील स्त्रि व २१ वर्षांखालील पुरुष यांचा विवाह हा बालविवाह माणला जातो असा कायद्याच्या तरतुदी भंग करणाऱ्या व्यक्तिस दखल पात्र गुन्हा असला तरी प्रामुख्याने ग्रामीण व मागास प्रदेशात असे विवाह सार्वत्रिक रित्या होताना दिसतात
धार्मिक वैदिक काळानंतर कर्मकांड महत्व वाढत गेले विवाह हा स्त्रि व पुरुष यांच्यातील व एकमेव संस्कार आहे याज्ञवलकय व वसिष्ठ यांनी देखील बालविवाहाचा पुरस्कार केला देव रुषी. व पित्याने कन्येचे दान लवकरात लवकर करुन पुण्य मिळवावे अशी भावना लोकांच्या मनावर बिंबविणयात आली आणि त्यामुळे बालविवाह पध्दत जोर धरू लागली हिंदू समाज व्यवस्थेत जातीशुधता टिकविण्यासाठी आंतरविवाह सक्ती केली जात आहे मुलाने व मुलीने जातीबाहय विवाह करु नये म्हणून तीचा विवाह लहान वयातच केला जात असे वाढत्या वयाच्या मुलीला योग्य वर मिळणे साठी अधिक हुंडा द्यावा लागेल मुलगी परक्याचे धन असे मानणे म्हणून तिच्या पालनपोषण वर वर्थ खर्च करण्यापेक्षा लहान वयातच तिचे लग्न करण्यास पालक उत्सुक असत याला कारण आहे ते म्हणजे आर्थिक कोंडी संयुक्त कुटुंब पध्दती बालविवाहास पोषक ठरली विवाहोत्तर काळात व्यक्तिवर प्रापंचिक जबाबदारी एकदम येत नसे शिवाय मुलगी लहानपणी सासरी गेली तर ती सासरच्या लोकात लवकर रमेल एकरुप होईल यामुळे मुलामुलींचे विवाह लवकरात लवकर उरकण्याची मानसिकता घडत गेली मुलीचे कौमार्य जपने ही बाब चरित्र संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची माणली जाई म्हणून विवाहाशिवाय कोणत्याही मार्गाने तिचा कौमार्य भंग होऊ नये या दृष्टीने बालविवाहाला एक वाचण्याचा मार्ग म्हणून निवडले गेले बालपणी व्यक्तिवर संस्कार होत असतात व्यक्तिमत्व जडणघडण होते त्याच काळात पति पत्नी एकत्र आल्यास एकामेकाशी दृढ परिचय होतात एकमेकांविषयी प्रेम आदर वाढिस लागतो लहान वयात मुलगी सासरी गेली तर सासरचे रितरीवाज कुलाचार ती लवकर शिकते आप्त मंडळीशी सहजगत्या परिचय होतों त्यामुळे कौटुंबिक सौख्यात भर पडते म्हणून अशा कारणांमुळे बालविवाहाचा आग्रह धरला गेला समाजातील सर्वच लोक आपल्या मुलांचे विवाह बालपणी घडवून आणत असल्याने त्या काळात उशीरा होणारे विवाह नियमबाह्य माणले जात असत मुलीचा विवाह लवकरात लवकर करणे ही बाब प्रतिष्ठेची मानली जात होती मध्ययुगात सुलतानशाही व मोगल राजवटी काळात हिंदू कुमारिकांशी जबरदस्तीने विवाह केले जात असत हा असा धोका मुलींचे लग्न लवकरात लवकर करुन टाळला जात असे अद्याप बालविवाह प्रथा पूर्णपणे बंद झालेली नाही वैदिक काळात कर्मकांड महत्व स्त्रिला उपनयन विधी नाकारुन शिक्षणाची दरवाजे बंद केले मनू स्मृती प्रमाणे विवाह हा स्त्रिच्या जीवनात एकमेव संस्कार माणला जातो
बालविवाह केल्या मुळे होणारी दयनीय अवस्था म्हणजे ज्या मुलीच खेळायचे वय असते शारीरिक वाढ वय पूर्ण नसते त्यामुळे मुलीवर मोठे अगत्य येण्याची दाट शक्यता असते एखाद्या मुलांचा बाल वयातच मृत्यू झाल्यास त्या बालिका वधूला जन्मभर विधवा जिणे जगावे लागते त्या काळात भारतात बाल मृत्यू प्रमाण जास्त होते त्यामुळे बालविधवा समस्या अधिक बिकट होती हिंदू संस्कृती प्रमाणे विधवांना पुनर्विवाह करण्यास बंदी घालण्यात आली होती बालवयात शारीरिक वाढ पूर्ण नसल्याने मुल होताना स्त्रि वर मातृत्व लादले जात असे त्यामुळे बालमाता मृत्यू प्रमाण वाढले दहा बालमाता मध्ये एक बालमाता प्रसुती वेळी दगावत असे किंवा अनेक शारीरिक व्याधीने खंगत असे शारीरिक अपुऱ्या वाढीमुळे बालमृत्यू प्रमाण वाढलेले होते स्त्रिच्या शारीरिक व मानसिक वाढ होण्यापूर्वी तिच्यावर वैवाहिक जबाबदारी पडल्याने तिच्या व व्यक्ति विकासावर मर्यादा पडत असत तसेच लागोपाठ होणा-या बाळंतपणामुळे स्त्रिचे आरोग्य कायमचे नष्ट होऊन तिला अकाली वृद्धत्व येते बालविवाह यामुळे प्रजनन काळ फार मोठा मिळत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत होतीी >
शाहु महाराज महात्मा फुले आंबेडकर यांनी या प्रथेविरुधद अतिशय मोठे योगदान दिले आहे महिलांच्या शिक्षणावर जोर दिला विधवा पुनर्विवाह कायदा अनाथ महिला आश्रम स्थापना हुंडाबंदी कायदा. वधू दहन प्रथा. छेडछाड विरोधी कायदे. मुला मुलींना मोफत सक्तीचे शिक्षण. केश वपन निषेध. स्त्रि व पुरुष समानता महात्मा फुले यांनी व त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणाना तोंड दिले लोकांनी त्याच अंगावर शेण घाण टाकली शिव्या दिल्या पण शिक्षणाची गंगा त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता सर्वसामान्यांच्या घरा पर्यंत पोहचविली. शाहु महाराज यांनी आपल्या संस्थानात स्त्रि शिक्षणासाठी विविध माध्यमातून मोठे योगदान दिले बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी घटनेत भरीव तरतूद करुन ठेवली त्यामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात कोणतेही काम असले तरी महिला आज विमान चालक. नौदल. सैनिक. यामध्ये कार्यरत दिसतात विविध महिला सरक्षाणासाठी विविध प्रभावी कायदे तयार करण्यात आले
आपणास काय करण्याची गरज आहे कायदेशीर कारवाई बालविवाह विषयक कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे या कायद्याचा भंग करणाऱ्या पालकाविरूधद कायदेशीर कारवाई करण्यात यावी लोक शिक्षणाद्वारे लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे बालविवाह संबंधी दुष्परिणाम पालकांच्या ध्यानात व त्याची जाणीव पालकांना करून देणे गरजेचे आहे असे केल्यास पालक बालविवाह विरोधात उभे राहतिल. शिक्षण प्रसार करणे गरजेचे आहे आपल्या जवळ कोठेही असा बालविवाह होत असल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला द्या
आजचा महत्वाचा विषय सध्या वाढत असलेली महागाई यामुळे घरात एका कमावत्या व्यक्तिच्या जीवांवर घरातील पत्नी मुले आई वडील यांचा खर्च एकाच्या नोकरी मध्ये होणे शक्य नाही म्हणून आपल्या शासनाने किमान वेतन समान वेतन कायदा महिला ५०/टक्के आरक्षण दिले आहे महिला सुध्दा आज विविध माॅल. बाजार. कपडे दुकान. अशा विविध ठिकाणी काम करायला जातात पण समाजातील काही समाजकंटक त्यांना कामाच्या ठिकाणी निट वागणूक दिली जात नाही कामाच्या ठिकाणी नोकरी व व्यवसाय करणार्या महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते हि जबाबदारी पार पाडत असताना त्यांची मानसिक ओढाताण होते मुलांचा अभ्यास भावनिक गरजा इत्यादी कडे लक्ष देण्याची या महिलांची इच्छा असली तरी तसे करता येते नाही विभक्त कुटुंबातील महिलांना आपली लहान मुले पाळणाघर येथे ठेवावी लागतात हि मुले मोठी झाल्यावर त्यांच्याकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नसतो नोकरी करणार्या महिलाचा पती समंजस नसेल तर क्षुल्लक कारणावरून वादावादी होत असते परस्परांविषयी आत्मविश्वास वाढत जाऊन या बेबनावाची परिणीती घटस्फोटात होत असल्याचे आढळून येते कशा महिलांचा दैनंदिन संबंध त्यांच्या. वरिष्ठांबरोबर येत असतो त्यांच्यातून त्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वारंवार आपण वाचतो याशिवाय पुरुष सहकारी मनमिळाऊ स्त्रि सहकारयाकडून मैत्री अपेक्षा बाळगतात आणि त्याची पूर्तता न झाल्यास त्या महिलेला मानसिक त्रास देतात किंवा त्यांची छेडछाड करतात एकंदरीत सर्व भयानक आहे
ज्या देशात महिला सुरक्षीत आहे तो देश संस्कृती सुरक्षित आहे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
जालना जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आज रमेश कांबळे हे आज ११ दिवस उपोषण करत आहेत त्यांना कोणत्याही अधिकार व कर्मचारी यांनी अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी असणारे प्रभावी माध्यम उपोषण आणि सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला आहे जाग नाही तर हुकूमशाही सुरवातीकडे वाटचाल सुरू झाली आहे
वाचा -
कामगार आणि हडताल A . Munde ...
न्याय विकणारी साखळी साखळी - A.Munde....
No comments:
Post a Comment